आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 28 February 2017
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान, लातूर
जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिवनी कोतल इथं सामूहिक कॉपी सुरू असल्याचं निदर्शनास आलं.
शिक्षण विभागानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत, परीक्षा केंद्र संचालक बदलण्याचे
आदेश दिले असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी दिली.
दरम्यान, राज्यभरात नऊ विभागीय
मंडळांमार्फत दोन हजार ७१० केंद्रांवर बारावी
परीक्षेत पहिल्या विषयाची परीक्षा आज घेण्यात आली. या परिक्षेला यंदा
१५ लाख पाच हजार ३६५ विद्यार्थी बसले असून, यापैकी आठ लाख ४८ हजार ९२९ मुलं तर सहा लाख ५६ हजार ४२६ मुली आहेत.
परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी २५० भरारी पथकं नेमण्यात
आली आहेत. धुळे जिल्ह्यात ४३ केंद्रातून
२५ हजार ५७३ परीक्षार्थी तर सोलापूर जिल्ह्यात ८२ केंद्रांतून ५० हजार ८६४ परीक्षार्थी
परीक्षा देत आहेत.
****
मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन चालणार
नसल्याचं निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा
गौरव दिनानिमित्त आज सोलापूर इथं आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. मराठी भाषा
गौरव दिन हा केवळ उत्सव समारंभापुरता मर्यादित न राहता तो व्यापक व्हावा असं मत त्यांनी
व्यक्त केलं. उच्च दर्जाच्या मराठी सांस्कृतिक परंपरांकडे दुर्लक्ष होणं हे सामाजिकदृष्ट्या
मराठी समाजमनाला परवडणारं नसल्याचं त्या म्हणाल्या.
****
राष्ट्रीय विज्ञान
दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी पदार्थांच्या
विकीरणासंदर्भातलं महत्वाचं संशोधन १९२८ मध्ये आजच्या दिवशी जगासमोर मांडलं होतं. हे
संशोधन 'रामन
परिणाम' म्हणून ओळखलं जातं. रामन यांच्या विज्ञान
क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन
म्हणून साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय वैज्ञानिकांचा राष्ट्र निर्माणात महत्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
नवीन तंत्रज्ञानामुळे
सायबर सुरक्षेला उद्भवणाऱ्या धोक्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक विविध
क्षेत्रातल्या तज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. बँकेनं मुंबई इथं आज ही घोषणा केली.
बँकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्रा, या ११ सदस्यीय समितीच्या अध्यक्ष असतील.
सायबर सुरक्षेच्या सक्षमीकरणाबरोबरच सुरक्षा मानकांचा स्वीकार करण्यासह इतर महत्वपूर्ण
बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे.
दरम्यान, वाढत्या
महागाई संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे देशातल्या १८ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार
असून, पहिल्या टप्प्यात पुढच्या महिन्यात मुंबईसह सहा शहरांमध्ये हे ग्राहक विश्वास
सर्वेक्षण होणार आहे.
****
वस्तु आणि
सेवा कर - जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत
दास यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं आर्थिक सहकार आणि विकास संघटना - ओईसीडीचं
भारतासंबंधी सर्वेक्षण जारी करताना बोलत होते. जीएसटीच्या तरतुदींना अंतिम मंजुरी देण्यासाठी
जीएसटी परिषदेची पुढची बैठक चार आणि पाच मार्चला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विमुद्रीकरणाचे लाभ आणि परिणाम पुढच्या तिमाहीत समजतील असं ते यावेळी म्हणाले.
****
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो
रॉय यांना जामीन मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला सात एप्रिलपर्यंत
पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये भरण्यास सांगितलं आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी न्यायालयानं
सहारा समूहाला त्यांच्या १३ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी
असलेला रायगड किल्ला तसंच इतर वारसा स्थळांचा लवकरच विकास होणार असल्याचं, केंद्रीय
सांस्कृतिक कार्य तसंच पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांशी
संबंधित सर्व ठिकाणं राष्ट्रीय गौरवाची तसंच पर्यटनाची केंद्रं व्हावीत, असा सरकारचा
प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान
सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान, पुणे इथं पहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात
आलेल्या खेळपट्टीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त
करत खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचं, आपल्या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालाची प्रत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवण्यात आली असून, १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात
आलं आहे. या सामन्यात तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा ३३३ धावांनी पराभव केला
होता.
****
अस्वच्छतेमुळे
रोगांचं प्रमाण अधिक असल्याचं, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे
यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार संचालनालयातर्फे
बीड जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या खालापुरी इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’
या विषयावर आयोजित जनजागृती अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
बँक कर्मचारी संघटनांनी आज एक दिवसीय
कामबंद आंदोलन पुकारलं आहे. बुडीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणासाठी उच्च अधिकाऱ्यांना
जबाबदार धरणं, विमुद्रीकरण काळात जादा तास केलेल्या कामाचा मोबदला न मिळणं, यासह विविध
कारणांसाठी पुकारलेल्या या संपामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार विस्कळीत होण्याची
शक्यता आहे. राष्ट्रीय बँक अधिकारी संघटना तसंच राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटना मात्र
या संपात सहभागी झालेल्या नाहीत.
****
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी उद्यापासून
सुरु होत आहे. पंजाब नॅशनल बँल, जम्मू ॲण्ड काश्मीर बँक आणि येस बँकेच्या देशभरातल्या
४३३ शाखांमधून ही नोंदणी केली जाणार आहे. ही यात्रा २९ जूनपासून सुरू होणार असून, सात
ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणीही सुरु करण्यात आल्याचं श्री अमरनाथ
देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी के त्रिपाठी यांनी सांगितलं. यात्रेत
सहभागी होण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
भारतात जलद गतीनं विकास साधण्याची क्षमता
असून, ग्रामीण क्षेत्रात गरीबी कमी करण्यासाठी तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी
विविध योजना राबवल्या जात असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
लंडन इथं प्रमुख सरकारी अधिकारी आणि उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भारत
रोखरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचं सांगतानाच जेटली यांनी, वस्तू आणि सेवा
कर - जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होईल, अशी आशा व्यक्त केली.
****
वक्फ मालमत्तांचा विकास आणि या मालमत्तांचा समाजातल्या हितासाठी
उपयोग करण्यामध्ये, काहींचे हितसंबंध गुंतल्यामुळे अडथळे येत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक
व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं केंद्रीय
वक्फ परिषदेच्या ७५ व्या बैठकीत बोलत होते. काही राज्य वक्फ मंडळांमध्ये गंभीर स्वरुपाची
अनियमितताही निदर्शनास आली असून, यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई
केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. देशभरातल्या वक्फ
मंडळांचं कामकाज डिजिटाईज्ड
करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं नक्वी म्हणाले.
****
नवी दिल्ली इथं सुरु
असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जीतू रायनं १० मीटर पीस्टल
प्रकारात आज कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या
गटात अंकूर मित्तल यानं काल डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. या स्पर्धेत
भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे.
****
औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता
विकास केंद्र आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं एक वर्ष
कालावधीच्या दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता आणि व्यवसाय व्यवस्थापन पदविका
या अभ्यासक्रमाची संपूर्ण राज्यात सुरुवात करण्यात येत आहे. राज्यभरातल्या उद्योजकता
विकास केंद्रात या अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरु असल्याचं याबाबत जारी पत्रकात म्हटलं
आहे.
****
बैलगाड्यांच्या शर्यतीला
परवानगी देण्यासाठी विधेयक आणण्यासाठी सरकार कायदेशीर बाबी तपासून बघत आहे, असं विधान
कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सांगितलं. ते मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात
कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.
****
२०१६-१७ या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी
निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी ७०० कोटी ५७ लाख इतक्या अर्थसंकल्पीय तरतूदीस
मंजूरी मिळाली असून यापैकी १४० कोटी ११ लाख इतकी रक्कम वितरीत करण्यास मान्यता मिळाली
आहे. काल जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात ही माहिती देण्यात आली.
****
राज्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या
कार्याचा गौरव करण्यासाठी आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षासाठीचे
राज्य युवा पुरस्कार काल घोषित करण्यात आले. क्रीडा विभागाच्या आठ विभागातून आठ युवक,
युवती आणि संस्थांची निवड करण्यात आली आहे. यात २०१४-१५ साठीचे पुरस्कार औरंगाबादचा
पठाण अझहर खान, परभणीची काजल भुसारे, उस्मानाबादचा उमाकांत मिटकर, सुरेखा गिरी यांना
आणि बीडच्या शाहू महाराज प्रतिष्ठान संस्थेला जाहीर झाला असून, २०१५-१६ साठीचा पुरस्कार
औरंगाबादच्या स्वप्नील चांदणे आणि अश्विनी महिरे, लातूरचे प्रवीण पाटील, उस्मानाबादची कृष्णाई उळेकर हिला जाहीर झाला आहे. व्यक्तींना
प्रत्येकी रोख ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर संस्थांना प्रत्येकी १ लाख रूपये,
आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
//*****//
आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात आज आणि उद्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां तसंच कार्यक्रमाचं आयोजन
करण्यात आलं आहे. यानिमित्त आज दुपारी ३ वाजता “सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर स्पेशली
ॲबल्ड पर्सन्स” या विषयावर प्रख्यात लेखिका माधुरी शानबाग यांचे व्याख्यान होणार आहे.
****
भाषेचं
संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असून त्यासाठी राज्य सरकार विविध उपायययोजना
राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर-वाई इथल्या भिलार
गावात ‘पुस्तकाचं गाव’ या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा
विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई इथं
आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. भिलार इथं पुस्तकाचं गाव तयार करताना सर्व घरे
निवडण्यात आली असून तिथे सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करुन
दिली जाणार असल्याचं, तावडे यांनी यावेळी सांगितलं.
****
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया
असून, आपल्या लोकशाहीचं भवितव्य त्यावर अवलंबून असल्याचं प्रतिपादन माहिती आयुक्त दिलीप
धारुरकर यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद
विभाग आणि भारतीय समाजशास्त्रीय संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात
ते बोलत होते. राज्यघटनेतील तरतुदींच्या चौकटीत राहूनच सामाजिक नव माध्यमांच्या मार्फत
अभिव्यक्त होण्याचं आवाहन धारुरकर यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या १४ हजार पुलांची करणार असल्याची माहिती सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते.
रायगड जिल्ह्यात महाड इथल्या सावित्री नदीवरचा पुल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर
राज्य सरकारनं राज्यभरातील पुलांचं सर्वेक्षण केलं होतं, त्यात १४ हजार पुलांची दुरवस्था
झाल्याचं आढळलं आहे. त्यातल्या जीर्ण पुलांची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले.
//*******//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date- 28 February 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸؍فروری ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
ریاستی اسمبلی کا بجٹ اجلاس 6؍ مارچ سے شروع ہو گا ۔ 18؍ مارچ کو ریاستی وزیر مالیات سُدّھیر مُنگنٹیوار بجٹ پیش کریں گے۔
اسمبلی امور کی مُشا ورتی کمیٹی کے کل اسمبلی میں ہوئے اجلاس کے بعد یہ فیصلہ کیا گیا۔ 6؍ مارچ کو ریاستی قا نون ساز اسمبلی کے دو نوں ایوانوں کے مشتر کہ اجلاس سے گور نر سی۔ وِدّیا ساگر رائو خطاب کریں گے۔ 7؍ اپریل تک چلنے والے بجٹ اجلاس کے دوران مجمو عی طور پر 23؍ دن کام کاج ہو گا۔ اِس دوران 6؍ آرڈیننس اور2؍ زیر التواء بلوں پر تبا دلہ خیال کا بھی امکان ہے۔ اِن میں مہا راشٹر زمین محصول اصلا حی آرڈیننس،
ممبئی اور مہا راشٹر میونسپل کار پو ریشنوں میں اصلاح سے متعلق آرڈیننس اور ریاستی پسماندہ طبقات کمیشن اصلاح جیسے آرڈیننس شامل ہیں۔
****************************
ممبئی ہائی کورٹ نے کل ریاستی حکو مت سے پو چھا ہے کہ کیامراٹھا ریزر ویشن کا معا ملہ نیا تشکیل کر دہ مہا راشٹر ریاستی پسماندہ طبقات کمیشن کو سونپا جا سکتا ہے۔ مراٹھا ریزر ویشن سے متعلق داخل کر دہ مختلف در خواستوں پر کل چیف جسٹس منجو لاچیلّور کی صدا رت والی بینچ میں سما عت ہوئی۔ اِس موقع پر عدالت نے یہ سوال پو چھا۔ عدالت نے ریاستی حکو مت اور در خواست گذا روں سے اِس بارے میں اپنا موقف واضح کر نے کو کہا ہے۔ معا ملے کی اگلی سماعت 29؍ مارچ کو ہو گی۔
****************************
عوامی شعبے کی بینکوں کے ملازمین اپنے مختلف مطالبات کی تکمیل کے لیے آج ایک دن کی علا متی ہڑتال پر ہیں۔
آج کی ہڑ تال میں یو نائیٹیڈ فورم آف بینک یو نین کے تحت آنے والی9؍ تنظیموں سے جُڑے قریب 10؍ لاکھ بینک ملازمین شامل ہو رہے ہیں۔ تا ہم نِجی شعبے کی بینکوں کا کام کاج آج حسبِ معمول جاری رہیگا۔
****************************
ریاست میں آج سے بارہویں جماعت کے امتحا نات کی شروعات ہو رہی ہے۔ طلباء کے لیے بورڈ کی جانب سے ڈِویژنل سطح پر خصو صی ہیلپ لائن شروع کی گئی ہے۔ امتحا نات کے دوران صبح 8؍ بجے سے رات 8؍بجے تک اِس ہیلپ لائن سے استفادہ کیا جا سکتا ہے۔ دسویں جماعت کے امتحا نات کی شروعات 7؍ مارچ سے ہو گی۔
****************************
دوائوں کی قیمتیں مقرر کر نے والی قومی اتھا ریٹی نے اسپتالوں اور ڈاکٹروں سے کہا ہے کہ وہ دِل کی شیر یانوں کو کھولنے والے آپریشن انجیو پلاسٹی کے لیے استعمال ہو نے والے Stentکی قلت کے بارے میں اطلاع دیں تا کہ اِن کی قیمت کم کیئے جا نے کے مد نظر اِن کی دستیابی یقینی بنا ئی جا سکے۔ مذکو رہ اتھا ریٹی نے اِس بات کو یقینی بنا نے کے لیے کہ Stent اُس کی مقررہ قیمتوں پر دستیاب ہوں ،کئی اقدامات کیئے ہیں۔
کیوں کہ ایسی خبریں ملی ہیں کے مارکیٹ میں اِنکی قلت ہو گئی ہے۔پچھلے ہفتے دوائوں کی قیمتیں طئے کرنے والی قو میاتھا ریٹی نے اسپتالوں،Stentبنا نے والوں او ر در آمد کاروں کو خبر دار کیا تھا کہ اگر یہ پا یا گیا کہ وہStentکی قلت کے بارے میں غلط خبریں پھیلا رہے ہیں تو اُنکے خلاف قا نو نی کار وائی کی جائے گی۔
****************************
اقلیتی امور کے مرکزی وزیرمملکت مختار عباس نقوی نے کہا ہے کہ آدھی سے زیادہ وقت املاک وقف مافیا کے قبضے میں ہے۔
کل نئی دِلّی میں مرکزی وقف کونسل کی75؍ ویں میٹِنگ سے خطاب کر تے ہوئے نقوی نے کہا کہ ایسا دیکھا گیا ہے کہ کئی وقف بورڈوں کے لوگ بھی املاک کو ہتھیا نے کی کار وائی میں شامل ہیں۔ نقوی نے کہا کہ اِس طرح کے لوگ معا شرے کی بہبود کے لیے وقف کی گئی املاک کے فروغ اور تر قی کے راستے میں مختلف رکا وٹیں پیدا کر رہے ہیں۔ اُنھوں نے بتا یا کہ اِن معاملوں کی ایک اعلیٰ سطح جانچ ہو رہی ہے۔
