आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 31 October 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
पुण्याजवळ रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तसंच सी डॅकचा
इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्प उभारण्याची
केंद्र सरकारची घोषणा.
·
वस्त्रोद्योग पार्कच्या मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.
·
महाविकास आघाडी सरकारच्या
काळात राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाचे पाप आमच्या
माथी मारु नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन.
·
आमदार बच्चू कडू आणि
आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटला.
·
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा माजी मंत्री आदित्य
ठाकरे यांचा आरोप.
·
लोहपुरुष सरदार
वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड.
आणि
·
माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
****
पुण्याजवळ रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची
घोषणा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
यांनी केली आहे. या क्लस्टरमध्ये दोन
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल तसंच यातून पाच हजार
रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त
केली आहे. स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याशिवाय सी डॅकचा एक इलेक्ट्रॉनिक्स
डिझाईनिंग प्रकल्पही राज्यात होणार असल्याचं चंद्रशेखर यांनी
सांगितलं. साधारण एक हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प
असणार आहे असं ते म्हणाले.
जवळपास
२९७ एकर जागेवर हे क्लस्टर उभारलं जाईल. या
प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशन कंपनीनं ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर
इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग या निमित्तानं राज्यात येतील, अशी
अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
****
राज्यात
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची घोषणा केल्याबद्दल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र
सरकराचे आभार मानले आहेत. केंद्रानं राज्याला
ही भेट दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ते म्हणाले...
महाराष्ट्राला
इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ते विकसित करतील. फ्यूचर - भविष्य हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे.
सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे एक प्रकारे
केंद्र सरकानं दिलेली ही भेटच आहे. यासोबतच लवकरच मला अपेक्षा आहे. केंद्र सरकार टेक्सटाईल
पार्क देणार आहे. आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातून एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे.
याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे. नविन वर्षात त्या संदर्भात बजेट
पर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखिल ते घोषित होवू शकतं.
राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांनी स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले...
पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की, आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही कोणाच्या काळात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलं आहे. त्यानंतर टाटा एअरबस गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करतय २०२१ ची गोष्ट आहे. हे चालले आहेत यांना थांबवलं पाहिजे परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. एक साधं पत्रही गेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असतांना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि त्याच्यावर कहर म्हणजे तर सॅफ्रॉन २०२१ मध्ये गेला त्याची फॅक्ट्री तयार झाली आहे. आणि त्यांची फॅक्ट्री तयार होवून तिचं उद्धाटन झालं. आणि इथं मात्र फेक नरेटिव्ह चालला आहे की, आमच्या सरकारच्या काळात ते गेलं.खोटं सांगावं तर त्याला काहीतरी लिमिट ठेवावी.
मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्क ड्रग पार्क राज्याला देण्याचं केंद्र सरकारनं कधीही आश्वासन दिलं नव्हतं. मात्र तरीही केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना दोष दिला जात आहे,
असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हे सगळे प्रकल्प आमच्या सरकारच्या
काळात गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं पाप आमच्या माथी मारु नका,
असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.
नाणार
रिफायनरीचा प्रकल्प रद्द झालेला नसून हा प्रकल्प राज्यातच होणार असल्याचं फडणवीस यांनी
सांगितलं. यामध्ये ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा
आहे. १ लाख थेट रोजगार, ५ लाखांपर्यंत इतर रोजगार निर्मिती
होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अमरावतीचे
आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचं उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
उपस्थितीत कडू आणि राणा यांच्यासोबत चर्चा झाली. आमदार
कडू आणि राणा यांची समजूत काढण्यात आली असून दोघांनीही रागा- रागात आपण बोलल्याचं
मान्य केलं आहे. त्यामुळे आता हा विषय संपला असल्याचं फडणवीस
म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा
प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस सांगत असलेले
फॉक्सकॉन प्रकल्प हा दुसराच असल्याचं सांगत, २०२० मध्ये
राज्याबाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल कंपनीशी संबंधित होता आणि आता
गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरशी संबंधित असून वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन हे
दोन्ही वेगवेगळे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत
समोरासमोर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. याबाबतीत मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते असंही ते यावेळी म्हणाले.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४७ वी जयंती. यानिमित्तानं देशभरात आज
एकता दिवस साजरा करत सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत पटेल
चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आज सकाळी पुष्पांजली
अर्पण केली. यानंतर गृहमंत्री शहा यांनी मेजर ध्यानचंद मैदानावर आयोजित एकता
दौडीचा शुभारंभ केला.
गुजरातमधल्या केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या हम एक है,
हम श्रेष्ठ हे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत या
कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना
एकतेची शपथ दिली.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ
युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.
राज्यातही आज सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. औरंगाबादमध्ये आयोजित एकता दौडला
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
विभागीय क्रीडा संकुल ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर ही एकता दौड झाली. यावेळी
राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन देशातली एकता आणि एकात्मता जोपासण्याचा संकल्प करण्यात
आला.
लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या
उपस्थितीत एकता दौड काढण्यात आली. देशाची अखंडता, एकता आणि अंतर्गत सुरक्षा कायम
राखणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असून, यासाठी सर्वांनी
योगदान देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
अहमदनगर,
धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, यवतमाळ, जळगाव, सोलापूर, बुलडाणा, वर्धा इथं एकता दौड
निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३८ साव्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना
सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह
पक्षाच्या अन्य नेत्यांनी दिल्लीत शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी
पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, १४ बँकांचे राष्ट्रीयकरण, पहिली अणुचाचणी असे धाडसी
निर्णय घेऊन देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी दिनी
अभिवादन, असं ट्विट करत आदरांजली वाहिली
आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – 31
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
एकता आणि
ऐक्यभावना भारताच्या जनमानसात आणि प्रत्येक अंतर्मनात खोलवर रुजलेली असून, देशाच्या
कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी त्याचा प्रत्यय दिसून येतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त
आज गुजरातमधल्या केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनाला उपस्थित राहून पंतप्रधानांनी
राष्ट्रीय छात्र सेनेच्या हम एक है, हम श्रेष्ठ हे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात
सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकतेची शपथ दिली. त्यानंतर ते बोलत होते.
भारताच्या एकतेसमोर आव्हानं उभ्या करणाऱ्या शक्ती आजही कार्यरत आहेत, अशा शक्तींना
भारतमातेची अपत्यं म्हणून आपण एकजुटीनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. धर्म,
जात, भाषेच्या आधारावर देशाचं विभाजन करणार्या नकारात्मक प्रवृत्तींपासून सावध राहण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
तत्पूर्वी
पंतप्रधानांनी केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
वाहिली.
वल्लभभाई
पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत 'एकता दौड'ला रवाना केलं.
स्वातंत्र्याच्या
शतकमहोत्सवी वर्षात भारत यशोशिखरावर उभा असेल अशा दृष्टीनं प्रत्येक भारतीयानं संकल्प
करून तसा प्रयत्न करणं, हीच सरदार पटेल यांना खरी आदरांजली ठरेल, असं शहा यावेळी म्हणाले.
राज्यातही
आज सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. औरंगाबादमध्ये आयोजित एकता दौडला केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. विभागीय क्रीडा संकुल
ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर ही एकता दौड झाली. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ
घेऊन देशातली एकता आणि एकात्मता जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.
लातूर इथं
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या उपस्थितीत एकता दौड काढण्यात
आली. देशाची अखंडता, एकता आणि अंतर्गत सुरक्षा
कायम राखणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असून, यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
धुळे, नंदुरबार,
वाशिम, भंडारा, यवतमाळ इथं एकता दौड निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी शक्ति स्थळ
या इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
ट्विटरनं
आपल्या वापरकर्त्यांच्या पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. एलन
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ही माहिती दिली. ट्विटर खात्याच्या वापरकर्त्याची
ओळख पटवल्यानंतर ट्विटरकडून त्याला ब्ल्यू टिक दिली जाते, यासाठी आता शुल्क आकारण्यात
येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
कोरडा आणि
ओला कचऱ्याबाबत जागरुकता निर्माण करण्याची मोहिम गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे
राबवली जात आहेत. या मोहिमेत ४५ हजार शाळांमधले ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी
झाले आहेत. कचरा वर्गीकरण मोहीम स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत ३२ राज्यांतल्या साडेतीन
हजार शहरी भागात आणि केंद्र शासित प्रदेशांत राबवली जात आहे.
****
दिवाळीमुळे
गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या आज पासून सुरू
झाल्या. त्यामुळे शेतमालाची आवक वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये बाजार समित्यांचं
कामकाज बंद असतं. ते सुरू झाल्यानंतर शेतमालाची आवक वाढते. सध्या कांद्याला चांगले
भाव असले तरी मर्यादित स्वरूपातच कांदा बाजारात आणावा असा आवाहन बाजार समितीच्या वतीने
करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
ते पुणे महामार्गावर औरंगाबाद मधल्या नगरनाका ते ए एस क्लब रस्त्यावरची जड वाहतूक ३१
डिसेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या महार्मावरील पुणे, अहमदनगर
ते जालना, बीड कडे जणारी जड वाहतूक महानुभाव आश्रम, जुना बीडनाका, झाल्टा फाटा, केंब्रीज
चौक मार्गे वळवण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात येणारी आणि जाणारी जड वाहतूक साजापूर
फाटा, नगरनाका या मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
फ्रेंच खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष
दुहेरीचं अजिंक्यप पटकावलं आहे. पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं चायनीज
तैपेईच्या जोडीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला.
****
१७ वर्षाखालच्या
महिलांच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद स्पनेनं पटकावलं आहे. काल झालेल्या
अंतिम लढतीत स्पनेनं कोलंबियाचा एक - शून्य असा पराभव केला.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑक्टोबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज
त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस
साजरा केला जात आहे.
नवी दिल्लीत पटेल चौक इथल्या स्मारकाला भेट देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी'
इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनात
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना एकतेची शपथ दिली. गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत
'एकता दौड'ला रवाना केलं. राज्यातही धुळे, नंदुरबार, वाशिम इथं एकता दौड निघाल्याचं
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन
करण्यात येत आहे.
****
गुजरातमध्ये मोरबी इथल्या मच्छू नदीवरचा झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या
मृतांची संख्या १४० वर पोहोचली आहे. सुमारे १७० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हा पूल
नुतनीकरणानंतर पाचच दिवसांपूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात आला होता. या दुर्घटनेमागच्या
कारणांची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
****
भारतीय विद्यार्थ्यांना फूटबॉल या खेळाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावं, यासाठी
फिफा फेडरेशनच्या फिफा फूटबॉल फॉर स्कूल या प्रकल्पांतर्गत, भारत सरकारच्या शिक्षण
मंत्रालयाच्या वतीनं काल फिफा सोबत करार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र
प्रधान आणि फिफा चे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टीनो यांनी नवी मुंबईत या करारावर स्वाक्षऱ्या
केल्या.
****
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग
शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचं अजिंक्यप पटकावलं आहे. पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात
या जोडीनं चायनीज तैपेईच्या जोडीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला.
****
१७ वर्षाखालच्या महिलांच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद स्पनेनं पटकावलं
आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत स्पनेनं कोलंबियाचा एक - शून्य असा पराभव केला.
****
.
آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی خبریں تاریخ :31 اکتوبر 2022‘ وقت: صبح 09.00 سے 09.10 بجے
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date : 31 October 2022
Time : 09.00 to 09.10 AM
آکاشوانی اَورنگ آ باد
علاقائی خبریں
تاریخ : ۳۱؍ اکتوبر ۲۰۲۲ ء
وقت : صبح ۹.۰۰ سے ۹.۱۰ بجے
سب سے پہلے خاص خبروں کی سر خیاں...
٭ گجرات میں ماچھو ندی پر واقع کیبل پُل ٹو ٹ جانے کے سبب کم و بیش 140؍ افراد ہلاک
٭ ملک میں شمسی توا نائی استعمال کرنے والے قصبات کی بڑی تحریک جلد شروع ہوگی ‘ وزیر اعظم کا تیقن
٭ ناگپور میں شروع ہونے والا سیفرن پرو جیکٹ بھی گیا ریاست کے باہر ‘ حزب اختلاف کی حکو مت پر تنقید
٭ پونے تا اورنگ آ باد تجویز کر دہ نئی ایکسپریس شاہراہ کو اورنگ آباد کے قریب سمرُدّھی ہائی وے سے جوڑا جائے گا ‘ مرکزی وزیر نتِن گڈ کری کا اعلان
٭ امرا وتی شہر میں بو سیدہ عمارت کے منہدم ہو جانے سے5؍ افراد کی موت
اور
٭ T-20؍ عالمی کپ کر کٹ مقابلے میں جنوبی افریقہ نےبھارت کو دی 5؍ وکٹوں سے شکست
اب خبریں تفصیل سے...
ٌٌ گجرات کے موربی میں ماچھو ندی کا کیبل پُل ٹوٹ جانے کے سبب کم و بیش 140؍ افراد ہلاک ہوگئے اور دیگر کئی زخمی ہو گئے ۔ وزیر اعلیٰ بھو پندر پٹیل نے گزشتہ رات جائے حادثہ کا دورہ کیا اور راحت و امداد کے کاموں کا جائزہ لیا ۔ وزیر اعظم نریندر مودی نے اِس حادثے پر غم کا اظہار کیا ہے ۔ اُنھوں نے احمد آباد میں آج اپنا روڈ شو منسوخ کر دیا ۔ وزیر اعظم قو می امداد فنڈ سے اِس حادثے میں ہلاک ہو نے والے ہر فرد کے اہل خانہ کو 2؍ لاکھ روپئے جبکہ زخمیوں کو 50؍ ہزار روپئے کی امداد کا اعلان کیا گیا ہے ۔ مرکزی وزیر داخلہ امِت شاہ نے بھی اِس حادثے پر دُکھ کا اظہار کیا ہے ۔***** ***** *****
وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ بھارت شمسی توا نائی سے بجلی تیار کرنے والے سر کر دہ ملکوں میں شامل ہو چکا ہے ۔ وزیر اعظم نے کہا کہ مُلک میں جلد ہی بڑے پیما نے پر شمسی توانائی کا استعمال کر نے والے قصبات کی ایک بڑی تحریک شروع کی جائےگی ۔ وہ کَل آکاشوانی کے پروگرام من کی بات کے ذریعے قوم سے خطاب کر رہے تھے ۔ اُنہوں نے کہا کہ شمسی توا نائی قدرت کا ایک انعام ہے اور آج ساری دنیا شمسی توا نا ئی میں اپنا مستقبل دیکھ رہی ہے ۔ وزیر اعظم نے کہا کہ خلائی شعبے میں بھارت کی تر قی دیکھ کر دنیا حیران ہے ۔ اُنھوں نے بتا یا کہ گزشتہ کچھ دن قبل بھارت نے بیک وقت 36؍ سیٹا لائٹس خلا میں داغے ۔ یہ واقعہ نو جوانوں کی جانب سے ملک کی دیوالی کا تحفہ ہے ۔ اُنھوں نے بتا یا کہ خلائی شعبہ اب خانگی کمپنیوں کے لیے بھی کھول دیا گیا ہے ۔ جس سے اِس شعبے میں ایک زبر دست انقلاب آئے گا ۔ وزیر اعظم نے کہا کہ آج کے دور میں عوام ماحول کے تحفظ کے لیے حساس ہو گئے ہیں ۔ اُنھوں نے کہاکہ مرکزی حکو مت کی ماحول کو نقصان نہ پہنچا نے والے طرز زندگی پر مبنی مشن لائف مہم کو عوام قبول کریں ۔
***** ***** *****
وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ سوچ بدلنا تر قی کا ایک اہم پہلو ہے ۔ گجرات کے بڑودہ میں کَل وزیر اعظم کے ہاتھوں 22؍ ہزار کروڑ روپئے لاگت کےTATA Airbus C-295 طیارہ ساز ی کے منصوبے کا سنگِ بنیاد رکھا گیا ۔ اِس موقعے پر اپنے خطاب میں انہوں نے کہا کہ گزشتہ8؍ برسوں میں حکو مت نے ہنر مندی کے فروغ پر زور دیا جس کے سبب پیدا وار کے شعبے میں ملک نے اہم مرحلہ عبور کر لیا ہے ۔ اُنھوں نے کہا کہ میک اِن اِنڈیا اور میک فار ورلڈ یہ بھارت کا نظر یہ ہے ۔ وزیر اعظم نے اِس یقین کا اظہار کیا کہ مستقبل میں مسافر بر دار ہوائی جہاز بھی بھارت میں تیار کیے جائیں گے اور اُس پر میڈ اِن اِنڈیا لکھا جائے گا ۔
***** ***** *****
TATA Airbus C-295؍ مال بر دار فو جی ہوائی جہاز پرو جیکٹ کے بعد ناگپور میں تجویز کر دہ مزید ایک پرو جیکٹ ریاست سے باہر چلا گیا ہے ۔ فرانس کی کثیر قو می کمپنی سیفرن ہوائی جہاز کے اِنجن کی درستی اور دیکھ بھال کا پرو جیکٹ ناگپور کے میہان میں قائم کر رہی تھی تا ہم قطعۂ اراضی کی فراہمی میں دیر ہو جانے کے سبب یہ منصوبہ حیدر آباد چلا گیا ۔ اِس مسئلے پر حزب اختلاف کے اراکین ریاستی حکو مت کو شدید تنقید کا نشانہ بنا رہے ہیں ۔
راشٹر وادی کانگریس پارٹی کی لیڈر سُپریہ سُلے نے نکتہ چینی کر تے ہوئے کہا کہ مہاراشٹر کو مسلسل گمراہ کیا جا رہاہے ۔ صحیفہ نگاروں سے بات کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ حکو مت کو ذمہ دار انہ رویّہ اپنا نا چا ہیے ۔ محتر مہ سُپر یہ سُلےنے کہا کہ
تر قیاتی منصوبے ریاست کے باہر جانے کے سبب ہمیں دُکھ ہو رہاہے ۔ وزیر اعلیٰ کو چا ہیے کہ وہ اِس مسئلے پر کُل جما عتی اجلاس کا انعقاد کر یں ۔ محتر مہ سُلے نے مزید کاہ کہ اِس بار ے میں وزیر اعظم سے بھی تبا دلۂ خیال کی ضرورت ہے ۔ کانگریس پارٹی کےتر جمان اتُل لونڈھے نے بھی اِس مسئلے پر ریاستی حکو مت پر تنقید کی ہے ۔
***** ***** *****
زمینی حمل و نقل اور شاہراہوں کے مرکزی وزیر نتِن گڈ کری نے کہا ہے کہ پونے اور اورنگ آباد کے در میان تجویز کر دہ نئے ایکسپریس وے کو اورنگ آباد کے قریب سمرُدّھی شاہراہ سے جوڑا جا ئے گا جس کے سبب پونے سے ناگپور کا سفر صرف8؍ گھنٹوں میں ممکن ہو جائے گا ۔اپنے ایک ٹوئیٹ پیغام میں وزیر موصوف نے بتا یا کہ مجوزہ سبز ایکسپریس وے بھارتی قو می شاہراہ اتھا ریٹی کی جانب سے تعمیر کیا جائے گا ۔ اِس شاہراہ کی تعمیر کے بعد اورنگ آ باد سے پونے کا سفر صرف سوّا دو گھنٹوں میں اور اورنگ آباد تا ناگپور کا فاصلہ ساڑھے پانچ گھنٹوں میں طئے کیا جا سکے گا ۔
گڈ کری نے اپنے پیغام میں بتا یا کہ یہ شاہراہ 128؍ کلو میٹر طویل ہو گی جس میں سے39؍ کلو میٹر کا رِنگ روڈ پونے شہر کے اطراف تعمیر کیا جائے گا ۔ یہ رِنگ روڈ 8؍ راستوں والا ہو گا ۔ یہ شااہراہ احمد نگر ‘ بیڑ اور اورنگ آ باد اضلاع سے گزرے گی ۔ اِس راستے سے گوا ‘ بنگلورو سمیت کر نا ٹک کے کچھ اضلاع پونے ‘ اورنگ آباد اور ناگپور سے جوڑے جائیں گے اور اِس کے بعد اِس راستے کے ذریعے مدھیہ پر دیش اور شمالی بھارت کو بھی جوڑا جائے گا ۔
***** ***** *****
***** ***** ***** ***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** ***** ***** ***** *****
فصل بیمہ رقم کسانوں کے کھاتوں میں فوری طور پر جمع کرنے سمیت دیگر مطالبات کی یکسوئی کے لیے عثمان آ باد کے رکن اسمبلی کیلاش پاٹل کی جانب سے کی جا رہی بھوک ہڑ تال کَل واپس لے لی گئی ۔ رکن اسمبلی پاٹل نے بتا یا کہ وزیر اعلیٰ ایکناتھ شندے ‘ نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس اور پارٹی سر براہ اُدھو ٹھاکرے سے تبادلۂ خیال کے بعد 6؍ دنوں سے جاری بھوک ہڑ تال ختم کر دی گئی ۔
***** ***** *****
امرا وتی شہر کے پُر ہجوم علاقے پر بھارت چوک میں ایک بو سیدہ عمارت کے منہدم ہو جانے سے 5؍ افراد ہلاک اور 2؍ شدید زخمی ہو گئے ۔ کَل دو پہر یہ حادثہ پیش آ یا ۔ راحت و امداد ستے کے ملازمین نے ملبے سے5؍ افراد کی نعشیں بر آمد کی ہیں ۔ زخمیوں کو علاج کے لیے اسپتال میں داخل کیا گیا ہے ۔ مر نے والے سب عمارت کی نچلی منزل پر واقع ایک دکان میں تھے ۔ شہر کی میونسپل کار پوریشن نے اِسی عمارت کو پہلے ہی بو سیدہ قرار دیاتھا ۔ چند مہینے قبل اِس عمارت کا کچھ حصہ توٹ گیا تھا ۔ اُس وقت نچلی منزل پر واقع دکاندار کو بھی جگہ خالی کر نے کی نوٹس دی گئی تھی تاہم اُس نے جگہ نہ خالی کر تے ہوئے عمارت کی درستی کا کام شروع کیا اور اِس کام کے دوران ہی عمارت منہدم ہو گئی ۔
وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے نے مر نے والوں کے لواحقین کو5؍ لاکھ روپیوں کی امداد کا اعلان کیا ہے ۔ ساتھ ہی وزیر اعلیٰ نے زخمیوں کے علاج کا مکمل خرچ اٹھا نے کا اعلان کیا ۔ نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے اِس حادثے پر گہرے رنخ و غم کا اظہار کیا ہے ۔ اُنھوں نے بتا یا کہ اِس حادثے کی تفصیلی جانچ کرنے کے احکا مات صادرکر دیئے گئے ہیں ۔
***** ***** *****
ملک کے پہلے وزیر داخلہ سر دار ولَبھ بھائی پٹیل کے یومِ پیدائش کی مناسبت سے آج اُنہیں ہر طرف خراج عقیدت پیش کیا جا رہا ہے۔ اورنگ آباد ‘ جالنہ ‘ پر بھنی ‘ ناندیڑ ‘ ہنگولی ‘ لاتور ‘ عثمان آ با د اور بیڑ شہروں میں اِس موقعے پر ایکتا دوڑ کا انعقاد کیا جا رہا ہے ۔
اِس طرح سابق وزیر اعظم اِندرا گاندھی کی بر سی کے موقعے پر آج انہیں بھی یاد کیا جا رہا ہے۔
***** ***** *****
آسٹریلیا میں جاریT-20؍ عالمی کپ کر کٹ مقابلوں میں کَل جنو بی افریقہ نے بھارت کو5؍ وکٹوں سے ہرادیا ۔ بھارت کی جانب سے دیئے گئے 134؍ رنوں کے ہدف کو جنوبی افریقہ کی ٹیم نے آخری اوور کی2؍ گیندیں باقی رکھتے ہوئے حاصل کر لیا ۔ ڈیوِڈ مِلر نے 59؍ ناٹ آئوٹ اور ایڈن مارک مین نے 52؍ رن بنائے ۔ ٹاس جیت کر پہلے بلّے بازی کر تے ہوئے بھارتی ٹیم نے سوریہ کمار یادو کے68؍ رنوں کی بد ولت 9؍ وکٹوں کے نقصان پر133؍ رن بنائے ۔ اِن مقابلوں میں بھارت نے شروعات کے 2؍ میچ جیتے ہیں آئندہ اتوار کو بھارت کا مقابلہ بنگلہ دیش سے ہوگا ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک بار پھر..
