Saturday, 29 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 तालुका पातळीवर जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी अकरा  वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घ्यावी, असे निर्देश शासनानं दिले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसंच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपुर्वी आठ  दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीला उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.
****

 राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होणाऱ्या भेसळीबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिले आहेत. दुधातील भेसळ थांबली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते सांगली इथं बोलत होते. राज्यात अडचणीत असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि यंत्र मागधारकांना मदत करण्यासाठी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मराठी शाळा टिकवण्याचं मोठं आव्हान आज राज्यासमोर असून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचं राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं.
****

 मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्री उपसमितीनं आज सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यावेळी उपस्थित होते. मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विधिज्ञ यांनी बैठकीत सहभाग घेतला. मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनं लागला पाहिजे यासाठी राज्यसरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ नेमल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. सरकार मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तेव्हा आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मराठा समाजानं मागं घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं.
****

 बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्यान होणाऱ्या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनान घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असलेले सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सिंह यांच्या बदलीन रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के. सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.
****

 आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यासाठी आणि उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकांना सुरूवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज संघटनात्मक आढावा घेतला. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचं नाव बदललंच पाहिजे अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलतांना मांडली. राष्ट्रवादी काँग्रस महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शहर आणि ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
****

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांच्या जागांसाठी संपूर्ण राज्यात आज मतदान झालं. या निवडणुकीसाठी राज्यातील सहा महसूल विभागांतलं एकूण सातशे दोन मतदान होतं. अमरावती विभागातील दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यासाठी वाशिम इथं मतदान करण्यात आलं.
****

 औरंगाबाद इथं राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या वतीनं आगामी सौर वर्ष १९४२ च्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचं आज विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सरोज देशपांडे, अभय मराठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****

 राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचं आज बीडमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते सत्तावन्न वर्षांचे होते. गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे ते रहिवासी होते.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.02.2020 18.00

आकाशवाणी औरंगाबाद – दि.29.02.2020 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.02.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date 29 February 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.

****

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्यातलं सरकार येत्या एक मे पर्यंत एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीकपासून राज्याला मुक्त करेल, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी याची काल विधानपरिषदेत माहिती दिली. राज्यात २०१८ साली तत्कालीन सरकारनं एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीक पिशव्या, चमचे, ताट आदींची निर्मीती आणि साठवणुकीवर बंदी घातली होती. एकवेळा उपयोगात आणायच्या प्लॅस्टीक पिशव्या, स्ट्रॉ, कप आणि ताट आदींवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे पण अशा वस्तू अद्याप बाजारात दिसून येतात, अशी माहिती ठाकरे यांनी काँग्रेसचे रामहरी रुपनवार यांनी विचारलेल्या प्रश्र्नाच्या उत्तरात दिली. आपण अधिकाऱ्यांना राज्याला एक मे पर्यंत एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीकपासून मुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली. शितपेयांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्लॅस्टीक बाटल्यांना तूर्त यातून वगळण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

महिला अत्याचाराच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणं आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्याटप्यानं केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून यासाठी लवकरच पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आशियाई विकास बँकेच्या समन्वयानं रस्ते विकासकामांसाठी ही तरतूद करण्यात येईल, असंही त्यांनी विधानसभेत एका पुरवणी प्रश्र्नाच्या उत्तरात सांगितलं. यासंदर्भात केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. मोरारजी देसाई हे आयुष्यभर शिस्तप्रिय आणि राजकारणामधील आपल्या सिद्धांतांवर ठाम राहिल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

पुढच्या वर्षीच्या मार्च पर्यंत एक लाख ४० हजार रिक्त जागा भरल्या जातील, अशी माहिती कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष ब्रज राज शर्मा यांनी काल दिली. त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटून राजपत्रित आणि गैर राजपत्रित रिक्त पदांबद्दल त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत १४ हजार ६११ रिक्त पद भरल्याचं त्यांनी सांगितलं. या जूनच्या अखेरीस अतिरिक्त ८५ हजार पदं भरली जातील, असंही ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण विभागानं आज दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्यांचा मेळावा घेतला. राज्याचे महसुल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन झालं. आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बंदींसाठी आज कुटुंब भेटीचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद मध्य विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उदघाटन करण्यात आलं. बंदींसाठी वर्षातून दोन वेळा असा उपक्रम आयोजित करण्यात येतो.

