आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 30 September 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी
दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान.
· स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;शहर सौंदर्यीकरण
आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणा.
· औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक.
· यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर.
आणि
· तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज कुलगुरू डॉ. उद्धव
भोसले यांच्याकडून व्यक्त.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ
अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात
आला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ तर सर्वोत्कृष्ट
बालचित्रपट म्हणून ‘सुमी’ चित्रपटाला पारितोषिक प्रदान करण्यात आला. ‘मी वसंतराव’ चित्रपटातल्या
गायनासाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात
आलं.
****
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दिल्लीत शहरी स्वच्छता
महोत्सवात स्वच्छ राज्यं आणि शहरांचा सन्मान करण्यात येणार आहे. विविध श्रेणींमधील
१६० हून अधिक पुरस्कार यावेळी प्रदान केले जाणार आहेत
****
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ होण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
आज मुंबईत शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा असून
इच्छाशक्ती द्वारेच ही कामं साध्य होऊ शकतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, येणाऱ्या काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे
परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. स्वच्छता मोहितेत खासगी संस्थांच्या
सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट
करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल असंही
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
या अभियानांतर्गत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात
आली. ०२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या ९० दिवसांच्या कालावधीत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत
कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या
तीन शहरांना अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी तसंच पाच कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
या कचरामुक्ती अभियानांतर्गत राज्यातली सर्व शहरं कचरामुक्त करणं अभिप्रेत आहे. त्यानुसार
घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचरा संकलीत करणं, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर १०० टक्के शास्त्रोक्त
प्रक्रिया करणं, वैयक्तिक शौचालयांसह, आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची उभारणी, आदी उद्दीष्ट
निर्धारित करण्यात आली आहेत. येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचं अभियानही
हाती घेण्यात आलं आहे.
या अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी राज्य शासनाने १२ हजार ४०९ कोटी रुपयांचा
आराखडा मंजूर केला असून या अभियानातंर्गत शौचालयं उभारणी, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन,
मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर
प्रक्रिया करण्यात येणार आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे, रेपो दर आता
पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक
बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या
पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नातली वाढ १३ पूर्णांक पाच टक्के राहिली
आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं.
महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत
महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार
स्वीकारला. सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला
भेट देऊन युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
सहावी भारतीय मोबाईल काँग्रेस उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे, या परिषदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी फाईव्ह-जी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत
चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त
होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही
वाढवेल. ४ आक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
उद्घाटन होणार आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं वर्धा इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता
सेवा पंधरवडा समारोप, ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, तसंच ७५ नद्यांच्या
परिक्रमेचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री
सुधीर मुनगंटीवार, मॅगसेसे पुरस्कार विजेते तसंच जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.
राजेंद्र सिंग यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या अत्याधुनिक औद्योगिक वसाहत ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा
अधिक गुंतवणूक झाली असून आठ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ऑरिकचे मुख्य व्यवस्थापक
सुरेश काकानी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑरिक सिटीत आयटी आणि इलेक्ट्रॉनिक
कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात उद्योजकांच्या परिषदेचं आयोजन करण्यात
आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ऑरिक सिटीत आतापर्यंत १७४ भूखंडांचं वितरण झालं असून
५० उद्योगांचं काम प्रगतीपथावर असून लवकरचं हे उद्योग सुरु होतील अशी माहिती त्यांनी
यावेळी दिली.
****
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार राजकीय तसंच अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक,
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या
सचिव डॉ.सविता पानट ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असं
या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १३ नोव्हेंबरला औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान
केला जाणार आहे.
****
तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं आवाहन नांदेड
इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केलं आहे.
