Thursday, 31 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभर एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. नांदेड शहरात गांधी पुतळा ते सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा अशी एकता दौड आज काढण्यात आली. महापालिका आयुक्त लहुराज माळी यावेळी प्रमुख उपस्थित होते. जालना इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून एकता दौडला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यावेळी प्रमुख उपस्थीत होते. अमरावती, सांगली इथंही सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचं आयोजन करण्यात आलं. 
****

 भाजपनं राज्यात शिवसेनेला सत्तेतील समान वाटा देण्यासंदर्भात आश्र्वासन दिलेलं नव्हतं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षांच्या नवनियुक्त आमदारांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी २०१४च्या तुलनेत यंदा शिवसेनेला सत्तेतील अधिक वाटा मिळावा यावर भर दिल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. भाजपनं सत्तेतील सहभागाबद्दल अद्याप कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याची माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली.
****

 दरम्यान, शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची या बैठकीत एकमतानं फेरनिवड करण्यात आली. प्रथमच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. प्रताप सरनाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं. सुनील प्रभू यांची विधानसभेतील पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणन निवडून आले आहेत.
****

 राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भातले सर्व अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ते  घेतील त्या निर्णयाचं आपण पालन करू, असं शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील अनेक भागांतील अत्याधिक पावसामुळे सोयाबीन, भात शेती आणि द्राक्षांचं नुकसान झालं असून त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या भेटीवेळी राज्यपालांकडे केली जाईल, अशी माहिती या संदर्भात सुनील प्रभू यांनी दिली.
****

 काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांचीही आज मुंबईत बैठक झाली. पक्षाचे महासचिव मलिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थीत होते. लवकरच क्षांच्या वरिष्ठांच्या नेतत्वाखाली क्षांच् क्षांच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल, असं खरगे यावेळी म्हणाले. तत्पर्वी, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्विराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन  चर्चा केली.  
****

 जायकवाडी धरणातील पाण्याचा अपव्यय होऊ नये याकरता स्वयंचलित पाणी सोडण्याची तसंच कालव्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था आवश्यक असल्याचं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी म्हटलं आहे. एकशे दोन पूर्णांक सात दशांश अब्ज घनफूट- `टीएमसी` क्षमतेच्या या धरणाला सत्तावीस दरवाजे असून तिनशे चाळीस किलोमीटर लाबींचे दोन कालवे आहेत. त्यातून समान पाणी वाटप निश्चित होण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग होईल, असं काळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची अवस्था वाईट झाली असून त्यामुळे तिस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. कालव्यांच्या दुरुस्तीनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवता येईल आणि शेतकऱ्यांची गरज भागवता येईल, असंही काळे यांनी यासंदर्भात नमुद केलं आहे. गोदावरी मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळ या संदर्भात स्वयंचित पाणी वाटपाच्या व्यवस्थेच्या शक्यते संदर्भात अभ्यास करत असल्याचं पीटीआयच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्याच्या बाभळी बंधाऱ्याचे सर्व चौदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागच्या सहा वर्षात प्रथमच यंदा परतीच्या पावसामुळे बाभळी बंधाऱ्यात पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बाभळी बंधाऱ्याची पाणी साठवन क्षमता दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर दशांश अब्ज घनफूट-  `टीएमसी` आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या पावासामुळे सुमारे ५० टक्के खरीप पीकांचं नुकसान झालं असून, जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करण्याचं काम सुरू केलं आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज सटाणा इथं  भेट देऊन या नुकसानीची पाहणी केली.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे आणि परतीच्या पावसामुळं झालेल्या शेती आणि मच्छिमारांच्या नुकसानीचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेऊन तातडीनं पंचनाम्यांचे आदेश प्रशासनाला दिले.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या कापूस पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव नष्ट करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.10.2019 सायंकाळी 18.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –31 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांचं भारतासाठीचं योगदान अमूल्य आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चव्वेचाळीसाव्या  जयंतीदिनी अभिवादन केलं आहे. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुजरातमधील  केवडिया इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्यानजिक समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरदार पटेल यांना नवी दिल्ली इथं अभिवादन केलं. सरदार पटेल हे दुरदृष्टी असलेले राजकीयनेते होते, भारताच्या पोलादी चौकट असणा-या सनदी सेवांचे ते निर्माते होते, असं उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही पटेल यांना अभिवादन करतांना एका संदेशात म्हटलं आहे.  
****
मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जयंतीनिमित्त आयोजित एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. भारताला एकसंघ ठेवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं,  म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जातं. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यावेळी म्हणाले.
पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्मानाबाद इथं मुख्य प्रशासकीय इमारतीपासून पोलिस मुख्यालया दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.कणकवली, ळगाव, बुलडाणा, अहमदनगर, नंदुरबारसह राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज
`एकता दौड` झाली.   
****
आजपासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं शपथविधी झाला. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नायब राज्यपालांचे शपथविधी होत आहेत. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याचं अस्तित्व मध्यरात्रीपासून संपुष्टात आलं. गेल्या पाच ऑगस्टला संसदेनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारं राज्यघटनेतलं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णयही संसदेनं याच दिवशी घेतला. आता देशात राज्यांची संख्या २८ झाली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढली असून आता नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
दरम्यान, हिमालयाच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी लडाख इथं जी बी पंत हिमालयन पर्यावरण आणि विकास संस्थेची स्थापना करायला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजुरी दिली.
****
महायुतीतील प्रत्येक छोट्या घटक पक्षाला एक - एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यावेळी उपस्थीत आहेत.
****
शिवसेनेच्या विधीमंडऴ नेत्याची निवड करण्यासाठी शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची मुंबईत बैठक सुरू आहे.  दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं, या शिवसेनेच्या भूमिकेचा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुनरुच्चार केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 
****
पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या भातशेती आणि मासेमारीच्य़ा नुकसानीची भरपाई मिऴावी, अशी मागणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र निलेश राणे आणि या जिल्ह्यांतील अन्य नेते या मागणीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
****
माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांचा आज पस्तीसावा स्मृतीदिन आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, अशोक गेहलोत आदींनी नवी दिल्लीत `शक्तीस्थळ` या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली. राहुल गांधी यांनी त्यांना एका संदेशात श्रद्धांजली अर्पण केली आहे. इंदिरा गांधी यांचं देशाच्या सुरक्षिततेसाठीचं आणि आर्थिक विकासासाठीचं योगदान देश नेहमी स्मरणात ठेवेल असं काँग्रेस पक्षाऩं म्हटलं आहे.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास दासगुप्ता यांचं आज दिर्घ आजारानं कोलकत्ता इथं निधन झालं. ते त्र्याऐंशी वर्षांचे होते.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.10.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
विविधतेत एकता हीच आपली ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उभारण्यात आलेल्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. सरदार पटेल यांची एकशे चव्वेचाळीसावी जयंती आज सर्वत्र `एकता दिवस` म्हणून साजरी करण्यात येत आहे. या निमित्त मुंबईत आयोजित एकता दौडला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. औरंगाबादमध्ये क्रांतीचौक ते महावीर चौक या मार्गावर एकता दौड झाली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. उस्मानाबाद शहरात तसंच जालना इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुला दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी इथं राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान तसंच हिंगोली, धुऴे, नाशिक, पालघर, वाशिम, गडचिरोली इथंही सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त `एकता दौड` झाली.
****
राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं, या शिवसेनेच्या भूमिकेचा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुनरुच्चार केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, शिवसेनेच्या विधीमंडऴ नेत्याची निवड करण्यासाठी शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची आज दुपारी मुंबईत बैठक होत आहे.
****
आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना-भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज मुंबईत होत आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होत आहेत.
****
परतीच्या पावसामुळं सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यात एक लाख ५० हजार एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड करण्यात आली आहे, त्यापैकी कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे पंचवीस हजार एकर द्राक्ष शेतीचं नुकसान आधीच झालं होतं. या पावसामुळे सुमारे तीस हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष पिकांचं नुकसान झालं असून याची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.10.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 October 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱  ؍اکتوبر  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

  وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کو  بی جے پی مقننہ کا قائد منتخب کیا گیاہے۔ بی جے پی کے  نو منتخبہ اراکین ِ اسمبلی کے کل ممبئی میں منعقدہ اجلاس میں پارٹی کے ریاستی صدر چندر کانت پاٹل نے دیویندر پھڑ نویس کے نام کی تجویز پیش کی تھی۔جس کی11؍اراکینِ اسمبلی نے تائید کی۔ اِس انتخاب کے ساتھ ہی بی جے پی کی جانب سے وزیر اعلیٰ عہدے کے لیے پھڑ نویس کا نام طئے ہو گیا ہے۔اِس انتخاب کے لیے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے تمام ارکینِ اسمبلی کا شکر یہ ادا کیا اور کہا کہ ریاست میں ایک مر تبہ پھر عظیم اتحاد کی حکو مت قائم ہو گی جو گزشتہ پانچ برسوں کی بہ نسبت زیادہ بہتر کام کرے گی ۔

***** ***** ***** 

  دوسری جانب راشٹر وادی کانگریس پارٹی کے نو منتخبہ اراکین اسمبلی کی بھی کل ممبئی میں میٹنگ ہوئی ۔پارٹی کے دفتر میں منعقدہ اِس اجلاس میں این سی پی کے مقننہ کے قائد کے طور پر اجیت پوار کا انتخاب کیا گیا۔پارٹی کے ریاستی صدر جینت پاٹل نے اُنکا نام تجویز کیا تھا۔
  اپنے خطاب میں اجیت پوار نے کہا کہ اُنکی جماعت ریاستی حکو مت کو اُسکی غلطیوں سے آگاہ کر ے گی  اورمعا شرے میں کسی بھی طبقے کے ساتھ نا انصافی نہ ہواِس پر بھی وہ خصو صی توجہ دیں گے۔

***** ***** ***** 

 شیو سینا مقننہ کے قائد کا انتخاب آج کیا جائے گا۔ اِس خصوص میں پارٹی کے نو منتخبہ اراکینِ اسمبلی کے ایک اجلاس کا اہتمام آج ممبئی کے دادر میں واقع شیو سینا بھون میں کیا گیا ہے۔اِس اجلاس میں شیو سینا کی حما یت کرنے والی پر ہار جن شکتی پارٹی کے ایم ایل اے اور آزاداراکینِ اسمبلی  بھی شرکت کریں گے۔
 کانگریس پارٹی نے بھی مقننہ کے قائد کو منتخب کر نے کے لیے  آج ممبئی میں پارٹی کے نو منتخبہ اراکین کا ایک اجلا س طلب کیاہے ۔

***** ***** ***** 

 مردِ آہن سردار ولبھ بھائی پٹیل کی جینتی آج یومِ اتحاد کے طور پر منا ئی جا رہی ہے۔ اِس موقعے پر تمام ریاست میں ایکتا دوڑ کا اہتمام کیا گیا ہے۔شہر اورنگ آ باد میںعلی الصبح کرانتی چوک سے ایکتا دوڑ کا آغاز ہو چکا ہے ۔اِس موقعے پر حاضرین کو قومی یکجہتی کا حلف بھی دلا یا گیا۔عثمان آ باد ضلعے میں بھی ایکتا دوڑ شروع ہو چکی ہے۔
 جالنہ ضلعے میں بھی صبح8؍ بجے سے سر دار پٹیل کے مجسمے سے شیواجی پُتلے تک اوربیڑ ضلعے میں ضلع کلکٹر دفتر سے ضلع اسپورٹس کامپلکس کے در میان ایکتا دوڑ کا آغاز ہو چکا ہے۔
 اُدھر پر بھنی ضلعے میں بھی صبح ساڑھے سات بجے سے راج گوپال چاری گارڈن سے ضلع اسپوٹرس کامپلیکس کے درمیان ایکتا دوڑ شروع چکی ہے ۔ناندیڑ اور ہنگولی میں بھی ایکتا دوڑ کا اہتمام کیا گیاہے۔