****

नांदेड जिल्ह्यात टमाटोच विक्रमी उत्पादन झालं आहे. मात्र बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर  टमाटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.तरी शासनानं टमाटो शेतीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच रुपये किलो प्रमाणे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

****

न्यूझीलंडनं भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर बिनबाद त्रेसष्ट धावा केल्या आहेत. ख्राईस्टचर्च इथं हँगले ओव्हल मैदानावर सुरू या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारताचा पहिला डाव २४२ धावांत बाद झाला आहे. यात हनुमा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

भारतीय संघानं आयसीसी महिला टीट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम साखळी सामन्यात श्रीलंकेवर सात गडी आणि ३२ चेंडू राखून विजय नोंदवला.

****

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.02.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

महिला अत्याचाराच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणं आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्याटप्यानं केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून यासाठी लवकरच पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आशियाई विकास बँकेच्या समन्वयानं रस्ते विकासकामांसाठी ही तरतूद करण्यात येईल, असंही त्यांनी विधानसभेत एका पुरवणी प्रश्र्नाच्या उत्तरात सांगितलं. यासंदर्भात केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यात टमाट्याचं विक्रमी उत्पादन झालं आहे. मात्र बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर टमाटे रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शासनानं टमाटा शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच रुपये किलो प्रमाणे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

****

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात २४२ धावांवर बाद झाला आहे. ख्राईस्टचर्च इथं हँगले ओव्हल मैदानावर सुरू या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारलं. हनुमा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक-शून्यनं आघाडीवर आहे.

****

आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं भारतीय संघाचा अंतिम साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.29.02.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्...