٭ گجرات میں ماچھو ندی پر واقع کیبل پُل ٹو ٹ جانے کے سبب کم و بیش 140؍ افراد ہلاک
٭ ملک میں شمسی توا نائی استعمال کرنے والے قصبات کی بڑی تحریک جلد شروع ہوگی ‘ وزیر اعظم کا تیقن
٭ ناگپور میں شروع ہونے والا سیفرن پرو جیکٹ بھی گیا ریاست کے باہر ‘ حزب اختلاف کی حکو مت پر تنقید
٭ پونے تا اورنگ آ باد تجویز کر دہ نئی ایکسپریس شاہراہ کو اورنگ آباد کے قریب سمرُدّھی ہائی وے سے جوڑا جائے گا ‘ مرکزی وزیر نتِن گڈ کری کا اعلان
٭ امرا وتی شہر میں بو سیدہ عمارت کے منہدم ہو جانے سے5؍ افراد کی موت
اور
٭ T-20؍ عالمی کپ کر کٹ مقابلے میں جنوبی افریقہ نےبھارت کو دی 5؍ وکٹوں سے شکست
علاقائی خبریں ختم ہوئیں
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 31 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
गुजरातमधे माच्छु नदीवरचा केबल पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत,
१४० जणांचा मृत्यू
· देशात सौर ऊर्जा वापरणारी गावांची मोठी लोक चळवळ लवकरच उभी राहील- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना विश्वास
· नागपूरमध्ये प्रस्तावित सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर, विरोधी पक्षांची सरकारवर टीका.
· पुणे - औरंगाबाद प्रस्तावित नवा हरीत द्रुतगती मार्ग औरंगाबाद जवळ समृद्धी महामार्गाला
जोडणार- नितीन गडकरी
· अमरावती शहरातधोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण ठार
· देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन,
ठिकठिकाणी एकता दौडचे आयोजन
· विविध मागण्यांसाठी, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेलं उपोषण
मागे
आणि
· टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी राखून
पराभव
सविस्तर बातम्या
गुजरातमधे मोरबी इथं माच्छु नदीवरचा केबल पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत, १४०
जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी काल रात्रक्षी
घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून, आजचा अहमदाबाद
इथला रोड शो रद्द केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना
प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येक ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
सौरऊर्जेपासून वीज निर्माण करण्यात अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश झाला
असून, प्रामुख्यानं सौर ऊर्जा वापरणारी गावंच्या गावं उभारण्याची मोठी लोक चळवळ लवकरच
देशात उभी राहील, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमात
ते काल बोलत होते. ‘सौर ऊर्जा’ हे सूर्यदेवतेचं वरदान असून, आज संपूर्ण जगाला सौर उर्जेत आपलं भविष्य दिसत
असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीमुळे अवघं जग आश्चर्यचकीत झालं आहे, काही
दिवसांपूर्वीच भारतानं एकाचवेळी ३६ उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण केलं, ही घटना म्हणजे
युवकांनी देशाला दिलेली दिवाळीची विशेष भेट होती, असं ते म्हणाले. अंतराळ क्षेत्र,
आता खासगी क्षेत्रासाठीही खुलं झालं आहे, त्यामुळे या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल
होऊ लागले असल्याचं ते म्हणाले.
अलिकडच्या काळात देशभरात पर्यावरणाप्रती वाढलेल्या संवेदनशीलतेचा पुनरुच्चार
पंतप्रधानांनी यावेळी केला. पर्यावरण संवर्धनासाठी देशभरात व्यक्तीगत पातळीवर केल्या
जात असलेल्या अभिनव प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी दिली. केंद्र सरकारनं पर्यावरणाचं
नुकसान होऊ न देणारी जीवनशैली, या संकल्पनेवर आधारीत सुरू केलेल्या, मिशन लाईफ, या
अभियानाचा नागरिकांनी स्विकार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
मानसिकता बदलणं हा प्रगतीचा एक मुख्य पैलू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये बडोदा इथं २२ हजार कोटी रुपयांच्या टाटा-एअरबस सी-टू
नाइन्टी फाईव्ह या विमान निर्मिती प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण काल पंतप्रधानांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं गेल्या आठ वर्षात कौशल्य विकासावर भर दिल्यामुळे
आज उत्पादन क्षेत्रात देशानं मोठा टप्पा गाठला असल्याचं ते म्हणाले. 'मेक-इन-इंडिया'
आणि 'मेक-फॉर-वर्ल्ड' हा भारताचा दृष्टिकोन असुन, भविष्यात जगातली प्रवासी विमानंही
भारतात तयार होतील आणि त्यावर `मेड इन इंडिया` असं लिहिलं जाईल, असंही त्यांनी नमूद
केलं. आगामी काळात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी संरक्षण आणि हवाई क्षेत्र हे दोन
महत्त्वाचे स्तंभ असतील, असं त्यांनी सांगितलं.
