आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 31 May 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
·
सबका साथ, सबका
विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान
भारत घडवायचा आहे- पंतप्रधान नरेन्द्र मोदी.
·
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद.
·
माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची सर्वोच्च
न्यायालयाकडून परवानगी.
·
सांस्कृतिक कार्य
संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा, नांदेडच्या
दत्ता भगत यांचा विजेत्यांमध्ये समावेश.
आणि
·
पुण्यश्लोक राजमाता
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यभरातून अभिवादन.
****
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि
सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा
संदेश पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज दिला. केंद्रात भाजप सरकारनं आठ वर्षं पूर्ण
केल्याच्या निमित्तानं देशभरात आयोजित केल्या गेलेल्या गरीब कल्याण संमेलन, या कार्यक्रमात
पंतप्रधानांनी शिमला इथून भाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या आठ वर्षांच्या काळात
तंत्रज्ञानाच्या मदतीनं भ्रष्टाचार कमी झाला,२०१४ पूर्वी देशात लूटमार आणि भ्रष्टाचाराची
चर्चा होत असे, आता सरकारी योजनांची चर्चा होते, असं पंतप्रधान म्हणाले. गरीबकल्याण
आणि सुशासनासाठी केलेल्या योजनांनी सरकारची व्याख्या बदलली असून, देशवासी आता सरकारकडे
सत्ताधीश म्हणून नाही तर एक सेवक म्हणून पाहतात, असंही ते म्हणाले. आजचा नवीन भारत
हा शत्रूच्या नजरेला नजर देणारा आणि त्याचवेळी गरजू राष्ट्रांना दबावरहित मदतीचा हात
पुढे करणाराही आहे असं पंतप्रधान म्हणाले. विविध क्षेत्रात होत असलेल्या विकासकामांची
माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान
निधीच्या अकराव्या हप्त्याचं हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातले केंद्रीय
राज्यमंत्री विविध ठिकाणांहून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरहून, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब
दानवे यांनी जालन्याहून तर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादहून
या कार्यक्रमाला हजेरी लावली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील
केंद्र सरकारनं समाजातल्या सर्वच घटकांसाठी १६२ प्रकारच्या कल्याणकारी योजना आणल्या
असून या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद इथं एक माहिती केंद्र सुरु करण्याची
गरज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं गरीब कल्याण संमेलनाचं आयोजन करण्यात
आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भारत झपाट्यानं प्रगतीकडे वाटचाल करत असून देश आर्थिकदृष्ट्या
प्रगत पाच देशांमध्ये सहभागी झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी आज राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद साधला. योजना केंद्राच्या
असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरून
आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी
व्यक्त केलं. प्रशासकीय यंत्रणेनं या योजना राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर नियोजनपूर्वक
लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागानं राज्यस्तरीय
संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्र पुरस्कृत
योजनांमध्ये राज्याचाही चाळीस टक्के वाटा आहे असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा तर २०२२-२३ साठी जल जीवन
मिशन योजनेकरता एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं.
केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ असं चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या
घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी देखील यावेळी लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला
तसंच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का हे जाणून घेतलं.
यावेळी औंरगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर
तालुक्यातल्या रायपूरचे बाळू राऊत, सिल्लोड तालुक्यातल्या भराडीचे कृष्णा महाजन आणि
फुलंब्रीच्या सुवर्णा भुईगळ यांनी योजनांच्या लाभाविषयी मनोगत व्यक्त केलं.
****
सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी
दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी आशा आहे, असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. देशमुख यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय कडून विशेष
तपास पथक अर्थात एसआयटीकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं एक
एप्रिलला फेटाळली होती.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात
येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
यांनी आज केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद
चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना भारतरत्न
पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लोककलाक्षेत्रातल्या
प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्यासाठीचा विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार आतांबर
शिराढोणकर आणि संध्या माने यांना मिळाला आहे.२०२०-२१ या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर
पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार नांदेडच्या दत्ता भगत यांना तर २०२१-२२ साठीचा हा
पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. या चार पुरस्कारांसह इतरही विविध पुरस्कारांची
घोषणा यावेळी करण्यात आली.
****
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज राज्यभरातून अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथल्या
त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या
वतीनं अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉक्टर भागवत कराड यांनी अहिल्यादेवी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं. परकीय आक्रमणामुळे पुसल्या गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणांचं संवर्धन
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं, असं डॉ.कराड यावेळी म्हणाले.
****
देशात नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण
अनुकूल बनलं असून, येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या किनारपट्टीच्या
काही भागात मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, आज
दुपारी नांदेड शहरातल्या काही भागांमध्ये सुमारे अर्धा तास वादळी पाऊस झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातही आज दुपारी
काही वेळ वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही वादळी
वारं आणि ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
वैजापूर तालुक्यातही आज दुपारी वादळी पाऊस झाला.
****
तृतीय पंथियांचा अभ्यास करुन त्यांचे
प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. तृतीय पंथीयांचा
अभ्यास करण्यासाठी आयोग दोन जणांना तीन लाख रुपयांची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती देणार
असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर इंथ प्रसारमाध्यमांशी
बोलताना दिली. या शिष्यवृत्तीसाठी १० जुनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
औरंगाबाद शहर पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान-११'
ही विशेष शोधमोहीम येत्या १ ते ३० जूनदरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत हरविलेल्या
किंवा अपहरण झालेल्या महिला आणि शून्य ते १८ या वयोगटातली हरवलेल्या किंवा पळवून नेलेल्या
मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पथकाची नेमणूक करण्यात
आली असून, शोध लागलेल्या मुलांना कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची
माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
केंद्रात भाजप सरकारची आठ पूर्ण झाल्यानिमित्त आज देशभरात गरीब कल्याण संमेलनाचं
आयोजन केलं गेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद
साधला जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमल्यातून दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून
विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा
हप्ता शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात
आला.प्रत्येक भारतवासियाचं जीवन समृद्ध करण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा आपला
संकल्प आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. २०१४ च्या पूर्वीचे
दिवस विसरू नका, ते दिवस लक्षात ठेवले तरच आज परिस्थितीत झालेला बदल लक्षात येईल, असं
पंतप्रधान म्हणाले.तेव्हा विविध योजनांचा पैसा सामान्य लोकांपर्यंत पोचत नसे, आज तो
लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केला जातो,
असं पंतप्रधान म्हणाले. केंद्राच्या विविध योजनांचा उल्लेख करत, सामान्य जनतेला विविध
सुविधा मिळून जीवनमान उंचावलं असल्याचं, तसंच देशाच्या सीमा आज सुरक्षित असल्याचं पंतप्रधान
म्हणाले.करोना काळात देशानं तत्काळ केलेल्या लसीकरण योजनेची प्रशंसा पंतप्रधानांनी
केली. डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा उल्लेख करत, आपल्या सरकारनं प्रशासन
यंत्रणेला सुधारून लोकाभिमुख केल्याचं पंतप्रधान म्हणाले. या योजनेमुळे पूर्वी दलालांच्या
हाती जाणारा पैसा आता लाभार्थ्यांच्या हातात पूर्णपणे पोचतो, असं ते म्हणाले. गरीब
नागरिकांना सशक्त करणं हे आपल्या सरकारचं प्राधान्याचं काम आहे, याचा पुनरुच्चार करत,
सगळ्याच भारतीय नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधानांनी
यावेळी सांगितलं.आपलं सरकार व्होट बँकेसाठी नाही तर जनतेसाठी काम करतं, सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास अशी आपली घोषणा
असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं.
विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या
संवादाचं औरंगाबाद इथं एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आलं.या
गरीब कल्याण संमेलन कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे
ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण उपस्थित होते.
केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विविध कल्याणकारी
योजनांबाबत प्रतिसाद मिळवण्यासाठी मुंबईमधून केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे राज्यमंत्री
कपिल पाटील यांनी जनतेशी संवाद साधला.
हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर इथे शतप्रतिशत
सशक्तिकरण या धोरणांतर्गत गरीब कल्याण संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.लाभार्थ्यांशी
थेट संवाद साधण्याचा या सोहळ्यात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थीत होते.
****
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना पुढची पाच
वर्षं सुरू ठेवण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आता ही योजना पंधराव्या वित्त
आयोगाच्या अवधीत, म्हणजे २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत सुरू राहील.या योजनेसाठी सुमारे
तेरा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.सूक्ष्म,लघु आणि
मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या योजनेतून बिगर शेती क्षेत्रात छोटे व्यवसाय उभारण्याला
मदत करून युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी आज राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद साधला. योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य
लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत,
असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रशासकीय यंत्रणेनं या योजना राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर
नियोजनपूर्वक लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान
व्यक्त केलं. केंद्रानं बंद केलेला पीक कर्जावरचा दोन टक्के व्याज परतावा परत सुरू
करावा ,हा परतावा बंद केल्यानं लाखो शेतकऱ्यांची अडचण होत आहे, असं सांगत, केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी यात लक्ष घालून हा व्याज परतावा सुरू करावा,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टर भागवत कराड यांना केलं.
****
राजामाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज सकाळी अभिवादन
केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक
कार्यमंत्री अमित देशमुख, महसूल राज्यमंत्री
अब्दुल सत्तार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
****
कोकणातल्या हापूस आंब्याला मराठवाड्यात मागणी
असते, त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या केशर आंब्याला कोकणात पसंती मिळावी, अशी अपेक्षा
फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी आज औरंगाबादमध्ये व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या, विकेल ते पिकेल-उत्पादक ते ग्राहक ,या योजनेतून, जिल्हा
नियोजन समितीनं सुरू केलेल्या केशर आंबा विक्री केंद्राचं भूमरे यांच्याहस्ते उद्घाटन झालं.त्यावेळी ते बोलत होते.
****
Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयं
आणि विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच
शिमल्याहून ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी
योजनेचा अकरावा हप्ता जारी करतील. त्याअंतर्गत दहा कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमधे
एकवीस हजार कोटी रुपये जमा केले जातील. सरकारची आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं
आजचा हा गरीब कल्याण संमेलन कार्यक्रम होत आहे.
****
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
बँकांनी युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करावं, आवश्यक असल्यास स्थानिक
पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते.
बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा, तसंच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय,
कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला बचतगटांना अधिक कर्ज द्यावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री
ठाकरे यांनी बँकांनी दिल्या आहेत.
****
देशातल्या पहिल्या ग्राहक
प्रबोधन केंद्राचं काल नाशिक मध्ये लोकार्पण करण्यात आलं. ग्राहकांची होणारी फसवणूक
टाळण्याच्या उद्देशानं त्यांचं प्रबोधन करण्यासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र
विभाग तसंच नाशिक महापालिका आणि नाशिक फर्स्ट या संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या
या केंद्राचं उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन
भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं आधार संलग्न
करून सुरळीत लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. या
योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल २०२२ पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात
येत आहे.
****
दक्षिण काश्मीरमधल्या अवंतीपोरा
इथे काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन जिहादी दहशतवादी
ठार झाले.
****
آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی خبریں' تاریخ : 31 مئی 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date : 31 May 2022
Time : 09.00 to 09.10 AM
آکاشوانی اَورنگ آ باد
علاقائی خبریں
تاریخ : ۳۱ مئی ۲۰۲۲ ء
وقت : صبح ۹.۰۰ سے ۹.۱۰ بجے
چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے ...
٭ آزادی کا امرت مہوتسو کے سلسلے میں مختلف 16؍ اسکیموں اور پروگرامس میں مستفدین کے ساتھ
وزیر اعظم نریندر مودی آج خطاب کریں گے
٭ کسانوں کو خریف ہنگام کے لیے فصل قرض تقسیم کرنے کی بینکوں کو ہدایت
٭ راجیہ سبھا انتخا بات کے لیے بھارتیہ جنتا پارٹی اور کانگریس کے امید واروں کی پر چہ نامزدگیاں داخل
٭ مرکزی پبلک سر وِس کمیشن کے شہری خد مات امتحانات کے نتائج ظاہر ‘ پہلے 4؍ مقام پر خواتین امید واروں نے بازی ماری
٭ ریاست میں کووِڈ وباء کے431؍ نئے مریضوں کا اندراج
اور
٭ ضمانت نرخ سے چنے کی خریدی کے لیے 18؍ جون تک توسیع
اب خبریں تفصیل سے...
ٌٌ آزادی کا امرت مہوتسو کے تحت وزیر اعظم نریندر مودی آج16؍ اسکیموں اور پروگرامس میں مستفدین کے ساتھ خطاب کریں گے ۔ قو می سطح پر شِملہ میں اِس کانفرنس کا اہتمام کیا گیا ہے ۔ وزیر اعظم ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے سے اِس میں شر کت کریں گے ۔ 21؍ ہزار کروڑسے زیادہ کسان سنمان فنڈ کے 11؍ ہفتوں کی تقسیم اِس موقعے پر مودی کے ہاتھوں کی جا ئے گی ۔ تمام ریاستوں کے صدر مقا مات ‘ ضلعے کے صدر مقا مات کے کسان تر قیاتی مراکز پر بھی اِس موقعے پر یہ پروگرام منعقد کیا جا رہا ہے ۔
اورنگ آ باد میں زرعی سائنسی مرکز پر ہونے والے اِس پروگرام میں مملکتی وزیر برائے خزا نہ ڈاکٹر بھاگوت کراڑ تاہم جالنہ ضلعے میں بد نا پور میں زرعی سائنسی مرکز پر ہونے والے پروگرام میں ریلوے مملکتی وزیر رائو صاحب دانوے شر کت کریں گے ۔
***** ***** *****
کووِڈ دور میں ایسے بچے جنھوں نے اپنے سر پرستوں کو کھو دیا اُنہیں اسکول اِسی طرح اعلیٰ تعلیم مکمل کرنے کے لیے تعا ون کیا جا ئے گا ۔ یہ بات وزیر اعظم نریندر مودی نے کہی ہے ۔ کووِڈ دور میں ایک یا دو نوں سر پرست کھو جا نے والے بچوں کو پی ایم کیئرس اسکیم کے ذریعے سے مدد کی جاتی ہے ۔ اِس اسکیم کے مستحقین سے وزیر اعظم نے کل ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے سے خطاب کیا ۔
***** ***** *****
جالنہ ضلعے میں 11؍ بچوں کو پی ایم کیئرس اسکیم کے تحت جمع ہوئی رقم اِس ضمن میں پا س بُک ‘ صحت کارڈ‘ وزیر اعظم کا مکتوب اور اسکیم کا معلو ماتی کِتابچہ وزیر صحت راجیش ٹو پے کے ہاتھوں تقسیم کیا گیا ۔ حکو مت ‘ عوامی نمائندے تمہارے ساتھ ہیں ‘ اِن الفاظ سے ٹو پے نے اُنھیں دِلاسہ دیا ۔ اِس پروگرام میں اسکول جانے والے طلباء کو اسکا لر شِپ کی رقم تقسیم کی گئی ہے ۔ اِسی طرح وزیر اعظم امدادی فنڈ کے پاس بُک اور آ یوشمان بھارت‘ وزیر اعظم جن آ روگیہ اسکیم کے تحت صحت کارڈس بچوں کو تقسیم کیے گئے ۔
***** ***** *****
اورنگ آباد میں ضلع کلکٹر سُنیل چو ہان کے ہاتھوں 26؍ بچوں کو ‘پر بھنی میں ضلع کلکٹر آنچل گوئل کے ہاتھوں 7؍ تاہم ناندیڑ ضلعے میں 9؍ بچوں کو ضلع کلکٹر ڈاکٹر وِپِن اِٹنکر کے ہاتھوں وزیر اعظم نے دیے صداقت نامے ‘ پی ایم کیئرس فار چِلڈرن اسکیم کے پاس بُک ‘ پی ایم صحت کارڈ اور آ یوشمان کارڈ کَل تقسیم کیے گئے ۔
***** ***** *****
موسمِ باراں قریب ہے ۔ کسانوں کو خریف ہنگام کے لیے جنگی پیما نے پر کسان فصل قرض تقسیم کیے جائیں ۔ ضرورت ہو تو مقامی سطح پر ضلع کلکٹر س کے تعا ون سے بینک میڑا وےمنعقد کیے جا ئیں ۔ ایسی ہدایت وزیر اعلیٰ اُدھوٹھا کرے نے دی ہے ۔ ریاستی سطح کی بینکرس کمیٹی کی میٹنگ سے کل وہ مخاطب تھے ۔
***** ***** *****
مرکزی حکو مت بینکوں کو فصل قرض سے2؍ فیصد سود واپس کرنے کا عمل دوبارہ شروع کریں ۔ ایسا مطالبہ وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے مرکزی وزیر زراعت نریندر سنہ تومر کو ایک مکتوب کے ذریعے سے کیا ہے ۔ سود واپسی بند کر نے کے مرکز کے فیصلے کے پس منظر میں وزیر اعلیٰ نے یہ مکتوب روانہ کیا ہے ۔ سو دواپسی بند ہونے کی وجہ سے ریاست کے70؍ لاکھ سے زیادہ کسانوں کا نقصان ہونے کا قیاس ہے ۔ قرض سود واپسی نہ ملنے کی وجہ سے ضلع کو آپریٹیو بینکس معاشی دشواری کاشکار ہو سکتے ہیں ۔ اسکا اثر بینکوں کے قرض تقسیم پر ہو گا یہ بات اُنھوں نے کہی ۔
***** ***** *****
راجیہ سبھا کے انتخا بات کے لیے بھارتیہ جنتا پارٹی کی جانب سے مہاراشٹر سے امید واری حاصل کرنے والے مرکزی وزیر پیوش گوئل ‘ انیل بونڈے اور دھننجئے مہا ڈِک نے کَل ممبئی میں وِدھان بھون میں اپنے پرچہ نامزدگیاں داخل کی ۔ اِس موقعے پر قانون سازاسمبلی کے حزب مخالف کے پارٹی رہنما دیویندر پھڑ نویس موجود تھے ۔
کانگریس امید وار عمران پر تاپ گڑھی نے کَل مراٹھی میں عہد لے کر اپنا پر چہ نامزدگی پُر کیا ۔ مہاراشٹر ریاستی کانگریس کمیٹی کے صدر نانا پٹو لے سمیت پارٹی کے دیگر رہنما اِس موقعے پر موجود تھے ۔
***** ***** ***** ***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** ***** ***** ***** *****
مرکزی پبلک سروس کمیشن کے شہری خد مات امتحا نات 2021ء کے نتائج کَل ظاہر کر دیے گئے ۔ اِس میں پہلے4؍ مقام پر خواتین امید واروں نے بازی ماری ۔ اُتر پر دیش میں بجنور میں شروتی شر ما نے تمام ملک میں پہلا مقام حاصل کیا ۔ اِس کے بعد انکِتا اگر وال ‘ گامنی سِنگلا ‘ ایشوَریا وَرما نے مقام حاصل کیا ۔ مرکزی حکو مت نے گروپA اور گروپB کے عہدوں کے لیے جملہ 685؍ امید واروں کے ناموں کی سفارش کمیشن نے کی ہے ۔
***** ***** *****
ریاست میں کَل کووِڈ وباء سے متاثرہ 431؍نئے مریض کی تصدیق ہوئی ۔ اسکی وجہ سے تمام ریاست میں کووِڈ متاثرین کی جملہ تعداد 78؍ لاکھ86؍ ہزار 375؍ ہو گئی ہے ۔ ریاست میں کَل اِس بیماری کی وجہ سے ایک بھی موت واقع نہیں ہوئی ۔ اب تک ریاست میں اِس وباء کی وجہ سے مرنے والے مریضوں کی جملہ تعداد ایک لاکھ47؍ ہزار859؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشا ریہ 87؍ فیصد ہے ۔ کَل 297؍ مریض کووِڈ سے شفایاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک 77؍ لاکھ35؍ ہزار385؍ مریض اِس وباء سے نجات حاصل کر چکے ہیں ۔ کووِڈ سے نجات کی شرح 98؍ اعشا ریہ09؍ فیصد ہو گئی ہے ۔ ریاست میں فی الحال 3؍ ہزار131؍ مریضوں کا علاج جاری ہیں۔
***** ***** *****
آج عالمی تمبا کو مخالف دِن منا یا جا رہا ہے۔ تمبا کو سے ہمارے ما حول کو خطرہ ہے یہ اِس سال کانعرہ ہے ۔
اِس نظر یہ سے عام شہر یوں میں مختلف طریقوںسے سما جی بیداری پیداہو ۔ اِس کےلیے قو می تمبا کو کنٹرول پروگرام کے تحت اورنگ آ باد میںگورنمنٹ ڈینٹل کالج و اسپتال کے طلباء آج صبح 10؍ بجے ریلوے اسٹیشن اور صبح ساڑھے گیارہ بجے سینٹرل بس اسٹینڈ پر ا سٹریٹ پلے کے ذریعے سے تمبا کو مخالف بیداری کریں گے ۔ کالج کے سماجی ڈینٹل شعبے کی جانب سے اِس موقع پر مسافروں کے دانتوں کی مفت جانچ کی جا ئے گی ۔
***** ***** *****
پیٹرول پمپ بند رہنے کی افواہ پر کَل اورنگ آ باد کے دیہی علاقوں اور شہری علاقوں کے پیٹرول پمپوں پر گاڑیوں میں ایندھن بھر نے کے لیے ہجوم ہو گیا تھا ۔ پیٹرول پمپ مالکان کی کسی قسم کی ہڑ تال نہیں ہے۔ صرف ایک یوم کے لیے پمپ مالکان پیٹرول کمپنیوں سے پیٹرول ڈیزل خریدی نہیں کریں گے ۔ پمپوں پر فراہم پیٹرول - ڈیزل کی فروخت جا ری رہے گی ۔ یہ بات اورنگ آباد پیٹرول پمپ ڈیلرس تنظیم کے سیکریٹری عقیل عباس نے کہی ہے ۔
***** ***** *****
اِنڈین قومی زرعی کو آپریٹیو مارکیٹِنگ تنظیم نافیڈ کے تحت کسانوں کو چنے کی خریدی کے لیے18؍ جون تک توسیع کی گئی ہے۔ اِس کی اطلاع ناندیڑ کے رکن پارلیمنٹ پر تا پ رائو پاٹل چکھلیکرنے جاری کر دہ بیان میں دی ہے ۔کسانوں کے مفاد کے نظریہ سے رکن پارلیمنٹ چِکھلیکر نے مرکزی وزیر پیوش گوئل ‘ مرکزی وزیر زراعت نریندر سنہ تو مر سے توسیع کا مطالبہ کیا تھا ۔ اِسکے لحاظ سے یہ توسیع کی گئی ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے...
٭ آزادی کا امرت مہوتسو کے سلسلے میں مختلف 16؍ اسکیموں اور پروگرامس میں مستفدین کے ساتھ
وزیر اعظم نریندر مودی آج خطاب کریں گے
٭ کسانوں کو خریف ہنگام کے لیے فصل قرض تقسیم کرنے کی بینکوں کو ہدایت
٭ راجیہ سبھا انتخا بات کے لیے بھارتیہ جنتا پارٹی اور کانگریس کے امید واروں کی پر چہ نامزدگیاں داخل
٭ مرکزی پبلک سر وِس کمیشن کے شہری خد مات امتحانات کے نتائج ظاہر ‘ پہلے 4؍ مقام پر خواتین امید واروں نے بازی ماری
٭ ریاست میں کووِڈ وباء کے431؍ نئے مریضوں کا اندراج
اور
٭ ضمانت نرخ سے چنے کی خریدی کے لیے 18؍ جون تک توسیع
علاقائی خبریں ختم ہوئی
٭٭٭٭٭
Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३१ मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध १६ योजना आणि कार्यक्रमांमधील
लाभार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार
· शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना
निर्देश
· पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा पुन्हा सुरु करण्याची
उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी
· राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज
दाखल
· केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, पहिल्या चारही
स्थानावर महिला उमेदवारांची बाजी
· राज्यात कोविड संसर्गाचे ४३१ नवे रुग्ण
आणि
· हमीभावानं हरभरा खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ
****
सविस्तर बातम्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ योजना
आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिमला इथं
या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार
आहेत. २१ हजार कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं वितरण यावेळी
मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान
विकास केंद्रांमध्ये देखील याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. औरंगाबादमध्ये
कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड तर
जालना जिल्ह्यात बदनापूरमधील कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे सहभागी होणार आहेत.
****
कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण
सहकार्य मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड काळात एक किंवा
दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते,
या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधला.
जालना जिल्ह्यात ११ बालकांना पीएम केअर योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, त्याबाबतचे
पासबुक, आरोग्य कार्ड, पंतप्रधानांचं पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सरकार, लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत,
अशा शब्दात टोपे यांनी मुलांना आश्वस्त केलं. याच कार्यक्रमात शाळेत जाणाऱ्या मुलांना
शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित
करण्यात आलं. औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते २६ बालकांना,
परभणीत जिल्हाधिकारी आंचल गगोयल यांच्या हस्ते सात तर नांदेड जिल्ह्यात ९ मुलांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते
पंतप्रधानांनी दिलेलं प्रमाणपत्र, पीएम केअर्स फॉर चिलड्रन योजनेचं पासबूक, पीएम आरोग्य
कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काल वाटप करण्यात आलं.
****
पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना
पीक कर्जाचं वाटप करावं, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन
यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. या बैठकीत राज्याच्या २०२२-२३
च्या २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यामध्ये
प्राधान्य क्षेत्रासाठी ५ लाख २२ हजार ६८ कोटी रुपयांच्या तर इतर क्षेत्रासाठीच्या
२१ लाख १० हजार ९३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना
कर्ज पुरवठा वाढवावा, तसंच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला
बचतगटांना अधिक कर्ज द्यावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या.
****
केंद्र शासनानं बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा पुन्हा सुरु करावा,
अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना
पत्राद्वारे केली आहे. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिलं आहे. व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातल्या ७० लाखापेक्षा
जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परतावा न मिळाल्यास जिल्हा सहकारी बँका
आर्थिक अडचणीत येऊन त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असं ते म्हणाले.
****
राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी काल मुंबईत विधान भवनात
उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित
होते.
मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याचा
आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित असून यापुढेही
समर्पित राहील, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी काल मराठीतून शपथ घेत आपला उमेदवारी
अर्ज भरला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे
अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
****
मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्र आणि राज्यांमधल्या
भाजप सरकारमधले सर्व मंत्री, खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील,
असं काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं. नवी दिल्लीतल्या भाजपच्या
मुख्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बूथपासून ते
राष्ट्रीय स्तरापर्यंत ७५ तासांचा जनजागरण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्व
स्तरातले लोकप्रतिनिधी भाग घेतील आणि गावांना भेट देतील. प्रत्येक दिवस हा शेतकरी,
महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी
समर्पित करण्यात आला आहे, असं सिंह यांनी यावेळी
सांगितलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल काल जाहीर केले.
यात पहिल्या चारही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशमधल्या
बिजनौर इथल्या श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यानंतर अंकिता
अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या
गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस आयोगानं केली
आहे.
****
राज्य मार्ग परीवहन महामंडळ- एसटी उद्या १ जून रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
करत असून या दिनाचं औचित्य साधत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 'शिवाई'
या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या पुण्यात होणार आहे,
अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल दिली. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचंही
उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाईच्या लोकार्पणानंतर बालगंधर्व
सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होणार असल्याचं मंत्री परब यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ४३१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८६ हजार ३७५ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने
एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५९ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.
काल २९७ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३५ हजार ३८५ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या तीन हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. “तंबाखूचा आपल्या वातावरणाला
धोका” असं यंदाचं
या दिनाचं घोषवाक्य आहे. त्याअनुषंगानं सामान्य नागरिकांमध्ये विविध प्रकारे समाज प्रबोधन
व्हावं, यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय
दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विद्यार्थी आज सकाळी दहा वाजता रेल्वे स्थानक आणि
सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक इथं पथनाट्याद्वारे तंबाखू विरोधी जनजागृती
करणार आहेत. महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या वतीनं यावेळी प्रवाशांची
मोफत दंत तपासणी करण्यात येणार आहे.
****
पेट्रोलपंप बंद राहण्याच्या अफवेनं काल औरंगाबादच्या ग्रामीण भागातल्या पेट्रोल
पंपावर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी
मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंप चालकांचा कोणताही संप नसून केवळ एका दिवसासाठी पंप
चालक पेट्रोल कंपन्याकडून पेट्रोल - डिझेल खरेदी करणार नाहीत. पंपावर उपलब्ध असलेल्या
पेट्रोल - डिझेलची विक्री सुरुच राहणार असल्याचं औरंगाबाद पेट्रोल पंप डिलर्स संघटनेचे
सचिव अखिल अब्बास यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून शेळीपालन, कोंबडी
पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिकाधिक भर द्यावा, असे निर्देश मानव
विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिले आहेत. नांदेड इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते काल
बोलत होते. अनुसूचित जाती -जमातीतल्या मुलींच्या शिक्षणावर मानव विकास कार्यक्रमात
विशेष भर देण्यात आला असून, त्यांना सायकल देण्यात येते तसंच या कार्यक्रमात पात्र
गरोदर महिलांना पहिल्या वेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जात असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा
खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी नियमित
सुरू असतांना अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे २३ मे पासून हरभरा खरेदी बंद झाल्यानं लाखो
क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून होता. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन खासदार चिखलीकर
यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे
मागणीचा पाठपुरावा केला होता, त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी
जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ही
पाझर तलावं ओसंडून वाहिल्यानं तलावाच्या भिंती वाहून गेल्या तर काही तलावांचे कालवे
फुटले आहेत, यामध्ये १४ तलावांचं अधिक नुकसान झालं असल्यानं त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती
करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरत असून, त्याच्या
निषेधार्थ काल नाशिक जिल्ह्यात प्रहार संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात
आलं. येवला इथं कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं आणि कांद्याचे गडगडणारे
भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात, नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत
देण्यात येणाऱ्या निधीमधून कळंब-ढोकी रोड ते ओम बालरुग्णालय ते बाबा नगर मधील सिमेंट
रस्ता आणि काँक्रीट नालीचं बांधकाम तसंच शहरातल्या दत्त नगर इथल्या सिमेंट रस्ता आणि
काँक्रीट नालीच्या कामांचं उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि माजी आमदार कैलास
पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आल। या कामांमुळे कळंब शहरातील वरील भागातील सांडपाण्याचा
निचरा आणि रहदारीसाठी योग्य रस्ता होणार असून यामुळे नागरिकांच्या सुविधेत भर पडणार
आहे.
****
नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या
पदवी आणि पदव्युत्तर ऊन्हाळी परिक्षा ऑफ लाईन
पद्धतीनं घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यापीठ
परिसरात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना- एन एस यु आय च्या वतीनं काल आक्रोश आंदोलन
करण्यात आलं. त्या नंतर कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
****
Monday, 30 May 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२२ सायंकाळी
६.१०
****
· कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य देण्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन.
· केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा परत सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांची मागणी.
· राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी
अर्ज दाखल.
आणि
· केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ परिक्षेचा निकाल जाहीर,
उत्तर प्रदेशची श्रुती शर्मा प्रथम.
****
कोविड
काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात
पूर्ण सहकार्य मिळेल, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना
पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते, या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधला. या मुलांना पंतप्रधानांनी आज साहाय्य
हस्तांतरित केलं. ज्या मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत, त्यांचा
भार कमी करण्यासाठी पीएम केअर्स माध्यमातून मुलांसाठीची ही योजना उपयुक्त ठरेल,
असं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी केलेल्या योगदानामुळे पीएम
केअर्स हा उपक्रम शक्य होऊ शकला, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यात ११ बालकांना पीएम केअर योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, त्याबाबतचे पासबुक, आरोग्य कार्ड, पंतप्रधानांचं पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सरकार, लोकप्रतिनिधी
तुमच्या सोबत आहेत, अशा शब्दात टोपे यांनी मुलांना आश्वस्त
केलं.
याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत
करण्यात आली, तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना
वितरित करण्यात आलं.
****
केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा परत सुरु करावा, अशी मागणी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्राद्वारे केली आहे.
व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिलं आहे. व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातल्या ७० लाखापेक्षा
जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परतावा न मिळाल्यास जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत येऊन त्याचा
प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असं ते म्हणाले. ही
व्याज परतावा योजना सुरु करण्यात जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीक कर्ज देणं हा उद्देश होता,
मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी शेतकरी हे ह्या बँकांवर अवलंबून असतात,
असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं.
दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देखील हा व्याज परतावा परत
सुरू करण्याबाबत ठराव करण्यात आला.
****
राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून
महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित
होते.
मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी
मिळाल्याचा आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित
असून यापुढेही समर्पित राहील, असं गोयल यांनी यावेळी
सांगितलं.
****
साखर कारखान्यांना साखरेबरोबर अल्कोहोल, इथेनॉल आणि वीज निर्मिती करावी लागणार असून,
यासाठीचं धोरण साखर कारखान्यांना आखावं
लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार
यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात बोधेगाव इथल्या केदारेश्वर
सहकारी साखर कारखान्याचं सुमननगर इथं नियोजित ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी आणि
इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन आज पवार यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक
आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी
दाखवण्यात आला. जास्तीचं
साखर उत्पादन न घेता इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे,
असं ते म्हणाले.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १६
योजना आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर
शिमला इथं या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान
दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार आहेत. २१ हजार
कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं
वितरण यावेळी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान विकास केंद्रांमध्ये देखील
याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
****
मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्र आणि राज्यांमधल्या भाजप सरकारमधले सर्व मंत्री, खासदार,
आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील, असं आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी
सांगितलं. नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बूथपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत ७५ तासांचा जनजागरण कार्यक्रम आयोजित
केला जाईल, ज्यामध्ये सर्वस्तरातले लोकप्रतिनिधी भाग घेतील
आणि गावांना भेट देतील. प्रत्येक दिवस हा शेतकरी, महिला,
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे,
असं सिंह यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले.
यात पहिल्या चारही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली
आहे. उत्तर प्रदेशमधल्या बिजनौर इथल्या श्रुती शर्मानं देशभरातून पहिला
क्रमांक पटकावला असून, त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला
आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या
नावाची शिफारस युपीएससीनं केली आहे.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन उद्या पाळण्यात येणार आहे.
“तंबाखूचा आपल्या वातावरणाला धोका” असं यंदाचं
या दिनाचं घोषवाक्य आहे. त्याअनुषंगानं सामान्य नागरिकांमध्ये विविध
प्रकारे समाज प्रबोधन व्हावं, यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रमातंर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालय आणि
रुग्णालयाचे विद्यार्थी उद्या ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता रेल्वेस्थानक आणि सकाळी साडेअकरा
वाजता मध्यवर्ती बसस्थानक इथं पथनाट्याद्वारे तंबाखू विरोधी जनजागृती करणार आहेत.
महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या वतीनं यावेळी प्रवाशांची
मोफत दंत तपासणी करण्यात येणार आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त धुळे तालुक्यातल्या निमगुळ इथं आज
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अंनिस तर्फे जनजागृती फलक लावून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं
सेवन करण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून शेळीपालन,
कोंबडी पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी
अधिकाधिक भर द्यावा, असे निर्देश मानव विकास आयुक्त नितीन पाटील
यांनी दिले आहेत. नांदेड इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते
आज बोलत होते. अनुसूचित जाती -जमातीतल्या
मुलींच्या शिक्षणावर मानव विकास कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला असून, त्यांना सायकल देण्यात येते तसंच या कार्यक्रमात पात्र गरोदर महिलांना
पहिल्या वेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हनुमानाचं
जन्मस्थान हे नाशिक जिल्ह्यातलं अंजनेरी मानलं जातं, मात्र किष्किंधा इथले
मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी मात्र नाशिक मध्ये येऊन किष्किंधा हेच
हनुमान जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे, त्यासाठी त्यांनी
रथयात्रा सुरू केली आहे. मात्र हनुमान जन्मस्थळाचा वाद निर्माण करत शांतता
बिघडवणाऱ्या स्वामी गोविंदानंद सरस्वती यांची अपप्रचार करणारी रथयात्रा थांबवावी,
अशी मागणी अंजनेरी येथील महंत आणि गावकऱ्यांनी
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे. तसंच आज नाशिक त्र्यंबक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं.
अंजनेरी गडाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असून, हनुमान जन्मस्थळाबाबत संत-महंतांनीही दाखले
दिलेले आहेत. अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असून, त्याचे पुरावेदेखील आहेत. त्यामुळे स्वामी गोविंदानंद यांनी उलटसुलट
विधाने करणे थांबवावे व त्यांची रथयात्राही थांबवावी, अशी
मागणी साधू-महंतांनी केली आहे.
****
नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
असल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
दिली आहे. नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी नियमित सुरू असतांना
अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे २३ मे पासून हरभरा खरेदी बंद झाल्यानं लाखो क्विंटल हरभरा
शेतकऱ्यांकडे पडून होता. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खासदार
चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री
नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे मागणीचा यशस्वी पाठपुरावा केला होता, त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली
आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...