Tuesday, 31 August 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.08.2021 रोजीचे कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.08.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.08.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी ब...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

                   Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** उपराष्‍ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते खादी इंडिया क्विज स्पर्धेचा शुभारंभ

** राज्य सरकार कोणत्याही सणांविरूद्ध नव्हे तर कोरोना विषाणूच्या विरोधात - मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

** मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस; अनेक मंडळात अतिवृष्टी

आणि

** टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूला रौप्य पदक तर शरदकुमारला कांस्यपदक

****

 

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज खादी इंडिया क्विज स्पर्धेचा शुभारंभ केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आजादी का अमृत महोत्सखवाअंतर्गत  या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी केलेल्या भाषणात नायडू यांनी, ही स्पर्धा आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची तसंच स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम योगदानाची आठवण करून देते, असं म्हटलं. नायडू यांनी यावेळी जनतेला खादीचा अधिकाधिक वापर करण्याचं आणि खादीच्या वापराचा प्रसार करण्याचं तसंच या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

****

राज्य सरकार कोणत्याही सणांविरूद्ध नाही तर कोरोना विषाणूच्या विरोधात असल्याचं, मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज ठाणे इथं एका प्राणवायू प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कोविडच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचं पालन करावंच लागेल, असं ठाकरे यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं देखील सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली असून राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या एका तोतया कर्मचाऱ्याला नाशिक जिल्ह्यात वणी पोलिसांनी अटक केली आहे. शाळा अनुदान मिळवून देण्यासाठी दीड लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. हा कर्मचारी दिंडोरी तालुक्यातला रहिवासी आहे. त्यानं आपल्या मोटारीवर अशोक स्तंभाचं शासकीय चित्र असलेलं स्टिकर लावलं असून झिरवाळ यांचं शीर्षपत्र - लेटर पॅडही त्याच्याकडे आहे. माजी आमदार कदम यांचं विधान सभा सदस्यत्वाचं ओळखपत्रही त्याच्याकडे आढळून आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

                                       ****

ओबीसी समाजाची, मागणारा समाज नव्हे तर देणारा समाज अशी ओळख निर्माण करण्यासाठी संघटन आवश्यक असल्याचं, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर इथं इतर मागासवर्गीयांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. गरज पडल्यास निवडणुका पुढे ढकलू मात्र ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु, असंही वडेट्टीवार म्हणाले. ओबीसींच्या या मेळाव्याला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 ****

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर विक्रेत्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिकेतल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला. दरम्यान, या प्रकरणातला हल्लेखोर विक्रेता अमरजित यादव याला ठाणे न्यायालयानं चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही. या निर्णयाच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादर इथं आणि मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. 

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त औरंगाबाद इथल्या कृष्णगुंज बासरी गुरुकुलाच्या वतीनं स्वरस्पर्श ऑनलाईन राष्ट्रीय बासरी वादन स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत औरंगाबादसह कर्नाटक, पंजाब, दिल्ली आदी राज्यांमधील बासरीवादकांनी सहभाग नोंदवला. युवा गटात बंगळुरूचा गौतम हेब्बर, शिशु गटात औरंगाबादचा अथर्व केचे तर प्रारंभिक गटात बीडच्या ओंकार देशपांडेने पहिला क्रमांक पटकावला

****

मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी मुसळधार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. काही नागरिकही घाटात अडकले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी याठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घाटातील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज पहाटे जोरदार हजेरी लावली या पावसामुळं काही भागातल्या नदी नाल्यांना मोठा पूर आला. आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी मंडळात १२१ पूर्णांक तीन दशांश मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे या भागातलं उसाचं पीक आडवं झालं. कपाशी, मक्याचं पीकही पाण्याखाली गेलं आहे. भोकरदन तालुक्यातही नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळं जैनपुर कोठारा इथल्या शनीमंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. जिल्ह्यातल्या मंठा, परतूर, अंबड, जालना तालुक्यातही दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील हादगाव, कासापुरी मंडळात आज पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजे पर्यंत जोरदार पाऊस झाला. हादगाव मंडळात १३० पूर्णांक ८ मिलीमीटर तर कासापुरी मंडळात १०६ पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतातील खरीपाची पिकं पाण्या खाली गेली तर हादगाव बुद्रुक मध्ये घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

पाथरी तालुक्यात कालही अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी गावनिहाय पंचनामे करून कार्यालयास सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांनी बजावले आहेत.

