Tuesday, 31 December 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी मुंबईचे 31.12.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.  

मस्साजोग हत्या प्रकरणी आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण. 

शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.

शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ. 

आणि

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत विकासकांना येणाऱ्या अडचणी नियमित बैठका घेऊन सोडवाव्यात तसंच यासंदर्भातील अहवाल १५ दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारी पूर्वक लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

****

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तत्पुर्वी त्यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे. 

****

वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे. सरकारने आता यापुढचं काम करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना आव्हाड यांनी, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. 


खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले..

या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याच्या विरूद्ध पुरावा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…… 

काय वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधावर कुणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या संदर्भात पोलीस वेळोवेळी निर्णय करतील, पोलीस ब्रिफींग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही.


दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज पुढचे दोन दिवस बंद राहणार आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीसाठी सरपंच संघटनेनं राज्यभरात आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला शेतकरी आणि शास्त्रज्ञ असा सुसंवाद कार्यक्रम घेण्यात येतो. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र -२  च्या वतीने गेल्या १०५ महिन्यांपासून हा उपक्रम निशुल्क रित्या राबवला जात आहे. उद्या सकाळी साडे अकरा वाजता, कृषी विज्ञान केंद्रात १०६ व्या  सुसंवाद कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन केंद्राच्या विस्तार शिक्षण विभागाचे विषय विषयतज्ञ डॉ बसवराज पिसुरे यांनी केलं आहे.

सद्यस्थितीमधील पशुधन व्यवस्थापन, मोसंबी बहार व्यवस्थापन, आंबा मोहोर व्यवस्थापन,नैसर्गिक शेती व के वि के चे विविध उपक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपल्या शेतीसाठी लाभ करून घ्यावा.


****

राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावल बोलत होते. नोंदणीची ही मुदत आज संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू आहेत. 

****

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जानेवारीला शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा काढण्यात येणार आहे.

****

आज ३१ डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहेत. 

न्यूझीलंड इथं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोष आणि उत्साहात करण्यात आलं. याठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा शब्दात राज्यपालांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

अहिल्या नगर जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळांवर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांच्या स्वागतासाठी कापडी तंबू उभारण्यात आले आहेत. यासह घाटघर रतनवाडी व्हॅली इथं नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.  

****

बीड इथं आज सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थित होत्या. व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच ३२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली. या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं, मिनियार यांनी सांगितलं. ते म्हणाले.. 

छत्रपतीसंभाजीनगरमध्ये ३२ इलेक्ट्रीक बसेस, प्लस प्रधानमंत्री योजनेच्या आपल्याकडे आणखी १०० सिटी बस येणार आहेत. परंतू या बसेस येण्यापुर्वी आपल्याला त्याची जी पुर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पाँईट असणे अपेक्षीत आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि जाधववाडी या ठिकाणी जो आता सिटीबसचा डेपो बनतोय त्याठिकाणी ते होणार आहे.आणि त्यामाध्यमातून आपल्याकडे बसेस येतील आणि त्यानुसार आपले रुट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील.


लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. यासाठी नोंदणीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. ही मुदत आज संपणार होती.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या  वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी संबधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं उद्यापासून रेल्वेच्या वेळापत्रकात काही गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. बदललेल्या वेळापत्रकाची प्रत मोठ्या स्थानकांवर लावण्यात आली असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****


आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे दुपारी 03.00 वाजताचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

آکاشوانی خبریں‘ تاریخ: 31.12.2024 ‘ وقت: دوپہر 01:50

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेले वाल्मिक कराड हे पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यात स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून, पोलिस तपासात दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले.

****

आज ३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून, विविध पर्यटन स्थळ नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री २५ जादा बसगाड्या सोडणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस-अधिकारी कर्मचारी आणि ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात २३ ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.

****

बीड इथं आज सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थिती होत्या. व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. यानिमित्त सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.

****

यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात ६१४ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र सुमारे ३२० लाख हेक्टरवर पोहचलं आहे. याशिवाय १३६ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची, ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न, भरड धान्यांची, तर ९६ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.

****

कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि ७५० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरेगाव भिमा परिसरात ४५ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० सीसीटीव्ही, दहा ड्रोन, आणि ५० पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं. आज आणि उद्या कोरेगाव भिमा इथं बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचं पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा प्रशासनानं उपलब्ध करुन दिल्या आहेत.

****

श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आज सायंकाळी प्रारंभ होत आहे. सात ते चौदा जानेवारी दरम्यान तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरूवात होणार आहे. विविध अलंकार महापूजा, जलयात्रा यासारखे धार्मिक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

****

बीड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त उद्यापासून १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातल्या ६२५ शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबवली जाणार असून, वाचकप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केलं आहे.

परभणी इथंही ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन काल जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांच्या हस्ते झालं.

****

उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. नांदेड - पाटणा - नांदेड, छत्रपती संभाजीनगर - पाटणा - छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा - पाटणा - काचीगुडा आणि सिकंदराबाद - पाटणा - सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराजमार्गे चालवण्यात येणार आहेत. १३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान या गाड्या धावणार असल्याचं रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे.  

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

आज ३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आहे. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून, विविध पर्यटन स्थळ नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री २५ जादा बसगाड्या सोडणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस-अधिकारी कर्मचारी आणि ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असून, शहरात २३ ठिकाणी तपासणी होणार आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे. यासंबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.

****

आरटीजीएस अथवा एनईएफटी प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना, असा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यासोबत नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकनं दिले आहेत. या संदर्भातलं परिपत्रक बँकेनं काल जारी केलं. आरटीजीएस आणि एनईएफटीचे थेट किंवा उपसदस्य असलेल्या सर्व बँकांनी येत्या एक एप्रिल २०२५ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही बँकेनं केली आहे.

****

करचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी डिजी यात्रेच्या माहितीचा वापर केला जाणार असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्या सरकारनं फेटाळल्या आहेत. या संदर्भातले अहवाल निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहेत, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयाकडून प्रवासी माहिती कर विभागाकडे सामायिक केली जात नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभगांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग विभागाच्या पुढील शंभर  दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत त्यांनी, महाराष्ट्रात टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्याचे निर्देश दिले. यासोबतच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणं,  नवी दिल्ली इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये सहभाग घेणं, टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागवणं तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी, आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. परिवहन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचा देखील पुढील शंभर दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं, कृषीमंत्री विधिज्ञ माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. त्यांनी काल कृषीमंत्री म्हणून पदभार स्विकारला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असंही कोकाटे यावेळी म्हणाले. 

दरम्यान, शेतीशी निगडीत वस्तू, अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

दादा भुसे यांनी देखील काल शालेय शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरवण्यास शासन कटीबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झालं असेल, तर ते तात्काळ हटवण्यात येईल, असं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी त्यांनी काल केली, त्यानंतर ते बोलत होते. कायदा कडक करण्यापेक्षा व्यापार आणि मार्केट सुरळित करणं, हा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी तीन विशेष मुलांच्या शाळांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक इथल्या प्रबोधिनी विद्या मंदिर, श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या तीन संस्थांसोबत विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या ‘सेंटर फॉर डिसेबिलेटी स्टडीज’ तर्फे दोन प्रकारचे द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आले. यांच्या सहकार्याने शिक्षणक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींसाठी भरीव कार्य करण्याचा विश्वास कुलगुरू संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला.

****

नांदेड - अमृतसर - सचखंड एक्सप्रेस आज दुपारी एक वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे दिली आहे. या मार्गावरून येणाऱ्या रेल्वे उशिरा धावत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

****

उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. नांदेड - पाटणा - नांदेड, छत्रपती संभाजीनगर - पाटणा - छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा - पाटणा - काचीगुडा आणि सिकंदराबाद - पाटणा - सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराजमार्गे चालवण्यात येत आहेत. 

