Thursday, 31 August 2023

आकाशवाणी औरंगाबाद –दिनांक 31.08.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक: 31.08.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी प्रमुख नेते मुंबईत दाखल.

·      मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये पंधरा ते सतरा सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रम - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.

·      श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित.

आणि

·      लातूर इथं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत राखी पोर्णिना साजरी.

****

मुंबई इथं आजपासून इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीमध्ये संघटनेचे प्रतिनिधी, झेंडा तसंच संयोजक या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. उद्योजक अदानींच्या गुंतवणुकींसंदर्भात राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा विविध प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरं द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.   

****

इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्तानं एकत्र आलेल्या पक्षांसमोर कोणताही कार्यक्रम नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही आघाडी झाली असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

****

मुंबईमध्ये आज सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही होत आहे. आघाडीच्या पुढल्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.  

****

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचं एकूण देशांतर्गत उत्पन्न सात पूर्णांक आठ दशांश टक्के झालं असल्याची माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. या आधीच्या तिमाहीत हे उत्पन्न सहा पूर्णांक एक दशांश टक्के इतकं होतं, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

संसदेचं विशेष अधिवेशन अठरा ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून दिली. या अधिवेशनामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत काळा दरम्यानच्या या अधिवेशनात सरकार फलदायी चर्चा आणि वादविवाद करू इच्छिते असंही जोशी यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ते आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले -

१५, १६, १७ या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या मुक्तिसंग्रामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सोळा तारखेला चार वाजता करण्यात आलं आहे. त्यासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना या बाबतीतलं निमंत्रण मी स्वतःही दिलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांनी भेट देऊन हे निमंत्रण दिलेलं आहे.

 

 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची माहिती देणारं भव्य स्मारक औरंगाबाद इथं उभारलं जाणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. सुमारे साडे चार एकर जागेवर उभारलं जाणारं हे स्मारक ज्ञानवर्धक तसंच राष्ट्रीय वैभवात भर घालणारं असेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

****

उस्मानाबाद कलाविष्कारचे डॉ. पद्मसिंह पाटील पुरस्कृत श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. श.मा.पाटील स्मृती पुरस्कार पद्य विभागामध्ये सोलापूरचे डॉ शिवाजी शिंदे लिखित 'अंतस्थ हुंकार' काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे. त्रिंबकदादा शेळके स्मृती पुरस्कार यंदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची सोय करणाऱ्या उस्मानाबादच्या अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्कारांचं वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी दिली आहे.

****

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेत साईंबाबांची पाद्य पूजा केली. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. संस्‍थानचे मुख्‍य  कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.  

****

लखनौ विभागात वाराणसी रेल्वे स्थानकावर तांत्रिक काम करण्याकरता `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यानुसार जालना ते छपरा ही विशेष रेल्वे २० आणि २७ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातली छपरा ते जालना ही विशेष रेल्वेही २२ आणि २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

लातूर इथल्या `ग्रीन लातूर वृक्ष टीम` या सामाजिक संघटनेनं यंदा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला. या संघटनेनं तुळशीच्या बियांच्या राख्या तयार केल्या होत्या. यासंदर्भात संघटनेचे समन्वयक डॉ पवन लड्डा यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले -

राखी पोर्णिमेचा सण आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पारंपारिक राख्यांसोबत आम्ही तुळसी बियांपासून बनवलेल्या आकर्षक राख्या तयार केल्या. यामध्ये शंभर एक तुळशी बिया कागदाच्या पुड्यामध्ये बांधून त्यांला मोळी बांधली. आणि सुंदर अशी राखी तयार केली. शेवटचा उद्देश हा होता की जेव्हा ही राखी मातीमध्ये, कुंड्यामध्ये टाकल्या जातील सोबत बियासुद्धा पडल्या जातील त्याच्या. आणि त्यानंतर त्याच्यातून जी तुळशीची रोपं उगवतील, प्रत्येक घरामध्ये या पद्धतीनं दोन, तीन, चार तुळशीची रोपं उगवायला लागतील. पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा हा छोटासा प्रयत्न ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून केला आहे.

****

लातूर जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्यानं त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचं सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट झाल्याचं दिसून आल्यास विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत विमा कंपनीला कळवण्यात येईल, असं जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी कळवलं आहे.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडन पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अलेक्जांडर बुकीक आणि क्रिस्तोफर ओकोनेल यांच्या जोडीला पहिल्या फेरीत ६-४, ६-२ असं पराभूत केलं. महिला एकेरीमध्ये प्रथम मानांकित पोलंडची इगा स्वियातेक तिसऱ्या फेरीत दाखल झाली आहे. पुरुष एकेरीमध्ये तीन वेळचा विजेता सर्बीयाचा नोवाक जोकोविचनं स्पेनच्या बर्नाबे मिरालेसला पराभूत करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केलं. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

धुळे शहरासह जिल्हाभर पाणी टंचाईच्या अनुषंगानं धोंडी धोंडी पाणी देम्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मिरवणुकीनं वरुणराजाला साकडं घातलं. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २५ टक्केही पाऊस झाला नाही. यामुळं धुळे महापालिकेनं पाण्याचं योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

****

कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आले आहेत. शेतकरी, गट, संस्था आणि व्यक्ती यांनी या संदर्भात आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दहा सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक एस. व्ही. लाडके यांनी केलं आहे.

****

रोटरी क्लबचे महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधले शल्यचिकित्सक आणि स्वयंसेवक असे एकूण पस्तीस जण येत्या तीन ते १३ सप्टेंबर दरम्यान काश्मीर खोऱ्यातल्या अनंतनाग, पुलवामा, शोपीयान आणि कुलगाम या ठिकाणी विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणार आहेत.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 31.08.2023, रोजीचे दुपारी: 01.30, वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 31.08.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

महेंद्रगिरी या युद्धनौकेचं उद्या मुंबईत जलावतरण करण्यात येणार आहे. याची निर्मिती मुंबईतल्या माजगाव गोदीत करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे जलावतरण करण्यात येईल. भारतीय नौदलाच्या विशेष प्रकल्पा अंतर्गत निर्मीत ही सातवी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत युद्धनौका आहे.

****

येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशमंडळांना पुरस्कृत करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. या पुरस्कारांसाठी मुंबई, मुंबई उपनगरीय क्षेत्र, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून प्रत्येकी तीन तर इतर जिल्ह्यांमधून प्रत्येकी एका गणेशमंडळाची निवड करण्यात येणार आहे. यात प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, द्वितीय अडीच लाख रुपये तर तृतीय पुरस्कार एक लाख रुपयांचा असेल. अन्य ४१ गणेशमंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

****

दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंही प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून अमिट चिन्ह प्रस्थापित केलं असल्याचं मंत्रालयानं आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मिरमधून गेल्या एक जुलै पासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा ६२ दिवसांनंतर आज संपत आहे. देशाच्या विविध भागांमधून आलेल्या जवळपास साडे चार लाख भाविकांनी या ६२ दिवसांच्या कालावधीत अमरनाथ मंदिरात बर्फ शिवलिंगाचं दर्शन घेतलं.

****

कृत्रीम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजंस `ए आय` या विषयावरचं पहिलं जागतिक संमेलन भारतात येत्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलं जाणार आहे. इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या संदर्भातली माहिती दिली. या शिखर संमेलनात कृत्रीम बुद्धीमत्तेची पुढील पिढीसाठी उपयुक्तता आणि प्रयोग यावर चर्चा होणार आहे. या तंत्रज्ञानामुळं शिक्षण, आरोग्य सेवा, प्रशासन, इलेक्ट्रीक वाहन आणि आधुनिक संगणक या क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी बदल अपेक्षित आहेत. एआय क्षेत्रातले प्रमुख विशेषज्ञ, संधोधक, स्टार्ट अप आणि गुंतवणुकदार यात सहभागी होणार आहेत.

****

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला वाचवण्यासाठी राज्य सरकार हमी देणार आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांचा तोटा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वाचवण्यासाठी या बँकेनच कृती आराखडा तयार करावा असे आदेश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. भाग भांडवल वाढण्यासाठी प्रसंगी राज्य सरकार हमी देखील देईल असंही त्यांनी सांगितलं. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला परवाना रद्द करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नोटीस बजावली असून त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सहकार मंत्री पाटील यांनी या सूचना केल्या. या बँकेवर किमान पाच वर्ष प्रशासक ठेवावेत आणि थकबाकीदारांकडून कठोर वसुली करावी अशी सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत केली.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम आदिवासी भागातलं गाव म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यातल्या पळसुंदे गावच्या ग्रामसभेत वैशिष्ट्यपूर्ण ठराव घेण्यात आला आहे. जो मुलगा- मुली आणि सुन आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांना संपत्तीचं वारस होता येणार नाही असं ग्रामसभेनं एकमतानं ठरवलं आहे. सरपंच सुरेश वळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव संमत करण्यात आला. आई वडिलांना सांभाळणाऱ्यांनाच वडिलोपार्जित मालमत्तेत वारस म्हणून हक्क मिळतील. महसूल आणि ग्रामविकास विभागाला या ठरावांची प्रत पाठवली जाणार असून ग्रामपंचायतीची संमती घेऊनच महसूल विभागानं वारस प्रकरणं मंजूर करावीत असं सूचवण्यात आलं असल्याचं वळे यांनी सांगितलं.

****

`घर घर गॅस` योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पहिला पाईपलाईन मधून मिळणारा घरगुती गॅस श्रीगोंदा शहरात उपलब्ध झाला आहे. श्रीगोंदा शहरातल्या शिवाजी उपनगर परिसरात अजित भोसले यांच्या घरात भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करुन गॅस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

****

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 31.08.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. सकारात्मक परिवर्तनाचे वर्ष या संदर्भातल्या राज्यस्तरीय उपक्रम उद्घाटनामध्ये राष्ट्रपती यावेळी सहभागी होणार आहेत.

****

मुंबईमध्ये आजपासून इंडीया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात होत आहे. या बैठकीमध्ये संघटनेचे प्रतिनिधी, झेंडा आणि संयोजक या विषयांवर चर्चा करणार आहे.

****

मुंबईमध्ये आज सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही होत आहे. आघाडीच्या पुढल्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.  

****

राज्यातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठीचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं.

****

वर्ष २०४० या वर्षापर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था १०० अब्ज डॉलर इतक्या क्षमतेची होईल, असं अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीत या संदर्भातली माहिती दिली. 

****

घर घर गॅस योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पहिला पाईपलाईन मधून मिळणारा घरगुती गॅस श्रीगोंदा शहरात उपलब्ध झाला आहे. श्रीगोंदा शहरातल्या शिवाजी उपनगर परिसरात अजित भोसले यांच्या घरात भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करून गॅस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

****

जळगाव जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातल्या उज्जैन आणि इंदूर महापालिकांना भेट देत आपला अभ्यास दौरा पूर्ण केला आहे. या अभ्यास दौऱ्यात या मुख्याधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत माहिती जाणून घेतली.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यानचा सामना होणार आहे.

श्रीलंकेतल्या पल्लेकेल इथं हा सामना होईल.

****

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ اگست 2023 ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 31.08.2023, रोजीचे सकाळी: 08.30, वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ اگست 2023 ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 31 August 2023

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۱؍  اگست  ۲۰۲۳؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


پہلے خاص خبروں کی سر خیاں  ... 

٭ آبی ذخیرے کے حامل علاقوں  اور  کاندل جنگلات کے تحفظ کے لیے فعال کارروائی کرنے کی وزیر اعلیٰ کی ہدایت

٭ اِنڈیا اتحادکے  2؍ روزہ اجلاس کا آج سے ممبئی میں آغاز

٭ ریاست میں بارش کی صورتحال کے پیش نظر راشٹر وادی کانگریس کے ریاستی صدر جینت پاٹل نے قحط سالی کے

اعلان کرنے کا کیا مطالبہ

٭ لاتور سمیت عثمان آباد  اور  بیڑ اضلاع میں صنعتوں کے قیام کو رفتار دینے کے لیے ہر ممکن مدد فراہم کرنےکا وزیر صنعت کا تیقن 

اور

٭ ایشیاء کپ کر کٹ مقابلوں کے افتتاحی میچ میں پاکستان نے نیپال کو 238؍ رنوں سے دی شکست

اب خبریں تفصیل سے...

ٌٌ وزیر اعلیٰ ایکناتھ شندے نے ریاست میں آ بی ذخیروں کی حامل زمین سمیت ساحل سمندر سے متصل کاندل جنگلات کے تحفظ کے لیے مزید فعال طریقے سےکارروائی کرنے کی ہدایت دی ہے ۔ وزیر اعلیٰ نے یہ بھی کہا کہ  نیشنل ویٹ لینڈ ایٹلس  کے مطا بق ریاست کے کم و بیش 23؍ ہزار  ایسے علاقوں کا سر وے مرکزی حکو مت سے تسلیم شدہ اِداروں سے کرائے جائیں  اور  اِس خصوص کی رپورٹ برس بھر میں متعلقہ آتھا ریٹی کو پیش کی جائے ۔ وہ کل ممبئی میں مہاراشٹر ویٹ لینڈ اتھا ریٹی کے پانچویں  اجلاس سے خطاب کررہے تھے ۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ ملک میں کُل 75؍ آبی ذخیروں کے حامل رامسر مقامات سے اِن میں ریاست کے  ناندُر ‘  مدھمیشور  ‘  لو نار جھیل  او ر تھانے کی خلیج شامل ہے ۔وزیر اعلیٰ شندے نے ہدایت دی کہ اِن علاقوں کے ضلع کلکٹرس سر وے کو فوقیت دے کر سال بھرمیں اِن آ بی ذخیروں کے حامل علاقوں کی معلو مات جمع کریں ۔

***** ***** ***** 

غیر زرعی یو نیور سٹی سطح کے تعلیمی شعبے میں اعلیٰ تعلیم کی خاطر کالج  اور  اِدارے قائم کرنے کے لیے  2024؁ء   تا  2029؁ء  کے دوران

 5؍ سالہ جامع منصوبےکو منظوری دی گئی ہے ۔ وزیر اعلیٰ ایکناتھ شندے کی زیر صدارت کل منعقدہ ریاست کے اعلیٰ تعلیم  اور  ڈیو لپمنٹ کمیشن کی میٹنگ میں یہ منظوری دی گئی ۔ اِس میٹنگ میں نائب وز یر اعلیٰ دیویندر پھڑ نویس  ‘  قانون ساز اسمبلی میں حزب اختلاف کے رہنما وِجئے وڈیٹی وار  اور  دیگر  معزز شخصیات موجود تھیں ۔ اِس منصوبے کے مطا بق رواں برس ریاست میں ایک ہزار  499؍  مقامات پر نئے کالجیز شروع کیے جا سکتے ہیں ۔

***** ***** ***** 

شیو سینا ٹھا کرے گروپ کے سر براہ اُدھو ٹھا کرے نے کہا ہے کہ وہ ملک دستور کی حفاظت کے واحد مقصد کے لیے اِنڈیا اتحاد کے پر چم تلے جمع ہوئے ہیں ۔ اِنڈیا اتحاد کا 2؍ روزہ اجلاس آج سے ممبئی میں ہو رہا ہے ۔ ٹھا کرے اِس موقعے پر اخباری کانفرنس سے مخاطب تھے ۔ اِس منا سبت سے راشٹر وادی کانگریس کےقومی صدر شرد پوار  ‘  کانگریس پارٹی کے ریاستی صدر  نانا پٹو لے  ‘  کانگریس قائد اشوک چو ہان  سمیت دیگر  معزز شخصیات موجود تھیں۔ اِس موقعے پرٹھا کرے نے پو چھا کہ مہا راشٹر میں قحط سالی ہے  ریاستی  او ر مرکزی حکو متیں کہا ں ہیں۔ 

اِسی بیچ  این  سی  پی  کے قو می صدر  شرد پوا ر نے بتا یا کہ اِنڈیا اتحاد کے تحت نشستوں کی تقسیم سے متعلق بات چیت ابھی شروع نہیں ہوئی ہے ۔فی الحال اتحاد کے اجتماعی پروگرام سے متعلق ممبئی اجلاس میں تبا دلۂ خیال کیا جائے گا ۔

***** ***** ***** 

جنوب کی سیاسی جماعت  بھارت  راشٹر یہ سمتی  مہا راشٹر میں کسی بھی پارٹی سے انتخابی اتحاد نہیں کرے گی ۔ پارٹی سبھی انتخا بات اپنے بل بو تے پر لڑے گی ۔ تلنگا نہ کے وزیر خزا نہ ہریش رائو نے کل شو لا پور میں یہ اطلاع دی ۔ آئندہ ماہ شو لا پور میں بھارت راشٹریہ سمیتی کے سر براہ  اور  تیلنگا نہ کے وزیر اعلیٰ چندر شیکھر رائو کا جلسہ ہونے والا ہے ۔ اِس پس منظر میں ہریش رائو کل شو لا پور کے دورے پر تھے ۔

***** ***** ***** 

ریاست کے 17؍ قبائلی اکثر یتی اضلاع میں آئندہ مارچ کے مہینے سے ایک بینچ مار ک سر وے کیا جائے گا  تا کہ قبا ئلیوں کی ترقی کی خا طر ایکشن پلان کی منصوبہ بندی کے لیے تازہ ترین شماریاتی معلو مات فراہم کی جا سکے ۔ قبائلی تر قی کےوزیر ڈاکٹر وجئے کمار گا وِت نے یہ اطلاع دی ۔ انہوں نے بتا یا کہ فی الحال ناندور بار ضلعے میں ایک بینچ مارک سر وے تجر با تی طو رپر شروع کیا جا رہا ہے ۔ جو 8؍ مہینوں میں مکمل کیا جائے گا ۔ اِس سر وے سے  1996 - 97؁ء  کے بعد کی  مدت میں قبائلیوں کے لیے نافذ کی گئی اسکیمات کے نتائج کی معلو مات ملے گی  او ر پتہ چل سکے گا کہ قبائلیوں کے موجودہ تعلیمی  ‘  سماجی ‘  مالی  اور  روز گار سے متعلق حالات کیسے ہیں ۔

***** ***** ***** 

راشٹر وادی کانگریس کے ریاستی صدر  جینت پاٹل نے ریاست میں بارش کی موجود ہ صورت حال کے پیش نظر قحط سالی کے اعلان کرنے کا مطالبہ کیا ہے ۔ اِس خصوص میں انہوں نے وزیر اعلیٰ  اور  دو نوں نائب وزراء اعلیٰ کو خط لکھا ہے ۔ اپنے خط میں انہوں نے خریف کی کئی فصلوں سمیت چارے  کے نقصان کی طرف توجہ مبذول کرائی ہے ۔ پاٹل نے کہا  کہ ریاست میں اِس مہینے کے اخیر تک منتخب مقامات پر  مجموعی طور پر  29؍ فیصد بارش ہوئی ہے ۔ موجود صورتحال میں ریاست کی 329؍ تحصیلوں میں گزشتہ 23؍ دونوں سے بارش نہ ہونے کے سبب قحط جیسے حا لات بن گئے ہیں ۔ اِس لیے قحط سالی سمیت اُس کے تدا رک کے لیے کیے جانے والے اقدامات کا اعلان کیا جائے ۔


***** ***** ***** ***** ***** ***** 

یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** ***** ***** ***** 


روزگار ضمانت  او ر باغبانی کے وزیر سندیپان بھومرے نے کہا ہے کہ ریاست کے نر سری ایکٹ میں تر میم زیر غور ہے ۔ وزیر موصوف کل محکمہ باغبانی کے جائزاتی اجلاس سے خطاب کر رہے تھے ۔ انہو ںنے بتا یا کہ پھلوں کے پو دے غیر قا نو نی طو رپر ریاست میں آ رہے ہیں جس پر قابو پا نا ضروری ہے ۔ انہوں نے ریاست کے عمر کھیڑ  ‘  دھیور  واڑی  ‘ تلے گائوں  ‘  ایثار واڑی  اور  ماسود میں سٹرس اسٹیٹ یعنی ترش پھلوں کا علاقہ قائم کرنے کی منطوری دی ہے ۔ بھُمرے نے متعلقہ افسران کو ہدایت دی کہ سٹرس اسٹیٹ کے قیام کے لیے ضروری سامان  اور  افرادی قوت فوری دستیاب کرائی جائے  او ر یہ کام مقررہ مدت میں مکمل کیا جائے ۔

***** ***** ***** 

صنعت و حرفت کے ریاستی وزیر اُدئے سامنت نے لاتور سمیت بیڑ  اور  عثمان آباد اضلاع میں صنعتوں کے قیام کو رفتار دینے کی خاطر ہر ممکن تعاون کرنے کا تیقن دیا ہے ۔ سابق وزیر  اور  رکن اسمبلی امِت دیشمکھ نے کل اِس خصوص میںسامنت سے مل کر مختلف مطالبات پر تبا دلہ ٔ خیال کیا ۔ اِس موقعے پر سامنت نے یہ تیقن دیا ۔ وزیر موصوف نے بتا یا کہ لاتور ضلعے کی صنعتی  ‘  تعلیمی  اور  زرعی ترقی کی خاطر ضرورتی ہوائی خدمات دوبارہ شروع کرنے کے لیے ایئر پورٹ اتھا ریٹی سے اجازت نا مے کا حصول کے لیے زمین تحویل میں لی جائے گی  اور  لاتور طیران گاہ کا کام جلد از جلد مکمل کر وا یا جا ئے گا ۔

***** ***** ***** 

ریاستی حکو مت نے کل ممبئی عدالت عالیہ میں وضاحت کی کہ اورنگ آباد  اور  عثمان آباد کے ناموں کی تبدیلی کے لیے آخری نوٹس اب تک جاری نہیں کی گئی ہے ۔ عدالت میں کل اِن شہروںکے ناموں کی تبدیلی کے خلاف دائر در خواستوں پر چیف جسٹِّس دیویندر کمار اُپا دھیائے  او ر جسٹس عارف ڈاکٹر کی زیر صدارت سنوائی کی گئی ۔ اِس سماعت کے دوارن  ریاستی حکو مت کی جانب سے عدالت کو بتا یا گیا کہ ضلع  اور  تحصیل سطح پر ناموں کی تبدیلی پر عمل آ وری کی خاطر اب تک نوٹس جاری نہیں کی گئی ہے ۔ اِس لیے نوٹس کے مسودے کو چیلنج کرنے والی در خواستیں بے معنی ہیں ۔اِس کے بعد عدالت نے ضلع سطح پر ناموں کی تبدیلی پر اعتراض کرنے والی در خواستوں سے متعلق فیصلہ سنا یا  او ر شہرسطح پر ناموں کی تبدیلی کی مخالف در خواستوں پر سماعت  آئندہ 4؍  او ر 5؍ اکتوبر کو طئے کر دی ۔

***** ***** ***** 

بہن -بھائی کے رشتے کو مزید مستحکم کرنے والا رکشا بندھن کا تہوار  کل ملک بھر میں جوش و خروش کے ساتھ منا یا گیا ۔ اِس موقعے پر صدر جمہوریہ دروپدی مر مو  اور  نائب صدر جمہوریہ جگدیپ دھنکھڑ نے ملک کی عوام سے نیک خواہشات کا اظہار کیا ہے ۔ نائب  صدر دھنکھڑ نےکہا کہ رکشا بندھن کا یہ تہوار بہن-بھائی  کو باندھنے والا  ‘  ایک دوسرے پر بھروسے  اور  اخوت کو قائم رکھنے والا رشتہ ہے ۔ وزیر اعظم نریندر مودی نے بھی اِس موقعے پر  عوام کومبارکباد دی  ہے ۔ انہوں نے تمنّا کی کہ ہر ایک کی زندگی میں احساس  مہر بانی  اور  ہم آہنگی کے جذبات اِس تہوار کی مناسبت سے تر قی پائیں ۔

***** ***** ***** 

وہیں لاتور میں کل در خت کو راکھی باندھ کر رکشا بندھن کا تہوار منا یا گیا ۔ اِس موقعے پر وسُندھرا فائونڈیشن کی جانب سے منعقدہ پروگرام میں ضلع کلکٹر ورشا ٹھا کُر گھو گے نے پیپل کے در خت کو راکھی باند ھ کر درختوں کے تحفظ کا پیغام ضلعے کی عوام کو دیا ہے ۔ گھو گے نے کہا کہ انسان  او ر فطرت کے در میان رشتے کو مستحکم کرنے کے لیے در ختوں کی حفاظت کا پروگرام وقت کی ضرورت ہے ۔

***** ***** ***** 

ایشیاء کپ کر کٹ مقابلوں میں کل کے افتتاحی میچ میں پاکستان نے نیپال  کو  238؍ رنو ں سے شکست دے دی ۔ پہلے بلّے بازی کرتے ہوئے پاکستان نے 50؍ اورس میں 6؍ وکٹوں کے نقصان پر 342؍ رن بنائے ۔ جوابی کھیل کے دوران نیپال کی ٹیم  24؍ ویں  اور  میں  104؍ رنوں کے ساتھ آل آئوٹ ہو گئی ۔اِس ٹور نا منٹ میں بھارت کا پہلا مقابلہ پاکستان سے آئندہ سنیچر کو ہو گا ۔

***** ***** ***** 


آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے  ...


٭ آبی ذخیرے کے حامل علاقوں  اور  کاندل جنگلات کے تحفظ کے لیے فعال 

کارروائی کرنے کی وزیر اعلیٰ کی ہدایت

٭ اِنڈیا اتحادکے  2؍ روزہ اجلاس کا آج سے ممبئی میں آغاز

٭ ریاست میں بارش کی صورتحال کے پیش نظر راشٹر وادی کانگریس کے ریاستی صدر جینت پاٹل نے قحط سالی کے

اعلان کرنے کا کیا مطالبہ


علاقائی خبریں ختم ہوئیں

آپ یہ خبر نامہ ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سماچار اورنگ آباد 

Aurangabad AIR News    پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭





आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 31.08.2023, रोजीचे सकाळी: 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 August 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ ऑगस्ट  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचं संरक्षण करण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात

·      राज्यात पावसाची स्थिती पाहता दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

·      लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन

·      औरंगाबाद आणि उस्मानबादच्या नामांतराविषयीची अंतिम अधिसूचना अद्याप काढलेली नसल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण

·      रक्षाबंधनाचा सण मराठवाड्यात अनेक ठिकाणी अभिनव पद्धतीने साजरा

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा नेपाळवर २३८ धावांनी विजय, भारताचा पहिला सामना येत्या शनिवारी

सविस्तर बातम्या

राज्यातल्या पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते. नॅशनल वेटलॅण्ड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचं सर्वेक्षण, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करावं, त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात एकूण ७५ रामसर क्षेत्र असून, त्यापैकी महाराष्ट्रात नांदूर - मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या तीन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात २३ हजार पाणथळ जागा असून, त्यांचं सर्वेक्षण, मान्यताप्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातल्या पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या अकृषी विद्यापीठ क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयं आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी, २०२४ ते २९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या, राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात एक हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालयं सुरु करता येणार आहेत. २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक ठिकाण आराखड्यामध्ये महाविद्यालयांसाठीची १ हजार ५३७ नवीन ठिकाणं प्रस्तावित होती, त्यापैकी १ हजार ४९९ ठिकाणं पात्र ठरली आहेत.

****

संविधानाचं रक्षण या एकमेव उद्दिष्टासाठी आपण एकत्र आल्याचं, इंडिया आघाडीचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे, या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असून, केंद्र आणि राज्य सरकार कुठे आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नसून, आघाडीचा सामुहिक कार्यक्रम काय असावा याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. या आघाडीत वेगवेगळे पक्ष आहेत, मात्र किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही पुढे जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात कोणाशी युती अथवा आघाडी करणार नाही, तर सर्वच निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची माहिती, तेलंगणाचे अर्थ मंत्री हरिष राव यांनी दिली आहे. ते काल सोलापुरात बोलत होते. पुढील महिन्यात सोलापूरात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापूर इथल्या स्थानिक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

****

आदिवासींच्या विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहीती उपलब्ध होण्यासाठी, राज्यातल्या १७ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये येत्या मार्च महिन्यापासून बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी ही माहिती दिली. सध्या नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने प्रायोगिक स्वरुपात बेंचमार्क सर्वेक्षण सुरु करण्यात येत असून, आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केलं जाणार आहे. असं सर्वेक्षण यापूर्वी १९९६-९७ साली झालं होतं. त्यानंतरच्या काळात आदिवासींसाठी राबवण्यात आलेल्या योजनांची फलश्रुती काय आहे, तसंच सध्या राज्यातल्या आदिवासींची रोजगार, शिक्षण, आर्थिक, तसंच सामाजिक स्थिती नेमकी काय आहे, याच अनुषंगानं हे बेंचमार्क सर्वेक्षण करण आवश्यक असल्याचं गावीत यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्यात पावसाची स्थिती पाहता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. खरिपातल्या बहुतांश पिकांचं नुकसान झालं असून, चारा पिकांचं देखील नुकसान झालं आहे, याकडे पाटील यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे. राज्यात या महिन्याअखेर पर्यंत सरासरीच्या २९ टक्के इतका पाऊस ठराविक ठिकाणी झाला असून, चालू परिस्थितीत ३२९ महसुली मंडळात, पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करून आवश्यक त्या उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणीही पाटील यांनी या पत्रातून केली आहे.

****

राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचं विचाराधीन असल्याचं, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांची रोपं येत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, तातडीने उपलब्ध करुन द्यावं, कालमर्यादेत हे काम पूर्ण करावं, असे निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

****

लातूर सह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी अत्यावश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्याच्या दृष्टीनं, आवश्यक असलेल्या जमिनीचं अधिग्रहण करून विमानतळावरची उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्यात येतील असं आश्वासनही सामंत यांनी दिलं.

****

राज्यमंत्रीमंडळाचा लवकर विस्तार करून सामाजिक आणि न्याय मंत्रीपद हे रिपब्लिकन पार्टीला देण्यात यावं अशी मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत दोन तर विधानसभेला दहा ते बारा जागा देण्यात याव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे. अमित शहा आणि जे पी नड्डां यांच्याशी बोलून मायावतींना राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएमध्ये आमंत्रित करणार असल्याची माहितीही आठवले यांनी यावेळी दिली. मराठवाडा विकासाचा विशेष आराखडा राज्य सरकारने तयार करावा, यंदा पाऊस कमी झाला असल्याने लगेच दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्याही आठवले यांनी यावेळी केल्या.

****

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविषयीची अंतिम अधिसूचना अद्याप काढलेली नसल्याचं, राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणार्या याचिकेसह अनेक रिट याचिकांवर काल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. जिल्हा आणि महसूल पातळीवर नामांतराची अंमलबजावणी करण्यात अद्याप अधिसूचना काढण्यात आली नाही, त्यामुळे ड्राफ्ट अधिसूचनेला आव्हान देणार्या याचिका निरर्थक असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नामांतरावर आक्षेप घेणार्या याचिका न्यायालयानं निकाली काढल्या. तसंच दोन्ही शहरांच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिकांवर येत्या ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.

****

बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यंदा पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं दिसून आलं. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अभिनव पद्धतीने रक्षाबंधन साजरं झालं.

लातूर जिल्ह्यात झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या उपक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पिंपळाच्या झाडाला राखी बांधून वृक्षांचं संवर्धन करण्याचा संदेश नागरिकांना दिला.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना व्यसनापासून मुक्त करावं, यासाठी राज्य नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी, जिल्हा समाज कल्याण अधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन राखी बांधली. जिल्ह्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना राखी बांधल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. पूर्वी बहीण भावाला संकट काळी माझं संरक्षण कर म्हणून, राखी बांधत असे, आता महिला सक्षमीकरण झालं आहे. त्यामुळे आता समाजासमोर असलेल्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी रक्षाबंधन करण्याची आवश्यकता बनसोडे यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद इथं स्वआधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्पात दिव्यांग मुलींनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या आमदार कैलास पाटील, तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना बांधून रक्षाबंधन साजरं केलं. अणदूर इथल्या जवाहर कला वाणिज्य महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा सण साजरा केला, तर परंडा इथं भाजपा महिला मोर्चाच्या वतीने बसस्थानकात एसटी बसचे चालक तसंच वाहक यांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या.

****

अहमदनगरमध्ये राखी पोर्णिमेनिमित्त भारत भारती संस्थेच्या महिला सदस्यांनी एम आय आर सी मधल्या अधिकारी आणि सैनिकांना राखी बांधून अनोख्यारितीनं सण साजरा केला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात पाकिस्ताननं नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने ५० षटकात सहा बाद ३४२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला नेपाळचा संघ २४व्या षटकार १०४ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्देतला भारताचा पहिला सामना परवा शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे.

****

औरंगाबाद इथं आता अंत्यविधी साठीचा परवाना थेट स्मशानभूमी किंवा कब्रस्तानात मिळणार आहे. उद्या एक सष्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हा परवाना याआधी महानगरपालिका कार्यालयातून घ्यावा लागत असे. ही गैरसोय लक्षात घेऊन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी हा परवाना थेट स्मशानभूमी किंवा कब्रस्तान इथं देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, जिल्ह्यातल्या मध्यम, लघु अशा सर्व पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातले सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत.

****

मांजरा धरणातल्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्यानं, धरणातला पाणीसाठा हा फक्त नागरिकांच्या पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठीचं निवेदन अंबाजोगाई इथं उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं. या धरणातून लातूर औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा तसंच काळवटी तलावातून शेतकऱ्यांकडून अवैध रित्या होत असलेला पाणी उपसा बंद करावा, आणि दोन्ही ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

****

शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्यात परळी इथं, येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यांच्या अनुषंगानं संबधित विभागांना करावयाच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

****

हिंगोली इथल्या पंचायत समितीमधल्या रोजगार हमी योजना कक्षात कार्यरत कंत्राटी पालक तांत्रिक अधिकारी जे.एम. पठाण याला, दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल सापळा रचून अटक केली. कनेरगाव इथल्या लाभार्थ्यांचा सिंचन विहिरींचा कुशलचा निधी देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****