****************************
سُمِت ملِک ریاست کے نئے چیف سیکریٹری ہوں گے۔ سُمِت مِلک موجودہ چیف سیکریٹری سُوادّھِین شتریہ کی جگہ لیں گے جو آج سبکدوش ہو رہے ہیں۔ سُمِت ملِک فی الحال عام انتظا یہ شعبے میں پرنسپل سیکریٹری کے طور پر کام کر رہے تھے۔
****************************
عثمان آباد ضلع و سیشن عدالت نے 2014ء کے رِشوت ستانی معاملے میں عثمان آ باد کی اُس وقت کی نائب ضلع کلکٹر شو بھا رائو ت کو قصور وار قرار دیا ہے۔ عدالت نے اُنھیں دو مختلف معاملات میں چار-چار سال قید ِ با مشقت اور25؍ ہزار روپئے جُر ما نے کی سزا سنائی ہے۔ اُنکی دو نوں سزائیں ساتھ ساتھ چلیں گی۔ شو بھا رائوت نے عثمان آبادکے کوَڑ گائوں میں صنعتی علا قے بسا نے کے لیے زر عی زمین تحویل میں لینے کے لیے
کسا نوں سے اُنھیں دیے جا نے والے معا وضے میں سے5؍ فیصد رقم کا مطالبہ کیا تھا۔ اِس بارے میں شکا یت موصول ہونے کے بعد رائوت کو جو لائی2014ء میں گرفتار کر لیا گیا تھا۔
****************************
ریاست بھر میں کل مراٹھی بھا شا گوَرو دِن جوش و خروش سے منا یا گیا۔ اِس موقعے پر ممبئی میں مراٹھی زبان کے وزیر وِنود تائوڑے کے ہاتھوں مراٹھی زبان کی سر کر دہ شخصیات کو انعا مات سے نوازا گیا۔اِس موقع پر ما روتی چِتّمپلّی کو ورندا کرندیکر لائف ٹائم اچیو منٹ انعام اور یاسمین شیخ کو ڈاکٹر اشوک کیلکر لسانی تحقیق انعام سے سر فراز کیا گیا۔
****************************
ملک کے نو جوانوں میں صلا حیتوں کی کوئی کمی نہیں ہے اور سائنسی تحقیق اور تیکنا لو جی کو فروغ دینے کے لیے صرف قوتِ اِرادی کی ضرورت ہے۔ اِن خیا لات کا اظہار وکھارڈ تحقیقی مرکز کے ڈائریکٹر ڈاکٹر پر کاش چانڈّک نے کیا۔ چانڈّک کل ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی میں
قو می سائنسی دِن کے موقعے پر منعقدہ مقابلے کی افتتاحی تقریب سے خطاب کررہے تھے۔
****************************
Date- 28 February 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸؍فروری ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
ریاستی اسمبلی کا بجٹ اجلاس 6؍ مارچ سے شروع ہو گا ۔ 18؍ مارچ کو ریاستی وزیر مالیات سُدّھیر مُنگنٹیوار بجٹ پیش کریں گے۔
اسمبلی امور کی مُشا ورتی کمیٹی کے کل اسمبلی میں ہوئے اجلاس کے بعد یہ فیصلہ کیا گیا۔ 6؍ مارچ کو ریاستی قا نون ساز اسمبلی کے دو نوں ایوانوں کے مشتر کہ اجلاس سے گور نر سی۔ وِدّیا ساگر رائو خطاب کریں گے۔ 7؍ اپریل تک چلنے والے بجٹ اجلاس کے دوران مجمو عی طور پر 23؍ دن کام کاج ہو گا۔ اِس دوران 6؍ آرڈیننس اور2؍ زیر التواء بلوں پر تبا دلہ خیال کا بھی امکان ہے۔ اِن میں مہا راشٹر زمین محصول اصلا حی آرڈیننس،
ممبئی اور مہا راشٹر میونسپل کار پو ریشنوں میں اصلاح سے متعلق آرڈیننس اور ریاستی پسماندہ طبقات کمیشن اصلاح جیسے آرڈیننس شامل ہیں۔
****************************
ممبئی ہائی کورٹ نے کل ریاستی حکو مت سے پو چھا ہے کہ کیامراٹھا ریزر ویشن کا معا ملہ نیا تشکیل کر دہ مہا راشٹر ریاستی پسماندہ طبقات کمیشن کو سونپا جا سکتا ہے۔ مراٹھا ریزر ویشن سے متعلق داخل کر دہ مختلف در خواستوں پر کل چیف جسٹس منجو لاچیلّور کی صدا رت والی بینچ میں سما عت ہوئی۔ اِس موقع پر عدالت نے یہ سوال پو چھا۔ عدالت نے ریاستی حکو مت اور در خواست گذا روں سے اِس بارے میں اپنا موقف واضح کر نے کو کہا ہے۔ معا ملے کی اگلی سماعت 29؍ مارچ کو ہو گی۔
****************************
عوامی شعبے کی بینکوں کے ملازمین اپنے مختلف مطالبات کی تکمیل کے لیے آج ایک دن کی علا متی ہڑتال پر ہیں۔
آج کی ہڑ تال میں یو نائیٹیڈ فورم آف بینک یو نین کے تحت آنے والی9؍ تنظیموں سے جُڑے قریب 10؍ لاکھ بینک ملازمین شامل ہو رہے ہیں۔ تا ہم نِجی شعبے کی بینکوں کا کام کاج آج حسبِ معمول جاری رہیگا۔
****************************
ریاست میں آج سے بارہویں جماعت کے امتحا نات کی شروعات ہو رہی ہے۔ طلباء کے لیے بورڈ کی جانب سے ڈِویژنل سطح پر خصو صی ہیلپ لائن شروع کی گئی ہے۔ امتحا نات کے دوران صبح 8؍ بجے سے رات 8؍بجے تک اِس ہیلپ لائن سے استفادہ کیا جا سکتا ہے۔ دسویں جماعت کے امتحا نات کی شروعات 7؍ مارچ سے ہو گی۔
****************************
دوائوں کی قیمتیں مقرر کر نے والی قومی اتھا ریٹی نے اسپتالوں اور ڈاکٹروں سے کہا ہے کہ وہ دِل کی شیر یانوں کو کھولنے والے آپریشن انجیو پلاسٹی کے لیے استعمال ہو نے والے Stentکی قلت کے بارے میں اطلاع دیں تا کہ اِن کی قیمت کم کیئے جا نے کے مد نظر اِن کی دستیابی یقینی بنا ئی جا سکے۔ مذکو رہ اتھا ریٹی نے اِس بات کو یقینی بنا نے کے لیے کہ Stent اُس کی مقررہ قیمتوں پر دستیاب ہوں ،کئی اقدامات کیئے ہیں۔
کیوں کہ ایسی خبریں ملی ہیں کے مارکیٹ میں اِنکی قلت ہو گئی ہے۔پچھلے ہفتے دوائوں کی قیمتیں طئے کرنے والی قو میاتھا ریٹی نے اسپتالوں،Stentبنا نے والوں او ر در آمد کاروں کو خبر دار کیا تھا کہ اگر یہ پا یا گیا کہ وہStentکی قلت کے بارے میں غلط خبریں پھیلا رہے ہیں تو اُنکے خلاف قا نو نی کار وائی کی جائے گی۔
****************************
اقلیتی امور کے مرکزی وزیرمملکت مختار عباس نقوی نے کہا ہے کہ آدھی سے زیادہ وقت املاک وقف مافیا کے قبضے میں ہے۔
کل نئی دِلّی میں مرکزی وقف کونسل کی75؍ ویں میٹِنگ سے خطاب کر تے ہوئے نقوی نے کہا کہ ایسا دیکھا گیا ہے کہ کئی وقف بورڈوں کے لوگ بھی املاک کو ہتھیا نے کی کار وائی میں شامل ہیں۔ نقوی نے کہا کہ اِس طرح کے لوگ معا شرے کی بہبود کے لیے وقف کی گئی املاک کے فروغ اور تر قی کے راستے میں مختلف رکا وٹیں پیدا کر رہے ہیں۔ اُنھوں نے بتا یا کہ اِن معاملوں کی ایک اعلیٰ سطح جانچ ہو رہی ہے۔
****************************
سُمِت ملِک ریاست کے نئے چیف سیکریٹری ہوں گے۔ سُمِت مِلک موجودہ چیف سیکریٹری سُوادّھِین شتریہ کی جگہ لیں گے جو آج سبکدوش ہو رہے ہیں۔ سُمِت ملِک فی الحال عام انتظا یہ شعبے میں پرنسپل سیکریٹری کے طور پر کام کر رہے تھے۔
****************************
عثمان آباد ضلع و سیشن عدالت نے 2014ء کے رِشوت ستانی معاملے میں عثمان آ باد کی اُس وقت کی نائب ضلع کلکٹر شو بھا رائو ت کو قصور وار قرار دیا ہے۔ عدالت نے اُنھیں دو مختلف معاملات میں چار-چار سال قید ِ با مشقت اور25؍ ہزار روپئے جُر ما نے کی سزا سنائی ہے۔ اُنکی دو نوں سزائیں ساتھ ساتھ چلیں گی۔ شو بھا رائوت نے عثمان آبادکے کوَڑ گائوں میں صنعتی علا قے بسا نے کے لیے زر عی زمین تحویل میں لینے کے لیے
کسا نوں سے اُنھیں دیے جا نے والے معا وضے میں سے5؍ فیصد رقم کا مطالبہ کیا تھا۔ اِس بارے میں شکا یت موصول ہونے کے بعد رائوت کو جو لائی2014ء میں گرفتار کر لیا گیا تھا۔
****************************
ریاست بھر میں کل مراٹھی بھا شا گوَرو دِن جوش و خروش سے منا یا گیا۔ اِس موقعے پر ممبئی میں مراٹھی زبان کے وزیر وِنود تائوڑے کے ہاتھوں مراٹھی زبان کی سر کر دہ شخصیات کو انعا مات سے نوازا گیا۔اِس موقع پر ما روتی چِتّمپلّی کو ورندا کرندیکر لائف ٹائم اچیو منٹ انعام اور یاسمین شیخ کو ڈاکٹر اشوک کیلکر لسانی تحقیق انعام سے سر فراز کیا گیا۔
****************************
ملک کے نو جوانوں میں صلا حیتوں کی کوئی کمی نہیں ہے اور سائنسی تحقیق اور تیکنا لو جی کو فروغ دینے کے لیے صرف قوتِ اِرادی کی ضرورت ہے۔ اِن خیا لات کا اظہار وکھارڈ تحقیقی مرکز کے ڈائریکٹر ڈاکٹر پر کاش چانڈّک نے کیا۔ چانڈّک کل ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی میں
قو می سائنسی دِن کے موقعے پر منعقدہ مقابلے کی افتتاحی تقریب سے خطاب کررہے تھے۔
****************************
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
राज्य