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 دسمبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 31 December-2024
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۱۳/دسمبر ۴۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہے خاص خبروں کی سرخیاں:
٭ خلائی تحقیقاتی ادارے ”اِسرو“ کے اسپیڈیکس مشن کا پہلا مرحلہ مکمل؛ دونوں سیٹیلائٹ مجوزہ مدار میں داخل۔
٭ سی بی ڈی ٹی کی جانب سے ”وِیواد سے وِشواس“ اسکیم میں 31 جنوری 2025 تک توسیع۔
٭ مسّاجوگ اور پربھنی کے متاثرہ خاندانوں سے مرکزی مملکتی وزیر رام داس آٹھولے کا اظہارِ تعزیت۔
٭ چھترپتی سمبھاجی نگر کو نئی متوازی پائپ لائن سے ماہِ مارچ تک آبرسانی ممکن بنانے کی منصوبہ بندی کرنے کیلئے وزیر اتل ساوے کی ہدایت۔
اور۔۔۔٭ اہلیا نگر- پرلی ریلوے لائن پر وِگھن واڑی تا راجوری کے درمیان ٹریک کی جانچ کامیاب۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے:
ہندوستانی خلائی تحقیقاتی ادارے ”اِسرو“ نے اپنے اسپیڈیکس مشن کا پہلا مرحلہ کامیابی کے ساتھ مکمل کرلیا ہے۔ شری ہری کوٹہ کے ستیش دھون خلائی مرکز سے کل شب پی ایس ایل وی سی 16- راکٹ کے ذریعے ایس ڈی ایکس زیرو وَن اور ایس ڈی ایکس زیرو ٹو ان دو سیارچوں کو داغا گیا۔ یہ دونوں سیٹلائٹ اپنے مجوزہ مدار میں کامیابی کے ساتھ داخل ہوگئے ہیں۔ اس برس کا اِسرو کا یہ آخری خلائی مشن کامیاب رہا۔ اب آئندہ 10 ایام میں ڈاکنگ یعنی ان دونوں سیارچوں کو خلاء میں ہی باہم جوڑنے کا دوسرا مرحلہ شروع ہوگا۔ اس تجربے کی مکمل کامیابی کے بعد بھارت خلائی میدان میں اس طرح کی ٹکنالوجی رکھنے والے امریکہ، رشیاء اور چین کے بعد چوتھا ملک بن جائے گا۔ چاند پر خلائی پروازوں اور خلاء میں سٹیلائٹ اسٹیشن قائم کرنے کے پروجیکٹس کیلئے یہ ٹکنالوجی نہایت اہم ہے اور اس شعبے میں بھارت کی حیثیت مزید مستحکم ہوگی۔
***** ***** *****
مرکزی راست ٹیکس بورڈ- سی بی ڈی ٹی نے اپنی ”وِیواد سے وِشواس“ نامی اسکیم کی مدت میں 31 جنوری تک توسیع کردی ہے۔ اسکیم کی مدت آج ختم ہورہی تھی۔ اس اسکیم کے ذریعے ٹیکس دہندگان کو اپنی انکم ٹیکس کی واجب الادا رقم کا تخمینہ لگانے‘ نیز ٹیکس کی ادائیگی کیلئے مزید وقت ملے گا۔
***** ***** *****
سال 2025-26 کے آئندہ مالی بجٹ کے پس منظر میں مرکزی وزیرِ خزانہ نرملا سیتا رَمن کی زیرِ صدارت کل نئی دہلی میں پری بجٹ اجلاس منعقد ہوا۔ مختلف محکموں کے سیکریٹری اس اجلاس میں شریک تھے۔ 2025-26 کا عام مالی بجٹ آئندہ یکم فروری کو پیش ہونے کا امکان ہے۔ مرکزی وزیرِ مالیات کی حیثیت سے نرملا سیتا رَمن اپنا آٹھواں عام بجٹ پیش کریں گی۔
***** ***** *****
نیشنل کیڈیٹس کور یعنی این سی سی کا یومِ جمہوریہ پریڈ کیمپ کل نئی دہلی کے کری اپّا میدان پر شروع ہوا۔ کیمپ کا آغاز تمام مذاہب کی دُعائیہ تقریب سے ہوا۔ ایک ماہ چلنے والے اس کیمپ میں 28 ریاستو ں اور آٹھ مرکز کے زیرِ انتظام علاقوں سے دو ہزار 361 کیڈیٹس شرکت کررہے ہیں۔ جن میں 917 طالبات بھی شامل ہیں۔ یوتھ ایکسچینج پروگرام کے تحت 14 دوست ممالک کے کیڈیٹس بھی اس کیمپ میں شریک ہیں۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے کل ریاستی حکومت کے مختلف محکموں کا جائزہ لیا۔ پارچہ بافی‘ زمینی مواصلات‘ ثقافتی اُمور‘ دیہی ترقیات‘ پنچایت راج اور دیگر محکمہ جات کے آئندہ 100 دِنوں کے اہداف بھی وزیرِ اعلیٰ کی موجودگی میں طئے کیے گئے۔
***** ***** *****
مرکزی وزیرِ مملکت برائے سماجی انصاف رام داس آٹھولے نے مطالبہ کیا ہے کہ مسّاجوگ کے سرپنچ سنتوش دیشمکھ کے قتل اور تاوان وصول کرنے کے واقعات کے تمام ملزمان کو فی الفور گرفتار کیا جائے۔ مسّاجوگ میں کل سنتوش دیشمکھ کے اہلِ خانہ سے ملاقات کے بعد وہ صحافیوں سے بات چیت کررہے تھے۔ انھوں نے بتایا کہ اس سلسلے میں وہ مرکزی وزیرِ داخلہ امیت شاہ اور وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس سے ملاقات کریں گے اور خاطیوں کو قرار واقعی سزا دئیے جانے کا مطالبہ کریں گے۔ آٹھولے نے کہا کہ مراٹھواڑہ میں دو بڑے واقعات ہوئے ہیں جو افسوسناک ہیں۔ اس ضمن میں انھوں نے ضلع کلکٹر کو اور پولس کو ہدایات جاری کی ہیں۔ انھوں نے کہا کہ سنتوش دیشمکھ کے خاندان کے کسی بھی شخص کا ابھی تک بیان قلمبند نہیں کیا جاسکا ہے، چونکہ یہ معاملہ سی آئی ڈی کی زیرِ تفتیش ہے اس لیے وزیرِ موصوف نے سی آئی ڈی کو بھی جلد از جلد اس خصوص میں جواب دینے کی ہدایت کی ہے۔
دریں اثناء آٹھولے نے کل پربھنی میں سومناتھ سوریہ ونشی اور امبیڈکری تحریک کے رہنماء وجئے واکوڑے کے اہلِ خانہ سے بھی ملاقات کی۔ اس موقع پر سومناتھ سوریہ ونشی کے لواحقین کو پارٹی کی جانب سے پانچ لاکھ روپئے امداد دی گئی، جبکہ واکوڑے کے اہلِ خانہ کو مالی امداد اور خاندان کے ایک شخص کو سرکاری ملازمت دئیے جانے کا مطالبہ آٹھولے نے وزیرِ اعلیٰ سے کیا۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
بیڑ ضلع کے سپرنٹنڈنٹ آف پولس نونیت کاوت نے کہا ہے کہ ضلع میں اسلحہ لائسنس کی کاجانچ کا عمل شروع کردیا گیا ہے اور جن افراد کو ضرورت نہیں ہے ان کے اسلحہ کے لائسنس منسوخ کیے جائیں گے۔ رکنِ اسمبلی سریش دھس نے کل ضلع کلکٹر اویناش پاٹھک سے ملاقات کرکے مطالبہ کیا تھا کہ اسلحہ کے لائسنس کی جانچ کی جائے۔ بعد ازاں صحیفہ نگاروں سے گفتگو کرتے ہوئے دھس نے کہا تھا کہ اُن کا مطالبہ ہے کہ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس ایک خصوصی باب کے طور پر بیڑ ضلع کی رابطہ وزارت قبول کریں۔ دریں اثناء‘ سریش دھس نے اداکارہ پراجکتا مالی سے متعلق دئیے گئے اپنے متنازعہ بیان کیلئے معذرت بھی کرلی ہے۔
***** ***** *****
سماجی کارکن انجلی دمانیہ نے توقع ظاہر کی ہے کہ مسّاجوگ کے سرپنچ سنتوش دیشمکھ کے قتل کے معاملے میں آئندہ ایک ماہ میں بڑی کارروائی کی جائیگی۔ کل ضلع کلکٹر اویناش پاٹھک سے ملاقات کے بعد وہ اخبار نویسوں سے گفتگو کررہی تھیں۔
***** ***** *****
بہوجن فلاح و بہبود اور دیگر پسماندہ طبقات کے اُمور کے وزیر اتل ساوے نے چھترپتی سمبھاجی نگر کو نئی متوازی پائپ لائن کے ذریعے مارچ کے مہینے میں پہلے مرحلے میں آبرسانی کی منصوبہ بندی کے احکامات دئیے ہیں۔ کل وہ شہر کی آبرسانی سے متعلق اجلاس سے خطاب کررہے تھے۔ اس اجلاس میں وزیر اتل ساوے کے علاوہ رُکنِ پارلیمان سندیپان بھومرے‘ جالنہ کے رُکنِ پارلیمان کلیان کاڑے اور دیگر اہم شخصیات شریک تھیں۔ وزیرِ موصوف نے کہا کہ آئندہ ماہِ جون تک پائپ لائن کا کام مکمل کرکے آبرسانی شروع کردی جائیگی۔ اتل ساوے نے کہا کہ ہماری کوشش ہے کہ جیک ویل کا پہلا مرحلہ مارچ تک شروع کردیا جائے۔ پائپ لائن کا تقریباً 88 فیصد کام مکمل ہوچکا ہے۔ سات ٹنکیاں پہلے ہی کمیشن کی جاچکی ہیں اور توقع ظاہر کی کہ 22 ٹنکیاں مارچ تک مکمل ہوجائیں گی اور جون تک پورا کام مکمل کرکے شہر کو پانی فراہم کیا جاسکے گا۔
***** ***** *****
اہلیانگر- بیڑ- پرلی ریلوے لائن پر شرور تعلقے کے وِگھن واڑی تا بیڑ کے راجوری تک ریلوے ٹریک کامیاب جانچ کرلی گئی ہے۔ بیڑ میں ہوئی اس جانچ کے وقت رُکنِ پارلیمان بجرنگ سونونے موجود تھے۔ اس موقع پر انھوں نے اعلان کیا کہ مارچ 2026 تک یہ ریلوے ٹریک پرلی تک مکمل کرلیا جائے گا۔
***** ***** *****
بارڈر- گاوسکر کرکٹ ٹیسٹ سیریز کے میلبورن میں کھیلے گئے ٹیسٹ میچ میں کل میچ کے پانچویں اور آخری دِن آسٹریلیاء نے بھارت کو 184 رنوں سے شکست دے دی۔ اس فتح کے ساتھ آسٹریلیاء نے سیریز میں دو۔ ایک کی ناقابلِ شکست برتری حاصل کرلی ہے۔ سیریز کا آخری میچ تین جنوری سے سڈنی میں کھیلا جائے گا۔
***** ***** *****
ممبئی میں منعقد ہوئے ریاستی سطح کے سینئر جوڈو مقابلوں میں دھاراشیو کے اوم پرساد نمبالکر نے 90 کلو وزنی زمرے میں طلائی تمغہ حاصل کیا ہے۔ اس طرح اب نمبالکر کی قومی جوڈو مقابلوں میں شرکت یقینی ہے۔
ساتارا میں منعقد ہوئے 11 برس سے کم عمر کے کھلاڑیوں کی رول بال چمپئن شپ میں دھاراشیو ضلع رول بال کے کھلاڑی پرنو ملدوڑے نے بھی طلائی تمغہ حاصل کیا ہے۔
***** ***** *****
تملناڈو کے کنیاکماری میں ملک کے پہلے شیشے کے پل کا افتتاح کردیا گیا ہے۔ ویویکانند میمورئیل- سنت تیرو ویلّور مجسّمے کو جوڑنے والے اس پُل کا افتتاح تملناڈو کے وزیر اعلیٰ ایم کے اسٹالن نے کیا۔ 133 فٹ اونچے اور 77 میٹر طویل اس پُل سے سمندر کا نظارہ کیا جاسکتا ہے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر:
٭ خلائی تحقیقاتی ادارے ”اِسرو“ کے اسپیڈیکس مشن کا پہلا مرحلہ مکمل؛ دونوں سیٹیلائٹ مجوزہ مدار میں داخل۔
٭ سی بی ڈی ٹی کی جانب سے ”وِیواد سے وِشواس“ اسکیم میں 31 جنوری 2025 تک توسیع۔
٭ مسّاجوگ اور پربھنی کے متاثرہ خاندانوں سے مرکزی مملکتی وزیر رام داس آٹھولے کا اظہارِ تعزیت۔
٭ چھترپتی سمبھاجی نگر کو نئی متوازی پائپ لائن سے ماہِ مارچ تک آبرسانی ممکن بنانے کی منصوبہ بندی کرنے کی وزیر اتل ساوے کی ہدایت۔
اور۔۔۔٭ اہلیا نگر- پرلی ریلوے لائن پر وِگھن واڑی تا راجوری کے درمیان ٹریک کی جانچ کامیاب۔
***** ***** *****

