Tuesday, 31 July 2018

“मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीतल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरात लवकर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -


Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीतल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरात लवकर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं आज ‘राजाराम महाराजांचे विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिला कायदा हा मराठा आरक्षणाचा केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आंदोलकांनी कायदेशीर बाबी समजून घ्याव्यात, हिंसाचार करु नये, तसंच स्वत:चा जीव गमावू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण मिळावं, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळवल्या असून, स्मारकाच्या उंचीवरुन राजकारण होणं ही बाब दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत गृह विभागाची बैठक घेऊन, राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. २४ जुलैपासून राज्यात हे आंदोलन सुरु असून, अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या मन्याड धरणाजवळ जलसमाधी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी इथल्या इंदापूर फाट्यावर आज आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करत बस पेटवण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं पालम लोहा राज्य मार्गावर मुंडण आंदोलन करण्यात आलं.

नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस, शिवशाहीच्या ६६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरातही आज मराठा क्रांती संघटनेच्या वतीनं करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निदर्शनं करण्यात आली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालच्या बंदनंतर आज जनजीवन सुरळीत सुरु आहे.

****

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी नागरिकांनी सूचना तसंच विचार पाठवावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी ‍अ‍ॅपवर किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर नागरिकांनी आपले विचार मांडावेत, असं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. नवीन तसंच उत्तम कल्पनांचा अंतर्भाव आपल्या लाल किल्यावरच्या भाषणात केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाड्यात बांबू लागवड झाली तर मराठवाड्याचं चित्र बदलू शकतं, असा विश्वास महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं ५१ हजार बांबू लागवड योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यावेळी उपस्थित होते. बांबुच्या लागवडीची, संवर्धनाची आणि विक्रीची माहिती देणारं केंद्र लोदगा परिसरात, राष्ट्रीय बांबू मिशन आणि राज्य सरकारच्या बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून उभारलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

****

जळगाव तसंच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या दोन्ही महानगरपालिकांची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवत आहेत तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. येत्या तीन ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

****

जालना जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांना पदाची सूत्रं सोपवली.

****

चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं महिला एकेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनानं तुर्कस्तानच्या एलिये देमिरबेग हिचा २१ - १७, २१ - आठ असा पराभव केला. पुरुष एकेरीत के श्रीकांत आणि बी साई प्रणितही दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत.

****

भारत आणि इंग्लंड याच्यात पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून बर्मिंगहम इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका भारतानं, तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडनं जिंकली आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत ४० लाख लोकांचं नागरिकत्व अवैध ठरवल्याचा मुद्दा उपस्थित करत, राज्यसभेत आज तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी सभागृहाचं कामकाज बाजूला ठेऊन या मुद्यावर चर्चेची मागणी केली. या संवेदनशील आणि गंभीर मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह निवेदन देतील, असं सभापतींनी सांगितलं, मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं सभापतींनी कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं.

 कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विविध पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर आपली मतं मांडली.



 देशभरात विविध राज्यांमध्ये घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना राज्यसरकारंही देशाबाहेर काढू शकतात, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या रोहिंग्या घुसखोरांच्या विषयावर बोलत होते. गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना, रोहिंग्या घुसखोर हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करत, त्यांना म्यांमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं.

****



 राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिका हा उपक्रम धर्माशी संबंधित नाही, तर राज्यात राहणारे नागरिक भारतीय आहेत किंवा नाहीत हे निश्चित करण्यासाठी आहे, असं भाजपाचे आसामचे प्रवक्ते सईद मामीनुल अवॉल यांनी म्हटलं आहे. तर आसाम गण परिषदेचे प्रवक्ते तपन दास यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिकेच्या नावाखाली कुठलंही कारस्थान आपला पक्ष यशस्वी होवू देणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

****



 जमावाकडून होणाऱ्या हत्या प्रकरणातल्या दोषींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक केंद्र सरकार लवकरच आणणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नाथजोगी समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली. १२ वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकाच्या धर्तीवर हे प्रस्तावित विधेयक असेल, असं ते म्हणाले.

****



 सरकारनं वस्तू आणि सेवा कर विवरण अर्जाचे नवीन मसुदे प्रसिद्ध केले आहेत. सहज आणि सुगम या नावानं प्रसिद्ध केलेल्या या मसुद्यांवर तज्ज्ञांची मतंही मागवली आहेत. जे व्यवसाय फक्त ग्राहकांना सेवा देतात त्यांच्या साठी सहज हा अर्ज, आणि जे व्यवसाय ग्राहक आणि अन्य व्यवसाय या दोन्हीशी संबधीत आहेत त्यांच्यासाठी सुगम हा अर्ज असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं म्हटलं आहे. हे अर्ज जानेवारी २०१९ पासून अंमलात येतील.

****



 मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांमुळे आलेला परतीचा कचरा अत्यंत चिंताजनक असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानव्यक्त केलं आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनकचरा नियोजनाबाबत तातडीनमार्गदर्शक तत्वनिश्‍चित करावीत, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****



 राज्यात लोक सहभागातून १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण झाला असल्याचं वन सचिव विकास खारगे यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं वृक्ष लागवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सर्व स्तरातल्या नागरिकांचं सहकार्य लाभलं असून, आता वृक्षसंगोपनाचं काम सुरु करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****



 पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या ३७ पूर्णांक ५० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यामधले ९१ प्रकल्प तळाला गेले असून, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, बुलडाणा आणि खामगाव या तालुक्यामध्ये पावसाची तूट ३३ टक्क्यापासून ते १७ टक्क्यापर्यंत आहे. आगामी दोन महिन्यात अपेक्षीत असा पाऊस न झाल्यास पिकोत्पादनासाह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****



 चीन मधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणित दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. साईप्रणितला थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला, तर श्रीकांतनं पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या नहात नगुयेनचा २१ - १५, २१ - १६ असा पराभव केला. महिला एकेरीत उप -उपान्त्यपूर्व फेरीत सायना नेहवालचा सामना आज तुर्कस्तानच्या आलिये देमिर्बग विरुद्ध, तर पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या फित्रीयानी विरुद्ध होणार आहे.

****



 लंडनमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज इटली विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताला उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे. 

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१  जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांना क विमा अर्ज सादर करण्याची मुदत आज संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये आज संबंधीतांचे अर्ज आणि पक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.

****



 फरार उद्योजक विजय मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची अंतिम सुनावणी आज ब्रिटनच्या न्यायालयात होणार आहे. त्यानंतर न्यायालय अंतिम निकालाची तारीख जाहीर करेल. याप्रकरणी गेल्या २७ एप्रिलला झालेल्या सुनावणीत भारतानं दाखल केलेले पुरावे न्यायालयानं मान्य केले आहेत. बँकांचं नऊ हजार कोटी रुपये कर्ज थकवून फरार झाल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.

****



 राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ, केंद्र सरकारच्या विरोधात काल मुंबई काँग्रेसतर्फे “मोर्चा” काढण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाकॉंग्रेस पदाधिकारी आणि  कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 जालना जिल्ह्यात उस्माननगर ते सातोना दरम्यान रेल्वे मार्ग दुरूस्तीमुळे आज ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे नगरसोल-नांदेड सवारी गाडी आणि मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी आज उशीरा धावणार आहे. हा ब्लॉक येत्या दोन, तीन, चार, आणि सात ऑगस्ट रोजी ही घेण्यात येणार आहे.

*****



      बीड जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टक्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली जात आहे. काल कृषी आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातल्या पिकांची पाहणी करून, बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं, तर कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेतल्या कोलंबो इथं खेळल्या गेलेल्या, १९ वर्षांखालील युवकांच्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला कालचा हिला सामना, भारतीय संघानं सहा गडी राखून जिंकला. अवघ्या ३८ षटकं आणि चार चेंडूत श्रीलंकेचा संघ केवळ १४३ धावाच करू शकला. भारतीय संघानं ३७ षटकं आणि एका चेंडूत, चार गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 July 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 31؍  جولائی  ۲۰۱۸ئ؁
وَقت: صبح  ۸:۴۰ -  ۸:۴۵
 فوجداری قانون ترمیمی بل 2018کل لوک سبھا میںمنظور کرلیاگیا۔اس قانون کے تحت 12؍سال سے کم عمربچی کے ساتھ جنسی زیادتی کے مجرم کو سزائے موت اور16؍برس سے کم عمرلڑکی کی آبروریزی کے معاملے میںسزائے سخت کی گنجائش رکھی گئی ہے۔اس خصوص میںگذشتہ 21؍اپریل کوحکمنامہ جاری کیاگیاتھا۔جنسی زیادتی یااجتماعی عصمت دری کے ملزمین کوضمانت قبل ازگرفتاری دئیے جانے کی کوئی بھی گنجائش اس قانون میں موجود نہیںہے۔
***** ***** *****
 مراٹھاریزرویشن کے معاملے پر کانگریس اورراشٹروادی کانگریس کے نمائندہ وفود نے کل گورنر سی ودیا ساگررائوسے علیحدہ علیحدہ ملاقات کی۔ مراٹھا،مسلم،دھنگر،مہادیوکوڑی اورلنگایت سماج کوریزرویشن دئیے جانے کے سلسلے میںگورنر سے مداخلت کرنے کامطالبہ ان وفود نے کیا۔رکن پارلیمنٹ اور کانگریس کے ریاستی صدراشوک چوہان ، ریاستی اسمبلی میں حزب اختلاف کے قائدرادھاکرشن ویکھے پاٹل سمیت دیگر قائدین اس وفد میںشریک تھے۔ ملاقات کے بعد اخباری نمائندوں سے گفتگوکرتے ہوئے اشوک چوہان نے کہا کہ ریزرویشن دئیے جانے کے سلسلے میں حکومت سے ہرطرح کاتعاون کرنے کے لئے کانگریس تیارہے۔
 انہوںنے کہاکہ مراٹھاریزرویشن کے معاملے پراگرشیوسیناسنجیدہ ہے تواسے حکمران محاذ سے باہر آجاناچاہئے۔سابق نائب وزیراعلیٰ اجیت پوار اور قانون سازکونسل میں حزب اختلاف کے قائد دھننجے منڈے کی زیرقیادت این سی پی وفد نے بھی کل گورنر سے ملاقات کی۔ان دونوں جماعتوں کے وفود نے کمیشن برائے پسماندہ طبقات کے ذمہ داران سے بھی کل ملاقات کی۔ اس خصوص میں شیوسینا کے وزراء واراکین اسمبلی کے ایک وفد نے وزیراعلیٰ سے ملاقات کرکے انہیں ایک محضر پیش کیا۔
 دریںاثناء مراٹھاکرانتی مورچہ کے کنوینروِنودپاٹل نے کہا ہے کہ اگرآج شام تک وقت کاتعین کرکے ریزرویشن سے متعلق پروگرام اعلان کیاجاتا ہے توریاست بھر میںجاری تحریک ختم کردی جائے گی۔کل اورنگ آبادمیںنامہ نگاروں سے گفتگو کرتے ہوئے انہوںنے کہا کہ مراٹھا رابطہ کمیٹی نے اپنے 7؍ مطالبات کی فہرست حکومت کوارسال کی ہے۔جس میںکمیشن برائے پسماندہ طبقات کی رپورٹ ملنے کے فوری بعد حکمنامہ جاری کرنے ، اس کے لئے اسمبلی کاخصوصی اجلاس طلب کرنے ، ریاستی حکومت کی ملازمتوں میںمراٹھانوجوانوں کوشامل کئے جانے یاریزرویشن کافیصلہ ہونے تک خالی آسامیاں پُر کرنے کے عمل کوملتوی کرنے جیسے مطالبات اس میںشامل ہیں۔
 اسی دوران کل بھی ریاست کے متعدد مقامات پرمراٹھا ریزرویشن کے لئے پرتشدداحتجاج جاری رہا۔پوناضلع میں کئی بڑی گاڑیوں کونذرآتش کردیا گیا۔شولاپورمیںمظاہرین نے ڈپٹی کمشنرپورنیماچوگلے کی گاڑی کونقصان پہنچایا۔مظاہرین کومنتشرکرنے کے لئے پولس نے وہاں لاٹھی چارج کیا۔
 اورنگ آبادکے مکندواڑی میں پرسوں ایک نوجوان نے ٹرین کے سامنے چھلانگ لگاکر خودکشی کرلی تھی۔ اس واقعے کی مذمت کل مراٹھامظاہرین نے تین گھنٹے تک اورنگ آباد جالنہ شاہراہ پرراستہ روکومظاہرہ کیا۔
***** ***** *****
 قانون سازکونسل کے نومنتخبہ اراکین کوایوان کے سربراہ رام راجے نائیک نمبالکر نے رکنیت کاحلف دلایا۔حلف لینے والے گیارہ اراکین میں بقائے مویشیان وماہی کے وزیرمہادیو جانکربھی شامل تھے۔
***** ***** *****
 اورنگ آبادضلع سلوڑ، سوئے گائوں حلقے کانگریس کے رکن اسمبلی عبدالستارنے مراٹھا ریزرویشن کی حمایت میں کل اسمبلی رکنیت سے استعفیٰ دے دیا۔انہوںنے اپنااستعفیٰ اسمبلی کے چیف سیکریٹری اننت کڑسے کے سپردکیا۔مراٹھاریزرویشن کے مطالبے پراسمبلی سے استعفیٰ دینے والے وہ اورنگ آباد ضلع کے تیسرے رکن اسمبلی ہیں۔
***** ***** *****
 پینے کے پانی کے قومی دیہی منصوبے کے تحت 6؍ہزار624؍اسکیمیں مکمل کرنے کے لئے 7؍ہزار952؍کروڑروپئے کے تخمینے کوحکومت نے منظوری دے دی ہے۔آب رسانی کے وزیر ببن رائو لونیکرنے کل یہ اعلان کیا۔انہوںنے بتایا کہ ان اسکیموں میں سے اورنگ آبادڈیویژن کے لئے ایک ہزار 214؍ اسکیموں کے لئے ایک ہزار251؍کروڑروپئے دئیے جائیںگے۔
***** ***** *****
 جالنہ میں ریلوے فلائی اوورپرایک خانگی بس اورٹووہیلرکے مابین راست تصادم کے باعث موٹرسائیکل سواردوافرادہلاک ہوگئے۔ اتوار کی شب یہ حادثہ رونماہوا۔جالنہ، اورنگ آبادشاہراہ پربدناپورسے قریب کل دوپہر ایک کاراورٹووہیلرکے حادثے میںایک خاتون ہلاک ہوگئی۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ३१  जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



Ø      फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर

Ø     आरक्षणासंदर्भात राज्यपालांनी हस्तक्षेप करून, सरकारला निर्णय     घेण्याचे निर्देश द्यावेत, -विरोधी पक्षांची मागणी

Ø      मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आज सायंकाळपर्यंत जाहीर   केल्यास आंदोलन मागे घेण्याचे संकेत

Ø      मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

आणि

Ø     राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत औरंगाबाद विभागासाठी एक हजार २१४ योजना प्रस्तावित

****



१२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेलं आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेलं फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेनं काल मंजूर केलं. गेल्या २१ एप्रिलला यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला होता. बालिकेवर लैंगिक अत्याचार किंवा सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन देण्याची कोणतीही तरतूद या विधेयकात नाही

****



      मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी, काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची वेगवेगळी भेट घेतली. मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणी बाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करून, राज्य सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. खासदार अशोक चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. आरक्षण देण्याबाबत सरकारला सर्वतोपरी सहकार्य करायला काँग्रेस, तयार आहे, असं चव्हाण यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना गंभीर असेल, तर त्यांनी सत्तेबाहेर पडावं असं ते म्हणाले.



 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानंही काल राज्यपालांची भेट घेतली. मराठा आरक्षणा संदर्भात मागासवर्ग आयोगालाही या दोन्ही पक्षाच्या शिष्टमंडळांनी काल भेट दिली.



 शिवसेनेचे मंत्री आणि आमदार काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले. अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिलं.        

****



 मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आज सायंकाळी पर्यंत जाहीर केल्यास राज्यभरातलं आंदोलन मागे घेतलं जाईल, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटलं आहे, ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते.



 समन्वय समितीनं सरकारला आपल्या सात मागण्यांची यादी पाठवली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ अध्यादेश काढावा, यासंबंधीचा कायदा करण्यासाठी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी, राज्य सरकारच्या पद भरतीतल्या मराठा तरुणांच्या जागा तत्काळ भराव्यात, किंवा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलकांनी हिंसा न करण्याचं आवाहन विनोद पाटील यांनी केलं आहे.

****



 दरम्यान, राज्यात कालही विविध भागात मराठा आरक्षण आंदोलन झालं. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. पुणे जिल्ह्यात अनेक मोठी वाहनं पेटवून देण्यात आली. सोलापूर इथं आंदोलकांनी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची तोडफोड केली, यावेळी प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.



 औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या एका युवकानं परवा रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या निषेधार्थ मराठा मोर्चा आंदोलकांनी काल दुपारी औरंगाबाद- जालना महामार्ग तीन तास रोखून धरला.



