आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 31 August 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ; ढोलताशांच्या
गजरात गणरायाची प्रतिष्ठापना.
·
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात हरभरा डाळीचा
पुरवठा करण्याला केंद्र सरकारची मंजुरी.
·
देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली
मर्यादा रद्द.
आणि
·
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी
प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ.
****
गणेशोत्सवाला
आज सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना
करण्यत आली. या वर्षी हा उत्सव कोविड प्रतिबंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जात
आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला
शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव देशवासियांवर राहील, अशी आशा पंतप्रधानांनी
आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केली.
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांचं राजभवनातलं निवासस्थान ‘जलभूषण’ इथे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी
गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी
आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी
बळ देण्यासह राज्यातल्या जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी
गणरायाला मागितलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय आणि मुक्त वातावरणात,
आनंद-जल्लोषात तसंच पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री
शिंदे यांनी यावेळी केलं.
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करून प्रार्थना केली
तसंच सर्वांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशमूर्तीचं
पूजन करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही आज ढोल ताशांच्या ठेक्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या
गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह
दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच गणेश
भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
राज्यभरात
सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश
मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरवात झाली. महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननं
यंदा पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा साकारली आहे. आठ प्रकारची रोपं वापरत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी
ही गणेश प्रतिमा साकारली आहे.
औरंगाबाद
शहरातही घरगुती गणपतींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निवासस्थानी गणपतीची षोडशोपचारे स्थापना केली.
राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, महागाई कमी होऊ दे, असं
साकडं दानवे यांनी गणरायाला घातलं आहे. ते म्हणाले –
गणरायाला हीच प्रार्थना आम्ही केली की, अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं
नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकर मदत मिळू दे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जी एस टी
पीठावर लागलेला आहे. पेट्रोल-डिझेल महागलेलं आहे. याचे सुद्धा दर कमी होऊ दे अशा प्रकारची
प्रार्थना मी गणपती बाप्पाला केलेली आहे.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात
हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला मंजुरी दिली आहे. ही डाळ, माध्यान्ह भोजन, सार्वजनिक
वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह विविध कल्याणकारी योजनांमध्ये
वापरली जाईल. या योजनेतून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या भांडारांमधून
आठ रुपये प्रति किलो दरानं पंधरा लाख मेट्रिक टन हरभरा डाळ घेता येईल, प्रथम येणाऱ्यास
प्रथम, या तत्वावर ही डाळ मिळणार आहे. ही योजना फक्त एकदा राबवण्यात येणार असून राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेचा लाभ बारा महिन्यांच्या आत किंवा डाळीचा साठा
संपेपर्यंत घेता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी
केंद्र सरकार बाराशे कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या तीन वर्षात देशात हरभऱ्याचं
सर्वाधिक उत्पन्न झालं आहे. केंद्र सरकारनं किमान हमी भाव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून
तीस लाख पंचावन्न हजार मेट्रिक टन हरभरा खरेदी केला आहे. आगामी रब्बी हंगामातही हरभऱ्याचं
उत्पादन चांगलं असेल, असा अंदाज आहे. याशिवाय या समितीनं किमान हमीभाव योजनेत तूर,
उडीद आणि मसूर डाळींच्या खरेदीची सीमा पंचवीस टक्क्यांवरून वाढवून चाळीस टक्के केली
आहे.
****
सुट्या
मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच
तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे.
ते आज नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथीयांच्या संमेलनात बोलत होते. सुटं तेल
विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका
आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र
सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
काँग्रेस
अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटाचे सदस्य
मनीष तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसनं
मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी तिवारी यांनी काल एका ट्विट संदेशातून केली. मतदार
यादी जाहीर न करता निवडणूक कशी होऊ शकते आणि अशा पद्धतीनं होणारी निवडणूक निष्पक्ष
कशी असेल, असा प्रश्न तिवारी यांनी काँग्रेस पक्ष निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री
यांना विचारला. यावर, काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सदस्याला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या
कार्यालयात जाऊन मतदार यादी पाहता येईल, असं उत्तर मिस्त्री यांनी दिल्यावरही तिवारी
यांनी यावर टीका करत पारदर्शक निवडणुकीसाठी मतदारांची यादी जाहीर करण्याची पुन्हा मागणी
केली.
****
देशांतर्गत
विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली सीमा आज हटवण्यात आली आहे. कोरोना
महामारीमुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सरकारनं या दराची सीमा ठरवली होती.
आजच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांचे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य
मिळेल, तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात स्वस्त तिकिटांच्या ऑफर्स
देता येतील. विमान सेवांची रोजची मागणी आणि विमान इंधनाची किंमत यांचं काळजीपूर्वक
विश्लेषण करून देशांतर्गत विमान तिकिटांच्या दरावरची सीमा हटवण्यात येईल, असं नागरी
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
****
प्रधानमंत्री
किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर-२०२२
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली
दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी,
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ही मुदतवाढ देण्याची मागणी
केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मागणी मान्य ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर
डेटा अपलोड करण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. राज्यातल्या पात्र पीएम किसान
लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबवली जात असून
आतापर्यंत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आलं आहे
आणि उर्वरीत एकोणचाळीस लाख तेरा हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचं
ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी या बैठकीत दिली.
****
आशिया
चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला
भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा
सामना सुरु होईल.
****
जागतिक
वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या
१० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष
फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया
करणार आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेश मूर्ती, रोषणाई आणि पुजेच्य
साहित्यांनी बाजारपेठ फुलली असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना करण्याची तयारी केली असून मोठ्या गणेशमूर्ती
मंडपात आणल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत त्यांची विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
***
राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा
करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील
जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातलं.
गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात
तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे
यांनी यावेळी केलं.
***
धुळे शहर
आणि जिल्ह्यात आज गणरायाचं मोठ्या उत्साहात सर्वत्र आगमन होत आहे. सकाळ पासूनच धुळे
शहरातील फुलवाला चौक, संतोषी माता चौक, दत्त मंदिर चौक येथून गणपती मुर्ती भाविक सहकुंटूंब
घरी घेवून जात आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेश मुर्ती घेण्याला
प्राधान्य दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
सांगली जिल्ह्यातील
मिरज शहरात ३५० सार्वजनिक मंडळात आज गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. शहरात गणेश
चतुर्थीच्या पूर्व संध्येला गणेशमूर्तींच सहवाद्य मिरवणुकांसहित आगमन करण्यात आलं.
यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने निर्बंध शिथिल केल्याने अनेक मंडळ उंच गणेश
मूर्तीची प्रतिष्ठापना करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
श्रीवैष्णो
देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी कटरा इथं इंटर मोडल
स्थानक विकसित केलं जात आहे. यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लिमिटेड-
एनएचएलएमएल आणि कटरा विकास प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात
आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री
जनरल व्ही के सिंह, तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारमधील अधिकारी यांच्या उपस्थितीत या
करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
***
नाशिक जिल्ह्यातील
इगतपुरी इथल्या अनुसयात्मक दिव्यांग पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
दिव्यांग आणि मतिमंद विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची दखल घेत
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं आपला अहवाल दिव्यांग आयुक्तालयाला पाठवून सदर
पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द केली आहे. गेल्या २५ ऑगस्टला रात्रीच्या जेवणानंतर
झालेल्या विषबाधेतून केंद्रातील दोन मुलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर
अन्य सहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते.
***
रशियाचे
माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे
होते. अमेरिका आणि तत्कालिन संयुक्त रशिया यांच्यात विभाजीत देशांच्या गटांमध्ये सुरू
असलेलं शीतयुद्ध संपवण्यात गोर्बाचेव्ह यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी १९८५ मध्ये
रशियाची सुत्रे स्वीकारली आणि तत्कालिन युनियन ऑफ सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लीक- युएसएसआरच्या
प्रगती आणि विकासात योगदान दिलं. गोर्बाचेव्ह यांनी रशियाच्या व्यवस्थेत महत्त्वाचे
बदल घडवले.
***
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी ३९ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख
५० हजार लसीच्या मात्रा देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली
आहे. आतापर्यंत १०२ कोटी २९ लाखांहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा, ९४ कोटी २४ लाखांहून
अधिक नागरीकांनी दुसरी, तर १५ कोटी ८३ लाखांहून अधिक नागरीकांनी वर्धक मात्रा घेतली
असल्याचंही आरोग्य
मंत्रालयानं
म्हटलं आहे.
दरम्यान,
देशात काल नव्या सात हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११
हजार रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे.
देशात सध्या ६४ हजारांवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
जागतिक वरिष्ठ
कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून
सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
१० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक
प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे. तर ९ सदस्य महिला संघाच नेतृत्व राष्ट्रमंडळ
खेळांत तीनवेळा सुवर्णपदक प्राप्त विजेत्या विनेश फोगाट करणार आहे.
***
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाला
आजपासून सुरवात होत आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात
आणल्या असून आज त्यांची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
***
राज्यातल्या
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनातर्फे स्पर्धेचं आयोजन करण्यात
आलं आहे.अधिकाधिक मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता यावा यासाठी २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
***
सांगली जिल्ह्यातील
मिरज शहरात ३५० सार्वजनिक मंडळात आज गणेशमूर्तींची प्रतिस्थापना होत आहे.शहरात गणेश
चतुर्थीच्या पूर्व संध्येला अनेक मंडळांच्या उंच गणेशमूर्तींच आगमन सह वाद्य मिरवणुकांसहित
करण्यात आलं. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने निर्बंध शिथिल केल्याने अनेक
मंडळ उंच गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
केंद्र सरकारच्या
माध्यम शब्दकोश निर्मिती समितीमध्ये सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विभागाचे प्रमुख
डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयातर्फे निवडीचं पत्र
चिंचोलकर यांना देण्यात आलं आहे. या समितीची येत्या ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विद्यापीठात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
***
आशिया चषक क्रिकेट
स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा
हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
***
येत्या २४ तासात
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात काही भागांत विजांसह पावसाचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवला आहे.
****
آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ اگست 2022 ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date : 31 August 2022
Time : 09.00 to 09.10 AM
آکاشوانی اَورنگ آ باد
علاقائی خبریں
تاریخ : ۳۱ ؍ اگست ۲۰۲۲ ء
وقت : صبح ۹.۰۰ سے ۹.۱۰ بجے
چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے ...
٭ دس یوم کے گنیش فیسٹیوَل کا آج سے آغاز ‘ کووِڈ پا بندیاں ختم ہونے کی وجہ سے عقیدتمندوں میں جوش
٭ ممبئی میں قلا بہ - باندرہ -سِبز کوریڈور میٹرو تھرڈ پرو جیکٹ کا پہلا ٹیسٹ
٭ ریاستی ٹرانسپورٹ کارپوریشن کے75؍ سال سے زیادہ سینئر شہر یوں کے لیے مفت سفر اسکیم پر
عمل در آمد شروع
٭ عثمان آباد کے شیو سینا کے سابق رکن پارلیمنٹ رویندر گائیکواڑ شِندے گروپ میں شامل
٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے ایک ہزار444؍ مریض ‘ مراٹھواڑہ میں23؍ متاثرین
٭ زرعی وزیر عبد الستار کے تعلیمی اِدارے میں12؍ اساتدہ کے پاس اسا تذہ اہلیتی ٹیسٹTET کے
بوگس صداقت نامے پائے گئے ‘ قانون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی رہنما رکن اسمبلی
امبا داس دانوے کا الزام
٭ جالنہ ضلع کے کانگریس کے سینئر رہنما عنبڑ کے سابق صدر بلدیہ بابو رائو کلکر نی طویل علا لت کے باعث چل بسے
اور
٭ ایشیائی کپ کر کٹ مقابلے میں آج بھارت کا ہانگ کانگ سے مقابلہ
اب خبریں تفصیل سے...
ٌٌ دس یوم کے گنیش اُتسو کی آج سے شروعات ہو رہی ہے ۔ کووِڈ دور کے 2؍ سال کے تعطّل کے بعد اِس سال گنیش فیسٹیوَل دھو دھام سے منا نے کا جوش تمام ریا ست میں نظر آ رہا ہے ۔ کووِڈ پھیلائو کی وجہ سے کئی تہواروں پر عائد کی گئی پا بندیاں اِس سال ریاستی حکو مت نے ختم کر دی ہیں ۔ کئی گنیش فیسٹیوَل منڈلس اپنے برے گنیش مورتیاں منڈلوں میں لا رہے ہیں ۔ آج اُن کی با قائدہ استھا پنا کی جائے گی ۔ گنیش مورتیاں ‘ سجا وٹ کی اشیاء ‘ پو جا ‘ روشنائی کی اشیاء وغیرہ چیزیں خرید نے کے لیے بازار میں ہجوم نظر آ رہا ہے ۔
***** ***** *****
صدر جمہوریہ دروپدی مُر مو نے ملک کے عوام کو گنیش فیسٹیوَل کے ضمن میں مبارکباد پیش کی ہے ۔ نائب صدر جمہوریہ جگدیپ دھن کھنڈ نے بھی عوام کو گنیش فیسٹیوَل کی مبارکباد پیش کی ہے ۔ وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے اور نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے بھی سب کو گنیش فیسٹیوَل کے لیے نیک خواہشات کا اظہار کیا ہے ۔ گنیش اُتسو کے پس منظر میں اورنگ آباد میں پولس کمشنر نکھل گپتا سمیت اعلیٰ افسران نے کَل وِسر جن کنوئوں کا معائنہ کیا ۔ پیٹھن میں گنیش اُتسو کے مدّ نظر پولس شعبے کی جانب سے کَل راستوں پر پریڈ کی گئی ۔
***** ***** *****
ممبئی میں قلا بہ-باندرہ- سِبز کوریڈور میٹرو تھرڈ اِس پروجیکٹ کی کَل وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے اور نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کی موجود گی میں پہلی جانچ کی گئی ۔ ریاستی حکو مت عام لوگوں کے مفاد کو ذہن میں رکھ کر ریاست کو تر قی کی راہ پر گامزن کر نے والے کاموں کو فوقیت دے رہی ہے ۔ یہ بات وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے نے کہی ہے ۔ ریاست کے تر قیاتی کاموں میں کسی قسم کی رکا وٹ نہ لائیں ایسی اپیل وزیر اعلیٰ نے کی ہے ۔
***** ***** *****
ریاستی ٹرانسپوٹر کارپوریشن ST کی جانب سے75؍ سال سے زیادہ سینئر شہر یوں کے لیے مفت سفر اسکیم پر عمل در آمد کی شروعات ہو گئی ہے ۔ یہ سہو لت صرف مہاراشٹر کی سر حد تک محدود ہے ۔ اہل شہری ‘ آدھار کارڈ ‘ الیکشن شناختی کارڈ ‘ پاسپورٹ ‘ ڈرائیونگ لائسنس ‘ پین کارڈ ‘ تحصیلدار کی جانب سے دیا گیا شناختی کارڈ ‘ ریاستی ٹرانسپورٹ کارپوریشن کی جانب سے دیا گیا اسمارٹ کارڈ ‘ ڈی جی لاکر ‘ موبائل ‘ آدھار کارڈ اِن میں سے کوئی بھی شناختی کارڈ بتا کر اِس سہو لت کا فائدہ حاصل کر سکتے ہیں ۔ایس ٹی کار پوریشن کے شہر یوں کو اِس اسکیم سے فائدہ حاصل کر نے کی اپیل کی ہے ۔
26؍ سے 29؍ اگست اِن 4؍ یوم میں تمام ریاست میں تقریباً ایک لاکھ 51؍ ہزار سے زیادہ سینئر شہر یوں نے ایس ٹی میں مفت سفر کا فائدہ حاصل کیا ۔
***** ***** *****
شیو سینا کے عثمان آباد کے سابق رکن پارلیمنٹ رویندر گائیکواڑ شیو سینا کے شِندے گروپ میں شامل ہو گئے ہیں ۔ گائیکواڑ نے کَل ممبئی میں وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے سے ملا قات کر کےاپنے رول کی وضاحت کی ۔ وزیر اعلیٰ شِندے نے گائیکواڑ کو پارٹی کے کام کرتے رہنے کی ہدایت دی ۔ اِس کی اطلاع ہمارے نمائندے نے دی ۔
***** ***** *****
ریاست میں کَل کووِڈوباء سے متاثرہ نئے ایک ہزار444؍ مریض منظر عام پر آئے ۔ اِس کی وجہ سے تمام ریاست میں کووِڈ متاثرین کی جملہ تعداد80؍ لاکھ98؍ ہزار738؍ ہو گئی ہے ۔ کَل اِس وباء کی وجہ سے ریاست میں8؍ مریض چل بسے ۔ ریاست میں اب تک اِس وباء سے مرنے والے مریضوں کی جملہ تعداد ایک لاکھ48؍ ہزار237؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشا ریہ 83؍ فیصد ہے ۔ کَل 2؍ ہزار6؍ مریض شفا یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک 79؍ لاکھ39؍ ہزار
594؍ مریض اِس وباء سے نجات حاصل کر چکے ہیں۔ کووِڈ سے نجات کی شرح 98؍ اعشا ریہ02؍ فیصد ہو گئی ہے ۔ ریاست میں فی الحال 10؍ ہزار902؍ مریضوں کا
علاج جاری ہیں ۔
***** ***** ***** ***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** ***** ***** ***** *****
مراٹھواڑہ میں کَل23؍ کورونا وائرس متا ثرہ مریضوں کا انکشاف ہوا ۔ اِس میں اورنگ آباد ضلعے میں 6؍ لاتور 4؍
عثمان آ باد ‘ ناندیڑ ‘ بیڑ ‘ جالنہ اضلاع میں فی کس3؍ اور ہنگولی ضلعے میں ایک نیا مریض پا یا گیا ۔
***** ***** *****
زرعی وزیر عبد الستار کے تعلیمی اِدارے میں 12؍ اساتدہ کے پاس ٹیچرس اہلیتی ٹیسٹ TET کے بو گس صداقت نا مے پائے گئے ۔ ایسا الزام قا نون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی رہنما رکن اسمبلی امبا داس دانوے نے عائد کیا ہے ۔ اورنگ آباد میں کَل صحا فیوں سے مخاطبت میں اُنھوں نے ستار کے خلاف کار وائی کر نے کا مطالبہ کیا ۔ اِس معاملے میں وزیر ستار کی لڑ کیوں کے نام بھی ہے ۔ اِس طرح اُن کے تنخواہ کے کاغذات ہمارے پاس ہونے کا دعویٰ دانوے نے کیا ہے ۔ اِس معاملے کی جانچ کا مطا لبہ اُنھوں نے کیا ۔
***** ***** *****
ایشاء کپ کر کٹ مقابلے میں آج بھارت کا مقابلہ ہانگ کانگ سے ہو گا ۔ اِس مقابلے میں بھارتیہ ٹیم کایہ دوسرا اور آخری لیگ میچ ہے ۔ شام ساڑھے سات بجے اِس مقابلے کا آغام ہو گا ۔
اِسی بیچ کَل افغانستان ٹیم نے بنگلہ دیش ٹیم سے7؍ وکٹس سے کامیابی حاصل کر لی ۔ اِس کامیابی کے ساتھ افغانستانی ٹیم سُپر4؍ رائونڈ میں داخل ہو گئی ہے ۔
***** ***** *****
جالنہ ضلعے کے کانگریس پارٹی کے سینئر رہنما عنبڑ کے سابق صدر بلدیہ بھوا نی داس عرف بابو رائو بھالچندر کلکر نی کَل شام طویل علالت کے باعث چل بسے ۔ وہ78؍ برس کے تھے ۔ اُن کے جسدِ خاکی پر آج آخری رسو مات ادا کی جائے گی ۔ اُنھوں نے اپنی کار کر دگی میں کانگریس پارٹی کے مختلف عہدوں پر کام کیا ۔ عنبڑ نگر پریشد کے وہ کئی سال صدر تھے ۔ اِن کے انتقال پر سا بق وزیر اعلیٰ اشوک چو ہان ‘ رکن اسمبلی کیلاس گورنٹیال سمیت کئی معززین کے رنج و غم کا اظہار کیا ہے ۔
***** ***** *****
مرکزی حکو مت کی جانب سے ستمبر ماہ کو ’’قو می پوشن ماہ ‘‘ کے طور پر منا نے کی ہدایت دی گئی ہے ۔ اِس کے لیے مختلف پروگرامس پر پُر اثر عمل در آمد کر نے کی ہدایت ناندیڑ کے ضلع کلکٹر خوشحال سنگھ پر دیسی نے دی ہے ۔ ضلع کلکٹر آفس کے ہال میں قو می پوشن ماہ اِس عنوان پر کَل ہوئی میٹنگ سے وہ مخا طب تھے ۔
***** ***** *****
سمرتھ رامداس سوامی کے پیدائشی مقام جالنہ ضلعے کے جامبرتھ میں رام مندر کی 5؍ دھاتوں کی تاریخی مورتی کے چو ری کی وار دات کو 10؍ یوم ہو گئے ہیں ۔ تاہم ابھی تک سراغ نہیں ملا ہے ۔ اِس کی وجہ سے دیہی شہر یوں نے کَل راستے پر 2؍ گھنٹے دھر نا احتجا ج کیا ۔ اِس موقعے پر پولس سپرنٹنڈنٹ نے احتجا جیوں سے بات چیت کر کے مورتی چوری کو فوراً حراست میں لینے کا تیقن دیا ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے...
٭ دس یوم کے گنیش فیسٹیوَل کا آج سے آغاز ‘ کووِڈ پا بندیاں ختم ہونے کی وجہ سے عقیدتمندوں میں جوش
٭ ممبئی میں قلا بہ - باندرہ -سِبز کوریڈور میٹرو تھرڈ پرو جیکٹ کا پہلا ٹیسٹ
٭ ریاستی ٹرانسپورٹ کارپوریشن کے75؍ سال سے زیادہ سینئر شہر یوں کے لیے مفت سفر اسکیم پر
عمل در آمد شروع
٭ عثمان آباد کے شیو سینا کے سابق رکن پارلیمنٹ رویندر گائیکواڑ شِندے گروپ میں شامل
٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے ایک ہزار444؍ مریض ‘ مراٹھواڑہ میں23؍ متاثرین
٭ زرعی وزیر عبد الستار کے تعلیمی اِدارے میں12؍ اساتدہ کے پاس اسا تذہ اہلیتی ٹیسٹTET کے
بوگس صداقت نامے پائے گئے ‘ قانون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی رہنما رکن اسمبلی
امبا داس دانوے کا الزام
٭ جالنہ ضلع کے کانگریس کے سینئر رہنما عنبڑ کے سابق صدر بلدیہ بابو رائو کلکر نی طویل علا لت کے باعث چل بسے
اور
٭ ایشیائی کپ کر کٹ مقابلے میں آج بھارت کا ہانگ کانگ سے مقابلہ
علاقائی خبریں ختم ہوئیں
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 August 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात, कोविड निर्बंध हटल्यामुळे भक्तांमध्ये
उत्साह
· मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ प्रकल्पाची पहिली चाचणी
· राज्य परीवहन महामंडळाच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास
योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात
· उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ४४४ रुग्ण, मराठवाड्यात २३ बाधित
· कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक
पात्रता परिक्षेचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार
अंबादास दानवे यांचा आरोप
· जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव
कुलकर्णी यांचं दीर्घ आजारानं निधन
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा हाँगकाँग विरुद्ध सामना
सविस्तर बातम्या
दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. कोविड काळातल्या दोन वर्षांच्या
विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीनं साजरा करण्याचा उत्साह राज्यभरात दिसून येत
आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध
राज्य सरकारनं यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती
मंडपात आणल्या असून आज त्यांची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येईल. गणेशमूर्ती, आकर्षक
मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याची बाजारपेठेत रेलचेल दिसून
येत आहे. घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या
गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची
तयारी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या
आहेत. गणपतीला विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती मानलं जातं, असं सांगून राष्ट्रपतींनी, लोकांना सौहार्द राखण्यासाठी भगवान
गणेशाकडे प्रार्थना करायला सांगितलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपतींनी सर्व देशवासियांच्या
उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प
करू या. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न
करूया,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं
पालन करावं पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी केलं आहे.
****
मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची काल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात
आली. राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना
प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या
चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी
बोलत होते. हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या
प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या
विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
मागास भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य
करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडो रामा कंपनीच्या शिष्टमंडळानं
काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात
नव्यानं साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे
चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी
निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने
ही गुंतवणूक केली जाणार आहे.
****
मद्य विक्रीच्या दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या
आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे
यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली...
Byte…
त्याने दारुबंदीची जी पॉलिसी
केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं.
आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं ते २१ वरती आणलं. म्हणजे
तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून मला ते फील झालं. आणि
पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.
****
राज्य परीवहन -एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास
योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच
आहे. पात्र नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक
ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र,
राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, मोबाईल-आधारकार्ड
यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा
लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.
२६ ते २९ ऑगस्ट या गेल्या चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून
अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष
आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली.
****
राज्यात मतदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी आणि मतदारांनी आपल्या मतदानाच्या
कर्तव्याचं चोख पालन करावं यासाठी मुख्य निवडणूक
अधिकारी यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ ही गणेशात्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या विषयी उत्कृष्ट देखावा,
सजावट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीसं दिली जाणार आहेत. स्पर्धेचे हे दुसरे
वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटी सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही
या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत
मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्ती,
प्रसार-प्रचार करावा असं आयोगातर्फे सांगण्यात आलं.
****
शिवसेनेचे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटात
सहभागी झाले आहेत. गायकवाड यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन
आपली भूमिका स्पष्ट केली. गायकवाड यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यात आमदार ज्ञानराज
चौगुले यांच्या शिष्टाईची महत्त्वाची भूमिका असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
आमदार चौगुले यांनी गुवाहाटी इथं असतांना, याबाबतचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री शिंदे
यांनी गायकवाड यांना पक्षकार्य करत राहण्याची सूचना केली असून, त्यांना सन्मान पूर्वक
वागणूक मिळेल अशी ग्वाही दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. रामकिशन
दहिफळे यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स
प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी डॉ. दहिफळे
यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन सभागृहात
१२ सप्टेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या
राम मंदिरातल्या पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवस उलटूनही तपास
लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी काल मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं.
समर्थ रामदासांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत समर्थ
स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा
पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांशी संवाद
साधून मूर्ती चोर लवकरच पकडले जातील, असं सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९८ हजार ७३८ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात
आठ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख ४८ हजार २३७ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल
दोन हजार सहा रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३९ हजार ५९४ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १० हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सहा, लातूर चार, उस्मानाबाद- नांदेड- बीड- जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, आणि
हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक
पात्रता परिक्षा- टीईटीचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये काल पत्रकारांशी बोलतांना त्यांनी
मंत्री सत्तार यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. या प्रकरणात मंत्री सत्तार यांच्या
मुलींची नावे देखील आहेत तसंच त्यांच्या वेतनाची कागदपत्रं आपल्याकडे असल्याचा दावा
आमदार दानवे यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
****
जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीदास
उर्फ बाबूराव भालचंद्र कुलकर्णी यांचं काल सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८
वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत
काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम केलं, अंबड नगरपरिषदेचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते.
त्यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह
अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या
स्पर्धेतला भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात
वाजता हा सामना सुरु होईल.
दरम्यान, काल अफगाणिस्तान संघानं बांग्लादेश संघावर ७ गडी राखत विजय मिळवला.
या विजयासह अफगाणिस्तान संघानं सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे.
****
केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर महिना हा “राष्ट्रीय पोषण महिना”म्हणून साजरा करण्याच्या
सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या
सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या
दालनामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या विषयावर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
Tuesday, 30 August 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पूर्ण; सहा महिन्यात चाचण्या
वेगानं पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास.
·
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी प्रवास योजनेच्या
अंमलबजावणीला सुरवात.
·
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची सगळीकडे जय्यत तयारी;बाजारपेठा
फुलल्या.
आणि
·
जांबसमर्थ इथल्या मूर्ती चोरी प्रकरणी तपासातल्या दिरंगाईविरोधात
ग्रामस्थांचं आंदोलन.
****
मुंबईत
कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात आली. राज्य सरकार
सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य
देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं
पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात
कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात
कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
मागास
भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,
असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार
आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा
कंपनीचा सध्या नागपूर इथं वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे.
आता नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक
प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार
आहे.
****
मद्यविक्रीच्या
दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे
यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी
आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत
अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली –
त्याने दारुबंदीची जी पॉलिसी केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक
वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं. आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं
ते २१ वरती आणलं. म्हणजे तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून
मला ते फील झालं. आणि पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.
****
एसटी
महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला
सुरूवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. पात्र नागरिकांना
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी
दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर,
मोबाईल-आधारकार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी
या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.
****
उद्यापासून
सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाचे स्वागत करताना,
महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व
एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करू या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे.
सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं पालन करावं, पर्यावरणाची
हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान,
कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीने साजरा करण्याचा
उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर
गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध राज्य सरकारने यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी
आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून उद्या विधीवत त्यांची प्रतिस्थापना करण्यात
येईल. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याने
बाजारपेठा फुलल्या आहेत.
घरगुती
तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या गर्दीनं बाजारपेठा
फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची तयारी करण्यासाठी
महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
आज शहरातल्या विसर्जन विहीरींची पाहणी केली.
पैठण
इथं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागच्या वतीनं आज पथ संचलन करण्यात आलं.
****
समर्थ
रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातल्या
पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवस उलटूनही तपास लागलेला नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी आज मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं. समर्थ रामदासांचे
अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत, सातशे वर्षांपूर्वी
समर्थ स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा
पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांशी संवाद
साधून मूर्ती चोरांना लवकरच पकडले जाईल, असं सांगितलं.
****
कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं.
त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१२ कोटी २६ लाखांच्या
वर गेली आहे. त्यात १५ कोटी ५५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली
आहे. आज ६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली.
राज्यात
आज सकाळपासून १९ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना
दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८२ लाख ४३
हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
कीटकजन्य
आजाराबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत, सोलापूर जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा परिषदेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात लिम्फेटीक फायलेरीया अर्थात हत्तीपाय रोग कार्यशाळेत स्वामी
बोलत होते. कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्णशोध मोहीम, रुग्णांची
यादी तयार करणे, हत्तीरोगाबाबत जनजागृती करणं यावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षण, तपासणी आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर या कार्यशाळेत भर देण्यात आला. सोलापूर
जिल्हा हत्तीरोग निर्मुलनाच्या टप्प्यावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
औरंगाबादच्या
महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ.रामकिशन दहिफळे यांना पुण्याच्या
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर
झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी डॉ.दहिफळे यांना
हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम.जोशी सोशलिस्ट फांडेशन सभागृहात १२ सप्टेंबरला
हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...