आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
▼
Friday, 31 August 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2018....Evening Bulletin
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
राज्यात
अलिकडेच अटक करण्यात आलेले कार्यकर्ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे आहेत तसंच
त्यातील एकाच्या पत्रांमध्ये ‘राजीव गांधी यांच्याप्रमाणे प्रकार’ घडवण्याचा उल्लेख
असल्याचं राज्य पोलिसांनी म्हटलं आहे. रोना विल्सन आणि माकपच्या एका नेत्यादरम्यान
ईमेल संवादामध्ये ‘मोदीराज’ ‘राजीव गांधी सारख्या प्रकारानं’ संपवण्याचा उल्लेख असल्याचं
अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं.
****
कोल्हापुरातल्या
औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी आग लागली. डिझेलच्या टाकीला गळती लागल्यानं ही आग लागली.
या आगीमध्ये ऑइल आणि भांडी बनवण्याचे दोन कारखाने भस्मसात झाले आहेत. यामध्ये लाखो
रुपयांचं नुकसान झालं असून महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार बंबांनी सुमारे
दीड तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तर एक कारखानदार जखमी झाला असून त्यांच्यावर
शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.
****
येत्या
डिसेंबर मध्ये तीन राज्याच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय
जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या
उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी शंका उपस्थितीत केली.
****
औरंगाबाद
इथं एकलव्य संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज क्रांती चौकापासून एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर टीकोरा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचीत
जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण
योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या
प्रकल्प आधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
औरंगाबाद
इथल्या बीड बायपासवर आज सकाळी देवळाई चौकात हायवा ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक
दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
****
शेतमाल
हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या शासन
निर्णयाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री
व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहेत. सदर शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत
खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय भुसार संघटनेनं घेतला आहे. जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीत
मात्र खरेदी सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.
जालना
इथंही बाजार समितीमधल्या आडत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार पाच दिवसांपासून बंद ठेवले
आहेत. यामुळे शेतकरी, हमाल तसंच मापाड्यांचे हाल होत आहेत. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर
कारवाईची मागणी केली आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या समनापूर इथं जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या पाच
मांत्रिकांना काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडलं. रात्रीच्या गस्तीवरील
पोलिसांनी गोरे वस्तीवर ही कारवाई केली. या मांत्रिकांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासोबत
अन्य गुन्ह्यांचीही नोंद करण्यात आली आहे.
****
कर्जमाफी
न मिळाल्यानं बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या मुरंबा इथल्या एका शेतकऱ्यानं
आज आत्महत्या केली. या शेतकऱ्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पिंपळगाव शाखेतून पीक कर्ज
घेतलं होतं. मात्र त्याची परतफेड करू न शकल्यानं त्यांनं आत्महत्या केली.
****
भारतानं
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात साउथम्पटन इथं दुसऱ्या दिवशी उपाहाराला
खेळ थांबला तेंव्हा दोन बाद १०० धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन २३ आणि लोकेश
राहुल १९ धावा काढून बाद झाले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडनं त्यांना बाद केलं. इंग्लंडचा
पहिला डाव २४६ धावांवर आटोपला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड संघ
२-१ असा आघाडीवर आहे.
****
इंडोनेशिया
इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सेलिंगमध्ये भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता
शेवगर यांनी रौप्य पदक जिकलं आहे. सेलींगमधील ओपन लेझर प्रकारात हर्षिता तोमर हिनं
कांस्य पदक जिकलं आहे. वरून ठाकूर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूष सेलिंगमध्ये कास्य
पदक पटकवलं आहे. मुष्टीयुध्दात ४९ किलो गटात अमित फनगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2018 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
चौथ्या बिमस्टेक परिषदेचा काठमांडू
घोषणापत्राला मंजुरी देऊन आज समारोप करण्यात आला. बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार,
नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सर्व सदस्य देशांनी या काठमांडू घोषणापत्राला मंजुरी
दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे राष्ट्रपती
विन मिंट यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली.
बिमस्टेक संमेलनादरम्यान या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाली. विकास, उर्जा आणि व्दिपक्षीय
सहकार्याच्या अन्य मुद्दांवर या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं
म्हटलं आहे.
*****
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात
बँका सुरू राहातील आणि नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिली
आहे. समाज माध्यमांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद
रहातील, अशी अफवा पसरली होती. त्या पार्श्र्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली
आहे. केवळ दोन सप्टेंबर- रविवार आणि शनिवार - आठ सप्टेंबर रोजी बँकांना सुटी राहील.
ज्या राज्यांत तीन सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे, तिथंच केवळ बँका बंद
राहतील, असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र, हे सुक्ष्म-लघु
आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली एक लोकचळवळ बनलं आहे, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र
प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल भुवनेश्वर इथं अनुसूचित जाती-जमाती मेळावा आणि प्रदर्शनात
बोलत होते. अनुसूचित जाती-जमातींमधे उद्योजकांचा विकास घडवणारं हे महत्वाचं पाऊल ठरलं
असून, उद्योजक आता शेकडो तरुणांना रोजगार पुरवू शकतात, असं प्रधान यावेळी म्हणाले.
