आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 31 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 August 2025
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३१ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं `मन
की बात`मध्ये आवाहन
· हैदराबाद मुक्ती संग्रामाचा पंतप्रधानांकडून
गौरव
· पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा
आणि
· मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा जरांगे पाटील यांचा इशारा, तर याप्रश्नी कायदेशीर
मार्गदर्शन घेत असल्याची सरकारतर्फे माहिती
****
आत्मनिर्भरता आणि `वोकल
फॉर लोकल` हा मंत्र घेऊन देशानं पुढं जायला हवं, असं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं. `मन की बात`
या कार्यक्रमाच्या १२५ व्या भागात त्यांनी आकाशवाणीद्वारे
आज देशवासियांना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. आगामी
सणासुदीच्या दिवसात स्वदेशीचा मंत्र विसरू नका, पेहराव, सजावट, उपाहार
या सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात, असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं.
उत्सवाच्या काळात स्वच्छता पाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यूपीएससी परीक्षेत अपयश येणाऱ्या
विद्यार्थ्यांना इतर परीक्षांसाठी तयारी करता यावी यासाठी प्रतिभासेतू हे डिजिटल
व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. या पोर्टलमधे अभियंता, वैद्यकीय
क्षेत्रात प्रवेश मिळवू बघणाऱ्या पण अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची माहितीही आहे.
या पोर्टलद्वारे माहिती घेऊन खासगी कंपन्या या विद्यार्थ्यांना नोकरी देणार आहेत.
याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाल्याचं त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमधल्या
दाल सरोवरात नुकत्याच झालेल्या
`खेलो इंडिया`
जलक्रीडा महोत्सवाचा पंतप्रनांनी आपल्या संबोधनात विशेष
उल्लेख केला. या स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते खेळाडू ओदिशा इथली रश्मिता साहू आणि
श्रीनगरमधला मोहसीन अली यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
एक भारत - श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असून खेळ यात
महत्त्वाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले. देशातल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या
प्रयोगाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. सौरऊर्जेच्या वापरामुळं शेतकऱ्यांचं
जीवनमान बदलत असून त्याला त्याच्या मेहनतीचं फळ कैकपटीनं जास्त मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या संदर्भात बिहारमधील रतनपुरा
इथल्या सोलारदीदी देवकी यांच्या कार्याची माहिती दिली. १५ सप्टेंबरला साजरा केल्या
जाणाऱ्या महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त तसंच १७
सप्टेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या मोदी यांनी शुभेच्छा
दिल्या. सोनार,
लोहार, सुतार, मूर्तीकार यानी
देशाच्या प्रगतीचा पाया घातला आहे, असं ते म्हणाले. १७
सप्टेंबरला देशभरात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा केला जाणार
असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. रझाकार आणि निजामाच्या अत्याचाराविरोधात लढलेल्या
सर्व स्वातंत्र्यसैनिकांचं त्यांनी स्मरण केलं तसंच देशाचे पहिले गृहमंत्री सरदार
वल्लभभाई पटेल यांची एक ध्वनिफीत श्रोत्यांना ऐकवली.
सरदार पटेल आणि भारतरत्न डॉक्टर
बाबासहेब आंबेडकर यांनी या संदर्भात बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा त्यांनी
गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले..
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंतच्या
शहीद जवानांची माहिती आणि छायाचित्र जतन करणारे जितेंद्र सिंह राठौड यांचा
पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. गेल्या काही दिवसात देशभरात अतिवृष्टी आणि इतर
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीबद्दल पंप्रधानांनी दुःख
व्यक्त केलं. तसंच या काळात एनडीआरएफ, एसडीआरएफ, डॉक्टर
आणि मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचं त्यांनी
कौतुक केलं. भारतीय संस्कृतीचा प्रभाव
परदेशातल्या छोट्या छोट्या शहरातही दिसून येतो असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची स्थापना करणाऱ्या इटलीमधल्या कँपरोतोंदो
या शहराचं उदाहरण दिलं. कॅनडात मिसीसागा इथल्या प्रभू श्रीरामाच्या ५१ फुटी
मूर्तीचा उल्लेखही त्यांनी केला. तसंच रशियामधल्या व्लादिवोस्तोक इथं शाळकरी
मुलांनी रामायणातल्या कथांवर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवल्याचं सांगत भारतीय
संस्कृतीचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी
आनंद व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे
अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. मोदी शांघाय सहकार्य
संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत. मोदी म्हणाले की, दोन्ही
देशांच्या दोन अब्ज ८० कोटी लोकांच्या जनतेचे हित परस्पर सहकार्याशी जोडलेलं आहे.