***** ***** ***** 

 آج سابق وزیر اعظم اندرا گاندھی کی بر سی ہے۔ اِس موقعے پر ملک بھر میںاُنھیں خراجِ عقیدت پیش کیاجا رہا ہے۔  خیال رہے کہ31؍ اکتوبر1984ء کے روز ایک محافظ نے گولیاں بر سا کراُنکا قتل کر دیا تھا۔

***** ***** ***** 

 مراٹھواڑہ کے پر بھنی ‘ لاتور اور ناندیڑ ضلعے کے بیشتر علاقوں میں کل پھر بارش ہوئی۔ پر بھنی شہر ‘ جنتور ‘ سون پیٹپھ اور پالم اِسی طرح  ناندیڑ ضلعے کے کنوٹ اور حما یت نگر علا قے میں بھی کل بارش ہوئی ۔ گزشتہ کچھ دنوں سے جاری اِس بار ش کی وجہ سے کسانوں کو ہوئے نقصان کے پنچنا مے فوراً  تیار کر کے کسا نوں کی امداد کرنے کے مطالبے  پر مبنی ایک مکتوب کل پر بھنی کے رکنِ پارلیمنٹ سنجئے جا دھو نے ضلع کلکٹر کو پیش کیا۔لاتور ضلعے میں بھی نقصان کے پنچنا مے فوراً تیار کر نے کی ہدا یت لاتور کے نگراں وزیر سنبھا جی پاٹل نلنگیکر نے لاتور ضلع کلکٹر کو دی ہے ۔

***** ***** ***** 

 اسمبلی انتخابات کے لیے نافذ  کئے گئے ضابطہ اخلاق کی مد ت کل ختم ہو گئی۔انتخابات کے اعلان کے ساتھ ہی21؍ ستمبر سے ضابطہ اخلاق نافد کر دیا گیا تھا۔

***** ***** ***** 

 پچاس کروڑ درخت لگانے کی مہم کا جائزہ لینے کی غرض سے اورنگ آ باد کے علا قائی کمشنر نے ایک کمیٹی تشکیل دینے کا فیصلہ کیا ہے۔یہ کمیٹی آئندہ5؍ نومبر تک ہنگولی ضلعے کے کلمنوری تعلقے میں دیہی انتظا میہ کی جانب سے لگائے گئے در ختوں معائنہ کرے گی۔

***** ***** ***** 

 اورنگ آ باد گریجویٹ حلقہ انتخاب کے لیے گریجویٹ رائے دہندگان آئندہ6؍ نومبر تک اپنے نام کا اندراج کر وا سکتے ہیں۔ اورنگ آباد کے علا قائی کمشنر  اور  ووٹر رجسٹریشن آفیسر سنیل کیندریکر نے یہ اطلاع دی ہے۔اُنھوں نے بتا یا کہ گریجویٹووٹرز کی پہلی فہرست 23؍ نومبر  کو اور  حتمی فہرست 30؍ دسمبر کو جاری کی جائے گی۔

***** ***** ***** 

 پر بھنی ضلعے میں آئندہ4؍ سے 13؍ جنوری کے درمیان فوج بھر تی میلے کا انعقاد کیا جا رہا ہے۔ اورنگ آباد کے فوج بھر تی دفتر سے موصولہ اطلاع کے مطا بق اِس میں حصہ لینے کے لیے آئندہ5؍ نومبر سے 19؍ دسمبر کے در میان آن لائن در خواستیں پیش کی جا سکتی  ہیں۔

***** ***** *****

Akashwani Aurangabad Urdu News Bulletin Date : 31-10-2019 Time : 8.40 AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१  ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या तर अजीत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
** शिवसेना आणि काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी आज नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक
** लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात एकता दौड
आणि
** राज्यात कालही अनेक भागात पाऊस; वीज पडून बारा जणांचा मृत्यू
****
भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी अजीत पवार यांची निवड झाली आहे. मुंबईत विधानभवनात काल भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला ११ आमदारांनी अनुमोदन दिलं. या निवडीबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं सांगत गेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक चांगलं काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्याही नवनिर्वाचित आमदारांची काल मुंबईत पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली, या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाची भुमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे असं पाटील म्हणाले. आपला पक्ष राज्य सरकारनं केलेल्या चुका दाखवून देईल, असं  पक्षाचे नवनिर्वाचित विधीमंडळ  नेते अजित पवार यांनी सांगितलं. सरकार योग्य दिशेनं काम करत आहे काय, याकडे आपण लक्ष ठेऊ तसंच समाजातल्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊ, असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
शिवसेना विधिमंडळ गटनेत्याची आज निवड करण्यात येणार आहे.  पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत दादरच्या शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे,  या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आगामी सरकारमधील सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना-भाजप  महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज सकाळी अकरा वाजता मुंबईत  होणार आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होणार आहेत.
****
धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित आणि जळगाव जिल्ह्यातले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
काँग्रेस पक्षाचाही गटनेता निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज मुंबईत नवनिर्वाचित आमदारांची बैठक होत आहे.
दरम्यान, राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे. काल, मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
****
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात सकाळी क्रांतीचौकातून ही दौड काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. उस्मानाबाद शहरातही सध्या एकता दौड सुरू आहे. जालना इथं सकाळी आठ वाजता मम्मादेवी जवळच्या  सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड काढण्यात येणार आहे.
परभणीत सकाळी साडेसात वाजता राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड निघणार आहे. याबरोबरचं राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेण्यात येणार आहे.
लातूरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी चौक ते हुतात्मा स्मारका दरम्यान  सकाळी साडेसात वाजता एकता दौड काढण्यात येणार आहे. नांदेड आणि हिंगोली शहरातही एकता दौड काढण्यात येणार आहे. 
****
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आज पाळली जात आहे. यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू करण्यात आलेली आचारसंहिता काल मागे घेण्यात आली. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच २१ सप्टेंबरपासून ही आचारसंहिता लागू करण्यात आली होती. नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगानं राज्यपालांना सादर केल्यानंतर ही आचारसंहित काल मागे घेण्यात आली.
****
राज्यातल्या बँकांच्या कामकाजांच्या वेळेत उद्यापासून बदल होणार आहे. राज्य स्तरीय बँक समिती आणि इंडियन बँक असोसिएशनने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकांच्या कामकाजांचं तीन प्रकारे वर्गीकरण केलं आहे. रहिवासी क्षेत्रातल्या बँकांची वेळ ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे, व्यापारी क्षेत्रातल्या बँकांची वेळ सकाळी ११ ते दुपारी पाच वाजेपर्यंत आणि इतर बँकांची वेळ सकाळी १० ते पाच वाजेपर्यंत असणार आहे. यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बँकांची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत असणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नाशिक, सोलापूर, सातारा, अमरावतीसह मराठवाड्यातल्या परभणी, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात अनेक भागात काल पुन्हा पाऊस पडला. परभणी शहर, जिंतूर, सोनपेठ, पालम तसंच नांदेड जिल्ह्यात नांदेड, किनवट तसंच हिमायतनगर भागात हा पाऊस पडला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी सरसकट पंचनामे करण्याची मागणी पालम तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, दरम्यान, जिल्ह्यातल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसंच पिक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि शेतकऱ्यांनी काल धरणं आंदोलन केलं.
जिल्ह्यात हिमायतनगर शहरात काल झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातल्या छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ नुकसान झालं.
****
राज्यात काल विविध ठिकाणी वीज पडून बारा जणांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात अमरावती -अचलपूर महामार्गावर असेगाव पूर्णाजवळ वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. अकोला जिल्ह्यात  तेल्हारा तालुक्यात शेतात वीज कोसळून बारा वर्षीय मुलीसह  तीन जण ठार तर, अकोट तालुक्यात एक शेतमजुर  मृत्यू पावला तर एक जण जखमी झाला. यवतमाळ जिल्ह्यात लोण बेहळ इथं वीज पडून एक तरुण दगावला.
नांदेड तालुक्यातल्या शिरपली शिवारात अंगावर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. किनवट तालुक्यात देहली शिवारातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी शेतात बैलं चारत असलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर तालुक्यात बीबी दारफळ इथं एका नऊ वर्षीय मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला.
****
पन्नास कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, वनसंरक्षक नितीन गुदगे, विशेष कार्य अधिकारी आर. एस. दावलवार यांचा समावेश असलेली ही समिती पाच नोव्हेंबरपर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या ग्रामपंचायतीनं लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी करणार आहे.
****
उस्मानाबादमध्ये दिवंगत शंकरराव धाराशिवकर स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीनं शासकीय रूग्णालयात दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्मलेल्या दहा मुलींच्या नावे प्रत्येकी सात हजार रूपयांची मुदत ठेव ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. धाराशिवकर कुटुंबियाच्यावतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात सिरसमार्ग इथं शेत तळ्यात बुडून दोन भावांचा काल मृत्यू झाला. विकास ठोंबरे आणि गणेश ठोंबरे अशी मृतांची नावं आहेत. हे भाऊ आपल्या शेतात गेले असता तिथल्या शेततळ्यात एकाचा पाय घसरून पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसराही पाण्यात उतरला होता. काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मादळमोही पोलिसांनी दिली आहे.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुदत असल्याची माहिती विभागीय आयुक्त तसंच मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिली. या मतदारांची प्राथमिक यादी तेवीस नोव्हेंबरला आणि अंतिम यादी तीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी या संदर्भात कळवलं आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.31.10.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Wednesday, 30 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा विधीमंडळ नेते म्हणून आज यासाठी झालेल्या बैठकीत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह दहा आमदारांनी अनुमोदन दिलं.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेससह राज्यातील विधानसभा निवडणुकीतील जनादेशानुसार विरोधी पक्षांत बसेल अशी प्रतिक्रीया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. जनतेनं आपल्याला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे आणि ती आपण पार पाडू, असं पाटील मुंबईत म्हणाले. आपला पक्ष राज्य सरकारनं केलेल्या चुका दाखवून देईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी या संदर्भात म्हटलं आहे. सरकार योग्य दिशेनं काम करत आहे काय, याकडे आपण लक्ष ठेऊ तसंच समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊ, असंही पवार यांनी यावेळी नमुद केलं. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त  करण्यात अपयश आलं तर पर्यायी सरकार स्थापन करण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल म्हटलं होतं.
****

