आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 30 September 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30 SEPTEMBER 2020 TIME – 18.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
**
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया
**
ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू
**
शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं
-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांची मागणी
आणि
**
मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा स्थगित करण्यास
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. गेल्या वेळेस कोविड -१९ मुळं ज्या उमेदवारांना
ही परीक्षा देता आली नाही, त्यांच्या साठी ही आणखी एक संधी असेल असं न्यायालयानं म्हटलं
आहे. चार ऑक्टोबरपासून होणारी ही परीक्षा कोविड -19चा प्रादुर्भाव आणि देशाच्या विविध
भागातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्थगित करण्याची मागणी केली जात होती, या
मागणीसह येत्या न्यायालयानं २०२० आणि २०२१ची नागरी सेवा परीक्षा एकत्र घेण्यासही न्यायालयानं
नकार दिला आहे. परीक्षा सर्वांसाठी आवश्यक असून, परीक्षेसाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात
आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
बाबरी
मशीद विध्वंस प्रकरणी लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं या प्रकरणातले
आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसंच मुरलीमनोहर जोशी यांनी स्वागत केलं
आहे. या निर्णयामुळे रामजन्मभूमी अभियानाप्रती आपली कटिबद्धता सिद्ध झाल्याचं, अडवाणी
यांनी म्हटलं आहे, तर जोशी यांनी या निर्णयामुळे आपलं अभियान कोणत्याही कटकारस्थानाचा
भाग नव्हतं हे सिद्ध झाल्याचं म्हटलं आहे.
न्यायालयानं
या प्रकरणातल्या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करत, बाबरी मशीदीचा
विध्वंस हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघानंही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानंतर समाजातल्या सर्व
घटकांनी एकत्र यावं आणि देशापुढची इतर आव्हानं सोडवण्यासाठी तसंच देशाच्या प्रगतीसाठी
कार्य करावं, असं आवाहन संघाचे महासचिव भैयाजी जोशी यांनी ट्विटरवरून केलं आहे.
शिवसेना
नेते संजय राऊत यांनी आजच्या या निकालाचं स्वागत केलं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं
गेल्या वर्षी रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निकालानंतर बाबरी मशीद विध्वंस खटल्याची
काहीही प्रासंगिकता राहिली नव्हती, असंही राऊत यांनी नमूद केलं.
दरम्यान,
या निकालाला आव्हान देण्याबाबतचा निर्णय विधी विभागाशी चर्चेनंतर घेणार असल्याचं, सीबीआयनं
म्हटलं आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात सीबीआयने न्यायालयासमोर
३५१ साक्षीदार तर सहाशे कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केली होती.
न्यायालयाचा
हा निर्णय अप्रिय असल्याचं, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे, सीबीआयनं
या निकालाला आव्हान देण्याचा सल्ला ओवेसी यांनी दिला आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल
लॉ बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य मौलाना खालिद रशीद यांनी या निर्णयाला आव्हान देण्याबाबतचा
निर्णय सर्वसहमतीनं घेतला जाईल, असं सांगितलं आहे.
****
रिपब्लीक
वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंग सूचना बजावल्याप्रकरणी
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांकडून उत्तर मागवलं आहे. गोस्वामी
यांचे वकील हरीश साळवे यांनी या सूचनेला आव्हान देताना, गोस्वामी यांनी विधानसभेच्या
किंवा विधानसभेच्या कोणत्याही समितीच्या कामकाजात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला
नसल्याचं, आपल्या युक्तिवादात म्हटलं आहे. या संदर्भात न्यायालयानं विधानसभा सचिवांना
सात दिवसांत उत्तर देण्यात सांगितलं आहे.
****
सैन्यदलानं
आज ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ध्वनीपेक्षा तिप्पट वेग
असलेलं हे क्षेपणास्त्र, चारशे किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतं. हे
क्षेपणास्त्र जमिनीवरून, विमानातून, युद्धनौकेवरून किंवा पाणबुडीवरूनही लक्ष्यावर डागता
येऊ शकतं ओडिशात बालासोर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आल्याचं, संरक्षण संशोधन आणि
विकास संस्था - डीआरडीओकडून सांगण्यात आलं.
****
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. नायडू यांची कोविड
चाचणी झाल्यानंतर ते बाधित आढळले. त्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान,
केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. गडकरी यांनी
ट्वीट करून ही माहिती दिली. गेल्या १६ तारखेला गडकरी यांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न
झालं होतं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९३५ जणांचा या
विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची संख्या ३३ हजार
४११ झाली असून पाच हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
केंद्र
शासनाने तयार केलेलं कृषी विधेयक हे शेतकरी विरोधात असून शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे
अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी केली आहे. केंद्र शासनाने
नुकत्याच मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात गणेश देवी यांनी गेल्या २४
सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथून संवाद यात्रा सुरू केली आहे. आज या संवाद यात्रेचे
नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर डॉ. देवी यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. करार
पध्दतीने शेती करताना ग्रामसभेची मान्यता आवश्यक करावी अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर
त्यांनी बाजार समितीतील शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला.
****
ऊसतोड
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज दुपारपासून पासून सांगली जिल्ह्यात ऊस तोड कामगारांचं
कोयता बंद आंदोलन सुरु झालं. माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या
नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं आहे. राज्यातल्या ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा
करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
****
धनगर
समाजाला अनुसूचीत जमातीचं आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी आज धुळ्यात धनगर समाजाच्या
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पारंपारिक वेषात, पिवळे फेटे,
हातात पिवळे झेंडे घेत भंडारा उधळीत या मोर्चात शेकडो धनगर समाज महिला पुरुष, तरुण,
मुले सहभागी झाले होते.
****
मोसमी
पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यंदा दिल्लीत दोन दिवस लवकर म्हणजेच
२५ जूनला पोहोचलेल्या पावसाचा मुक्काम पाच दिवस लांबला. साधारणत: २५ सप्टेंबरला दिल्लीतून
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
*****
उद्यापासून
सुरु होत असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य परीवहन महामंडळाच्या वतीनं
घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं
आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात तसंच बीड, जालना, परभणी, बुलडाणा आणि
इतर विभागातून औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं विभागनियंत्रक अरुण सिया
यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या भोकर ते रहाटी रस्त्याचं हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
दिले आहेत. मंत्रालयात यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते
बोलत होते. भोकर ते रहाटी रस्त्याचं काम प्रलंबित असल्याच्या अनेक तक्रारी, निवेदने
आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान, या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात
यावी, आणि कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
****
शिवसेनेच्या
औरंगाबाद शाखेच्या वतीनं माझे कुटुंब माझी
जबाबदारी अभियानांतर्गत एक ते २५ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. यामध्ये दूरदृष्य
संवाद प्रणालीच्या माध्यमाद्वारे व्याख्यानं, विना मास्क असणाऱ्यांना मास्क भेट, वाफ
घेण्याचे यंत्र आणि गावनिहाय ९ कोरोनायोद्ध्या महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं
ते म्हणाले.
****
हिंगोली
जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सालेगावं
-सांडस मार्गे कळमनुरीला जाणारा पूल सतत च्या पावसामुळे उखडून गेला आहे.दोन गावांना
जोडणारा पूल तुटल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतल्या
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयच्या लखनौतल्या विशेष न्यायालयानं आज हा निर्णय सुनावला. अयोध्येत
६ डिसेंबर १९९२ रोजी झालेली ही घटना पूर्वनियोजित नव्हती, असं न्यायालयानं या निर्णयात
म्हटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तरप्रदेशचे
तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार आणि अयोध्येतल्या राममंदिराचे
महंत नृत्यगोपालदास यांच्यासह एकूण ३२ आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी ३१ ऑगस्टपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले होते,
ही मुदत त्यानंतर महिनाभरासाठी वाढवण्यात आली होती. खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी
विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत, आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय सुनावला.
****
देशात कोविड
संसर्गमुक्तीचं प्रमाण ८३ पूर्णांक ३३ शतांश टक्के झालं आहे. देशात कोविड बाधितांच्या
संख्येनं ६२ लाखांचा आकडा पार केला असून, त्यापैकी ५१ लाख ८७ हजार ८२५ रुग्ण बरे झाले
आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात या संसर्गाचे ८० हजार ४७२ नवे रुग्ण आढळले,
१ हजार १७९ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ९७ हजार ४९७ झाली आहे.
या संसर्गाने मृत्यूचं प्रमाण आता एक पूर्णांक ५६ शतांश टक्के झालं आहे. देशात सध्या
९ लाख ४० हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली आहे. यापैकी २६ हजार
६५२ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९३० जणांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मुंबईत गेल्या
२४ तासांत एक हजार ७१३ नवीन कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली तर ४९ रुग्णांचा मृत्यू
झाला. आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख दोन हजार ४८८ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा
आठ हजार ८८० वर पोहचला आहे.
****
मुंबईत आता
मास्क न वापरणाऱ्या लोकांना बस, टॅक्सी, आणि रिक्षा यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा
उपयोग करता येणार नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मॉल्स, कार्यालयं, तसंच
रहिवासी सोसायट्या या ठिकाणी देखील विना मास्क असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही.
कोरोना विषाणू संसंर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क सारख्या प्रतिबंधित उपायाचा वापर
व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची
अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक, वॉर्ड कार्यालयं तसंच रिक्षा चालक संघटनेला या बाबत
माहिती देण्यात येणार आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या
कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या आता ३४ हजार ७०८ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार
महानगरपालिका क्षेत्रातल्या २२ हजार २१९ इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या १२ हजार
४१७ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३० हजार ४३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात ६१२ इतकी प्रतिबंधित क्षेत्रं आहेत.
****
लोकांवर
भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं आरोग्य सेवांचं शुल्क कमी करण्यासाठी अनेक पावलं
उचलली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे. अनेक खाजगी संस्था लोकांकडून
अतिरिकत शुल्क वसूल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी हे विधान केलं आहे. ते
भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान कोविड -19 मुळं अनेक
जणांचा रोजगार गेला असून त्यामुळं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे आणि त्यातून बाहेर पडणं
हे एक आव्हान असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
धुळे जिल्ह्यातले
उद्योजक आणि शिरपूर नगर परिषदेचे नगरसेवक तपनभाई पटेल यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं.
शिरपूर जवळच्या सावळदे शिवारातल्या निम्स कॅम्पस इथून घरी जात असतांना तपन पटेल यांची
भरधाव गाडी अनियंत्रित झाल्यानं पथकर नाक्याजवळ महामार्गावरच्या दुभाजकावर जोरात आदळली.
या अपघातात तपन पटेल हे जागीच ठार झाले. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी शिरपूर
इथं पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
वाशिम जिल्ह्यात
“माझे कुटुंब - माझी जबाबदारी” या अमोहिमेला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत १२ लाख नागरिकांचं
सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आता पर्यंत 3 लाख लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.
यातील उच्च रक्तदाब-मधुमेह या रोगाने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या जवळ पास ८ हजार
आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी आकाशवाणीशी बोलतांना
दिली.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचं
लखनौतलं विशेष न्यायालय आज निर्णय सुनावणार आहे. या प्रकरणी सर्व ३२ आरोपींना न्यायालयात
हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र मुख्य आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,
मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि अयोध्येतल्या
राममंदिराचे महंत नृत्यगोपालदास हे विलगीकरणात असल्यानं, हजर राहण्याची शक्यता कमी
आहे.
****
देशात कोविड बाधितांच्या संख्येनं ६२ लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या
२४ तासांत देशात या संसर्गाचे ८० हजार ४७२ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या
६२ लाख २५ हजार ७६३ झाली आहे. गेल्या २४ तासांतच या संसर्गाने १ हजार १७९ रुग्णांचा
मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ९७ हजार ४९७ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ४११
झाली आहे. यापैकी २६ हजार ६५२ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत
जिल्ह्यात ९३० जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८५७ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार ७१३ कोविडग्रस्तांच्या नवीन रुग्णांची
नोंद झाली तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख दोन हजार
४८८ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा आठ हजार ८८० वर पोहचला आहे.
****
२०२०-२१ या हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावानं उडीद
खरेदीला उद्या एक ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी
१५ सप्टेंबरपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला
उद्यापासून सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या एक हजार ३९८ सहकारी
संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या निवडणूका डिसेंबरपर्यंत पुढे
गेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, शिक्षक बँक, सांगली अर्बन बँक यासह अन्य संस्थांच्या
निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date : 30 September 2020
Time: 09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ ستمبر ۲۰۲۰ئ
وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
پہلے خاص خبروں کی سر خیاں...
٭
نوراتر ی اُتسو میں گر با ‘ داندڈیا اور دیگر ثقا فتی پروگراموں کا اہتمام کرنے کی اجازت نہیں ہو گی
٭
زراعی تر میمی بلوں کی حمایت میں کسان تنظم2؍ اکتوبر کو ریاست بھر میں مکمل آزادی کی تحریک چلائے گی
٭
ڈاکٹر بابا صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے امتحا نات ملتوی کر دیئے گئے ہیں
٭
ریاست میں مزید14؍ ہزار976؍ افراد کورونا وائرس سے متاثر ‘430
؍مریض علاج کے دوران چل بسے
اور
٭
مراٹھواڑے میں مجموعی طور پر 36؍ مریض دوران علاج انتقال کر گئے ‘ جبکہ مزید ایک ہزار265؍ مریضوں کا اضا فہ
اب خبریں تفصیل سے....
کورونا وائرس کے پھیلائو کو مدِ نظر رکھتے ہوئے ریاستی حکو مت نے نو راترر ی اور دسہرا تہوار منا نے کے لیے کَل رہنما ہدایات جا ری کی ۔ اِس کے مطابق ریاست میں نو راتری کے موقعے پر گر با ‘ دانڈیا اور دیگر ثقا فتی پروگراموں کا اہتمام کرنے کی اجازت نہیں ہو گی۔ اِسی طرح عوامی منڈلوں میں مورتی کی اونچائی زیادہ سے زیادہ چار فُٹ اور گھریلو مورتی کی اونچائی زیادہ سے زیادہ 2؍ فُٹ ہو۔ اِسی طرح مورتی لانے اور اُس کے وِسرجن کے لیے جلوس نکالنے کی بھی اجازت نہیں ہو گی۔ آن لائن درشن کا بندوبست کر نا نیز مذہبی تقاریب میں عوامی ہجوم اکٹھا نہ ہو اِس بات کا خیال رکھنا اور نوراتری اُتسو کے دوران ’’ میرا کُنبہ میری ذمہ داری‘‘ مہم سے متعلق عوامی بیداری پیدا کرنا وغیرہ ہدایات ریاستی حکو مت نے جا ری کی ہیں۔ ساتھ ہی عوامی نوراتر اُتسو منڈلوں کو بلدیہ اور مقا می انتظا میہ سے اجازت حاصل کرنا بھی لازمی قرار دیا گیا ہے۔
اِسی طرح دسہرا تہوار کے موقعے پر راون کی مورتی جلا نے کا کام گنے چُنے افراد کی موجودگی میں انجام دینے اور اِس پروگرام کوبراہِ راست نشر کرنے کی بھی ہدایت دی گئی ہے۔
***** ***** *****
وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا ہے کہ ’’ میرا کُنبہ میری ذمہ داری‘‘ یہ مہم سر کارکی نہیں بلکہ عوام کی ہے ۔ وہ کَل اِس مہم کے جائزہ اجلاس میں اظہار خیا ل کر رہے تھے۔ اِس موقعے پر چیف سیکٹریٹری اروِند کُما ر نے بتا یا کہ اِس مہم کے تحت تا حال دیہی علاقوں کے8؍ کروڑ سے زیادہ افراد کا سر وے کیا جا چکا ہے۔ اور اِس کے لیے تشکیل دیئے گئے وفود نے اب تک 24؍ لاکھ کنبوں سے ملا قات کی ہے۔
***** ***** *****
راشٹر وادی کانگریس پارٹی کے سر براہ رکن پارلیمنٹ شرد پوار نے کہا ہے کہ چھتر پتی سنبھاجی راجے اور چھتر پتی اُدین راجے کو بھارتیہ جنتا پارٹی نے بطور رکن پارلیمنٹ مقرر کیا ہے لہذا یہ دونوں راجابی جے پی سے مراٹھا ریزر ویشن کا معا ملہ حل کر وائیں۔وہ کَل شولا پور میں صحافیوں سے مخا طب تھے۔ اُنھوں نے کہا کہ ملک کی توجہ ہٹا نے کے لیے مرکزی حکو مت نے اداکار سشانت سنگھ راجپوت خودکشی معاملے کی جانچ کر نے کے لیے مختلف اِداروںکو ذمہ داری سونپی تھی تا ہم وہ دوسری سمت میں تفتیش کر رہے ہیں۔ پوار نے کہا کہ مرکزی حکو مت کے پیش کر دہ زرعی بلوں کی سبھی مل کر مخالفت کریں گے اور کسان اِس کی قیادت کریں گے ۔
***** ***** *****
اسمبلی میں حزب اختلاف کے رہنما دیویندر پھڑ نویس نے وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کو خط لکھ کر مطالبہ کیا ہے کہ مراٹھواڑے میں ہوئی موسلا دھار بارش کی وجہ سے متاثر ہوئی فصلوں کے پنچ نا مے جلد از جلد تیار کر کے کاشتکاروں کی امداد کی جائے ۔ اُنھوں نے لکھا کہ پنچانامے کیئے جا رہے ہیں یا نہیں اور اصل زمینی حالات کیا ہیں اِس پر سنجید گی سے توجہ دینے کی ضرورت ہے ۔
***** ***** *****
مرکزی حکو مت کی جانب سے منظو رکر دہ زرعی تر میمی بلوں کی حمایت میں کسان تنظیم آئندہ2؍ اکتوبر کو ریاست بھر میں مکمل آزادی کی تحریک چلائے گی۔ کسان تنظیم کے صدر اَنیل گھن وٹ نے صحا فیوں کو یہ اطلاع دی ۔ اُنھوں نے بتا یا کہ کسان تنظیم کے دیرینہ مطا لبات کے مطا بق اِن قوانین کے سبب کاشتکاروں کو کھلا بازار میسر آ یاہے تاہم ضروری اشیاء سے متعلق قا نون سے خارج کی گئی اشیاء کی قیمت میں اضا فہ ہونے کے بعد دو با رہ ضروری اشیاء کی فہرست میں شامل کرنے کی گنجائش کی کسان تنظیم خلاف ہے۔ گھن وٹ نے کہا کہ مرکزی حکو مت صحیح سمت میں گامزن ہے۔
***** ***** *****
ڈاکٹر با با صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے آئندہ کَل یعنی یکم اکتوبر سے شروع ہونے والے امتحا نات ملتوی کر دیئے گئے ہیں۔ اِس خصوص میں یونیور سٹی کی جانب سے کل ایک مراسلہ جاری کیا گیا۔ اِس میں کہا گیا ہے کہ یو نیور سٹی کے تمام غیر تدریسی ملازمین کام بند آندولن کر رہے ہیں اِسی لیے یہ امتحا نات ملتوی کیے جا رہے ہیں۔
اِسی دوران رکن پارلیمنٹ ڈاکٹر بھاگوت کراڑ اور شیو سینا کے رہنما چندر کانت کھیرے نے کَل مظاہرین سے ملا قات کی اِس موقعے پر رکن پارلیمنٹ کراڑ نے کہا کہ وہ ملازمین کے مسائل حل کروانے کے مقصد سے وزیر اعلیٰ اور ریاست کے گور نر سے ملاقات کریںگے۔
***** ***** *****
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** *****
ریاست بھر میں گزشتہ روز مزید14؍ ہزار976؍ افراد کورونا وائر س سے متاثر پائے گئے ۔ اِس اضا فے کے ساتھ ہی ریاست بھر میں اب تک پائے گئے کورونا متاثرین کی مجموعی تعداد 13؍ لاکھ
66؍ ہزار129؍ ہوچکی ہے۔ ریاست بھر میں کَل 430؍ کورونا مریض علا ج کے دوران چل بسے ۔ اِس بیماری کے سبب اب تک پوری ریاست میں 36؍ ہزار181؍ اموات ہو چکی ہیں۔