भारत आणि चीन यांच्यातल्या सहकार्यामुळं संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग
मोकळा होईल. भारत परस्पर विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर संबंध
पुढे नेण्यास वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये
सीमाव्यवस्थापनाबाबत सहमती झाली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली असून
दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणही सुरू केले जात आहे, अशी
माहिती पंतप्रधानांनी दिली. या बैठकीकरता तियानजिनमधे आलेल्या इतर
राष्ट्रप्रमुखांबरोबरही ते द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यात रशियाचे अध्यक्ष
व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे.
****
सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं
उद्यापासून उपोषणाची तीव्रता वाढवणार असून पाणी घेणंही बंद करणार असल्याचा इशारा
मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. मुंबईतल्या आझाद मैदान इथं
जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
****
जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या
प्रस्तावावर उपसमितीनं चर्चा केली असून, सरकार यासंदर्भात कायदेशीर
मार्गदर्शन घेत असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसंच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी
उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज झाली, त्यावेळी
ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री गिरीष महाजन, दादा भुसे, मकरंद
पाटील, शिवेंद्रराजे भोसले तसंच अन्य मंत्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी
झाले होते. सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र महाविकास आघाडीचे
नेते केवळ वेगवेगळी विधानं करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात
मंत्री असताना गप्प का बसले, असा प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी
उपस्थित केला. बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले
की, प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमिती
काम करीत आहे. काल त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या महाधिवक्त्यांशीही
यासंबंधी चर्चा करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले. काल बीड जिल्ह्यातील आमदारांनी
भेट घेवून केलेल्या मागण्याबाबत तसंच समितीकडे आलेल्या अनेक सूचनांचं स्वागत करून
समितीचे सदस्य विचारही करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज
जरांगे हे मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची
टीका राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत
वार्ताहरांशी बोलत होते. जरांगेंनी यापूर्वी आंदोलन केल्यानंतर
मराठा समाजाला सामाजिक तसंच आर्थिक दृष्ट्या मागास श्रेणीचं आरक्षण देण्यात आलं, मात्र
त्यात राजकीय आरक्षण समाविष्ट नसल्यानं जरांगे आंदोलन करत आहेत अशी टीका पाटील
यांनी केली.
****
जरांगे-पाटील यांच्या मुंबईतल्या आझाद
मैदानावरील उपोषणाला,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट दिली. जरांगे यांच्या तब्बेतीची विचारपूस करून
त्यांना काळजी घेण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मराठा आंदोलनाच्या
संदर्भात तातडीनं तोडगा काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, अशी
प्रतिक्रीया काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नोंदवली आहे.
****
शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या
विविध योजना गावात प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामविकास विभागातर्फे 'मुख्यमंत्री
समृध्द पंचायतराज अभियान'
राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातल्या लोकांनी
ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट ५० टक्के सवलत देण्याची ग्वाही
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे, ते
आज सोलापूर इथं बोलत होते.
****
अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज पहाटे
मुंबईत निधन झालं. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या
कर्करोगानं ग्रस्त होत्या. विघ्नहर्ता महागणपती, किरण कुलकर्णी
व्हर्सेस किरण कुलकर्णी,
ती आणि इतर, दिल तो बच्चा है जी या
चित्रपटांमध्ये तसंच गाजलेली हिंदी टी व्ही मालिका पवित्र रिश्ता, तर
तुझेच मी गीत गात आहे,
तू तिथे मी, या सुखांनो या, तू
भेटशी नव्याने या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरण पाणलोट
क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळं आणि धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या
दृष्टीनं आज दुपारी धरणाच्या सांडव्याची दोन दारं उघडण्यात आली आहेत. धरणाच्या
सांडव्याच्या चार दारांतून मांजरा नदीपात्रात तीन हजार ४९४ पूर्णांक २८ दशलक्ष
घनफुट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडणं सुरू आहे. नदी काठावरच्या गावातल्या
नागरीकांनी खबरदारी घ्यावी,
असं आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्षातर्फे
करण्यात आलं आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
प्रत्येक नागरिकानं स्वेदेशीचा आग्रह धरावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते
आज आकाशावाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या मालिकेतील १२५व्या भागामध्ये बोलत होते.
ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
युवकांनी क्रीडा क्षेत्रात रस घ्यावा अशी सूचना त्यांनी
केली. व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. क्रीडाक्षेत्रात
अलिकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे खेळाडू ओडिशाची रश्मिता साहु आणि श्रीनगरचा
मोहसीन अली यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
हैदरबाद मुक्ती संग्रामात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
आणि भारतरत्न डॉक्टर बाबासहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा त्यांनी
गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले..
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सौरउर्जेचा वापर करत गावाचा विकास साधणाऱ्या मुजफ्फरपूरच्या
रतनपुरा इथल्या सोलारदीदी देवकी यांचा गौववपूर्ण उल्लेख करत पंतप्रधानांनी सौरउर्जेच्या
माध्यमातून होत असलेल्या क्रांतीची माहिती दिली. सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी स्वच्छतेचा
अंगीकार करावा, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी
यावेळी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी
जिनपिंग यांच्यासोबत चिनपिंग इथं चर्चा केली. मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर
बैठकीच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत. ते संघटनेतील इतर नेत्यांसोबतही द्विपक्षीय बैठक
घेणार आहेत. मोदी हे संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांच्या
सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनाससुद्धा उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्रालयातल्या
पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी सांगितलं की, संघटनेची स्थापना प्रामुख्यानं दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकवाद नष्ट करण्याच्या उद्देशानं करण्यात
आली होती, पण अशी अनेक अन्य क्षेत्रं आहेत
ज्यामध्ये सदस्य देश सहकार्य वाढवू शकतात.
भारत २०१७ पासून या संघटनेचा सदस्य आहे. २०२२-२३मध्ये भारत या संघटनेचा अध्यक्ष
होता. शांघाय सहकार्य संघटनेत एकूण दहा सदस्य देश आहेत.
****
सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून उपोषणाची
तीव्रता वाढवणार असून पाणी घेणंही बंद करणार असल्याचा इशारा मराठा मोर्चाचे नेते मनोज
जरांगे पाटील यांनी आज दिला. मुंबईतल्या आझाद मैदान इथं जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा
आज तिसरा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी शांतपणे आंदोलन करण्याचं
आवाहन आंदोलकांना केलं.
****
मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज पहाटे मुंबईत निधन
झालं. ती ३८ वर्षांची होती. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने ग्रस्त होती. आज दुपारी
चार वाजता मुंबईतल्या मीरा रोड मधल्या स्मशानभूमीत तिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही
ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील
आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाउस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा उर्ध्व
कुंडलिका मध्यम प्रकल्प धरणाच्या सांडव्याच्या २ दरवाजांमधून कुंडलिका नदीपात्रात एक
हजार ६८३ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कुंडलिका
नदी काठावरील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक
लक्षात घेऊन आज धरणाची दोन दारं उघडून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती धनेगांव पुरनियंत्रण
कक्षातर्फे देण्यात आली.
****
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा
जामिनासाठीचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे
याच्या दोषमुक्ती अर्जावरील निकाल अद्याप राखून ठेवण्यात आला आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध
प्रकारची आयात शुल्कं फेडरल न्यायालयाकडून रद्दबातल
·
शांघाय सहकार्य संघटनेच्या २५ व्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल
·
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची हैदराबाद गॅझेटसह
काही गोष्टींना तत्त्वतः मान्यता
·
आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमन- सजावटीसह विविध साहित्याने
बाजारपेठा सजल्या
आणि
·
बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा पादचारी भाविकांचा
मृत्यू
****
अमेरिकेचे
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्कं बेकायदेशीर असल्याचं
सांगत फेडरल न्यायालयाने ते रद्दबातल ठरवली आहेत. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात
दाद मागण्यासाठी ट्रम्प सरकारला १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली असून तोपर्यंत हे शुल्क
लागू असेल, असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितलं.
****
शांघाय
सहकार्य संघटनेची २५ वी शिखर परिषद आजपासून चीनमधे तिएनजीन इथं सुरू होत आहे. दोन दिवस
चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या २५ वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल
तसंच पुढच्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
या परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानहून चीनमध्ये दाखल झाले.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट
प्रसारण केलं जाणार आहे.
****
चालू आर्थिक
वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाली आहे.
जीडीपीत
झालेली ही वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
तर, सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर आपल्या अर्थव्यवस्थेनं वेग घेतल्याचं
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या अर्थतज्ज्ञांनीही
याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. आर्थिक विश्लेषक उदय तारदाळकर यांनी याबाबत अधिक माहिती
दिली. ते म्हणाले..
बाईट
- उदय तारदाळकर
****
तालुकास्तरावर
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ
दिली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. सदर
समितीला २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू
राहतील, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट
यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षणासंदर्भात
राज्य मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्त्वतः मान्यता दिली आहे. मराठा
आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी काल
मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा
केली, त्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यभरातून कुणबी प्रमाणपत्रासाठी
५८ लाख अर्ज प्राप्त झाले असून यापैकी दहा लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. यासंदर्भात
अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..
बाईट
- आकाशवाणी प्रतिनिधी
मराठा आरक्षण
प्रश्नावर संवैधानिक चौकटीत राहून तोडगा काढू असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केला आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तामिळनाडूमधे आरक्षणाची मर्यादा
७२ टक्के असल्याकडे लक्ष वेधत, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची
गरज व्यक्त केली.
पवार यांच्या
या मतावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार आज ही सूचना करत आहेत, मात्र ते
दहा वर्षे सत्तेत होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
ओबीसी महासंघाचे
राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आरक्षणप्रकरणी नागपुरात उपोषण पुकारलं आहे.
आपलं उपोषण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असून मराठा आरक्षणाची पूर्तता करताना ओबीसी
आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी सरकारकडून मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार
नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय
गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत 'लालबागच्या राजा'चं सहकुटुंब दर्शन घेतलं. शहा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं.
केंद्रीय
आरोग्य मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल पुण्याचं ग्रामदैवत कसबा
गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचं दर्शन घेतलं.
****
ज्येष्ठा
कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्म्यांचं आज घरोघरी आगमन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या
सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. गौरीचे मुखवटे, साड्या,
दागदागिने, मखर, तसंच सजावटीच्या
साहित्याने आणि हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीने शहरातले रस्ते फुलून
गेले आहेत.
****
बीड जिल्ह्यात
भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर
पेंडगाव फाटा इथं काल सकाळी ही घटना घडली. हे सर्वजण पेंडगावला दर्शनासाठी जात होते.
या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी
दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
****
केंद्र
आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलला संस्कृत अनुरागी शाळा पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलं आहे. संस्कृत प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. चंपालाल देसरडा संस्कृत
अनुरागी शाळा पुरस्कार या शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापक सिस्टर सिंथिया फर्नांडिस, शाळेचे संस्कृत
शिक्षक गिरीश जोशी आणि अनिरुद्ध महाजन यांना प्रदान करण्यात आला.
****
हिंगोली
जिल्हात आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निवडीसाठी काल ९६ पूर्णांक
९२ टक्के एवढं मतदान झालं. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे
पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच आमदार
संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
दरम्यान, मांजरा धरणाचे
सर्व दरवाजे काल दुपारनंतर बंद करण्यात आले. धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुरात वाहून
गेलेले अनिल लोखंडे यांचा मृतदेह काल सकाळी सापडला. २७ तारखेला अनिल लोखंडे पुराच्या
पाण्यात वाहून गेले होते.
****
लातूर जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे सुमारे एक लाख ४७ हजार ५९३ हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील
साडे पाचशे गावं बाधित झाली असून ४०६ घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी
तातडीने पंचनामे करून शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्ह्यात
पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.
****
नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे तसंच माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी ग्रामीण
भागातील अनेक गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान, जिल्ह्यातील माळाकोळी इथल्या फुलमळा तलावाला काल भगदाड पडलं. त्यामुळे
तलावाखालील शेतजमिनीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मूग तसंच उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात
आले आहेत. या माध्यमातून विमा नुकसान भरपाई निश्चित केली जाते, त्यामुळे
सर्व शेतकरी बांधवांनी त्याकडे सतर्कतेने लक्ष देण्याचं आवाहन आमदार राणा जगजितसिंह
पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, सीना कोळेगाव
प्रकल्पाच्या १० दरवाजांमधून १५ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग
सुरु आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात २२ हजार २८४ दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगाने
पाण्याची आवक सुरु असून गोदापात्रात नऊ हजार ४०० दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगाने
विसर्ग सुरु आहे.
