आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 30 April 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी
साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
** कोविडच्या सौम्य लक्षणांसाठी केंद्र सरकारच्या शास्त्रीय
सल्लागार कार्यालयाकडून उपाय योजना जारी
** माजी महाधिवक्ता सोली सोराबजी, ज्येष्ठ पत्रकार रोहित
सरदाना यांचं निधन
** जालना जिल्ह्यात १० तर औरंगाबाद जिल्ह्यात आज १४ कोविडग्रस्तांचा
मृत्यू
आणि
** राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री
सहायता निधीस दोन कोटी रुपये मदत
****
कोविडची सौम्य लक्षणं असल्यास घरीच योग्य खबरदारी घेऊन
संसर्गावर मात करणं सहज शक्य असल्याचं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या
शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून कोविड व्यवस्थापनाबाबत उपाय योजना जारी केल्या आहेत,
त्यात सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी या कार्यालयानं आवश्यक उपाय
सांगितले आहेत. कोविडची प्राथमिक लक्षणं आढळताच, रुग्णांनी विलगीकरण करून घ्यावं, आराम
करावा, पाणी तसंच पेय पदार्थांचं सेवन करत राहावं, खोलीमध्ये हवा खेळती ठेवावी, रक्तातलं
प्राणवायूचं प्रमाण तसंच शरीराचं तापमान सतत तपासत राहावं, मात्र प्राणवायूचं प्रमाण
९२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास, किंवा ताप उतरत नसल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
असं यात म्हटलं आहे.
****
देशाचे माजी महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं
आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. सोराबजी यांनी अनेक प्रतिष्ठीत
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं होतं. १९९७
साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं
होतं.
****
आजतक या हिंदी वृत्तवाहिनीचे
ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं दिल्ली
इथं निधन झालं. ते ४२ वर्षांचे होते. गेल्या २४ तारखेपासून ते कोविड संसर्गानं आजारी
होते. उपचारादरम्यान, आज त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन, त्यात त्यांचं निधन झालं.
२०१८ साली सरदाना यांना पत्रकारितेतल्या मानाच्या गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने
सन्मानित करण्यात आलं होतं.
सोराबजी, तसंच सरदाना यांच्या
निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मिस्टर इंडिया किताब पटकवलेले
शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड यांचं आज बडोद्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ३४ वर्षांचे
होते. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड हे नुकतेच नवी मुंबईतून
बडोदा इथं स्थायिक झाले होते. मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, तसंच महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग
असोसिएशनने लाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
उस्मानाबाद इथंले ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार तिलोकचंद
बेदमुथा यांचं हैदराबाद इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने
त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही
त्यांनी काम केलं होतं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त
आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा
या शासकीय निवासस्थानी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या
माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला असून समाजाला एकसंध ठेवण्याचे त्यांचे
विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत असं ठाकरे यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही तुकडोजी महाराजांना अभिवादन करताना, स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्योतर
काळात त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी
संतोष राऊत यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराजांना आदरांजली वाहिली.
****
नांदेड इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक
प्रमोद शेवाळे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी
संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १० कोविड बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ७५८
झाली आहे. दरम्यान, आज ६८३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता
४६ हजार ४८८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ७५२ रुग्णांना
आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ३८ हजार ८८१ रुग्ण या आजारातून बरे झाले
आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौदा कोविड बाधितांचा आज शासकीय
वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यत
दोन हजार ४९८ रुग्ण दगावले आहेत. आजच्या मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या आठ, जालना
जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि नाशिक इथल्या प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा समावेश
आहे.
दरम्यान, घाटीचा बाह्यरुग्ण विभाग उद्या एक मे रोजी महाराष्ट्र
दिनानिमित्त बंद राहणार असून रविवारी नेहमी प्रमाणे विभाग सुरु राहणार असल्याचं कळवण्यात
आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार ५२० नवे कोविड बाधित रुग्ण आढळून
आले. यामध्ये सर्वाधिक २९८ रुग्ण हे बीड तालुक्यातील असून अंबाजोगाई २३६, केज १९८,
आष्टी १८७, गेवराई १५५, परळी ११६, धारुर ८६, शिरुर ८०, माजलगाव आणि पाटोदा प्रत्येकी
६५ आणि वडवणी इथल्या ३४ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा
पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातल्या ३८ पैकी १३ कैद्यांना कोविडची लागण झाली आहे. मंगळवेढा
पोलीस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी या बाबतची माहिती दिली. या बाधित कैद्यांवर
मंगळवेढा तहसील उपकारागृहात उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री
सहाय्यता निधीस दोन कोटी रुपये मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे
एक कोटी रुपये तर राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं एक महिन्याचं वेतन
असे एकूण दोन कोटी रुपये मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील
नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवर
अधिक भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला
सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात
म्हटलं आहे.
****
ठाणे महानगर पालिकेतल्या राष्ट्रवादी
काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा
निर्णय घेतला आहे, पालिकेतले विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी ही माहिती दिली
आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १५ लाख रुपये जमा होणार असल्याचं,
पठाण यांनी सांगितलं आहे.
****
परभणी शहरात सर्व स्मशानभूमीमध्ये
विद्युतदाहिनी बसवण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे पाटील
यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरासह जिल्ह्यात कोविडबाधित
रुग्ण तसंच मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी
प्रतिक्षा करावी लागत असल्याचं म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात एका महिलेस
डांबून ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेख शौकत शेख शरीफोद्दिन या आरोपीस तिसरे
सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची
शिक्षा ठोठावली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-केदारखेडा
रोडवर आज दुपारी विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या
अपघातात दुचाकीस्वार १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली.