नांदेड इथल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मिशन गौरी या
किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर कुलगुरू बोलत
होते. किन्नरांना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाअंतर्गत ज्या सुविधा लागतील त्या, उपलब्ध
करून देण्याचं आश्वासनही कुलगुरू डॉ भोसले यांनी दिलं. किन्नरांप्रती असलेला संवेदनेचा
धागा या लघुपटामार्फत अत्यंत कुशलतेने हाताळल्या बद्दल कुलगुरूंनी जिल्हा माहिती अधिकारी
विनोद रापतवार यांचं विशेष कौतुक केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही लहान मुले पळवून नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय
नाही असं जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज औरंगाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वास्तविक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेला नाही. चौकशीअंती या फक्त अफवा असल्याचं निष्पन्न
झालं, असं कलवानिया यांनी सांगितलं. सामाजिक माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या संदेशांवर
विश्वास ठेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपाला आज २९ वर्ष झाली. या भूकंपामध्ये
मृत्यू पावलेल्या नागरिकांना किल्लारी इथं आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार अभिमन्यू
पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अन्य अधिकारी तसंच ग्रामस्थांनी स्मृतीस्तंभाला
पुष्पचक्र अर्पण करत, दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन केलं. पोलीस प्रशासनाच्या वतीने
बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य दृष्टीने शक्तिशाली
होताना प्राणिमात्रांच्या कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे असं मत राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई शहर आणि परिसरातील प्राण्यांसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय
रुग्णवाहिका आज रुजू झाल्या, राज्यपालांनी या रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह
बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली असून, आता रेपो दर पाच पूर्णांक नऊ दशांश
टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत
दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत
उत्पन्नातली वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून, ही वाढ १३ पूर्णांक पाच टक्के आहे.
ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं.
कोरोना महामारी,
रशिया-युक्रेन युद्धाचा, जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील
नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच
विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातल्या ग्रामीण भागात
मागणी वाढली असून, गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत
महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
निवृत्त
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला.
सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या
हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय
योगदानाबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी
प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपट
‘फ्यूनरल’ ला गौरवण्यात येणार आहे, तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून ‘सुमि’ चित्रपटाला
पारितोषिक देण्यात येईल. ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट
पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात येणार आहे.
****
केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थाच्या तस्करीचं जाळं नेस्तनाबुत
करण्यासाठी गरुड ही विशेष मोहिम सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरपोल आणि
अंमली पदार्थ विरोधी दलाच्या समन्वयानं ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून
विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शोध मोहिम, धाडी आणि अटकसत्र राबवणार
आहे. यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याक़़डून मोठ्या प्रमाणात
अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
****
पावसाळा
संपत असताना यंदा राज्यातल्या धरणांमधल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे
साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा कोकण विभागात सर्वाधिक ९३ पूर्णांक २२ टक्के
पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागात सर्वात कमी ८७ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातली लहान
मोठी ३४ धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
****
कांदा निर्यातीबाबत
केंद्र शासनाच्या धोरणामुळे उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप करत काल नाशिक
जिल्ह्यातल्या मालेगाव इथं शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.
किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणू नये, कांदा
निर्यात बंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरपाई द्यावी, जीवनावश्यक वस्तुंच्या
सुचीतून कांद्याला कायमस्वरुपी वगळण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
औरंगाबाद
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्ह्यातल्या
विकास कामांचा काल आढावा घेतला. विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. क्रीडा प्रेमी आणि खेळाडू यांच्या
मागणीनुसार विभागीय संकुलामधल्या सर्व सुविधा दोन ऑक्टोबरपासून रविवारी सुद्धा उपलब्ध
करुन देण्याचे आदेशही भुमरे यांनी दिले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात ज्या शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमांक जोडणी झालेली नाही, त्यांच्यासाठी
जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दोन ऑक्टोबर रोजी विशेष शिबीरांचं आयोजन करण्यात
आलं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी ही माहिती दिली. आधार क्रमांक
जोडणी झाली नसल्यास त्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही भोसले यांनी दिला.
****
अहमदाबाद
इथं सुरु असलेल्या ६३व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या रुद्रांश
पाटीलने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच राज्याचं
सुवर्ण पदकाचं खातं देखील उघडलं आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष रग्बी संघाने
अंतिम फेरीत धडक मारली आहे. राज्याच्या महिला खोखो संघाने यजमान गुजरात संघाचा एक डाव
आणि सहा गुणांनी पराभव केला.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० सप्टेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास
यांनी आज पत्रकार परिषदेत आरबीआचं पतधोरण जाहीर केलं. रेपो दरात ५० बीपीएस पॉईंट म्हणजे
अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
****
गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. तसंच गांधीनगर ते कालूपूर या स्थानाकांदरम्यान
ते या गाडीतून प्रवासही करत आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.
****
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांचं वितरण होणार आहे. भारतीय चित्रपट
सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब
फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
म्हणून मराठी चित्रपट ‘फ्यूनरल’ ला गौरवण्यात येणार आहे.
****
राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना
शासनानं पदावरून दूर केलं आहे. गुरव यांनी केवळ तोंडी आदेशाद्वारे श्री विठ्ठल मंदिरातल्या
भजन-कीर्तनावर बंदी घातली होती. हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायानं या संदर्भात
केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघानं दिल्लीवर दोन -
शून्य असा सहज विजय मिळवला. अन्य सामन्यांत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील आणि आर्या
बोरसेनं १० मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित केला.
****
भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर यांनी हाँग कोंग च्या खेळाडूंचा पराभव
करत, व्हिएतनाम खुल्या सुपर हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाच्या उपांत्य
फेरीत प्रवेश केला आहे.
****
آکاشوانی اورنگ آباد ‘ علاقائی خبریں ‘ تاریخ : 30 ؍ ستمبر 2022ء ‘ وقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے تک
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date : 30 September 2022
Time : 09.00 to 09.10 AM
آکاشوانی اَورنگ آ باد
علاقائی خبریں
تاریخ : ۳۰؍ سِتمبر ۲۰۲۲ ء
وقت : صبح ۹.۰۰ سے ۹.۱۰ بجے
سب سے پہلے خاص خبروں کی سر خیاں...
٭ شدید بارش کے متاثرین کی فہرست میں غیر شامل 9؍ اضلاع کے کسانوں کو خصو صی امداد کے طور پر
755
؍ کروڑ روپیوںکی امداد ‘ ناندیڑ کے علاوہ مراٹھواڑہ کے دیگر تمام اضلاع کو اِس امداد کا فائدہ
٭ گھریلو استعمال کی گیس کے ایک کنیکشن پر اب سا لانہ ملیں گے صرف15
؍ سلینڈرس اور ماہانہ زیادہ سے زیادہ 2
٭ غیر شادی شدہ خواتین کو بھی اسقاطِ حمل کا قا نو نی حق سپریم کورٹ کی وضاحت
٭ ریاست میں44؍ گزیٹیڈ افسران کے تبادلے ‘ ناندیڑ میں ابھیجیت رائوت اور عثمان آ باد میں
اومباسے نئے ضلع کلکٹر
اور
٭ مرکزی حکو مت کی جانب سے عائد پا بندی کے بعد پاپو لر فرنٹ آف اِنڈیا کے اورنگ آباد اور بیڑ اضلاع کے دفا تر پر لگائے گئے تالے
اب خبریں تفصیل سے...
ٌٌ شدید بارش سے متاثرہ کسانوں کی فہرست میں نہ شامل9؍ اضلاع کے متاثرہ کسانوں کو خصو صی طورپر کم و بیش 755؍ کروڑ روپیوں کی امداد دی جائے گی ۔ وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے کی زیر صدارت کَل منعقدہ کا بینی اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا ۔ اِس فیصلے کا5؍ لاکھ سے زائد کسانوں کو فائدہ ہو گا ۔ رواں برس جون تا اگست کے دوران شدید بارش سے کسا نوں کا بہت نقصان ہوا ۔ قدرتی آفات سے نمٹنے کے زمرے کے تحت حکو مت نے اب تک کم و بیش ساڑھے4؍ ہزار کرور روپئے خرچ کیے ہیں ۔ حکو مت کے مذکورہ فیصلے سے مراٹھوارہ کے اورنگ آ باد ‘ جالنہ ‘ پر بھنی ‘ ہنگولی ‘ بیڑ ‘ لاتور اور عثمان آباد اضلاع سمیت ایوت محل اور شو لا پور اضلاع کے کسانوں کو فائدہ ہو گا ۔
ریاست کے قدر تی آ فات سے نمٹنے کے لیے قائم دستے کی فہرست کے مطا بق اگر امداد تقسیم کی جاتی تو صرف دیڑھ ہزار کروڑ روپئے خرچ ہوتے ۔ وزیر اعلیٰ نے بتا یا کہ حکو مت کی جانب سے امداد کا دائرہ وسیع کرنے کا سبب متاثرہ کسانوں کو بھر پور مدد ملے گی ۔