****

बीड जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातले नदी, नाले, ओढे, लघू - मध्यम प्रकल्प हे दुथडी भरून वाहत आहेत. परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

राज्यात येत्या तीन ते चार दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी स्पर्धेत भारताच्या मरिअप्पन थंगावेलू यानं रौप्य पदक जिंकलं. तर शरदकुमार यानं याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. त्यापूर्वी आज सकाळी नेमबाजीत भारताच्या सिंघराज अधाना यानं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नऊ पदकं जिंकली आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यानं पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

//**************//

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी मुसळधार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कुणीही औट्रम घाटामधून प्रवास करू नये असं आवाहन वाहतूक पोलीसांनी केलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शिऊर बंगला, नांदगाव मार्गे वळवण्यात आली आहे. तसंच दौलताबाद टी पॉईंट समोर बॅरिकेट लावून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कन्नड तालुक्यात पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्यानं या रस्त्याने मोठ्या संख्येने दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा येण्या -जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पिंपरखेड नादर इथल्या नदीला पूर आला असून, पिशोरच्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, या भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील मंगरूळ उच्च पातळी बंधारा शंभर टक्के भरल्यानं आज सकाळी बंधाऱ्याचे आठ दरवाजे उघडण्यात आले. यातून ८० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर राजाटाकळी बांधाऱ्यातूनही ७० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपत्रात सोडण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातले नदी, नाले, ओढे, लघू-मध्यम प्रकल्प हे दुथडी भरून वाहत आहेत. परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

****

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईच्या सखल भागात पाणी भरण्याची शक्यताही आहे. मात्र या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर किंवा रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

तीन महिलांसह नऊ जणांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय श्रीनीवास ओक आणि बी व्ही नागराथना, गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि बेला एम त्रिवेदी, सिक्कीम उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जितेंद्र कुमार माहेश्वरी, तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हिमा कोहली, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी टी रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम एम सुंदरेश, आणि माजी अतिरिक्त महाधिवक्ता पी एस नरसिंह, यांना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.       

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी आज दहीहांडी उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहांडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही. या निर्णयाच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहांडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादर इथं दहीहांडी फोडण्यात आली. मलबार हिल, वरळी, भांडुप, मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडली. निर्बंधांचं उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. 

****

शासनाच्या ब्रेक द चेनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता नसून, त्यानुसार सर्वांनी पालन करावं, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत. गणेश उत्सवाच्या अनुषंगानं काल पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी यावेळी बोलताना, सर्वांना कोविड नियमांचं पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक मध्ये टँकर ठेवून बायोडिझेलची खुलेआम विक्री करणाऱ्या साठ्यावर बाळापुर पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी रोख रकमेसह साठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आखाडा बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत भाटेगाव शिवारातल्या कॅनल जवळ एका धाब्यासमोर बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. याठिकाणाहून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, दोन जण फरार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात येत्या दोन आणि तीन सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानाच्या माध्यमातून, नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. या परिसरातल्या नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताच्या सिंघराज अधाना याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत आठ पदकं जिंकली आहेत.

****

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कुणीही औट्रम घाटामधून प्रवास करू नये असं आवाहन वाहतूक पोलीसांनी केलं आहे. कन्नड घाट बंद पडल्यामुळे औरंगाबाद मार्गे जाणाऱ्यांनी जळगावकडून, तर औरंगाबादकडे येणाऱ्यांनी नांदगावमार्गे येण्याचं आवाहन, महामार्ग सुरक्षा पथकानं केलं आहे.

कन्नड तालुक्यात पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्यानं या रस्त्याने मोठ्या संख्येने दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नागद परिसरातून मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना आणि नाल्यांना मोठा पूर आला आहे.

****

केंद़ीय मंत्री नारायण राणे यांना काल महाड न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग पोलिस ठाण्यात हजर व्हायचं होतं, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण उपस्थित राहू शकत नसल्याचं पत्र राणे यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सादर केलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि संघाच्या स्थापनेपासूनचे विश्वस्त संतु पुंजा आढाव, यांचं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या अनेक, राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांसमवेत ते दलित, उपेक्षित जणांच्या कल्याणार्थ प्रयत्नरत राहिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या बाबुर्डी घुमट गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठ आणि खाजगी भागीदारीतून स्वंयचलीत हवामान केंद्र बसवण्यात आलं आहे. फुले इरीगेशन शेड्युलर अॅप आणि ऑटोमॅटीक पंप कंन्ट्रोलर शेतकऱ्यांना देण्यात आलं असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर त्या दिवसाचं हवामान आणि त्यानुसार पिकांना किती वेळी पाणी द्यायचं याबाबत सूचना मिळणार आहे.

****

मराठवाड्यात काल १८४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

آکاشوانی اَورنگ آبادعلاقائی خبریں تاریخ : 31 ؍ اگست 2021 ؁وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 August 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:   ۳۱ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  اگست  ۲۰۲۱ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


سب سے پہلے اِس وقت کی سر خیاں...

٭ ٹو کیو پیرا  اولمپِک مقابلوں میں بھارتی کھلاڑیوں کی بہترین کار کر دگی جاری ‘کَل جیتے 5؍ تمغے

٭ نوجوانوں کے دلوں میں حب الوطنی کا جذبہ ابھارنے کی ضرورت  ‘  مرکزی وزیر ڈاکٹر بھاگوت کراڑ کا اظہار خیال 

٭ بھارت کی آزادی کے75؍ سال مکمل ہونے پر آکاشوانی اورنگ آ باد کاخبروں کا شعبہ شروع کر رہا ہے خصو صی نشر یاتی سلسلہ  ‘ ڈاکٹر کراڑ  اور  امتیاز جلیل نے کیا افتتاح

اور

٭ مہاراشٹر میں کورونا وائر س کی وجہ سے بند مندروں کو کھلوانے کے لیے بی جے پی نے کیا جگہ جگہ آندو لن ‘ عہدیداروں اور کار کنوں نے بڑی تعداد میں لیا حصہ 


 

اب خبریں تفصیل سے....

جا پان کی راجدھانی ٹو کیو میں جاری پیرا  او لمپِک مقابلوں میں بھارت نے کَل 5؍ تمغے جیتے ۔ اِن میں سو نے کے2؍ چاندی کے2؍ اور  ایک کانسے کا تمغہ شامل ہے۔ بھارت کی جا نب سے بھا لا پھینک کھلاڑی سُمِت اَنتل نے سو نے کا تمغہ جیتا ۔ سُمِت نے68.5؍ میٹر دوری تک بھا لا پھینک کر عالمی ریکارڈ بنا یا ۔ دوسری جانب بھارت کے ہی دیویندر جھجر یہ نے64.35؍ میٹر بھا لا پھینک کر چاندی کا تمغہ اور سُندر سنگھ گُر جر نے

62.58؍ میٹر بھا لا پھینک کر کانسے کے تمغے اپنے نام کیے۔اِس سے پہلے کَل صبح بھارت کی نشانے باز اَونی لیکھرا نے خواتین کے 10؍ میٹر ایئر رائفل شو ٹِنگ زمرے میں سونے کا تمغہ جیتا ۔ اِس کے ساتھ ہی اَونی لیکھرا  پیرا  اولمپِک مقابلوں میں بھارت کی جانب سے سو نے کا تمغہ جیتنے والی پہلی خا تون کھلاڑی بن گئی ہیں۔  اَونی نے فائنل رائو نڈ میں249.6 ؍ پوائنٹس حاصل کر تے ہوئے نیا ریکارڈ بنا یا۔ ساتھ ہی عالمی ریکارڈ کی برا بری بھی کی۔

دریں اثناء بھارتی کھلاڑیوں نے تھالی پھینک میں بھی اپنی بہترین کار کر دگی کا مظاہرہ جاری رکھا۔ بھارتی کھلاڑی یو گیش کھتُو نیا نے44.38؍ میٹر دوری تک تھالی پھینک کر چاندی کا تمغہ جیتا ۔ یو گیش کی جاریہ سیزن میں یہ سب سے بہترین کار کر دگی رہی ۔ بھارت کھلاڑیوں کی اِن کامیابیوں پر صدر جمہوریہ جناب رامناتھ کووِند ‘  وزیر اعظم نریندر مودی  اور  کھیلوں کے وزیر انو راگ ٹھاکر نے سبھی معذور کھلاڑیوں کو مبارکباد پیش کی۔

***** ***** ***** 

کئی ریاستوں اور مختلف تہذیوں سے سجے ملک بھارت کے نو جوانوں میں حب الوطنی کا جذبہ ابھار نے کی ضرورت ہے۔ اِس خیال کا اظہار مرکزی کا بینہ میں ما لیات کے مملکتی وزیر ڈاکٹر بھاگوت کراڑ نے کیا۔ ڈاکٹر کراڑ کے ہاتھوں کَل آکاشوانی  اور نگ آ باد کے خبروں کے شعبے کی جانب سے شروع کئے جا رہے خصوصی نشر یا تی سلسلے کا افتتاح عمل میں آ یا۔ 3؍ ستمبر سے شروع ہو رہے اِس نشر یاتی سلسلے میں بھارت کی جدو جہد آزادی  اور  آزادی کے بعد تر قی کی جانب پیش قدمی پر روشنی ڈالی جا ئے گی۔قریب 100؍ اقساط پر مشتمل یہ پروگرام ہفتے میں 2؍ دن  منگل  اور  جمعہ کی شام6؍ بجکر 35؍ منٹ پر آکاشوانی ‘ اورنگ آ باد سے نشر کیے جا ئیں  گے۔

یہ نشر یاتی سلسلہ ‘ بھارت کی آزادی کے75؍ سال مکمل ہو نے پر آزادی کا امرت مہتسو  پروگرام کے تحت شروع کیا جا رہا ہے۔

افتتاحی تقریب میں اورنگ آ باد کے رکن پارلیمنٹ سید امتیاز جلیل بطور مہمانِ خصو صی موجود تھے ۔ اِس موقعے پر اظہار خیال کر تے ہوئے امتیاز جلیل نے کہا کہ مختلف مذاہب ‘ ذات  ‘  زبانوں  اور تہذیبوں کے با وجود بھی حب الوطنی کے جذبے کے تحت بھارت ایک ہے او ریہ کثرت میں وحدت کی عمدہ مثال ہے ۔ انھوں نے امید ظاہر کی کہ ڈاکٹر بھاگوت کراڑ کو مرکزی کا بینہ میں شامل کیے جانے کے بعد اب اورنگ آ باد کی تر قی کی راہیں ہموار ہو ں گی ۔

اِس موقعے پر آکاشوانی اورنگ آ باد کے سبکدوش ہو چکے نیوز ریڈرس اَویناش پائی گُڑے  ‘  لکشمن پوار   اور  مقیم خان کا خیر مقدم کیا گیا  اور  اُن کی خد مات کو یاد کیا گیا۔ 

واضح رہے کہ آکاشوانی  اورنگ آباد کا خبروں کا شعبہ کَل ایک ستمبر کو41؍ ویں سال میں قدم رکھنے جا رہا ہے۔ اِس منا سبت سے شعبے کی جانب سے ایک E   کِتابچہ جاری کیا گیا۔ جِس کا اجراء بھی امتیاز جلیل اور بھاگوت کراڑ نے کیا۔ اِس E کِتابچے میں مدیروں ‘ نیوز ریڈرس اور  سامعین نے اپنی40؍ سال کی یادوں کو قلمبند کیا ہے۔ 

***** ***** ***** 

ریاست کے شہر یوں کو کمپیو ٹرائزڈ 7/12؍ کی پہلی پرنٹ سیدھے  اُن کے گھروں تک پہنچا نے کا اہم فیصلہ  محکمہ محصول نے کیا ہے۔ آنیوالے 2؍ اکتوبر سے گاندھی جینتی کی منا سبت سے اِس پر عمل آوری شروع ہو گی۔ محصول کے ریاستی وزیر با لا صاحب تھورات نے یہ اطلاع دی۔

***** ***** ***** 

ایوت محل کی رکن پارلیمنٹ بھائونا گَولی کے6؍ اِداروں پر کَل انفورسمنٹ ڈائریکٹوریٹED کی ٹیم نے چھا پے مارے ۔ اِس دوران ED  کے40؍اہلکاروں  اور سینٹرل ریزرو فورس کے25؍ کمانڈوز پر مشتمل عملے نے مختلف مقا مات پر ایک ساتھ کار وائی کی  اور  اِن ٹھکا نوں کو سیل کر دیا۔ بھائو نا گَولی کے ٹھکا نوں  پر صبح11؍ بجے شروع ہو ئی یہ کار وائی شام تک جا ری رہی۔

اِس بیچ اِس کار وائی پر تبصرہ کر تے ہوئے بھائو نا گَولی نے کہا کہ اُنھیں کار وائی سے متعلقED   نے کوئی نوٹس نہیں بھیجا تھا۔ گَولی نے اِس کار وائی کو اپنے خلاف سازش قرار دیا۔

 

***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 

مہاراشٹر میں کَل ایک دِن میں3,741؍ نئے کورونا پازیٹیو مریض پائے گئے ۔ اِس انکشاف کے بعد ریاست میں اب تک کورونا پازیٹیو ہوئے مریضوں کی درج شدہ مجموعی تعداد بڑھ کر64؍ لاکھ60؍ ہزار

680؍ ہوگئی ہے۔وہیں کَل ریاست بھر میں52؍ کورونا مریضوں نے علاج کے دوران دم توڑ دیا ۔ اِس وباء کی شروعات کے بعد سے اب تک مہاراشٹر میں جان گنوا نے والوں کی کُل تعداد ایک لاکھ37؍ ہزار209؍ ہو گئی ہے۔ ریاستی شرح اموات لگ بھگ 2؍ فیصد رہی ۔

دوسری جانب کَل دِن بھر میں ریاست میں4,696؍ افراد کو  کورونا وائرس سے صحت یاب قرار دے کر اسپتالوں سے رخصت کیا گیا۔ اِس طرح مہاراشٹر میں کورونا وائر س سے ٹھیک ہونے والو ںکی مجموعی تعداد 62؍ لاکھ68؍ ہزار112؍ تک جا پہنچی ہے۔ کووِڈ19؍ سے صحت یابی کا ریاستی تنا سب97؍ فیصد رہا۔

 فی الحال مہاراشٹر میں کورونا پازیٹیو مریضوں کی درج شدہ مجموعی تعداد 51؍ ہزار834؍ ہے اور  اِن سبھی کا علاج جاری ہے۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل ایک دِن میں184؍ نئے کورونا پازیٹیو مریضوں کا انکشاف ہوا  اور  4 ؍ افراد کی موت درج کی گئی۔ مر نے والوں میں اورنگ آ باد ‘ لاتور ‘ عثمان آ باد  اور بیڑ ضلعوں سے ایک -   ایک مریض شامل ہے۔ بیڑ ضلعے میں کَل مراٹھواڑہ میں سب سے زیادہ74؍ نئے کورونا پازیٹیو مریض پائے گئے۔

اورنگ آباد ضلعے میں کَل ایک دِن میں29؍ نئے مریضوں کا اضا فہ درج کیا گیا۔ اِس تعداد میں 11؍ مریض اورنگ آ باد کی شہری حدود سے ہیں جبکہ  18؍ مریضوں کا تعلق اورنگ آ باد ضلعے کے دیہی علاقوں سے ہے ۔ اِسی طرح لاتور ضلعے میں 8؍  اور  ناندیڑ اور ہنگولی ضلعوں میں ایک- ایک شخص کو کَل کورونا پازیٹیو پا یا گیا۔ جالنہ اور پر بھنی ضلعوں میں کَل کورونا وائرس کا ایک بھی مریض نہیں پا یا گیا۔

***** ***** ***** 

ریاست میں کورونا وائرس کی وجہ سے بند  مندروں کو کھلوا نے کے لیے بھارتیہ جنتاپارٹی کی جانب سے کَل مہاراشٹر کے مختلف مقامات پر آندو لن کیے گئے۔ اورنگ آ باد ضلعے میں ریاستی سیکریٹری  اور  رکن اسمبلی اتُل ساوے  اور  نائب صدر بسو راج منگروڑے کی قیادت میں احتجاج کیا گیا۔ جالنہ میں شہر صدر راجیش رائوت نے آندو لن کی قیادت کی۔

پر بھنی میںبی جے پی کی خواتین اکائی کی جانب سے مختلف مندروں کے سامنے گھنٹے بجا ئے گئے ۔ ناندیڑ میں ضلع صدر پر وین سالے نے جبکہ عثمان آباد ضلعے میں تلجا پور کے رکن اسمبلی رانا جگجیت سنگھ پاٹل نے مندروں کو کھلو انے کے لیے کئے گئے احتجاج کی قیادت کی۔

***** ***** ***** 

اورنگ آباد ضلعے کے سِلوڑ  اور  سوئیگائوںتعلقوں میں2؍ اور3؍ ستمبر کو بڑے پیما نے پر لوگوں کو  کورونا وائرس سے بچائو کے مفت ٹیکے دئے جائیں گے۔ سِلوڑ  اور  سوئیگائوں تعلقوں کے عوام سے بڑی تعداد میں اِس مہم میں شامل ہونے کی اپیل اورنگ آ باد کے ضلع کلکٹر سنیل چو ہان نے کی ہے۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ کے بیشتر مقامات پر کَل موسلا دھار بارش ہوئی۔ ناندیڑ ضلعے کے لو ہا تعلقے کے ما لا کو لی محصول ڈویژن میں کَل دو پہربادل پھٹ پڑے  اور  موسلا دھار بارش شروع ہو گئی۔ اِس دوران ندی نالوں میں طغیا نی آ گئی ۔ اِس تیز بارش کے دوران سا وَر گائوں میں پا نند نالے میںآئی طغیا نی میں ایک 52؍ سالہ خا تون بہہ گئیں۔ بعد میں اُن کی نعش بر آمد ہوئی۔اِس بہائو میں بہہ گئی دوسری خاتون کی تلاش جاری ہے۔ ناندیڑ ضلعے کے بھو کر تعلقے میں بھی کَل مو سلا دھار بارش درج کی گئی ۔ پر بھنی ضلعے کے پا لم تعلقے میں بھی کَل ہو ئی مو سلا دھار بارش سے ندیوں میں طغیا نی آ گئی ہے۔لینڈی ندی کے پُل کے او پر سے بہہ رہے پانی میں ایک بیل گاڑی بہہ گئی۔ شیلوپینڈوی ندی میں آئے سیلاب کا پانی شیلو گائوں میں گُھس گیا۔

عثمان آباد شہر او ر تلجاپور تعلقے میں پر سوں رات سے تیز بارش کا سلسلہ جاری ہے ۔ اورنگ آ باد شہر میں بھی آج صبح سے مطلع ابر آلود تھا   جس کے بعد اب بارش شروع ہو گئی ہے ۔بیڑ ضلعے میں بھی کَل رات بھر  موسلا دھار بارش ہوتی رہی۔

اِس بیچ اگلے 2؍ دنوں میں کو کن مراٹھواڑہ  اور  وِدربھ کے بیشتر مقامات پر اور وسطی مہاراشٹر کے مقامات پر بارش ہونے کی پیشن گوئی پونے محکمہ موسمیات نے کی ہے۔

***** ***** ***** 

اورآخر میں اہم خبریں ایک بار پھر سن لیجیے ...

٭ ٹو کیو پیرا  اولمپِک مقابلوںمیں بھارتی کھلاڑیوں کی بہترین کار کر دگی جاری ‘کَل جیتے 5؍ تمغے

٭ نوجوانوں کے دلوں میں حب الوطنی کا جذبہ ابھارنے کی ضرورت  ‘  مرکزی وزیر ڈاکٹر بھاگوت کراڑ کا اظہار خیال 

٭ بھارت کی آزادی کے75؍ سال مکمل ہونے پر آکاشوانی اورنگ آ باد کاخبروں کا شعبہ شروع کر رہا ہے خصو صی نشر یاتی سلسلہ  ‘ ڈاکٹر کراڑ  اور  امتیاز جلیل نے کیا افتتاح

اور

٭ مہاراشٹر میں کورونا وائر س کی وجہ سے بند مندروں کو کھلوانے کے لیے بی جے پی نے کیا جگہ جگہ آندو لن ‘ عہدیداروں اور کار کنوں نے بڑی تعداد میں لیا حصہ


اِس کے ساتھ ہی آکاشوانی اورنگ آباد سے علاقائی خبریں ختم ہوئیں۔

خبروں کا یہ بُلیٹِن آکاشوانی اورنگ آباد کے یو ٹیوب چینل  آکاشوانی سمارچار اورنگ آ باد  یا 

 Aurangabad AIR News  پر دوبارہ کسی بھی وقت سنا جا سکتا ہے۔

٭٭٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آبادعلاقائی خبریں تاریخ : 31 ؍ اگست 2021 ؁وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –31 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·       टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक

·       देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

·       संगणकीकृत सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराला घरपोहोच देण्याचा महसूल विभागाचा निर्णय

·       यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या सहा संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

·      राज्यात तीन हजार ७४१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर १८४ बाधि

·       देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचं ठिकठिकाणी आंदोलन

आणि

·      मराठवाड्यात अनेक भागात पाऊस

****

जपानमधे टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं.

सुमीत अंतिल याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. त्याने ६८ पूर्णांक पाच मीटर लांब भाला फेकून जागतिक विक्रमाची नोंद केली. देवेंद्र झाझरिया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक, तर सुंदरसिंग गुर्जर यानं ६२ पूर्णांक ५८ मीटर लांब भाला फेकत, कांस्यपदक जिंकलं.

त्यापूर्वी काल सकाळी नेमबाज अवनी लेखरा हिनं महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत, ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवनी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी, भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अवनीनं अंतिम फेरीत २४९ पूर्णांक सहा गुण मिळवत, पॅरालिम्पिक स्पर्धेतला नवा विक्रमही रचला, याशिवाय तिनं विश्वविक्रमाचीही बरोबरी केली.

पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियानं ४४ पूर्णांक ३८ मीटर लांब थाळी फेकत, रौप्य पदक जिंकलं. योगेशची ही या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व दिव्यांग खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

****

अनेक राज्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन डॉ कराड यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले....

 

राष्ट्रप्रेम आपणाला आणखी जगवलं पाहिजे. युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम जगवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं हा अमृत महोत्सव महत्वाचा ठरेल. येणाऱ्या काही वर्षामध्ये देश एक विकसित देश बनून या जगाचं नेतृत्व करणारा हा भारत देश असेल याची मला पुर्णपणे खात्री आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग भरारी चालू आहे. आणि याच्या मध्ये प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. एक कदम प्रत्येकानं पुढे जर टाकला तर आपण १३० कोटी पाऊल पुढे जाऊ

 

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही, राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं, ते यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांची विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाला उद्या एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खासदार जलील यांच्या हस्ते काल झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक, श्रोते तसंच समीक्षकांच्या आठवणी, या ई पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

****

राज्यात नागरीकांना संगणकीकृत सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराला घरपोहोच देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. येत्या दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आगामी काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या सहा संस्थांवर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं काल छापे टाकले. यासाठी ईडीचे ४० कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे २५ कमांडो यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सर्व ठिकाणं सील केली. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुरू झालेली चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान, या कारवाईबाबत ईडीची कुठलीही नोटीस आली नसून, आपल्याविरोधात हे षड्यंत्र असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल तीन हजार ७४१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ६० हजार ६८० झाली आहे. काल ५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार २०९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ६९६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १८४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात ७४, औरंगाबाद २९, लातूर आठ, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जालना आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष देत, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या समस्येवर तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरीत करण्याच्या मागणीसाठी, संघर्ष एस. टी कामगार युनियनच्या वतीनं, काल औरंगबाद विभागीय आगारासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

राज्यभरात बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात काल अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. परभणीत भाजप महिला आघाडीच्या वतीनं, विविध मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. नांदेड इथं महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या तर उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात टाळमृदंग आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीक कर्जासाठी जाचक अटी लावल्या जात असल्याच्या निषेधार्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, काल ठिय्या आंदोलन केलं. फायनान्स स्केल प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात यावं, इतर बँकांचे बोजा असलेले सातबारा नाकारण्यात येऊ नयेत, कर्ज माफीतील पात्र शेतकरी यांना प्राधान्यानं कर्ज पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत.

****


मराठवाड्यात काल अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी महसुल मंडळात काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. सावरगाव इथल्या पाणंद नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं ५२ वर्षीय मनकर्नाबाई दगडगावे यांचा मृत्यू झाला, तर, पार्वतीबाई दगडगावे यांचा शोध सुरु आहे. भोकर तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. लेंडी नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात एक बैलगाडी वाहून गेली.

शेलू पेंडू नदी ला महापूर आल्यानं शेलू गावात पुराचं पाणी शिरलं आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे शेतातील पीकं वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पालम - ताडकळस मार्ग बंद पडला, तसंच लेंडी नदीच्या पुरामुळे बारा गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे.

उस्मानाबाद शहरासह परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात परवा रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. काल सूर्यदर्शनही झालं नाही.

औरंगाबाद शहर परिसरातही काल सकाळी पाऊस झाला, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं.

बीड जिल्ह्यातही काल रात्रभर पावसाची संततधार सुरु होती.

****

हवामान - येत्या दोन दिवसात कोकण,  मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.  या काळात  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात  तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Monday, 30 August 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2021 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.08.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून व्यक्त; आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेचं उद्घाटन

** बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलन

आणि

** टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखराला १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक

****

वेगवेगळे राज्य आणि विविधतेने नटलेल्या भारतात युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज डॉ कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचं स्मरण करतच भविष्यात वाटचाल करण्याची आवश्यकता कराड यांनी नमूद केली. ते म्हणाले....

राष्ट्रप्रेम आपणाला आणखी जगवलं पाहिजे. युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम जगवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं हा अमृत महोत्सव महत्वाचा ठरेल. येणाऱ्या काही वर्षामध्ये देश एक विकसित देश बनून या जगाचं नेतृत्व करणारा हा भारत देश असेल याची मला पुर्णपणे खात्री आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग भरारी चालू आहे. आणि याच्या मध्ये प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. एक कदम जर प्रत्येकानं पुढे जर टाकला तर आपण १३० कोटी पाऊल पुढे जाऊ.

 

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं जलील यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

 

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांची विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

 

दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाचा परवा एक सप्टेंबर रोजी ४१ वा वर्धापन दिन आहे, यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खा. जलील यांच्या हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक, श्रोते तसंच समीक्षक यांनी सांगितलेल्या आठवणी, या ई पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

****

राज्यभरात बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात आज अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख, आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक इथं, बुलडाणा जिल्ह्यात, संतनगरी शेगाव इथं भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात,  भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं परभणी इथं ही विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

जालना जिल्ह्यातही आज भाजपानं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन केलं. जालना इथं शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात घनसावंगी, मंठा, जाफराबाद तालुक्यातही मंदिरांसमोरही आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद जिल्ह्यातही चौदा ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद शहरात गजानन मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं.

****

राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरीत करण्याच्या मागणीसाठी संघर्ष एस. टी कामगार युनियनच्या वतीनं आज औरंगाबाद विभागीय आगारासमोर निदर्शनं करण्यात आली. औद्योगिक न्यायालयानं जुलै महिन्याचं वेतन तात्काळ करण्याचे आदेश १४ ऑगस्टला देवुनही आजपर्यंत वेतन झालं नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलं

****

जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचं आज कल्याण इथं राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती शिल्प, दिल्लीत गांधीजींचं शिल्प, गुजरातमध्ये दांडी यात्रा शिल्प, यासह अनेक शिल्पं साठे यांनी उभारली आहेत. शिल्प तयार करण्याबाबत त्यांनी लिहिलेलं ‘आकार’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. साठे यांनी डोंबिवली इथं एक शिल्पालय उभारलं असून त्यात त्यांची शिल्पं ठेवण्यात आली आहेत.

****

जपानमध्ये टोक्यो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिनं महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवनी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अवनीनं अंतिम फेरीत २४९ पूर्णांक ६ गुण मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेतला नवा विक्रमही रचला, याशिवाय तिनं विश्वविक्रमाचीही बरोबरी केली.

पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियानं ४४ पूर्णांक ३८ मीटर लांब थाळी फेकत रौप्य पदक जिंकलं. योगेशची ही या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी ठरली. पुरुषांच्या भालाफेकीत भारतानं दोन पदकं जिंकली. देवेंद्र झाझरिया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक तर सुंदरसिंग गुर्जर यानं ६२ पूर्णांक ५८ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक जिंकलं.

****

जालना जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ४९८ रुग्ण या आजारातून बरे झाले असून सध्या बाधित असलेल्या १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात येत्या २ आणि ३ सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

//********//