//**********//
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड-१९ ची
सौम्य लक्षणं असलेले किंवा लक्षण रहित रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठी, केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं, सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरातली
ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, आणि कोविडची कोणतीही लक्षणं नाहीत, मात्र
चाचणीत कोविड झाल्याचं दिसून आलं, अशा रुग्णांना लक्षणरहीत रुग्ण म्हणावं. अशा रुग्णांचा
गृह विलगीरकणात ठेवण्यासाठी, रुग्णाच्या घरात विलगीकरणाची सोय असणं, रुग्णाची देखभाल
करण्यासाठी एक व्यक्ती घरात असणं, आवश्यक आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना,
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसीवीर इंजेक्शन देऊ नये, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं
आहे.
****
देशाचे माजी
महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे
होते. सोराबजी हे अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्वपूर्ण
पदावर होते. १९९७ साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी
म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं होतं.
****
देशात ऑक्सिजन
पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत, असे निर्देश, दिल्ली उच्च
न्यायालयानं दिले आहेत. दिल्लीतल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्यावर सुनावणी करताना
काल न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्र सरकार ऑक्सिजनचा पुरवठ्यात अडथळा आणण्याचा
प्रयत्न करत आहे, असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं, तर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी
आम्ही काम करत आहोत, असं उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. दिल्ली मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये,
ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन प्लांट
उभारण्याबरोबर, ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून वेगानं वाहतूक करण्याला प्राधान्य
दिलं जात असल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
कोविड-19 प्रतिबंधासाठी
केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम ३१ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. राज्य सरकारांनी
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत, परिस्थितीचा आढवा घेऊन, विविध उपाययोजना लागू कराव्या,
असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दहा टक्क्यांहून अधिक बाधित
रुग्ण आहेत, किंवा ज्याठिकाणी रुग्णालयांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत,
अशा जिल्ह्यांची यादी तयार करुन, त्याठिकाणी जनजागृती अभियान राबवावं, असं केंद्र सरकारनं
सांगितलं आहे.
****
सरकारी तपासात
हस्तक्षेप केल्याप्रकरणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची,
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप
यांनी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून,
पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण
दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, सामाजिक माध्यमातून यावर गदारोळ माजताच, त्यांनी
सारवासारव केली. मात्र एखाद्याची चौकशी चालू असताना पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं
हा अपराध असल्यानं, फडणवीस आणि दरेकर यांची चौकशी करावी, अशा मागणीचं पत्र, आपण गृहमंत्री
दिलीप वळसे-पाटील यांना दिल्याचं, भाई जगताप यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या
किनवट तालुक्यातल्या मांडवी इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश पाटील राठोड यांचं काल
नांदेड इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. प्रकाश राठोड यांच्या न्यायदानाच्या भूमिकेमुळे
अनेकांचे संसार जुळले, त्यामुळे त्यांना बंजारा समाजात मानाचं स्थान होतं. माजी खासदार
उत्तमराव राठोड यांचे ते बंधू होत.
****
राज्यात सध्या
कडक निर्बंध लागू असून, निवृत्ती वेतन धारक, दिव्यांग आणि निराधारांना बँकेच्या वतीनं
रक्कम घरपोच देण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. पक्षाच्या वतीनं
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. ज्या बँकांना
घरपोच पगार मोफत देणं शक्य नसेल, त्यांनी नाममात्र शुल्कावर संबंधीत पगारी घरपोच देण्याबाबत,
जिल्ह्यातल्या सर्व बँकांना सूचित करावं, जेणेकरुन जेष्ठ नागरीक आणि दिव्यांगांना कोविड
संक्रमणापासून सुरक्षित ठेवता येईल, आणि त्यांची फरफट होणार नाही, असं या निवेदनात
म्हंटलं आहे.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या
वतीनं शहरातल्या सर्वच आरोग्य केंद्रावर आजपासून लसीकरण सुरु झालं. शासनाकडून कोविड-19
ची लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती, मनपाचे आयुक्त देविदास पवार यांनी
दिली. सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
तामसा इथं पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीनं, काल रक्तदान शिबिर
घेण्यात आलं, यावेळी ६० जणांनी रक्तदान केलं. तर घुंगराळा इथं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या
वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं, यात ५६ जणांनी रक्तदान केलं.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
कोविड १९ प्रतिबंधासाठी
केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम ३१ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. राज्य सरकारांनी
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत परिस्थितीचा आढवा घेऊन विविध उपाययोजना लागू कराव्या,
असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशातल्या कोविड
१९ च्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली
आज मंत्रिमंडळ बैठक होत आहे. आरोग्य सचिवांनी काल महाराष्ट्रासह सर्वाधिक प्रभावित
नऊ राज्यांचा कोविड स्थितीचा अहवाल गृह सचिवांना सादर केला.
****
राज्यात लागू
असलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश काल राज्य सरकारनं जारी
केले. कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध
आणि उपाययोजनांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी वाजेपासून ते १५ मे २०२१ रोजीच्या
सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
****
मुंबईत कोविड
लसीचा तुटवडा असल्यामुळे आजपासून तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. अतिरिक्त आयुक्त
सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे लसीकरणाला
वेग देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे, मात्र लसीचा योग्य पुरवठा होत नसल्याचं
लसीकरण मोहीम थांबली असल्याचं, पालिका प्रशासनानं सांगितलं.
****
भारत बायोटेक
आणि सिरम या लस उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांसाठी लसीच्या एका मात्रेची किंमत कमी
करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीच्या किमतीत २०० रुपये कपात
करुन, ती आता ४०० रुपये निश्चित केली आहे. तर सीरम कंपनीनं कोव्हिशिल्ड लसीच्या एका
मात्रेची किंमत शंभर रुपये कमी करुन, ३०० रुपये निर्धारित केली आहे.
****
मेळघाट व्याघ्र
प्रकल्पातल्या हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातला
आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे.
त्याला काल धारणी न्यायालयात हजर करण्यात आलं असून, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात
आली आहे.
****
आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या वस्तुसंग्रहालयं स्थापन करण्यासाठीच्या, सल्लागार समितीच्या सदस्यपदी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक, डॉ.राजेश रगडे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۳۰ ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ اپریل ۲۰۲۱ئ وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date : 30 April 2021
Time: 09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ اپریل ۲۰۲۱ئ
وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
سامعین کورونا وائرس کے پھیلائو میں دوبارہ تیزی آ گئی ہے۔ اِسی لیے آپ سے گزارش ہے کہ تمام احتیاطی تدابیر اختیار کریں ۔ 45؍ سال سے زیاہ عمر کے شہر یان بے خوف ہو کر کورونا وائرس سے بچائو کے ٹیکے لگوائیں ۔ ناک اور منہ پر ماسک پہنیں اور سوشل ڈسٹنسنگ کا خیال رکھیں ۔ بار بار صابن سے ہاتھ دھوئیں اور محتاط رہیں۔
اب خاص خبروں کی سر خیاں...
٭کورونا وائرس کا پھیلائو روکنے کے مقصد سے ریاست میں15 ؍ مئی تک نافذ رہیںگی سخت پا بندیاں
٭کووڈ19 ؍ کی تیسری لہر کے اندیشے کے پیش نظر بہترین منصوبہ بندی کریں ‘ وزیر اعلیٰ کی
سرکاری افسران کو ہدایت
٭پی ایم کیئرس فنڈ سے ایک لاکھ آکسیجن مشنری خریدنے کی منظوری
٭مفت ٹیکہ اندازی مہم کے لیے کانگریس پارٹی کے اراکین اسمبلی کی ایک ماہ کی تنخواہ وزیر اعلیٰ امدادی فنڈ میں جمع اور
٭ریاست میں کَل مزید66؍ہزار159؍ افراد کورونا وائرس سے متاثر ‘ مراٹھواڑے میں
134؍ مریض چل بسے اور مزید 7 ؍ہزار 403؍ کورونا مریض پائے گئے
اب خبریں تفصیل سے....
ریا ستی حکو مت نے ریاست میں نافذ سخت پا بندیوں کی مدت15؍ مئی تک بڑھا نے کا حکم دیدیا ہے۔ کورونا وائرس کے پھیلائو کو روکنے کے مقصدسے پا بندیوں کی مدت میں اضا فہ کیاگیا ہے۔اِس عرصے میں عوام کی بلا وجہ آمد ورفت پر پا بندی رہے گی۔ اِسی طرح نہایت ضروری کام کے بغیربین اضلاع سفر کی بھی ممانعت ہو گی ۔ کرانہ دکانیں ‘ سبزی تر کاری اور پھلوں کا کاروبار صبح7؍بجے سے 11؍ بجے تک ہی کیا جا سکے گا۔
اِسی دوران وزیر صحت راجیش ٹو پے نے کہا ہے کہ یہ فیصلہ عوام کی صحت کو مد نظر رکھ کر کیا گیا ہے۔ وہ کَل ممبئی میں صحا فیوں سے مخاطب تھے۔اُنھوں نے عوام سے انتظامیہ کے ساتھ تعاون کرنے کی اپیل کی ہے۔ وزیر موصوف نے کہا کہ گو کہ یکم مئی سے ٹیکہ اندازی کے تیسرے مرحلے کا آغاز کرنے کا اعلان کیا گیا تھا تاہم ویکسین کی قلت کی وجہ سے یہ مہم ابھی شروع نہیں کی جا سکے گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ ریاست کو جب یکمشت
20؍ سے25؍ لاکھ ٹیکے دستیاب ہوں گے تب ہی 18 ؍ سے44؍ سال عمر کے شہر یان کو ٹیکے لگوائیں جا سکتے ہیں ۔
***** ***** *****
ریاست میں کووڈ19؍ کی تیسری لہر کے اندیشے کے پیش نظر وزیر اعلیٰ اُدھو ٹھاکرے نے سرکاری افسران کو باریکی سے منصوبہ بندی کرنے کی ہدایت دی ہے۔وزیر اعلیٰ نے کووِڈ 19 ؍ کی صورتحال کے حوالے سے کَل ریاست کے علاقائی کمشنرس‘ ضلع کلکٹرس اور میونسپل کمشنرس کے ساتھ ویڈیو کانفرنسنگ کے توسط سے تبادلۂ خیال کیا۔
اِس موقعے پر اُنھوں نے کہا کہ تمام اضلاع کسی بھی صورت میں آکسیجن پلانٹ لگا نے ‘ ضروری ادویات کا وافر ذخیرہ کرنے پر خاص توجہ دیں اور پا بندی کے عر صے میں کمزور طبقے کے لیے معلنہ پیکیج کے مطابق امداد فراہم کریں ۔ اُنھوں نے کہا کہ آنے والے موسم باراں میں کسی بھی قسم کے ممکنہ آفات کو پیش نظر رکھتے ہوئے ضروری ادویات اور ساز و سامان کا ذخیرہ ضلعے کے کونے کونے میں ہو اِس کی بھی اچھی منصوبہ بندی کریں ۔
***** ***** *****
ویکسین تیار کرنے والی بھارت بایو ٹیک اور سیرم اِنسٹی ٹیوٹ نے ریاستی حکو مت کے لیے ویکسین کی قیمتوں میں کمی کرنے کا فیصلہ کیا ہے۔ اِس کے مطا بق بھارت با یو ٹیک نے کو ویکسین کے ایک نسخے کی قیمت میں200؍ روپئے کی کمی کرتے ہوئے اِس کی قیمت400؍ روپئے مقرر کی ہے۔ اُدھر سیرم اِنسٹی ٹیوٹ نے بھی کووی شیلڈ ویکسین کے نسخے کی قیمت میں100؍ روپئے کی کٹوتی کرتے ہوئے اِس کی قیمت300؍ روپئے طئے کی ہے۔تاہم اِن دو نوں کمپنیوں نے خانگی دواخانوں کے لیے ویکسین کی قیمت میں کوئی کمی نہیں کی ہے۔
***** ***** *****
پی ایم کیئر س فنڈ سے ایک لاکھ آکسیجن مشنری خریدنے کی منظوری دی گئی ہے۔میڈیکل آکسیجن کی فراہمی سے متعلق وزیر اعظم نریندر مودی کی زیر صدارت منعقدہ اعلیٰ سطحی اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔
اِس موقعے پر وزیر اعظم نے کہا کہ اِس پر جلد از جلد عمل در آمد کر کے زیادہ متا ثرہ ریاستوں کو یہ مشنری فراہم کی جائے۔
اِسی دوران ملک میں کورونا وائرس کی صورتحال سے نمٹنے کے لیے بھارتیہ فوج کی جانب سے کیے گئے اقدامات اور تیاریوں کا بھی وزیر اعظم نے کَل جائزہ لیا۔ اِس خصوص میں انھوں نے فوج کے سر براہ جنرل منوج نر ونے کے ساتھ تبادلۂ خیال کیا۔ اِس موقعے پر جنرل نر ونے نے وزیر اعظم کو بتا یا کہ فوج کی جانب سے ملک بھر میں مختلف مقامات پر عارضی ہسپتال قائم کئے جا رہے ہیں۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** *****
کَل منا ئے جا نے والے 61؍ ویں مہا راشٹر دِن کا جشن کورونا وائرس کے پھیلائو کو مد نظر رکھتے ہوئے گزشتہ سال کی طرح نہایت سادگی سے منا یا جا ئے ۔ جنرل ایڈمنسٹریشن کے شعبہ آدابِ معاشرت نے یہ ہدایت دی ہے۔ شعبے کی جانب سے کہا گیا ہے کہ اِس خصوص میں منعقدہ پروگرامز میں شر کاء کو لازمی طور پر ماسک پہننا ہو گا ۔
***** ***** *****
ریاست میں کورونا وائر س سے بچائو کی ٹیکہ اندازی مفت کی جا سکے اِس کے لیے کانگریس پارٹی کے اراکینِ اسمبلی نے اپنی ایک ماہ کی تنخواہ وزیر اعلیٰ امدادی فنڈ میں جمع کر نے کا فیصلہ کیا ہے۔ اِس کے تحت ودھان سبھا اور ودھان پریشد دنوں ایوانوں میں کانگریس پارٹی کے اراکین اپنی ایک ماہ کی تنخواہ دیں گے ۔ اِسی طرح Congress Legislative Party کے رہنما اور وزیر محصول با لا صاحیب تھورات نے اپنا ایک سال کا اعزازیہ
اِس طرح تقریباً2؍ کروڑ روپئے وزیر اعلیٰ امدادی فنڈ میں جمع کر نے کا فیصلہ کیا ہے۔
***** ***** *****
ریاست میں کَل مزید66؍ہزار159؍ افراد کورونا وائر س سے متاثر پائے گئے۔ اِس کے ساتھ ہی ریاست میں اب تک پائے گئے کورونا متاثرین کی مجموعی تعداد بڑھ کر45 ؍ لاکھ 39؍ ہزار553؍ ہو چکی ہے۔ اِسی دوران کَل 771؍ مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔
دوسری جانب 68؍ہزار537؍ کورونا متاثرین علاج معالجے کے بعد کَل شفا یاب ہو گئے ۔ اِس طرح ریاست میں اب تک 37؍ لا کھ99؍ہزار266؍ کورونا متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں۔ فی الحال ریاست میں 6؍ لاکھ 70؍ہزار301؍ مریض زیر علاج ہیں۔
***** ***** *****
مراٹھواڑے میں گزشتہ روز مزید7؍ہزار403؍افراد کورونا وائرس سے متاثر ہوگئے جبکہ134؍ مریض علاج کے دوران چل بسے ۔ فوت ہونے والوں میں اورنگ آباد اور پر بھنی ضلعے کے فی کس21-21؍ مریض لاتور کے31؍ ناندیڑ کے24؍ عثمان آ باد کے18؍ جالنہ کے8؍ ہنگولی کے6 ؍ اور بیڑ ضلعے کے 5؍ مریضوں کا شمار ہے۔
اورنگ آباد ضلعے میں کَل مزیدایک ہزار61؍ افراد کورونا وائرس کی زد میں آ گئے ۔ اِسی طرح بیڑ ضلعے میں ایک ہزار470؍ پر بھنی میں ایک ہزار265 ؍ لاتور میں ایک ہزار134؍ ناندیڑ میں 816؍ عثمان آ باد میں783؍ جالنہ میں677؍ اور ہنگولی ضلعے میں کَل مزید197؍ مریض پائے گئے۔
***** ***** *****
محکمہ موسمیات نے مراٹھواڑے کے کچھ مقامات پر آج طوفانی ہوائوں اور بجلی کی گھن گرج کے ساتھ بارش ہونے کا امکان ظاہر کیا ہے ۔ عثمان آباد ضلعے میں کَل دو پہر 3 ؍ بجے کے آس پاس کچھ دیر بارش ہوئی ۔ اور نگ آباد میں بھی کَل بادل چھائے ہوئے تھے۔
***** ***** *****
ڈاکٹر با با صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے مقررہ گریجویشن اور پوسٹ گریجویشن کے آن لائن امتحا نات کے کَل ہوئے پہلے Mock Test میں 65؍ہزار494؍ طلباء نے شر کت کی۔یہ امتحان آئندہ2؍ مئی تک لیے جا ئیں گے۔گریجویشن کے بقیہ Main Exame 3؍ مئی سے اور پوسٹ گریجویشن کے امتحانات 5؍ مئی سے شروع ہوں گے ۔Board of Examinations and Assessments کے ڈائریکٹر
ڈاکٹر یو گیش پاٹل نے طلباء سے ایپل کی ہے کہ وہ امتحانات کے حوالے سے کالج کو آرڈینٹر سے رابطہ کریں۔
***** ***** *****
کورونا وائرس کے پھیلائو کو مد نظر رکھتے ہوئے ریاستی حکو مت آنے والے موسمِ خریف سے پہلے کی تیاری جلد کر لیں ۔ ناندیڑ کے رکن پارلیمنٹ پر تاپ رائو پاٹل چکھلی کر نے نائب وزیر اعلیٰ اجیت پوار اور وزیر زراعت دادا بھوسے سے یہ مطالبہ کیا ہے۔مطالبات پر مبنی مکتوب میں اُنھوں نے کہا ہے کہ وقت پر تخم ریزی مکمل ہونے کے مقصد سے ریاستی حکو مت فصل قرض کی تقسیم ‘ بازار میں معیاری بیج اور کھاد کی فراہمی ‘ فصل بیمہ کا اندراج ‘ پچھلے فصل بیمہ کے تحت نقصان بھر پائی کی رقم کسانوں کے بینک کھاتوں میں جلد از جلد جمع کریں ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے
٭کورونا وائرس کا پھیلائو روکنے کے مقصد سے ریاست میں15 ؍ مئی تک نافذ رہیںگی سخت پا بندیاں
٭کووڈ19 ؍ کی تیسری لہر کے اندیشے کے پیش نظر بہترین منصوبہ بندی کریں ‘ وزیر اعلیٰ کی
سرکاری افسران کو ہدایت
٭پی ایم کیئرس فنڈ سے ایک لاکھ آکسیجن مشنری خریدنے کی منظوری
٭مفت ٹیکہ اندازی مہم کے لیے کانگریس پارٹی کے اراکین اسمبلی کی ایک ماہ کی تنخواہ وزیر اعلیٰ امدادی فنڈ میں جمع اور
٭ریاست میں کَل مزید66؍ہزار159؍ افراد کورونا وائرس سے متاثر ‘ مراٹھواڑے میں
134؍ مریض چل بسے اور مزید 7 ؍ہزار 403؍ کورونا مریض پائے گئے
علاقائی خبریں ختم ہوئیں۔
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या
नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं
पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
· कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध कायम ठेवण्याचे
आदेश.
· कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करण्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश.
· ‘पी एम केअर्स’ निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला मंजुरी.
· मोफत लसीकरण मोहिमेसाठी काँग्रेसच्या आमदारांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री
सहाय्यता निधीत जमा.
· राज्यात ६६ हजार १५९ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १३४ जणांचा मृत्यू
तर सात हजार ४०३ बाधित.
आणि
· मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध,
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल; राज्य
सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करणारी परमवीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात
याचिका.
****
राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश काल
राज्य सरकारनं जारी केले. कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीनं तोडण्यासाठी
हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत. या काळात सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद राहील,
तसंच अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद राहील. किराणा दुकान, भाजी, फळ विक्री
सकाळी सात ते ११ या वेळेतच सुरु राहतील.
दरम्यान, हे सर्व निर्बंध जनतेच्या आरोग्यासाठीच लावण्यात आले असून, जनतेनं सहकार्य
करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. एक मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असली तरीही
लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम सुरु करता येत नाही, एकत्रित २० ते २५ लाख मात्रा जेव्हा
राज्याला प्राप्त होतील, तेव्हाच १८ ते ४४ वयोगटाला लस देता येईल, असं टोपे यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
पर्चेस ऑर्डर ही तीन लाख लसींची फक्त ती कोविशिनची
आलेली आहे. आणि त्यामुळे आता तीन लाख लस म्हणजे महाराष्ट्रासाठी एका दिवसाचा विषय आहे.
मग आपण एक मे रोजी सुरू करायची आणि परत थांबून टाकायचं का हा महत्वाचा विषय आहे. म्हणून
त्याच्यामधे सातत्य असलं पाहिजे. आणि त्यामधे सुध्दा मॉडेलिटीज ठरवाव्या लागतील की
एकदम १८ ते ४४ एकाच वेळेस सगळ्यांना जाऊ द्यायचं का? एक व्यवस्थित नियमावली खऱ्या अर्थाने
निर्गमित करण्यात येईल. त्यानंतर एक अतिशय शिस्तबध्द पद्धतीनं १८ ते ४४ वयोगटासाठी
लसीकरण करण्याचा मानस हा सरकारचा आहे.
****
राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी
काल कोविड परिस्थितीसंदर्भात राज्यातले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त
यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांनी
कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक
औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, निर्बंधाच्या काळात दुर्बल
घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे त्यांना तात्काळ लाभ द्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता, आवश्यक औषधी आणि संसाधनांचा साठा जिल्ह्यातल्या
कानाकोपऱ्यात होईल, याचंही चांगलं नियोजन करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केल्या.
****
भारत बायोटेक आणि सिरम या लस उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांसाठी लसीच्या एका
मात्रेची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीच्या किमतीत
२०० रुपये कपात करुन, ती आता ४०० रुपये निश्चित केली आहे. तर सीरम कंपनीनं कोव्हिशिल्ड
लसीच्या एका मात्रेची किंमत शंभर रुपये कमी करुन, ३०० रुपये निर्धारित केली आहे. सार्वजनिक
आरोग्य व्यवस्थेचा विचार करता दरात घट केल्याचं, भारत बायोटेकनं म्हटलं आहे. या दोन्ही
कंपन्यांनी खासगी रुग्णालयांसाठीच्या दरात कोणतेही बदल केले नाही.
****
‘पी एम केअर्स’ निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. याची
लवकरात लवकर पूर्तता करून, रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा,
अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे.
****
उद्या साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ
कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्यात यावा,
अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेनं केल्या आहेत. या संबंधी
कार्यक्रमात सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश
यात आहेत.
****
राज्यात मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री
सहाय्यता निधीसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमधले
काँग्रेसचे सदस्य, एक महिन्याचं वेतन देणार आहेत. तर, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते
आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, त्यांचं एक वर्षाचं मानधन, असा सुमारे दोन
कोटी रुपयांचा निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे. तसंच यांच्या
सहकारी उपक्रमांमधे काम करणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्याचं लसीकरण शुल्क द्यायचंही थोरात
यांनी ठरवलं आहे. प्रदेश काँग्रेस पाच लाख रुपयांची देणगी देणार आहे, तर काँग्रेसचे
अनेक कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणाचं शुल्क, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
जमा करणार आहेत.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा
झाली असून त्यांना दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच आलं असल्याचं त्यांची
नात रुद्राली पाटील चाकूरकर यांनी सांगितली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री
पंकजा मुंडे यांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती
देताना त्यांनी, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचं नमूद केलं. काँग्रेसचे राज्यसभा
खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर
उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं राज्यमंत्री
विश्र्वजित कदम यांनी काल सांगितलं. त्यांना गेल्या पंचवीस तारखेला प्राणवायुची पातळी
खालावल्यानं जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल ६६ हजार १५९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली आहे. काल ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६७ हजार ९८५ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ६८ हजार ५३७ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ७० हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सात हजार ४०३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३४
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी
२१, लातूर ३१, नांदेड २४, उस्मानाबाद १८, जालना आठ, हिंगोली सहा, तर बीड जिल्ह्यातल्या
पाच रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ६१ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ४७०, परभणी
एक हजार २६५, लातूर एक हजार १३४, नांदेड ८१६, उस्मानाबाद ७८३, जालना ६७७, तर हिंगोली
जिल्ह्यात १९७ नवे रुग्ण आढळून आले.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध,
अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात
आला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह विविध २२ कलमान्वये, हा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी कोट्यवधी
रुपयांचा भ्रष्टाचार केला, तसंच जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
भिमराज घाडगे यांनी, पोलिस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे
केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्य शासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या
विरोधात, सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार आपली
मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप, त्यांनी या याचिकेत केला आहे. १९ एप्रिलला आपण पोलीस
महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली होती, त्यावेळी सरकार आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या
तक्रारी दाखल करणार असल्याचं, त्यांनी आपल्याला सांगितलं, तसंच माजी गृहमंत्री अनिल
देशमुख यांच्यावर आरोप करणारं आपलं पत्र मागे घ्यावं, असा सल्ला पांडे यांनी दिला होता,
असंही सिंग या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर मागितलं
असून, या याचिकेची सुनावणी येत्या चार मे रोजी होणार आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित पदवी आणि पदव्युत्तर
‘ऑनलाईन’ परीक्षेसाठी, काल झालेल्या पहिल्या चाचणी परीक्षेला, ६५ हजार ४९४ विद्यार्थी
उपस्थित राहिले. येत्या दोन मे पर्यंत ही चाचणी घेण्यात येणार आहे. पदवीची उर्वरित
मुख्य परीक्षा तीन मे पासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मे पासून सुरु
होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात महाविद्यालय समन्वयकांशी संपर्क साधण्याचं
आवाहन, परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज,
हवामान विभागानं व्यक्त केला आहे. काल उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास
काही काळ पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही काल ढगाळ वातावरण होतं.
****
परभणी महापालिकेचे कर्मचारी कोविड प्रादुर्भावाच्या कार्यकाळात आघाडीवर राहून कार्यरत
असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांचं विमा कवच देण्यात यावं, अशी मागणी
महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.
के. आंधळे यांनी, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांना, या मागणीचं निवेदन सादर
केलं. कार्यरत कर्मचाऱ्याला हा संसर्ग झाल्यास त्याला तात्काळ २५ हजार रुपये मदत देण्यात
यावी, आणि त्याला प्राणवायू, रेमडीसिव्हीर इंजेक्शन आदी उपचारांसाठी, दहा टक्के आरक्षण
देण्यात यावं, असंही संघटनेनं म्हटलं आहे.
****
नांदेडचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी
त्रिसुत्रीचं पालन करण्याचं, आणि लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मित्रांनो, कोरोना या रोगावर अद्याप गुणकारी असं कोणतचं
प्रभावी औषध नाहीये. महत्वाचं काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नका आणि बाहेर
जाण्याची वेळ आलीचं तर किमान सहा फुटापेक्षा जास्त अंतर हे समोरच्या व्यक्तीपासून ठेवा
आणि नेहमी आपण योग्य प्रकारच्या मास्कचा वापर करा. आणि वारंवार आपले हात आणि तोंड साबणाने
धुवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण
करुन घ्या, इतकीच माझी आपल्याला विनंती आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारनं आगामी खरीप हंगामाची
पूर्व तयारी लवकर करावी अशी मागणी, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. आगामी खरीप
हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून, राज्य शासनाने वेळेवर
पेरणी होण्याच्या दृष्टीनं, पिक कर्ज वाटप, दर्जेदार बियाणे, खते बाजारात उपलब्ध करून
द्यावेत, पिक विमा नोंदणी, मागील पिक विम्याची नुकसान भरपाईचे पैसे, शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावेत, आदी मागण्या चिखलीकर यांनी एका निवेदनाद्वारे
केल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णांचा वाढता मृत्यूदर, तज्ञांची कमतरता लक्षात घेऊन,
टेली आयसीयू सुविधा पुन्हा कार्यान्वित करावी अशी मागणी, आमदार राणा जगजितसिंह पाटील
यांनी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. गतवर्षी कोविडच्या पहिल्या
लाटेदरम्यान, रुग्णांसाठी क्लाऊड फिजिशियन हेल्थकेअर या कंपनीच्या माध्यमातून, आणि
कंपनी दायित्व निधी-सीएसआरच्या मदतीनं, जिल्हा सामान्य रूग्णालयात ही सेवा कार्यान्वित
करण्यात आली होती, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथंल्या कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात जनरेटर सुविधा
तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी
केली आहे. पालकमंत्री नवाब मलीक, आमदार सुरेश वरपुडकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक
मुगळीकर यांच्याकडे त्यांनी हा मागणी केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी या गावी, जिल्हा परिषद शाळे शेजारी
होणाऱ्या अंगणवाडी खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार, आमदार मेघना
बोर्डीकर यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित अंगणवाडी बांधकामासाठी
वर्ग केलेला निधी अधिकाऱ्यांनी उचलला असून, बांधकाम मात्र सुरु केलं नाही, असं त्यांनी
तक्रारीत नमूद केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या काजळा इथल्या सरपंचाचा पती आणि ग्रामपंचायत
सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते याला, पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या अनुदानाचा हप्ता
लाभार्थाच्या खात्यावर जमा करण्यासाठी, २० हजार रुपयांची लाच घेतांना, लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं अटक केली. तक्रारदाराच्या एक लाख २० हजार रुपयांपैकी, १५ हजार रुपयांचा पहिला
हप्ता जमा झाला होता. दुसरा हप्ता ४५ हजार रुपये खात्यावर जमा करण्यासाठी, ३० हजार
रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीनं केली होती.
****
मध्य रेल्वे विभागात कल्याण-कसारा दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे, नांदेड
विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामधे सिकंदराबाद
- मुंबई आणि मुंबई - सिकंदराबाद धावणारी देवगिरी विशेष गाडी एक मे रोजी रद्द करण्यात
आली आहे, तर आदिलाबाद - मुंबई आणि मुंबई - आदिलाबाद विशेष गाडी आज रद्द करण्यात आली
आहे. नांदेड - मुंबई तपोवन विशेष गाडी दोन मे रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती, दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
Thursday, 29 April 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी
साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
**
`पीएम केअर्स` निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला पंतप्रधानांची मंजुरी
**
राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना
**
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे २३ रुग्णांचा मृत्यू
आणि
**
मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांचं एक महिन्याचं वेतन
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी `पी एम केअर्स` निधीतून एक लाख हाताळण्यायोग्य प्राणवायू यंत्र
खरेदीला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. याची लवकरात
लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा अशी सूचना
पंतप्रधानांनी केली आहे. देशातल्या कोरोना विषाणू संसर्ग स्थितीविरोधात लढा देण्यासाठी
भारताच्या लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचाही पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काल आढावा घेतला. यासंदर्भात पंतप्रधानांनी सैन्य दलाचे प्रमुख जनरल मनोज
नरवणे यांच्यासोबत चर्चा केली. सैन्य दलाच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी तात्पुरती
रुग्णालयं उभारली जात असल्याची माहिती जनरल नरवणे यांनी यावेळी पंतप्रधानांना दिली.
****
राज्याचं
उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसंच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी
`महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक` या `वेब पोर्टल`चा निश्चितच उपयोग
होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा
कल लक्षात येईल, असंही त्यांनी या `वेब पोर्टल`चं लोकार्पण करताना आज नमुद केलं. नियोजन
विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी महासंचालनालय आणि उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीनं
याची निर्मीती करण्यात आली आहे. राज्यातली कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी
निर्बंध लावण्यात आले असल्यानं या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य
सरकारनं साडे पाच हजार कोटी रुपयांच्या मदतीची तरतुद केली असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
या पोर्टलच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातलं राज्याचं निश्चित स्थान आपल्याला समजणार
असल्याचं तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे उद्योग विभागाचे अधिकारी यावर आवश्यक
माहिती देतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
****
परवा-
शनिवारी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ
कोरोना संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्यात यावा, अशा सूचना
सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेनं केल्या आहेत. या संबंधी कार्यक्रमात
सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश यात आहेत.
जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी आठ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं. औरंगाबाद
तसंच अन्य विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभाकरता योग्य ती व्यवस्था करावी.
तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये, अशा सूचनाही
देण्यात आल्या आहेत. दरम्यान, परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री
नवाब मलिक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या २३ रुग्णांचा
मृत्यू झाला. यामध्ये १६ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातले असून बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातले
प्रत्येकी दोन तर अहमदनगर इथल्या तीन रुग्णांचा मृतांत समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
आतापर्यंत दोन हजार ४८० रुग्ण या विषाणू संसर्गानं दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण
रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ८८० झाली आहे.
****
माजी
मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणुच्या संसर्गाची
लागण झाली आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती देताना त्यांनी त्यांच्यावर
घरीच उपचार सुरू असल्याचं नमुद केलं आहे. अलिकडच्या काळात संपर्कात आलेल्यांनी संसर्गासाठी
चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.
****
मुंबईचे
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यात सिटी
कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह
विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना
परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक
भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे
केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रारही घाडगे यांनी दिली
आहे.
****
राज्यात
मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता
निधीसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि
विधानपरिषद
या दोन्ही सभागृहांमधले काँग्रेसचे सदस्य एक महिन्याचं वेतन देणार आहेत. तर, काँग्रेस
विधीमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं एक वर्षाचं
मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सहकारी उपक्रमांमधे
काम करणाऱ्या ५ हजार कर्मचाऱ्याचं लसीकरण शुल्क द्यायचंही थोरात यांनी ठरवलं आहे. प्रदेश
काँग्रेस ५ लाख रुपयांची देणगी देणार आहे. तर, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या
कुटुंबियांच्या लसीकरणाचं शुल्कं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत.
****
खासदार
इम्तियाज जलील यांनी आज आपल्या निधीतून चार हजार सलाईन बाटल्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय
रुग्णालय- घाटीच्या प्रशासनाला दिल्या आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या गोर गरिब रुग्णांना
याचा लाभ होईल असं जलील यांनी म्हटलं आहे.
****
नांदेडचे
माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आणि लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मित्रांनो,
कोरोना या रोगावर अद्याप गुणकारी असं कोणतचं प्रभावी औषध नाहीये. महत्वाचं काम असल्याशिवाय
आपण घराच्या बाहेर पडू नका, आणि बाहेर जाण्याची वेळ आलीचं तर किमान सहा फुटापेक्षा
जास्त अंतर हे समोरच्या व्यक्तीपासून ठेवा आणि नेहमी आपण योग्य प्रकारच्या मास्कचा
वापर करा, आणि वारंवार आपले हात आणि तोंड साबणाने धुवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या
जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्या. इतकीच माझी आपल्याला विनंती
आहे.
****
परभणी
महापालिकेचे कर्मचारी कोविड प्रादुर्भावाच्या कार्यकाळात आघाडीवर राहून कार्यरत असल्यामुळे
या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांचं विमा कवच देण्यात यावं, अशी मागणी महापालिका
अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे यांनी
महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. कार्यरत कर्मचाऱ्याला
हा संसर्ग झाल्यास त्याला तात्काळ २५ हजार रुपये मदत देण्यात यावी आणि त्याला प्राणवायू,
रेमडीसिव्हीर इंजेक्शन आदी उपचारांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात यावं असंही संघटनेनं
म्हटलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित पदवी आणि पदव्युत्तर `ऑनलाईन` परीक्षेसाठी
आज झालेल्या चाचणीला ६५ हजार ४९४ विद्यार्थी उपस्थित राहिले. येत्या २ मेपर्यंत ही
चाचणी घेण्यात येणार आहे. पदवीची उर्वरित मुख्य परीक्षा तीन मे पासून तर पदव्यूत्तर
अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात महाविद्यालय
समन्वयकांशी संपर्क साधण्याचं आवाहन परीक्षा आणि मुल्यमापण मंडळाचे संचालक डॉ.योगेश
पाटील यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उद्या वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी तीन
वाजेच्या सुमारास काही काळ पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही ढगाळ वातावरण होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरी या गावी जिल्हा परिषद शाळे शेजारी होणाऱ्या
अंगणवाडी खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार आमदार मेघना बोर्डीकर
यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित अंगणवाडी बांधकामासाठी वर्ग केलेला निधी
अधिकाऱ्यांनी उचलला असून बांधकाम मात्र सुरु केलं नाही, असं त्यांनी निदर्शनास आणून
दिलं आहे.
//************//
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...