***** ***** *****
LPG گیس کمپنیوں نے گھریلوں استعمال کی گیس کے ایک کنیکشن پر سا لانہ صرف15؍ سلینڈر س اور ماہا نہ صرف2؍ سلینڈرس دینے کا فیصلہ کیا ہے ۔ اِس خصوص میں اب نئے ضوابط پر عمل آوری شروع کردی گئی ہے ۔ اب تک گھریلو استعمال کی گیس کےغیر ریاستی سلینڈرس سال بھر میں حسب ضرورت مل جا یا کر تے تھے تاہم اب یہ تعداد 15؍ تک محدود کر دی گئی ہے ۔ سبسیڈی والے سلینڈرس اب سا لانہ صرف12؍ عدد ملیں گے اور اِس سے زائد سلینڈرس غیر رعایتی داموں میں دستیاب کیے جا ئیں گے ۔ رعایتی سلینڈرس گھریلو استعمال کی بجائے کاروباری طور پر استعمال کیے جارہے ہیں ۔ ایسی شکا یات ملنے کے بعد یہ قدم اٹھا یا گیا ہے ۔
اِسی بیچ راشٹر وادی کانگریس پارٹی کی قائد سپریہ سُلے نے حکو مت کے اِس فیصلے پر تنقید کی ہے ۔ اُنھوں نے کہا کہ مرکز کی بی جے پی حکو مت نے گھریلو گیس کے استعمال پر پابندی عائد کر کے عوام کے کھانے پینے اور بنیادی حقوق پر پا بندی عائد کی ہے ۔
***** ***** *****
عدالت عظمیٰ نے وضاحت کی ہے کہ غیر شادی شدہ خواتین کو بھی اسقاطِ حمل یعنی حمل گرانے کا قا نو نی حق حاصل ہے ۔ عدالت نے کہا ہے کہ محفوظ اور قا نو نی طور پر اسقاطِ حمل کے حق کے معاملے میں شادی شدہ اور غیر شادی شدہ کے در میان فرق کرنا غیر دستوری ہو گا ۔ غیر شادی شدہ خا تون اگر اپنی مرضی سے جسما نی تعلقات قائم کر تی ہے تو اُس سے حا ملہ ہونے پر اُسے20؍ تا 24؍ ہفتوں تک اسقا ط حمل کی اجازت ہو گی ۔ جسٹِس چندر چوڑ کی زیر قیادت بینچ نے یہ وضاحیت کی ۔
***** ***** *****
4؍ چاکی گاڑیوں میں اب6؍ ایئر بیگس کے لازمی استعمال کی تجویز پر آئندہ برس یکم اکتوبر سے عمل آ وری کی جائے گی ۔ زمینی حمل و نقل کے مرکزی وزیر نتن گڈ کری نے کَل سوشل میڈیا کے ذریعے یہ اعلان کیا ۔
***** ***** *****
مرکزی وزارتِ مالیات نے مالی سال 2022 - 23 ء کے لیے محکمہ ڈاک کی بچت اسکیمات پر شر ح سود میں اضا فے کافیصلہ کیا ہے ۔ کسان وِکاس پتر پر سود کی شرح 6.9؍ فیصد سے بڑھا کر 7؍ فیصد کر دی گئی ہے اور اِس اسکیم کی مدت 123؍ مہینے کر دی گئی ہے ۔ سینئر شہر یان کی بچت اسکیم پرشرح سود 7.6؍ فیصد اور ما ہانہ آمدنی اسکیم پر یہ 6.7؍ فیصد کر دیا گیا ہے ۔ پوسٹ آفِس میں 2؍ سال کی مدت کے لیے رقم جمع کرنے پر اب 5.7؍ فیصد اور 3؍ برس کی مدت پر 8.5؍فیصد سود ملے گا تاہم صرف ایک برس مدت کے لیے رقم ڈِپازٹ کرنے پر PPF ‘ سُکنیا سمرُدّھی یو جنا اور قومی بچت اسکیمات پر شرح سود میں کوئی تبدیلی نہیں کی گئی ہے ۔
***** ***** *****
اب سماعت فرمائیں ایک ضروری اعلان
آکاشوانی اورنگ آباد کی علاقائی خبررساں اکائی سے نشر ہونے والی اُردو خبروں کیلئے نیوزریڈر اور مترجم درکارہیں۔ درخواست گذارکی عمر یکم ستمبر 2022 کو21؍ تا 50؍ برس ہونالازمی ہے۔علاوہ ازیں درخواست گذار اورنگ آباد میونسپل کارپوریشن حدود کا ساکن ہوناضروری ہے۔ بیرون شہر کے درخواست گذاروں کی درخواست پرغورنہیں کیاجائیگا۔
اس عہدے سے متعلق دیگر تفصیلات اوردرخواست فارم پرساربھارتی کی ویب سائٹ ’’پرساربھارتی ڈاٹ جی اووی ڈاٹ اِن سلیش پی بی ویکنسیز‘‘ پر موجود ہے۔ اس کے علاوہ آکاشوانی اورنگ آباد کے ٹوئیٹر ہینڈل ،’’ اے آئی آرنیوز انڈر اسکور اے آر این جی بی اے ڈی‘‘ اور فیس بک پیج ’’اے آئی آراورنگ آباد‘‘ پربھی موجودہے۔
خواہشمند افراداپنی درخواست فیس کے ساتھ ’’ہیڈآف آفس آکاشوانی ،جالنہ روڈ اورنگ آباد 431005 ‘‘پر اسپیڈ پوسٹ یابذریعہ ڈاک 30؍ ستمبر تک بھیج سکتے ہیں۔
***** ***** *****
ریاستی حکو مت نے کَل 44؍ گزیٹیڈ افسران کے تبا دلے کیے ۔ اورنگ آ باد ضلع پریشد کےCEO کے طور پر وِکاس مینا جبکہ جالنہ میں اِسی عہدے کے لیے ورشا مینا کا تقرر کیا گیا ہے ۔ عثمان آباد کےکلکٹر کے طور پر سچن اومبا سے اور ناندیڑ کے ضلع کلکٹر عہدے پر ابھیجیت رائوت کی نامزدگی عمل میں آئی ہے ۔ اِسی طرح ڈاکٹر بھگونت رائو پاٹل کو ناندیڑ کا میونسپل کمشنر بنا یا گیا ہے ۔ لاتور کے میونسپل کار پوریشن کے کمشنر امن مِتّل اور کِنوَٹ کی معا وِن ضلع کلکٹر کیرتی پجا ر کا بھی تبا دلہ کیا گیا ہے ۔
***** ***** *****
آب رسانی اور صاف صفائی کے رستی و زیر گلاب رائو پاٹل نے دیہی علاقوں میں صفائی قائم رکھنے اور دیہی عوام کے صحت درست رکھنے کے لیے اُن میں بیداری کی خاطر سر پنچوں سے سر گرم کر دار ادا کر نے کی اپیل کی ہے ۔ وزیر موصوف کَل ایک جُٹ بھارت مہم کے تحت سر پنچوں سے آن لائن خطاب کررہے تھے ۔ اُنھوں نے کہا کہ دیہا توں میں صاف صفائی کی خاطر سو کھے اور گیلے کچرے کو الگ الگ کرنے کےلیے عوام میں بیداری کی جائے ۔ عوامی اجتما عات کا انعقات کر کے اُن میں پلا سٹِک کی اشیاء کے استعمال کے نقصا نات بتائے جا ئیں ۔ پانی کے قریب صفائی بر قرار رکھتے ہوئے شجر کاری کی اسکیمات پر عمل در آمد کیا جائے ۔
***** ***** *****
ریاست میں کَل کورونا کے453؍ نئے مریض پائے گئے ۔ جس کے بعد ریاست بھر میں اب تک اِس وباء کے کُل متاثرین کی تعداد81؍ لاکھ 20؍ ہزار954؍ ہو چکی ہے ۔ کَل اِس بیما ری سے 2؍ مریضوں کی موت ہو گئی ۔ ریاست میں اب تک اِس مرض سے ہلاک ہونے والوں کی تعدادایک لاکھ48؍ ہزار338؍ ہو چکی ہے ۔ساتھ ہی کَل604؍ کورونا مریض شفا یاب ہو ئے ۔ ریاست میں اب تک79؍ لاکھ69؍ہزار340؍ کورونا مریض ٹھیک ہو کر گھر لوٹ چکے ہیں ۔ فی الحال ریاست کے مختلف اسپتالوں میں3؍ ہزار276؍ کورونا مریضوں کا علاج کیا جا رہاہے ۔
***** ***** *****
مراٹھواڑہ میں کل کورونا کے49؍ نئے کیسیز درج کیے گئے ۔ اِن میں عثمان آباد ضلعے کے21؍ اورنگ آ باد 11؍ لاتور10؍ جالنہ 4؍ ناندیڑ2؍ اور پر بھنی ضلعے کا ایک مریض شامل ہے ۔
***** ***** *****
مرکزی حکو مت کی جانب سے پا پو لر فرنٹ آف اِنڈیا PFIنامی تنظیم پر پا بندی عائد کیے جانے کے بعد اورنگ آ باد شہر کے علاقے جنسی میں واقع تنظیم کے دفتر پر پولس نے تا لا لگا دیا ۔ پولس کمشنر ڈاکٹر نکھل گپتا کے حکم پر یہ کار وائی عمل میں آئی ۔ اِس سلسلے میں تنظیم کے دفتر کو نوٹس جا ری کی گئی تھی ۔ مرکزی جانچ ایجنسیوں کے ساتھ ساتھ مقا می پولس بھی اب اِن پر کار وائی کر رہی ہے ۔ اِس ممنوعہ تنظیم دفتر کے اطراف پولس کا سحت بندوبست کر دیا گیا ہے ۔ اِس سے قبل مرکزی جانچ ایجنسی NIA اور اِنسداد دہشت گر دی دستےATSنے مشتر کہ طور پر چھا پے مار کر اِس تنظیم کے
13؍ اراکین کو گرفتار کیا تھا ۔بیڑ ضلعے میں بھیPFI کے ضلع دفتر پر تا لا لگا یا گیا ہے ۔
***** ***** *****
آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے...
٭ شدید بارش کے متاثرین کی فہرست میں غیر شامل 9؍ اضلاع کے کسانوں کو خصو صی امداد کے طور پر
755
؍ کروڑ روپیوںکی امداد ‘ ناندیڑ کے علاوہ مراٹھواڑہ کے دیگر تمام اضلاع کو اِس امداد کا فائدہ
٭ گھریلو استعمال کی گیس کے ایک کنیکشن پر اب سا لانہ ملیں گے صرف15
؍ سلینڈرس اور ماہانہ زیادہ سے زیادہ 2
٭ غیر شادی شدہ خواتین کو بھی اسقاطِ حمل کا قا نو نی حق سپریم کورٹ کی وضاحت
٭ ریاست میں44؍ گزیٹیڈ افسران کے تبادلے ‘ ناندیڑ میں ابھیجیت رائوت اور عثمان آ باد میں
اومباسے نئے ضلع کلکٹر
اور
٭ مرکزی حکو مت کی جانب سے عائد پا بندی کے بعد پاپو لر فرنٹ آف اِنڈیا کے اورنگ آباد اور بیڑ اضلاع کے دفا تر پر لگائے گئے تالے
علاقائی خبریں ختم ہوئیں
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 30 September 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून
७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठवाड्यातल्या नांदेड वगळता
सर्व जिल्ह्यांचा समावेश
· स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर आता वर्षाला एकूण १५ तर महिन्याला
जास्तीत जास्त दोन सिलेंडर्स मिळणार
· अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च
न्यायालयाकडून स्पष्ट
· भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ
· राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नांदेडला अभिजित राऊत तर उस्मानाबादला
सचिन ओंबासे नवे जिल्हाधिकारी
· केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद आणि बीडमधील
कार्यालयांना टाळं
आणि
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचा कृषीमंत्री
अब्दुल सत्तार यांचा दावा
सविस्तर बातम्या
अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना
विशेष बाब म्हणून जवळपास ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
याचा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत
अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निकषात बसलेल्या शेतकऱ्यांसाठी
राज्य सरकारनं यापूर्वीच मदत घोषित केली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत
अंदाजे साडे चार हजार कोटी रुपयांच्या निधीचं शासनानं वाटप केलं आहे. या निर्णयाचा
मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना,
तसंच यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना लाभ होईल. राज्य आपत्ती निवारण
दलाच्या निकषाप्रमाणे जर मदतीचं वाटप केलं असतं, तर केवळ दीड हजार कोटी रुपयांची मदत
वाटप झाली असती. मात्र निकषाच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स
तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात
नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या
ग्राहकांना, वर्षभरात अमर्यादित सिलेंडर्स मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस जोडणी धारकांना
वर्षभरात फक्त १२ सिलेंडर्स मिळणार असून, त्याहून अधिक सिलेंडर्सची गरज भासल्यास जास्तीचे
सिलेंडर्स विनाअनुदानित दरानं घेता येईल. सिलेंडर संदर्भातल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल
करण्यात आले असून, याची तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती
गॅस सिलेंडरचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत असल्यामुळे
हा बदल करण्यात आला आहे.
