Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
व्होकल
फॉर लोकल हा मंत्र अंगिकारत फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरण्याचं पंतप्रधानांचं आवाहन;
एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात
उत्साह
·
मराठवाड्यात
सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
·
विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार - शालेय शिक्षण
मंत्री दादा भुसे यांची माहिती
·
कार्यालयीन
सुधारणा मोहीम उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला द्वितीय
पारितोषिक
आणि
·
पुढचे
पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
****
व्होकल फॉर लोकल हा मंत्र अंगिकारत
फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज
७९ व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर
ते बोलत होते. विक्रेत्यांनी आपल्या दुकानात स्वदेशी वस्तू विकाव्यात,
स्वदेशीचा वापर नाईलजाने नव्हे तर अभिमानाने
करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऑपरेशन
सिंदूरसह विविध मुद्यांचा उल्लेख केला. महात्मा जोतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीच्या
पार्श्वभूमीवर बोलतांना, मागास
घटकांना प्राधान्य देऊन आपण परिवर्तनाची नवी शिखरं पादाक्रांत करू,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी,
पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या
मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं
योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या
जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांनी पुण्यात राजभवन इथं राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना दिली.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन
उत्साहात साजरा झाला. याबाबतचा हा वृत्तांत –
मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांच्या सहकार्यानं बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, नवा विकसित बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं. ते म्हणाले –
बाईट – उपमुख्यमंत्री
अजित पवार
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं. परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते
तर हिंगोली
इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन पार पडलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री
अतुल सावे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं
पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या
हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.
सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्र्यांच्या
हस्ते सेवा पदकं तसंच राष्ट्रपती पदकं प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर
केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले –
बाईट – पालकमंत्री
संजय शिरसाट
मुंबर्इ उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय
न्यायमुर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी खंडपीठातील माननीय न्यायधीश, वकील संघ, तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू
डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठात
कुलगुरू डॉ इंद्र मणी
मिश्रा यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबर्इ उच्च न्यालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा कुलगुरू
डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
कुलगुरू डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामं वेळेत
पूर्ण व्हावी यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश
महाजन यांनी दिले. ते आज नाशिक इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत
होते. कुंभमेळ्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामं करावीत त्याचप्रमाणे कामांची गुणवत्ता
राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलं.
****
शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश
करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
भुसे यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘दशसूत्री’
या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. शाळांची आणि शिक्षणाची स्थिती बळकट करण्यासाठी माजी
विद्यार्थ्यांशी शाळा संवाद साधेल. शाळा अद्यावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल,
त्यातून शाळांचे चित्र बदलेल,
असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
****
१०० दिवसांत कार्यालयीन सुधारणा मोहीम जिल्ह्यातल्या
सर्व तालुक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला
आज द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गटविकास अधिकारी मीना रावताळे,
गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरी असलेलं प्रशस्तीपत्र
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.
****
राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस
सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
त्यानंतरही दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून
पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अधून-मधून वाढत असून नदी-नाल्यांना पूर आला असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड जिल्ह्यात २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे
उघडण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातला तावरजा
मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्क्यांवर गेला आहे.
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या
माकणी इथल्या निम्न तेरणा धरणाचा पाणीसाठा ८५ टक्के झाला असून,
तेरणा नदीपात्रात विसर्ग सुरु होण्याची
शक्यता आहे.
****
हवामान
दक्षिण ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर
भागात आज आलेल्या चक्रीवादळामुळे येत्या २० तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी
मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे पाच दिवस मराठवाड्याच्या
आठही जिल्ह्यात तसंच राज्यातल्या इतर भागातही विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अतिमुसळधार
पाऊस पडेल, तर
कोकणासह गोव्यातही अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment