Saturday, 30 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२ सकाळी.०० वाजता

****

परभणी तालुक्यातील ९ मंडळ अधिकारी आणि ५२ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आलं. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. नव्याने मिळालेल्या संगणकीय सुविधांमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, विशेषतः ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी आदी सुविधा नागरिकांनी सुलभपणे उपलब्ध करू देता येतील.

****

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीयांच्या एका पथकाला आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी तृतीय पंथी करत आले आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमामुळे हातभार लागेल असं संकपाळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृती दल  गठीत करण्यात आलं असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. या दलामार्फत पदवी अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाची रचना, OJT/Internship संदर्भातील कार्यपद्धती, विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी मदत कक्ष, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या शिफारसी हे दल शासनास सादर करेल. ही  समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार नाट्य लेखक अभिराम भडकमकर यांना तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार महेश मांजरेकर यांना देण्यात येणार आहे. सन्मानपत्र आणि ३१ हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे, यंदाचा बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे सुनील देशपांडे यांना जाहीर करण्यात आला. सन्मानपत्र आणि १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जून अखेरीस हे  पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अड्याळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला, या अड्ड्यावरुन जवळपास १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मोहफुल सडवा नष्ट केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90 टक्केच पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल, तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघाचा टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने चेम्सफर्ड इथं इंग्लंडचा ३८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉंटन इथं खेळवला जाणार आहे. दरम्यान, 12 जूनपासून इंग्लंडमध्ये ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ८ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि १० जून रोजी इंग्लंडविरुद्ध कार्डिफ येथे सराव सामने खेळणार आहे.

****

कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव केला.

****

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 May 2026
Time: 09:00-09:10 AM
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۰۳/مئی ۶۲۰۲ء؁
وقت: 09.00 سے 09.10/ بجے
***** ***** *****
سرخیاں
پہلے خاص خبروں کی سرخیاں...
٭ NEET پیپر افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کے ذمہ داروں کا تعین کیا جائے: عدالت ِ عظمیٰ کا مشاہدہ۔
٭ مستقبل میں مہاراشٹر عالمی سطح پر AI کی قیادت کرے گا: وزیرِ اعلیٰ کا اعتماد۔
٭ قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم پر مہاوِکاس آگھاڑی کا فیصلہ۔
٭ جالنہ ضلع میں دیوار منہدم ہونے سے دو بچوں کی موت؛ پربھنی ضلع میں سڑک حادثے میں چار نوجوان ہلاک۔
اور۔۔۔ ٭ گجرات ٹائٹنس IPL کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
عدالت ِ عظمیٰ نے کہا ہے کہ NEET سوالیہ پرچہ افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کی ذمہ داری کا تعین کیا جانا چاہیے۔ اس سلسلے میں داخل درخواستوں پر جسٹس پی ایس نرسنگھ اور جسٹس آلوک آرادھیے کی بینچ نے کل سماعت کی۔ ان میں سے ایک درخواست میں قومی امتحانی ایجنسی (NTA) کی ازسرِ نو تشکیل یا اس کی جگہ میڈیکل کورسیز میں داخلے کیلئے ایک مضبوط اور خود مختار ادارہ قائم کرنے کا مطالبہ کیا گیا ہے۔ عدالت نے اس سلسلے میں حکومت کو حلف نامہ داخل کرنے کی ہدایت دی۔ اس مقدمے کی آئندہ سماعت جولائی کے دوسرے ہفتے میں ہوگی۔
دریں اثناء‘ مرکزی وزیرِ تعلیم دھرمیندر پردھان نے کہا ہے کہ NEET کا سوالیہ پرچہ افشاء ہونے کا معاملہ نہایت ہی سنگین ہے۔ 21 جون کو ہونے والے دوبارہ امتحان بہتر طور پر کرانا حکومت کی ذمہ داری ہے۔ کل نئی دہلی میں اخباری نمائندوں سے گفتگو کرتے ہوئے انھوں نے امتحان کے پورے عمل میں کسی قسم کی غلطی نہ ہو اس کیلئے ہر ممکنہ احتیاطی تدابیر اختیار کی جارہی ہیں۔ انھوں نے مزید کہا کہ معاملے سی بی آئی کے سپرد کیا جاچکا ہے اور اس خصوص میں روزانہ نئے انکشافات سامنے آرہے ہیں۔ اصل سازش تک پہنچنے اوراس کے مرتکب ملزمان کو سخت ترین سزائیں دلانے کیلئے حتی المقدور کوششیں جاری ہیں۔
***** ***** *****
عدالت ِ عظمیٰ نے ملک کی تمام عدالت ِ عالیہ کو حکم دیا ہے کہ زیرِ التواء مقدمات پر محفوظ کیے گئے فیصلے اندرونِ تین ماہ جاری کیے جائیں۔ سپریم کورٹ نے شخصی آزادی سے متعلق مقدمات کی فوری سماعت اور فیصلوں کی ضرورت پر بھی زور دیا۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے یقین ظاہر کیا ہے کہ آنے والے وقت میں مہاراشٹر صرف ہندوستان نہیں بلکہ پوری دنیا میں مصنوعی ذہانت یعنی AI کی قیادت کرے گا۔ ممبئی کے باندرہ- کُرلا کمپلیکس میں ٹیک وِیک 2026- کے افتتاح کے بعد خطاب کرتے ہوئے انھوں نے کہا کہ مہاراشٹر AI انقلاب کی قیادت کیلئے مکمل طور پر تیار ہے۔ انھوں نے ممبئی کی اقتصادی قوت‘ تکنیکی مہارت‘ مضبوط اسٹارٹ اَپ نظام اور جدید ٹکنالوجی اپنانے کی صلاحیت کی سمت توجہ مبذول کروائی۔ ان کے مطابق مسلسل تین برسوں سے مہاراشٹر سرمایہ کاری اور اسٹارٹ اَپس کی تعداد کے لحاظ سے ملک کی سرِ فہرست ریاست ہے۔
***** ***** *****
ریاستی قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم سے متعلق مہاوکاس آگھاڑی کی رُکن جماعتوں میں فیصلہ ہوگیا ہے۔ کانگریس کے ریاستی صدر ہرش وردھن سپکاڑ نے کل ممبئی میں نامہ نگاروں کو یہ اطلاع دی۔ چندرپور‘ ایوت محل‘ بھنڈارا- گوندیا‘ دھاراشیو‘ اہلیانگر‘ شولاپور‘ امراوتی اور بیڑ- لاتور اور ناگپور کے ضمنی الیکشن میں کانگریس امیدوار کھڑا کرے گی، جبکہ رائے گڑھ- رتناگری‘ جلگاؤں‘ پربھنی‘ ہنگولی اور سمبھاجی نگر میں شیوسینا اُدّھو باڑا صاحب ٹھاکرے پارٹی کے امیدوار میدان میں ہوں گے۔ راشٹروادی کانگریس شرد چندر پوار پارٹی کے پونا‘ تھانہ اور سانگلی- ساتارا سے امیدوار کھڑا کرے گی۔
***** ***** *****
نیشنل ڈیفنس اکیڈمی (NDA) کے 150 ویں کورس کی تقریب تقسیمِ اسناد کل پونہ کے کھڑک واسلہ میں پُروقار طریقے سے منعقد ہوئی۔ تقریب میں پڈوچیری کی سابق لیفٹیننٹ گورنر کرن بیدی بطورِ مہمانِ خصوصی شریک تھیں۔ اس موقع پر236 کیڈیٹس کو جواہر لال یونیورسٹی کی ڈگریاں تفویض کی گئیں۔
***** ***** *****
ریاست میں گیارہویں جماعت میں داخلے کی پہلی فہرست کل جاری کردی گئی۔ ثانوی اور اعلیٰ ثانوی تعلیم کے محکمے کے زیرِ انصرام تمام جونیئر کالجوں کیلئے آن لائن داخلے کا عمل جاری ہے۔ ان داخلوں کیلئے ریاست بھر سے 12 لاکھ 51 ہزارطلبہ نے رجسٹریشن کیا تھا۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جا رہی ہیں۔
***** ***** *****
شارجہ سے پیٹرولیم مصنوعات ہندوستان کی جانب لے آنے والے تیل بردار جہاز نسوس کیروس نے کامیابی سے آبنائے ہرمز پار کرلیا ہے۔توقع ہے کہ 3 جون کو یہ جہاز وشاکھا پٹنم کی بندرگاہ پہنچے گا۔ اسی دوران خلیجی ممالک میں جاری بحران کے پیشِ نظر حکومت نے LPG کمپنیوں کو ہدایت کی ہے کہ 30 دنوں کا ذخیرہ محفوظ کیا جائے۔
***** ***** *****
پیٹرول - ڈیزل اور گیس سلنڈر کی قیمتوں میں اضافے کیخلاف کل کانگریس کی جانب سے ریاست کے مختلف مقامات پر مظاہرے کیے گئے۔ ناندیڑ میں آئیٹی آئی کے احاطے میں واقع مہاتما پھلے کے مجسّمے کے روبرو مظاہرہ کیا گیا۔ مظاہرین نے بیل گاڑی پر لاد کر ٹو وہیلر اور سڑک پر ہی چولہے جلاکر روٹیاں سینکیں۔ یہ مظاہرہ ضلع صدر وٹھل پاؤڑے اور شہر صدر عبدالغفار کی قیادت میں کیا گیا۔
بیڑ میں ضلع صدر راہل سونونے کی قیادت میں مظاہرہ کیا گیا۔ اس موقع پر سونونے‘ نے انتباہ دیا کہایندھن کی قلّت دور کرکے قیمت میں کمی نہیں کی گئی تو تحریک مزید تیز کی جائیگی۔ پارٹی کی جانب سے ضلع کلکٹر کو محضر بھی پیش کیا گیا۔ دھاراشیو میں ضلع صدر امیش راجے نمبالکر کی قیادت میں مظاہرہ کیا گیا۔
***** ***** *****
جالنہ ضلع میں ایک قدیم مکان کی دیوار منہدم ہوجانے سے دو نابالغ بچوں کی موت واقع ہوگئی۔ عنبڑ تعلقے کے گھونگرڈے حد گاؤں میں کل یہ حادثہ پیش آیا۔ یہ دونوں بچے بکریوں کیلئے درخت کے پتے توڑ رہے تھے کہ مخدوش مکان کی دیوار گرگئی‘ جس کے باعث ان کی موت واقع ہوگئی۔
پربھنی ضلع میں کلیان-نرمل قومی شاہراہ پر ایک خانگی بس اور ٹووہیلر کے درمیان ہوئے حادثے میں چار افراد ہلاک ہوگئے۔ یہ حادثہ کل شب پیش آیا۔ حادثے میں ہلاک ہونے والے چاروں نوجوانوں کا تعلق مانوت سے بتایا جاتا ہے۔