Audio - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 دسمبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 31.12.2024 ‘ وقت: صبح 08:30

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 08.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

इस्रोच्या स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा पूर्ण-दोन्ही उपग्रह निर्धारित कक्षेत दाखल

'विवाद से विश्वास' योजनेला सीबीडीटीकडून महिनाभराची मुदतवाढ

मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी

आणि

लातूर, धाराशिव आणि बीडसह अनेक गावांत वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोने स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन काल रात्री पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं, हे दोन्ही उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं असून, आता पुढच्या दहा दिवसांत डॉकिंग अर्थात हे दोन्ही उपग्रह अंतराळात जोडण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. चांद्र मोहिमा तसंच अंतराळ स्थानकासारख्या प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार असून, या क्षेत्रात भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीने विवाद से विश्वास या योजनेची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. आज ही मुदत संपणार होती. यामुळे करदात्यांना प्राप्तीकराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी वेळ मिळणार आहे.

****

वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.

****

राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला काल नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर प्रारंभ झाला. महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात २८ राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले दोन हजार ३६१ छात्रसैनिक सहभागी होत असून, त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही या शिबीरात सहभागी झाले आहेत.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभगांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास आणि पंचायत राज, आदी विभागांचा पुढील शंभर दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली, ते म्हणाले...

मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना घडलेल्या आहेत. जे काही प्रकार घडत आहेत, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे. पोलिसांना पण सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी भेटले होते, त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या प्रकरणामध्ये या सुत्रधारांना सुद्धा पकडणे अत्यंत आवश्यक आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातल्या कुणाचा जबाब अजून नोंदवला नाहीये. हे प्रकरण सीआयडीकडे असल्यामुळे सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा.


दरम्यान, आठवले यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी या अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

****


आमदार सुरेश धस यांनी काल जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन, शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

****

मस्सजोग हत्याप्रकरणी महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

****

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.’’


****

अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी काल करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

तमिळनाडूत कन्याकुमारी इथं देशातल्या पहिल्या काचेच्या पुलाचं काल लोकार्पण करण्यात आलं. विवेकानंद स्मारक ते संत तिरुवल्लुवर प्रतिमा या दोन ठिकाणांना जोडणारा हा पुल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना राष्ट्राला अर्पण केला. १३३ फूट उंच आणि ७७ मीटर लांबीच्या या पुलावरून समुद्राचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली.

‘‘या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.’’


****

बॉर्डर -गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला शेवटचा सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार आहे.

****

मुंबई झालेल्या राज्यस्तरीय वरीष्ठ ज्युदो स्पर्धेत धाराशिव इथले ओमप्रसाद निंबाळकर यांनी ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निंबाळकर यांचं स्थान निश्चित झालं आहे.

सातारा इथं घेण्यात आलेल्या ११ वर्षाखालील राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे यानंही सुवर्णपदक जिंकलं आहे.

****

जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर काल एका क्रिकेटपटूचं हृदयविकारानं निधन झालं. विजय पटेल नावाचे हे क्रिकेटपटू मुंबईतल्या नालासोपारा इथून ख्रिसमस ट्रॉफी खेळण्यासाठी जालन्यात आले होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली...

‘‘ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.’’


****

नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

****

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी आणि दर महिन्याला तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचा काल स्वामी यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

****

नांदेड - अमृतसर - सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी एक वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे दिली आहे.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 30.12.2024 وقت: رات 09:15

Monday, 30 December 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर –आकाशवाणी मुंबईचे 30.12.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

अवकाशातल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज.  

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश.

मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन.

अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. 

आणि

मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावसकर मालिकेत दोन-एकने आघाडी.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज अवकाशातल्या एका अनोख्या प्रयोगासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्त्रोचा अग्निबाण, ४७६ किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. 

****

वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल.

****

राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला. २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसह मधून आलेले २ हजार ३६१ छात्रसैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात सहभागी होत आहेत. त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत या शिबीरात सहभागी होत आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले... 

आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीप्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.  या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

दरम्यान, आठवले यांनी आज परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. 

****

बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

****

बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी येत्या महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर दमानिया या पत्रकारांशी बोलत होत्या. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुढच्या काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनात आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ते म्हणाले... 

येणाऱ्या वर्षा मध्ये नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराचे असतात. त्यांच्यात प्रमुख एअर पोर्ट जे आहे. एअर पोर्टला सुध्दा आता इंटरनॅशनल फ्लाईट नव्याने दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुसंघाने देखील आपण मॅन पॉवर डिप्लोमॅट मिमिग्रॅशन करतांना आणि इतर योजना आपल्या चालु आहेत. त्याच्या प्रमाणे आपण लवकरच नियोजन करू.  

****

अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली. 

****

राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, २०२४-२५ या वर्षात राज्यात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर १ हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - १ हजार १३४, पुणे १ हजार ८७२, कोल्हापूर १ हजार पाच, अमरावती ३ हजार ५६६, तर नागपूर विभागात २ हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली...

ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे.त्याबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.  

****

मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली. 

या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.

****

बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे.  

दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. 

****

जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या एका ३५ वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूच नाव असून, तो मुंबईतल्या नालासोपारा भागातला रहिवासी आहे. ख्रिसमस ट्रॉफीनिमित्त हे क्रिकेट सामने खेळवले जात होते.