دوسری جانب زیر علاج مریضوں میں سے گزشتہ کَل19؍ ہزار212؍ افراد شفا یاب ہو کر اپنے گھر لوٹ گئے ۔ اِس طرح اب تک 10؍ لاکھ 69؍ ہزار159؍ افراد علاج کے بعد کورونا وائرس سے نجات پا کر صحت یاب ہو چکے ہیں اور فی الحال 2؍ لاکھ60؍ ہزار363؍ کورونا مریض زیر علاج ہیں۔
***** ***** *****
مراٹھواڑے میں کَل 36؍کورونا مریضوں کا علاج کے دوران انتقال ہو گیا۔ جبکہ مزید ایک ہزار
265؍ افراد کورونا وائرس کی زد میں آ گئے ۔
عثمان آ باد اور بیڑ ضلعے میں کَل فی کس 8-8؍ کورونا مریضوں کی موت واقع ہو گئی ۔ جبکہ عثمان آ باد ضلعے میں مزید216؍ اور بیڑ ضلعے میں146؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے ۔ اورنگ آ باد اور لاتور ضلعے میں بھی فی کس 5-5؍ کورونا مریض کل علاج کے دوران فوت ہو گئے۔ جبکہ اورنگ آباد ضلعے میں مزید237؍ افراد اور لاتور ضلعے میں مزید217؍ کورونا مریضوں کی نشاندہی ہوئی۔ ناندیڑ ضلعے میں 4؍ کورونا مریض کل علاج کے دوران چل بسے جبکہ مزید216؍ مریض پائے گئے۔ جالنہ ضلعے میں 3؍ کورونا مریضوں نے کل علاج کے دوران دم توڑ دیا جبکہ مزید115؍ افراد کورونا وائرس کے نر غے میں آ گئے ہیں ۔ پر بھنی ضلعے میں بھی گزشتہ کَل2؍ مریضوں کی موت واقع ہو گئی جبکہ مزید82؍ افراد کورونا وائرس سے متاثر ہونے کا انکشاف ہوا ۔ ہنگولی ضلعے میں کَل ایک کورونا مریض کی علاج کے دوران وفات ہو گئی جبکہ مزید36؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے ۔
***** ***** *****
پریس اِنفور میشن بیورو نے واضح کیا ہے کہ بالیکا یو جنا کے نام سے غریب لڑ کیوں کی شادی کے لیے مرکزی حکو مت کی جانب سے پچاس ہزار روپئے دینے کی اسکیم سے متعلق ایک ویب سائٹ پر شائع کی گئی خبر بے بنیاد ہے اور ایسی کوئی یو جنا نہیں ہے ۔
***** ***** *****
عثمان آ باد ضلعے کے پرانڈا تعلقے میں ٹاکلی سے تعلق رکھنے والے سپا ہی وامن پوار نے کَل لداخ میں فرائض کی انجام دہی کر تے ہوئے اپنی جان کا نذرانہ پیش کر دیا ۔ اُن کا جسدِ خاکی کل دیر رات گئے اُن کے گائوں پہنچا یا گیا۔ اُن کی آخری رسو مات آج تمام سر کاری اعزازات کے ساتھ ادا کی جا ئیں گی۔
***** ***** *****
جیب گاڑی میں منشیات کی اسمگلنگ کرنے والے 2؍ افراد کو کل اورنگ آ باد میں گرفتار کر لیا گیا۔ پولس کو اطلاع ملی تھی کہ ممبئی سے اورنگ آ باد آ رہی ایک گاڑی میں منشیات کی اسمگلنگ کی جا رہی ہے جس کے بعد پولس نے جال بچھا کر ایک اسکار پیو جیپ سے61؍ ہزار روپئے مالیت کی منشیات بر آمد کی۔ ملزمان کو گرفتار کر کے فردِ جرم داخل کیا گیا ہے۔
***** ***** *****
اورنگ آ باد کے رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے موسلادھا بارش کی وجہ نقصان اُٹھا رہے کاشتکاروں کو امداد فراہم کرنے سے متعلق جلد از جلد کوئی ٹھوس فیصلہ کر کے معاشی پیکیج جا ری کرنے کا مطالبہ کیا ہے۔ رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے کَل مملکتی وزیر برائے محصول عبد الستار ‘ ضلع کلکٹر سُنیل چو ہان اور دیگر متعلقہ افسران کے ساتھ کنڑ‘ گنگا پور اور ویجا پور تعلقوں میں متاثرہ کھیتوںکا معائنہ کیا ۔ اِس موقعے پر اُنھوں نے کہا کہ حکو مت کی جانب سے قانون میں تبدیل کئے گئے زرعی بِل کسان مخالف ہیں۔
***** ***** *****
آخر میں خاص خبروں کی سر خیاں ایک بار پھر سن لیجیے
٭
نوراتر ی اُتسو میں گر با ‘ داندڈیا اور دیگر ثقا فتی پروگراموں کا اہتمام کرنے کی اجازت نہیں ہو گی
٭
زراعی تر میمی بلوں کی حمایت میں کسان تنظم2؍ اکتوبر کو ریاست بھر میں مکمل آزادی کی تحریک چلائے گی
٭
ڈاکٹر بابا صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے امتحا نات ملتوی کر دیئے گئے ہیں
٭
ریاست میں مزید14؍ ہزار976؍ افراد کورونا وائرس سے متاثر ‘430؍مریض علاج کے دوران چل بسے
اور
٭
مراٹھواڑے میں مجموعی طور پر 36؍ مریض دوران علاج انتقال کر گئے ‘ جبکہ مزید ایک ہزار265؍ مریضوں کا اضا فہ
علاقائی خبریں ختم ہوئیں۔
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०
सप्टेंबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
बातमीपत्राच्या
सुरूवातीला गांधी वचन –
खूप सारे उपदेश ऐकण्यापेक्षा थोडासा सराव करणं कधीही चांगलं.
****
·
आगामी नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना
परवानगी नाही.
·
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा
निर्णय राज्य सरकार मागे घेणार- खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती.
·
कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटनेचं दोन ऑक्टोबरला
राज्यव्यापी ‘संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन’.
·
आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला तर सोयाबीन
खरेदीच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात.
·
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे
ढकलल्या.
·
राज्यात आणखी १४ हजार ९७६ कोविड बाधितांची नोंद, ४३० जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
आणि
·
मराठवाड्यात ३६ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार २६५ रुग्णांची
नोंद.
****
राज्यात
आगामी नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दसरा सण साजरा करण्याबाबतच्या
मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार, देवीच्या
मूर्तींची उंची, सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरगुती देवीच्या मूर्तीची
उंची दोन फुटांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देवीचं आगमन आणि विसर्जन
मिरवणुका काढू नयेत, नवरात्र उत्सवात “माझं कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेसंदर्भात
जनजागृती करण्यात यावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, तसंच
धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन राज्य
सरकारनं केलं आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची
परवानगी घेणं आवश्यक असल्याचं या मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटलं आहे. दसऱ्याच्या दिवशी
होणारा रावण दहनाचा कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करुन त्या कार्यक्रमाचं
थेट प्रक्षेपण करावं, असंही राज्य सरकारनं सांगितलं आहे.
****
मराठा
समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेणार
असून, याबाबत लवकरच सुधारित आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर
भाजप खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी काल
मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. आर्थिक मागास प्रवर्गाचा
लाभ विशिष्ट समाजाला देता येत नाही, शिवाय, अशा निर्णयाने मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाचा
न्यायालयीन लढा कमकुवत होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.
****
‘माझं
कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शासकीय नसून, ती लोकांची असल्याचं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या मोहिमेअंतर्गत
ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, यासाठी नेमलेल्या
पथकांनी २४ लाख कुटुंबांना भेट दिली असल्याचं मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी यावेळी
सांगितलं. तीव्र श्वसन संक्रमण-सारी आणि शीतज्वरासारखे आजाराचे रुग्ण अधिक काटेकोरपणे
शोधावेत, तसंच सर्वेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी आणि इतर वरिष्ठ यंत्रणांनी
तपासावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती
संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची खासदार म्हणून नियुक्ती भारतीय जनता पक्षानं
केली असून, दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाकडूनच सोडवून घ्यावा,
असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़सदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशाचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध
संस्था अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या,
मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारनं
आणलेल्या कृषी विधेयकांना सर्व मिळून विरोध करणार असून, याचं नेतृत्व शेतकरीच करणार
असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ
मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत
आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची
गरज त्यांनी व्यक्त केली.
****
आणि
आता ऐकू या जेष्ठ पत्रकार गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी
विचार –
अलिकडेच
गांधीजींचा एक व्यापक आणि मोठा विचार मी वाचला त्यात गांधीजी म्हणतात या जगात माणसाच्या
गरजेसाठीच सारे काही आह, पण त्याच्या लालसेसाठी मात्र हे सगळं जगही पूरणार नाही. मित्रांनो
गांधीजींनी हा सांगितलेला जो विचार आहे हा विचार ऐकत असताना, माझ्या मनामधे टॉलस्टॉयच्या
एका कथेची आठवण झाली. त्या टॉलस्टॉयच्या कथेमधे एक देवदूत प्रसन्न होतो. आणि तो समोरच्या
काही इच्छा, आकांक्षा, लालसा असलेल्या माणसाला विचारतो की तुला काय हवंय? तर तो म्हणतो
मला ही जमीन हवीय. मोठी जमीन हवीय. तो देवदूत त्याला सांगतो की पळत जाऊन जेवढी जमीन
तुझ्या ताब्यात घेशील तिथपर्यंतची जमीन तुझी होईल. आणि मग तो माणूस पळत सुटतो. लालसेपोटी
पळत सुटतो. आता मला जमीन हवीय. मला आणखीन जमीन हवीय. मला आणखीन जमीन हवीय. आणि आपल्या
सर्वांना त्या कथेचा शेवट माहितीये की तो इतका पळतो की उरी धाप लागून शेवटी तो खाली
धापकीनी पडतो अन् त्याचा प्राणही जातो. गांधीजींनी अतिशय नेमक्या शब्दामधे हे सांगितलेलंय
की माणसांच्या लालसेसाठी हे सगळं जगही पूरणार नाही.
****
केंद्र
शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटना येत्या दोन
ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
अनिल घनवट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार
या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे, मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून
वगळलेल्या वस्तू, भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या
तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं घनवट यांनी सांगितलं. केंद्र सरकार योग्य
दिशेने वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले.
****
२०२०-२१
या हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला उद्या एक ऑक्टोबरपासून
सुरुवात होणार आहे. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल ही माहिती दिली. खरेदी केंद्रावर
होणारी गर्दी टाळण्यासाठी १५ सप्टेंबरपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान,
सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष खरेदीला १५ ऑक्टोबरपासून
सुरूवात होणार आहे.
****
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उद्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या उन्हाळी
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधिचं एक परिपत्रक विद्यापीठानं काल जारी
केलं. विद्यापीठातल्या सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्यामुळे
या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान,
खासदार डॉ. भागवत कराड आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल आंदोलनकर्त्यांची
भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याचं
खासदार कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
काल दिवसभरात आणखी १४ हजार ९७६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ झाली आहे. राज्यभरात काल ४३० जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल १९ हजार २१२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
१० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६० हजार ३६३
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार २६५ रुग्णांची
नोंद झाली.
उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ बाधितांचा मृत्यू झाला, उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या
२१६, तर बीड जिल्ह्यात १४६ रुग्णांची भर पडली. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
पाच जणांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात आणखी २३७, तर लातूर जिल्ह्यात २१७ रुग्ण
आढळून आले. नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे २१६ रुग्ण, जालना जिल्ह्यात
तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ११५ रुग्ण, परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू, तर
नवे ८२ रुग्ण, आणि हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ३६ रुग्णांची
नोंद झाली.
****
पुणे
जिल्ह्यात आणखी दोन हजार ४५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ८७ जणांचा मृत्यू
झाला. मुंबईत एक हजार ७१३ नवे रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ७४५
रुग्ण आढळले आणि १२ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २१५, सातारा ८६३,
सांगली ५०६, यवतमाळ १९४, भंडारा १९१, अमरावती १९०, गडचिरोली १४९, वाशिम ११९, सिंधुदुर्ग
८० तर रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ६४ रुग्णांची नोंद झाली.
****
अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर
करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांनी
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह
काल कन्नड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, त्यानंतर
ते बोलत होते. सरकारनं कायद्यात रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधी
असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पंडित वेताळ यांच्याविरुद्धचा
अविश्वास ठराव काल १२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात
कामकाज करताना सदस्यांना विश्वासात न घेणं, मनमानी करत पदाचा गैरवापर करणं, असा आरोप
करुन १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातली दुकानं सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
बालिका
योजनेच्या नावाखाली गरीब कुटुंबातल्या मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास
हजार रूपये देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं, ही
बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या टाकळी इथले सैनिक वामन पवार हे काल लडाख इथं कर्तव्य
बजावत असताना शहीद झाले. त्यांचा पार्थिव देह काल रात्री उशीरा गावात आणला असून, आज
शासकीत इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
मराठा
समाजाचं आरक्षण कायम ठेवावं या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात काल सकल मराठा समाजाच्या
वतीनं जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयांवर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी
जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन दिलं.
****
कोविड
प्रतिबंधाचा नियम मोडल्याप्रकरणी परभणीचे मुख्य न्याय दंडाधिकारी महेश तिवारी यांनी
तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोटारसायकलद्वारे पुण्याहून
परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या
कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे. साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून
जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी टाळेबंदी
असताना हा युवक परभणीत आला होता.
****
सध्या
‘राष्ट्रीय पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात
येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये मुलांना एनर्जी
ड्रिंक देता येईल. या पेयाची कृती सांगत आहेत आयुर्वेदिय बालरोग तज्ज्ञ कविता फडणवीस
-
आयुर्वेदीय
ऐनर्जी ड्रिंक याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याचं नाव आहे ‘खर्जुरादी
मंथ’ म्हणजे डेट्स एनर्जी ड्रिंक. ६ चमचे स्वच्छ धुतलेल्या सीडलेस मनुका, २० ग्रॅम
सीडलेस खजूर, ३ चमचे भाजलेल्या साळीच्या लाह्या, २ चमचे गूळ हे सर्व एकत्र मिक्सरमधून
बारीक करा. आणि दीड पेला पाणी टाकून नीट मिक्स करा. झाले ‘खर्जुरादी मंथ’ तयार. हे
खर्जुरादी मंथ खूप छान एनर्जी बुस्टर म्हणून काम करतं. पचायला हलकं असून थकवा दूर करतं.
यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय व्हिटॅमिन बी-6 सुध्दा
मोठ्या प्रमाणात असतं.
****
औरंगाबाद
महापालिकेतल्या १८५ अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश शासनानं दिले असल्याची
माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यांनी काल औरंगाबाद महापालिकेत या कर्मचाऱ्यांशी
संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. येत्या आठ ऑक्टोबरला पालकमंत्री सुभाष
देसाई यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात येणार
असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
जीपमध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना काल औरंगाबादमध्ये
अटक करण्यात आली. मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या एका गाडीत अंमली पदार्थ असल्याची माहिती
पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या या कारवाईत, ५२
हजार रुपये किंमतीचे मेफेडीन आणि ११ हजार रुपयांचे चरस हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
परभणी
तालुक्यातल्या साटला, धारणगाव आणि समसापूर या गावांना भारतीय स्टेट बँक दत्तक म्हणून
द्यावी, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या
गावांना आयडीबीआय बँक दत्तक म्हणून देण्यात आली आहे, मात्र या बँकेचा पीक कर्जाचा व्याज
दर अधिक असल्यामुळे हा बदल करण्यात यावा असं आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
Tuesday, 29 September 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29 SEPTEMBER 2020 TIME – 18.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून
जारी
**
मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना
तत्काळ मदत द्यावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
**
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फेटाळली
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू
**
कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडल्याप्रकरणी परभणीत तिघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड
आणि
**
केंद्र शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटनेचं
२ ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा
करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं आज जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार,
देवीच्या मूर्तींची उंची, सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरगुती देवीच्या
मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक
कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्या ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य
द्यावं अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ
मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत
की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली. विदर्भातल्या पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचं फडणवीस यांनी पत्रात
म्हटलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेवून आर्थिक पॅकेज जाहीर
करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांनी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आज
कन्नड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. सरकारनं कायद्यात
रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकर्यांच्या विरोधी असल्याचं ते म्हणाले.
****
छत्रपती
संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवर खासदार म्हणून
नियुक्ती केली असून, दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा,
असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़सदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. खासदार संजय राऊत हे संपादक असून, त्यांनी प्रथम आपली
मुलाखत घेतली, त्याच वेळेस त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांची
मुलाखत घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे फडणवीस - राऊत भेटीला राजकीय अर्थ
नाही, असं सांगून पवार यांनी, काही झालं तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचं स्पष्ट
केलं. देशाचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी केंद्र सरकारने अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू
प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध संस्था लावल्या होत्या, मात्र त्यांचा तपास इतर दिशेने
सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना सर्व
मिळून विरोध करणार असून, याचं नेतृत्व शेतकरीच करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
****
राज्यात
मध्यावधी निवडणुकांची शक्यता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली
आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ
पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात
केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांची नुकतीच घेतलेली भेट ही सामना दैनिकासाठी मुलाखतीचं वेळापत्रक निश्चित करण्यासंदर्भात
होती, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. बिहार निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत काहीही चर्चा
झाली नाही, मात्र भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातल्या नेत्याकडे
सोपवली, याचा आपल्याला आनंद झाल्याचं राऊत यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू
झालेल्या रुग्णांची संख्या आता ९२७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार ३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन
घरी परतले आहेत.
****
कोविड
प्रतिबंधाचा नियम मोडल्याप्रकरणी परभणीचे मुख्य न्याय दंडाधिकारी महेश तिवारी यांनी
तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोटारसायकलद्वारे पुण्याहून
परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या
कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे. साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून
जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी टाळेबंदी
असताना हा युवक परभणीत आला होता.
****
केंद्र
शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटना येत्या २
ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
अनिल घनवट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार
या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून
वगळलेल्या वस्तू, भाव वाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या
तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं घनवट यांनी सांगितलं. या त्रुटी सुधारून शेतकऱ्यांना
संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावं, या मागणीसाठी २ ऑक्टोबरला राज्यव्यापी समर्थन आणि
संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार असल्याची माहिती घनवट यांनी दिली. केंद्र सरकार योग्य
दिशेने वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जात
प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेची ३५ हजारच्या वर प्रकरणे प्रलंबित असून, ही सर्व
प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या
अधिकाऱ्यांना दिले आहेत. वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीनं
सुरू असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेच्या ६ महिन्यांच्या कामकाजाचा आढावा
आज मुंडे यांनी घेतला. प्रमाणपत्र देण्याच्या कामास गती देण्याच्या सूचना मुंडे यांनी
यावेळी केल्या.
****
२०२०-२१
या हंगामातील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला परवा
१ ऑक्टोबर पासून तसंच प्रत्यक्ष खरेदीला १५ ऑक्टोबर पासून सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांनी
नोंदणीकरिता आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर आधारकार्डाची छायांकित प्रत आणि
पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा, असं आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील
यांनी केलं आहे. केंद्र शासनानं ३ हजार ८८० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सोयाबीनचा
हमी भाव जाहीर केला आहे. दरम्यान, १५ सप्टेंबर पासून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या
उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या
वतीनं आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात तसंच औंढा, वसमत, सेनगाव, कळमनुरी
इथल्या तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्या सय्यद इमरान सय्यद मजुमिया याला पोलिसांनी
बसस्थानकावर ताब्यात घेतले. गंगाखेडहून गुटखा घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून २८ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
औरंगाबाद
व्यापारी संघानं शहरातल्या मुख्य रस्त्यांवरच्या हातगाडी चालकांविरूद्ध कारवाईची मागणी
केली आहे. या मागणीचं निवेदन व्यापाऱ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात सादर केलं.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...