विधीमंडळाचं येत्या ६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १८ मार्चला अर्थसंकल्प मांडणार
·
मराठा
आरक्षणाचा विषय, राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवता येईल का, मुंबई उच्च न्यायालयाची
सरकारला विचारणा
·
तूर
खरेदीचे शेतकऱ्यांचे पैसे सात दिवसांच्या आत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
·
लाचखोर उपजिल्हाधिकारी शोभा राऊत हिला
चार वर्ष सश्रम कारावास, आणि २५ हजार रुपये दंडाची
शिक्षा
आणि
·
मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
साजरा, साहित्यविषयक विविध पुरस्कारांचं वितरण
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
येत्या ६ मार्चपासून सुरू होणार असून, १८
मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील. काल
विधानभवनात झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ६ मार्चला
विधीमंडळाच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेसमोर राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल. सात
एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात, एकूण २३ दिवस कामकाज होईल. या
दरम्यान ६ अध्यादेश, तसंच दोन प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. यामध्ये
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश, मुंबई तसंच महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अध्यादेश, राज्य मागासवर्ग आयोग सुधारणा अध्यादेश, आदी अध्यादेशांचा समावेश आहे.
****
सायबर गुन्हे प्रतिबंधासह, स्ट्रॉंग सिटी नेटवर्क क्षेत्रात
राज्याला अमेरिकेचं सहकार्य मिळणार
आहे. गृह राज्यमंत्री
डॉ. रणजीत पाटील यांनी ही माहिती
दिली. यासंदर्भात अमेरिकी
दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी काल डॉ. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक
झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठीही
राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच अमेरिकेचं या क्षेत्रातलं सहकार्य महत्वाचं
ठरेल, असं, पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाचा विषय, नव्यानं स्थापन
करण्यात आलेल्या, महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवता येईल का, अशी विचारणा,
मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला केली. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात
आलेल्या, विविध याचिकांची सुनावणी मुख्य न्यायाधीश मंजुषा चेल्लूर यांच्या अध्यक्षते
खालील पीठासमोर काल झाली, त्यावेळेस उच्च न्यायालयानं
ही विचारणा केली. याबाबत राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यास
न्यायालयानं सांगितलं आहे. या यचिकांची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे.
****
राज्यात तूर उत्पादनात झालेली भरघोस
वाढ लक्षात घेता सर्वत्र तूर खरेदी
केंद्रं सुरू करावीत, तसंच शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे सात दिवसांच्या आत देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत, तूर
खरेदी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत
बैठक झाली होती, त्यावेळी
ते बोलत होते. शेतकऱ्यांचं
नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत, राज्यात
जिथं भारतीय अन्न महामंडळाचे खरेदी केंद्रं सुरु आहेत, तिथं
नाफेडनं खरेदी केंद्रं तातडीनं सुरु करावीत, गोदामांची
क्षमता वाढवण्यासाठी गोदामांचं मॅपिंग करुन, आवश्यकतेनुसार खासगी गोदामं ताब्यात घेण्याच्या
सूचनाही, मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिल्या.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांनी
विविध मागण्यांसाठी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात युनायटेड फोरम
ऑफ बॅंक युनियनच्या अखत्यारीतल्या ९ संघटनांचे सुमारे १० लाख कर्मचारी सहभागी होणार
आहेत. मात्र खाजगी क्षेत्रातल्या बॅंकांचं कामकाज आज सुरु राहणार आहे.
****
सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव
सुमित मलिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय आज सेवानिवृत्त होत आहेत.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी इयत्ता
बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी मंडळानं विभागीय स्तरावर
मदतवाहिनी सुरू केली असून, परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार
आहे.
दरम्यान, दहावीच्या लेखी
परीक्षेला येत्या सात मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
२०१४ च्या
लाचखोरी प्रकरणात उस्मानाबाद इथल्या उपजिल्हाधिकारी शोभा राऊत हिला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं तिला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावास आणि
२५
हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या दोन्ही शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहतीकरता शेतजमीन
संपादित करताना राऊत यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातून पाच टक्के रक्कम मागितली
होती. यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून राऊत यांना जुलै २०१४ मध्ये अटक करण्यात आली
होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात
काल मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर काल
मुंबईत विविध पुरस्कारांचं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण करण्यात
आलं. यामध्ये विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर
भाषा अभ्यासक पुरस्कार यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना, तसंच श्री. पु. भागवत स्मृती
उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्याच्या भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला.
याचबरोबर विविध साहित्य-प्रकारांसाठीचे यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कारही
यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये, प्रतिमा इंगोले यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
पुरस्कार, सुधीर रसाळ यांना के. क्षीरसागर पुरस्कार, रमेश पतंगे यांना डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पुरस्कार, डॉ. प्रभा गणोरकर यांना कवी केशवसूत पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय
यांना वसंतराव नाईक पुरस्कार, श्रीराम पेडगावकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार, हेरंब
कुलकर्णी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुकर धर्मापुरीकर
यांना ना. धों. ताम्हणकर पुरस्कार देण्यात आला.
****
नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जेष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. मानपत्र, स्मृती
चिन्ह आणि एक लाख रुपये असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे काव्य पुरस्कार
काल औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कविवर्य
कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना तर कवयित्री लीला धनपलवार
पुरस्कार कवयित्री कविता महाजन यांना ज्येष्ठ समीक्षक डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. अकरा हजार रुपये
रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
औरंगाबाद इथं माहिती आणि जनसंपर्क विभागानं आयोजित केलेल्या कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचं
उद्घाटन साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
परभणी इथं राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं
मराठी राजभाषा दिन काल साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या
सोनपेठ बसस्थानकावर आमदार राहुल पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या
पुस्तकांचं वाटप केलं.
****
देशातल्या तरुणांमध्ये प्रचंड
क्षमता असून वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचं वोक्हार्ट
संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश चांडक यांनी म्हटलं आहे. औरंगाबादच्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित
स्पर्धेचं उद्घाटन चांडक यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताचा
गेल्या अनेक वर्षांपासून विकसनशील देशामध्ये समावेश असून विकसित देशात समाविष्ट होण्यासाठी
प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई
तालुक्यातल्या गिरवली इथं विवाहीत महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या
निषेधार्थ काल गिरवली इथं मोर्चा काढण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय
प्रचार संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यातल्या खालापुरी, इथं कालपासून सुरू झालेल्या ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियानाचा आज समारोप होईल.
//*****//
Monday, 27 February 2017
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी
सर्वांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन साहित्यिक ॠषीकेश कांबळे यांनी केलं आहे. औरंगाबाद
इथं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांच्या
प्रदर्शनाचं उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात विभागीय आयुक्त कार्यालयासह अनेक ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
****
अस्सल मराठी
बोलणं आजकाल दुरापास्त होत असल्याची खंत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केली आहे. ते आज मराठी
भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भाषेचा योग्य वापर होत नसल्यामुळे
ती ऱ्हास पावते, भाषा जोपासण्याची गरज असल्यामुळे अस्सल
मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करण्याचं आवाहन कुलगुरुंनी यावेळी केलं.
****
देशातल्या तरुणांमध्ये
प्रचंड क्षमता असून वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचं
वोक्हार्ट संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ.प्रकाश
चांडक यांनी म्हटलं आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय
विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचं उद्घाटन आज चांडक यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. कुलगुरु बी.ए.चोपडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारताचा गेल्या
अनेक वर्षांपासून विकसनशील देशामध्ये समावेश असून विकसित देशात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
नांदेड इथं
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. तंत्रज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची मनोवृत्तीही विकसित व्हायला
पाहिजे, असं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षणशास्त्र संकुलाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.महेश जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ
विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी मंडळानं विभागीय स्तरावर हेल्पलाइन सुरू केली असून, परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध
राहणार आहे. यामार्फत परीक्षेचं वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना
माहिती पुरवली जाणार आहे. दरम्यानं, दहावीच्या लेखी परीक्षेला येत्या सात मार्चपासून सुरुवात होणार आहे.
****
२०१४ च्या लाचखोरी प्रकरणात उस्मानाबाद इथल्या तत्कालिन महसूल अधिकारी शोभा
राऊत याना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं राऊत याना शेतजमीन संपादन प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात दोषी
धरून, चार वर्षे सश्रम कारावास आणि पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. उस्मानाबाद तालुक्यात कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहतीकरता शेतजमीन संपादित करताना राऊत यांनी शेतकऱ्यांना
मिळणाऱ्या मोबदल्यातून पाच टक्के रक्कम मागितली होती.
****
राज्यात डिझेलवर होणारी रेल्वे वाहतुक येत्या तीन ते चार वर्षांत इतिहासजमा होईल, असं मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी के शर्मा यांनी म्हटलं आहे. ते सोलापूर इथं बोलत होते. राज्यातल्या सर्वच रेल्वे मार्गांचं येत्या तीन ते चार वर्षात विद्युतीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासखर्चात चौपट वाढ केली असल्यानं, रेल्वेची सर्व विकासकामं येत्या दोन वर्षात मार्गी लागतील,
असं त्यांनी सांगितलं. मनमाड दौंड रेल्वे मार्गावरच्या विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
****
नवी दिल्ली
इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जीतू राय आणि हीना
सिंधू यांनी आज १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या गटात अंकूर मित्तल यानं डबल ट्रॅप प्रकारात
रौप्य पदक पटकावलं, या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत
चार पदकं मिळवली आहेत.
****
देशातल्या क्रीडापटूंना उच्च
दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ३५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, भारतीय
क्रीडा प्राधिकरणात २०० प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कुरुक्षेत्र इथं
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक हीरा बल्लभ यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
खेळाडूंना दुखापत झाल्यास लवकर उपचार मिळण्यासाठी देशभरात फिजिओथेरपी केंद्र उभारणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण हमी योजनेप्रमाणे
राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येक गावात खेळाचा प्रचार प्रसार करणार असल्याचं बल्लभ
यांनी सांगितलं.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या
पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरू असून सकाळी ११ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. १२ जिल्ह्यातल्या ५१ मतदारसंघांमध्ये हे
मतदान होत असून, ४० महिलांसह ६०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
अमेरिकेतल्या कन्सास सिटी इथं झालेल्या
गोळीबारात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अमेरिकेनं कडक भूमिका घ्यावी, अशी
मागणी भारतानं केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम वैंकय्या नायडू
यांनी ही माहिती दिली. या घटनेविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जनतेनं जाहीर
निषेध नोंदवावा, तसंच कठोर उपाययोजना करावी, असं
ते म्हणाले.
****
वादग्रस्त मुस्लिम
धर्मगुरु झाकीर नाईक याला सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौथ्यांदा
नोटीस बजावली आहे. परदेशात असणाऱ्या झाकीर नाईकनं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चौकशीत
सहभागी होण्याची मागणी केली होती, मात्र संचालनालयानं ती मागणी फेटाळून लावत त्याला
स्वत: हजर राहण्यास सांगितलं आहे. यावेळेसही नाईक चौकशीला हजर न राहील्यास त्याच्याविरुद्ध
अटक वॉरंट काढण्यात येणार आहे. नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेविरुद्ध
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सगळी मालमत्ता जप्त करण्यात
आली आहे.
****
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि प्रवाशांसाठी वाहतुकीची उपलब्धता वाढावी, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी नीति आयोगानं नवी दिल्ली इथं आजपासून दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यात केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू, परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभु आणि अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यासह अन्य उच्चस्तरीय मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
****
राज्यातल्या मराठा
समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, अशी
मागणी करणाऱ्या याचिकेची अंतिम सुनावणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांच्यासमोर होणार आहे. या
याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले
होते. सामाजिक कार्यकर्ते विनोद नारायण पाटील यांनी ही याचिका दाखल केली
आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार
संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यातल्या खालापुरी, नाळवंडी
आणि पिंपळनेर या गावांमध्ये ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय
जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. खालापुरी इथं आज आणि उद्या,
नाळवंडी इथं तीन आणि चार मार्च आणि पिंपळनेर इथं आठ आणि नऊ मार्चला हे
अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान जनजागृती रॅली,
विविध स्पर्धा तसंच मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आगामी गुढी पाडवा आणि लगतच्या सुट्ट्यांच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनानं नागपूर - मुंबई विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ते २८ मार्च दरम्यान या गाडीच्या तीन फेऱ्या करण्यात येणार आहेत. वातानुकुलित द्वितीय श्रेणीच्या एका डब्यासह तृतीय श्रेणीच्या दोन आणि सर्वसाधारण द्वितीय श्रेणीच्या सात डब्यांचा यात समावेश आहे.
****
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासोबत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबालाही मिळणार असून, या योजनेअंतर्गत ९७१ आजारांसाठी वैद्यकीय मदत दिली जाणार आहे.
रुग्णालयाच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही योजना नांदेड, गडचिरोली, अमरावती, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.
****
रिओ ऑलिम्पियन थनाकल गोपी आणि मोनिका अथारे यांनी नवी दिल्ली इथं झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गोपीनं पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन, दोन तास १५ मिनिटात, तर महिला मॅरेथॉनमध्ये मोनिकानं दोन तास ३९ मिनिटात शर्यत पूर्ण केली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या गिरवली इथं विवाहीत महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज गिरवली इथं नराधम प्रतिबंधक मोर्चा काढण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
८९व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मूनलाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ला ला लॅण्ड या चित्रपटानं सहा पुरस्कार पटकावले.
//****//
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...