 हिंगोली - नांदेड रस्त्यावर माळेगाव फाटा इथं आंदोलन करण्यात आलं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड - लातूर मार्गावर सोनखेड इथं बसवर दगडफेक केली. जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं काही समाजकंटकांनी दगडफेक केली, मात्र गुन्हे मराठा आंदोलकांवर नोंदवण्यात आल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.

****



 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणं सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली आहेत, ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कामुंबई इथं या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संस्थांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

****



 विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना काल सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी  सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्यासह अकरा सदस्यांचा समावेश आहे.

*****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड-सोयंगावचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. या प्रश्नी राजीनामा देणारे ते औरंगाबाद जिल्ह्यातले तिसरे आमदार आहेत.

****



 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून सहा हजार ६२४ योजना पूर्ण करण्यासाठी, सात हजार ९५२ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनानं मंजुरी दिली आहे. पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. यापैकी औरंगाबाद विभागासाठी, १ हजार २१४ योजना प्रस्तावित असून, त्यासाठी १ हजार २५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. याद्वारे राज्यभरात टँकरग्रस्त असणाऱ्या प्रत्येक गावासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

****



 मराठवाड्यात जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार झालेल्या गावांसाठी शासनाच्या वतीनं ‘सामुहिक मत्स्य शेती योजना’ राबवण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना भापकर यांच्या हस्ते जलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. वृक्ष लागवडीचं उद्दीष्टही औरंगाबाद जिल्ह्यानं पूर्ण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 भारत सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या अशासकीय संचालक पदी, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉक्टर भागवत कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सात संचालक या महामंडळावर आहेत.

****



 प्रधानमंत्री पक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांना क विमा अर्ज सादर करण्याची मुदत आज संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये आज संबंधीतांचे अर्ज आणि पक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.

****



 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातल्या नागरिकांनी आपलं कुटुंब सुरक्षित केलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….

राजकुमार शिवाजी सोनकांबळे, राहणार गुरळी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा मी लाभार्थी असून, वर्षाला १२ रूपये भरतो. आमच्या जीवन योजनेचे लाभ मिळावा म्हणून आणि सुरक्षा विमा योजना चालू ठेवली.

 नमस्कार, मी सचिन सोपान घोडगे , राहणार गुरळी तालुका तुळजापूर. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत १२ रूपयांचा विमा काढलेला आहे. आणि तो दरवर्षी माझ्या खात्यातनं ऑटोडेबिट होतो. या योजनेमुळे परिवाराला सुरक्षा मिळत आहे. त्यामुळे मी केंद्र शासनाचा आभारी आहे.

****

 जालना इथं रेल्वे उड्डाणपूलावर एक खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरचे दोन तरुण ठार झाले. रविवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूरजवळ काल दुपारी कार आणि दुचाकीच्या अन्य एका अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला.

****



 तुळजापूर नगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण गवळी यांनी काल तुळजापूर इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आणि साकार मुद्रणालयाचे संस्थापक, रामकृष्ण जोशी यांचं काल निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

*****

***

Monday, 30 July 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.07.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा आरक्षण आंदोलन राज्याच्या विविध भागात सुरूच असून, या मुद्यावर भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी आज बैठका घेतल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस कार्यालयात, तर विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. दोन्ही पक्षांचं शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्ग आयोगाची आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.   

****

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत आज पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भातला सर्वसमावेशक अहवाल सर्वानुमते केंद्राकडे पाठवावा, असं सांगून ठाकरे यांनी, मराठा समाजानं आंदोलनादरम्यान कोणताही हिंसाचार न करण्याचं आवाहन केलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकारनं लगेच अध्यादेश काढावा, आणि कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारच्या पद भरतीतल्या मराठा तरुणांच्या जागा तात्काळ भराव्यात किंवा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत पाटील यांनी, आंदोलकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागातल्या तरुणानं काल रात्री आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर, जालन्याहून औरंगाबादला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेस काही काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या.

नाशिक इथं शिवसेनेचे देवळाली विधानसभेचे आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर नांदेड जिल्ह्यात नांदेड - लातूर मार्गावर सोनखेड इथं आंदोलकांनी बसवर दगडफेक केली.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं काही समाजकंटकांनी दगडफेक केली, मात्र गुन्हे मराठा आंदोलकांवर नोंदवण्यात आले असून, येत्या आठ ऑगस्ट पर्यंत गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. एक ऑगस्ट पासून जालना शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, आठ ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणं सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली, ती तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई इथं आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेसंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या शैक्षणिक वर्षांत शैक्षणिक संस्थांना महाडीबीटी पोर्टलद्वारे राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब लागत असला, तरी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानाला प्रतिसाद देत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढकारातून लातूर जिल्ह्यातल्या लोदगा इथं एकावन्न हजार बांबूंची लागवड केली जाणार आहे. उद्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

****

मराठवाड्यात जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार झालेल्या गावांसाठी शासनाच्या वतीनं ‘सामुहिक मत्स्य शेती योजना’ राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना भापकर यांच्या हस्ते जलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. वृक्ष लागवडीचं उद्दीष्टही औरंगाबाद जिल्ह्यानं पूर्ण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

तुळजापूर नगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण गवळी यांनी आज तुळजापूर इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आणि साकार मुद्रणालयाचे संस्थापक रामकृष्ण जोशी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते.

//**********//




AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 आसामची राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली झालं असून, याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. या पुस्तिकेत ४० लाख लोकांचं नागरिकत्व अवैध ठरवल्या बद्दल विरोधकांनी आज लोकसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ४० लाख लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न असून, याबाबत ठोस निर्णय घ्यावा, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. हा मानवाधिकाराचा मुद्दा असून, आसाममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. यावर बोलताना गृहमंत्र्यांनी, ही यादी नि:पक्षपातीपणे तयार करण्यात आली असून, ज्यांची नावं या यादीत नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याची आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं.



 राज्यसभेतही या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निवेदन देण्याची मागणी केली. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसना समोर हौद्यात उतरुन घोषणा बाजी केल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.   

****



 दरम्यान, आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत एकूण तीन कोटी २९ लाख अर्जांमधून दोन कोटी ८९ लाख लोकांची नावं समाविष्ट करण्यात आली असून, ४० लाख लोकांची नावं यातून वगळण्यात आली आहेत. ही केवळ प्राथमिक यादी असून अंतिम अहवाल नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.

****



 एक पीक उत्पादन पद्धतीत बदल करून, एकाच वेळी विविध प्रकारच्या अन्नधान्य उत्पादनाची पद्धत अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. चेन्नई इथं स्वामीनाथन फाऊंडेशननं आयोजित केलेल्या, 'पोषण आहारक्षम कृषीव्यवस्था' या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. भरड धान्य, फळं आणि भाज्यांसोबतच, विविध प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन घेतल्यानं पोषणक्षम अन्नधान्य उत्पादनांतली समृद्धता वाढे, जमिनीचा कस कायम राहिल, तसंच डाळींच्या आयातीवरचा भारही कमी करता ये, असं नायडू यांनी सांगितलं.

****



जम्मू-काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्याच्या नायरा ताहब परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळी बारात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला. काल रात्री झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणी साठी राज्यात आजही काही ठिकाणी आंदोलन सुरु आहे. सोलापूर शहर आणि परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून, बंदला हिंसक वळण लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंदोलकांनी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची तोडफोड केली, यावेळी प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या परिसरात पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री सुरु आहे. शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद आहेत. अक्कलकोट, चुंगी इथंही सर्वत्र बंद असून, आंदोलन सुरु आहे. हिंगोली - नांदेड रस्त्यावर माळेगाव फाटा इथं रस्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या एका युवकानं काल रात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. प्रमोद पाटील असं या युवकांचं नाव आहे. काल दुपारी त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर संदेश लिहून आत्महत्या करणार असल्याचे, संकेत दिले होते. प्रमोद यांचा मृतदेह औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात असून, आरक्षणा बाबत ठोस निर्णय झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा मोर्चा आंदोलकांनी औरंगाबाद - जालना महामार्ग रोखला असून, सरकार विरोधात घोषणा बाजी सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद जिल्ह्यातली ही तिसरी आत्महत्या आहे.

****



 महाड जवळ पोलादपूर इथं बस दुर्घटनेत मरण पावलेल्या दापोली कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांत सामावून घेणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली आहे. मरण पावलेल्या ३० कर्मचाऱ्यांपैकी २३ जण विद्यापीठाचे कायमस्वरुपी कर्मचारी होते, इतर सात जणांबाबतही विशेष बाब म्हणून त्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत सामावून घेतलं जाईल, अशी माहिती वायकर यांनी दिली.

****



 औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

*****

***