***** ***** *****
قومی تحقیقاتی ادارے (NIA) نے کل ملک بھر میں 12 مقامات پر چھاپے مارکر متعدد افراد سے تفتیش کی۔ اس کارروائی میں چھترپتی سمبھاجی نگر کے والوج علاقے سے ایک شخص کو حراست میں لیکر پوچھ تاچھ کیے جانے کی بھی بات سامنے آئی ہے۔
***** ***** *****
مراٹھا ریزرویشن اور دیگر مطالبات کیلئے بھوک ہڑتال کے اپنے فیصلے پر قائم رہنے کے مؤ قف کا اظہار منوج جرانگے پاٹل نے کیا ہے۔ انتروالی سراٹی میں کل ریاستی وزیر رادھا کرشن وکھے پاٹل اور رکنِ اسمبلی پرساد لاڑ کے ساتھ ملاقات نتیجہ خیز ثابت نہیں ہوئی۔ تاہم جرانگے نے کہا کہ تحریری تیقن اور سرکاری حکمنامہ موصول ہونے پر آج صبح بھوک ہڑتال سے متعلق فیصلہ کیا جائے گا۔
***** ***** *****
محکمہ موسمیات نے پیش گوئی کی ہے کہ ایل نینو کے اثرات کے باعث اس سال جنوب مغربی مانسون اوسط سے کم90 فیصد رہے گا۔ محکمہ موسمیات کے ڈائریکٹر جنرل مرتیونجئے موہاپاترا اور وزارتِ ارضی سائنس کے سیکریٹری ڈاکٹر روی چندرن نے کل نئی دہلی میں مانسون 2026 کے دوسرے مرحلے کی طویل پیش گوئی جاری کی۔ ان کے مطابق جون سے ایل نینو کے اثرات میں اضافہ متوقع ہے اور وسطی و جنوبی ہندوستان میں بارش کا تناسب کم رہنے کا امکان ہے۔
***** ***** *****
کپتان شبھمن گل کی جارحانہ سنچری کی بدولت گجرات ٹائٹنس نے انڈین پریمیر لیگ (IPL) کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں داخلہ حاصل کرلیا ہے۔ کل نیو چنڈی گڑھ میں کھیلے گئے میچ میں گجرات نے راجستھان رائلز کو سات وکٹ سے شکست دے دی۔ راجستھان کی ٹیم نے پہلے بلّے بازی کرتے ہوئے مقررہ اوورز میں 214 رن بنائے‘ تاہم گجرات کی ٹیم نے یہ ہدف 19 ویں اوور میں ہی حاصل کرلیا۔ 53 گیندوں میں 104 رن بنانے والے شبھمن گِل کو مین آف دی میچ قرار دیا گیا۔ کل ٹورنامنٹ کا فائنل گجرات اور رائل چیلنجرز بنگلورو کے مابین کھیلا جائے گا۔
***** ***** *****
ریاست میں کل وردھا میں سب سے زیادہ درجہ حرارت 46 اعشاریہ آٹھ ڈگری سیلسیئس درج کیا گیا۔ مراٹھواڑہ میں پربھنی میں 42 اعشاریہ چارڈگری‘ ناندیڑ میں 42 اعشاریہ چھ ڈگری اور چھترپتی سمبھاجی نگر میں درجہ حرارت 41 اعشاریہ چار ڈگری سیلسیئس درج کیا گیا۔
***** ***** *****
سرخیاں
آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر....
٭ NEET پیپر افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کے ذمہ داروں کا تعین کیا جائے: عدالت ِ عظمیٰ کا مشاہدہ۔
٭ مستقبل میں مہاراشٹر عالمی سطح پر AI کی قیادت کرے گا: وزیرِ اعلیٰ کا اعتماد۔
٭ قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم پر مہاوِکاس آگھاڑی کا فیصلہ۔
٭ جالنہ ضلع میں دیوار منہدم ہونے سے دو بچوں کی موت؛ پربھنی ضلع میں سڑک حادثے میں چار نوجوان ہلاک۔
اور۔۔۔ ٭ گجرات ٹائٹنس IPL کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں۔
***** ***** *****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी-सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय

·      इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

·      जालना जिल्ह्यात भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू; परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात चार युवक ठार

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक

****

नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था -NTA चं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हे पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश, राखून ठेवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जाहीर करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं.

****

आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक विक २०२६ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे, मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली.

चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड- लातूर या आठ जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली-सातारा इथून उभे राहणार आहेत. इतर दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेऊ, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.

दरम्यान, उस्मानाबाद - लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३२ व्यक्तींनी ६० कोरे नामनिर्देशनपत्रे प्राप्त केली आहेत. तर दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल पुण्यात खडकवासला इथं दिमाखदारपणे पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी २३६ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या ‘निसोस केरॉस’ या तेलवाहू जहाजाने होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून, हे जहाज ३ जून रोजी विशाखापट्टणबंदरात पोहोचेल. दरम्यान, आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एलपीजी कंपन्यांना ३० दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या भाववाढी विरोधात काल काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दरकपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

धाराशिव इथं जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ रद्द करण्यासह इतर मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

****

जालना जिल्ह्यात एका जुन्या घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या घुंगर्डे हादगाव इथं काल ही घटना घडली. काल दुपारी दोन्ही मुले शेळ्यांसाठी शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण घराची भिंत अचानक कोसळून या दोघे ठार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले चारही तरुण मानवत इथले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने काल देशभरात १२ ठिकाणी छापे टाकून अनेकांची चौकशी केली. या कारवाईत, छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेत, चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

****

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबतच्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. मात्र, लेखी आश्वासन आणि शासन आदेश प्राप्त झाल्यास आज सकाळी उपोषबाबत निर्णय घेतला जाईल, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं त्यांनी सांगितलं.

****

कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करत, वैभव सूर्यवंशीच्या ९६ धावांच्या बळावर २१४ धावा केल्या, मात्र गुजरात संघाने हे आव्हान १९ व्या षटकांतच पार केलं. ५३ चेंडूत १०४ धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या दोन संघात होणार आहे.

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी १९-२१, २१-१७, २१-१३ असा विजय मिळवला.

****

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. २०२६ कौशल्याला रोजगाराची दिशा, या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी पाचशेहून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

****

राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस, नांदेड ४२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार, बीड ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

Friday, 29 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी-सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमाखदारपणे साजरा

·      इंधन भाववाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

आणि

·      एल निनोमुळे यंदा ९० टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

****

नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था -NTA चं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान म्हणाले.

****

देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश, राखून ठेवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जाहीर करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं हा निर्णय दिला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं.

****

ऑपरेशन सिंदूर हे एक अभूतपूर्व यश होतं, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरवरच्या एका स्मृती अंकाचं सामाजिक माध्यमावरुन प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकाशन केवळ ऐतिहासिक नोंदींपुरतं मर्यादित नसून, यामध्ये वीर सैनिकांच्या वैयक्तिक अनुभवांनाही स्थान देण्यात आलं आहे, असं सिंह यांनी सांगितलं. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी, तसंच देशासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सक्षम नागरिक घडवण्यासाठी या प्रकाशनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं.

****

आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक विक २०२६ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे, मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेऊ, असं सपकाळ म्हणाले. 

चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड- लातूर या आठ जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली-सातारा इथून उभे राहणार आहेत. 

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला येथील हबीबुल्ला सभागृहात दिमाखदारपणे पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

यावेळी २३६ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे ६५, संगणक शास्त्र शाखेचे ११२ आणि कला शाखेचे ५९ कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसेच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांतील २१ कॅडेट्सनाही पदवी बहाल करण्यात आली. दरम्यान, एनडीएची पासिंग आऊट परेड उद्या होणार असून, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या परेडचं निरीक्षण करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्यानिसोस केरॉसया तेलवाहू जहाजाने होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते ३ जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. दरम्यान, होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

****

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या भाववाढी विरोधात आज काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापटल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दरकपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

धुळे तसंच भंडारा इथंही काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं.

****

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे  प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा घेतला. न्यायमूर्ती शिंदे समितीने केलेलं काम समाधानकारक असल्याचं मत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना नमूद केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहिर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, जुलै-ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेने चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं मोहापात्रा यांनी सांगितलं.

****

इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. आजच्या सामन्यातला विजेता संघ परवा रविवारी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात उद्या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. २०२६ कौशल्याला रोजगाराची दिशा, या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी पाचशेहून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

****

राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस, नांदेड ४२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार, बीड ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...