****

नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कन्या दिनानिमित्त शपथ देणं तसंच आणि आपल्या अल्पवयीन बालकांचा विवाह न करणेबाबत पत्र लिहून कळवण्याचे उपक्रम राबवावेत, असे राऊत यांनी सांगितलं. जिल्ह्यात या वर्षात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. 

****


आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर-दिनांक 30.12.2024 रोजीचे दुपारी 03.00 वाजताचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 30.12.2024 ‘ وقت: دوپہر 01:50

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक 30.12.2024, सोलापूर जिल्हा वार्तापत्र

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे दुपारी 01.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे. अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहिम नवी दालनं खुली करणार आहेत. जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. या मोहिमेत इस्रोचे एच डी एच सी झिरो वन आणि एच डी एच सी झिरो - टू हे उपग्रह समाविष्ट असतील. या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी २२० किलो आहे. पीएसएलव्ही सी -16 द्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४७० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे.

****

राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर एक हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.

****

जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.

****

नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत.

****

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.

****

बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोल्डनं प्रत्येकी तीन बळी टिपले. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे.

दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

****

किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं कांस्य पदकाची कमाई केली. त्याने काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू ॲलेक्स लॅनियरवर २१ - १७, २१ - ११ असा विजय मिळवला.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.

****

राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं ठेवलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर क हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.

****

जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.

****

अकोला इथं काल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यातल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतलं.

****

नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. येत्या दोन जानेवारीपर्यंत लातूर रेल्वे स्थानकासह मध्य रेल्वेच्या १४ स्थानकात फलाट तिकीट विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

दरम्यान, नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाणही मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनारी होणाऱ्या घटना आणि मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार आहे.

****

लातूर, धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ -पुणे-हरंगुळ रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत आज संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती.

****

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत  रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथकं असून, दोन भरारी निरीक्षक पथकं नेमण्यात आली आहेत. त्यांना रायगड जिल्ह्यातल्या मद्यविक्री आस्थापनांमध्ये परराज्यातलं मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

****

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. कंपनीतल्या कामगारांनी वेळ राहता त्यांच्या पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचा सकाळी 10.45 वाजताचे कार्यक्रम - ध्वनीचित्र