****
टाटा एअरबसचा सी-२९५ लष्करी विमान वाहतूक प्रकल्पापाठोपाठ आणखी एक नागपूरमध्ये
प्रस्तावित प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन, ही
विमान इंजिन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र,
जमीन मिळवण्यास विलंब झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला. यावरुन विरोधी पक्षांनी
राज्य सरकारवर टीकेची धार तीव्र केली आहे.
महाराष्ट्राची सातत्यानं दिशाभूल केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं जबाबदारीनं वागावं, असं त्या
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या. प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं आपल्याला
दुःख होत आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी, तसंच पंतप्रधानांबरोबर
देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी नमूद केलं. काँग्रेसचे
प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यावरुन सत्ता पक्षावर टीका केली.
****
पुणे आणि औरंगाबाद दरम्यानचा प्रस्तावित नवा हरीत द्रुतगती मार्ग औरंगाबाद जवळ
समृद्धी महामार्गावर औरंगाबादला जोडला जाईल, यामुळे पुणे ते नागपूर हे अंतर केवळ आठ
तासात गाठणं शक्य होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांनी म्हटलं आहे. हा प्रस्तावित मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं
बांधला जाईल, असं त्यांनी ट्.विट संदेशात सांगितलं आहे. या मार्गावरून पुणे आणि औरंगाबादमधलं
अंतर सव्वा दोन तासात, तर औरंगाबाद आणि नागपूरमधलं अंतर साडेपाच तासात गाठणं शक्य होईल,
असं गडकरी म्हणाले. हा नवा मार्ग १२८ किलोमीटरचा असेल, यापैकी ३९ किलो मीटरचा मार्ग
पुणे शहराभोवतीचा रिंग रोड असेल. यावर एकूण आठ मार्गिका असतील. राज्यातल्या अहमदनगर,
बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतून हा मार्ग जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे - बंगळूरू
द्रुतगती मार्गावरून गोवा तसंच बंगळूरूसह कर्नाटकातले काही जिल्हे पुणे, औरंगाबाद आणि
नागपूरला जोडले जातील, आणि त्यापुढे ते मध्यप्रदेश आणि उत्तर भारतालाही जोडले जातील,
अशी माहिती गडकरी यांनी आपल्या संदेशात दिली आहे.
****
अमरावती शहरातल्या गजबजलेल्या प्रभात चौकात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या
दुर्घटनेत पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. बचाव
पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखालून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढलं असून, जखमींना
उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हे सर्वजण कोसळलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील
दुकानात होते. ही इमारत धोकादायक असल्याचं महापालिकेनं जाहीर केलं होतं, काही महिन्यांपूर्वी
या इमारतीचा काही भागही पाडला होता. त्याचवेळी तळमजल्यावरील दुकानदारालाही जागा रिकामी
करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतू दुकानदारानं जागा रिकामी न करता तिथं डागडुजीचं
काम सुरू केलं, हे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नजिकच्या नातेवाईकांना
पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल,
असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
केला आहे. याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपये अनुदानातून राज्यातल्या कामगारांसाठी
घरकुल बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `मन की बात` कार्यक्रमांचं
थेट प्रेक्षपण, ‘मोदीजी की मन की बात कामगारोंके साथ’, हा कार्यक्रम काल झाला,
त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी रुग्णालय, कामगार भवन, आणि
कामगार क्रीडा भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती खाडे यांनी दिली.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना
सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा
केला जात असून, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड
शहरात यानिमित्त एकता दौड होत आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन
करण्यात येत आहे.
****
उद्यापासून राज्यात आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राच्या
वेळांमधे काही बदल होणार आहेत. त्यानुसार, आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित होणारं
सकाळचं नऊ वाजून २० मिनिटांचं राष्ट्रीय बातमीपत्र, आता साडे आठ वाजता प्रसारित होईल.
आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रात्री सव्वा नऊ वाजता प्रसारीत होणारं राष्ट्रीय बातमीप,त्र
आता रात्री आठ वाजता प्रसारित होईल.
****
पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी यासह विविध मागण्यांसाठी,
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेलं उपोषण काल अखेर मागे घेतलं. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी
चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. गेली सहा दिवस हे उपोषण
सुरू होतं. विमा कंपनीसोबत बैठक घेऊ, तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या
नुकसानाचे पैसे लवकरात लवकर देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. उस्मानाबाद
जिल्ह्याला नुकसान भरपाईचे २८२ कोटी रुपये येणं आहे. त्यातले अतिवृष्टीचे ५९ कोटी रुपये
दोन दिवसांत देण्याचं आश्वासन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी दिल्याचं
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या संदर्भात सांगितलं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची ६० कोटी रुपयांची नुकसानभरपाई आज जमा होणार आहे. सकारात्मक
निर्णय झाल्यानं आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.
****
राज्यात लवकरच वारकऱ्यांची बँक उभारण्याचा मनोदय रोजगार हमी योजना मंत्री संदिपान
भुमरे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं संत स्नेह मिलन कार्यक्रमात
ते काल बोलत होते. मठांच्या विकासाला निधी देणार तसंच पैठण इथल्या संतपीठाला पूर्ण
विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही भुमरे यांनी दिलं.
ते म्हणाले,
Byte….
आपल्या
वारकऱ्यांची एक बँक असली पाहिजे. तुम्ही जर पुढाकार घेतला माझी जी काही मदत असेल, ती
मदत मी तुम्हाला करेल. पण एक वारकऱ्यांची बँक जर असेल तर वेळोवेळी निश्चित मदत झाल्याशिवाय
राहत नाही. कोणाकडंही आपल्याला हात पसरवायचं काम पडणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला
गरज पडेल त्यावेळेस आपल्या हक्काची, वारकऱ्यांची बँक राहीन.
****
जालना - तिरूपती साप्ताहिक विशेष रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब
दानवे यांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ही साप्ताहिक रेल्वे दर रविवारी आणि
परतीच्या प्रवासात दर मंगळवारी धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
मराठवाड्यातल्या जनतेला तिरुपती बालाजी दर्शनाला जाण्यासाठी दीर्घ काळापासून रेल्वे
गाडी सुरु करण्याची मागणी पूर्ण झाल्याचं दानवे यावेळी म्हणाले. परभणी, परळी, बिदर,
कलबुर्गी गुंटकल मार्गे ही रेल्वे तिरुपतीला जाईल.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात लिंगी शिवारात पोलिसांनी काल ४६ हजार २००
रुपये किंमतीची गांजाची झाडं जप्त केली. केशव डांगरे यांच्या कापसाच्या पिकात गांजाची
झाडे असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून सहा नोव्हेंबर पर्यंत “भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित
भारत” या संकल्पनेवर
आधारित दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार
निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे
निर्देश विविध विभागांना देण्यात आले आहेत.
****
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या
सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून पराभव केला. भारतानं विजयासाठी ठेवलेलं
१३४ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या षटकात दोन चेंडू शिल्लक असताना साध्य
केलं. डेव्हीड मिलरनं नाबाद ५९ तर एडन मार्क्रमनं ५२ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघानं सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर नऊ बाद
१३३ धावा केल्या. भारतानं स्पर्धेतले या पुर्वीचे दोन सामने जिंकले आहेत. संघाचा या
स्पर्धेतला पुढचा सामना येत्या रविवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
अन्य सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला. बांग्लादेशनं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत सात बाद १५० धावा केल्या. सलामीवीर
नजमुल हुसेन शांतोनं सर्वाधिक ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत
८ बाद १४७ धावाच करू शकला. काल झालेल्या आणखी एका सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड संघाचा
सहा गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात लढत होणार आहे.
****
नवी मुंबईत सुरू असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत
तिसऱ्या क्रमांकावर नायजेरियाचा संघ विजयी झाला आहे. नायजेरिया आणि जर्मनी या संघांमध्ये
तिसऱ्या क्रमांकासाठीच्या काल झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना ३-३ गुण मिळाले. सामना
बरोबरीत झाल्यामुळे घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊट मध्ये नायजेरियाला ३ आणि जर्मनीला
२ गुण मिळाले.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या जांब समर्थ इथल्या मूर्ती चोरी प्रकरणी
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं काल पाचव्या आरोपीला हैदराबाद इथून ताब्यात घेतलं. चोरीला
गेलेल्या पाचही मूर्त्या देखील ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात
कौडगाव, आंबेजवळगा आणि कारी इथं अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी कारी इथं आत्महत्या केलेले शेतकरी
वाघे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत केली. मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचं
नुकसान झालेलं असतानाही सराकरकडून एक रुपयाही मदत मिळाली नसल्याचा आरोप दानवे यांनी
यावेळी केला.
****
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. किमान
तापमानात घट झाली आहे, तर कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी
थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात
लक्षणीय घट झाली आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...