 भाजपनं नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला छपन्न, राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न आणि काँग्रेसला चव्वेचाळीस जागा प्राप्त झाल्या आहेत. दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी १४५ संख्याबळाची गरज आहे.

 दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस क्षांच्या आमदारांची मुंबईत बैठक सुरू आहे. पक्षाचा विधीमंडळ तसंच विधानसभा आणि विधानपरिषदेतील नेता निवडीसाठी ही बैठक होत आहे.   
****

 वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष आणि त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषांमधून लोकांपर्यंत पोहोचल्यास अशा संशोधनाचा फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – निरीतर्फे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन, जलसाक्षरता आणि संवर्धन पर्यावरण जनजागृती यासारखे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निरीतर्फे राबवण्यात येणार आहेत.
****

 लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतीवृष्टी होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून याचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना याची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असंही निलंगेकर यावेळी म्हणाले.

 दरम्यान, लातूरमध्ये आज दुपारपासून पाऊस पडत आहे.
****

 परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालूक्यात काल दुपारपासून संततधार पाऊस पडत आहे. बीड जिल्ह्यात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत दीड मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अमरावती इथंही आज दुपारपासून पाऊस पडत आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या गेवराई मधल्या सीरसमार्ग इथं शेततळ्यात बुडून दोन भावांचा आज मृत्यू झाला. विकास सुदाम ठोंबरे आणि गणेश सुदाम ठोंबरे अशी मृतांची नावं आहेत. हे भाऊ आपल्या शेतात गेले असता तिथल्या शेततळ्यात एकाचा पाय घसरून पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसराही पाण्यात उतरला होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडल्याची माहिती मादळमोही पोलीसांनी दिली आहे.
****

 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तसंच मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. या मतदारांची प्राथमिक यादी तेवीस नोव्हेंबरला आणि अंतिम यादी तीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी या संदर्भात कळवलं आहे.
****

 परभणी इथं येत्या चार ते तेरा जानेवारी दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पाच नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान `ऑनलाईन` अर्ज भरावे, असं जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 18.00

आकाशवाणी औरंगाबाद – 30.10.2019 सोलापूर जिल्ह्याचे वार्तापत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –30 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
राज्यात सरकार स्थापनेबाबतची चर्चा अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नसून भाजपचे आमदार आज विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक घेणार आहेत. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते शाहूवाडीचे आमदार डॉ. विनयकुमार कोरे यांनी यापुर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपनं १०५ जागांवर विजय मिळविला असून अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या पंधरा आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सत्तास्थापनेमध्ये शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक घेत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. तिथल्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेला पंतप्रधानांनी एका संदेशात लाभकारी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान झालेल्या करारानुसार भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार झाला असून परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या बारा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
****
पुढच्या पाच वर्षात भारताला पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं झालेल्या एका भाविष्यातील गुंतवणुकीसंदर्भातील परिषदेत ते काल बोलत होते. `स्टार्ट अप` गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, `स्टार्ट अप`साठी गुंतवणूकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी, असंही ते म्हणाले. भारतातल्या `स्टार्ट अप` कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. तंत्रज्ञानाच प्रभाव, पायाभूत सुविधेचं महत्त्व, मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग, अनुकूल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं.
****
पाकिस्तानी सैन्यानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारामध्ये एक भारतीय मृत्यूमुखी पडला आहे तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील मच्छील भागात काल रात्री हा गोळीबार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्ताननं केलेल्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, कुलगाम जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून गेलेल्या पाच कामगारांची दहशतवाद्यांनी काल रात्री गोळ्या घालून हत्या केल्याच्या पार्श्र्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. युरापीय देशांतील संसदेच्या २३ सदस्यांचं शिष्टमंडळ दोन दिवसीय काश्मीर दौऱ्यावर आलं असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड आदी देशांच्या संसदेचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.     
****
अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दहावी पूर्व शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षी पुनरनोंदणी आणि नवीन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. एकही पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. 
****
नाशिकमधील देवळाली कँप येथे आयोजित लष्कर भऱती मेळाव्यावेळी आज गोंधळ उडाला. त्रेसष्ट जागांसाठी असलेल्या या भरतीसाठी राज्यभरातील हजारो युवक नाशिकमध्ये दाखल झाले हा गोंधळ उडाल्याचं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारताचा युवा मल्ल रविंद्र यानं हंगेरीतील बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या तेवीस वर्षे वयोगटातील विश्वचषक कुस्ती स्पर्धेत एकसष्ट किलो वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बावीस वर्षीय रविंद्रनं हंगेरीचा प्रतिस्पर्धी मार्केल बुडाई याला उपउपांत्यपूर्व फेरीत १२-१ असं पराभूत केल्यानंतर उपउपांत्य फेरीत रशियाच्या दिनिइस्मा ताख्तारोफविरुद्ध ११-० असा सहज विजय नोंदवला आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.10.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत.  तिथल्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेला पंतप्रधानांनी एका संदेशात लाभकारी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान झालेल्या करारानुसार भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार झाला असून परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या १२ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
****
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून देण्याच्या सुत्रावर अतिम निर्णय घेतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलं आहे. राज्यातील जनादेश महायुतीला होता असं नमुद करून भाजपही सत्तास्थापनेसंदर्भात अन्य पर्यायांचा विचार करू शकते, असं वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  या पार्श्वभुमीवर भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठी आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी यांच्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण भरलं असून धरणाच्या परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे मांडओहळ धरण भरलं नव्हतं. यंदा मात्र परतीचा पाऊस तसंच अवकाळी पावसानं हे धरण भरलं आहे.
****
नांदेड शहराजवळ असलेल्या वाजेगाव इथल्या एका गोदामातून काल १७० पोती सुंगधी मसाला गुटखा छापा टाकून जप्त करण्यात आला. या अवैध गुटख्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.30.10.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Akashwani Aurangabad Urdu News Bulletin 8.40 AM 30-10-2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०  ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम; अमित शहा यांचा मुंबई दौरा स्थगित
** भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
** वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपनं बोलावलेली बैठक शिवसेनेकडून रद्द
** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सरन्यायाधीश म्हणू नियुक्ती; १८ नोव्हेंबरला घेणार शपथ
आणि
** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व जिल्ह्यात उद्या एकता दौडचं आयोजन
****
राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम आहे. शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे, त्यात मुख्यमंत्रीपद अडीच- अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे.
दरम्यान, भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी निरीक्षक असतील.
राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेत सत्तेचं समान वाटपं करण्याचं ठरलं होतं, मात्र यात मुख्यमंत्री पदाचं समान कालावधीसाठी वाटप करण्याचा निर्णय झाला नव्हता, असं भाजपच्या सूत्रानं सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं. याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर आपल्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. राज्यात आपल्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं.  त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासोबतची भेटही रद्द झाली आहे.
दरम्यान, राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत, असं राज्यसभेतले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
****
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपाने बोलावलेली आजची बैठक शिवसेनेनं रद्द केली आहे. सत्ता वाटपाच्या पन्नास पन्नास टक्के वाटपाच्या समीकरणावर चर्चा झालेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर चर्चेसाठी कोणताही मुद्याच नसल्याने, बैठक रद्द केल्याचं, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कॅमेऱ्यासमोर केलेलं विधान मुख्यमंत्री मान्य करत नसल्याचं, राऊत यांनी नमूद केलं.
****
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रिपद घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून ठोस काही प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असं माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष स्वत:हून शिवसेनेकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
***
नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बालदी यांनी या संदर्भातलं पत्र काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं.
****
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणू नियुक्ती करण्यात आली असून, ते १८ नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार १७ नोव्हेंबरला संपणार आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या पदाचा कार्यकाळ सतरा महिन्यांचा असणार आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी  केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. त्यांच्याकडे देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होणार आहे. यानिमित्त राज्यात जिल्हा मुख्यालयं, महत्त्वाची शहरं असा विविध ठिकाणी रन फॉर युनिटी - एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी अकोला इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची काल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागासोबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना डवले यांनी केली.