Regional Urdu Text  Bulletin, Aurangabad, Date : 29.02.2020, Time : 8.40 - 8.45 AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.Date: 29 February-2020Time: 8:40 to 8:45 amآکاشوانی اَورنگ آبادعلاقائی خبریںتاریخ:۲۹؍ فروری  ۲۰۲۰؁وَقت :  ۴۰:۸۔ ۴۵:۸***** ***** *****مہاراشٹر میونسپل کارپوریشن‘ میونسپلٹی اور صنعتی علاقہ قانون ترمیمی بل کل قانون ساز کونسل نے منظور کرلیا۔ شہری ترقیات کے وزیر ایکناتھ شندے نے ایوان میں یہ بل پیش کیا ۔ اس ترمیم کے بعد اب ایک بلاک سے ایک سے زائد کونسلرز کا انتخاب اور صدرِ بلدیہ اور میئر کے براہِ راست انتخاب سے متعلق قانون ردّ ہوجائے گا۔ اب حسب ِ سابق ایک بلاک سے ایک ہی کارپوریٹر منتخب ہوگا۔ حزبِ اختلاف کے قائد پروین دریکر نے اس بل کی مخالفت کرتے ہوئے کہا کہ اس سے ہارس ٹریڈنگ میں اضافے کا خدشہ ہے۔ نیز یہ بل سیاسی جماعتوں کے کارکنوں اور عوام کے ساتھ ناانصافی ہوگی۔***** ***** *****ریاست میں مسلمانوں کو تعلیمی اداروں میں داخلے کیلئے پانچ فیصد ریزرویشن دینے سے متعلق بل عنقریب منظور کرکے اس پر عمل درآمد کیا جائیگا۔ یہ اعلان اقلیتی امور کے وزیر نواب ملک نے کل قانون ساز کونسل میں کیا۔ انھوں نے کہا کہ آئندہ تعلیمی سال میں داخلوںکے عمل کے آغاز سے قبل ہی اس قانون پر عمل درآمد کیا جائیگا اور اس خصوص میں تمام زاویوں سے غور و خوص کے بعد حکومت فیصلہ کریگی۔ انھوں نے مزید کہا کہ پسماندہ طبقات کو انصاف فراہم کرنا حکومت کا مقصد ہے۔***** ***** *****وزیرِ اعلیٰ اُدّھو ٹھاکرے نے کہا ہے کہ ڈویژنل سطح پر شروع کیے گئے وزیرِ اعلیٰ دفاتر میں تعلقہ سطح تک توسیع کرنے پر حکومت غور کررہی ہے۔ وہ کل اسمبلی میں گورنر کے خطبے پر مباحثے کا جواب دے رہے تھے۔ انھوں نے کہا کہ ریاست بھر میں ترقیاتی کاموں کی ترجیح طئے کرکے ان پرعمل درآمد کیا جارہا ہے اور ریاست کی ہمہ گیر ترقی کیلئے حکمراں اور حزبِ اختلاف متحد ہوکر کام کرنے کے پابند ہیں۔***** ***** *****محکمۂ دیہی ترقیات کی جانب سے چلائی جانے والی اسمارٹ گرام یوجنا کا نام تبدیل کرکے اسے ’’آر آرپاٹل سندر گائوں پُرسکار یوجنا‘‘ کا نام دیا گیا ہے۔ دیہی ترقیات کے وزیر حسن مشرف نے کل اسمبلی میں یہ اعلان کیا۔ نومبر 2016ء سے جاری اسمارٹ گرام یوجنا کے تحت گرام پنچایتوں کو اسمارٹ گرام ایوارڈز دئیے جاتے ہیں۔ حسن مشرف نے بتایا کہ اب آنجہانی آر آر پاٹل کی برسی یعنی 16/ فروری کو ضلع سطح پر ہر برس یہ ایوارڈ دئیے جائیں گے۔ ریاستی کابینہ کے حالیہ اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا تھا۔***** ***** *****دیگر پسماندہ طبقات کی ذاتوں کی بنیاد پر مردُم شماری کے موضوع پر کل اسمبلی میں بحث ہوئی۔ اس خصوص میں ایک قرارداد اسمبلی کی جانب سے مرکزی حکومت کو روانہ کی گئی ہے۔ تاہم درجِ فہرست ذاتوں اور جماعتوں کے سوا دیگر طبقات کی ذات کی بنیاد پر مردم شماری کیے جانے کا عندیہ متعلقہ محکمے نے دیا ہے۔ اس موقع پر وزیر برائے اُمورِ تحفظ ِ صارفین چھگن بھجبل نے مطالبہ کیا کہ دیگر پسماندہ طبقات یعنی OBC کے لیے ذات کی بنیاد پر مردم شماری کا مطالبہ متحدہ طور پر کیا جائے اور حزبِ اختلاف کے قائد دیویندر پھڑنویس نمائندہ وفدکے ہمراہ وزیرِ اعظم سے ملاقات کرکے یہ مطالبہ کریں۔***** ***** *****غیر امداد یافتہ اسکولوں کو امداد دینے اور اساتذہ کو سابقہ پنشن اسکیم لاگو کرنے کا معاملہ کل قانون ساز کونسل میں توجہ دلائو نوٹس کے ذریعے اٹھایا گیا۔ کونسل میں قائد ِ حزبِ اختلاف پروین دریکر‘ تعلیمی حلقے سے منتخب رکن وکرم کاڑے اور دیگر ارکان نے اس موضوع پر توجہ دلائو نوٹس پیش کی۔ جس کے جواب میں اسکولی تعلیم کی وزیر ورشا گائیکواڑ نے کہا کہ اس خصوص میں کمیٹی تشکیل دی گئی ہے اور اس کمیٹی کے اجلاس میں ہی کوئی فیصلہ کیا جائیگا۔***** ***** *****آر آر پاٹل فائونڈیشن نے مطالبہ کیا ہے کہ مراٹھا سماج کو ریزرویشن دینے سے متعلق سماعت پانچ ججوں پر مشتمل آئینی بینچ کرے۔ اس سلسلے میں فائونڈیشن کے صدر ونود پاٹل نے عدالت ِ عظمیٰ میں داخل کردہ درخواست میں کہا کہ اس موضوع پر سماعت کیلئے پانچ رُکنی آئینی بینچ تشکیل دی جائے اور آئینی بینچ ہی مراٹھوں کے ریزرویشن سے متعلق فیصلہ کرے۔ ممبئی عدالت ِ عالیہ کی جانب سے یہ ریزرویشن برقرار رکھے جانے پر فی الحال عدالت ِ عظمیٰ میں سماعت جاری ہے۔***** ***** *****نیشنلسٹ کانگریس پارٹی کی رُکن پارلیمنٹ وندنا چوہان نے کہا ہے کہ اورنگ آباد میونسپل کارپوریشن کے انتخابات کیلئے عوامی معاونت سے ہی پارٹی منشور تیارکیا جائیگا۔ میونسپل کارپوریشن انتخابات کے پیشِ نظر پارٹی کارکنوں کے اجلاس میں شرکت کے بعد وہ اخباری نمائندوں سے مخاطب تھیں۔ انھوں نے کہا کہ ان انتخابات میں مہا وِکاس آگھاڑی سے متعلق فیصلہ اعلیٰ سطح پر تبادلۂ خیال کے بعد کیاجائیگا۔***** ***** *****لاتور ضلع کے رینا پور تعلقے کے رینا آبی منصوبے سے پانی چھوڑے جانے پر کلکٹر جی شریکانت نے حکمِ التواء جاری کردیاہے۔ پانی نہ چھوڑے جانے کے مطالبے پر مقامی باشندوں کی جانب سے تین دِن سے مظاہرے کیے جارہے ہیں۔ ضلع کلکٹر نے کل مظاہرین سے ملاقات کے بعد یہ فیصلہ کیا۔***** ***** *****