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 دسمبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 30 December-2024
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۰۳/دسمبر ۴۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہے خاص خبروں کی سرخیاں:
٭ آئین ملک کی روشنی کا مینار ہے: ”من کی بات“ پروگرام میں وزیرِ اعظم کا اظہارِ خیال۔
٭ نئی ممبئی بین الاقوامی طیران گاہ پر پہلے تجارتی طیارے کی آمد۔
٭ ناندیڑ ضلع کی مالیگاؤں یاترا کا آغاز؛ آئندہ پانچ تاریخ تک مختلف پروگراموں کا انعقاد۔
٭ بارڈر- گاوسکر سیریز میں بھارت کو میلبورن ٹسٹ جیتنے کیلئے 253 رَن درکار۔
اور۔۔۔٭ عالمی شطرنج ریپڈ مقابلوں میں بھارت کی کونیرو ہمپی رَنراَپ۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے:
وزیرِ اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ ملک کا آئین ہمارا مینار اور رہنماء ہے۔ وہ گذشتہ روز آکاشوانی کے ”من کی بات“ پروگرام کی 117 ویں قسط میں عوام سے مخاطب تھے۔ انھوں نے کہا کہ 26 جنوری کو ملک میں آئین کے نفاذ کے 75 سال مکمل ہوجائیں گے۔ انھوں نے نوجوانوں سے اپیل کی کہ وہ اس موقع پر شروع کی گئی ویب سائٹ Constitution Seventy Five.com پر جائیں اور آئین کی تمہید پڑھیں اور اس کی آڈیو ویب سائٹ پر اپلوڈ کریں۔ انھوں نے کہا:
”دیش کے ناگرکو ں کو سنویدھان کی وراثت سے جوڑنے کیلئے constitution75.com نام سے ایک خاص ویب سائٹ بھی بنائی گئی ہے۔ اس میں آپ سنویدھان کی پرستاؤنا پڑھ کر اپنا ویڈیو اپلوڈ کرسکتے ہیں‘ الگ الگ بھاشاؤں میں سنویدھان پڑھ سکتے ہیں‘ سنویدھان کے بارے میں پرشن بھی پوچھ سکتے ہیں۔ ”من کی بات“ کے شروتاؤں سے‘ اسکول میں پڑھنے والے بچوں سے‘ کالج میں جانے والے یواؤں سے‘ میرا آگرہ ہے‘ اس ویب سائٹ پر ضرور جاکر دیکھیں‘ اس کا حصہ بنیں۔“
وزیرِ اعظم نے من کی بات پروگرام میں ملک کے تفریحی شعبے کی شراکت کا ذکر کیا۔ انھوں نے کہا کہ ہماری اینیمیشن‘ فلمیں‘ ٹیلی ویژن سیریز پوری دنیا میں مقبول ہیں جو بھارت کی تخلیقی صنعت کی صلاحیت کو ظاہر کرتی ہے۔ انھوں نے راج کپور‘ محمد رفیع‘ اَکّی نینی‘ ناگیشور راؤ‘ تَپن سنہا کی کارکردگی کی ستائش کی۔
وزیرِ اعظم نے بھارتی ثقافت‘ پریاگ راج میں شروع ہونے والا کمبھ میلہ، بستر میں شروع ہونے والے اولمپک مقابلے وغیرہ پر تبصرہ کیا۔ عالمی ادارہئ صحت کی رپورٹ کے مطابق 2015 سے 2023 کے درمیان ملک میں ملیریا کے مریضوں اور ملیریا سے ہونے والی اموات میں 80 فیصد کمی آئی ہے۔ انھوں نے کہا کہ یہ محکومی اسی وقت حاصل ہوئی جب اہلِ وطن نے عزم کے ساتھ چیلنج کا مقابلہ کیا۔ انھوں نے کہا کہ آیوشمان بھارت اسکیم کینسر کے خلاف جنگ میں اہم کردار ادا کررہی ہے‘ جس کی وجہ سے 90 فیصد مریضوں کابروقت علاج ہورہا ہے۔ وزیرِ اعظم نے چھوٹی اجتماعی کوششوں کے ذریعے ملک بھر کے کسانوں کی طرف سے حاصل کی گئی کامیابیوں کی نشاندہی کی۔ انھوں نے کہا کہ چھوٹی شروعات سے بڑی تبدیلیاں ممکن ہیں اور اس کیلئے مضبوط عزم اور ٹیم جذبے کے ساتھ کام کرنے کی ضرورت ہے۔ نئے سال میں ”من کی بات“ کے ذریعے مزید متاثر کُن کوششوں کا اشتراک کرنے کا وعدہ کرتے ہوئے وزیرِ اعظم نے سب کو نئے سال کی مبارکباد دی۔
ریاست کے مختلف مقامات پر بڑے پیمانے پر ”من کی بات“ سننے کا اہتمام کیا گیا۔ لاتور شہر کے ریلائنس تری پورہ کالج میں ہونے والے پروگرام میں شہریوں اور طلبہ کی بڑی تعداد نے شرکت کی۔ اس موقع پر حاضرین نے اس تجربے کا اظہار کیا کہ پوری دنیا ہمارے ملک کی ثقافتی ترقی سے تحریک لے رہی ہے۔
رتناگری سمیت دھولیہ ضلع کے شِرپور شہر میں بھی ”من کی بات“ پروگرام سنا گیا۔ واشم ضلعے میں واقع بی جے پی کے دفتر میں پروگرام کا براہِ راست نشریہ سننے کا اہتمام کیا گیا۔
***** ***** *****
بی جے پی رکنِ اسمبلی سریش دھس کے کیے گئے تبصرے کے معاملے میں اداکارہ پراجکتا مالی نے کل ممبئی میں وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس سے ملاقات کرکے محضر پیش کیا۔ وزیرِ اعلیٰ نے کہا کہ مالی کی عزت میں رُکاوٹ بننے والی کسی بھی کوشش کو برداشت نہیں کیا جائے گا۔ اس موقع پر مالی نے اُن سے متعلق یوٹیوب پر نازیبا ویڈیو کی بھی شکایت کی۔
***** ***** *****
سماجی انصاف اور اختیارات کے مرکزی وزیرِ مملکت رام داس آٹھولے آج پربھنی کا دورہ کریں گے۔ وہ سومناتھ سوریہ ونشی اور وجئے واکوڑے کے اہلِ خانہ سے ملاقات کریں گے، جو پربھنی تشدد اور مارپیٹ کے معاملے میں ہلاک ہوگئے تھے۔ اس کے بعد محکمہ سماجی بہبود کے اہلکار کے ساتھ ایک میٹنگ ہونے کی اطلاع ہمارے نامہ نگار نے دی۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
پہلا تجارتی طیارہ کل رائے گڑھ ضلع میں بنائے گئے نوی ممبئی بین الاقوامی ہوائی اڈے کے رَن وے پر پہنچا۔ انڈیگو اے تھری ٹوئنٹی کی پرواز ممبئی ایئرپورٹ سے نوی ممبئی انٹرنیشنل ایئرپورٹ پر اُتری۔ طیارے کو پانی کا چھڑکاؤ کرکے سلامی دی گئی۔
دریں اثناء‘ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے ریاست کے ہر حصے کو ہوائی راستے سے جوڑنے کے ساتھ ساتھ موجودہ ہوائی اڈوں کو وسعت دینے کے کام کو تیز کرنے کا مشورہ دیا۔ وہ ممبئی میں مہاراشٹر ایئرپورٹ ڈیولپمنٹ کمپنی کے بورڈ آف ڈائریکٹرز کی میٹنگ سے خطاب کررہے تھے۔ وزیرِ اعلیٰ نے بڑے شہروں کے ایئرپورٹ پر بوجھ کم کرنے کیلئے جنگی بنیادوں پر کارروائی کرنے کی ہدایت دی۔
***** ***** *****
مرکزی وزارتِ ریلوے نے 125 کلو میٹر اہلیا نگر- پونے ریلوے لائن کے سروے کو منظوری دی۔ رکنِ پارلیمان نیلیش لنکے نے یہ اطلاع دی۔ اس سلسلے میں بتایا گیا ہے کہ لنکے نے پارلیمنٹ کے سرمائی اجلاس میں اہلیانگر -پونے انٹرسٹی ریلوے کے آغاز کے سلسلے میں حکومت کی توجہ مبذوئی کروائی تھی اور اس کا نوٹس لیتے ہوئے اس ریلوے لائن کے سروے کو منظوری دی گئی ہے۔
***** ***** *****
رکنِ اسمبلی رانا جگجیت سنگھ پاٹل نے کہا ہے کہ دھارا شیو ضلع میں سیاحت‘ صنعت اور پائیدار آبپاشی کے ذریعے بڑی تعداد میں ملازمتیں پیدا کرنے کیلئے ایک وقتی ایکشن پروگرام کا منصوبہ بنایا گیا ہے اور پہلے مرحلے میں دس ہزار ملازمتیں پیدا کرنے کا عزم ہے۔ وہ گذشتہ روز دھاراشیو میں خطاب کررہے تھے۔
ہر موضوع کیلئے 12 اسٹیئرنگ کمیٹیاں تشکیل دی جائیں گی‘ جن میں متعلقہ شعبوں کے افراد شامل ہوں گے۔ رکنِ اسمبلی پاٹل نے عوام سے اپیل کی ہے کہ وہ اس ترقیاتی عمل میں بڑھ چڑھ کر حصہ لیں جس سے ضلع کی تصویر بدل جائے۔
***** ***** *****
ناندیڑ ضلع کی مالیگاؤں یاترا کل سے شروع ہوئی۔ کھنڈوبا کی یاترا روایتی انداز میں شروع ہونے کے بعد دیوسواری مرکزی راستے سے نکلی۔ اس موقع پر ریاستی تعاون کے وزیر بابا صاحب پاٹل کے ساتھ رُکنِ اسمبلی پرتاپ راؤ پاٹل چکھلیکر، رکنِ اسمبلی آنند راؤ پاٹل بونڈھارکر پالکی درشن کیلئے موجود تھے۔ یہ یاترا آئندہ پانچ تاریخ تک جاری رہے گی، جبکہ سرکاری پروگرام دو جنوری سے شروع ہوں گے۔
***** ***** *****
بارڈر-گاوسکر ٹسٹ سیریز میں بھارت کو جیتنے کیلئے 253 رنز درکار ہیں۔ آج میچ کے آخری دِن کھیل شروع ہونے کے بعد آسٹریلیاء کی دوسری انگز 234 رنز پر ختم ہوگئی۔ اس اننگ میں جسپریت بمراہ نے پانچ‘ محمد سراج نے تین اور رویندر جڈیجہ نے ایک وکٹ حاصل کی۔ دریں اثناء‘ بمراہ نے کل اس مقابلے میں ریکارڈ ساز کارکردگی کرکے ٹسٹ میں دو سو وکٹس کا ہندسہ عبور کرلیا۔
آخری خبر ملنے تک بھارت نے 283 رنز بنائے ہیں اور اب بھی جیت کیلئے 253 رنز درکار ہیں۔
***** ***** *****
بھارت کی معروف شطرنج کلاڑی کونیروہمپی نے نیویارک میں منعقدہ ورلڈ ریپڈ اینڈ بلٹز چمپئن شپ میں خواتین ٹیم نے فتح حاصل کی۔ انڈونیشیاء کے کھلاڑی کو شکست دے کر ہمپی نے اس ٹورنامنٹ میں دوسری فتح حاصل کی۔ اس نے گیارہ راؤنڈ میں ساڑھے آٹھ پوائنٹس حاصل کیے۔ 37 سالہ ہمپی اس مقابلے میں دوبار جیت درج کرکے چین کی جو وینجون کے بعد دوسری شطرنج کھلاڑی ہے۔
***** ***** *****
چھترپتی سمبھاجی نگر ضلعے کے کنڑ میں آج جئے بھیم دن اور مکرن پور پریشد کا انعقاد کیا گیا ہے۔ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر نے 30 دسمبر 1938 کو مراٹھواڑہ کی سرحد پر مکرن پور میں مہار پریشد کا انعقاد کیا تھا، اس مناسبت سے یہ پروگرام منعقد کیا جا رہا ہے۔ پولس سپرنٹنڈنٹ ڈاکٹرونئے کمار راٹھوڑ کے ہاتھوں اس کانفرنس کا افتتاح عمل میں آئے گا۔
***** ***** *****
شیو سنگرام تنظیم کی جانب سے بیڑ میں کل 31 تاریخ کو انسدادِ نشہ عوامی بیداری ریلی نکالی جائے گی۔ چھترپتی شیواجی مہاراج اسٹیڈیم سے ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر سماجی انصاف بھون تک یہ ریلی نکالی جائے گی۔
***** ***** *****
نئے سال کی آمد کے پیشِ نظر پربھنی ضلعے میں ”ڈَرَنک اینڈ ڈرائیو“ روک تھام مہم چلائی جائے گی۔ پولس سپرنٹنڈنٹ رویندر سنگھ پردیشی نے ایک صحافتی بیان کے ذریعے یہ جانکاری دی‘ اور نئے سال میں ضلعے کو حادثات سے پاک رکھنے کا عزم کرنے کی اپیل کی ہے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر:
٭ آئین ملک کی روشنی کا مینار ہے: ”من کی بات“ پروگرام میں وزیرِ اعظم کا اظہارِ خیال۔
٭ نئی ممبئی بین الاقوامی طیران گاہ پر پہلے تجارتی طیارے کی آمد۔
٭ ناندیڑ ضلع کی مالیگاؤں یاترا کا آغاز؛ آئندہ پانچ تاریخ تک مختلف پروگراموں کا انعقاد۔
٭ بارڈر- گاوسکر سیریز میں بھارت کو میلبورن ٹسٹ جیتنے کیلئے 253 رَنز درکار۔
اور۔۔۔٭ عالمی شطرنج ریپڈ مقابلوں میں بھارت کی کونیرو ہمپی رَنراَپ۔
***** ***** *****

Audio - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 دسمبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 30.12.2024 ‘ وقت: صبح 08:30

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे सकाळी 08.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

संविधान हा देशाचा दीपस्तंभ-मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन 

नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेला प्रारंभ-येत्या पाच तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन

बॉर्डर-गावस्कर मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची गरज

आणि

बुद्धिबळाच्या जागतिक रॅपिड स्पर्धेत भारताची कोनेरू हंपी अजिंक्य

****

देशाचं संविधान हे आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ११७व्या भागात ते काल बोलत होते. येत्या २६ जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील, त्यानिमित्तानं देशभरात अनेक उपक्रम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टीट्यूशन सेव्हनटी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी, नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनीचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं.

‘‘देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास website भी बनाई गई है। इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना video upload कर सकते हैं। अलग-अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं,संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं। ‘मन की बात’ के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से, मेरा आग्रह है, इस website पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बनें।’’


देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाचा पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. आपले ॲनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. राज कपूर मोहम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव गारू, तपन सिन्हा यांच्या कामगिराचा त्यांनी गौरव केला.

भारतीय संस्कृती, प्रयागराज इथं सुरु होणारा कुंभमेळा, बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा, आदी विषयांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात २०१५ ते २०२३ या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले. कर्करोगा विरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे ९० टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशभरातल्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामुहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. छोट्या प्रारंभातूनच मोठं परिवर्तन शक्य असल्याचं सांगत, यासाठी दृढ संकल्प आणि सांघिक भावनेनं काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत, पंतप्रधानांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

****

राज्यात ठिकठिकाणी `मन की बात`चं सामुहिक श्रवण करण्यात आलं. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं, तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

****

भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रारही माळी यांनी केली. 

****

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. परभणी हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या नातेवाईकांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर काल पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली.

दरम्यान, राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

****

अहिल्यानगर-पुणे या १२५ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही माहिती दिली. अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं होतं, त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यास मान्यता मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात पर्यटन, उद्योग आणि शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार रोजगार निर्मिती करण्याचा निश्चय असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. प्रत्येक विषयावर संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींचा सहभाग घेऊन १२ सुकाणू समित्या गठीत केल्या जाणार आहेत. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या विकास प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला कालपासून सुरुवात झाली. श्री खंडोबाच्या यात्रेला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, यांची उपस्थिती होती. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत.

****

बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची आवश्यकता आहे. आज सामनच्याच्या शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून जसप्रति बुमराहनं पाच, मोहम्मद सिराजनं तीन, तर रविंद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, उपाहारापर्यंत तीन बाद ३३ धावा झाल्या होत्या. दरम्यान, बुमराहनं काल या सामन्यात विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीत दोनशे बळींचा टप्पा पार केला.

****

भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी, या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी, चीनच्या जू वेंजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं आज जयभीम दिन आणि मक्रणपूर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याच्या हद्दीवर असलेल्या मक्रणपूर इथं महार परिषद घेतली होती, त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होत आहे. पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल.

****

नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची  स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणकीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू असून, याअंतर्गत जिल्ह्यातल्या ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.

****

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.

****

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं काल सकाळी भाविकांची बस आणि ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 29.12.2024 وقت: رات 09:15

Sunday, 29 December 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.12.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केंद्राचा दिनांक 29.12.2024 रोजीचा वृत्तविशेष कार्यक्रम

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर –आकाशवाणी मुंबईचे 29.12.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवी शिखरं गाठत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार.

भाविकांच्या बसला पंढरपूरनजिक अपघात, दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी. 

आणि

कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचं दुसऱ्यांदा अजिंक्यपद. 

****

देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज `मन की बात` कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारीत ११६ भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची राज्यघटना लागू होण्यास येत्या २६ जानेवारीला ७५ वर्ष पुर्ण होत असून ही राज्य घटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास website भी बनाई गई है। इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना video upload कर सकते हैं। अलग-अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं,संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं। ‘मन की बात’ के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से, मेरा आग्रह है, इस website पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बनें।


या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्याला प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं, असं ते म्हणाले. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण देशवासीयांनी या काळात एका कुटुंबाप्रमाणं मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ-आरोग्या बाबत विविध उपक्रम सुरु असून जनता सुदृढ आरोग्याला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्द्ल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत, `सायकलचा रविवार` तसंच `सायकलचा मंगळवार` या सारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले.