नांदेड जिल्ह्यातले भोकरचे आमदार अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही काल नांदेड तालुक्यातल्या सावंगी, पुयणी, वाडी बुद्रुक, चिखली आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचमाने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, पीक विमा कंपनीनं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशी मागणी विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. 

औरंगाबाद  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची शिवसेनेच्या वतीनं आज पाहणी करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व आमदार, नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्ह्यात आठही तालुक्यातल्या विविध गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. यामुळे कांद्याचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
****
भाऊबिजेचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी पाड्यावर अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. काँग्रेस नेत्या डॉ स्वाती वाकेकर आणि डॉ संदीप वाकेकर यांनी आदिवासी बांधवाना ओवाळून भेटवस्तू वाटप केल्या.
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान या गावातही स्वरानंद संचच्या वतीनं संगीत दिवाळी पहाट हा भावगीत, भक्तीगीत तसंच मराठी हिंदी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमानं भाऊबीज साजरी करण्यात आली.
औरंगाबाद शहरात काल भाऊबिजेच्या दिवशी हेल्यांचा सगर काढला जातो. यावेळी पशुपालकांनी शहरातला बिबी का मकबरा, फकीरवाडी इथलं श्रीकृष्ण मंदीर आणि नवाबपुऱ्यात सजवलेल्या हेल्याचं पूजन करुन त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. सगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटूळ ते लासूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचं एका स्थानिक शेतकऱ्यानं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई-नांदेड-हैदराबाद मार्गावरच्या गाड्यांची गती ताशी ३० किलोमीटरपर्यंत कमी केली जाणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल, असं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
पंढरपूर -रिसोड एस टी बसचा काल परळी शहराजवळ संभाव्य अपघात दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे टळला. या धावत्या बसच्या मागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक चाक निखळून पडल्याचं पाहताच, गणेश यतोंडे आणि रोहित सातपुते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून ही बाब  चालकाच्या निदर्शनास आणून दिली. बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
****