Akashwani Aurangabad Urdu Bulletin, 29.02.2020 8.40-8.45 AM

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.29.02.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.02.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 February 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२९ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत.
·      मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण देणारा कायदा लवकरच - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा.
·      नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङमय पुरस्कार जाहीर.

आणि

·      लातूर जिल्ह्यातल्या रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती.

****

महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेनं काल संमत केलं. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच नगराध्यक्ष आणि महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे.
आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत, यामुळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय असल्याचं, दरेकर म्हणाले. मतदानानंतर हे विधेयक बहुमतानं संमत झालं.

****

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल विधान परिषदेत केली. आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं मलिक यांनी सांगितलं. यासंदर्भात सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं सांगत, मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं, मलिक यांनी स्पष्ट केलं.

****

विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात  असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकास कामं करायला बांधील असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आता ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असं नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. नोव्हेंबर २०१६ पासून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय तसंच जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर केलं जाईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

****

नागरिकांच्या ‘इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना’ या विषयावर काल विधानसभेत चर्चा झाली. नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र अनुसूचित जाती -जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी, याबाबत बोलताना, इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, हा मुद्दा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

****

विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी तसंच शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा काल विधान परिषदेत लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिक्षक सदस्य विक्रम काळे यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावी, अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात पाटील यांनी, यासंदर्भात पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ तत्काळ गठीत करून, त्या घटनापीठाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काल पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या निवडणुकीत महाआघाडीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. 

****

मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. कुसुमाग्रज काव्यपुरस्कार काव्यसमीक्षक डॉ.अक्षयकुमार काळे यांना, तर कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार कवी दिनकर मनवर यांना समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वाङमय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार, डॉ. अरुण शिंदे, रमाकांत देशपांडे आणि निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि  पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या पंधरा मार्चला नांदेड इथं एका विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्थगिती दिली आहे. पाणी न सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी काल आंदोलनकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी हा निर्णय घेतला. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाणी पिण्यासाठी पुरेल असं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. संबंधित यंत्रणेनं प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

****

परभणी इथल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेलं कापूस खरेदी केंद्र तीन मार्चपर्यंत बंद राहणार आहे. बाजार समितीचे सचिव एस.बी.काळे यांनी काल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्रावर कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे, कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काऴे यांनी या पत्रकात नमूद केलं.

****

बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यात विवाहित महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं तीन जणांना सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. 

****

औरंगाबाद इथं काल शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि अधिनियम २०१४च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं.

****

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं.
परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या शांताबाई नखाते विद्यालयाच्या वतीनं काल विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं. ६० बालशास्त्रज्ञांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष भावना नखाते यांनी यावेळी केलेल्या भाषणात, चौकस बुद्धीच्या बालकांना योग्य वातावरण तसंच संधी निर्माण करून दिल्यास ते वैज्ञानिक बनू शकतात असं मत व्यक्त केलं.

****

नांदेड मर्चंट को - ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी दिलीप कंदकुर्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे. मर्चंट बँकेच्या जिल्ह्यात आठ शाखा आहेत.

****

लातूर इथं काल शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बांबू प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त क्षेत्रात हवामानातल्या बदलामुळे जे पर्यावरणात बदल होत आहेत, त्याला लढा देण्यासाठी बांबूची लागवड आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं.

****

क्रिकेट

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. उपहरासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या तेवीसाव्या षटकात दोन बाद ८४ धावा झाल्या होत्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता हा सामना सुरू होईल.

****

Friday, 28 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.02.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००

****

महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेनं आज संमत केलं. शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदनात हे विधेयक मांडलं. या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे. आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत, यामुळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय असल्याचं, दरेकर म्हणाले. मतदानानंतर हे विधेयक बहुमतानं संमत झालं.

****

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत केली. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक प्रवेश सुरू होण्यापूर्वी सुरू केली जाईल असं मलिक यांनी सांगितलं. यासंदर्भात सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं सांगत मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

****

विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आता ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असं नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. नोव्हेंबर २०१६ पासून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय तसंच जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर केलं जाईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

****

औरंगाबाद महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. आज औरंगाबाद इथं महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कार्यकर्ते घरोघरी जावून एक प्रश्नावली भरून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत महाआघाडी होण्याचे संकेतही त्यांनी दिले, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार, डॉ. अरुण शिंदे, रमाकांत देशपांडे आणि निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि  पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी आज नांदेड इथं ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या पंधरा मार्चला नांदेड इथं एका विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

परभणी इथल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेलं कापूस खरेदी केंद्र उद्यापासून ते येत्या ३ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. बाजार समितीचे सचिव एस.बी.काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्रावर कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे, कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काऴे यांनी या पत्रकात नमूद केलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि अधिनियम २०१४च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमी...

आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 सांगली जिल्हा वार्तापत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 28 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविद्याविभुषित अनेक महिला कार्यरत असल्या, तरी जागतिक स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अनुषंगानं बोलत होते. जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना, भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. विज्ञानात कार्यरत महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे.  विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना या विषयावर आज विधानसभेत चर्चा झाली. नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र अनुसूचित जाती -जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी, याबाबत बोलताना, इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, हा मुद्दा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
****
विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी तसंच शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदनाला सांगितलं.
****
वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक होणारी मालवाहतुक - ओव्हर लोडिंग थांबवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ते विधान परिषदेत बोलत होते. अनेक अपघातांनाही ओव्हरलोडिंग कारणीभूत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात कायद्याचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून, पथकर नाक्यांनाही अशा वाहनांवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली असल्याचं, मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावी, अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात पाटील यांनी, अशा घटनात्मक बाबींवर कलम १४५/३ नुसार घटनापीठाला निर्णय देण्याचा अधिकार आहे, त्याकरता पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ तत्काळ गठीत करून, त्या घटनापीठाने याबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
****
सीमेपलिकडच्या साधनांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, बालाकोट हवाई हल्ल्यातून हा संदेश स्पष्ट केला असल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत वायूसेना अभ्यास केंद्रात बोलत होते. तीनही सेना दलांचे प्रमुख सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यावेळी उपस्थित होते. कठोर निर्णय घेण्यासाठी सैन्य दल तसंच राजकीय नेतृत्वाची भूमिका मोठी असते, कारगील, उरी आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांमधून ही बाब सिद्ध होत असल्याचं, रावत यांनी नमूद केलं.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. आज विज्ञान दिनाच्या अनुषंगानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २१ महिला शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संशोधन क्षेत्राला अधिकाधिक पूरक वातावरण निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सांगली महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीला सादर करण्यात आला . या अर्थसंकल्पात ६७४ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे ६७५ कोटी २३ लाख रुपये महसुली जमा आणि ५८ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आयुक्त नितीन कापडणीस यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महसूली उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला असून त्यात क्रीडांगणे, खुल्या जागांच्या भाडे शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामुळे महापालिका स्वयंपूर्ण व्हायला मदत होईल, असा विश्वास आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला.
****
ओडिशामधे सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांन काल आणखी तीन सुवर्णपदकं मिळवत अग्रस्थान कायम राखलं. भारोत्तोलन स्पर्धेत महेश दत्ता अस्वले आणि प्राजक्त रविंद्र खळकर यांनी तर कुस्तीत ज्योतिबा बजरंग अटकले यानं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत पंजाब विद्यापीठानं दुसरा तर बंगळुरु इथल्या जैन विद्यापीठानं तिसरा क्रमांक मिळवला.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 28.02.2020, Time: 8.40 - 8.45 AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 28 February 2020
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۸  ؍ فروری  ۲۰۲۰ئ؁
وَقت :  ۴۰:۸۔ ۴۵:۸

 مرکزی حکو مت مراٹھی کو اعلیٰ زبان کا درجہ دینے سے متعلق جلد از جلد فیصلہ کرے ۔  اِس تجویز کی منظوری سے متعلق قرار داد کل مقننہ میں اتفاقِ رائے سے منظور کی گئی۔  وزیر برائے مراٹھی زبان سُبھاش دیسائی نے یہ تجویز پیش کی تھی۔ اِس موقعے پر سابق وزیر اعلیٰ پُرتھوی راج چو ہان نے بتا یا کہ سن 2013؁ میں معروف ادیب  رنگناتھ پٹھا رے کی زیر قیادت کمیٹی کی جانب سے تیار کر دہ 500؍ صفحات پر مشتمل رپورٹ مرکزی حکو مت کو پیش کی گئی تھی لیکن اب تک اُس پر کوئی خاص کاروائی نہیں ہوئی ہے۔  اُنھوں نے اِس خصوص میں فالو اپ لینے کے لیے ایک کمیٹی تشکیل دینے کا بھی مطالبہ کیا۔اِس موقعے پر اراکین نے اِس بات پر نا راضی کا اظہار کیا کہ تمام اُصولوں کی تکمیل کے با وجود تا حال مراٹھی کو سرکا ری زبان کا درجہ نہیں دیا گیا ہے۔خیال رہے کہ فی الحال   تیلگو ‘تامِل ‘ سنسکرت‘ کننڈا‘ ملیا لم اور اُڑیا  زبانوں کو اعلیٰ زبان کا درجہ حاصل ہے۔

***** ***** *****

 مراٹھی زبان کی ماہرڈاکٹر نیلیما گُنڈی نے کہا ہے کہ ہمیں ایسے تعلیمی نصاب کی ضرورت ہے جس سے ماہر لسا نیات تیار ہوں۔ وہ کل ودھان بھون میں منعقدہ ’’ اِ اے مراٹھی چے نگری ‘‘ نامی پروگرام میں اظہار خیال کر رہی تھیں۔اپنے خطاب میں اُنھوں نے مراٹھی زبان کی مختلف بولیوں کے تحفظ کی ضرورت کا بھی اظہار کیا۔ڈاکٹر نیلیما نے کہا کہ ادویات کے کوَر پر مراٹھی زبان میں بھی تفصیلات درج کی جا نی چا ہیے۔
 اِس پروگرام کا افتتاح وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کے ہاتھوں عمل میں آیا ۔ اِس موقعے پر اسمبلی کے اسپیکر  نا نا پٹولے‘ قانو ن ساز کونسل کے چیئر مین رام راجے نائک نمبالکر ‘ اسمبلی میں حزب اختلا ف کے قائد دیویندر پھڑنویس ‘ قانون ساز کونسل میں حزب اختلاف کے رہنما پر وین دریکر اور  وزیر برائے مراٹھی زبان  سُبھاش دیسائی سمیت کئی معزز شخصیتیں موجود تھیں۔
اپنے خطاب میں وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا کہ مراٹھی زبان کی حمایت میں صرف ایک دِن کا اہتمام نہ کریں بلکہ تا عمر اِس کی حمایت کر نا چا ہیے۔ 

***** ***** *****

 یومِ مراٹھی زبان کی مناسبت سے کل ریاست بھر میں مختلف تقاریب کا اہتمام کیا گیا تھا۔ اورنگ آ باد میں اِس موقعے پرکتابوں کی نمائش کا اہتمام کیا گیا ۔ شہر کے سرسوتی بھون آرٹس اور کامرس کالج میں کل اساتذہ کے مشاعرے کا بھی انعقاد کیا گیا تھا۔
 جالنہ ضلع کتب خا نے میں بھی اِس دن کی منا سبت سے کتابوں کی نمائش رکھی گئی تھی۔ اِس موقعے پر مراٹھی زبان کے عظیم ادیب  وی  وا  شِر واڑ کر  کی تصویر کو پھولوں کا ہار پہنا کرنمائش کا افتتاح کیا گیا۔

***** ***** *****

  کورے گائوں بھیما ‘ مراٹھا ریزر ویشن  اور نانار منصوبہ آندولن  میں جن نوجوانوں پر فردِ جر داخل کیے گئے ہیں اُنھیں ریاستی حکو مت کی جانب سے بڑی راحت ملی ہے۔وزیر داخلہ انیل دیشمکھ نے بتا یا کہ کورے گائوں بھیما آندولن میں داخل کیے گئے649؍ فردِ جر م میں سے 348؍  جبکہ مراٹھا ریزر ویشن احتجاج میںداخل کیے گئے 584؍ میں سے460؍ فردِ جرم  میں ریا ستی حکو مت کے فیصلوں کے خلاف احتجاج کرنے والے کاشتکاروں پر داخل کیے گئے فرد ِ جرم بھی واپس لیے جائیں گے۔ 

***** ***** *****

 ہنگولی ضلعے کے کئی حصوں میں کل زلزلے کے ہلکے جھٹکے محسوس کیے گئے۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ کلمنوری تعلقے کے بو دھی‘ بعور‘ مال دھاونڈا  اور  دانڈے گائوں میں کل صبح زلزلے کے  دو  جھٹکے محسوس کیے گئے  اور  زمین کے اندرسے پُر اَسرار آوازیں سنائی دی جس کی وجہ سے مقامی ساکنان پر خوف طا ری ہے۔ تا ہم اِن آفات کی وجہ سے کوئی جانی نقصان نہیں ہوا ہے۔

***** ***** *****

 لاتور کے ضلع کلکٹر  جی  شری کانت نے بتا یا ہے کہ لاتور شہر کو پانی فراہم کرنے والے مانجر آبی ذخیرے میں 36؍ میلین گھن میٹر پانی کا ذخیرہ موجود ہے۔ لہذا  اگر دس دِن کے وقفے سے پانی فراہم کی جاتا ہے تو اکتوبر مہینے تک پانی کی قلت نہیں ہو گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ دیو نی اور لاتور تعلقے میںپانی کی قلت کے امکانات کو مد ِنظر رکھتے ہوئے پانی فراہمی کی منصو بہ بندی کی گئی ہے۔  

***** ***** *****

 آسٹریلیاء میں کھیلے جا رہے خواتین کے  T-20؍کر کٹ عالمی کپ مقا بلو ںمیں  کل بھارتی ٹیم نے نیوزی لینڈ پر 4؍ وکٹوں سے جیت حاصل کر تے ہوئے سیمی فائنل میں داخلہ حاصل کر لیا ہے۔ نیوزی لینڈ نے ٹاس جیت کر پہلے فیلنڈنگ کرنے کا فیصلہ کیا  تھا۔ پہلے بلّے بازی کرتے ہوئے بھارتی ٹیم نے مقررہ اوورں میں8؍ وکٹ کے نقصان پر نیوزی لینڈ کو
133؍ رن کا نشا نہ دیا تھا۔ جوابی بلّے بازی میں نیوزی لینڈ کی ٹیم مقررہ اووروں میں محض129؍ رن ہی بنا سکی۔ بھارت کی سلامی بلّے باز  شیفالی ور ما کو مقابلے کی بہترین کھلاڑی قرار دیا گیا۔

***** *****
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२८ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर
** भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षण आंदोलनातले काही गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
आणि 
** महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश 
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी शिफारस करणारा ठरावही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल एकमतानं मंजुर झाला. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी तो सभागृहात मांडला. २०१३मध्ये साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालच्या समितिनं तयार केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला, मात्र त्यानंतर याबाबत फारसे काही घडले नसल्याचं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी, साहित्यिक आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पाठपुराव्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाण्याची मागणीही सदस्यांनी केली. सर्व निकष पूर्ण करत असतांनादेखील मराठीला राजभाषेच्या दर्जा दिला जात नसल्याबद्दल, सदस्यांनी नाराजीची भावना यावेळी व्यक्त केली. सध्या तामिळ, तेलगु, संस्कृत, कन्नड, मल्याळम् आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं विधेयक काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकातली सवलत देण्याची तरतूद या कायद्याला मारक असून ती रद्द करावी, अशी सूचना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर ही सुरुवात असून, कायद्यात सवलत मिळणार नाही, याची काळजी घेऊ, आणि वेळोवेळी सभागृहात याबाबतची माहिती देऊ, असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे.
****
भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची आज गरज असल्याचं, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी म्हटलं आहे. त्या काल विधानभवनात झालेल्या 'इये मराठीचीये नगरी' या कार्यक्रमात बोलत होत्या. मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती देण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा ही संस्कारातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता, आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा,  असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्य सरकारच्या वतीनं मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ काल ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पुरस्कार प्रदान केले. मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेला ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आर. विवेकांनद गोपाळ यांना, तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला.
****
दरम्यान, मराठी भाषा दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. औरंगाबाद इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात काल प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं. शहरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधून मराठी गौरव गीत, पोवाडा गायन, आदी कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून काल मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून हा दिन साजरा केला.
जालना जिल्हा ग्रंथालयात काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे यांनी यावेळी व्यक्त केली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
****
कोरेगाव- भीमा,  मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरूणांना राज्य शासनानं मोठा दिलासा दिला आहे. कोरेगाव भीमा आंदोलनातल्या ६४९ पैकी ३४८  गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातले ५८४  पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानपरिषदेत दिली. दरम्यान, गेल्या पाच  वर्षात राज्यात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातले गुन्हेही मागे घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.
****
राज्यात विविध उत्सवादरम्यान तयार होत असलेल्या देवी देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिस - पीओपीच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. त्यासोबतच राज्य सरकारनं पर्यावरण रक्षणबाबत संवेदनशील असावं, अशी अपेक्षाही न्यायालयानं व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं, पीओपीच्या मूर्तींची योग्य विल्हेवाट लाऊ शकत नसल्यानं याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरता येणार नाही, असं सांगितलं. त्याशिवाय पीओपीची मूर्ती तयार करण्यावरच बंदी घालावी, अशा मूर्ती तयार करण्यावर दंडात्मक कारवाई करावी, या मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट व्हावी, असा आदेश दिला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात काल भुकंपाचे सौम्य धक्के बसले. कळमनुरी तालुक्यात बोधी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव या परिसरात काल पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले असून, भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुदैवानं या भागात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत प्रस्तावित सहा कोटी २५ लाख रुपयांच्या पुस्तक खरेदी प्रकरणाची संपूर्ण  चौकशी  रण्यात यावी अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना याबाबत एक सविस्तर निवेदन त्यांनी दिलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमातर्गंत शेतकऱ्यांना ही पुस्तके वाटप करायची होती.
****
लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या विरोधात रेणापूर परिसरातल्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाज्यासमोर परवा दुपारपासून सुरू केलेलं धरणं आंदोलन कालही सुरू होतं. पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे. रेणापूर शहरातलेही बहुतांश व्यवहारही काल बंद ठेवण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिशा समितीची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या त्रेचाळीस योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या. कयाधू नदी काठावरील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावावी, प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी, पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवावी, आदी सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या.
****
लातूर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या मांजरा धरणात ३६ लक्ष घनमीटर इतका पाणी साठा असून दर दहादिवसा आड पाणी देण्याचं नियोजन केलं तर आक्टोबर महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवणार  नाही असं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं. देवणी आणि लातूर तालुक्यात टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. रेणापूर मध्यम प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलंच फक्त पाणी  सोडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
*****
उस्मानाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासह कळंब तालुक्यातले चाळीस गावामधले सरपंच, तसंच चार शिवसेना विभाग प्रमुखांनीही काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुजितसिंह ठाकू आदी उपस्थितीत होते.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं काल न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं निर्धारित षटकांत आठ बाद १३३ धावा केल्या, मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारित वीस षटकांत १२९ धावाच करू शकला. भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिनं सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
****
औरंगाबाद शहराच्या उल्कानगरी भागात खिंवसरा पार्क इथं असलेल्या एका इमारतीत तळमजल्यावरच्या गोदामाला काल पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत संस्कार श्यामसुंदर जाधव या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
****