छत्तीसगडच्या बस्तर इथं घेण्यात आलेल्या बस्तर ऑलिंपिकचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले...

मैं आप सभी से आग्रह करता हूँ, अपने क्षेत्र में ऐसे खेल आयोजनों को प्रोत्साहित करें। #खेलेगा भारत – जीतेगा भारत के साथ अपने क्षेत्र की खेल प्रतिभाओं की कहानियां साझा करें। स्थानीय खेल प्रतिभाओं को आगे बढ़ने का अवसर दें। याद रखिए, खेल से, न केवल शारीरिक विकास होता है, बल्कि ये Sportsman spirit से समाज को जोड़ने का भी एक सशक्त माध्यम है। तो खूब खेलिए-खूब खिलिए।


जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष २०१५ पासून २०२३ दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसंच कर्करोगविरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लान्सेटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्मान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत Ekta Ka MahaKumbh या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.       

देशाच्या सर्जनशीलतेच्या उद्योगातील क्षमतेबाबत बोलतांना मोदी यांनी, KTB  ॲनिमेशन मालिका अर्थात क्रृश, तृश आणि बाल्टीबॉय या ॲनिमेशन पात्रांद्वारे देशाच्या  स्वातंत्र्यलढ्याबाबत मिळणा-या माहितीचा उल्लेख केला. राज कपूर यांची  साजरी होत असलेली शतकमहोत्सवी जयंती तसंच, भारतात लवकरच होत असलेल्या `वर्ल्ड ऑडिओ - व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट` म्हणजेच `WAVES` मध्ये सहभाग घेण्याबाबत मोदी यांनी माहिती दिली. वर्ष २०२५ आता जवळ आलं असून या वर्षातही  या उपक्रमाच्या  माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असं नमुद करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

****

ठिकठिकाणी `मन की बात`चं सामुहिक श्रवण करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात आज विविध भागात पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं थेट प्रसारण ऐकण्यात आले. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं, तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमदार प्रसाद लाड यांच्या मुंबईतल्या सायन सर्कल इथल्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं. पंतप्रधानांचं सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन लाभत असून, त्यामुळं एक नवी ऊर्जा मिळते, अशी भावना आमदार लाड यांनी व्यक्त केली. 

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं आज सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****                   

भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी, या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी, चीनच्या जू वेंजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे. २०१९ मध्ये हंपीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं. पुरुषांच्या गटात रशियाच्या १८ वर्षीय वोलोदार मुर्झिन विजेता ठरला. 

****

भारत-ऑस्ट्रेलिया,बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न इथं सुरू चौथ्या सामन्यात आजच्या चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुस-या डावात नऊ बाद २२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलिय संघाने आता एकूण ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रति बुमराहनं पुन्हा एकदा भेदक मारा करताना चार गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करून त्याला साथ दिली. बुमराहनं विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीतील दोनशे बळींचा टप्पाही आज ओलांडला. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनं सर्वाधिक ७० तर पॅट कमीन्सनं ४१ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद ९१ असताना सोबत येत संघाचा कोसळणारा डाव सावरला.   

****

रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. या विमानावर पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली. 

****

नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची  जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातल्या ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. 

****

हरंगुळ -पुणे आणि पुणे -हरंगुळ या लातूरसह धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाश्यांच्या पुण्याला जाणाऱ्या महत्वाच्या रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत उद्या संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  या गाडीला मुदतवाढ देणेबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती. त्यानुसार या रेल्वेला मुदतवाढ दिली असल्याचं रेल्वे मुख्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाची दोन दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातींचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि एमयू चव्वेचाळीस हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणं यात मांडली आहेत. शेतकरी या प्रदर्षणाला भेट देऊन माहिती घेत असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. 

****


आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2024 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

آکاشوانی ‘ خبریں ‘ تاریخ : 29.12.2024 ‘ وقت : دوپہر 01.50

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक 29.12.2024, सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.12.2024 रोजीचे दुपारी 01.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज मन की बात कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारीत ११६ भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या काळातल्या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्या प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं असं त्यांनी नमूद केलं. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. आपण देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ-तंदुरुस्तीबाबत विविध उपक्रम सुरु असून जनता तंदुरुस्तीला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत, सायकलचा रविवार तसंच सायकलचा मंगळवार या सारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले.

छत्तीसगडच्या बस्तर इथं आयोजित अनोख्या बस्तर ऑलिंपिकचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. खिलाडूवृत्ती समाजाला जोडण्याचं सशक्त माध्यम असल्यानं,आपल्या भागातील अशा क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देत हॅश टॅग : खेलेगा भारत - जीतेगा भारतद्वारे गुणवंत खेळाडूंच्या कथा सामायिक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष २०१५ पासून २०२३ दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसंच कर्करोगविरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लान्सेटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्मान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं.

२०२५जवळ आलं असून या वर्षातही मन की बातच्या माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत EktaKaMahaKumbh या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.

राज्यघटना लागू होण्यास येत्या २६ जानेवारीला ७५ वर्ष पूर्ण होत असून मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ असलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे असं मोदी म्हणाले. यापार्श्वभूमीवर constition75.com संकेतस्थळाद्वारे राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून तुमची ध्वनीचित्रफीतही टाकू शकता अशी महिती ही त्यांनी दिली.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीनं करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, मलब्याचं व्यवस्थापन आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचं नियमन यांचा नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.

****

भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत, मेलबर्न इथं सध्या खेळल्या जात असलेल्या चौथ्या सामन्यात, आजच्या चौथ्या दिवस अखेर, ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात नऊ बाद २२८ धावा केल्या आहेत. याद्वारे ऑस्ट्रेलियानं एकूण ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. जसप्रति बुमराहनं पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करून त्याला योग्य साथ दिली. मार्नस लाबुशेनं सर्वाधिक ७० तर पॅट कमीन्सनं ४१ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद ९१ असताना सोबत येत धावसंख्येला आकार दिला.

****

नवीन नांदेडमधील कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकानं शनिवारी ही कारवाई केली. या बांगलादेशी नागरिकाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांना हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

नवीन वर्षाच्या आरंभावेळी संतनगरी शेगाव इथं होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. संत श्री गजानन महाराज संस्थान मधील श्रींचं समाधी स्थळ, आणि मंदिरातील सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार असल्याचं मंदिर संस्थानतर्फे कळवण्यात आलं आहे.

****