****
देशातले एक लाख ३५ हजार बंदर आणि
गोदी कामगार आणि निवृत्तीवेतनधारकांना लाभदायक ठरणारा नवा वेतन करार नौवहन मंत्रालयानं
केला आहे. काल मुंबईमध्ये नौवहन मंत्रालय,
बंदर अधिकारी आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला. या नव्या करारामुळे कामगार
आणि निवृत्ती वेतनधारकांना १० पूर्णांक सहा दशांश टक्के वेतनवाढ मिळेल. जानेवारी
2017 पासून येत्या पाच वर्षांसाठी या कराराचा
लाभ मिळेल.
****
राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस
उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा
निर्णय घेतला आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं
सोपं होणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे ११५ तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये
५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र
उभारायला प्रोत्साहन देणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या कवठाळा गावचे
तलाठी राजू कांबळे आणि कोतवाल सुभाष हणमते यांना आठ हजारांची लाच घेतांना काल लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराकडून मयत वडीलांच्या नावावर असलेल्या
शेतीचा वारसा हक्क आईच्या नावे फेर करून देण्यासाठी कांबळे यांनं ही लाच मागितली होती.
****
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर
दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येईल असं नाशिकच्या महापौर रंजना भानसी
यांनी आज स्पष्ट केलं. मुंढे यांच्यावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षानं अविश्वास ठराव
दाखल केला असून शनिवारी विशेष महासभा होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून आता हा ठराव मागे घेण्यात येईल असं त्यांनी
यावेळी सांगितलं. दरम्यान, नाशिक मधील विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी
आज सकाळी मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.
****
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम सामना आज जपान विरूध्द होणार आहे. वीस वर्षांनंतर भारतीय
महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. कांस्य पदकासाठी भारतीय पुरूष
हॉकी संघाचा सामना उद्या शनिवारी पाकिस्तान
विरूध्द होणार आहे. स्कवॉश मध्ये महिला आणि पुरूष संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार
आहेत. टेबल टेनिस मध्ये मनिका बत्रा, अचंत शरत कमल आणि जी साथियान उप उपांत्य पूर्व
फेरीत लढत देतील. तर जुडो, ब्रिज, साईक्लिंग आणि सेलिंगच्या सामन्यातही भारतीय संघ
खेळणार आहे. पदक तालिकेत भारत १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २५ कांस्य पदकासह ५९ पदक घेवून
आठव्या क्रमांकावर आहे.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2018 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑगस्ट २०१८
सकाळी ११.०० वाजता
****
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथ्या बिम्सटेक शिखर
परिषदेचं आयोजन केलं जात आहे. बांग्लादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका
आणि थायलंड या सात सदस्य देशांचे नेते यावेळी घोषणापत्र जाहीर करणार आहेत. पंतप्रधान
थायलंड, म्यानमार आणि भूतान या देशांच्या नेत्यांशी यावेळी संवाद साधणार आहेत.
****
वेतनप्राप्त करणारे तसंच व्यापारी आणि अन्य व्यवसायांशी जोडले गेलेल्यांसाठी
प्राप्तीकर परतावा दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. दरम्यान, प्राप्तीकर भरणाऱ्यांची
संख्या यावर्षी आतापर्यंत पाच कोटी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या ६०
टक्क्यांनी अधिक आहे. सरकारी वित्त संस्थेसाठी प्राप्ती कर भरणाऱ्यांची संख्या वाढणं
हे चांगले संकेत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना मराठी साहित्यातील
भरीव योगदानाबद्दल रानगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद
जिल्ह्यातील पळसखेडे इथं नामवंत साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला
जाणार आहे. मंगला घुणावत आणि रामलालजी घुणावत यांनी आपल्या उद्योगाच्या वतीनं कविवर्य
ना.धो महानोर यांच्या सन्मानार्थ रानगंध पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
एक
लाख रूपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागानं नांदेड ते दिल्ली हजरत निझामुद्दीन या आठवड्यातून एक
दिवस धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या आणखी ५२ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या
जानेवारी पर्यंत ही गाडी सुरू राहील.
नांदेड रेल्वे स्थानकातून ही गाडी दर गुरुवारी सुटेल. पूर्णा, हिंगोली, अकोला, खांडवा, भोपाळ, आग्रा, मार्गे
ती निझामुद्दीन-नवी दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही
गाडी दर शनिवारी दिल्लीहून सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे
विभागानं कळवलं आहे.
//*****//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 August 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ ؍ اگست ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸ ۔ ۴۵:۸
آئینی کمیشن نے مرکزی حکو مت سے سفا رش کی ہے کہ ملک میں لوک سبھا اور اسمبلیوں کے انتخا بات ایک ساتھ کروائے جا ئیں۔ اِس خصوص میں رپورٹ کا مسودہ کل کمیشن نے مرکزی حکو مت کو ار سال کیا۔ رپورٹ میں کہا گیا ہے کہ اگر د و نوں انتخا بات ایک ساتھ ہو تے ہیں تو ملک کو مسلسل انتخا بات میں مصروف رہنے کی صورتحال سے نجات مل سکے گی اور عوام کا پیسہ بچے گا نیز انتظا می اور سلا متی اِداروں کا بوجھ بھی کم ہو گا۔ دستور ہند کی مو جود ہ شقوں کے تحت لوک سبھا اور اسمبلی انتخا بات ایک ساتھ کر وا نا ممکن نہیں ہے اور اِس کے لیے آئین اور انتخا بی قوانین میں
ترا میم ضروری ہے۔
***** ***** *****
کانگریس صدر راہُل گاندھی نے کہا ہے کہ نوٹ بندی ملک کی سب سے بڑی اقتصا دی بد عنوا نی تھی۔ نوٹ بندی کے ذریعے عوام کا پیسہ چنندہ سر ما یہ کا روں کے ہاتھوں میں پہنچا دیا گیا۔ کل نئی دہلی میں صحیفہ نگاروں سے گفتگو کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ شرح نمو میں کمی اور بے رو ز گاری جیسے بے شمار مسائل کا سبب بنے وا لا نوٹ بندی کا تبا ہ کن فیصلہ کیوں کیا گیا۔ اِس سوال کا جواب وزیر اعظم نریندر مودی عوام کو دیں۔ اُنھوں نے الزام عائد کیا کہ نوٹ بندی ایک غلطی نہیں بلکہ عوام پر سوچ سمجھ کر کیا گیا منظم اقتصادی حملہ تھا۔
دریں اثناء وزیر خزا نہ ارون جیٹلی نے نوٹ بندی کے با وجود بیشتر رقم بینک کھاتوں میں جمع ہو جا نے کے با عث نو ٹ بندی کو نا کام قرار دیئے جانے کے دعوے کو مسترد کر دیا ۔ فیس بک پر اپنے ایک پیغام میں وزیر موصوف نے کہا کہ بینکوں میں رقم جمع کرنا حکو مت کا مقصد نہیں تھا
بلکہ ٹیکس نہ دہندگان کو ٹیکس کی ادائیگی پر مجبور کر نا مطلو ب تھا۔
***** ***** *****
درج فہرست ذاتوں اور قبائل کے کسی امید وار کی ذات کسی دوسری ریاست میں پسماندہ ذات و طبقات کی فہرست میں مو جود نہ ہو تو وہ امید وار اُس ریاست میں سر ما یہ کا ری، ملازمت میں ریز ویشن دیئے جانے کا دعویٰ نہیں کر سکتا۔ یہ نہا یت اہم فیصلہ کل عدالت عظمیٰ کی پانچ رکنی آئینی بینچ نے دیا۔ اِس ضمن میں عدالت عظمیٰ میں متعدد در خواستیں داخل کی گئی تھیں۔ درج فہرست ذاتوں و قبائل سے متعلق کوئی شخص کسی سبب دوسری ریاست میں ہجرت کر جا تا ہے اور اُس ریاست کی پسماندہ طبقات کی فہرست میں اُس شخص کی ذات شامل نہ ہو تو اُسے ریزر ویشن کا فائدہ نہیں مل سکتا۔ تا ہم آئینی بینچ نے وضاحت کی کہ دہلی میں مرکزی حکو مت کی ریزر ویشن پالیسی نافذالعمل رہے گی۔
***** ***** *****
مرکزی وزیر حمل و نقل نتن گڈ کری نے کہا ہے کہ ملک کی بندر گاہوں کی نجکاری نہیں کی جائے گی ۔ کل ممبئی میں ایک پرو گرام سے خطاب کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ یہ بندر گاہیں سر کاری تسلط میں ہی رہیں گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ جوا ہر لال نہرو پورٹ کے خصو صی اقتصا دی زون کے سبب آئندہ چند بر سوں میں دیڑھ لاکھ افراد کو روز گار ملے گا۔ ساگر مالا پرو گرام کے تحت تین لاکھ ورک آرڈر پہلے ہی جا ری کیئے جا چکے ہیں اور اِس کے لیے 16؍ لاکھ کروڑ روپئے کی سر ما یہ کا ری متوقع ہے۔
***** ***** *****
اورنگ آباد ضلع کانگریس کمیٹی نے مراٹھا ،مسلم ،دھنگر اور کوڑی سماج کو ریزر ویشن دیئے جانے کے مطالبے پر اب بے مدت بھوک ہڑ تال شروع کر دی ہے۔ کانگریس کی جانب سے گذشتہ2؍ اگست سے ضلع کلکٹر دفتر کے رو برو زنجیری بھوک ہڑ تال شروع کی گئی تھی۔ کانگریس کے رکن اسمبلی عبد الستار نے بتا یا کہ اب اِس زنجیری بھوک ہڑ تال کو غیر معینہ مدت کی بھوک ہڑ تال میں تبدیل کر دیا گیا ہے۔ اُنھوں نے کہا کہ حکو مت کی جانب سے اب تحریری تیقن ملنے تک یہ بھوک ہڑتال جاری رہے گی۔ اِس موقع پر رکن اسمبلی سُبھاش جھامبر، سا بق رکن اسمبلی کلیان کاڑے، کانگریس کے شہر صدر نامدیو پوار اور کثیر تعداد میں پارٹی کار کنان موجود تھے۔
***** ***** *****
ریاستی حکو مت نے ریاست کی115؍ تحصیلوں کو کپاس کی پیدا وار والے علا قے قرار دیا ہے۔ کپڑا سازی صنعت کو فروغ دینے کے لیے حکو مت نے یہ فیصلہ کیا ۔ اِس فیصلے کے با عث کپاس کی تخم ریزی، فصلوں کی بہتر ی اور رسد جیسے کا موں میں آسانی ہو گی۔ ریاست کے جن مقا مات پر کپاس کی پیدا وار 50؍ فیصد سے کم ہو تی ہے وہاں حکو مت ایک پار چہ با فی مرکز کے قیام کی تر غیب دے گی۔
***** ***** *****
اِنڈو نیشیا میں جا ری اٹھا ر ویں ایشیائی کھیلوں میں کل بھارت نے 2؍ طلائی، ایک نقرئی اور دو کانسے کے تمغے حاصل کیئے۔ 1500؍ میٹر کی دوڑ میں جِنسن جانسن نے اور4x4؍ ریلے دوڑ میں خواتین کی ٹیم نے طلائی تمغہ حاصل کیا۔ مر دوں کی4x4؍ ریلے میں بھارت نے چاندی کا تمغہ جیتا۔ خواتین کی1500؍ میٹر انفرادی ایونٹ میں چِترا اُنّی کرِشنن نے اور ڈِسک تھرو میں سیما پُنیا نے کانسے کا تمغہ جیتا۔ مردوں کے ہاکی مقابلوں کے سیمی فائنل میں بھارت کو ملیشیا نے سڈن ڈیتھ میں 6؍ کے مقابلے 7؍ گول سے شکست دیدی۔
***** ***** *****
Date: 31 August 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ ؍ اگست ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸ ۔ ۴۵:۸
آئینی کمیشن نے مرکزی حکو مت سے سفا رش کی ہے کہ ملک میں لوک سبھا اور اسمبلیوں کے انتخا بات ایک ساتھ کروائے جا ئیں۔ اِس خصوص میں رپورٹ کا مسودہ کل کمیشن نے مرکزی حکو مت کو ار سال کیا۔ رپورٹ میں کہا گیا ہے کہ اگر د و نوں انتخا بات ایک ساتھ ہو تے ہیں تو ملک کو مسلسل انتخا بات میں مصروف رہنے کی صورتحال سے نجات مل سکے گی اور عوام کا پیسہ بچے گا نیز انتظا می اور سلا متی اِداروں کا بوجھ بھی کم ہو گا۔ دستور ہند کی مو جود ہ شقوں کے تحت لوک سبھا اور اسمبلی انتخا بات ایک ساتھ کر وا نا ممکن نہیں ہے اور اِس کے لیے آئین اور انتخا بی قوانین میں
ترا میم ضروری ہے۔
***** ***** *****
کانگریس صدر راہُل گاندھی نے کہا ہے کہ نوٹ بندی ملک کی سب سے بڑی اقتصا دی بد عنوا نی تھی۔ نوٹ بندی کے ذریعے عوام کا پیسہ چنندہ سر ما یہ کا روں کے ہاتھوں میں پہنچا دیا گیا۔ کل نئی دہلی میں صحیفہ نگاروں سے گفتگو کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ شرح نمو میں کمی اور بے رو ز گاری جیسے بے شمار مسائل کا سبب بنے وا لا نوٹ بندی کا تبا ہ کن فیصلہ کیوں کیا گیا۔ اِس سوال کا جواب وزیر اعظم نریندر مودی عوام کو دیں۔ اُنھوں نے الزام عائد کیا کہ نوٹ بندی ایک غلطی نہیں بلکہ عوام پر سوچ سمجھ کر کیا گیا منظم اقتصادی حملہ تھا۔
دریں اثناء وزیر خزا نہ ارون جیٹلی نے نوٹ بندی کے با وجود بیشتر رقم بینک کھاتوں میں جمع ہو جا نے کے با عث نو ٹ بندی کو نا کام قرار دیئے جانے کے دعوے کو مسترد کر دیا ۔ فیس بک پر اپنے ایک پیغام میں وزیر موصوف نے کہا کہ بینکوں میں رقم جمع کرنا حکو مت کا مقصد نہیں تھا
بلکہ ٹیکس نہ دہندگان کو ٹیکس کی ادائیگی پر مجبور کر نا مطلو ب تھا۔
***** ***** *****
درج فہرست ذاتوں اور قبائل کے کسی امید وار کی ذات کسی دوسری ریاست میں پسماندہ ذات و طبقات کی فہرست میں مو جود نہ ہو تو وہ امید وار اُس ریاست میں سر ما یہ کا ری، ملازمت میں ریز ویشن دیئے جانے کا دعویٰ نہیں کر سکتا۔ یہ نہا یت اہم فیصلہ کل عدالت عظمیٰ کی پانچ رکنی آئینی بینچ نے دیا۔ اِس ضمن میں عدالت عظمیٰ میں متعدد در خواستیں داخل کی گئی تھیں۔ درج فہرست ذاتوں و قبائل سے متعلق کوئی شخص کسی سبب دوسری ریاست میں ہجرت کر جا تا ہے اور اُس ریاست کی پسماندہ طبقات کی فہرست میں اُس شخص کی ذات شامل نہ ہو تو اُسے ریزر ویشن کا فائدہ نہیں مل سکتا۔ تا ہم آئینی بینچ نے وضاحت کی کہ دہلی میں مرکزی حکو مت کی ریزر ویشن پالیسی نافذالعمل رہے گی۔
***** ***** *****
مرکزی وزیر حمل و نقل نتن گڈ کری نے کہا ہے کہ ملک کی بندر گاہوں کی نجکاری نہیں کی جائے گی ۔ کل ممبئی میں ایک پرو گرام سے خطاب کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ یہ بندر گاہیں سر کاری تسلط میں ہی رہیں گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ جوا ہر لال نہرو پورٹ کے خصو صی اقتصا دی زون کے سبب آئندہ چند بر سوں میں دیڑھ لاکھ افراد کو روز گار ملے گا۔ ساگر مالا پرو گرام کے تحت تین لاکھ ورک آرڈر پہلے ہی جا ری کیئے جا چکے ہیں اور اِس کے لیے 16؍ لاکھ کروڑ روپئے کی سر ما یہ کا ری متوقع ہے۔
***** ***** *****
اورنگ آباد ضلع کانگریس کمیٹی نے مراٹھا ،مسلم ،دھنگر اور کوڑی سماج کو ریزر ویشن دیئے جانے کے مطالبے پر اب بے مدت بھوک ہڑ تال شروع کر دی ہے۔ کانگریس کی جانب سے گذشتہ2؍ اگست سے ضلع کلکٹر دفتر کے رو برو زنجیری بھوک ہڑ تال شروع کی گئی تھی۔ کانگریس کے رکن اسمبلی عبد الستار نے بتا یا کہ اب اِس زنجیری بھوک ہڑ تال کو غیر معینہ مدت کی بھوک ہڑ تال میں تبدیل کر دیا گیا ہے۔ اُنھوں نے کہا کہ حکو مت کی جانب سے اب تحریری تیقن ملنے تک یہ بھوک ہڑتال جاری رہے گی۔ اِس موقع پر رکن اسمبلی سُبھاش جھامبر، سا بق رکن اسمبلی کلیان کاڑے، کانگریس کے شہر صدر نامدیو پوار اور کثیر تعداد میں پارٹی کار کنان موجود تھے۔
***** ***** *****
ریاستی حکو مت نے ریاست کی115؍ تحصیلوں کو کپاس کی پیدا وار والے علا قے قرار دیا ہے۔ کپڑا سازی صنعت کو فروغ دینے کے لیے حکو مت نے یہ فیصلہ کیا ۔ اِس فیصلے کے با عث کپاس کی تخم ریزی، فصلوں کی بہتر ی اور رسد جیسے کا موں میں آسانی ہو گی۔ ریاست کے جن مقا مات پر کپاس کی پیدا وار 50؍ فیصد سے کم ہو تی ہے وہاں حکو مت ایک پار چہ با فی مرکز کے قیام کی تر غیب دے گی۔
***** ***** *****
اِنڈو نیشیا میں جا ری اٹھا ر ویں ایشیائی کھیلوں میں کل بھارت نے 2؍ طلائی، ایک نقرئی اور دو کانسے کے تمغے حاصل کیئے۔ 1500؍ میٹر کی دوڑ میں جِنسن جانسن نے اور4x4؍ ریلے دوڑ میں خواتین کی ٹیم نے طلائی تمغہ حاصل کیا۔ مر دوں کی4x4؍ ریلے میں بھارت نے چاندی کا تمغہ جیتا۔ خواتین کی1500؍ میٹر انفرادی ایونٹ میں چِترا اُنّی کرِشنن نے اور ڈِسک تھرو میں سیما پُنیا نے کانسے کا تمغہ جیتا۔ مردوں کے ہاکی مقابلوں کے سیمی فائنل میں بھارت کو ملیشیا نے سڈن ڈیتھ میں 6؍ کے مقابلے 7؍ گول سے شکست دیدی۔
***** ***** *****
AIR NEWS BULLETIN, AURNAGABAD 31.08.2018 06.50AM
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची विधी आयोगाची शिफारस.
§
नोटबंदी हा मोठा आर्थिक
घोटाळा, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप.
§ अनुसुचित जाती -जमातीच्या उमेदवाराची जात दुसऱ्या राज्यामध्ये
अधिसूचित नसेल, तर आरक्षणाचा दावा करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय.
§ आशियाई
क्रीडा स्पर्धेत काल,
भारताला दोन
सुवर्ण, एक रौप्य
आणि दोन कांस्य पदकं.
आणि
§
क्रिकेटमध्ये पहिल्या डावात इंग्लंडला सर्वबाद २४६ धावांवर रोखत,भारताच्या बिनबाद १९ धावा.
****
देशात लोकसभा आणि
विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात अशी शिफारस विधी आयोगानं केंद्र सरकारला
केली आहे. याबाबतचा मसुदा अहवाल आयोगानं काल केंद्र सरकारला सादर केला. दोन्ही
निवडणुका एकत्र घेतल्या तर, देश सातत्यानं केवळ निवडणुकांतच गुंतून असल्याची
स्थिती बदलता येईल, जनतेच्या पैशांची बचत होईल, तसंच
व्यवस्थापकीय आणि सुरक्षा यंत्रणांचा ताणही कमी होईल असं आयोगानं म्हटलं आहे.
राज्यघटनेच्या सध्याच्या चौकटीत देशात एकत्रित निवडणुका घेणं शक्य नाही, त्यामुळेच
एकत्रित निवडणुका घेता याव्यात यासाठी राज्यघटना आणि निवडणूक कायद्यात बदल करावा
अशी शिफारसही आयोगानं केली आहे.
****
नोटबंदी
हा देशातला मोठा आर्थिक घोटाळा होता, नोटबंदीनं देशातल्या सामान्य जनतेचा
पैसा मोजक्या भांडवलदारांकडे वळवला असा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी
यांनी केला आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशाच्या
विकासदरातली घट आणि बेरोजगारी यांसारख्या असंख्य समस्यांना कारणीभूत ठरलेला, नोटबंदीसारखा
घातक निर्णय का घेतला होता याचं उत्तर, पंतप्रधानांनी देशाला द्यावं. अशा
शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नोटबंदी
ही चूक नव्हती, तर देशाच्या जनतेवर ठरवून केलेला हल्ला होता, असा
कठोर शाब्दीक हल्लाही गांधी यांनी यावेळी केला.
दरम्यान,
नोटबंदीमध्ये बहुतांश चलन बँकेत जमा झाल्यानं, नोटबंदी अयशस्वी झाल्याचा दावा केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटलं आहे की, न जमा झालेली
रक्कम हे नोटबंदीचं उद्दिष्ट नव्हतं, तर कर न भरणाऱ्या समाजाकडून करभरणा करुन घेणं,
हे उद्दिष्ट होतं. अर्थव्यवस्थेचं सुसुत्रीकरण आणि काळा पैसा रोखणं आवश्यक होतं, असंही
जेटली यांनी म्हटलं आहे. टीकेला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
****
अनुसुचित जाती-जमातीच्या उमेदवाराची जात दुसऱ्या
राज्यामध्ये अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गात मोडत नसेल तर अशा उमेदवाराला त्या संबंधीत
राज्यात सरकारी नोकरीत आरक्षणाच्या लाभासाठी दावा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण
निकाल काल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठानं दिला. यासंदर्भात सर्वोच्च
न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातली एखादी
व्यक्ती अन्य राज्यात काही कारणांमुळे स्थलांतरीत झालेली असेल, आणि त्या राज्यात त्या
व्यक्तीची जात ही अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गात अधिसूचित नसेल तर त्याला त्या प्रवर्गाचे
लाभ मिळणार नाहीत असं घटनापीठानं स्पष्ट केलं आहे. मात्र, दिल्लीमध्ये केंद्र सरकारचं
आरक्षणविषयक धोरण लागू राहील, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
देशातल्या बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच
अधिकारात राहतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते काल मुंबईत
एका कार्यक्रमात बोलत होते. जवाहरलाल नेहरू बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढल्या
काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं. सागरमाला
कार्यक्रमांतर्गत तीन लाख कार्यारंभ आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत आणि त्या अंतर्गत
१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इंडियन मर्चंट्स
चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी गंगा नदी पुनरुज्जीवनीकरणा बाबत माहिती
दिली. पुनर्नवीकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न
आहे, असं ते म्हणाले.
****
राज्य
सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड
उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यामुळे कापूस लागवड, पीक
वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल. मराठवाडा, उत्तर
महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे ११५ तालुके
आहेत. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी
सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र उभारायला प्रोत्साहन देणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या
वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आता आमरण उपोषण सुरू केलं
आहे. कॉग्रेसनं गेल्या दोन ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषणाला सुरूवात
केली होती. आता हे उपोषण कालपासून आमरण उपोषणात परिवर्तित केल्याची माहिती आमदार अब्दुल
सत्तार यांनी दिली. सरकारकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचंही त्यांनी
सांगितलं. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष
नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळ, देवणी आणि उदगीर
इथं तालुकास्तरीय जलसंधारण कामांची माहिती देणाऱ्या कार्यशाळांचं जलयुक्त शिवार अभियान आणि भारतीय जैन संघटना यांनी काल आयोजन केलं होतं. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
या कार्यशाळांना मार्गदर्शन केलं.
जून,२०१९ पर्यंत जिल्ह्यात जलसंधारंणाची कामं शंभर
टक्के पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून यासाठी भारतीय जैन संघटनेकडून शंभर पोकलेन आणि
जेसीबी यंत्र दिली जाणार आहेत.
****
इंडोनेशियात सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं
दोन सुवर्ण, एक रौप्य
आणि दोन कांस्य पदकं मिळवली. पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिनसन जॉन्सननं तर महिलांच्या चार
बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत महिलांनी सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या
चार बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत पुरुषांनी रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चित्रा उन्नीकृष्णनला
आणि थाळी फेकमध्ये सीमा पुनियाला
कांस्यपदक मिळालं. पुरुष हॉकीमध्ये उपांत्य फेरीत भारताचा मलेशियाकडून सडन डेथमध्ये ७-६
असा धक्कादायक पराभव झाला. तत्पूर्वी दोन्ही संघानी प्रत्येकी दोन गोल केल्यामुळे सामना
बरोबरीत सुटला होता. भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पदकासाठीचा सामना आज जपान विरुद्ध
होणार आहे.
****
भारत-इंग्लंड यांच्यात कालपासून
सुरु झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडला
भारतानं २४६ धावांवर रोखलं. त्यानंतर दिवसअखेर भारतानं बिनबाद १९ धावा केल्या. नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत सहा बाद ८६ अशी स्थिती केली होती. मात्र, तळाच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरला.
****
जालना जिल्ह्यात अकोलादेव इथल्या जीवरेखा धरणावर
शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्यावतीनं काल जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. कपाशीवरील बोंडअळीचे
सरसकट पंचनामे करावेत या मागणीसाठी हे आंदोलन होतं.
****
प्रधानमंत्री
उज्वला योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार, ६९१
जणांना गॅस जोडणी देण्यात
आली आहे.
या योजनेमुळे आदिवासी बहुल भागातल्या महिलांचं जीवन सुकर झालं असून कमी वेळात स्वयंपाक
होत असल्यानं, महिला समाधान व्यक्त करत आहेत. या योजनेबद्दल जिल्ह्यातल्या लोय गावातल्या लाभार्थी
रंजना वळवी म्हणाल्या –
आम्हाला फायदा असा झाला की,
आम्ही शेतात कामाला जायचो रोज. त्यामुळे तिथुन यायचो आणि पावसाचा दिवस पण रायचा. ते
लाकड पण सर्व ओले होऊन जायचे. मग स्वयंपाक करायला जेवण बनवायला आम्हाला फार त्रास व्हायचा
धुरा मुळे. आम्हाला फायदा असा झाला आहे की, सिंलेनडर भेटले आहे ना. दोन तासाचं काम
असं पाच, दहा मिनिटात होऊन जातं. शासनाने जे आम्हाला गॅस सिंलेनडर दिलं आहे ना ते आमच्या
महिला करीता फार हे सुखाचं काम करून दिलं आहे.
****
अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या
सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत उद्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. शरद कळसकर आणि अंदुरे
यांची या प्रकरणात समोरासमोर चौकशी करावयाची असल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची
मागणी सीबीआयनं केली होती.
****
शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावापेक्षा
कमी दरानं खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंगोली
जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद केली आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून
जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार ठप्प आहेत.
****
अखिल भारतीय मराठी
पत्रकार परिषद, हिंगोली जिल्हा शाखेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संपादक उत्तमराव दगडू
यांना जाहीर झाला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांनी काल
या पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय साहित्य क्षेत्रासाठी कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी, सिंचन क्षेत्रासाठी
आमदार तानाजी मुटकुळे, धर्मदाय आयुक्त रवींद्र घायतिडक, पत्रकार राकेश भट, प्रभाकर
स्वामी, छायाचित्रकार कृष्णा देवणे यांना दर्पण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
*****
***
Thursday, 30 August 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2018 - 18.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
वस्तु
आणि सेवा कर - जीएसटी देशातली आतापर्यंतची सर्वात व्यापक कर सुधारणा असल्याचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय महसूल सेवेच्या ६८व्या तुकडीला
संबोधित करताना ते बोलत होते. जीएसटी प्रणाली यशस्वीरित्या लागू करण्यात आली असून,
यामुळे अर्थव्यवस्था आणि प्रामाणिक करदात्यांना लाभ होईल, असं ते म्हणाले. देशाची कर
व्यवस्था न्यायपूर्ण, कार्यक्षम, विश्वासू आणि समानतेवर आधारित असली पाहिजे, असंही
राष्ट्रपती म्हणाले.
****
देशातल्या
बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच अधिकारात राहतील, अशी ग्वाही केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. जवाहरलाल
नेहरू बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढल्या काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना
रोजगार उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं. सागरमाला कार्यक्रमांतर्गत तीन लाख कार्यारंभ
आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत आणि त्या अंतर्गत १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इंडियन मर्चट्स चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरी
यांनी गंगा नदी पुनरुज्जीवनीकरणाबाबत माहिती दिली. पुनर्नवीकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून
संपत्ती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.
****
केंद्रीय
पर्यावरण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्ली इथं वन संरक्षणाला चालना देऊन, हवामान
बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय धोरण जारी केलं. या धोरणाअंतर्गत वन क्षेत्र
कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळण्यासाठी राष्ट्रीय अभियानाची सुरुवात
केली जाणार आहे. हवामान बदलाची समस्या कमी करण्यासाठी भारतानं काही उपाययोजना करुन
अडीच ते तीन अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन थांबवलं असल्याचं हर्षवर्धन यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यात
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न
करावेत, तसंच अत्याचार प्रतिबंधक कायदा-ॲट्रॉसिटीची गुणवत्तापूर्ण आणि योग्य अंमलबजावणी
व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई इथं आज राज्यस्तरीय
उच्चाधिकार दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दाखल गुन्हा आणि
तपास याविषयीची गुणवत्ता वाढवण्यासाठी गृह विभागानं समन्वयानं प्रयत्न करावेत, असंही
मुख्यमंत्री म्हणाले.
****
दरम्यान,
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भातही बैठक आयोजित
करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यात गणेशोत्सव अतिशय उत्साहात
आणि आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा, असे निर्देश
त्यांनी यावेळी दिले. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाना देण्यात येत असल्याची
माहिती या बैठकीत देण्यात आली.
****
राज्य
शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून भारतीय स्टेट बँकेनं महाराष्ट्र स्तरावर
‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून, यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित कर्जावर
५० टक्के सुट दिली आहे. प्रामुख्यानं कृषी, कृषी पुरक आणि लघु उद्योगांचा यात समावेश
आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसलेल्या परंतु स्वत:च्या हिश्शाची रक्कम भरू न
शकलेल्या राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मोठ्या प्रमाणवर पीक कर्जाची
थकबाकी असलेल्या बुलडाणा, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे.
****
औरंगाबाद
जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी
आता आमरण उपोषण सुरू केलं आहे. कॉग्रेसनं गेल्या दोन ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
चक्री उपोषणाला सुरूवात केली होती. आता हे उपोषण कालपासून आमरण उपोषणात परिवर्तित केल्याची
माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सरकारकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण
सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण
काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
****
बुलडाणा
जिल्ह्यात शासकीय दरानुसार अधिकाऱ्यांनी दूध खरेदी करण्यास नकार दिल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी
विकण्यासाठी आणलेल्या दुधानेच अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक घातला. जिल्ह्यातल्या चिखली
तालुक्यात आज ही घटना घडली.
****
इंडोनेशिया
इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारत आणि मलेशिया
यांनी उपान्त्य फेरीत प्रत्येकी दोन गोल केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे
या सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर निश्चित केला जात आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा
सुवर्ण पदकासाठीचा सामना उद्या जपान विरुद्ध होणार आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2018 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद
यादव, आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले. चारा घोटाळा प्रकरणात
शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव प्रकृतीचं कारण देऊन १० एप्रिल २०१८ पासून जामीनावर
बाहेर होते. त्यांच्या तात्पुरत्या जामिनाची मुदत संपल्यानं त्यांना आज समर्पण करण्याचे
आदेश न्यायालयानं दिले होते. यादव यांची रांचीच्या बिरसा मुंडा कारागृहात रवानगी करण्यात
आली आहे.
****
इतर क्षेत्रांमधल्या संभाव्य संधी लक्षात घेता २०३०
पर्यंत शेतमजुरांची संख्या ३५ टक्के कमी होईल, अशी शक्यता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे
महासंचालक त्रिलोचन महापात्र यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज कृषी तज्ज्ञांच्या
बेठकीत ते बोलत होते. युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना
राबवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
****
चौथ्या बिमस्टेक शिखर संमेलनात
सहभगी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं पोहोचले.
बिमस्टेक शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ते आज संबोधित करणार आहेत. नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष
विद्यादेवी भंडारी, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना आणि बांग्लादेशच्या
पंतप्रधान शेख हसीना यांची ते या दौऱ्यात भेट घेणार आहेत.
****
औद्योगिक व्यवहारातली वाढ आणि चांगल्या
पावसामुळे चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर सात पूर्णांक
चार दशांश टक्के राहिल, असा
अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे.
किरकोळ चलनफुगवट्याचा
दर चार टक्क्यांपर्यंत खाली आणणं हे उद्दिष्ट
असल्याचं, बँकेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. कृषी उत्पादन चांगलं
राहण्याची शक्यता असून, औद्योगिक वाढ मजबूत होत असल्याचंही बँकेनं यात नमूद
केलं आहे.
****
राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस
उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी हा निर्णय
घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि
प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या
१८ जिल्ह्यांमधले हे १५१ तालुके असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ज्या तालुक्यांमध्ये
५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र
उभारण्यास प्रोत्साहन देणार आहे.
****
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला येत्या एक सप्टेंबरला
एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात एक ते सात सप्टेंबर दरम्यान मातृ
वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातही हा सप्ताह साजरा करण्यात येणार
असून, या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य
अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
अजिंठा आणि वेरुळ लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या देशविदेशी
पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळ- एमटीडीसीच्या वतीनं येत्या १७ सप्टेंबरपासून, ५
नवीन बसगाड्या सुरु करण्यात येणार आहेत. दळण-वळण आणि तीर्थक्षेत्र विकास संदर्भात औरंगाबाद
इथं काल झालेल्या बैठकीनंतर एमटीडीसी चे अधिकारी विजय जाधव यांनी ही माहिती दिली.
****
इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये
आज भारतीय खेळाडूंना सहा क्रीडाप्रकारांमध्ये सुवर्ण पदकाची संधी आहे. मनजीत सिंग, जिन्सन जॉन्सन, मोनिका चौधरी आणि चित्रा हे धावपटू आज पंधराशे मीटरच्या अंतिम फेरीत धावतील.
चारशे मीटर
रिले शर्यतीत भारताचे पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करतील.
हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुरुष संघाची मलेशियाबरोबर लढत होणार आहे. स्क्वॅशमध्ये महिला संघाची
हाँगकाँगशी लढत होईल. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, मौमा
दास, शरथ कमल आणि जी सत्यन यांच्याकडूनही पदकांच्या अपेक्षा आहेत.
ज्युडो, कुराश, व्हॉलीबॉल, सेपक टकरो, सायकलिंग
आणि डायव्हिंग या प्रकारांमध्येही भारतीय स्पर्धक सहभागी होतील. सध्या भारत पदकतालिकेत
११ सुवर्ण, २० रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह नवव्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला चौथा सामना आजपासून साउदम्पटन इथं सुरू होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी
साडेतीन वाजता सामना सुरू होईल. भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कमरेच्या दुखापतीतून
बरा झाला असून, या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती कर्णधार विराट
कोहली यानं दिली आहे.
*****
***$F8B7D50A-C9BE-4C04-839F-1D0C7D00C1E5$