Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण
असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन - पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बातमधून गौरवपूर्ण
उल्लेख
·
लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर
कारवाईचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
·
फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यातला दुसरा सामनाही अनिर्णित, आज टायब्रेकरने
होणार निकाल
·
मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारतीय फलंदाजांना
यश
आणि
·
मराठवाड्यातल्या धरणांमध्ये समानाधारक पाणीसाठा, परभणी जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे होणार
****
वस्त्रोद्योग
हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या १२४ व्या भागात ते काल
बोलत होते. येत्या सात ऑगस्टला साजरा होत असलेल्या दहाव्या ‘राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या’ अनुषंगाने
बोलतांना पंतप्रधानांनी, देशभरात आज तीन हजारांहून अधिक वस्त्रोद्योग
स्टार्टअप कार्यरत असल्याचं सांगत, या स्टार्ट -अप्सनी भारताच्या
हातमाग क्षेत्राला नवी ओळख देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं. या संदर्भात
बोलतांना पंतप्रधानांनी, पैठण इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे
यांचा उल्लेख केला. ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
कविता ढवळे
यांनी यासंदर्भात आकाशवाणीशी बोलतांना आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी फक्त आपलीच
नव्हे, तर पैठण इथं कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची
नोंद घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाईट
- कविता ढवळे
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचं युनेस्कोचं जागतिक वारसा यादित समावेश, शुभांशू शुक्ला
यांचा अंतराळ प्रवास, २३ ऑगस्टचा राष्ट्रीय अंतराळ दिवस,
स्वातंत्र्यदिनासह स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट महिन्यातल्या विविध चळवळी,
लोकमान्य टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी, हस्तलिखितांचं जतन आणि वारसा हस्तांतरण, स्वच्छ भारत
मिशन, 'जागतिक पोलिस आणि अग्निशमन स्पर्धा', विद्यार्थ्यांच्या ऑलिंपियाड तसंच क्रीडा स्पर्धा, यासह
विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. आगामी काळात येणाऱ्या सणांच्या त्यांनी देशवासियांना
शुभेच्छा दिल्या.
****
भारताच्या
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक क्षण ठरलेला, भारत-यूके
मुक्त व्यापार करार झाल्यानिमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल
यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. बोरीवली इथं झालेल्या या सत्कार समारंभात,
“यूके बाजारातील निर्यात संधी” या विषयावर एक विशेष सत्रही घेण्यात आलं,
ज्यामध्ये भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी या करारामुळे उपलब्ध
झालेल्या नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली.
****
लाडकी बहीण
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी दिला आहे. काल अहिल्यानगर इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी, आज मुंबईत
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य मंत्रिमंडळात
कोणाला घ्यायचं आणि कोणाला काढायचं याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्यासोबत मिळून घेणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपहारगृह इमारतीचं
लोकार्पणही काल पवार यांच्या हस्ते झालं.
****
ठाणे इथं
काल वंजारी समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचं
उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. यावेळी समाजातील गुणवंतांचा
सत्कार करण्यात आला. संघर्ष काय असतो हे आपण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यात
पाहिला, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
जलसंधारणासोबत
मनसंधारण करणंही आवश्यक असल्याचं, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी
म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशच्या वतीने गाळमुक्त धरण गाळयुक्त
शिवार या योजनेसंदर्भात काल घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात या
योजनेच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणार्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान
करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलतांना, गाळरुपी मातीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात यावेत यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र
तयार करण्याचं सूचित करून, जल संधारण तसंच माती परीक्षणाबाबत
जागृतीची गरज व्यक्त केली.
****
स्थानिक
बियाण्यांचं जतन संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या प्रचारासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये
जागृती करावी, असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं आहे. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात चितेपिंपळगाव इथं बीज प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत
होत्या. गेल्या दहा वर्षांपासून आपण बियांच्या राख्या तयार करत असून, प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या हातावर बियांची राखी बांधावी, असं आवाहन, राहिबाई यांनी केलं. त्या म्हणाल्या...
बाईट
- पद्मश्री राहीबाई पोपरे
****
फिडे महिला
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख
यांच्यातला दुसरा सामना काल अनिर्णित राहिला. जॉर्जीयात बटुमी इथं सुरू असलेल्या या
अंतिम स्पर्धेत दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंचा पहिला सामनाही अनिर्णित राहिला होता.
अंतिम फेरीचा टायब्रेकर सामना आज होणार आहे.
****
क्रिकेट
भारत आणि
इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या अँडरसन - तेंडुलकर चषक मालिकेतले चौथा सामना अनिर्णित
राहीला. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने दुसर्या डावात चार बाद ४२५ धावा केल्या.
शुभमन गील, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकं
झळकावली. सामन्यात पाच बळी घेणारा आणि १४१ धावा करणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स सामनावीर
पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत इंग्लंड दोन - एकनं आघाडीवर असून, पाचवा सामना येत्या गुरुवारी सुरु होईल.
****
परभणी जिल्ह्यात
१७ जुलै आणि २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन
नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषांनुसार आर्थिक
मदत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
यांना दिले आहेत. जिल्ह्यात पेडगाव, जांब, पाथरी,
हादगाव, कासापुरी, जिंतुर,
वाधी धानोरा, सेलु, केकरजवळा
आदी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर विभागात विविध धरणांमधला पाणीसाठा सरासरी ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पैठण
इथल्या जायकवाडी धरण सुमारे ८२ टक्के तर नांदेड इथला विष्णुपुरी प्रकल्प सुमारे ९०
टक्के भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात येलदरी धरणात ७३ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ५१ टक्के
पाणी साठा झाला आहे.
****
बीड इथं
काल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाड्यातल्या उपविभागीय कार्यालयाचं
उद्घाटन करण्यात आलं. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलेल्या भाषणात, मराठा समाजाला
आर्थिक सक्षम करण्याचं ध्येय असून, त्यासाठी महामंडळाकडून मोठ्या
प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन दिलं.
****
No comments:
Post a Comment