Saturday, 30 September 2017

AIR NEWS AURANGABAD PRASANGIK 30.09.2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.09.2017 17.25

Text-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.09.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज लडाखला सीमारेषेवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी खोऱ्यामध्ये अनेक भागांना भेटी दिल्या असून घुसखोरी रोखण्यासाठी उत्तर काश्मीरमधल्या भक्कम व्यवस्थेचा आढावा घेतला. सैन्यानं पोलिस दल आणि केंद्रीय सशस्र पोलिस दलासोबत निर्माण केलेल्या समन्वयाबद्दल त्यांचं कौतुकही केलं. सितारामन यांनी नंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.

दरम्यान, सितारामन यांनी लेहमध्ये प्रथम श्योक पुलाचं उद्घाटन केलं. हा पुल लेह ते काराकोरमला जोडणारा असून सैन्य दलाच्या वाहतूकीसाठी ठरणार आहे.

****

मुंबईत एलफिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरीत झालेल्या २३ जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपनगरीय रेल्वेमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज रेल्वे मंडळाची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत स्थानकावरून चालत जाण्यासाठीचे पुल हे आता प्रवाशांची सुविधा म्हणून नव्हे तर बंधनकारक म्हणून असतील, असे निर्देश गोयल यांनी दिलेत. तसंच ज्या स्थानकावर अधिक गर्दी असते अशा ठिकाणी अधिकच्या लिफ्ट बसवण्याचे निर्देशही गोयल यांनी यावेळी दिले.

****

बुलेट ट्रेन प्रकल्प हा विमुद्रीकरणासारखा प्रयत्न ठरणार असून त्याऐवजी या योजनेसाठीचे एक लाख कोटी रूपये रेल्वे सुरक्षेवर खर्च करण्यात यावेत असं काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या कालच्या दुर्घटनेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट सेवा ही काही सामान्य लोकांसाठी नसून उच्चभ्रू लोकांसाठी करण्यात येत असलेली सोय असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

****

दरम्यान, या प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या स्थानकावरचा पुल खूप अरुंद असल्याची तक्रार नागरिकांनी याआधी केली होती, मात्र सरकार आणि रेल्वेकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २३ झाली आहे. सत्येंद्रकुमार कनोजिआ यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ अधिक गतिमान करावी, असं आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आज संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी, कामगारांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्याकरता लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं जानकर यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे आज सकाळी अकरा वाजता अर्ध्या फूटानं उघडण्यात आले. नदीपात्रात दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागच्या वतीनं सांगण्यात आलं. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून जलशयात पाण्याची आवक चालूच असल्यामुळे विसर्गात वाढही करण्यात येऊ शकते. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही प्रत्येकी एक हजार आणि चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

परभणी इथं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी पंचरंगी ध्वजास मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनंही दसऱ्यानिमित्त परभणी इथं पथसंचलन करण्यात आलं. 

****

 ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जालना शहरात येत्या दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतचं नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. एक दिवस स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी ‘झिरो कचरा सप्ताह’ राबवून आठवडाभरात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शहरात दररोज निघणाऱ्या ८० टन कचऱ्यापैकी ६० टन कचऱ्याचं नियमित संकलन केलं जातं, उर्वरित २० टन कचरा खासगी एजन्सीची नेमणूक करून संकलित केला जाईल, असं नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी यावेळी सांगितलं.

****


केंद्र शासनाच्या स्वच्छ दर्पण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दोन ऑक्टोबरला  नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गावागावात आणि घरोघरी शौचालय उभारणीसाठी जनजागृती व्हावी, तसंच सार्वजनिक स्वच्छता वाढावी यासाठी केंद्रशासनानं 'स्वच्छ दर्पण' ही स्पर्धा जाहीर केली होती.

****


AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2017 13.00

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

सरकारनं काही राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती भवनानं आज याबाबत निवेदन जारी केलं. बिहारचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांची, तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारी लाल पुरोहीत, मेघालयच्या राज्यपालपदी गंगा प्रसाद, अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी ब्रिगेडीयर बी डी मिश्रा यांची, अंदमान आणि निकोबारचे राज्यपाल म्हणून ॲडमिरल देवेंद्र कुमार जोशी, तर आसामच्या राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्व नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.

****

लोकसभा आणि राज्यांच्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची पावती देणारी व्ही व्ही पॅट मतदान यंत्रंच वापरण्यात यावीत असे निर्देश केंद्रीय निवडणुक आयोगानं दिले आहेत. या आशयाचं पत्र निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना पाठवलं आहे. यापुढे मतदानासाठी व्ही व्ही पॅट यंत्रंच वापरण्यात येतील अशी ग्वाही तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी मार्चमध्येच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली होती. सध्याच्या मतदान यंत्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता अशी यंत्रं वापरण्यात यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही होते.

****

रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून भविष्यात संकट बनू शकतात असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथं आज दसऱ्यानिमित्त आयोजित संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भार पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असं ते म्हणाले.

देशातल्या शिक्षण प्रणालीवर परदेशी प्रभावाबरोबर शिक्षण धोरणात बदल व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले. आपणच आपली भाषा कमी बोलू लागलो असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. भागवत यांनी केंद्र सरकारच्या कामकाजावर यावेळी समाधान व्यक्त केलं.

****

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकासपत्र, सुकन्या समृद्धी या सारख्या अल्पबचत योजनांसाठीच्या व्याजदरात ऑक्टोबरपासून सुरू होणार्या तिमाहीत कोणतेही बदल होणार नाहीत. या संदर्भातलं परिपत्रक अर्थ मंत्रालयानं जारी केलं. सध्या भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर सात पूर्णांक आठ दशांश टक्के, किसान विकास पत्रांवर साडे सात टक्के, तर सुकन्या समृद्धी योजनेवर आठ पूर्णांक तीन दशांश टक्के व्याज मिळतं. आता डिसेंबर अखेरपर्यंत हेच दर कायम राहतील.

****

वस्तु आणि सेवांच्या निर्यातीपूर्वी बँक हमी सादर करण्याच्या शर्तीतून लहान निर्यातदारांना वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केवळ एक प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांना निर्यात परवाना मिळवता येईल, असं काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जीएसटी संदर्भातल्या आपल्या अडचणींबाबत या निर्यातदारांच्या शिष्टमंडळानं काल अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, त्यानंतर हा निर्णय झाला.

****

दूरसंचार आयोगानं दूरसंचार कंपन्यांनी विकत घेतलेल्या पट्ट्यांसाठीची किंमत फेडण्यासाठीचा कालावधी दहा वर्षांपासून सोळा वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. दूरसंचार कंपन्यांवर लावण्यात येत असलेला दंड सौम्य प्रमाणात कमी करण्यास आयोगानं मान्यता दिली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणाचा मसूदा तयार करण्यालाही आयोगानं मान्यता दिली आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व भागांमध्ये दोन हजार आठशे सतरा दूरसंचार टॉवर उभारण्यास आयोगानं परवानगी दिली आहे.

****

मुंबईतल्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर काल घडलेली चेंगराचेंगरीची घटना अतिशय दुर्देवी असल्याचं महाराष्ट्र नननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या स्थानकावरच्या पुलाच्या रुंदीकरणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - एमएमआरडीएनं पूर्ण केलं नाही, असा आरोप मुंबई महानगरपालिकेनं केला असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. यावरुन सगळेजण आपापली जबाबदारी नाकारत असल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणाले.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १६ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात मुख्यमंत्री जाफराबाद तालुक्यातल्या अकोला देव आणि देळेगव्हाण या गावातल्या गटशेतीची पाहणी करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारनं जालना जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या सीडहब, आयसीटी, टेक्सटाईल पार्क, रेशीम कोष बाजारपेठ प्रकल्पांचा मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईनंतर देशात एकमेव जालना इथं होत असलेल्या इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी - आय सी टीच्या कॅम्पससाठी दोनशे एकर जमिनीचं हस्तांतर झालं असल्याचंही दानवे यांनी यावेळी सांगितलं.

****

AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.09.2017 11.00

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

विजयादशमी अर्थात दसरा आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा हे सत्प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तीवरच्या विजयाचं प्रतिक असून, आजही या मूल्यांचं सर्वाधिक महत्व आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपूर इथं दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला. जगाला आत्ता भारताच्या शक्तीचा परिचय होत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले. गोरक्षा, चीन, पाकिस्तान, रोहिंग्या, आदी मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.

****

धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉ.बबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना केंद्रात भंते विशुद्धानंद बोधी यांनी उपासकांना धम्मदेसना दिली. यावेळी शहर आणि परिसरातून उपासक उपस्थित आहेत. संध्याकाळपर्यंत उपासक मोठ्या संख्येनं यठिकाणी दाखल होतात. 

****

राज्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम तीन ऑक्टोबर २०१७ ते पाच जानेवारी २०१८ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. एक जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहे.

****

ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली.
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 September 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  30 ؍  ستمبر  .۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 ممبئی میںپربھادیوی اورپریل اِن دو ریلوے اسٹیشنوں کوجوڑنے والے پیدل پُل پرہوئی بھگدڑ میں22؍ افرادہلاک اور40 ؍ سے زیادہ افرادزخمی ہوگئے۔کل صبح تقریباً پونے گیارہ بجے یہ حادثہ پیش آیا۔مہلوکین میںجملہ 14؍مرداورآٹھ خواتین شامل ہیں۔ تقریباً 39؍ زخمیوں کاپریل میں کیم اسپتال میںعلاج جاری ہے۔ریلوے وَزیرپیوش گوئیل نے کل ممبئی کااپنامجوّزہ دورہ منسوخ کرکے کیم اسپتال جاکرزخمیوں کی عیادت کی اورحالات کا جائزہ لیا۔ریلوے محکمہ کی جانب سے اِس سانحہ میںمرنے والوں کے لواحقین کودس لاکھ روپئے اوررِیاستی حکومت کی جانب سے پانچ لاکھ روپیوں کی اِمدادکااعلان کیاگیاہے۔
 شدید زخمیوں کوایک لاکھ روپئے اورمعمولی زخمیوں کوفی کس 50؍ ہزارروپیوں کی مدد ظاہرکی گئی ہے۔صدرِجمہوریہ رام ناتھ کوویند، وزیراعظم نریندرمودی،وزیراعلیٰ دِیویندرپھڑنویس ، کانگریس رِیاستی صدر رُکن پارلیمنٹ اشوک چوہان نے اس سانحہ پرگہرے رنج وغم کااظہارکیاہے۔اس حادثے کی ریاستی حکومت اورریلوے محکمہ کی جانب سے جانچ کی جائے گی۔یہ بات وزیراعلیٰ نے کہی۔اسپتال میںزخمیوں سے ملاقات کرنے کے بعد وہ صحافیوں سے مخاطب تھے۔اس حادثے کے لئے ذمہ داروں کے خلاف سخت کاروائی کرنے کااشارہ دیتے ہوئے وزیراعلیٰ نے کہا کہ مستقبل میںایسے حادثات نہ ہو اس کے لئے ریلوے انتظامیہ کومختلف احتیاطی اسکیموں میں مکمل مدد کی جائے گی۔
******************************
 ریلوے وِزارت کوسب سے زیادہ محصول دینے والی ممبئی عظمیٰ ریلوے خدمات کوعلیحدہ کیاجائے اورریلوے انتظامیہ تحفّط کے لئے کوکڑکر کمیٹی کی سفارشات پرفوراً عمل درآمدکریں۔ایسا مطالبہ شیوسینا نے کیاہے۔شیوسینا چیف اُدھوٹھاکرے نے جمعہ کی صبح کیم اسپتال جاکرزخمیوں سے پوچھ تاچھ کی۔ بعدازاں اُنہوں نے یہ مطالبہ کیا۔اس حادثے کی عدالتی جانچ کرکے خاطیوں کے خلاف سخت کاروائی کرنے کامطالبہ کانگریس ریاستی صدر رکن پارلیمنٹ اشوک چوہان نے کیاہے۔ممبئی کے شہریوں کوبلٹ ٹرین کی نہیں بلکہ محفوظ لوکل سفر کی ضرورت ہے۔یہ بات چوہان نے کہی۔
******************************
 قانون ساز کونسل میںحزبِ مخالف رہنمادھننجے منڈے نے کہا کہ یہ سانحہ حکومت کی لاپرواہی کی وجہہ سے ہواہے۔خاطیوں کے خلاف حقوقِ انسانی کی خلاف ورزی کاجرم داخل کیاجائے۔اس حادثے میںمرنے والوں کے وارثوں کوریلوے میںنوکری دی جائے۔اسی طرح بلٹ ٹرین کے لئے ریاستی حکومت جوپانچ ہزارکروڑ روپئے خرچ کرنے والی ہے اسے فوراً ممبئی ریلوے کی ترمیم کے لئے استعمال کیاجائے۔ایسامطالبہ منڈے نے کیا۔
******************************
 گرام پنچایت کومضبوط کرنے والے 73؍ویں اور74؍ویں ترمیمی آئین کو25؍ سال مکمل ہورہے ہیں۔اس کے پس منظر میںریاست کے تمام گرام پنچایتوں میںیکم اکتوبرکوہونے والے خواتین اجلاس میں جنس تشخیص حمل کے خلاف حلف دلایاجائے گا۔ریاستی خواتین کمیشن کی صدر وجیاراہٹکر نے اس کی اطلاع دی۔وہ کل اورنگ آبادمیںصحافتی کانفرنس سے مخاطب تھیں۔
******************************

 ’’سوچھ بھارت‘‘ مہم کے تحت ریاست مہاراشٹر نے ملک میںبہترین کارکردگی انجام دی ہے۔سن 2018 تک کھلے میدان میں رفع حاجت سے نجات دِلانے کے لئے گائوں ۔گائوں سوچھتا کاپیغام پہنچائیں ۔ایسی اپیل پانی فراہمی اورصفائی وَزیرببن رائو لونیکر نے کی ہے۔وہ کل امرائوتی ڈیویژن کی جائزہ میٹنگ سے مخاطب تھے۔
 وجئے دشمی یعنی دسہرہ کاتہوارآج منایاجارہاہے۔گورنر سی وِدھیا ساگررائو نے اسی طرح وَزیراعلیٰ دِیویندرپھڑنویس نے ریاستی عوام کودسہرے کی مبارکبادپیش کی ہے۔اس تہوارکی وجہہ سے بھائی چارگی میںاضافہ ہویہ بات گورنرنے اپنے تہنیتی پیغام میںکہی۔
******************************
 جلگائوں میںبزرگ صحافی وِدھیادھرپانٹ کل چل بسے۔وہ 75؍برس کے تھے۔آج صبح ان کے جسدِ خاکی پرجلگائوں میںآخری رسومات ادا کی جارہی ہے۔
******************************
 یکم اکتوبر‘اختیاری بلڈڈونیشن دِن کے طورپرمنایاجاتاہے۔خون کے عطیات کے سلسلے میںبڑے پیمانے پرعوامی بیداری پیداکرنے کے نظریے سے یکم اکتوبرسے 15؍اکتوبرکے درمیان اورنگ آبادکے گورنمنٹ میڈیکل کالج اوراسپتال (گھاٹی) کے ڈیویژنل بلڈبینک کی جانب سے عوامی بیداری کے لئے مختلف پروگرامس کااہتمام کیاگیاہے۔اسپتال کے ڈین ڈاکٹر کانن یڑیکر نے کل صحافتی کانفرنس میں اس کی اطلاع دی۔ اسی بیچ گھاٹی اسپتال کااوپی ڈی آج دسہرے کی تعطیل کی وجہہ سے بندرہے گا۔تاہم کل اتوارکواوپی ڈی جاری رہے گا۔
******************************
 دہم چکرپرورتن دن آج منایاجارہاہے۔اس سلسلے میںمختلف مقامات پرمختلف پروگرامس کااہتمام کیاگیاہے۔بھارت رتن ڈاکٹر باباصاحب امبیڈکریادگاری کمیٹی کی جانب سے ناگپورمیںدیکشابھومی پراہم تقریب کااہتمام کیاگیاہے۔
******************************

30.09.2017_8.40_8.45_AM_URDU.MP3


AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2017 06.50

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१७ सकाळी .५० मि.
****
** मुंबईत प्रभादेवी इथं चेंगराचेंगरी होऊन २२ जण ठार तर ४० हून अधिक जण जखमी
** रेल्वेला सर्वाधिक महसूल देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करावी- शिवसेनेची मागणी
** राज्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये उद्या महिला सभा; गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार
** स्वच्छ भारतअभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली
आणि
** आज िजयादशमी; शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन  
**
****
मुंबईत प्रभादेवी आणि परळ या दोन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ जण ठार तर ४० हून अधिक जण जखमी झाले. काल सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एकूण १४ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. जवळपास ३९ जखमींवर परळ इथं केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी काल मुंबर्इतला आपला नियोजित कार्यक्रम रद्द करत केएर्इएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्र्यांनी दहा लाख रुपये तर राज्यशासनातर्फे पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना एक लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची राज्य शासन आणि रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाला विविध उपाययोजनांसह आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करावी, आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काकोडकर समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली, त्यानंतर ही मागणी करण्यात आली.
      या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नव्हे तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज असल्याचं, चव्हाण म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी, ही दुर्घटना म्हणजे, सरकारची अनास्था आणि बेपर्वाईनं घडवलेलं हत्याकांड असून त्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं म्हटलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्यावी, तसंच बुलेट ट्रेनसाठी राज्यशासन खर्च करणार असलेले पाच हजार कोटी रुपये तातडीने मुंबईच्या रेल्वे सुधारणेसाठी वर्ग करण्याची मागणीही मुंडे यांनी केली.
****
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. त्या काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. या सभेत होणाऱ्या ठरावांबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या...
डीपीडीसी चा जो निधी असतो, त्या माध्यमातून निदान दहा टक्के निधीची कामं ही त्या दिवशी महिलांनी सुचवावीत, ग्रामसभेनं ठराव घ्यावा, आणि निर्णय घ्यावा की आम्ही सगळे प्रयत्न करू की आमच्या शाळेतली एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही. गर्भलिंग निदान करणार नाही, आमचं गाव हे गर्भलिंग निदान कुठेही करणार नाही, त्यापासून मुक्त राहील. शौचालय बऱ्याचदा वापरलं पण जात नाही. त्यामुळे ते वापरण्याची मानसिकता व्हावी, याकरता सुद्धा प्रयत्न करण्याकरता ठराव घेण्यात यावा, असे चार ठराव, हे मी या निमित्त सगळ्यांना आवाहनही करते, सगळ्या ग्रामसभांना आणि सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना, की त्यांच्याकडच्या ग्रामसभा त्यांनी या विषयावर घ्याव्यात.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. या विशेष नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका, आणि आपले सरकार पोर्टलद्वारे प्राप्त माहितीवर समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे.
****
स्वच्छ भारतअभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली असून राज्य २०१८ पर्यंत उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा, असं आवाहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ते काल अमरावती विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शौचालय बांधकामात राज्या समाधानकारक काम झालं असून, १५ जिल्हे, १६३ तालुके, १८ हजार ग्रामपंचायती आणि २६ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
****
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. हिंदी, इंग्रजी भाषेतले अनेक चित्रपट, टीव्ही मालिका तसंच नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.पद्मश्री या नागरी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विजयादशमी अर्थात दसरा आज सर्वत्र साजरा होत आहे. ाज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणानं समाजातला बंधुभाव वृद्धींगत होवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे, तर अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन विधायकतेचा स्वीकार करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात केलं आहे.
दरम्यान, काल महानवमीला ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका तसंच बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षेसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. ुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. देवीच्या पाच दिवसांच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉ.बासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
****
नांदेड तसंच औरंगाबाद इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज कामकाज सुरू राहणार आहे. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन, वाहनांची नोंदणी करून घ्यावी, असं आवाहन, नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पैठणचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं आहे. धरणात सध्या तीन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर उजव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात होणारी अत्यल्प आवक पाहता, धरणातून अद्याप विसर्ग करण्याची शक्यता नाही, असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नाशिक शहरात काल दुपारी सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
ळगाव इथले ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांचं काल निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. आज सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर जळगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
एक ऑक्टोबर हा दिवस ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी या उद्देशानं एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या विभागीय रक्तपेढीच्या वतीनं जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाला आज दसर्ऱ्यानिमित्त सुटी असून, उद्या रविवारी बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे.
****
इंधन दरवाढीच्या निषेधासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीनं येत्या सहा ऑक्टोबरला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जारी केलेल्या एक पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३२९ गावात दोन लाख ६६ हजारावर कर्जमाफी अर्जांचं चावडी वाचन केलं जात आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायती वगळता, इतर सर्व गावांमध्ये हे अर्ज वाचन सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कर्जमाफी अर्जांवरचे आक्षेपही या दरम्यान स्वीकारले जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप न करणाऱ्या ६२५ स्वस्त धान्य दुकानांविरुद्ध  जिल्हा पुरवठा विभागानं  कारवाईचा इशारा दिला आहे. दुकानदारांना ई-पॉस मशीन हाताळण्याचे प्रशिक्षणही देऊनही काही दुकानदार अजूनही  यंत्रणेचा वापर करत नसल्यानं ही कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****


Friday, 29 September 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.09.2017_17.25

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.09.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

मुंबईत प्रभादेवी - परळ इथं झालेल्या चेंगराचेंगरीतल्या २२ मृतांपैकी १जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एकूण १४ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. जवळपास ३९ जखमींवर परळ इथं केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुंबर्इतील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करत केएर्इएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्र्यांनी दहा लाख रुपये तर राज्यशासनातर्फे पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना एक लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची राज्य शासन आणि रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्र्यांशी या दुर्घटनेबाबत आपण चर्चा केली असून, या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाला विविध उपाययोजनांसह आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल संताप व्यक्त करत, यासाठी सरकार आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत विविध यंत्रणांचा परस्पर समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनं मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. या विशेष नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका, आणि आपले सरकार पोर्टलद्वारे प्राप्त माहितीवर समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे.

****

राज्यातील ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या ‘महाखादीया दर्जेदार ब्रॅण्डला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. ग्रामोद्योगाअंतर्गत राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणी केलेल्या ग्रामीण कारागीर, उद्योजक यांच्या उत्पादनांच्या मार्केटींगसाठी ‘महाखादीया ब्रॅण्डची आज औपचारीक घोषणा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या माती तसंच लाकडाच्या वस्तू, खाद्य पदार्थ आणि इतर वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं या ब्रॅण्डचा उपयोग होणार आहे.

****

भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याकडे कोणीही राजकीयदृष्टीने पहिलेलं नाही, असं अखिल वंजारी विकास परिषदेचे ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक प्रबोधनासाठी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना समर्थन देण्याचा निर्धार अखिल वंजारी विकास परिषदेनं केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

‘स्वच्छ भारत अभियाना’ला गती देण्यासाठी मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय कार्यालयांनी स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावं, असं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्हा परिषद कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलत होते. कार्यालयांना स्वच्छता राखण्यासोबतच शासकिय दस्तऐवजांचे जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले.

****

ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. त्या आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. एकही मुलगी शाळाबाह्य न होऊ देण्यासह, प्रत्येक घरी शौचालय बांधकाम, ग्रामपंचायत विकास आराखड्यात १० टक्के निधी महिलांसाठी राखीव, आदी अनेक ठराव या महिला सभेत होणार असल्याचं, रहाटकर यांनी सांगितलं.

****

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन जम्मू काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज श्रीनगरला पोहोचल्या. या दौऱ्यात त्या आज भारत पाकिस्तान दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांना भेट देणार आहेत. उद्या चीन सीमेवर तसंच सियाचीन इथं जाऊन त्या सैनिकांशी संवाद साधणार आहेत. सशस्त्र सेनेची सज्जता तसंच राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा त्या आढावा घेतील.

****