आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ डिसेंबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
राज्याच्या
आर्थिक स्थितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून मागितला आहे,
विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना याबाबत त्यांनी माहिती दिली.
राज्याची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यावरच पुढचे निर्णय घेणं सोपे जाणार असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
त्याचबरोबर
आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेशही
देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेवर येताच
ठाकरे
यांनी आरेतल्या मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता आंदोलकांवरचे
गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे,
अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या एक-दोन दिवसात खाते वाटप
जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान,
मेट्रो रेल्वेसाठीचं कारशेड गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या कवायत मैदानावर
उभारण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक
यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की, १०२ हेक्टर्सची ही जागा असून सध्या या मैदानावर
केवळ लग्न सोहळे होत आहेत. कारशेडसाठी केवळ ५२ हेक्टर्स जागेची आवश्यकता असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला ४० हजार कोटी रुपये परत केले आहे. केंद्र
सरकारनं दिलेला हा निधी वाचवण्यासाठीच फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती
असा आरोप भाजपचे खासदार अनंत हेगडें यांनी केला आहे. नव्या सरकारला हा निधी मिळु नये
म्हणुन हा बनाव केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,
विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी हा आरोप फेटाळुन लावला आहे.आपण शेतकऱ्यांना ८० तासांत
५ हजार कोटींची मदत केली असल्याचं त्यांनी
सांगितलं. शेतकी मदतीशिवाय दुसरी कोणताही निर्णय घेतला नाही असं त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात
सांगितलं.
****
संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापीठानं या वर्षीच्या परिक्षांच्या ३८ विषयांचे निकाल आज जाहीर केले आहे.
****
No comments:
Post a Comment