****
हवामान
पश्चिम
महाराष्ट्र, खानदेश तसंच मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात आज यलो अलर्ट
देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच
परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
Saturday, 30 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· अमेरिकेचे
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांनी लादलेली विविध
प्रकारची आयात शुल्कं फेडरल
न्यायालयाकडून रद्दबातल
· शांघाय
सहकार्य संघटनेच्या २५
व्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल
· कुणबी
मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भातील वंशावळ समितीला ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ
· ज्येष्ठा
कनिष्ठा गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर
विविध साहित्याने बाजारपेठा
सजल्या
आणि
· बीड
जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत
सहा पादचारी भाविकांचा
मृत्यू
****
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प यांनी लादलेली विविध
प्रकारची आयात शुल्कं बेकायदेशीर
असल्याचं सांगत फेडरल न्यायालयाने
रद्दबातल ठरवली आहेत. आंतरराष्ट्रीय
आपत्कालीन अधिकार कायदा
या करांना मान्यता
देत नसल्याचं .न्यायालयानं
नमूद केलं. फेडरल
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च
न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प
प्रशासनाला १४ ऑक्टोबरपर्यंत वेळ
दिलेला असून तोपर्यंत हे
शुल्क लागू असेल, असं
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते
कुश देसाई यांनी सांगितलं
****
१५ व्या भारत - जपान
वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू
केलेल्या भागीदारी उपक्रमामुळे
दोन्ही देशातल्या व्यापार,
तंत्रज्ञान, पर्यटन, कौशल्य,
सुरक्षा आणि सांस्कृतिक भागीदारीला
चालना मिळेल, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे.
ते आज टोकयोमध्ये बोलत
होते. मोदी यांनी जपानचे
पंतप्रधान शिगेरू इशिबा
यांच्यासह आज बुलेट ट्रेननं
प्रवास केला. सेंदई
इथल्या इलेक्ट्रॉन कारखान्यालाही
त्यांनी भेट दिली. यानंतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
शांघाय सहकार्य संघटनेच्या
बैठकीसाठी चीनमध्ये दाखल
झाले. भारतीय वंशाच्या
नागरिकांनी त्यांचं मोठ्या
उत्साहात स्वागत केलं.
शांघाय सहकार्य संघटनेची
२५ वी शिखर परिषद
उद्यापासून चीनमधे तिएनजीन
इथं सुरू होत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या
परिषदेत संघटनेच्या मागच्या
२५ वर्षांच्या कामकाजाचा
आढावा घेतला जाईल तसंच
पुढल्या दहा वर्षांसाठी धोरण
आखलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या मन की
बात या कार्यक्रम मालिकेतून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी अकरा वाजता आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट
प्रसारण केलं जाणार आहे.
****
चालू आर्थिक वर्षाच्या
पहिल्या तिमाहीत देशाच्या
अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची
नोंद झाली आहे.
देशाची अर्थव्यवस्था केवळ
जगात वेगाने विकसित
होणारी अर्थव्यवस्था नसून
जीडीपीत झालेली वाढ
उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय
मंत्री हरदीप सिंग पुरी
यांनी म्हटलं आहे.
तर, सुधारणा आणि
लवचिकतेच्या बळावर जागतिक स्तरावर
भारताच्या अर्थव्यवस्थेनं वेग
घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य
आणि उद्योग मंत्री
पियुष गोयल यांनी म्हटलं
आहे. देशभरातल्या अर्थतज्ज्ञांनीही याबाबत समाधान व्यक्त
केलं आहे. आर्थिक
विश्लेषक उदय तारदाळकर यांनी
याबाबत अधिक माहिती दिली.
ते म्हणाले..
बाईट - उदय तारदाळकर
****
तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ
समितीला शासनानं ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं जारी केला, सामाजिक
न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही
माहिती दिली. सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू
राहतील,
असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट
यांनी सांगितलं.
****
राज्यात परवान्याशिवाय अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू
असलेल्या रॅपिडो, ओला, उबर
या सारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्यानं कारवाई सुरू राहील, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. राज्य शासनानं ई-बाईक
टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार संबंधित
संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी असं आवाहनही त्यांनी
केलं आहे.
शासनानं परवाना मिळेपर्यंत अशा सेवा बंद
ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात
संबंधित कंपन्यांनी प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते, तरीही
या नियमांचं उल्लंघन करून सेवा सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे.
****
मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस
आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे
यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट
घेऊन चर्चा करतील, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे
अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वार्ताहरांना दिली. हा प्रश्न सुटावा, हीच सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या
मराठा बांधवांच्या सोयीसाठी पाणी, दिवे, स्वच्छतेची सोय करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काल मुसळधार पाऊस
झाल्यामुळे आझाद मैदानात चिखल
आणि पाणी साचलं, त्यामुळे
आंदोलकांना मोठ्या त्रासाला
सामोरं जावं लागलं. त्यामुळे
काहींनी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर
ठिय्या आंदोलन केलं.
नवी मुंबईच्या सिडको
प्रदर्शन केंद्रात उतरलेल्या
कार्यकर्त्यांनी वीज आणि
पाण्याची सोय नसल्याबद्दल आज
रास्ता रोको आंदोलन केलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत 'लालबागच्या राजा'चं सहकुटुंब दर्शन घेतलं. यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी अमित शहा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन
गणेशाचं दर्शन घेतलं.
****
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात डॉल्बी आणि लेझर शो बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या
आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
ज्येष्ठा कनिष्ठा गौरी
अर्थात महालक्ष्म्यांचं उद्या
घरोघरी आगमन होत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या
सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी
महिला वर्गाची लगबग
सुरू झाली आहे. गौरीचे
मुखवटे, साड्या, दागदागिने,
मखर, तसंच सजावटीच्या साहित्याने
आणि हे साहित्य खरेदीसाठी
बाजारपेठेत झालेल्या गर्दीने
शहरातले रस्ते फुलून गेले
आहेत.
****
बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत
सहा जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावर पेंडगाव फाटा इथं आज सकाळी ही घटना घडली.
हे सर्वजण पेंडगावला
दर्शनासाठी जात होते. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार
यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई
करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत तसंच मृतांच्या कुटुंबियांना
शासन स्तरावरून तातडीनं सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक
सुरक्षेबाबत अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना
दिले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध
शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे
निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी घेण्यात
आलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं होली क्रॉस इंग्लिश
हायस्कूलला संस्कृत अनुरागी
शाळा पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलं आहे.
संस्कृत
प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला
जाणारा डॉ.चंपालाल देसरडा
संस्कृत अनुरागी शाळा
पुरस्कार या शाळेच्या मुख्याध्यापक
सिस्टर सिंथिया फर्नांडिस,
शाळेचे संस्कृत शिक्षक
गिरीश जोशी आणि अनिरुद्ध
महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला.
संस्कृतदिनाच्या औचित्याने संस्कृत
भाषेच्या प्रचार व
प्रसाराच्या उल्लेखनीय कार्याची
दखल घेत हा पुरस्कार
दिला जातो.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या एक हजार ३२३ निवासी सदनिका आणि १८ भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन
नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला ०८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती
दिली.
****
बीड विधानसभा क्षेत्रात मागील दोन दिवसात झालेल्या
अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संदीप
क्षीरसागर यांनी केली आहे.
परळी वैजनाथ मतदारसंघात झालेल्या नुकसानाचा माजी मंत्री
धनंजय मुंडे यांनी आज समग्र
आढावा घेतला. या
नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आमदार मुंडे यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, मांजरा धरणाच्या पाणलोट
क्षेत्रात येणारी पाण्याची आवक मंदावल्याने, धरणाचे सर्व दरवाजे आज दुपारनंतर बंद
करण्यात आले.
बीड जिल्ह्याच्या धारूर
तालुक्यात वाण नदीच्या पुरात
वाहून गेलेले अनिल
लोखंडे यांचा मृतदेह आज
सकाळी सापडला. २७
तारखेला लोखंडे हे
पुराच्या पाण्यात वाहून
गेले होते.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभ...