Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 May
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मे २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· संसदेची
नवी वास्तू, ही आत्मनिर्भर भारताच्या भावनेचं प्रतिक असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भावना
· नवीन
संसद भवनाच्या अनावरणानिमित्त ७५ रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण
· लोकसभा-विधानसभा
निवडणुकांच्या पाश्वर्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक कायार्यालयाकडे इतर कामं न सोपवण्याचे
राज्य सरकारचे आदेश
· मुंबईतल्या
वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर
सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’,
नाव देण्याची तर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना
‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
· उस्मानाबाद
इथं आजपासून सहा दिवसीय नाट्य महोत्सव
· भारताचा
बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयनं मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावत रचला
इतिहास
आणि
· पावसामुळे
रद्द झालेला आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार
सविस्तर
बातम्या
विक्रमी वेळेत उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आलेली संसदेची
नवी वास्तू, ही आत्मनिर्भर भारताच्या भावनेचं प्रतिक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. नवनिर्मित संसद भवनाचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं,
त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री अमित शाह, डॉक्टर
जितेन्द्र सिंह, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंह ठाकुर, डॉक्टर मनसुख मांडविया,
प्रल्हाद जोशी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यावेळी उपस्थित होते. या
संसद भवनात भारताची गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्य अधिक समृद्ध होतील,
या भवनाच्या सदनांमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, सदस्य
आपलं काम अधिक उत्तमरीत्या करु शकतील, अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. ते
म्हणाले,
Byte…
यहां होनेवाला हर निर्णय आनेवाले सदीयों को सझाने
संवारने वाला है। यहां होनेवाला हर निर्णय आनेवाले पिढीयों को सशक्त करनेवाला है। यहां
होनेवाला हर निर्णय भारत के उज्वल भविष्य का आधार बनेगा। गरीब, दलित, पिछडा, आदिवासी,
दिव्यांग समाज के हर वंचित परिवार के सशक्तीकरण का, वंचितों को वरियता का रास्ता यही
से गुजर रहा है। इस नये संसद भवन की हर ईट, हर दिवार, इसका कण-कण गरीब के कल्याण के
लिये समर्पित है।
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसद भवन बांधण्याच्या
कार्यात सहभागी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ६५ हजार वर्ग मीटर क्षेत्रावर बांधण्यात
आलेलं हे संसद भवन, त्रिकोणी आकारात आहे. यामध्ये लोकसभा सभागृहात ८८८ तर राज्यसभा
सभागृहात ३८४ सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या संसद भवनाची कार्यालयं
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दृश्य -श्राव्य प्रणालीनं सुसज्ज आहेत.
त्यानंतर पंतप्रधानांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि अन्य
मंत्र्यांसह नव्या संसद भवनच्या लोकसभा सभागृहात प्रवेश केला. या ऐतिहासिक क्षणी त्यांनी
७५ रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण केलं. यावेळी राज्य सभा उपसभापती
हरिवंश यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु और उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदेशाचं
वाचन केलं.
नवीन संसद भवनाचं उद्घाटन तसंच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब
असून, या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं
भाग्य लाभलं असल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
****
दरम्यान, संसद भवनाच्या उद्घाटनाच्या समारंभावर प्रमुख
विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी वार्ताहरांनी बोलतांना, उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टीका केली. संसदेच्या
उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही, कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी
ते गेलेलं असू शकेल, असं ते म्हणाले. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी
कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
****
भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या
एकशे एकाव्या भागात ते काल बोलत होते.
शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम, या उपक्रमाचा
उल्लेख करत, त्यांनी यात सहभागी युवकांशी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यांत उच्चशिक्षण
घेणाऱ्या संस्थांमधले विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती, राहणीमान
यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत बाराशे युवकांनी देशाच्या २२ राज्यांना
भेटी दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
जल संरक्षण आणि संवर्धनाचं महत्व पंतप्रधानांनी मन की बात
मध्ये आधोरेखित केलं –
Byte ..
हम सब ने एक कहावत कइ बार सुनी होगी। बार बार सुनी
होगी। बिन पानी सब सून। बिना पानी जीवन पर संकट तो रहता ही है। व्यक्ती और देश का विकास
भी ठप्प पड जाता है। भविष्य की इसी चुनौती को देखते हुऐ आज देश के हर जिले में 75 अमृत
सरोवरों का निर्माण किया जा रहा है। हमारे अमृत सरोवर इसलिऐ विशेष है, क्योंकि ये आजादी
के अमृत काल में बन रेहे हैं। और इस में लोगों का अमृत प्रयास लगा हैं। आप को जान कर
अच्छा लगेगा की अब तक 50 हजार से ज्यादा अमृत सरोवरोंका निर्माण भी हो चुका हैं। यह
जल संरक्षण की दिशा में बहोत बडा कदम हैं।
जल संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अप, अर्थात नवउद्योगाबाबत
पंतप्रधानांनी माहिती दिली. नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम
करणाऱ्या, तसंच समाज जागृतीच्या मोहिमेत सहभागी असलेल्या युवक-युवतींचं त्यांनी कौतुक
केलं. कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असलेले नाशिक जिल्ह्यातले
माजी सैनिक शिवाजी शामराव डोळे यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती
रमेश धानुका यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थित
हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती आर.डी धानुका
यांची ४६ वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. धानुका यांचा मुख्य न्यायाधीश
म्हणून कार्यकाळ चार दिवसांचा असेल, ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
****
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे इतर
कामं सोपवू नयेत, असे आदेश काढण्यात आले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक राज्य सरकारनं
जारी केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुकांबाबतची कामं जिल्हास्तरावर
करण्यासाठी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अत्यंत महत्वाचं असून, इथं अन्य कामं
सोपवल्यास त्याचे विपरीत परिणाम निवडणूक विषयक कामांवर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात
कार्यालयानं सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळेवेळी आदेश देऊनही या आदेशांचं
पालन होत नसल्याचं आढळल्यानं, पुन्हा हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल नवीन संसद भवनात, सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.
मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती
पुतळ्याचं अनावरण काल मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. मॉरिशसचे राष्ट्रपती
पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राज्यात काल 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यात आला.
मुंबईत यानिमित्त सावरकर यांच्या जीवनावर आधारित
'शतजन्म शोधिताना' हा सांस्कृतिक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
उपस्थितीत घेण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतल्या
वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर
सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ , असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्रीयांनी
सांगितलं.
मुंबईत मंत्रालयात शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री
दीपक केसरकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्य
पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह हे अभियान राबवण्यात
येत आहे. राष्ट्रीय स्मारक पदयात्रेसह दिपोत्सवाचं आयोजनही मुंबईच्या सावरकर स्मारक
इथं करण्यात आलं.
औरंगाबाद शहरात समर्थ नगर इथल्या सावरकरांच्या पूर्णाकृती
पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. शहरात यानिमित्त दिपोत्सव,
मिरवणूक, गायन, वाचनाचे कार्यक्रम पार पडले.
उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जयोस्तु
प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं
पूजन करण्यात आलं. तसंच यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना
यावेळी गौरवण्यात आलं. तुळजापूर इथं सावरकर विचार मंच आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या
वतीनं शहरातील सावरकर चौकात सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
विभागात इतरत्रही सावरकर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
झाली.
****
मराठवाड्यात मोसंबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं
वेळीच उपाय योजना करण्याचं आवाहन जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे
प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी केलं आहे. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी इथं या केंद्रातर्फे
आयोजित जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. सीट्रस ग्रिनिंग
या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं या फळ पिकावर मंदऱ्हासाचं संकट निर्माण
झाल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातल्या बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात या रोगाचं प्रमाण
वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता
येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ
घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर
ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येतील. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी
करायची आहे, त्यांना येत्या पाच जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी
आवश्यक उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्याकरता १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना पाच जून रोजी दुपारी तीन वाजता
संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयातून गुणपत्रिका वितरित होणार आहे. तर जुलै-ऑगस्ट मध्ये
विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाईल.
****
उस्मानाबाद इथं आयोजित सहा दिवसीय नाट्य महोत्सवाचं उद्घाटन
अभिनेते उमेश जगताप यांच्या हस्ते आज होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ उपकेंद्राचा नाट्यशास्त्र आणि लोककला विभाग, तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य
परिषद यांच्यावतीनं, या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ उपकेंद्रातल्या
नाट्यगृहात संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत विविध १५ नाटकांचं सादरीकरण होणार आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयनं मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. क्वालालांपूर इथं झालेल्या या स्पर्धेच्या
अंतिम फेरीच्या लढतीत प्रणॉयनं चीनच्या वेंग हॉंग याँग याचा २१ - १९ , १३ - २१ , २१-
१८ असा पराभव केला. पुरूष एकेरीचं विजेतपद पटकवणारा प्रणॉय हा पहिला भारतीय ठरला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम
सामना काल पावसामुळे रद्द झाला, हा सामना आज होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी
क्रिकेट संकुलावर काल गुजरात टायटन्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज दरम्यान हा सामना होणार
होता. अहमदाबादमध्ये काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. आधी सामना उशीरा होणार
असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र पाऊस न थांबल्यानं सामना रद्द केल्याची अधिकृत घोषणा
करण्यात आली. आज याच ठिकाणी अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
उस्मानाबाद इथं काल दुपारी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. रोहिणी नक्षत्राच्या या पावसानं प्रचंड उष्णता सहन करणाऱ्या नागरिकांना
अल्पसा दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिऊर परिसरातही वाऱ्यासह जोरदार पाऊस
झाला.
हिंगोली शहरासह परिसरातही काल दुपारी पाऊस झाला. वादळी
वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या
पडल्यानं अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. अर्धा तास पडलेल्या पावसानं नागरिकांची
तारांबळ उडाली.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज जोरदार
वारा आणि वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला
आहे. या भागात आगामी तीन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
****
नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेससह, नांदेड - हजरत निजामुद्दीन
मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस, या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या मार्गात, आज आणि
उद्या दोन दिवस तात्पुरता बदल झाला आहे. जळगाव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर
रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे या गाड्या हिंगोली, अकोला, भुसावळ
मार्गे धावणार असल्याचं रेल्वे विभागान कळवलं आहे.
****
औरंगाबादमध्ये चिकलठाणा परिसरातल्या हिना नगर इथं काल आयुर्वेदिक
आरोग्य शिबिर घेण्यात आलं. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या आयुष
विभागाविषयी माहिती आणि यासंदर्भातल्या तपासण्यांविषयीची माहिती यावेळी देण्यात आली,
तसंच अनेक प्रकारच्या रुग्णांसाठी मार्गदर्शन आणि औषधी देण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment