आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जून २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
२५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १५१ पुरूष आणि १०१ महिला आहेत. आतापर्यंत
एकूण पाच हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून दोन हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले
आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २६०७ रुग्णांवर उपचार सुरू
असल्याचं जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १६
रूग्णांची कोरोनावर मात केली यात ८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या एका मुलीचा तसंच
अहमदनगर शहरातल्या १३ आणि संगमनेर, जामखेड तसंच अकोले तालुक्यातल्या प्रत्येकी एका
रूग्णाचा समावेश आहे सध्या १०१ रूग्णांवर उपचार सुरू असून आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना
अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.
****
मिरज इथल्या कोविड रुग्णालयात
प्लाझमा उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती
वाढण्यास आणि मृत्यूदर कमी होण्यास ही उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे. प्लाझमा द्यायला
तयार असणाऱ्या शंभर जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळणारा प्लाझमा
संग्रहित करून ठेवला जाणार आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरजेनुसार हा प्लाझमा
दिला जाणार आहे.
****
मुंबई इथल्या ताज हॉटेल आणि
परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल पाकिस्तानच्या कराची शहरातून हे
हॉटेल बाँम्बनं उडवून देण्यासंदर्भातला फोन आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था
वाढवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
****
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे तीन वाजता
विठ्ठल रुख्माईची शासकीय महापुजा केली जाणार आहे. यासाठी आज ते पंढरपूरला पोहोचणार
आहेत. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द करण्यात
आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार
आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर संदेशाद्वारे
ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment