आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 November 2017
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.11.2017 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
आर्थिक वृद्धी दराचा आकडा दहा टक्क्यांपर्यंत आणणं हे
एक आव्हान असून, जागतिक अर्थव्यवस्थेवर तो अवलंबून असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण
जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं हिंदुस्थान टाईम्स नेतृत्व परिषदेत बोलत
होते. सरकारच्या नैतिक धोरणांमुळे जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला महत्वाचं स्थान
प्राप्त झालं असल्याचं ते म्हणाले. कराचा दर पाच टक्के असणारा भारत हा एकमेव देश असून,
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणता येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
अमेरिकेच्या एनाहेम इथं झालेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद
स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. १९९५ नंतर देशाला प्रथमच वेटलिफ्टिंगमध्ये
सुवर्ण पदक मिळालं आहे. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मीराबाई चानूचं
अभिनंदन केलं आहे. संपूर्ण देशाला तिचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनीही मीराबाईचं अभिनंदन
केलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला आणि बडगाम
जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगेवगळ्या चकमकीत
पाच दहशतवादी ठार झाले.
बडगाम जिल्ह्यातल्या पखेरपुरा भागात दहशतवादी लपले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर जवानांनी आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत
चार दहशतवादी ठार झाले.
तर दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातल्या सगीपुरा
जंगलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. याठिकाणी दुपारपर्यंत चकमक सुरू होती.
****
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ - सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष
प्रसून जोशी, पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादासंबंधी माहिती देण्यासाठी आज
संसदीय समितीसमोर हजर राहिले. या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची मागणी राजस्थानचे
दोन खासदार सी.पी.जोशी आणि ओम बिरला यांनी समितीला केली होती. सेन्सॉर बोर्डानं फक्त
चित्रपटाच्या प्रोमोलाच मान्यता दिली असून, तज्ज्ञांना दाखवल्यानंतरच प्रमाणपत्र देण्याचा
निर्णय होईल, असं जोशी यांनी समितीला सांगितलं.
****
ईद-ए-मिलादचा सण उद्या साजरा होणार असून, राज्यपाल सी.विद्यासागर
राव यांनी राज्यातल्या जनतेला ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा
जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण प्रेषितांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण
करुन देतो. हा पवित्र सण परस्पर बंधुभाव आणि सौहार्द वृद्धिंगत करो, असं राज्यपालांनी
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
एचआयव्ही एड्स प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून
एकत्रित काम करणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केलं.
एक डिसेंबर हा दिवस
जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येतो, त्यानिमित्त मुंबई
इथं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्यावतीनं आयोजित राज्यस्तरीय
कार्यक्रमात ते आज बोलत होते. एचआयव्ही एड्स बाधितांसाठी राज्यातल्या ३४ जिल्ह्यांत
५९५ एकात्मिक समुपदेशन आणि तपासणी केंद्रं असून, त्याठिकाणी समुपदेशन आणि मोफत औषधं
दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, जागतिक एड्स दिनानिमित्त
आज औरंगाबाद शहरात जनजागरण रॅली काढण्यात आली. क्रांती चौकातून निघालेल्या या रॅलीला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांच्या
हस्ते सुरुवात झाली. रॅलीचा समारोप मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर करण्यात
आला.
परभणी इथंही महानगरपालिका आयुक्त
राहुल रेखावार यांनी जनजागरण रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी महविद्यालयीन विद्यार्थी
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
‘उडान’ या योजनेत समाविष्ट असलेली नांदेड
- मुंबई - नांदेड विमानसेवा ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीनं सुरू केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, तसंच सामान्य प्रशासन विभागानं ही
माहिती दिली. नांदेड इथून सकाळी दहा वाजून
३५ मिनीटांनी विमान उड्डाण घेईल आणि दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मुंबईला उतरेल, तर परतीच्या प्रवासात हे विमान
मुंबई इथून दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
****
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
वतीनं आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काँग्रेस
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जालना मार्ग अडवून धरत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
केली. बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत, सरसकट कर्जमाफी,
शेतीमालाला हमीभाव, दुधाला ३० रुपये प्रतिलिटर भाव, वीज शुल्क माफी अशा मागण्या करण्यात
आल्या. जवळपास पंधरा मिनिटं रस्ता अडवण्यात आल्यानं वाहतूक खोळंबली होती.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2017 13.00.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2017
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक 30 नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
भ्रष्टाचार मुक्त विकास प्रणाली सरकारची
प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं
हिंदुस्थान टाईम्स नेतृत्व परिषदेत बोलत होते. विमुद्रीकरणामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये
मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाल्याचं, तसंच वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे कर व्यवस्थेत
पारदर्शकता आल्याचं ते म्हणाले. माध्यमांनी स्वच्छ भारत अभियान आणि सरकारच्या विविध
योजनांचा प्रसार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की
बात हा कार्यक्रम पारंपारिक आणि सामाजिक माध्यमांचा वापर करुन कमी वेळात जास्त जनतेपर्यंत
पोहोचण्याचं उत्तम उदाहरण असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर
वेंपती यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं जागतिक उद्योजकता संमेलनात 'पारंपारिक आणि सामाजिक
माध्यमांचा वापर' या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. सामाजिक माध्यमांचा
प्रेक्षकांवर प्रचंड प्रभाव पडत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून
आवाहन केल्यानंतर सेल्फी विथ डॉटर, अतुल्य भारत यासारखे उपक्रम सामाजिक माध्यमांवर
लोकप्रिय झाल्याचं ते म्हणाले.
****
बाजारात कांद्याच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं साठवण मर्यादेचा कालावधी
येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान
यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कांद्याची विक्री करण्याचे
निर्देश दिल्ली सरकारला दिले आहेत. तर, महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी कमी दरात कांदा खरेदी करुन नंतर
तो विकावा, असं त्यांना सांगितलं आहे. नाशिक, सोलापूर, अलवार आणि इंदूरमधे अजूनही २८ ते ३५ रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध आहे. शिवाय कांदा आयात करण्याची प्रक्रिया
सरकारनं सुरु केली असून, कांद्याच्या दरवाढीवर मात करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे
आदेश नाफेड आणि इतर यंत्रणांना दिले आहेत, असं पासवान यांनी सांगितलं.
****
देशात उच्च शिक्षण देणार्या सहा प्रमुख शैक्षणिक संस्थांना त्यांच्या संशोधनाविषयक
पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी उच्च शिक्षण
निधी पुरवठा संस्थेनं दोन हजार ६६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, मद्रास, खरगपुर आणि कानपुर इथल्या आय आय टी
आणि सुरतकाल इथल्या एन आय आय या संस्थाचा समावेश आहे. या संस्थाना केंद्रसरकारकडून मिळणार्या
नियमित अनुदानाव्यतिरिक्त हा निधी दिला जाणार आहे. हा निधी उभारण्यासाठी निधिपुरवठा संस्था
बाजारातून रक्कम उभी करणार असून व्याजमुक्त कर्जाच्या स्वरुपात तो या शिक्षणसंस्थांना
पुरवला जाणार आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी कर रचनेअंतर्गत
गुळाचा सध्याचा अकृषक उत्पादन - नॉन अग्रीकल्चर प्रोड्युस हा दर्जा वगळून कृषि उत्पादन
असाच करण्यात यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारकडे
केली आहे. गुळावर जीएसटी लावल्यानं शेतकऱ्यांना कमी दर मिळणार असून, ग्राहकांनाही जादा
दरानं गुळ घ्यावा लागू शकतो, असं खोत यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहीलेल्या
पत्रात म्हटलं आहे.
****
विविध संस्था आणि सोसायट्यांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत असून, त्यासाठी
राज्यात राबवण्यात येत असलेलं अटल महापणन विकास अभियान अत्यंत उपयुक्त असल्याचं प्रतिपादन
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. जालना इथं आयोजित अटल महापणन
विकास अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. या अभियानात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन
संस्था, सोसायट्यांचे सदस्य तसंच शेतकऱ्यांना विविध तज्ज्ञ व्यक्तीमार्फत
मार्गदर्शन करण्यात येत आहे.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लातूर विभागातल्या जिल्ह्यात
होत असलेल्या अंमलबजावणी बाबतचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक गतिमान पद्धतीनं
काम करून शेवटच्या घटकापर्यंतच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचण्याचे निर्देश, त्यांनी
यावेळी दिले
****
राज्य सरकारनं दिलेल्या कर्ज माफी योजनेतली
दुसरी यादी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाली असून, आणखी नऊ हजार
९६३ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ५३ कोटी रुपयांची
रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यात वर्ग झाली आहे. कर्ज माफीच्या पहिल्या यादीत ८३७ शेतकऱ्यांना
तीन कोटी ६० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली होती.
****
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी
नाशिक जिल्ह्यातल्या आणखी ७५३ शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली असून, त्यांचं खरेदी खतही
तयार करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा मार्ग
जाणार असून, आत्तापर्यंत २४० हेकटर क्षेत्राचं भूसंपादन करण्यात आले असल्याचं जिल्हा
प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2017 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद.
संक्षिप्त
बातमीपत्र
३०
नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये
सध्या चकमक सुरु आहे. जवानांच्या शोधमोहीमेदरम्यान ही चकमक सुरु झाल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक
गुलाम हसन भट्ट यांनी सांगितलं. या चकमकीत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
****
पंतप्रधान
ग्रामीण आवास योजनेनं दहा लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट वेळेच्या आधीच पूर्ण केलं आहे.
गेल्या २० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रा इथून या योजनेचा शुभारंभ
केला होता. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं ३१ मार्च २०१९
पर्यंत एक कोटी घरं बांधण्याचं उद्दिष्ट निर्धीरित केलं असून पुढच्या वर्षीच्या ३१
मार्च पर्यंत ५१ लाख घरं बांधण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह, मध्य
प्रदेश, ओडिशा, राजस्थान, आदी राज्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याचं
याबाबतच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
परीक्षांचं वेळापत्रक काल जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते
वीस मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत
होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला आठ विशेष
रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. नागपूर - मुंबई, मुंबई -
अजनी, मुंबई - सेवाग्राम, तसंच सोलापूर - मुंबई मार्गावर या गाड्या धावतील. अधिक माहितीसाठी
इच्छुकांनी संबंधित रेल्वे स्थानक अधीक्षकांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
विभागीय
महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना आजपासून जालना इथं प्रारंभ होत आहे. राज्याचे
पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर
यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. सुमारे
१५०० खेळाडू
यात सहभाग घेणार आहेत.
*****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 November 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍ نومبر ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
احمد نگر ضلع کے کو پر ڈی میں ایک کمسن اسکو لی طالبہ کے ساتھ زیادتی اور بعد میں اُسے قتل کیئے جانے کی واردات کے مجرم تین افراد کو احمد نگر ڈِسٹرکٹ سیشن کورٹ نے سزائے موت دیدی ہے۔ گذشتہ 18؍ تاریخ کو سما عت کے بعد جِتیندر شِندے ،سنتوش بھواڑ اور نتشن بھئے لو مے کو عدالت نے زیاد تی اور قتل کے ارتکا ب کا مجرم قرار دیا تھا۔ گذشتہ برس13؍ جولائی کو پیش آئی اِس واردات کے بعد سے ریاست بھر میں احتجاجی مظا ہرے اور جلوس نکالے جا رہے تھے جس میں خا طیوں کو کیفر کر دار تک پہنچا نے کا مطالبہ کیا جا رہا تھا۔
عدالتی فیصلے پر ردّ عمل ظا ہر کرتے ہوئے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہاکہ اِس فیصلے سے معا شرے میں مو جود مجرما نہ ذہنیت پر ضرب لگے گی اور عدالت پر عوام کے اعتماد میں مزید اضا فہ ہو گا نیز عدالت کی جانب سے مجرموں کو دی گئی سخت ترین سزا سے خواتین کے خلاف مظالم پر قا بو پا نے میں مدد ملے گی ۔
بی جے پی کے ریاستی صدر رائو صاحب دانوے نے اِس فیصلے پر تبصرہ کر تے ہوئے کہا کہ مستقبل میں اِس طرح کے واقعات سے بچنے کے لیے عدالتی فیصلے سے معقول پیغام جرائم پیشہ افراد کو گیا ہے۔
ریاستی خواتین کمیشن کی سر براہ وِجیہ راہٹکر نے اپنے خیا لات کا اظہار کر تے ہوئے کہا کہ کو پر ڈی مقد مہ فاسٹ ٹریک عدالت میں چلا کر ریاستی حکو مت نے متا ثرہ لڑ کی اوراُس کے خاندان کو انصاف دلا نے میں مدد کی ہے۔ اُنھوں نے اعتماد ظا ہر کیا کہ مجر موں کی سزائے موت کو عدالت عالیہ میں بھی بر قرار رکھنے کے لیے ریاستی حکو مت ہر ممکنہ کوشش کریگی۔
مہا راشٹر پر دیش کانگریس کمیٹی کے صدر اشوک چو ہا ن نے اِس عدالتی فیصلے کو ملک کے نظام عدل پر اعتماد کو تقویت دینے والا قرار دیا۔ اُنھوں نے کہا کہ نِر بھیا معاملے کے بعد کانگریس حکو مت کی جانب سے کی گئی قا نو نی ترامیم کے باعث کو پر ڈی مقدمے کو فاسٹ ٹریک عدالت میں سنا کر مجر موں کو پھا نسی کی سزا ممکن ہو ئی۔
قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے قائد دھننجئے مُنڈے نے عدالت کے فیصلے کو اطمینان بخش قرار دیتے ہوئے کہا کہ اِس سے متا ثرہ لڑ کی کے خاندان کو کسی در جے میں انصاف ملنے کا اطمینان ہو گا۔
****************************
راشٹر وادی کانگریس پار ٹی آئندہ12؍ دسمبر کو ریاستی اسمبلی کے سر مائی اجلاس پر مور چہ نکال کر اجلاس کے کام کاج کو روکنے کی کوشش کریگی۔ پارٹی ذرائع نے بتا یا کہ این سی پی صدر رکن پار لیمنٹ شرد پوار کی زیر قیا دت یہ مظا ہرہ کیا جائے گا۔
ریاستی اسمبلی کا سر مائی اجلاس 11؍ دسمبر تا22؍ دسمبر ناگپور میں منعقد ہو رہا ہے۔ اِس اجلاس میں13؍ بل اور 11؍ آرڈیننس نیز
قا نون ساز کونسل میں زیر التواء 5؍ بل بھی ایوان میں پیش کیئے جائینگے۔ پارلیما نی امور کے وزیر گریش با پٹ نے کل اخبا ری نمائندوں کو یہ اطلاع دی۔
****************************
جن لوک پال اور کسانوں کے مسائل کے حل کے لیے بزرگ سما جی کار کن انناہزارے ،یوم شہدا یعنی 23؍ مارچ سے نئی دہلی میں تحریک چلائیںگے۔ کل احمد نگر کے رالے گن سِدھی میں منعقد ایک اجلاس کے بعد اننا ہزارے نے صحا فیوں کویہ اطلاع دی۔
****************************
ریاست میں ماش، مونگ اور سو یا بین کی خرید کے لیے قائم کر دہ165؍ مراکز پر گریڈنگ مشین فوری نصب کرنے کے احکا مات وزیر تجا رت سُبھاش دیشمکھ نے دیئے ہیں۔ کل ممبئی میں منعقدہ ایک اجلاس کے بعد اُنھوں نے حکم جاری کیا کہ کسا نوںکی اشیاء خرید نے کے بعد اُنھیں چیک نہ دیتے ہوئے آر ٹی جی ایس کے ذریعے اُن کی رقو مات بینک کھاتوں میںراست جمع کی جائے ۔
****************************
ریاست کی10؍ بھو وِکاس بینکوں کی املاک فروخت کرنے کے عمل کا آ غاز کرنے کی ہدا یت ریاستی حکو مت نے دی ہے۔ کل ممبئی میں کا بینی کمیٹی کے اجلاس کے بعد یہ فیصلہ کیا گیا۔ اجلاس کے بعد حکم جا ری کیا گیا کہ املاک کی فروخت سے حاصل ہونے والی رقم سے ملا زمین کی واجب الادا تنخواہیں اور وظائف ادا کیئے جائیں۔
****************************
ریاستی ثانوی اور اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ نے2018 میں مجوزہ دسویں اور بارہویں کے امتحا نات کا ٹائم ٹیبل کل جا ری کر دیا ہے۔ بارہویں کے امتحا نات 21؍ فروری سے20؍ مارچ کے دوران اور میٹرک کے امتحا نات یکم مارچ سے 24؍ مارچ کے دوران ہوںگے۔ یہ ٹائم ٹیبل بورڈ کی ویب سائٹ پر موجود ہے۔
****************************
اورنگ آباد میونسپل کار پو ریشن میں لاڈ کمیٹی کی سفارشات کے تحت 188؍ ملازمین کی بھر تی کے عمل میں 8؍ افسران کو بد عنوا نی کا مرتکب پا یا گیا۔ اِن افسران کے خلاف کار وائی کیئے جانے کے احکا مات وزیر اعلیٰ دفتر سے میونسپل کمشنر کو ارسال کیئے گئے ۔ اورنگ آباد میونسپل کا ر پو ریشن میں2010 سے 2015 کے دوران یہ بھر تی ہوئی تھی۔ اِن بھر تیوں میں بد عنوا نی کی شکایت پر تُکا رام مونڈھے کو تحقیقات پر ما مور کیا گیا تھا۔ اِس سلسلے میں مو نڈھے کی تحقیقاتی رپورٹ پر یہ احکا مات جاری کیئے گئے۔
****************************
Date: 30 November 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍ نومبر ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
احمد نگر ضلع کے کو پر ڈی میں ایک کمسن اسکو لی طالبہ کے ساتھ زیادتی اور بعد میں اُسے قتل کیئے جانے کی واردات کے مجرم تین افراد کو احمد نگر ڈِسٹرکٹ سیشن کورٹ نے سزائے موت دیدی ہے۔ گذشتہ 18؍ تاریخ کو سما عت کے بعد جِتیندر شِندے ،سنتوش بھواڑ اور نتشن بھئے لو مے کو عدالت نے زیاد تی اور قتل کے ارتکا ب کا مجرم قرار دیا تھا۔ گذشتہ برس13؍ جولائی کو پیش آئی اِس واردات کے بعد سے ریاست بھر میں احتجاجی مظا ہرے اور جلوس نکالے جا رہے تھے جس میں خا طیوں کو کیفر کر دار تک پہنچا نے کا مطالبہ کیا جا رہا تھا۔
عدالتی فیصلے پر ردّ عمل ظا ہر کرتے ہوئے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہاکہ اِس فیصلے سے معا شرے میں مو جود مجرما نہ ذہنیت پر ضرب لگے گی اور عدالت پر عوام کے اعتماد میں مزید اضا فہ ہو گا نیز عدالت کی جانب سے مجرموں کو دی گئی سخت ترین سزا سے خواتین کے خلاف مظالم پر قا بو پا نے میں مدد ملے گی ۔
بی جے پی کے ریاستی صدر رائو صاحب دانوے نے اِس فیصلے پر تبصرہ کر تے ہوئے کہا کہ مستقبل میں اِس طرح کے واقعات سے بچنے کے لیے عدالتی فیصلے سے معقول پیغام جرائم پیشہ افراد کو گیا ہے۔
ریاستی خواتین کمیشن کی سر براہ وِجیہ راہٹکر نے اپنے خیا لات کا اظہار کر تے ہوئے کہا کہ کو پر ڈی مقد مہ فاسٹ ٹریک عدالت میں چلا کر ریاستی حکو مت نے متا ثرہ لڑ کی اوراُس کے خاندان کو انصاف دلا نے میں مدد کی ہے۔ اُنھوں نے اعتماد ظا ہر کیا کہ مجر موں کی سزائے موت کو عدالت عالیہ میں بھی بر قرار رکھنے کے لیے ریاستی حکو مت ہر ممکنہ کوشش کریگی۔
مہا راشٹر پر دیش کانگریس کمیٹی کے صدر اشوک چو ہا ن نے اِس عدالتی فیصلے کو ملک کے نظام عدل پر اعتماد کو تقویت دینے والا قرار دیا۔ اُنھوں نے کہا کہ نِر بھیا معاملے کے بعد کانگریس حکو مت کی جانب سے کی گئی قا نو نی ترامیم کے باعث کو پر ڈی مقدمے کو فاسٹ ٹریک عدالت میں سنا کر مجر موں کو پھا نسی کی سزا ممکن ہو ئی۔
قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے قائد دھننجئے مُنڈے نے عدالت کے فیصلے کو اطمینان بخش قرار دیتے ہوئے کہا کہ اِس سے متا ثرہ لڑ کی کے خاندان کو کسی در جے میں انصاف ملنے کا اطمینان ہو گا۔
****************************
راشٹر وادی کانگریس پار ٹی آئندہ12؍ دسمبر کو ریاستی اسمبلی کے سر مائی اجلاس پر مور چہ نکال کر اجلاس کے کام کاج کو روکنے کی کوشش کریگی۔ پارٹی ذرائع نے بتا یا کہ این سی پی صدر رکن پار لیمنٹ شرد پوار کی زیر قیا دت یہ مظا ہرہ کیا جائے گا۔
ریاستی اسمبلی کا سر مائی اجلاس 11؍ دسمبر تا22؍ دسمبر ناگپور میں منعقد ہو رہا ہے۔ اِس اجلاس میں13؍ بل اور 11؍ آرڈیننس نیز
قا نون ساز کونسل میں زیر التواء 5؍ بل بھی ایوان میں پیش کیئے جائینگے۔ پارلیما نی امور کے وزیر گریش با پٹ نے کل اخبا ری نمائندوں کو یہ اطلاع دی۔
****************************
جن لوک پال اور کسانوں کے مسائل کے حل کے لیے بزرگ سما جی کار کن انناہزارے ،یوم شہدا یعنی 23؍ مارچ سے نئی دہلی میں تحریک چلائیںگے۔ کل احمد نگر کے رالے گن سِدھی میں منعقد ایک اجلاس کے بعد اننا ہزارے نے صحا فیوں کویہ اطلاع دی۔
****************************
ریاست میں ماش، مونگ اور سو یا بین کی خرید کے لیے قائم کر دہ165؍ مراکز پر گریڈنگ مشین فوری نصب کرنے کے احکا مات وزیر تجا رت سُبھاش دیشمکھ نے دیئے ہیں۔ کل ممبئی میں منعقدہ ایک اجلاس کے بعد اُنھوں نے حکم جاری کیا کہ کسا نوںکی اشیاء خرید نے کے بعد اُنھیں چیک نہ دیتے ہوئے آر ٹی جی ایس کے ذریعے اُن کی رقو مات بینک کھاتوں میںراست جمع کی جائے ۔
****************************
ریاست کی10؍ بھو وِکاس بینکوں کی املاک فروخت کرنے کے عمل کا آ غاز کرنے کی ہدا یت ریاستی حکو مت نے دی ہے۔ کل ممبئی میں کا بینی کمیٹی کے اجلاس کے بعد یہ فیصلہ کیا گیا۔ اجلاس کے بعد حکم جا ری کیا گیا کہ املاک کی فروخت سے حاصل ہونے والی رقم سے ملا زمین کی واجب الادا تنخواہیں اور وظائف ادا کیئے جائیں۔
****************************
ریاستی ثانوی اور اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ نے2018 میں مجوزہ دسویں اور بارہویں کے امتحا نات کا ٹائم ٹیبل کل جا ری کر دیا ہے۔ بارہویں کے امتحا نات 21؍ فروری سے20؍ مارچ کے دوران اور میٹرک کے امتحا نات یکم مارچ سے 24؍ مارچ کے دوران ہوںگے۔ یہ ٹائم ٹیبل بورڈ کی ویب سائٹ پر موجود ہے۔
****************************
اورنگ آباد میونسپل کار پو ریشن میں لاڈ کمیٹی کی سفارشات کے تحت 188؍ ملازمین کی بھر تی کے عمل میں 8؍ افسران کو بد عنوا نی کا مرتکب پا یا گیا۔ اِن افسران کے خلاف کار وائی کیئے جانے کے احکا مات وزیر اعلیٰ دفتر سے میونسپل کمشنر کو ارسال کیئے گئے ۔ اورنگ آباد میونسپل کا ر پو ریشن میں2010 سے 2015 کے دوران یہ بھر تی ہوئی تھی۔ اِن بھر تیوں میں بد عنوا نی کی شکایت پر تُکا رام مونڈھے کو تحقیقات پر ما مور کیا گیا تھا۔ اِس سلسلے میں مو نڈھے کی تحقیقاتی رپورٹ پر یہ احکا مات جاری کیئے گئے۔
****************************
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2017 06.50AM
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि
****
** कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिन्ही दोषी आरोपींना
फाशीची शिक्षा
** या निकालामुळे समाजातल्या अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच
न्यायपालिकेवरचा विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
** इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
आणि
** औरंगाबाद महापालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आढळलेल्या
दोषी आठ अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
***
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तिन्ही दोषी
आरोपींना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. जीतेंद्र शिंदे,
संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अशी या तिघा आरोपींची नावं असून, तिघांचा गुन्हा गेल्या
अठरा तारखेला सिद्ध झाला होता. गेल्या वर्षी १३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर
मोर्चे आणि निदर्शनं झाली होती.
या
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, समाजातल्या अपप्रवृत्तींना
जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरचा विश्वास या निकालामुळे वाढला असल्याचं म्हटलं आहे.
या शिक्षेमुळे महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी
तपास यंत्रणा तसंच सरकारी वकिलांचं अभिनंदन केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब
दानवे यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी, या निर्णयामुळे
योग्य संदेश गेला असल्याचं मत व्यक्त केलं.
राज्य
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत भावना व्यक्त करताना, कोपर्डीचा
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना
जलद न्याय मिळवून दिला, असं म्हटलं आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहावी,
यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, हा निकाल न्यायव्यवस्थेवरचा
विश्वास दृढ करणारा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस
सरकारने कायद्यात सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि
आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, हा निकाल पीडितेच्या कुटुंबीयांना काही
अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
****
राज्य
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मोर्चा काढून अधिवेशनाचं कामकाज रोखून धरणार आहे. राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध
नोंदवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करणार
असल्याचं, पक्षसूत्रांकडून सांगण्यात आलं.
विधीमंडळाचं
हिवाळी अधिवेशन येत्या अकरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत नागपूर इथे होणार
आहे. या अधिवेशनात तेरा विधेयकं आणि अकरा अध्यादेश, तसंच विधान परिषदेत प्रलंबित असलेली
पाच विधेयकं सभागृहाच्या पटलावर ठेवली जाणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश
बापट यांनी दिली.
****
जनलोकपालसह
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे येत्या २३
मार्च रोजी शहीद दिनापासून नवी दिल्लीत आंदोलन सुरू करणार आहेत. यासंदर्भात अहमदनगर
जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं झालेल्या एका बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. जनलोकपाल,
शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच निवडणूक सुधारासाठी हे आंदोलन सुरू करत असल्याचं, अण्णा हजारे
यांनी सांगितलं.
****
राज्यात उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या
१६५ खरेदी केंद्रांवर चाळण आणि ग्रेडींग मशीनची व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून देण्याचे
निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात आयोजित
बैठकीत बोलत होते. शेतमाल खरेदीनंतर शेतकऱ्यांना त्या रकमेचा धनादेश न देता
आरटीजीएस पध्दतीनं तत्काळ त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याची सूचनाही देशमुख यांनी
केली.
****
राज्यात पाली भाषा अकादमी सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार
करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत. ते काल मुंबई
इथं मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाली
भाषेतल्या विपूल साहित्याची लोकांना माहिती व्हावी, तसंच या भाषेच्या विकासासाठी अशा
प्रकारची अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी समिती गठित करावी, अशा
सूचनाही बडोले यांनी दिल्या.
****
राज्यातल्या दहा भू - विकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची
प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता विक्रीतून जमा होणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचं
थकीत वेतन आणि निवृत्तीचे लाभ प्राधान्यानं अदा करावेत, असे निर्देशही या बैठकीत देण्यात
आले. भूविकास बँकांनी घेतलेल्या विविध कर्जांची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाने त्यांना
मदत म्हणून एक हजार ८९७ कोटी रुपये दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षात ही रक्कम वसूल
होवू शकलेली नाही.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
परीक्षांचं वेळापत्रक काल जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते
वीस मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत
होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
नवबौद्ध
तसंच अनुसूचित जातींच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या ‘स्वाधार‘
योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना
भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून ही योजना चालवली
जाते.
****
औरंगाबाद
महापालिकेत लाड समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या १८८ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत
आठ अधिकारी दोषी आढळले असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून
मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. २०१० ते २०१५ या काळात महापालिकेत ही भरती झाली
होती. या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आल्यानं, सनदी अधिकारी तुकाराम
मुंढे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंढे यांनी याबाबतचा
अहवाल विधीमंडळाकडे सादर केल्यानंतर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या
५७ आदिवासी शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्यानं या शाळा बंद करण्याचे आदेश प्राथमिक
शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांना दिले आहेत. या शाळांमधल्या १४१ शिक्षकांचं समायोजन जवळील शाळांमध्ये
करण्यात येणार आहे.
****
परभणी
जिल्ह्यात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं, जिल्ह्यात
पालम तसंच गंगाखेड इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून, प्रशासनाला निवेदन सादर करण्यात
आलं. राज्यात कोल्हापूरसह इतरही अनेक ठिकाणी पक्षाच्या वतीनं काल हल्लाबोल आंदोलन करण्यात
आलं.
****
बीड
जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मादळमोही इथं शेतात बसवलेल्या डीपीला विद्युत जोडणी करून
देण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचा सहाय्यक अभियंता संतोष
राठोड आणि त्याच्या साथीदाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने गुन्हा
नोंदवला आहे. या दोघांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार विभागास प्राप्त
झाली होती.
****
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या
रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले
आहेत. ते काल जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांची परिस्थिती
गंभीर असल्यानं, वीजबिल वसुलीबाबत सक्ती न करता, टप्पाटप्पाने वीजबील भरण्याची सवलत
द्यावी, असंही खैरे यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा निवडणूक विभागामार्फत
शालेय स्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत जिल्ह्यातल्या १४९ शाळांचे
विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विजेते ठरलेले ३०४ विद्यार्थी येत्या चार डिसेंबरला
जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. उपजिल्हा निवडणूक आधिकारी गोविंद रणवीरकर यांनी
ही माहिती दिली.
****
नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरुक राहून, कचऱ्याची विभागणी करण्यास
स्वत:पासून सुरुवात करावी, असं आवाहन परभणीचे महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी
केलं आहे. येत्या जानेवारी महिन्यात राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या
अनुषंगानं, ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वच्छता ॲपद्वारे आतापर्यंत सतराशे
तक्रारी प्राप्त झाल्या असून, या ॲपद्वारे आलेल्या तक्रारीचं बारा तासाच्या आत निवारण
करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
लातूर
शहरासह जिल्ह्यात वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
लातूर जिल्हा सडक सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील गायकवाड यांनी दिले आहेत.
काल लातूर इथं जिल्हा सडक सुरक्षा समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. पोलिस प्रशासन
आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बेशिस्त वाहतुकीस पायबंद घालून वाहतूक सुरळीत करावी
आणि गुन्ह्याचं स्वरूप बघून वाहन परवाना रद्द करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
Wednesday, 29 November 2017
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.11.2017 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date-29 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या तीन
आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातल्या अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच
न्यायपालिकेवरचा विश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. या शिक्षेमुळे महिलांवरच्या अत्याचारांना पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून
मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचं अभिनंदन केलं आहे.
या निर्णयामुळे पीडीतेला न्याय मिळाला
असून, या कठोर शिक्षेमुळे भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी योग्य संदेश गेला आहे,
अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त
केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर यांनी याबाबत भावना व्यक्त करताना, कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात
चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना जलद न्याय मिळवून दिला,
असं म्हटलं आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहावी, यासाठी राज्य सरकार
पूर्ण प्रयत्न करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, हा निकाल न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करणारा
आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात
सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा
सुनावण्यात आली, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर
येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्चा काढून अधिवेशनाचं कामकाज
रोखून धरणार आहे. राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करणार असल्याचं, पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, पक्षानं आज कोल्हापूर इथं हल्लाबोल मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन
उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
जनलोकपालसह शेतकऱ्यांच्या विविध
समस्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे येत्या २३ मार्च रोजी शहीद दिनापासून
नवी दिल्लीत आंदोलन सुरू करणार आहेत. यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं
झालेल्या एका बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच
निवडणूक सुधारासाठी हे आंदोलन सुरू करत असल्याचं, हजारे यांनी सांगितलं.
****
साडे तीन कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा
केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी काल सात जणांना अटक केली. यामध्ये एका बँकेच्या चार
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कर्जप्रक्रियेसंबंधीच्या सॉफ्टवेअरमध्ये
छेडछाड करून, पंचावन्न लोकांना साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत केली, असा
आरोप या बँकेनं दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. मार्च ते जुलै २०१६ या कालावधीत
हा घोटाळा झाला आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळानं २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक
आज जाहीर केलं. इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तर
इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत होणार आहे. हे वेळापत्रक
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
नवबौद्ध तसंच अनुसूचित जातींच्या
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज करण्याची
मुदत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भोजन, निवास
आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून ही योजना चालवली जाते.
****
जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर
उद्या परभणीमध्ये जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणीच्या जिल्हा रुग्णालयाच्या
वतीनं आयोजित या फेरीला उद्या सकाळी नऊ वाजता जिल्हा रुग्णालयापासून सुरुवात होईल.
या फेरीत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन परभणीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी
केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी
उसाचा पहिला हप्ता पुढच्या आठ दिवसांत न दिल्यास कारखाने बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. उसाला रास्त आणि किफायतशीर भाव
अधिक ४०० रुपये दर द्यावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे. ते काल एका सभेत बोलत
होते. उसाचा साखर उतारा कमी दाखवूनही कारखानदार उताऱ्याची चोरी करत आहेत. यापुढील काळात
साखर कारखानदारांची संपत्ती जाहीर करावी, अन्यथा आयकर विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा
काढण्याचा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2017 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2017
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं शाळकरी मुलीवर बलात्कार आणि
हत्या प्रकरणातल्या तिन्ही दोषी आरोपींना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा
सुनावली आहे. आज सकाळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जीतेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि
नितीन भैलुमे अशी या तिघा आरोपींची नावं असून, तिघांचा गुन्हा गेल्या अठरा तारखेला
सिद्ध झाला होता. गेल्या वर्षी १३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर मोर्चे आणि
निदर्शनं झाली होती.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
सहा डिसेंबरला आठ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. नागपूर
- मुंबई, मुंबई - अजनी, मुंबई - सेवाग्राम, तसंच सोलापूर - मुंबई मार्गावर या गाड्या
धावतील. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित रेल्वे स्थानक अधीक्षकांशी संपर्क साधावा,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
**** माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संसदीय समितीनं, पद्मावती या चित्रपटाचे
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना आपल्यासमोर
हजर होण्यास सांगितलं आहे. या चित्रपटात ऐतिहासिक बाबींशी छेडछाड केलेली असल्याचा आरोप
झाल्यामुळे उद्भवलेल्या वादाबाबत, आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना या समितीसमोर बोलावण्यात
आल्याची माहिती, या समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना
दिली. या समितीची बैठक उद्या होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दलचा वाद थांबल्याशिवाय
हा चित्रपट बिहारमध्ये दाखवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी म्हटलं
आहे. गुजरात, राजस्थानसह इतरही अनेक राज्यांनी या तुर्तास चित्रपटाचं प्रदर्शन न करण्याचा
निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
****
उच्च रक्तदाबावर नियंत्रण तसंच त्यापासून बचाव, यासाठी केंद्रसरकारनं
उच्च रक्तदाब व्यवस्थापन, हा उपक्रम सुरू केला आहे. रक्तदाब नियंत्रणात सुधारणा करणं,
आहारातला मिठाचा वापर कमी करणं आणि कृत्रिम मेदयुक्त घटकांचं आहारातून उच्चाटन करणं,
या त्रिसूत्रीच्या माध्यमातून या रोगाशी संबंधित मृत्यू आणि अपंगत्वाचं प्रमाण कमी
करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. पंजाब, केरळ, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातल्या पंचवीस
जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक स्वरुपात राबवण्यात येणार आहे.
****
राज्य विधीमंडळाचं शीतकालीन सत्र येत्या अकरा ते बावीस डिसेंबर
या कालावधीत नागपूर इथे होणार आहे.या अधिवेशनात तेरा विधेयकं आणि अकरा अध्यादेश, तसंच
विधान परिषदेत प्रलंबित असलेली पाच विधेयकं सभागृहाच्या पटलावर ठेवली जाणार असल्याची
माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. विरोधी पक्षांनी अधिवेशनाचा कालावधी
वाढवण्याची मागणी केली असून, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक
वीस डिसेंबरला घेण्यात येईल, असंही बापट यांनी सांगितलं.
****
राज्यसरकारनं उद्योगांसंदर्भात गेल्या तीन वर्षात घेतलेल्या विविध
निर्णय आणि धोरणांचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून
देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार,
राज्यात इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत पाच हजार त्रेपन्न कोटी रुपये तर माहिती तंत्रज्ञान
आणि सहाय्यभूत सेवा धोरणांतर्गत आठशे एकोणतीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या अंजग इथली आठशे त्रेसष्ठ
एकर जागा औद्योगिक विकासासाठी मिळणार आहे. शेती महामंडळाची ही जागा पश्चिम औद्योगिक
क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता, त्यानुसार उद्योग विभागानं
चौतीस कोटी अठरा लाख रुपये शेती महामंडळाला वर्ग केले आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास
राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाला
या औद्योगिक वसाहतीचा मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
****
कांद्याला योग्य भाव मिळावा, आणि कांदा खरेदीसाठी स्पर्धा निर्माण
व्हावी यासाठी खास बाब म्हणून राज्यात मागेल त्याला खरेदीदाराचा परवाना अर्थात डायरेक्ट
मार्केटिंग लायसन्स देण्यात यावं, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले
आहेत. ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. देशाच्या एकूण कांदानिर्यातीच्या
सत्तर ते ऐंशी टक्के निर्यात महाराष्ट्रातून, विशेषत: नाशिक परिसरातून होते, असं नमूद
करत, अडते आणि व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मागेल त्याला खरेदीदाराचे
परवाने देण्याचं धोरण नाशिकमध्ये लागू करण्याचे
निर्देश त्यांनी दिले. *****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2017 11.00AM
आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या
प्रकरणातल्या तिन्ही दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा निर्णय
जनतेनं शांतपणे स्वीकारावा,
त्यावर कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन विशेष
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. दरम्यान, हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात
मोठी गर्दी झाल्याचं, आमच्या अहमदनगरच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात एका सैनिकाकडून शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या
वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि लातूरचे जिल्हा मॅजिस्ट्रेट, यांना
नोटिस जारी करून चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्यास सांगितलं आहे. माध्यमांमधून आलेल्या याबाबतच्या वृत्ताची दखल घेत आयोगानं हे निर्देश दिले.
