Wednesday, 30 June 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 30.06.2021 रोजीचे- अर्थविशेष

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक - 30.06.2020 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.06.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ३३ कोटींचा टप्पा पार

** ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप तसंच वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा

** जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रासाठी १६५ कोटी रुपये निधी

आणि

** इंधन, खाद्यतेल तसंच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रद्द करण्यासाठी भाकपचं पंतप्रधानांना निवेदन

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने ३३ कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ४४ लाख ३३ हजार ८५३ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून, लसीच्या एकूण ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसीच्या ३२ कोटी १३ लाख ७५ हजार ८२० मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी ३१ कोटी ४० लाख ७५ हजार ६५४ मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्य-केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या ७३ लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक असून, २४ लाख ६५ हजार ९८०मात्रा पुढील ३ दिवसात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कृषी संजीवनी मोहिमेचा उद्या एक जुलै रोजी कृषी दिनी समारोप होणार आहे. २१ जूनपासून सुरु झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. या समारोप सत्रात पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उद्या दुपारी साडे बारा वाजता हा कार्यक्रम होणार असून, कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होणार असल्याचं कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने लागू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत, या कायद्याला किसान सभेचा विरोध असल्याचं, किसान सभेचे डॉ अजित नवले यांनी सांगितलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना तसंच किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई करून, हे तीन केंद्रीय कृषी कायदे लागू करण्याचे प्रयत्न केले तर किसान सभा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा डॉ नवले यांनी दिला. यासंदर्भात महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद असल्याची टीका नवले यांनी केली.

****

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. इतर मागासवर्गीय - ओबीसींना दिलेले संवैधानिक अधिकार काढून घेण्याचे  प्रयत्न होत आहेत, ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पडळकर यांनी केली.

****

सर्वोच्च न्यायालयानं वारंवार मुदत देऊनही ओबीसी समाजाबाबतचा इम्पिरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला सादर करता आला नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे. सावे यांनी औरंगाबाद इथं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर दोषारोप करत असल्याचं सावे यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यासाठी आघाडी सरकारने तातडीने हालचाली कराव्या, अन्यथा या समाजाच्या असंतोषाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने तयार रहावं, असा इशाराही आमदार सावे यांनी दिला आहे.

****

राज्य सरकारनं ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित आघाडीचे मराठवाडा विभाग प्रवक्ते डॉ. धर्मराज चव्हाण यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या नावाखाली उभे केले जात असलेले आरक्षणाचे लढे म्हणजे, जनतेची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आखलेला डाव असल्याची टीका चव्हाण यांनी केली. न्यायमूर्ती रोहिणी आयोग स्वीकारण्यात यावा आणि ओबीसींचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्याची मागणीही धर्मराज चव्हाण यांनी केली आहे.

****

राज्यात नांदेडसह ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचं काम सुरू आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. नांदेड इथल्या उर्दू घरासाठी ८कोटी १६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचं लोकार्पण करण्यात येईल. राज्यात सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने उर्दू घरे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

****

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली होती. प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केले. अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होत.

****

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना न्युमोनिया झाल्यानं, त्यांना मुंबईत हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाह यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उद्या रुग्णालयातून सुटी दिली जाईल, अशी शक्यता त्यांचे व्यवस्थापक जयराज पाटील यांनी वर्तवली आहे. 

****

जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रात पायाभूत सुविधा उभारणीसाठी राज्यशासनाकडून १६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली़. जालना शहरातल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपक्रेंद्रास आज भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. या उपकेंद्रासाठी मंजूर २०३ एकर जमिनीचे रेखांकन करुन ही जमीन ताब्यात घ्यावी, तसंच पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले़

****

वाढती बेरोजगारी, महागाई आणि जनतेची उपासमार या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच देशभरातल्या सर्व डाव्या पक्षांनी १६ ते ३० जून दरम्यान देशभर पंधरा दिवस आंदोलन केलं, या आंदोलनाचा आज समारोप झाला. आंदोलक पक्ष संघटनांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात, पेट्रोल-डिझेलच्या किमती तात्काळ कमी कराव्या, खते बी-बियाणे अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किमतीत झालेली वाढ रद्द करावी, सर्व जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेले आणि धान्याच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, कराचा भरणा करत नसलेल्या सर्व कष्टकरी कुटुंबांना दरमहा साडे सात हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटात आत्तापर्यंत ४१ हजार नागरिकांना कोविड लसीचा किमान पहिला डोस देण्यात आला आहे. साठ वर्षाच्या पुढील ६६% नागरिकांना लसीचा किमान एक डोस तर दुर्धर आजार असणाऱ्या ७० टक्के नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. असे सर्व मिळून जिल्ह्यात दोन लाख ९६ हजार नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

//*********//

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.06.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.06.2021 सोलापूर जिल्हा वार्तापत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला देण्यात येणारी आर्थिक मदत सर्व प्रकारचे पैलू लक्षात घेऊन निश्चित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. अशा कुटुंबियांना किमान दराची सवलत मिळावी यासाठी सहा आठवड्यात मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे आदेश न्यायालयानं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला दिले आहेत.   

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीला उद्या चार वर्ष पूर्ण होत आहेत. जीएसटीमुळे जटिल अप्रत्यक्ष कर संरचनेची जागा एका साध्या, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली असून, भारताला एकाच सामान्य बाजारामध्ये एकत्रित केलं आहे. प्रत्येक राज्यात व्यवसाय करू पाहणाऱ्या कंपनीला तब्बल ४९५ वेगवेगळे अर्ज सादर करावे लागत होते. जीएसटी अंतर्गत, ही संख्या घटून अवघ्या १२ वर आली आहे. जीएसटी अंतर्गत, एक कोटी तीन लाखाहून अधिक करदात्यांची नोंदणी करण्यात आली असून, अनुपालन सातत्यानं सुधारत आहे. जीएसटीमुळे लोकांना भराव्या लागणाऱ्या कराचा दर कमी झाला आहे. आरएनआर समितीने शिफारस केल्याप्रमाणे महसूल तटस्थ दर १५ पूर्णांक तीन होता, त्या तुलनेत रिझर्व्ह बँकेच्या मते, जीएसटी दर सध्या केवळ ११ पूर्णांक सहा टक्के इतका असल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

****

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या सारस्वत सहकारी बँक, एसव्हीसी सहकारी बँकं, हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. नो युवर कस्टमर या संदर्भातील निर्देशांचं पालन न करणं, ठेवीवरील व्याज दरावरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचं उल्लंघन करणं, ठेवीवरील व्याज दर आणि फसवणुकीचे निरीक्षण आणि अहवाल न ठेवणं, आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता ‘डिजिटल इंडिया’च्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. एक जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

****

घरोघरी जाऊन कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी तयार असल्याचं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. ७५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि दिव्यांग नागरीकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

****

देशातली बेरोजगारी आणि पर्यायाने गरिबी दूर करण्यासाठी तरुणांमध्ये उद्यमशीलता येणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी वेगवेगळं प्रशिक्षण देणाऱ्या, उद्योजक निर्माण करणाऱ्या संस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. चेंबर ऑफ इंडियन एमएसएमईनं आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मानांकन प्रणाली आणि त्या संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचं आवाहन, गडकरी यांनी यावेळी केलं.

****

इंधनाच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी एल्गार पुकारला आहे. कोरोनाविषयक निर्बंधांमुळे वाहतूकदार अडचणीत आले आले असून, मालवाहक गाड्यांचे थकीत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी आणि इंधन दरवाढ रोखावी अशी आग्रही मागणी वाहतूकदार संघटनेनं केली आहे. या प्रश्नावर वाहतूकदारांनी काल पुण्यात निदर्शनं केली. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

****

कोविड संसर्गाने आई-वडील यापैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना, शासन निर्देशानुसार आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. महिला आणि बाल विकासांअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दलाची बैठक काल झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाल कल्याण समितीची बैठक घेऊन या पाल्यांना बालसंगोपन किंवा बालगृहामध्ये ठेवण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

****

भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज इंग्लंडमधल्या टाउंटन इथं खेळला जाणार आहे. हा सामना दिवस रात्र खेळला जाणार असून, भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामना सुरू होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ एक-शून्यनं आघाडीवर आहे.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Audio- आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय औषध नियामकांनी मॉडर्ना या कोविड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. या लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार असल्याचं, नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी सांगितलं. देशात आता कोविड प्रतिबंधासाठी कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक व्ही, आणि मॉडर्ना या चार लसी उपलब्ध आहेत.

****

महाराष्ट्रात डेल्टा प्लस प्रकाराचे सर्वाधिक नऊ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले असून, या विषाणूची बाधा झाल्यानं पहिला मृत्यूदेखील, रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात झाला होता. मात्र आता संगमेश्वर तालुक्यातल्या तीन मुलांनी डेल्टा प्लस संसर्गावर यशस्वी मात केली असल्याचं, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाद्वारे, ई-बिलिंग संगणकीय प्रणालीचा प्रारंभ; काल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला. सेवाशुल्क देण्यासाठी ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरवात हा म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय असून, नागरिक केंद्रित प्रशासनाचं उत्तम उदाहरण असल्याचं, आव्हाड म्हणाले.

****

चालू शैक्षणिक वर्षासाठीची शालेय पाठ्यपुस्तकं पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. सर्वात आधी आदिवासी भागात पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे. राज्यभरात अनेक शाळांनी १५ जूनपासून ऑनलाईन अध्यापन सुरू केलं आहे, मात्र विद्यार्थ्यांना नवीन वर्गाची पाठ्यपुस्तकं अद्याप मिळू शकलेली नाहीत.

****

औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोरील अडीच एकर जागेवरचं अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं काल दूर केलं. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसंच टपऱ्या, सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व विभागाला देण्यात आला. या कारवाईला विरोध करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेत, पोलिसांनी कारवाई पूर्ण केली.

****

परभणी इथल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचलीत साधन केंद्र यांच्या वतीने सोनपेठ इथं अल्प दरात सोयाबीन बियाणे, खत, औषधें आणि फळझाडे वाटप करण्यात आले.

****

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 30 ؍ جون 2021 وَقت : صبح 09.00 سے09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 30 June 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۰ ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  جون  ۲۰۲۱ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


سامعین کرام  مُلک بھر میں18؍ برس سے زائد عمر کے تمام افراد کو مُفت میں کورونا کے حفاظتی ٹیکے لگا ئے جا رہے ہیں۔ تمام نو جوان سامعین سے گزارش ہے کہ وہ ٹیکہ ضرور لیں۔ کورونا سے متعلق پا بندی میں نر می ضرور کی گئی ہے۔ لیکن کورو نا کے پھیلائو کا امکان ابھی ختم نہیں ہوا ہے۔ اِس لیے احتیا ط بہت ضروری ہے۔ سامعین سے در خواست کی جاتی ہے کہ جب ضروری ہو تب ہی گھر سے باہر نکلیں ۔ ماسک کا استعمال کریں‘ سماجی فاصلہ بر قرار رکھیں  ‘ ہاتھ اور چہر ہ صاف رکھیں  اور کورونا کا حفاظتی ٹیکہ ضرور لگوائیں ۔


اب خاص خبروں کی سر خیاں...

٭ ایک ملک ایک راشن کارڈ اسکیم پر31؍ جولائی سے عمل در آمد کرنے کی عدالت عظمی کی ہدایت 

٭ پارلیمنٹ کا مانسون اجلاس کا آئندہ 19؍ جولائی سے آغاز

٭ کورونا سے یتیم ہونے والے بچوں کی اسکول فیس خواتین و اطفال کی بہبود  کا محکمہ کرے گا اداجبکہ گریجویشن اور  پوسٹ گریجویشن  تک کی مکمل فیس ریاستی حکو مت کی جانب سے معاف 

٭ ریاست میں کَل پائے گئے 8؍ہزار85؍ کورونا کے نئے مریض‘ مراٹھواڑہ میں کورونا سے

15؍ مریضوں کی موت  ساتھ ہی384؍ نئے متاثرین کا اضا فہ 

اور

٭ غیر قا نو نی تبدیلی ِ مذہب معاملے میں بیڑ ضلعے کے عر فان شیخ کو اُتر پر دیش ATS  نے کیا گرفتار



  اب خبریں تفصیل سے....

عدالتِ عظمی نے ریاستوں اور مرکز کے زیر انتظام علاقوں کو ایک ملک ایک راشن کارڈ اسکیم  پر

آئندہ 31؍ جولائی سے عمل در آمد کرنے کی ہدایت دی ہے۔ ساتھ ہی سپریم کورٹ نے مرکزی حکو مت کو  کورونا وائرس کی وباء کے جا ری رہنے تک مہاجر مزدوروں کو اناج کی فراہمی اور Community Kitchen جاری رکھنے کی ہدایت بھی دی۔ عدالت نے ریا ستی حکو متوں کو  کورونا کے سبب ہجرت کرنے والے مزدوروں کو سہو لیات کی فراہمی کے لیے بہترین منصوبہ بندی کرنے کا حکم دیا ہے۔

***** ***** *****

پارلیمانی امور کی کمیٹی نے پارلیمنٹ کا مانسون اجلاس آئندہ19؍ جولائی  تا  23؍  اگست کے در میان منعقد کرنے کی سفا رش کی ہے۔ گزشتہ ہفتے اِس کمیٹی نے ما نسون اجلاس کی مد ت کا تعین کر نے کے لیے میٹنگ کا انعقاد کیا تھا۔  

***** ***** ***** 

خواتین و اطفال کی بہبود کی وزارت نے کورونا سے یتیم ہونے والے بچوں کی اسکو ل فیس ادا کرنے کی ذمہ داری لی ہے۔ اِس خصوص میں کَل خواتین و اطفال کی بہبود کی وزیر یشو متی ٹھا کُر کی موجود گی میں دو معاہدے کئے گئے ۔ اِن یتیم بچوں کی تعلیم میں استعمال کے لیے  Tab  اور  Laptopo  بھی فراہم کیا جا ئے گا۔ جس کے لیے Project Mumbai  نامی کمپنی سے معاہدہ کیا گیا ہے۔

***** ***** ***** 

ریاستی حکو مت نے کورونا وائرس سے ہلاک ہونے والے شہر یا ن کے بچوں کو گریجویشن  اور  پوسٹ گریجویشن کی تعلیم کی تکمیل تک مکمل فیس معا فی کا فیصلہ کیا ہے۔ اعلیٰ اور تکنیکی تعلیم کے ریاستی وزیر اُدئے سامنت نے کَل ممبئی میں یہ اعلان کیا۔ غیر امداد یافتہ اور مستقل غیر امداد یافتہ اسکو لوں کی ٹیو شن  اور  ڈیولپمنٹ فیس میں سہو لت نہیں دی جا ئے گی تاہم  جِم خانہ فیس ‘ پروجیکٹ فیس ‘ کالج کے رسالے کی فیس  اِسی طرح کمپیو ٹر ‘ علاج کے لیے امداد ‘ کھیلوں  اور  یوتھ فیسٹیول کے انعقاد کے لیے طلب کی جا نے والی فیس مکمل طور پر معاف کر دی جا ئے گی ۔ سامنت نے بتا یا کہ اِن بچوں کو کتب خا نے اور تجر بہ گاہ کے لیے مطلوبہ  فیس کا نصف ہی ادا کر نا ہو گا ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


اورنگ آ باد کے ضلع کلکٹر سنیل چو ہان نے کورونا وائرس سے اپنے والدین میں سے ایک یا دو نوں کو کھو دینے والے بچوں کو ضروری امداد فراہم کرنے کے لیے فوری کار وائی کر نے کی ہدایت دی ہے۔ گزشتہ روز اِس خصوص میں District Child Protection Cell    اور  ضلع ٹاسک فورس کا ایک اجلاس منعقد کیا گیا ۔ ضلع کلکٹر نے ضلعے میں موجود ایسے 402؍ بچوں کو ماہ جو لائی کے پہلے ہفتے میں بہبود اطفال کمیٹی کی میٹنگ منعقد کر کے بچوں کے ہاسٹل میں رکھنے کے لیے ضروری کار وائی جلد مکمل کرنے کی ہدایت دی ہے۔

***** ***** *****

ریاست میں کَل مزید8؍ہزار85؍ کورونا مریض پائے گئے ۔ اِس کے ساتھ ہی ریاست میں اب تک پائے گئے کورونا مریضوں کی مجموعی تعداد بڑھ کر 60؍ لاکھ 51؍ہزار633؍ ہو چکی ہے۔ کَل231؍مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔ ریاست بھر میں اب تک اِس بیماری سے  ایک لاکھ 21؍ ہزار804؍ اموات ہو چکی ہے۔ 

دوسری جانب 8؍ ہزار 623؍ متاثرین کَل علاج معالجے کے بعد شفا یاب ہو گئے ۔ اِس طرح اب تک 58؍ لاکھ548؍ متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں ۔ فی الحال ریاست میں ایک لاکھ 

17؍ ہزار98؍ مریض زیر علاج ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑے میں کَل 384؍ کورونا مریضوں کا اندراج ہوا۔ جبکہ 15؍ مریض علاج کے دوران چل بسے ۔ وفات پانے والوں میں بیڑ ضلعے کے6؍ اورنگ آ باد اور جالنہ ضلعے کے فی کس3؍ لاتور کے 2؍ پر بھنی ضلعے کے  ایک مریض کا شمار ہے ۔

بیڑ ضلعے میں کَل کورونا کے نئے170؍ مریض پائے گئے۔ اورنگ آ باد میں91؍ عثمان آ باد میں53؍ لاتور میں29؍ پر بھنی میں25؍ جالنہ میں11؍ جبکہ ہنگولی ضلعے میں 5؍ نئے مریض پائے گئے ۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ  گزشتہ 15؍ مہینوں کے عرصے میں ناندیر ضلعے میں کَل پہلی بار ایک بھی مریض نہیں پا یا گیا ۔

***** ***** ***** 

ریاستی حکو مت کی جانب سے کووڈ19؍سے بچائو کے مقصد سے جاری کئے گئے قوانین کا احترام کر تے ہوئے راشٹر وادی پری وار نے عوامی رابطے کے لیے اپنا دورمنسوخ کر دیاہے ۔ راشٹر وادی کانگریس پارٹی کے ریاستی صدر اور آ بی وسائل کے وزیر جینت پاٹل نے کَل یہ اعلان کیا۔ وزیر موصوف کَل ہنگولی میں صحا فتی کانفرنس سے خطاب کر رہے تھے۔ انہوں نے بتا یا کہ 24؍ جون سے شروع کئے گئے  اِس عوامی رابطہ دور ے کے در میان عثمان آ باد ‘ لاتور ‘ ناندیڑ  اور  ہنگولی اضلاع  اور اِن میں واقع 23؍ انتخا بی حلقوں کا جائزہ لیا گیا ہے۔

***** ***** *****

راشٹر وادی کانگریس پارٹی کے قومی صدر شرد پوار نے کَل وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے سے اُن کی رہائش گاہ پر ملا قات کی۔ اِس موقع پر دو نوں رہنمائوں نے کم و بیش 2؍ گھنٹے تک تبادلہ ٔ خیال کیا ۔ پارلیمنٹ اور اسمبلی اجلاس کے پس منظر میں یہ ملا قات کا فی اہم ما نی جا رہی ہے۔

***** ***** ***** 

تعمیراتِ عامہ کے ریاستی وزیر اشوک چو ہان نے کہاہے کہ مراٹھواڑہ سے گزر نے والی24؍ میں سے

18؍ قو می شاہراہوں کا  کام ‘ مالی طور پر کمزور گُتے دار کے سبب نا مکمل رہ گیا ہے ۔ وزیر موصوف کَل پر بھنی میں صحا فتی کانفرنس سے خطاب کر رہے تھے۔ انہوں نے بتا یا کہ اِس خصوص میں مرکزی وزیر نتن گڈکری سے انہوں نے تبادلۂ خیال کیا ہے اور چند ایجنسیوں کے کاموں پر اعتراض ظاہر کیا ہے۔ انہوں نے اِس اعتماد کا اظہار کیا ہے کہ مرکزی اور  ریاستی حکو متیں جلدہی سڑ کوں کی تعمیر مکمل کرنے کے لیے راستہ نکالے گی 

دریں اثناء پر بھنی تعلقے کے تری دھارہ سے اُکھڑد پمپری دیشمکھ  مر کھیل اِس14؍ کلو میٹر طویل راستے کے کام کا افتتاح چو ہان کے ہاتھوں عمل میں آ یا۔

***** ***** ***** 

غیر قا نو نی طریقے سے مذہب تبدیل کر ا نے کے معاملے میں اُتر پر دیش دہشت گرد مخالف دستے نے بیڑ ضلع کے ساکن عر فان شیخ نا می نو جوان کو دِلّی سے گرفتار کیا ہے۔ پر لی تعلقے کے شِر ساڑی قصبے کا سا کن عر فان ‘  خواتین و اطفال کی مرکزی وزارت میں گو نگے بچوں کو اِشارے سے بات چیت کرنا سکھا تا ہے ۔ پولس کی جانب سے دی گئی اطلاع کے مطا بق بے رو زگار ‘ غریب کنبوں اور گونگے افراد کو پیسوں کا لالچ دے کر مذہب تبدیل کیا جا رہا تھا  اور  اِس کام کے لیے پا کستانی تنظیم ISI  سے مالی معا ونت حاصل کی جا رہی تھی۔

***** ***** ***** 

ناندیڑ ضلعے میں کورونا وائرس سے مدافعت کے لیے ٹیکہ کاری مراکز کی تعداد میں اضا فہ کیاگیا ہے۔ آج ناندیڑ شہر میں 12؍ جبکہ دیہی علاقوں میں 90؍ یعنی کُل102؍ مراکز پر کورونا کا ٹیکہ لگا یا جا ئے گا ۔ اِن مراکز پر کووِ شیلڈ کی پہلی جبکہ کوویکسین کی دوسری خوراک دی جا ئے گی ۔ ضلع صحت افسر ڈاکٹر با لا جی شندے نے اہلیانِ شہر یان سے ٹیکہ لگوا نے کی اپیل کی ہے۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد میں کَل شام4؍ بجے تمام بازار بند کر دیے گئے۔ تاجروں نے کورونا کے اصول و ضوابط پر عمل در آمد کرتے ہوئے  کاروباری سر گر میاں بند کر دیں۔ ضلع کلکٹر کی ہدایت کے مطا بق شام5؍ بجے تک لوگوں کے ایک جگہ جمع ہونے پر پا بندی عائد کی گئی ہے  اور  اِس کے بعد صبح7؍ بجے تک کر فیو نافد رہے گا۔ اورنگ آ باد شہر کے تمام پیٹرول پمس  پر عام شہر یان کو صبح7؍  تا  شام4؍ بجے تک ایندھن فراہم کیا جا ئے گا اور  اشد ضروری خد مات انجام دینے والوں کو یہ سہو لت 4؍ بجے کے بعد بھی جاری رہے گی۔

***** ***** ***** 

اورنگ آباد شہر میں واقع تاریخی عمارت بی بی کے مقبرے کے روبرو ڈھائی ایکڑ اراضی پر غیر قانو نی قبضے کو کَل میونسپل کارپوریشن کی جانب سے ختم کر دیا گیا ۔ اِس اراضی پر 2؍ اسکول شروع کئے گئے تھے۔ اور متعدد چھوٹی دو کا نیں تعمیر کی گئی تیں۔ اِس اراضی کو کھلا کر کے محکمۂ  آثار قدیمہ کے حوالے کر دیا گیا ہے۔

***** ***** ***** 

آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک بار پھر...

٭ ایک ملک ایک راشن کارڈ اسکیم پر31؍ جولائی سے عمل در آمد کرنے کی عدالت عظمی کی ہدایت 

٭ پارلیمنٹ کے مانسون اجلاس کا آئندہ 19؍ جولائی سے آغاز

٭ کورونا سے یتیم ہونے والے بچوں کی اسکول فیس خواتین و اطفال کی بہبود کا محکمہ کرے گا ادا جبکہگریجویشن اور  پوسٹ گریجویشن  تک کی مکمل فیس ریاستی حکو مت کی جانب سے معاف 

٭ ریاست میں کَل پائے گئے 8؍ہزار85؍ کورونا کے نئے مریض‘ مراٹھواڑہ میں کورونا سے

15؍ مریضوں کی موت  ساتھ ہی384؍ نئے متاثرین کا اضا فہ 

اور

٭ غیر قا نو نی تبدیلی ِ مذہب معاملے میں بیڑ ضلعے کے عر فان شیخ کو اُتر پر دیش ATS  نے کیا گرفتار


اِسی کے ساتھ ہی آکاشوانی اورنگ آباد سے علاقائی خبریں ختم ہوئیں


آپ یہ خبریں ہمارے یو ٹیوب چینل  آکاشوانی سماچار اورنگ آباد  

Aurangabad AIR News  پر کسی بھی وقت سُن سکتے ہیں ۔


٭٭٭٭٭


آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 30 ؍ جون 2021 وَقت : ...

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेची येत्या ३१ जुलैपर्यंत अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना निर्देश.

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून प्रारंभ.

·      आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी; गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई.

·      कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी महिला आणि बाल विकास विभागानं घेतली तर पदवी-पदव्युत्तर शिक्षणाचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      राज्यात आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १५ जणांचा मृत्यू तर ३८४ बाधित.

·      बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या इरफान शेखला उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक.

आणि

·      मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.

****

‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेची अंमलबजावणी येत्या ३१ जुलै पर्यंत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. तसंच कोविड-19 ची साथ सुरु आहे तोपर्यंत स्थलांतरित मजुरांना अन्नाचा पुरवठा सुरु ठेवावा, कम्युनिटी किचनही सुरु ठेवावं, असंही न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांनी उत्तम नियोजन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान घेण्याची शिफारस संसदीय कामकाज समितीनं केली आहे. अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी समितीनं गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. या अधिवेशनादरम्यान अनेक विधेयकं सादर करण्यात येणार आहेत.

****

आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची चार फूट, तर घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत असण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्ती धातू अथवा संगमरवरी असण्याला प्राधान्य द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरीच करावं, लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाच्या कृत्रिम तलाव परिसरात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव काळात भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरांसारखे आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम, महिला आणि बाल विकास विभाग हाती घेत आहे. यासाठी काल महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं शालेय शुल्क, त्यांना शिक्षणाकरता लागणारे टॅब, लॅपटॅाप अशा गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार असून, यासाठी प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला. यशोमती ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली, त्या म्हणाल्या –

जी लेकरं आहेत ज्यांनी आपले आईवडील गमावलेले आहेत, त्या लेकरांच्या पुढच्या तीन वर्षांच्या फीसची व्यवस्था आम्ही करतो आहोत शैक्षणिक. त्याच्यासोबतच या बाळांना सायकॉलॉजिकली मदत कशी करता येईल, याचं देखील आम्ही बघतो आहे. त्यांना टेक्नॉलॉजिकली लॅपटॉप असो किंवा अँड्राईड फोन्स असो, किंवा यायला जायला सायक्लस जर लागल्या, तर सायकल्स असो, याची व्यवस्था आम्ही करणार आहोत.

****

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या मुलांचं पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही, परंतू इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारं शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. संसद आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

****

राज्यात काल आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ५१ हजार ६३३ झाली आहे. काल २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार ८०४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ६२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख नऊ हजार ५४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३८४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या सहा, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, लातूर दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा मृतांमधे समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १७० रुग्ण आढळले. औरंगाबाद ९१, उस्मानाबाद ५३, लातूर २९, परभणी २५, जालना ११, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यात काल प्रथमच एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात शासनानं जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं. ते काल हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे, आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जलसंपदा मंत्री पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोली वरून वसमतकडे येत असतांना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही काळ अडवला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचं निवेदन जयंत पाटील यांच्याकडे सादर केल्याचं, आमच्या वार्तारानं कळवलं आहे.

****

बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकानं बीड जिल्ह्यातल्या इरफान शेख नावाच्या तरुणाला दिल्लीतून अटक केली. परळी तालुक्यातल्या शिरसाळा इथला रहिवासी असलेला इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मुकबधीर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूकबधीर लोकांना पैशाचं अमिष दाखवून, धर्मांतरण करण्यात येत होतं. या धर्मांतरणासाठी आयएसआय या पाकिस्तानी संघटनेकडून पैसा पुरवला जात असल्याचं, समोर आलं आहे.

****

औरंगाबाद नजिक वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याबाबत, सिडकोनं केलेला ठराव रद्दबातल करण्यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगानं, मुंबई उच्च न्यायालयानं, सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करून, सिडको प्रशासनानं हा भाग औरंगाबाद महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे.

****

वैश्विक समस्यांच्या बाबतीत भारतानं नेहमीच दिशादर्शक भूमिका घेतली आहे, कोविड प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीतही भारतानं सभ्यता, मानवता आणि संवदेनशीलतेचं दर्शन घडवलं, असं प्रतिपादन बिहारमधल्या मोतीहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ संजीवकुमार शर्मा यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनारमध्ये, बीजभाषणात डॉ.शर्मा बोलत होते. नैनीताल इथल्या कुमाऊं विद्यापीठाचे डॉ.मधुरेंद्र कुमार, दिल्ली विद्यापीठातले डॉ.प्रकाश सिंग यांच्यासह सुमारे ३६० जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तर ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध यावेळी सादर केले.

****

मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची २४ पैकी अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण राहिली आहेत, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर आपण मराठवाड्यातल्या या चोवीस कामांबाबत चर्चा केली असून, काही एजन्सी धारकांच्या कामांबद्दल आक्षेप नोंदवले आहेत, केंद्र आणि राज्य सरकारकडून या रस्त्यांच्या कामांच्या पूर्ततेबाबत लवकरच निश्चितच मार्ग काढला जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

दरम्यान, परभणी तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र त्रिधारा पाटीपासून ते उखळद-पिंपरी देशमुख -मिरखेल, या १४ किलोमीटर मार्गाच्या कामाचा आणि परभणी इथल्या सावली या शासकीय विश्रामगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ, काल चव्हाण यांच्या हस्ते झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा काल सायंकाळी चार वाजता बंद झाल्या. व्यापाऱ्यांनी कोविड नियमांचं पालन करत सर्व बाजारपेठा बंद केल्या. पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दुपारी साडे तीन वाजेपासूनच व्यापाऱ्यांना आस्थापना बंद करण्यासंबंधी सूचना दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात सांयकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी, आणि त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू असून, शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद असणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या सर्व पेट्रोलपंपांवर सर्वसामान्य नागरिकांना, सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच इंधन मिळेल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र त्यानंतरही इंधन पुरवठा सुरू राहणार असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड प्रतिबंधाक लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज नांदेड शहरात १२ तर ग्रामीण भागात ९० अशा एकूण १०२ केंद्रातून लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड ही लस पहिला आणि दुसरा तर कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार असून, पात्र व्यक्तींनी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण आठ हजार ८१ जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातल्या सात हजार ४९२ जणांनी, तर शहरात ५८९ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख २६ हजार ७११ जणांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांचं वीज बील थकल्यामुळे, महावितरण कंपनीने नांदेड महापालिकेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांची, एकूण ५४ कोटी सहा लाख रूपयांची थकबाकी महानगरपालिकेकडे आहे, महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावल्याने थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नसल्याचं, महावितरणनं म्हटलं आहे. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नसल्याचं, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी बंधाऱ्याच्या एका दरवाजातून, १६ हजार ६३५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं, पाणी काल सोडण्यात आलं. धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या दिग्रस बंधारा तथा पूर्णा नदी मधून चालू पाण्याच्या विसर्गामुळे, प्रकल्पात येणारी पाण्याची आवक तसंच सततचा पाऊस लक्षात घेता, पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं.

****

राज्यात मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Tuesday, 29 June 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.06.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 29.06.2021 रोजीचे कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 29.06.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी; यंदाही मिरवणुकांना बंदी

** तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी मंजूर

** औरंगाबाद नजिक वाळूज महागनर प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाची सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस

आणि

** जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोविडग्रस्तांचा मृत्यू

****

आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची चार फूट तर घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत असण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्ती धातू अथवा संगमरवरी असण्याला प्राधान्य द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरीच करावं, लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाच्या कृत्रीम तलाव परिसरात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव काळात भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीरांसारखे आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम, महिला आणि बाल विकास विभाग शासन हाती घेत आहे. यासाठी आज महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं शालेय शुल्क, त्यांना शिक्षणाकरिता लागणारे टॅब, लॅपटॅाप अशा गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार असून यासाठी प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला.

****

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांना मदतीचं वाटप करण्यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये १६ तसंच १७ मे २०२१ रोजी "तौक्ते" चक्रीवादळामुळे नुकसान झालं होतं. सर्वाधिक नुकसान झालेल्या कोकण विभागासाठी १५२ कोटी ४८ लाख २८ हजार, नाशिक विभागासाठी १० कोटी ९७ लाख ६७ हजार, अमरावती विभागासाठी ३ कोटी ५७ लाख ३७ हजार, पुणे विभागासाठी ३ कोटी २४ लाख २५ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९० हजार, तर नागपूर विभागासाठी ४४ लाख २६ हजार रुपये, याप्रमाणे एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

****

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव इथल्या 'आनंद सागर' च्या धर्तीवर पंढरपूर इथंही भव्य उद्यान उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. पंढरपूर शहरातली विकास कामं आणि श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पालखी मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेचा स्कायवॉक, चंद्रभागा नदीवरचे घाट, सार्वजनिक स्वच्छतागृहं, यासह विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

****

राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं. ते आज हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. कोविड प्रार्दुभाव कमी होईल त्यावेळी परभणी जिल्हयातून ही यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचं, पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

औरंगाबाद नजिक वाळूज महागनर प्रकल्प रद्द करण्याबाबत सिडकोनं केलेला ठराव रद्दबातल करण्यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करून, सिडको प्रशासनानं हा भाग औरंगाबाद महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे. हा प्रकल्प रद्द झाला तर या ठिकाणी होणारा विकास थांबेल, त्यामुळे प्रकल्प रद्द करु नये. या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम नसल्यामुळे तसंच नगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत, सिडकोनं वाळूज महानगरचा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणं गरजेचं असल्याचं सांगत, स्थानिक नागरिक नागेश कुठारे आणि इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिडकोला या भागात भौतिक सुविधा पुरवण्याबाबत आदेश देण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

****

     नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केलं आहे. क्रोएशियाच्या ओसिजेक इथं सुरु असलेल्या स्पर्धेत राहीने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी संपूर्ण क्रीडा जगताकरिता ही अतिशय उत्साहवर्धक घटना असल्याचं राज्यपाल म्हणाले. आगामी वाटचालीसाठी राज्यपालांनी राही सरनोबतला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, भारताने स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. कोश्यारी यांनी आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू इथल्या परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसंच प्राचार्यांशी संवाद साधला, त्यावेळी हे मत व्यक्त केलं. या विद्यापीठाने आगामी २५ वर्षांत आपलं स्वरूप कसं असावं, याचा विकास आराखडा तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल, यादृष्टीनं विचार करावा अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज १७० नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ६४ रुग्ण आष्टी तालुक्यात आढळले. बीड १९, गेवराई १८, पाटोदा १४, शिरूर तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी १२, केज ११, माजलगाव ७, अंबाजोगाई ८, धारुर ३, तर परळी तालुक्यात आज २ नवे रुग्ण आढळले.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १५३ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ११ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार १८१ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ८५४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आज सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु होत्या. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन करत सर्व बाजारपेठा बंद केल्या. पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी साडे तीन वाजेपासूनच व्यापाऱ्यांना आस्थापना बंद करण्यासंबंधी सूचना दिल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांयकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी आणि त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद असणार आहेत.

****

वैश्विक समस्यांच्या बाबतीत भारतानं नेहमीच दिशादर्शक भूमिका घेतली आहे, कोविड प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीतही भारतानं सभ्यता, मानवता आणि संवदेनशीलतेचं दर्शन घडवलं, असं प्रतिपादन बिहारमधल्या मोतीहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजीवकुमार शर्मा यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनारमध्ये बीजभाषणात डॉ शर्मा बोलत होते. नैनीताल इथल्या कुमाऊं विद्यापीठाचे डॉ मधुरेंद्र कुमार, दिल्ली विद्यापीठातले डॉ प्रकाश सिंग, यांच्यासह सुमारे ३६० जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तर ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध यावेळी सादर केले.

//*************//