****
अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च
न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व
महिला पात्र असून, त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणं
असंवैधानिक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या
शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या २० ते २४ व्या आठवड्यात
गर्भपात करण्याची परवानगी मिळेल, असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या
खंडपीठानं सांगितलं. बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत
वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार
झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. समाजातल्या संकुचित पितृ
सत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश
संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
चारचाकी वाहनामध्ये सहा `एअरबॅग` अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची पुढील वर्षी
एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक
पुरवठा साखळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय
घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात, भारतीय टपाल खात्याच्या
तिसऱ्या तिमाहीसाठी, बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान
विकास पत्रावरील व्याज दरामध्ये सहा पूर्णांक नऊ टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात
आली असून, त्याचा कालावधी १२३ महिने इतका करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत
योजनांवरील व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के तर, मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर सहा
पूर्णांक सात टक्के करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच
पूर्णांक सात टक्के तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक आठ टक्के इतका व्याजदर
देण्यात येणार आहे. मात्र एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात, तसंच पीपीएफ,
सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बचत पत्रांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात
आला नाही.
****
गावांमध्ये कायम स्वच्छता आणि ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यासंदर्भात जनजागृती
करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असं आवाहन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. स्वच्छता के लिए एकजुट भारत मोहिमेअंतर्गत, ऑनलाईन
सरपंच संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. गावातल्या कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची
साफसफाई, सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम
घ्यावेत, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचं
व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा घ्याव्यात, पाणवठ्याजवळचा
परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, इत्यादी विविध उपक्रम सरपंचानी
आयोजित करावेत, असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
म्हणून सचिन ओंबासे, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी अभिजित राऊत, तर नांदेड महानगरपालिका
आयुक्तपदी डॉ. भगवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. लातूर महानगरपालिका आयुक्त
अमन मित्तल आणि किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांची देखील बदली झाली आहे.
****
औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यात भगरीच्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर,
राज्यात भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने
तपासणी करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
यांनी दिल्या आहेत. अन्न, औषध तसंच सौदर्य प्रसाधनांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध
कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
२०१४ साली एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली,
असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं असेल तर त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे, असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी
जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही त्यांनी
मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे यांचं महत्त्व
कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ९५४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ३३८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ६०४
रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६९ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
तीन हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
२१, औरंगाबाद ११, लातूर दहा, जालना चार, नांदेड दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
****
केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- पीएफआय या संघटनेच्या
औरंगाबाद शहरातल्या जिन्सी भागातल्या कार्यालयाला पोलिसांनी काल टाळं ठोकलं. पोलीस
आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली. या संदर्भात
कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून, केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही
पीएफआयविरुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा -एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं औरंगाबादच्या
अनेक भागात छापे टाकून पीएफआयच्या १३ सदस्यांना अटक केली आहे.
बीड इथल्या पीआयएफच्या जिल्हा कार्यालयाला देखील टाळं ठोकण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानं पालक गमावलेली बालकं
शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी
राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते.
जिल्ह्यात या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांचे चारशे पंचवीस
अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचं, कृषीमंत्री
अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित
हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते काल बोलत होते. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे देशाचं
लक्ष लागल असून, मुख्यमंत्र्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा
जागर’ या स्पर्धेचं
आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी यासारख्या विषयांवर
गीतरचना करुन लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषयांशी
संबंधित लोकगीत गाऊन त्याची दोन ते पाच मिनिटांची ध्वनि चित्रफीत ३१ ऑक्टोबर पर्यंत
पाठवावी. विजेत्यांना रोख बक्षिसं, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. प्रवेश अर्ज
तसंच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या संकेत स्थळावर संपर्क करण्याचं आवाहन उपजिल्हा
निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
किन्नरांचा आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे. जिल्हा
माहिती कार्यालयाच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या, “मिशन गौरी”, या किन्नरांच्या विकास
प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर, ते काल बोलत होते. या विद्यापिठाअंतर्गत
उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा किंन्नरांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासनही
भोसले यांनी यावेळी दिलं.
****
बीड जिल्ह्यात सेवा पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीनं तृतीयपंथीयांची
कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना
ओळखपत्र आणि प्रमाणपत्रासाठीची कार्यपद्धती सांगितली. तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण
केलं. यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र
वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्हा परिषदेतच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा घेण्यात
आली. सर्व ग्रामपंचायतींनी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत गावात प्लॉस्टिक वापरावर बंदीचा
ठराव घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी यावेळी
केलं. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत गावात स्वच्छता, प्लॉस्टिक वापरावर बंदी यासह
कचरा संकलन, वृक्ष लागवड आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी
केलं.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी
सोळा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी
सांगितलं. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला
उद्यापासून सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार
असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेनं
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सुरु केलं आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...