सैनिकाविरुद्ध पोलिसात तक्रार केल्यानं या मुलीला शाळेतून काढून टाकल्याचं,
तसंच स्थानिक पोलिसांनी ही तक्रार दाखल करण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांकडून
पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं.
*****
बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या कुठल्याही कंपन्यांचं कर्ज माफ केलं नसल्याचं अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. अशा बारा बड्या कंपन्यांकडून कर्जाची वसुली
सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारच्या, सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या पुनर्भांडवलीकरणाच्या निर्णयामुळे,
बुडित खात्यांच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या बँकांना आर्थिक बळ मिळेल,
असंही जेटली यांनी नमूद केलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ताज्या कसोटी मानांकनात भारताचा फलंदाज
चेतेश्वर पुजारा दुस-या तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर इथे झालेल्या कसोटीत शतक केल्यामुळे पुजाराला आणि
याच कसोटीत द्विशतक केल्यानं कोहलीला हे स्थान मिळालं आहे.
****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 29 November 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ نومبر ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
احتجا جی مظاہروں اور ریلیوں کے در میان سر کا ری املاک کی توڑ پھوڑ اور نقصان پر سپریم کورٹ نے تشویش کا اظہار کیا ہے۔ عدالت عالیہ نے اِس طرح کے واقعات سے نمٹنے اور اِن واقعات کے لیے ذمہ دار افراد کا تعین اور نقصان بھر پائی کے حصول کے لیے سبھی ریاستوں اور مرکز کے زیر نگرانی علاقوں میں عدالتوں کے قیام کی ہدا یت دی ہے۔ عدالت نے یہ بھی کہا کہ اِن واقعات کے ذمہ دار افراد کے خلاف قا نو نی کار وائی کو ممکن بنا نے کے لیے متعلقہ ہائی کورٹ کی نگرا نی میں ایک یا اُس سے زا ئد ضلع ججوں کی ایک کمیٹی بھی قائم کی جائے۔
****************************
آئندہ 11؍ دسمبر سے ریاستی اسمبلی کا سر مائی اجلاس ناگپور میں شروع ہو گا۔ یہ بات پارلیمانی امور کے وزیر گریش با پٹ نے کل ممبئی میں کہی۔ 22؍ دسمبر تک یہ اجلاس جاری رہے گا۔
****************************
ریاستی کا بینہ نے جنگلا تی زر اعت مہم کی شروعات کا فیصلہ کیا ہے۔ زرعی پیدا وار کے ساتھ ساتھ در ختوں کی تعداد میں بھی جنگلا تی زراعت کے ذریعہ اضا فہ ہو گا۔ ریاستی کا بینہ کے کل ہوئے اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔ کا بینہ نے کاشتکا روں کو 24؍ گھنٹے 3-Phaseبجلی کی فراہمی کے لیے مہا وِترن کو امداد فراہم کرنے کا فیصلہ بھی کیا ہے۔ اِس کے علا وہ بہترین ITI کالجس کو ایوارڈ دیئے جانے کا فیصلہ بھی کل کا بینی اجلاس میں کیا گیا۔
****************************
بھارت کا 48؍ واں بین الاقوا می فلم میلہ کل شام گوا کے پنا جی میں ختم ہو گیا۔ اختتا می تقریب بمبو لم کے شیا ما پر ساد مکھر جی اسٹیڈیم میں منعقد ہو ئی۔ اِس موقع پر معروف ادا کار امیتابھ بچّن کو2017 کی فلمی شخصیت کا ایوارڈ دیا گیا۔ مرکزی وزیر برائے اطلا عات و نشر یات اسمر تی ایرانی سمیت کئی نامور شخصیات اِس موقع پر موجود تھیں۔ فرانس کی فلم 120 Beats per Minute؍ کو بہترین فلم کا ایوارڈ دیا گیا جس کے ہدا یت کار رابن کامپو لو ہے۔ بہترین ہدا یت کار کا ایوارڈ چین کے ووین قو لوکو اُن کی فلم Angels Wear Whiteکے لیے دیا گیا۔
ملیا لم فلم ٹیک آف جیو ری کی طرف سے خصو صی ایوارڈ دیا گیا جبکہ فلم کی ادا کارہ پا ر وتی کو بہترین ادا کارہ کا اعزاز دیا گیا۔
120 Beats per Minute؍ میں بہترین ادا کا ری کے لیے نا ہول پیرز بسکایارٹ کو بہترین ادا کار کا ایوارڈ دیا گیا۔ منوج کدم کے مراٹھی فلم Kshitij کو ICFI Unisco Gandhi ایوارڈ دیا گیا۔
****************************
علیحدہ ریاست مراٹھواڑہ کے قیام کی کانگریس مخا لفت کرے گی۔ یہ بات کانگریس کی ریاستی اکائی کے صدر رکن پارلیمنٹ اشوک چو ہان نے کہی ہے۔ آئندہ12؍ دسمبر کو ناگپور میں سر مائی اجلاس کے موقع پر کُل جما عتی مورچے کی تیاری کے سلسلے میں اورنگ آ باد میں منعقدہ ڈویژنل اجلاس کے بعد جناب چو ہان نے ایک پریس کانفرنس سے مخا طبت میں یہ بات کہی ۔ اُنہوں نے کہا کہ متحدہ مہاراشٹر ہی کانگریس کا موقف ہے۔ اُنہوں نے حکو مت پر نکتہ چینی کر تے ہوئے کہا کہ متحدہ محاذ حکو مت کے دور میں جن لو گوں کو سر کا ری اسکیمات سے فائدے ملے تھے اُن کے نام اور تصا ویر کا حکو مت غلط استعمال کر رہی ہے۔
****************************
ریاستی حکو مت کی جانب سے دیا جانے والا اِس سال کا تما شہ سمرادنی وِٹھا بائی نا رائن گائونکر لائف ٹائم اچیو منٹ ایوارڈ معروف کلا کار مد ھوکر نیراڑے کو دیا جا ئے گا۔ وزیر ثقا فت وِنود تائو ڑے نے کل اِس ایوارڈ کا اعلان کیا۔ تما شو ں کے میدان میں گرانقدر خد مات انجام دینے والے افراد کو ہر سال حکو مت کی جانب سے یہ ایوارڈ دیا جا تا ہے۔ پانچ لاکھ روپئے نقد ، سپاس نا مہ اور مو مینٹو پر یہ ایوارڈ مشتمل ہے۔
****************************
لاتور ضلع میں کل علی الصبح ایک سڑک حادثے میں سات افراد ہلاک ہو گئے جبکہ14؍ افراد زخمی ہوئے ہیں۔ لاتور -ناندیڑ شاہراہ پر کولپا نا می قصبے سے قریب ناندیڑ کی جانب جا رہی تیز رفتار جیپ کا ٹائر پھٹ جانے کے با عث یہ جیپ سڑک کے کنا رے کھڑے ٹرک سے ٹکراگئی اِس کے بعد یہ جیپ نا ندیڑ سے آ رہی ایک دوسری جیپ سے بھی ٹکرا ئی۔
پولس ذرائعوں سے موصولہ اطلاع میں کہا گیا ہے کہ جیپ ڈرائیور تیز رفتاری سے گاڑی چلا تے ہوئے سڑک پر دیگر گاڑیوں سے آ گے نکلنے کی کوشش کر رہا تھا جس کے سبب یہ حادثہ پیش آ یا۔
****************************
مکمل قرض معا فی اور سات بارہ کو رہ کیئے جانے کے مطالبات کی یکسوئی کے لیے کل ہنگو لی ضلع کے بسمت تحصیل دفتر کے رو برو نیشنلِسٹ کانگریس پارٹی کی جانب سے ہلّہ بول مورچہ نکا لا گیا۔ سابقہ وزیر جئے پر کاش دانڈیگائونکر کی قیادت میں نکا لے گئے اِس مورچے کے اختتام پر تحصیلدار کو ایک مطالباتی محضر بھی دیا گیا۔
****************************
جسٹس برج گو پال لو یا کی مشکوک موت کی عدالتی تحقیقات کا مطالبہ بائیں بازوں کی جماعتیں کر رہی ہیں۔ کل اورنگ آ باد میں سبھاش لومٹے کی صدا رت میں ہوئے ایک اجلاس میں صدر جمہوریہ کو ڈویژنل کمشنر کی معرفت اور چیف جسٹس آف اِنڈیا کو بامبے ہائی کورٹ کی اورنگ آ باد بینچ کے ذریعے مطالباتی محضر روانہ کرنے کا فیصلہ کیا گیا ہے۔
****************************
Date: 29 November 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ نومبر ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
احتجا جی مظاہروں اور ریلیوں کے در میان سر کا ری املاک کی توڑ پھوڑ اور نقصان پر سپریم کورٹ نے تشویش کا اظہار کیا ہے۔ عدالت عالیہ نے اِس طرح کے واقعات سے نمٹنے اور اِن واقعات کے لیے ذمہ دار افراد کا تعین اور نقصان بھر پائی کے حصول کے لیے سبھی ریاستوں اور مرکز کے زیر نگرانی علاقوں میں عدالتوں کے قیام کی ہدا یت دی ہے۔ عدالت نے یہ بھی کہا کہ اِن واقعات کے ذمہ دار افراد کے خلاف قا نو نی کار وائی کو ممکن بنا نے کے لیے متعلقہ ہائی کورٹ کی نگرا نی میں ایک یا اُس سے زا ئد ضلع ججوں کی ایک کمیٹی بھی قائم کی جائے۔
****************************
آئندہ 11؍ دسمبر سے ریاستی اسمبلی کا سر مائی اجلاس ناگپور میں شروع ہو گا۔ یہ بات پارلیمانی امور کے وزیر گریش با پٹ نے کل ممبئی میں کہی۔ 22؍ دسمبر تک یہ اجلاس جاری رہے گا۔
****************************
ریاستی کا بینہ نے جنگلا تی زر اعت مہم کی شروعات کا فیصلہ کیا ہے۔ زرعی پیدا وار کے ساتھ ساتھ در ختوں کی تعداد میں بھی جنگلا تی زراعت کے ذریعہ اضا فہ ہو گا۔ ریاستی کا بینہ کے کل ہوئے اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔ کا بینہ نے کاشتکا روں کو 24؍ گھنٹے 3-Phaseبجلی کی فراہمی کے لیے مہا وِترن کو امداد فراہم کرنے کا فیصلہ بھی کیا ہے۔ اِس کے علا وہ بہترین ITI کالجس کو ایوارڈ دیئے جانے کا فیصلہ بھی کل کا بینی اجلاس میں کیا گیا۔
****************************
بھارت کا 48؍ واں بین الاقوا می فلم میلہ کل شام گوا کے پنا جی میں ختم ہو گیا۔ اختتا می تقریب بمبو لم کے شیا ما پر ساد مکھر جی اسٹیڈیم میں منعقد ہو ئی۔ اِس موقع پر معروف ادا کار امیتابھ بچّن کو2017 کی فلمی شخصیت کا ایوارڈ دیا گیا۔ مرکزی وزیر برائے اطلا عات و نشر یات اسمر تی ایرانی سمیت کئی نامور شخصیات اِس موقع پر موجود تھیں۔ فرانس کی فلم 120 Beats per Minute؍ کو بہترین فلم کا ایوارڈ دیا گیا جس کے ہدا یت کار رابن کامپو لو ہے۔ بہترین ہدا یت کار کا ایوارڈ چین کے ووین قو لوکو اُن کی فلم Angels Wear Whiteکے لیے دیا گیا۔
ملیا لم فلم ٹیک آف جیو ری کی طرف سے خصو صی ایوارڈ دیا گیا جبکہ فلم کی ادا کارہ پا ر وتی کو بہترین ادا کارہ کا اعزاز دیا گیا۔
120 Beats per Minute؍ میں بہترین ادا کا ری کے لیے نا ہول پیرز بسکایارٹ کو بہترین ادا کار کا ایوارڈ دیا گیا۔ منوج کدم کے مراٹھی فلم Kshitij کو ICFI Unisco Gandhi ایوارڈ دیا گیا۔
****************************
علیحدہ ریاست مراٹھواڑہ کے قیام کی کانگریس مخا لفت کرے گی۔ یہ بات کانگریس کی ریاستی اکائی کے صدر رکن پارلیمنٹ اشوک چو ہان نے کہی ہے۔ آئندہ12؍ دسمبر کو ناگپور میں سر مائی اجلاس کے موقع پر کُل جما عتی مورچے کی تیاری کے سلسلے میں اورنگ آ باد میں منعقدہ ڈویژنل اجلاس کے بعد جناب چو ہان نے ایک پریس کانفرنس سے مخا طبت میں یہ بات کہی ۔ اُنہوں نے کہا کہ متحدہ مہاراشٹر ہی کانگریس کا موقف ہے۔ اُنہوں نے حکو مت پر نکتہ چینی کر تے ہوئے کہا کہ متحدہ محاذ حکو مت کے دور میں جن لو گوں کو سر کا ری اسکیمات سے فائدے ملے تھے اُن کے نام اور تصا ویر کا حکو مت غلط استعمال کر رہی ہے۔
****************************
ریاستی حکو مت کی جانب سے دیا جانے والا اِس سال کا تما شہ سمرادنی وِٹھا بائی نا رائن گائونکر لائف ٹائم اچیو منٹ ایوارڈ معروف کلا کار مد ھوکر نیراڑے کو دیا جا ئے گا۔ وزیر ثقا فت وِنود تائو ڑے نے کل اِس ایوارڈ کا اعلان کیا۔ تما شو ں کے میدان میں گرانقدر خد مات انجام دینے والے افراد کو ہر سال حکو مت کی جانب سے یہ ایوارڈ دیا جا تا ہے۔ پانچ لاکھ روپئے نقد ، سپاس نا مہ اور مو مینٹو پر یہ ایوارڈ مشتمل ہے۔
****************************
لاتور ضلع میں کل علی الصبح ایک سڑک حادثے میں سات افراد ہلاک ہو گئے جبکہ14؍ افراد زخمی ہوئے ہیں۔ لاتور -ناندیڑ شاہراہ پر کولپا نا می قصبے سے قریب ناندیڑ کی جانب جا رہی تیز رفتار جیپ کا ٹائر پھٹ جانے کے با عث یہ جیپ سڑک کے کنا رے کھڑے ٹرک سے ٹکراگئی اِس کے بعد یہ جیپ نا ندیڑ سے آ رہی ایک دوسری جیپ سے بھی ٹکرا ئی۔
پولس ذرائعوں سے موصولہ اطلاع میں کہا گیا ہے کہ جیپ ڈرائیور تیز رفتاری سے گاڑی چلا تے ہوئے سڑک پر دیگر گاڑیوں سے آ گے نکلنے کی کوشش کر رہا تھا جس کے سبب یہ حادثہ پیش آ یا۔
****************************
مکمل قرض معا فی اور سات بارہ کو رہ کیئے جانے کے مطالبات کی یکسوئی کے لیے کل ہنگو لی ضلع کے بسمت تحصیل دفتر کے رو برو نیشنلِسٹ کانگریس پارٹی کی جانب سے ہلّہ بول مورچہ نکا لا گیا۔ سابقہ وزیر جئے پر کاش دانڈیگائونکر کی قیادت میں نکا لے گئے اِس مورچے کے اختتام پر تحصیلدار کو ایک مطالباتی محضر بھی دیا گیا۔
****************************
جسٹس برج گو پال لو یا کی مشکوک موت کی عدالتی تحقیقات کا مطالبہ بائیں بازوں کی جماعتیں کر رہی ہیں۔ کل اورنگ آ باد میں سبھاش لومٹے کی صدا رت میں ہوئے ایک اجلاس میں صدر جمہوریہ کو ڈویژنل کمشنر کی معرفت اور چیف جسٹس آف اِنڈیا کو بامبے ہائی کورٹ کی اورنگ آ باد بینچ کے ذریعے مطالباتی محضر روانہ کرنے کا فیصلہ کیا گیا ہے۔
****************************
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2017 06.50AM
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
****
** आंदोलनांदरम्यानच्या घटनांची जबाबदारी, आणि हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्यांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
** येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन
** राज्यात वनशेती उपअभियान राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
** ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप
** स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण
आणि
** नांदेड- लातूर रस्त्यावरच्या अपघातात सात ठार, चौदा जखमी
****
****
आंदोलनांदरम्यान होणारा हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा विध्वंसक घटनांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तसंच हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. याचबरोबर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर खटला भरण्यासाठी तसंच त्यांच्यावर नागरी दायित्व निश्चित करण्याचे काम संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार एक किंवा त्याहून अधिक जिल्हा न्यायाधिशांकडे सोपवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. आंदोलना दरम्यान नुकसान झाल्यास संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरूद्ध अथवा सार्वजनिक किंवा खाजगी नुकसानीस जबाबदार असलेल्यांविरूद्ध गुन्हेगारी कारवाई करण्यासही न्यायालयानं अनुकुलता दर्शवली आहे.
**
येत्या ११ डिसेंबर पासून नागपूर इथं राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याची माहिती विधीमंडळ कार्य मंत्री गिरीष बापट यांनी काल मुंबईत दिली. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल, या अधिवेशनात १३ नवीन विधेयकं आणि ११ अध्यादेश सादर केले जातील, असं ते म्हणाले.
**
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्ष लागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध वस्तू आणि सेवांप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदीही केंद्र शासनानं विकसित केलेल्या गव्हर्नमेंट- इ - मार्केटप्लेस - जीईएम या वेबपोर्टलच्या माध्यमातून करायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार द्यायचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला.
****
गोवा पणजीत काल ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. या महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेन्टी बीटस पर मिनिट’ या चित्रपटानं सुवर्णमयूर पटकावला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, फ्रेंच अभिनेता नेहूल पर्झ बिस्कार्त याला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘टेक ऑफ’ या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला तर ‘डार्क स्खूल’ या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. चिनचे विवियन क्यू यांना अँगल्स वियर व्हाईट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परीषद -आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय कॅनडाच्या अटोम इग्वोयन यांना इफ्फी २०१७ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह चित्रपट सृष्टीतले नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते.
***
स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी औरंगाबाद इथं विभागीय पातळीवर काल बैठक झाली, या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आघाडी सरकारच्या काळात ज्या लोकांना योजनांचा लाभ मिळाला त्यांच्या जाहीराती आणि फोटो दाखवून हे सरकार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली.
****
राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ कलावंतर मधुकर नेराळे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. तमाशा क्षेत्रात दीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
लातूर जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या रस्ते अपघातात सात जण जागीच ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. लातूर- नांदेड महामार्गावर टायर फुटल्यानं कोळपा गावानजीक रस्त्यालगत उभ्या असलेल्या टृकवर पंढरपूरहून नांदेडकडे जाणारी एक जीप भरधाव वेगानं येऊन आदळली, त्याचवेळी ही जीप नांदेडकडून येणाऱ्या अन्य एका जीपला धडकून त्यांची समोरासमोर टक्कर झाली. एका टेंपोला ओलांडून पुढे जायच्या प्रयत्नात मोटारीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा विचित्र अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
**
सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले.
****
न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी डाव्या लोकशाही आघाडीनं केली आहे. काल औरंगाबाद इथं सुभाष लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रपतींना विभागीय आयुक्तांमार्फत तर सरन्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामार्फत निवेदन पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
***
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मसला या गावात येणारी बस रस्त्यांवरच्या खड्यांमुळं बंद करण्यात आल्यामुळे काल या गावातल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या दालनात शाळा भरवली. या बसनं गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी गंगाखेड इथं ये जा करतात. तहसीलदार आसाराम छडीदार यांनी आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे तसंच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येत्या ७ डिसेंबरपासून कृषी पंपांसाठी रात्रपाळीत केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात बदल केला जाणार असून आता दिवसाही काही तास कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऐन हिवाळ्यात रात्रपाळीतल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती.
*****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
*****
Date – 29 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
****
** आंदोलनांदरम्यानच्या घटनांची जबाबदारी, आणि हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्यांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
** येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन
** राज्यात वनशेती उपअभियान राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
** ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप
** स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण
आणि
** नांदेड- लातूर रस्त्यावरच्या अपघातात सात ठार, चौदा जखमी
****
****
आंदोलनांदरम्यान होणारा हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा विध्वंसक घटनांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तसंच हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. याचबरोबर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर खटला भरण्यासाठी तसंच त्यांच्यावर नागरी दायित्व निश्चित करण्याचे काम संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार एक किंवा त्याहून अधिक जिल्हा न्यायाधिशांकडे सोपवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. आंदोलना दरम्यान नुकसान झाल्यास संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरूद्ध अथवा सार्वजनिक किंवा खाजगी नुकसानीस जबाबदार असलेल्यांविरूद्ध गुन्हेगारी कारवाई करण्यासही न्यायालयानं अनुकुलता दर्शवली आहे.
**
येत्या ११ डिसेंबर पासून नागपूर इथं राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याची माहिती विधीमंडळ कार्य मंत्री गिरीष बापट यांनी काल मुंबईत दिली. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल, या अधिवेशनात १३ नवीन विधेयकं आणि ११ अध्यादेश सादर केले जातील, असं ते म्हणाले.
**
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्ष लागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध वस्तू आणि सेवांप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदीही केंद्र शासनानं विकसित केलेल्या गव्हर्नमेंट- इ - मार्केटप्लेस - जीईएम या वेबपोर्टलच्या माध्यमातून करायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार द्यायचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला.
****
गोवा पणजीत काल ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. या महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेन्टी बीटस पर मिनिट’ या चित्रपटानं सुवर्णमयूर पटकावला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, फ्रेंच अभिनेता नेहूल पर्झ बिस्कार्त याला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘टेक ऑफ’ या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला तर ‘डार्क स्खूल’ या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. चिनचे विवियन क्यू यांना अँगल्स वियर व्हाईट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परीषद -आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय कॅनडाच्या अटोम इग्वोयन यांना इफ्फी २०१७ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह चित्रपट सृष्टीतले नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते.
***
स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी औरंगाबाद इथं विभागीय पातळीवर काल बैठक झाली, या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आघाडी सरकारच्या काळात ज्या लोकांना योजनांचा लाभ मिळाला त्यांच्या जाहीराती आणि फोटो दाखवून हे सरकार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली.
****
राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ कलावंतर मधुकर नेराळे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. तमाशा क्षेत्रात दीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
लातूर जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या रस्ते अपघातात सात जण जागीच ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. लातूर- नांदेड महामार्गावर टायर फुटल्यानं कोळपा गावानजीक रस्त्यालगत उभ्या असलेल्या टृकवर पंढरपूरहून नांदेडकडे जाणारी एक जीप भरधाव वेगानं येऊन आदळली, त्याचवेळी ही जीप नांदेडकडून येणाऱ्या अन्य एका जीपला धडकून त्यांची समोरासमोर टक्कर झाली. एका टेंपोला ओलांडून पुढे जायच्या प्रयत्नात मोटारीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा विचित्र अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
**
सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले.
****
न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी डाव्या लोकशाही आघाडीनं केली आहे. काल औरंगाबाद इथं सुभाष लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रपतींना विभागीय आयुक्तांमार्फत तर सरन्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामार्फत निवेदन पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
***
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मसला या गावात येणारी बस रस्त्यांवरच्या खड्यांमुळं बंद करण्यात आल्यामुळे काल या गावातल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या दालनात शाळा भरवली. या बसनं गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी गंगाखेड इथं ये जा करतात. तहसीलदार आसाराम छडीदार यांनी आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे तसंच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येत्या ७ डिसेंबरपासून कृषी पंपांसाठी रात्रपाळीत केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात बदल केला जाणार असून आता दिवसाही काही तास कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऐन हिवाळ्यात रात्रपाळीतल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती.
*****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...