Tuesday, 31 December 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो,तसंच आपलं राज्य आणि आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नवीन वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून, नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदानं आणि उत्साहानं करू या, असं आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे. महापालिकेत आज  झालेल्या निवडणुकीत जंजाळ यांना एक्कावन्न, भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिलेले उमेदवार गोकुळ मुळके यांना चौतीस तर एम आय एमचे शेख जफर अख्तर यांना तेरा मतं मिळाली. या निवडणुकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एम आय एम पक्षाच्या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती या पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणूक झाली. नऊ सभापती पदांपैकी पाच शिवसेनेनं, दोन भारतीय जनता पक्षानं तर काँग्रेस आणि रायभान जाधव विकास आघाडीनं प्रत्येकी एक सभापती पद मिळवलं आहे. उपसभापती पदांपैकी पाच शिवसेनेनं,तीन भाजपनं तर एक राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलं.

औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या छायाताई घागरे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या मालती पडूळ यांची निवड झाली आहे.

पैठण पंचायत समितीमध्ये सभापतीपदावर शिवसेनेचे अशोक भवर आणि उपसभापतीपदी शिवसेनेचेच कृष्णा भूमरे यांची बिनविरोध निवड झाली. वैजापूर पंचायत समितीतही सभापती पदी शिवसेनेच्या सिना मिसाळ तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र मगर यांची बिनविरोध निवड झाली.

कन्नड पंचायत समिती सभापतीपदी रायभान जाधव विकास आघाडीचे आप्पाराव घुगे तर उपसभापतीपदी भाजपच्या डॉ. नयना तायडे यांची निवड झाली आहे.

गंगापूर,सिल्लोड आणि सोयगाव पंचायत समितींमध्ये सभापती आणि उपसभापती पदांवर शिवसेनेचे तर फुलंब्री आणि खुलताबाद मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.

औरंगाबादच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी येत्या तीन जानेवारीला निवडणूक होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

****

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप आघाडीचे अनिरुद्ध कांबळे यांची आणि उपाध्यक्षपदी भाजप आघाडीच्याच दिलीप चव्हाण यांची आज निवड झाली.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले पाटील आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत येणा-या ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा” २०१८-१९ या वर्षासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानभवनात आज यासंदर्भात झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

****

नववर्षाच्या स्वागताच्या वेळी मद्यपान करून वाहन न चालवण्याचं आवाहन औरंगाबाद पोलिसांनी शहरातल्या सगळ्या वाहनधारकांना केलं आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस उप आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी सांगितलं आहे. उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण शहरात वाहनधारकांची यासाठीची चाचणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ऐतिहासिक कोरेगाव लढाईच्या दोनशे दोनव्या जयंतीच्या वेळी, उद्या, कोरेगाव भीमा इथे दहा हजारहून जास्त पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. २०१८ मध्ये या जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह साहित्य टाकणाऱ्यांवर याआधीच कारवाई सुरू केली असून, कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोचेल, असे संदेश कोणीही टाकू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दक्षतेचा उपाय म्हणून सुमारे साडेसातशे जणांवर कारवाई करण्यात आली असून, सामाजिक माध्यमांवर नजर ठेवली जात आहे, तसंच  अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.

**********



 








आकाशवाणी औरंगाबाद दि.31.12.2019 संध्याकाळी सहा वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****



 नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे, कुणाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. देशातल्या नागरिकांनी इंडिया सपोर्ट्स सी.ए.ए. हा हॅशटॅग वापरून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवावा असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे.

****



 जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. आपल्या सदोतीस वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी जम्मू काश्मीर तसंच पूर्वोत्तर भारतातल्या कार्यासह इतर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. लष्करप्रमुख पदावर नियुक्ती होण्याआधी, लष्कराच्या पूर्व मुख्यालयाचे ते प्रमुख होते.

****



 रेल्वे मंत्रालयानं केलेल्या उपायांमुळे यावर्षी सगळ्या रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या आणि एकही प्राणहानी झाली नाही, तसंच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेचा वक्तशीरपणा  आठ टक्क्यांनी वाढला  आहे, अशी माहिती रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.  प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ५०० रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे निर्भया निधीतून बसवल्याची आणि ५ हजार पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा पुरवल्याची माहितीही यात दिली आहे. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोरस रेल्वे कमांडो बटालियनची स्थापना केल्याचं याशिवाय आय.आर.सी.टी.सीच्या माध्यमातून दर्जेदार खाद्य पदार्थ पुरवले जात असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.

****



 औरंगाबादच्या उपमहापौरपदी  शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाल्याचं वृत्त आहे. जंजाळ यांना एक्कावन्न , भारतीय जनता पक्षाचे गोकुळ मलके यांना चौतीस तर एम आय एमचे उमेदवार शेख अख्तर यांना तेरा मतं मिळाली.

****



 वर्षअखेर आणि नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहराचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज संध्याकाळपासून उद्या पहाटे अडीच वाजेपर्यंत शहरातल्या सर्व हालचालींवर पोलिस यंत्रणेचं लक्ष राहणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. औरंगाबाद शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

****



 परभणी इथं व्यापारी तसंच नागरिकांनी पाण्याचे प्लास्टिक पाऊच आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. आयुक्त रमेश पवार यांनी यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे.

****



 हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊस झाला आहे. औंढानागनाथ ,कनेरगाव नाका, कळंबोली, बासंबा आणि बळसोंड परिसरात सकाळी  पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****



 ठाणे शहरात सर्व सोयींनी युक्त असं क्रीडा वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. या शहरात दरवर्षी होत असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी देशभरातून येणाऱ्या खेळाडूंची निवासाची सोय व्हावी, यासाठी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जायस्वाल यांनी हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 पुढच्या वर्षीच्या ऑलम्पिक पात्रतेसाठी 69 किलो वजन गटात विकास कृष्णननं भारतीय मुष्टीयुद्ध संघात स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघात स्थान मिळवणा-यांमधे राष्ट्रकुल पदक विजेते गौरव सोळंकी  आणि नमन तंवर यांचाही समावेश आहे.

****



 बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये  होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा याआधी घेतलेला  निर्णय  भारतानं मागे घेतला आहे. २०२६ किंवा २०३० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेआधी नेमबाजी स्पर्धेचं यजमानपद घेण्याचाही भारत विचार करत आहे, असं भारताच्या ऑलम्पिक समितीनं जाहीर केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन, यांनी भारताच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****



 जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री दोन तासाहून कमी कालावधीत भूकंपाचे चार धक्के बसले. रात्री पावणेअकरा ते अकरा वाजून वीस मिनिटांमध्ये जाणवलेल्या या धक्क्यांची कमाल तीव्रता रिश्टर स्केलवर पाच पूर्णांक पाच इतकी होती. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त आतापर्यंत आलेलं नाही.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 13.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर २०१ सकाळी ११.०० वाजता

****



 भारताचे पहिले सीडीएस- अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती झाली आहे. जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होत आहेत. तीनही संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून काम करताना लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये समन्वय राखणं आणि सैन्यदलाशी संबंधित सर्व बाबींमध्ये सरकारचा सल्लागार म्हणून काम करणं, या त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या असतील. संरक्षण मंत्रालय नव्यानं निर्माण करत असलेल्या संरक्षण व्यवहार विभागाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पहातील.



 दरम्यान, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे आज लष्करप्रमुख पदाची सूत्रं हाती घेत आहेत.

****



 पॅन आणि आधार कार्ड जोडणीसाठी प्रत्यक्ष कर मंडळानं मुदतवाढ दिली आहे. आता  ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडता येणार आहे. मंडळानं या साठी याआधी जाहीर केलेली मुदत आज संपत होती.

****



 राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं बँक कर्जखातं आणि बचतखातं त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणं अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचं बँक कर्जखातं किंवा बचत खातं आधार क्रमांकाशी संलग्न नाही, अशा शेतकऱ्यांनी आपली खाती तत्काळ आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावीत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****



 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज दिनांक ३१ डिसेंबरला नांदेड इथून सकाळी साडे नऊऐवजी दुपारी चार वाजता सुटेल. अमृतसरहून येणारी गाडी उशीरा धावत असल्याने, हा बदल झाल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 सांगली जिल्ह्यातल्या दहापैकी पाच पंचायत समितींमध्ये मध्ये भाजपची सत्ता आली असून तीन ठिकाणी राष्ट्रवादी, एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी खासदार गटाकडे सत्ता राहिली.

****



 भारत-दक्षिण अफ्रिकेदरम्यान, १९ वर्षांखालील युवांच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, इस्ट लंडनमध्ये बफेलो पार्क इथं काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र मालिकेतले पहिले दोन सामने जिंकल्यामुळे मालिका भारतानं जिंकली आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 11.00AM

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 31.12.2019, Time : 8.40 - 8...

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 December 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍دسمبر ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کی زیر قیادت مہا وکاس آگھاڑی حکو مت کی کا بینہ میں پہلی توسیع کل کی گئی۔ گورنر بھگت سنگھ کوشیاری نے نو منتخبہ وزراء کو عہدے اور  راز داری کا حلف دلا یا۔ اِس موقعے پر راشٹر وادی کانگریس پارٹی کے رہنما  اجیت پوار نے نائب وزیر اعلیٰ کی حیثیت سے حلف لیا۔ اُن کے علا وہ این سی پی کے دلیپ ولسے پاٹل  ‘  دھننجئے منڈے ‘  انیل دیشمکھ ‘  حسن مُشرِف ‘  راجیندر شنگنے ‘ نواب ملک ‘ جیتندر آوہاڑ  ‘
راجیش ٹو پے اور بالا صاحیب پاٹل جبکہ کانگریس پارٹی کے اشوک چو ہان ‘  وِجئے وڈِٹیوار ‘  ورشا گائیکواڑ‘  یشو متی ٹھاکُر’ سُنیل کیدارے ‘ امیت دیشمکھ ‘  بالا صاحیب پاٹل ‘ کے  سی  پاڈوی اور اسلم شیخ  نے عہدے  اور  ر از داری کا حلف لیا۔ اِسی طرح شیو سینا  کے سنجئے راٹھوڑ  ‘ گلاب رائو پاٹل ‘  انیل پرَب ‘  اُدئے سامنت ‘ دادا بھُسے ‘  سندیپ بھُمرے ‘  شنکر رائو گڈاکھ  اور آدِتیہ ٹھاکرے  نے بھی عہدے اور  رازداری کا  عہد کیا۔
  جبکہ مملکتی وزیر کی حیثیت سے شیو سینا کے عبد الستار‘ شمبھو راجے دیسائی ‘ بچو کڑو اور  راجیندر یے درائوکر این سی پی کے دتتا تریہ بھر نے ‘ آدِتی تٹکرے‘ سنجئے بن سو ڑے ‘ پراجکت تن پورے‘ اور کانگریس پارٹی کے ستیج پاٹل  اور وِشوجیت کدم نے بھی کل حلف اُٹھا یا۔

 ***** ***** ***** 

  کابینی توسیع کے بعد منعقدہ پہلے کابینی اجلاس میںاظہار خیال کر تے ہوئے وزیر اعلیٰ اُدھو ٹھاکرے نے کہا ہے کہ توسیع شدہ کابینہ عوام کے مسائل کو بخوبی سمجھنے والے اور تجر بہ کار وزراء پر مشتمل ایک بیسٹ ٹیم ہے۔اُنھوں نے کہا کہ اِس میں مختلف خیا لات رکھنے والی جماعتیں ایک ساتھ جمع ہو ئی ہیں اورہمیں ریاستی مفادات کو تر جیح دینی ہے۔ وزیر اعلیٰ نے اِس یقین کا اظہار کیا کہ یہ بیسٹ ٹیم ریاست کو تر قی کی بلندیوں تک لے جائے گی۔

***** ***** ***** 

  ہنگولی ضلعے کے بسمت میں کل شہر یت تر میمی قانون کی حمایت میں ریلی نکا لی گئی  ۔ اِسی طرح جالنہ ضلعے کے پر تور میں بھی کل راشٹریہ سُرکشا منچ کی جانب سےCAA کی حما یت میں ر یلی نکا لی گئی۔ پر بھنی میں بھی کل محبانِ وطن ایکشن کمیٹی کی جانب سے عوامی بیداری ریلی نکا لی گئی۔ اِن ریلیوں میں مقامی ساکنان نے بڑی تعداد میں شر کت کی۔

***** ***** ***** 

 مراٹھواڑہ میں کل ہنگولی ‘ جالنہ ‘ لاتور اور  بیڑ پنچایت سمیتیوں کے صدور اور نائب صدور عہدوں کے لیے انتخابات ہوئے۔ اِن میں  ہنگولی ضلعے میں شیو سینا ‘  جالنہ  او ر  لاتور ضلعے میں بی جے پی  جبکہ بیڑ ضلعے میں کانگریس پارٹی کو غلبہ حاصل ہوا ۔
 ہنگولی ضلعے کی پانچ میں سے تین پنچایت سمیتیوں کے صدر عہدے پر شیو سینا کو  جبکہ کانگریس پارٹی  اور  بی جے پی کو فی کس  ایک  ایک  نشست حاصل ہوئی ۔ جس میں ہنگولی پنچا یت سمیتی صدر عہدے پر شیو سینا کی سُمن بائی جھُر جھُرے ‘    سین گائوں پنچایت سمیتی صدر عہدے پر  شیو سینا کی چھا یا سنجئے ہینباڈے  ‘ اِسی طرح  اَونڈھا  شیو سینا کی ہی سنگیتا ڈھیکلے  ‘  کلمنوری  کانگریس پارٹی کی پنچ پھُلا بائی اشوک بیلے  جبکہ بسمت  پنچایت سمیتی صدر عہدے پر بی جے پی کی جیو تی وشوناتھ دھسے کا انتخاب ہوا ہے۔ 

***** ***** ***** 

 جالنہ ضلعے میں چار پنچایت سمیتیوں میں  بی جے پی  جبکہ شیو سینا  اور  این  سی  پی کو فی کس دو  دو  صدر عہدے پر کامیابی ملی ہے۔ جالنہ پنچایت سمیتی کے صدر عہدے پر شیو سینا کے ومل پاکھرے ‘  بد ناپور  شیو سینا  کی ہی شیلا شندے ‘   بھو کر دن  بی جے پی کی ویشا لی گاونڈے  ‘  پر تور  بی جے پی  کی  من کر نا یے و لے  ‘  جعفر آباد  بی جے پی کے ومل گو رے  ‘  منٹھا  بی جے پی  کی شلپا پوار ‘  عنبڑ این سی پی کے باپو رائو کھٹکے  اور گھن سائونگی پنچایت سمیتی صدر عہدے پر راشٹر وادی کانگریس پارٹی کے بھاگوت رکتاٹے منتخب ہوئے ہیں۔

***** ***** ***** 

    بیڑ ضلعے میں 6؍ پنچایت سمیتیوں پر راشٹر وا دی کانگریس -کانگریس پارٹی کا غلبہ رہا  جبکہ تین پنچایت سمیتوں میں بی جے پی کو کامیابی حاصل ہوئی۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ پاٹودا پنچایت سمیتی انتخابات کے لیے ایک بھی امید وارکی جانب سے در خواست فارم مقررہ وقت تک داخل نہیں کیے گئے  جس کی وجہ سے  اِس پنچایت سمیتی میں آج چنائو ہو گا۔
 لاتور ضلع میں بی جے پی کو7؍ اور کانگریس پارٹی کو تین پنچایت سمیتیوں کے صدر عہدے پر کامیابی حاصل ہوئی ہے۔

***** ***** ***** 

  جنوب وسطی ریلوے کے ناندیڑ دفتر سے موصولہ اطلاع کے مطا بق ناندیڑ -امرُتسر سچکھنڈ ایکسپریس آج  ناندیڑ سے صبح ساڑھے نو بجے کی بجائے دو پہر  چار بجے روانہ ہو گی۔ امرُتسر سے آنے والی گاڑی  تاخیر سے چلنے کے سبب یہ تبدیلی کی گئی ہے۔

***** ***** ***** 

 پر بھنی ضلع سینٹرل کو آپریٹو بینک کی سیلو شاخ  سے  ڈا ساڑا شاخ کی جانب   رقم لے جا رہے بینک ملازم کی آنکھوں میں   مرچ کا سفوف پھینک کر چور اُن کے پاس سے تین لاکھ روپئے لوٹ کر فرار ہو گئے۔یہ واردات کل پاتھری راستے پر دیول گائوں پاٹی کے قریب پیش آئی۔

***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****



Ø  महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांना शपथ

Ø  आपले मंत्रिमंडळ ही अनुभवी आणि उत्तम नेत्यांची “बेस्ट टीम” - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ø आठ जानेवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

आणि

Ø ंचायत समिती सभापती निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेना, जालना आणि लातूर जिल्ह्यात भाजप तर बीड जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचं वर्चस्व

****



 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील यांनी, तकाँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख, के. सी. पाडवी, अस्लम शेख यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.



      शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड, गुलाबराव पाटील, अनिल परब, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख, आणि आदित्य ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.



 राज्यमंत्री म्हणून, शिवसेनेचे अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, तर काँग्रेसचे सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काल शपथ घेतली.

****



 जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेलो असलो, तरी राज्यासाठी हिताचा विचार आपल्याला करायचा आहे, आपली ही बेस्ट टीम राज्याला अधिक प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



 दरम्यान, येत्या आठ जानेवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३३४ नुसार अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसभा तसंच विधानसभेत आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय संसदेनं संमत केला आहे, या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.

****

 मुख्यमंत्र्यांनी राज्यात नागरिकता सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे स्वत: मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढण्याची भाषा बोलत होते, त्यावर त्यांनी कायम राहावं असं आठवले म्हणाले.

****



 नागरिकत्व कायद्याचा प्रारंभ कॉंग्रेस पक्षाच्या काळातच झाला, मात्र आता या कायद्यातील तरतुदी बाबत काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. घुसखोरांना नागरिकत्व देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा अट्टहास असल्याचं सांगत, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात राबवल्या जात असलेल्या मोहिमेला  जनजागरण अभियान राबवून उत्तर दिलं जाईल, असं चौहान यांनी सांगितलं.

****



 नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत काल शिवप्रतिष्ठानतर्फे जनजागृती फेरी काढण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी या रॅलीला पाठिंबा दिला होता. संघटनेचे मार्गदर्शक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराज, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आदी नेते सहभागी झाले होते.

****



 हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली या फेरीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



 परभणी इथं राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्यावतीने काल जनजागरण फेरी काढण्यात आली. विविध पक्ष, संघटना, तसंच महिलांनी या जनजागरण फेरीत सहभाग घेतला.



 जालना जिल्ह्यात परतूर इथंही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली. उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात, त्यांचे अनुकरण आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉ. शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भागवत बोलत होते. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या. निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य उदासीनता दूर ठेवतं, हेबाळकर कुटुंबाने निरपेक्ष भावनेनं राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं, या शब्दांत शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला. शरद हेबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शरयू हेबाळकर यांचा यावेळी शाल आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हेबाळकर यांनी अंबाजोगाईकरांच्या कायम ऋणात राहू, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

****



 मराठवाड्यात काल हिंगोली, जालना, लातूर आणि बीड इथं पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात शिवसेना, जालना आणि लातूर जिल्ह्यात भाजप तर बीड जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे.



 हिंगोली जिल्ह्यातील पाचपैकी तीन पंचायत समित्यांची सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक सभापती पद मिळवता आलं. हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे, सेनगाव -शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे, औंढा - शिवसेनेच्या संगीता ढेकळे, कळमनुरी - काँग्रेसच्या पंचफुलाबाई अशोक बेले, तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे .



 जालना जिल्ह्यात जालना पंचायत समिती वगळता उर्वरित सात ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. जिल्ह्यात चार जागांवर भाजप, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली. जालना पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे, बदनापूर - शिवसेनेच्या शिला शिंदे, भोकरदन - भाजपाच्या वैशाली गावंडे, परतूर - भाजपाच्या मनकर्णा येवले, जाफराबाद - भाजपच्या विमल गोरे, मंठा - भाजपाच्या शिल्पा पवार, अंबड - राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव खटके, तसंच घनसावंगी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली आहे.



 लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांपैकी भाजपनं सात तर काँग्रेसनं तीन पंचायत समित्यांची सभापतीपदं पटकावली.



 लातूर पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसच्या सरस्वती पाटील, औसा काँग्रेसच्या अर्चना गायकवाड, आणि जळकोट पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसचे बालाजी ताकबीडे बिनविरोध निवडून आले.



 निलंगा पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपच्या राधा सुरेश बिरादार, शिरुर अनंतपाळ भाजपचे डॉ नरेश चलमले, देवणी भाजपच्या चित्रकला बिरादार, चाकूर भाजपच्या जानाबाई बडे, रेणापूर भाजपचे रमेश सोनवणे, अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपच्या गंगासागर जाभाडे हे सर्व जण बिनविरोध निवडून आले.



 उदगीर पंचायत समितीत भाजपाचे दोन सदस्य फुटल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपाला समसमान मतं मिळाली, त्यामुळे इथे चिठ्ठी काढून निर्णय झाला, यात सभापती पदी भाजपाचे विजय पाटील विजयी झाले. अहमदपूर इथं उपसभापतीपदाच्या निवडणुकीत समसमान मतं पडल्यानं चिठ्ठी काढण्यात आली, त्यात भाजपा बंडखोर बालाजी गुट्टे विजयी झाले.



 देवणी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी दोन अवैध ठरले तर एकाने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक आज होण्याची शक्यता आहे.



 बीड जिल्ह्यातल्या अकरा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती यांच्या निवडी सोमवारी झाल्या. दहापैकी सहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस- काँग्रेस यांचं वर्चस्व राहिलं असून तीन पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पाटोदा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज वेळेत पोहचला नाही, त्यामुळे ही निवडणूक आज होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या स्वातंत्र्यसैनिक चंदाबाई जरीवाला यांचं रविवारी रात्री अमेरिकेत न्यू जर्सी इथं निधन झालं, त्या ९६ वर्षांच्या होत्या. गेली चार वर्षे त्यांचं अमेरिकेत मुलाकडे वास्तव्य होतं. त्यांच्या पार्थिव देहावर न्यू जर्सी इथंच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू शाखेतून डासाळा इथल्या शाखेत रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोख तीन लाख रुपये चोरट्यांनी लुटून नेले.  पाथरी रस्त्यावर देऊळगाव पाटीजवळ काल सकाळी ही घटना घडली.

****



 सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी शाखेतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक कोटी ६६ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचं काल उघडकीस आलं.

****



 औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदार संघाची अंतिम यादी काल जाहीर करण्यात आली. ही यादी विभागीय आयुक्त कार्यालय, विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयं, उप-विभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2019 07.10AM

Monday, 30 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2019 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, आणि राजेश टोपे यांच्यासह १४, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख, बाळासाहेब पाटील, के. सी. पाडवी यांच्यासह  १० आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

      शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड, गुलाबराव पाटील, अनिल परब, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आणि आदित्य ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली.
****

 कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राची कालेकर या विजयी झाल्या आहेत. १५०० हून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दहा जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

 हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अरुणकुमार जानवेकर विजयी झाले आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. पाचपैकी तीन पंचायत समित्यांची सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक सभापती पद मिळवता आलं. हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे, सेनगाव -शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे, औंढा - शिवसेनेच्या संगीता ढेकळे, कळमनुरी - काँग्रेसच्या पंचफुलाबाई अशोक बेले, तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे .
****

 जालना जिल्ह्यातल्या आठही पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. जालना पंचायत समिती वगळता सर्व ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. जिल्ह्यात चार जागांवर भाजप, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली. जालना पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे, बदनापूर - शिवसेनेच्या शिला शिंदे, भोकरदन - भाजपाच्या वैशाली गावंडे, परतूर - भाजपाच्या मनकर्णा येवले, जाफराबाद - भाजपच्या विमल गोरे, मंठा - भाजपाच्या शिल्पा पवार, अंबड - राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव खटके, तसंच घनसावंगी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली आहे.
****

 देशाच्या वनक्षेत्रात १८८ चौरस किलोमीटरने वाढ होऊन, वनाच्छादित जमिनीचं प्रमाण आता सुमारे २५ टक्के झालं आहे. पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज देशातल्या वनांची स्थिती सांगणारा अहवाल जारी केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
****

 देशाच्या शाश्वत विकास निर्देशांकात सुधारणा झाली असून, हा निर्देशांक ५७ वरून ६० झाला आहे. जल, स्वच्छता, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे ही सुधारणा झाल्याचं, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी सांगितलं. कुपोषण आणि लिंगभेद या दोन बाबींमध्ये अजुनही सुधारणा आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****

 नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनात रेल्वेचं सुमारे ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या आंदोलनात सहभागी असणाऱ्यांकडून या नुकसानाची भरपाई केली जाणार असल्याचं, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी सांगितलं. नुकसानाला जबाबदार लोकांचा तपास सुरू असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****

 नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आज शिवप्रतिष्ठानतर्फे संदेश फेरी काढण्यात आली. संघटनेचे मार्गदर्शक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराज, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आदी नेते सहभागी झाले होते.
****

 हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य संदेश फेरी काढण्यात आली या फेरीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 जालना जिल्ह्यात परतूर इथंही आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली. उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2019 18.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत असून, यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण २५ कॅबिनेट मंत्री तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. विधान भवनाच्या प्रांगणात होत असलेल्या या शपथग्रहण समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या विस्तारात मराठवाड्यातून अनेकांची वर्णी लागत असून, यामध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.



या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्रिपदं मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे.

*****

२०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज इंग्लंड इथल्या आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्थेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल ‘२०२०’ या नावाच्या या अहवालात २०२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सवर पोहोचेल तर २०३४ पर्यंत जपानला मागे टाकत भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलं आहे.

२०१९ या वर्षात फ्रान्स आणि ब्रिटन यांना मागे टाकत भारत जगातली पाचव्या क्रमाकाची मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. या अहवालासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक दृष्टीकोनाची माहिती आधारभूत मानली आहे.

****

नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे.  या निर्देशांकामध्ये  २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचा आढावा असेल. नीती आयोग डॅशबोर्ड २०१९-२० अर्थात ‘डिजिटल माहिती फलक’ सुद्धा जारी  करणार असून त्यामध्ये शंभर मानकांवर आधारित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचं परिक्षण केलं जाईल. हे मानक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं तयार केलं आहे.

****

आर्यंलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या वराड या आपल्या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची वराड या गावाची ही पहिली भेट असल्याचं त्यांच्या मुंबईतल्या नातेवाईंकांनी सांगितलं. गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमानं आणि आपुलकीनं लिओ याचं स्वागत केलं. लिओ यांचे वडिल अशोक वराडकर यांनी ६० च्या दशकात इंग्लंडमधे स्थलांतर केलं होतं.

****

सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना-महाविकास आघाडीच्या बाबू कुडतरकर यांचा ३१३ मतांनी पराभव केला. परब यांना ४ हजार ४८८ तर कुडतरकर यांना ४ हजार १६८ मतं मिळाली. 

****

रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप साळवी एक हजार १८२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा पराभव केला. प्रदीप साळवी यांना १० हजार सात, तर पटवर्धन यांना आठ हजार ८२५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कीर यांना तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार २५२ मतं मिळाली.

****

पालघर इथं आज नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मंचच्यावतीने संदेश फेरी काढण्यात आली आहे. अनेक व्यावसायिक तसंच दुकानदार आज आपली प्रतिष्ठानं सकाळच्या वेळेत बंद ठेवून या संदेश फेरीत सहभागी झाले. सर्वसामान्य नागरिकांचाही या फेरीत लक्षणीय सहभाग होता.

****

सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. साखर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याचं देयक अदा करणं बंधनकारक आहे. मात्र कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही उसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. रास्त आणि किफायतयशीर दर - एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे मान्य करून कारखाने सुरू करण्यात आले. मात्र आता एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासाठी  शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेतली जात आहेत, अशी संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


आकाशवाणी औरंगाबाद – सोलापूर जिल्हा वार्तापत्र दिनांक– ३०.१२.२०१९

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 30.12.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 30.12.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० डिसेंबर २०१ सकाळी ११.०० वाजता

****

महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे.  विधानभवनाच्या प्रागंणात दुपारी एक वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाविकास आघाडी सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री, पद आणि गॊपनीयतेची शपथ घेतील. तर काँग्रेस पक्षाचे दहा मंत्री शपथ घेणार आहेत, यामध्ये अशोक चव्हाण, के.सी.पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, असलम शेख, सतेज पाटील, आणि विश्वजीत कदम यांचा समावेश आहे.

****

राज्य पोलीस अकादमीच्या उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा दीक्षांत सोहळा आज नाशिक इथं होत आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल उपस्थित आहेत.

****

आझाद हिंद सेनेनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते अंदमानात पहिला ध्वज फडकवण्य़ात आल्याच्या क्षणाचा ७६ वा वर्धापन दिन आज पोर्ट ब्लेअर इथं साजरा झाला. लेफ्टनंट गव्हर्नर अ‍ॅडमिरल डी.के. जोशी तसंच आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दुचाकी फेरी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. साखर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याचं देयक अदा करणं बंधनकारक आहे. मात्र कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही उसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. रास्त आणि किफायतयशीर दर - एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे मान्य करून कारखाने सुरू करण्यात आले. मात्र आता एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासाठी  शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेतली जात आहेत, अशी संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 30.12.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 December 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍دسمبر ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 ریاست کے وزیر اعلیٰ اُدّھو ٹھا کرے کی زیر قیادت مہا وِکاس آ گھاڑی حکو مت کی کا بینہ میں پہلی توسیع آج ہو گی۔ وِدّھان بھون کے احا طے میں دو پہر ایک بجے یہ حلف بر داری تقریب عمل میں آئے گی  اور  کل 36؍ نئے وزراء کو گور نر بھگت سنگھ کوشیاری عہدے اور راز داری کا حلف دیں گے۔ مجلس وزراء کی اِس توسیع میں شیو سینا اور این سی پی کے10-10؍ کا بینی  اور  3-3؍ مملکتی وزراء حلف اٹھائیں گے۔ جبکہ کانگریس کی جانب سے 8؍ کا بینی اور 2؍ وزیر مملکت حلف لیں گے۔ کل شام تینوں پارٹیوں کے ممکنہ وزراء کے ناموں کو قطعیت دے دی گئی اور وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے یہ تمام نام گور نر کو اِرسال کر دیئے ہیں۔
 حلف بر دا ری تقریب کے بعد وزیر اعلیٰ تمام نئے وزراء میں قلمدان تقسیم کریں گے۔ کا بینہ میں تینوں پارٹیوں کی جانب سے چند نو جوان چہروں کو موقع دیئے جانے کا امکان ہے۔

***** ***** ***** 

 وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ نئی نسل سے ملک کو بہت زیادہ امیدیں ہیں اور یہ نئی نسل ہی ملک کو نئی اونچا ئیوں پر لے جائے گی۔ آکاشوانی پر من کی بات سلسلے کے60؍ ویں پر و گرام میں وہ عوام سے مخاطب تھے۔ اُنھوں نے کہا کہ 2؍دو نوں میں نیا سال شروع ہو رہا ہے۔ اور ہم اکیسویں صدی کی تیسری دہائی میں داخل ہو رہے ہیں۔ اکیسویں صدی کی سو شل میڈیا کی یہ بہ صلا حیت نئی نسل ملک کی تر قی کو تیز کرنے میں سر گرم کر دار ادا کرے گی۔ وزیر اعظم نے ملک کی عوام کو نئے سال کی پیشگی مبارکباد بھی دی۔

***** ***** ***** 

 مرکزی وزیر داخلہ امیت شاہ نے کہا ہے کہ مسلح افواج کاہر جوان سال میں سے100؍ دن اپنے خاندان کے ساتھ گزار سکے اِس کے لیے حکو مت اپنے عہد کی پا بند ہے۔ کل نئی دہلی میں CRPFکے ڈرائریکٹوریٹ کی عما رت کا سنگ بنیاد رکھنے کے لیے منعقدہ تقریب سے وہ خطاب کر رہے تھے۔ اُنھوں نے ریاستی حکومتوں کو ترغیب دی کہ حفا ظتی دستے کے جوانوں کے اہل خانہ میں صحت کا رڈ تقسیم کیے جا ئیں ۔

***** ***** ***** 

 جھار کھنڈ مُکتی مورچہ کے رہنما ہیمنت سو رین نے کل رانچی میں جھار کھنڈ کے گیارہویں وزیر اعلیٰ کی حیثیت سے حلف لیا۔ گور نر دروپدی مُرمونے  اُنھیں عہدے اور رازداری کا حلف دیا۔ ہیمنت سورین کے ساتھ کانگریس کے ڈاکٹر رامیشور اُرائوں‘ عالمگیر عالم اور  راشٹر یہ جنتا دل کے رکن اسمبلی سیتا نند بھو تکا نے بھی کا بینی وزیر کی حیثیت سے حلف لیا۔

***** ***** ***** 

 مقبول بزرگ اداکار امیتابھ بچن کو کل نئی دہلی میں صدر جمہوریہ رام ناتھ کو وِند نے دادا صاحب پھالکے ایوارڈ تفویض کیا۔ یہ ایواڈر طلائی کنول اور 10؍لاکھ روپئے نقد پر مشتمل ہے۔ ایوارڈ حاصل کرنے کے بعد تقریب سے خطاب کر تے ہوئے امیتابھ بچن نے حکو مت ‘شوزارت اطلا عات و نشر یات  اور ایوارڈ  کے لیے اداکاروں کا انتخاب کرنے والی کمیٹی کا شکریہ ادا کیا۔ طبیعت نا ساز ہونے کے سبب امیتابھ بچن قومی فلم ایوارڈ کی تقریب میں شریک نہ ہو سکے تھے۔

***** ***** ***** 

 سابق وزیر اعلیٰ اور اسمبلی میں حزب اختلا ف کے قائد دیویندر پھڑ نویس نے الزام عائد کیا ہے کہ ریاستی حکو مت نے قر ض معا فی کے لیے قیود و شرائط لگا کر کسا نوں کے ساتھ جعلسازی کی ہے ۔ ناسک میں کل آیوشمان بھارت یوجنا کے تحت کارڈ تقسیم کرنے کے سلسلے میں منعقدہ اجتماع سے خطاب کر رہے تھے۔
 بیلگام میں مراٹھی باشندوں کے مسئلے پر اُنھوں نے کہا کہ مراٹھی شخص مراٹھی باشندوں کے ساتھ ہی رہے گا۔

***** ***** ***** 

 بزرگ سما جی کار کن اناّ ہزارے نے وزیر اعظم نریندر مودی سے مطالبہ کیا ہے کہ ملک میں خواتین پر ہونے والے مظا لم کے خا طیوں کو جلد سے جلد سزا دینے کے لیے ایک مستحکم قانون وضع کیا جائے۔ اُنھوں نے کہا کہ حیدر آ باد میں عصمت دری کے ملزم کی مبینہ پولس مقابلہ آرائی میں موت اور عوام کی جانب سے اِس وار دات کی حما یت اِس بات کی بین ثبوت ہے کہ عوام کا اعتماد عدلیہ پر سے اُٹھتا جا رہا ہے۔ وزیر اعظم کو اِرسال کر دہ اپنے مکتوب میں اُنھوں نے کہا کہ جب تک نِر بھیا معاملے کے مجرموں کو پھانسی نہیںہو جا تی تب تک وہ اپنا مون ورت قائم رکھیں گے۔

***** ***** ***** 

 سانگلی ضلع میں مہاراشٹر -کرنا ٹک سر حد پر کل شیو سینا اور کنڑ رکشن ویدیکا سنگٹھن کے کار کن آمنے سامنے آ گئے  اور دو نوں جانب سے زور دار نعرے بازی کی گئی۔ مہا راشٹر کر نا ٹک سر حد پر شیو سینکوں نے بھیم شنکر پاٹل کی شبیہہ نذر آ تش کی۔ جواب میں کنڑ رکشن ویدیکا کے کار کنوں نے وزیر اعلیٰ اُدّھو ٹھا کرے کا علا متی پُتلا نذر آتش کیا۔
 دریں اثناء مہاراشٹر کر ناٹک سر حد ی تنازعے پر جا ری مظاہروں کے پیش نظر سانگلی سے جانے والی ایس ٹی بسیں بند کر دی گئی ہیں۔

***** ***** ***** 

 ہندوستانی خاتون گرینڈ ماسٹر کونیروہمپی نے تیز رفتار شطرنج مقابلوں میں عالمی چیمپن شپ جیت لی ہے۔ روس کے ماسکو میں اُنھوں نے فائنل میں کل چین کی لی تنگ جی کو شکست دی۔

***** ***** ***** 

 اورنگ آباد میں بی بی کا مقبرہ احا طے میں کل ہیریٹج واک منعقد کی گئی۔ اِس میں ماہر تاریخ ڈاکٹر دُلا ری قریشی اور ڈاکٹر رفعت سعید قریشی نے بی بی کے مقبرے سے متعلق رہنما ئی کی۔

***** ***** *****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 30.12.2019, Time : 8.40 - 8.4...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.12.2019 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

** महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार; ३६ मंत्री घेणार शपथ

** देशाला तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

** ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित

आणि

** भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, रॅपिड बुद्धिबळ प्रकारात विश्वविजेती

****

राज्यातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. विधानभवनाच्या प्रागंणात दुपारी एक वाजता  हा  शपथविधी सोहळा होणार असून एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शपथ देतील. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री,  पद आणि गॊपनीयतेची शपथ घेतील. तर काँग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला काल अंतिमरूप देण्यात आलं असून त्या सर्वांची नावं मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांकडे सोपवली आहेत. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांचं खातेवाटप मुख्यमंत्र्यांकडून केलं जाईल. मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांकडून काही तरूणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

****

देशाला तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. या तरुणांनीच देशाला नवीन उंचीवर न्यायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी काल देशवाशियांशी संवाद साधला. या मालिकेचा साठावा भाग काल प्रसारित झाला.

दोन दिवसांत २०२० हे नवीन वर्ष सुरू होणार असून, आपण २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार असल्याचं ते म्हणाले. २१ व्या शतकातली ही सोशल मीडियाची, प्रतिभावान पिढी, देशाच्या विकासाला गती देण्यात सक्रिय भूमिका बजावेल, असंही पंतप्रधान म्हणाले. एखादी व्यवस्था योग्य रीतीनं काम करत नसेल, तर आजचे युवक अस्वस्थ होतात आणि धैर्यानं व्यवस्थेला जाब देखील विचारतात, हे आपल्याला चांगलं लक्षण, वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह - चला पुढे जाऊया, असं सांगून पंतप्रधानांनी, देशवाशियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

****

निमलष्करी दलातला प्रत्येक जवान वर्षातले शंभर दिवस तरी आपल्या कुटुंबासोबत घालवू शकेल, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महानिदेशालयाच्या इमारतीची पायाभरणी करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबांची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं असून, राज्य सरकारला जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य कार्ड उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवानांना घराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही एक समिती गठित केली आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी, काल रांची इथं झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी, सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे डॉक्टर. रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

****

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना काल नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सुवर्ण कमळ आणि दहा लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. बच्चन यांनी यावेळी सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच निवड समितीचे आभार मानले. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते.

****

राज्य सरकारनं कर्जमाफी देताना अटी शर्ती लागू करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक इथं काल आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्मान भारत ही योजना पारदर्शी योजना असल्याचं फडणवीस म्हणाले.  

दरम्यान,  बेळगाव मधल्या मराठी माणसाच्या प्रश्नावर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असं स्पष्ट केलं.

****

देशात महिला अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरता सक्षम कायदा तयार करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हैदराबाद प्रकरणातल्या आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू होण्याला देशातल्या जनतेनं समर्थन देणं, यातून लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला असल्याचं दिसून येतं, असं हजारे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपलं मौन व्रत सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली. किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसंच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलं.

****

सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर काल शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचं तिरडी मोर्चा काढून दहन केलं. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

दरम्यान, महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमा भागातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली इथून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. कन्नड भाषिक नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना गोळ्या घाला, असं वक्तव्य केल्यामुळे सीमेलगतच्या भागात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीकडून कर्नाटकात येणाऱ्या बसेस काल सकाळपासून बंद झाल्या आहेत. तसंच या मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात कालही राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

नाशिक शहरात या कायद्याच्या समर्थनार्थ १६ ठिकाणी मानवी साखळी करण्यात आली होती. अकोला इथंही काल समर्थन रॅली काढण्यात आली, तर  धुळे शहरातही भारतीय जनता पक्ष, विविध हिंदुत्ववादी संघटना तसंच या कायद्याला समर्थन देणाऱ्या नागरिकांनी मोर्चा काढून, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात मक्रणपूर इथं आज एक्यांशीवाव्यामक्रणपूर परिषद आणि जयभीम दिनाचंआयोजन करण्यात आलं आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहन- धम्मोपदेशनंतर ज्येष्ठ विचारवंत दत्ता भगत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं  उद्घाटन होईल. ज्येष्ठ विधिज्ञ डी. एन. संदानशिव परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यावेळी साहित्यक शिल्पा कांबळे यांना स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे साहित्य पुरस्कार आणि  भादोला इथले आंबेडकरी  जलसाकार जनार्दन गवई यांना भाऊसाहेब मोरे प्रबोधन पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

बीड जिल्ह्यातल्या ११ पंचायत समिती सभापती- उपसभापतींची आज निवडणूक होत आहे. यामध्ये  शिरूर पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती - महिला, परळी- इतर मागासवर्गीय, माजलगावसह  आष्टी- इतर मागासवर्गीय महिला, तसंच गेवराई,धारूर,बीड याठिकाणी  खुल्या तर केज, अंबाजोगाई, पाटोदा, वडवणी इथं खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं आहे.

****

भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, रॅपिड बुद्धिबळ प्रकारात महिला विश्वविजेती ठरली आहे. रशियात मॉस्को इथं झालेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या ली तिंगजी हिला अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं.

****

औरंगाबाद इथं बीबी का मकबरा परिसरात इतिहासप्रेमींनी काल हेरिटेज वॉकचं आयोजन केलं होतं. यात इतिहास तज्ज्ञ डॉक्टर. दुलारी  कुरैशी आणि डॉक्टर रफत कुरैशी यांनी बीबी का मकबऱ्याविषयी इतिहासप्रेमींना मार्गदर्शन केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या वाडी मुक्त्यारपूरचे रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख यांचं काल निधन झालं, ते ९५ वर्षाचे होते. साहेबराव देशमुख यांनी निजाम सत्तेविरूध्द झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर आज मुक्त्यारपूर वाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

औरंगाबाद-जालना महामार्गावर गेवराई बाजार फाट्यावर जेसीबी घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा काल अपघात झाला. यात दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे जण जखमी झाले आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दूधपुरी इथं शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. सिद्धेश्वर रामकिसन धांडे, शुभम कल्याण पाटोळे अशी मृतांची नावं असून, दोघेही परवा सायंकाळपासून बेपत्ता होते.

****

नाशिक-पंचवटी एक्सप्रेसला पर्याय म्हणून मनमाड ते मुंबई ही राज्यराणी इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, आता ती मनमाडऐवजी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी काल नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शनं केली. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं काल अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या तिसऱ्या लेखक- प्रकाशक संमेलनाचा समारोप झाला. साहित्यिक चळवळीला शासनाची ही भरीव मदत मिळाली पाहिजे, असं मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी समारोप समारंभात व्यक्त केलं. पुढचं लेखक प्रकाशक संमेलन नाशिक इथं होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

****