Tuesday, 31 October 2017

AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आधुनिक आणि एकसंध भारत घडवण्यासाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या अनमोल योगदानाप्रती सगळ्या भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. दिल्ली इथं आयोजित “मेकींग अ गांधीयन नॅशनलिस्ट : लाईअँड टाईम्स ऑफ सरदार पटेल या दोन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचं नायडू यांनी आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. पटेल यांनी सदैव राष्ट्रहिताला प्राधान्य देत, देशाच्या भविष्याला आकार दिला, असं उपराष्ट्रपती म्हणाले.

****

भाजप सरकारनं नागरिकांना ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवून बुरे दिन आणल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला आज अहमदनगर इथं प्रारंभ झाला, त्यावेळी चव्हाण बोलत होते. सरकारच्या ऑनलाईन खरेदीच्या धोरणावरही टीका करत, चव्हाण यांनी शेतमालाची थेट खरेदी करण्याची मागणी केली. प्रशासन कसं चालवायचं, हे या सरकारला माहीत नसल्याचं चव्हाण म्हणाले.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आल. भाजप सरकारला आ तीन वर्ष पूर्ण झाले, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं दिलेल्या आश्वासनांची जाणीव करुन देण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

****

भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना सत्तेबाहेर ठेवलं जात असल्याचं, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते धुळे इथं एका कार्यक्रमात बोलत होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पुणे औद्योगिक वसाहतीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

****

मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावं यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली, या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

****

फेरीवाल्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी मुंबई हॉकर्स संघटनेनं उद्या आझाद मैदानावर रोजी-रोटी बचाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारनंही केंद्र सरकारच्या पथ विक्रेता अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी करून राज्यातल्या फेरीवाल्यांना परवाना द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

****

लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

रभणी महानगरपालिकेच्या तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे तीन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असेल.

****

औरंगाबाद इथं भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या दूरसंचार सल्लागार समितीची जिल्हास्तरीय बैठक आज खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बीएसएनएलनं दूरध्वनीसह मोबाईल ग्राहकांना मुबलक, स्वस्त आणि जलदगतीनं सेवा पुरवण्याची सूचना खैरे यांनी यावेळी केली.

****

गडचिरोली इथल्या जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडाप यांची मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. मुद्रा बँक योजनेचा प्रचार, प्रसार आणि संनियत्रण करण्यासाठी ही राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.

****

रदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज परभणी इथं एकता दौड घेण्यात आली. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या उपस्थितीत राजगोपालाचारी उद्यानातून सुरू झालेली ही एकता दौड शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, प्रियदर्शनी मैदानात विसर्जित झाली.

****

जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मलेशियाचा दोन शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीचा सामना परवा गुरुवारी होणार आहे.

****

AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017 13.00

Text-AIR News bulletin, Aurangabad 31.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ दुपारी १.०० वा.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला संघटित करण्यासाठी महत्वाची भमिका बजावली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेलांचं योगदान कायम स्मरणात राहील, असं ते म्हणाले. एकता हाच देशाच्या उज्जवल भविष्याचा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यानंतर पंतप्रधानांनी 'एकता दौड'ला हिरवा झेंडा दाखवला.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेडसह राज्यात ठिकठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. नाशिक इथं विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी तर वाशिम इथं जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली.

धुळे, सोलापूर, अहमदनगर, सातारा इथंही एकता दौड काढण्यात आली आणि एकतेची शपथ देण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या एकता दौडमध्ये सहभागी झाले.

****

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार डी पी सावंत, जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कळसकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्यांच्या अखत्यारित येणाऱ्या बँकाच्या विलीनकरणाच्या प्रस्तावांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीची स्थापना केली आहे. रेल्वे तसंच कोळसा मंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या समितीचे सदस्य आहेत. अर्थसेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विच्या माध्यमातून ही माहिती दिली.

****

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालय स्वतः सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वांची आखणी करणार आहे. यादृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळोवेळी आखलेल्या नियमांचं संकलन करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. गुरुग्राम इथल्या रान इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या महिन्यात सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणासहीत अनेक याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यानच न्यायालयानं हे आदेश दिले.

****

निर्यातदारांनी स्वच्छतेविषयीच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं निर्देश वाणिज्य मंत्रालयानं दिले आहेत. या नियमांची पर्तता न करणाऱ्या निर्यातदारांवर कडक कारवाई केली जाईल असं परराष्ट्र व्यापार संबंधीच्या महासंचालकांनी म्हटलं आहे. भारतीय निर्यातदारांकडून वस्तूची निर्यात होताना, स्वच्छता नियमाचं उल्लघंन होत असल्याचं महासंचालकांनी कृषी विभागाच्या निदर्शनाला आणून दिलं आहे.

****

गेल्या वर्षी जगभरात क्षयरोगाचे एक कोटी नवीन प्रकरणं समोर आली असून, त्यात ६४ टक्के भारतीयांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या जागतिक क्षयरोग अहवालात ही माहिती देण्यात आली. भारतात २०१६ या वर्षात १७ लाख लोकांचा क्षयरोगानं मृत्यू झाला, हे प्रमाण २०५च्या तुलनेत कमी झालं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  

****

मुंबईतल्या एलिफिन्स्टन स्थानकावर नवीन पादचारी पुल भारतीय लष्कराकडून बांधण्यात येणार आहे. या स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानकांवरच्या अरुंद पुलामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. करी रोड आणि अंबिवली स्थानकावरचे पादचारी पुलही लष्कर बांधून देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इथं आयोजित वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असं सांगितलं. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असंही ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होत आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंच्या भोवतालची अतिक्रमणं येत्या डिसेंबर अखेर पर्यंत काढावीत असे आदेश विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहराला जागातिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ऐतिहासिक दृष्ट्या वारसा संवर्धन होण्यासाठी तसंच शहराच्या पर्यटन विकासासाठी औरंगाबाद शहर, जागतिक वारसा शहर म्हणून युनेस्कोद्वारे घोषित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 31.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर आज `राष्ट्रीय एकता दिवस' साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली.

यानिमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात 'एकता दौड'ला हिरवा झेंडा दाखवला.

मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं आयोजित एकता दौडला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला.

****

औरंगाबाद शहरातही आज सकाळी क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. लातूर इथं अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी एकतेची शपथ दिली.

जालना इथंही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली. नांदेड इथं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी एकता दौडच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना शपथ दिली. ठिकठिकाणच्या या आयोजनांमध्ये विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३३ वी पुण्यतिथी. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. आज देशभरात अनेक कार्यक्रमांच्या आयोजनतून इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात येत आहे.

****

कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं आज पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. दर्शनबारीत उभ्या असलेल्या वारकऱ्यांपैकी कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्याच्या हडगल्ली इथले बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. औरंगाबाद नजिक प्रति पंढरपूर इथं भाविकांनी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली आहे.

****

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभापती आणि उपसभापती पदावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असून, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या गटाची सरशी झाली आहे. शिवसेनेला मात्र या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

****




AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date: 31.10.2017, Time: 8.40- 8.45 AM



Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 October 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍اکتوبر  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 سر دار ولبھ بھائی پٹیل کی142؍ ویں جینتی آج ملک بھر میں یوم یکجہتی کے طور پر منا ئی جا رہی ہے۔ اِس خصوص میں ملک بھر میں مختلف پرو گرام منعقد کیئے گئے ہیں۔ ملک کے626؍ اضلا ع میں آج یکجہتی دو ڑ کا انعقاد کیا گیا ہے۔ نئی دہلی کے میجر دھیان چند اسٹیڈیم میں منعقدہ پروگرام میں وزیر اعظم نریندر مودی نے شر کت کی اور ہرا جھنڈا دِکھا کر یکجہتی دوڑ کا افتتاح کیا۔
 اورنگ آ باد شہر میںبھی آج صبح کرانتی چوک سے یکجہتی دوڑ منعقد کی گئی۔ مراٹھواڑہ کے جالنہ، پر بھنی،ہنگولی ،ناندیڑ، لاتور، عثمان آ باد اور بیڑ اضلاع میں یکجہتی دوڑ سمیت مختلف پرو گرام منعقد کیئے گئے۔
 ناندیڑ ڈویژن کے مختلف ریلوے اسٹیشنوں پر بھی قو می یوم یکجہتی منا یا جا رہا ہے۔ اِس خصوص میں منعقد کیئے جانے والے پروگرام میں اسکولوں کے طلباء ،معروف شہری اور  ریلوے افسران و ملازمین شر کت کر رہے ہیں۔
****************************
 زرعی پمپ رکھنے والے کسا نوں کے لیے ریاستی حکو مت نے ’’مُکھیہ منتری کرشی سنجیو نی یو جنا2017؁ ‘‘کا اعلا ن کیا ہے۔ اِس اسکیم کے تحت جن کسا نوں کے ذمہ بجلی کے بل بقا یا ہیں اُنھیں جر ما نہ اور سود معاف کر کے محض بقا یا رقم 5؍ آسان اقسا ط میں ادا کر نا ہو گی۔ اِس اسکیم کا اعلان ریاست کے وزیر توا نا ئی چندر شیکھر با ون کوڑے نے کل کیا۔ جن کسا نوں کے ذ مہ30؍ ہزار روپئے سے کم کے بل واجب الادا ہوں اُنھیں 5؍ یکساں اقساط میں اور جن کے ذمہ30؍ ہزار سے زائد بل ہوں اُنھیں10؍ یکساں اقساط میں یہ بل ادا کر نے کی سہو لت دی گئی ہے۔
 رواں ماہ کا بجلی بل نومبر2017؁ تک ادا کر نا ہو گا اور اِس کے بعد سا بقہ بلوں کے اقساط ادا کیئے جا سکینگے۔ وزیر موصوف نے بتا یا کہ جو کسا ن اِس اسکیم میں شامل نہیں ہونگے اُن کی بجلی کاٹ دی جائے گی۔
****************************
 وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ اسمبلی کے سر مائی اجلاس سے قبل ریاستی کا بینہ میں توسیع کی جائے گی اور سوا بھیما نی پار ٹی کے قائد نا رائن رانے کو مجلس وزراء میں شامل کیا جائے گا۔بی جے پی کی زیر قیا دت ریاستی حکو مت آج اپنے3؍ سال مکمل کر رہی ہے اِس ضمن میں وزیر اعلیٰ کل ممبئی میں منعقدہ ایک تقریب سے خطاب کر رہے تھے۔
 ریاستی اسمبلی کا سر مائی اجلاس آئندہ 11؍ دسمبر سے شروع ہو گاپھڑ نویس نے بتا یا کہ کا نگریس سے علحدگی اختیار کرنے والے نا را ئن رانے کو ریاستی حکو مت میں بی جے پی کے کوٹے سے وزیر بنا یا جائے گا۔
****************************
 شیو سینا پر تنقید کر تے ہوئے وزیر اعلیٰ نے کہا کہ شیو سینا بیک وقت بر سر اقتدار جما عت اور حزب اختلاف کا کر دار ادا نہیں کر سکتی۔  شیو سینا کے چند قائد ین نے ریاستی حکو مت کے ہر فیصلے پر نکتہ چینی کر نے کی عادت ڈال رکھی ہے اور عوام کو یہ بات ہضم نہیں ہو تی۔
 دریں اثناء حکو مت کے3؍ سال مکمل ہو نے پر کانگریس اور راشٹر وادی کانگریس حکو مت کی3؍ سالو ںمیں تمام محاذوں پر نا کا می کو اُجا گر کرنے کے لیے ریاست بھر میںایک ہفتہ طویل ایجی ٹیشن کریگی۔
****************************
 ریاستی حکو مت نے عین دیوالی کے موقع پر ہڑ تال پر جانے والے ایس ٹی ملا زمین کی36؍ دنوں کی تنخواہیں کاٹنے کا فیصلہ کیا ہے۔ 6؍ ماہ کے عر صے میں یہ رقم تنخواہوں میں سے مر حلہ وار کا ٹی جائے گی۔ کل اسٹیٹ ٹرانسپورٹ کار پو ریشن کی جانب سے جا ری کردہ بیان میں بتا یا گیا کہ ضوا بط کے مطا بق ہڑ تال کے با عث ہونے والے نقصان کی بھر پائی کے لیے ایک دن کی ہڑ تال پر8؍ دن کی تنخواہ کا ٹی جاتی ہے اور ایس ٹی ملازمین نے4؍ روز تک ہڑ تال جاری رکھی تھی۔ ممبئی عدالت عا لیہ کی جانب سے ہڑ تال کو غیر قا نو نی قرار دیئے جانے کے بعد ایس ٹی ملا زمین کی تنظیموں نے اپنی ہڑ تال ختم کی تھی۔
 دریں اثناء اِن تنظیموں نے حکو مت کے اِس فیصلے کو نا انصا فی قرار دیتے ہوئے فیصلے کے خلاف ممبئی صنعتی عدالت سے رجوع کرنے کا فیصلہ کیا ہے۔
****************************
 تعمیرات عامہ کے وزیر چندر کانت پاٹل نے کہا ہے کہ ریاست کے96؍ ہزار کلو میٹر طویل راستوں پر موجود گڑھوں کو آئندہ 15؍دسمبر سے قبل بھردیاجا ئے گا۔ کل پنڈھر پور میں اخبا ری نمائندوں سے گفتگو کر تے ہوئے اُنھوں نے بتا یا کہ سڑ کوں پر موجود گڑ ھوں کو بھر نے کے لیے ٹینڈر جاری کیئے جا چکے ہیں۔
****************************
 بیڑ ضلع امدا با ہمی بینک کے ساتھ جعلسا زی کے الزام میں راشٹر وادی کانگریس کے رکن اسمبلی امر سنگھ پنڈت اور سا بق وزیر شیو اجی رائو پنڈت سمیت28؍ افراد کے خلاف گیو رائی پو لس اسٹیشن میں مقد مہ درج کیا گیا ہے۔ امر سنگھ پنڈت نے جئے بھوا نی  امداد با ہمی شکر کار خا نے کے لیے اِس بینک سے 14؍ کروڑ روپئے قرض لیے تھے۔ اور ضما نت کے طور پر کار خا نے کی زمین رہن رکھی تھی۔ لیکن جعلی دستا ویزات تیار کر کے پنڈت نے یہ زمین کسی اور شخص کو ساڑھے تین لاکھ روپئے میں فروخت کر دی۔ بینک کے منیجر کی شکا یت پر اِن افراد کے خلاف یہ مقد مہ درج کیا گیا ۔
****************************

AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017 06.50

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४२वी जयंती; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

** कृषीपंप धारक शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७जाहीर; दंड आणि व्याज माफ

** हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचा समावेश करणार- मुख्यमंत्री

** राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळाची भरपाई म्हणून ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय

आणि

** बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह एकूण २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४२वी जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातल्या ६२३ जिल्ह्यात या निमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद मैदानात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. औरंगाबाद शहरातही आज सकाळी क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही एकता दौडसह विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. काही वेळातच सर्व जिल्ह्यांमध्ये एकता दौडला प्रारंभ होणार आहे.

नांदेड विभागातल्या विविध रेल्वे स्थानकावर आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत असून या निमित्त, एकता दिंडी काढण्यात येणार आहे. विविध शाळांचे विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक आणि रेल्वे अधिकारी तसच कर्मचारी या दिंडीत हभाग होतील.

****

वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंप धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७जाहीर केली आहे. या योजनेमध्ये वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज माफ करून मूळ थकबाकीची रक्कम पाच समान हप्त्यात भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तीस हजार रूपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांना पाच समान हप्ते तर तीस हजार रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना दहा समान हप्त्यात थकबाकी भरता येणार आहे. चालू वीज बिल नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावं आणि त्यानंतर समान हप्त्यातली थकबाकी भरण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असं ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचा समावेश केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारला आज  तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत बोलत होते. हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होत असून काँग्रेस मधून बाहेर पडलेले, नारायण राणे भाजपच्या कोट्यातून मंत्रीमंडळात येतील असं ते म्हणाले. शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा एकाचवेळी दोन भूमिका घेऊ शकत नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काही सेना नेत्यांना सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात बोलण्याची सवय झाली असल्याचं सांगितलं. जनतेला ही बाब आवडत नसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजपासून आठवडाभर आंदोलन करणार आहे.

****

दिवाळीच्या कालावधीत संपावर गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय राज्यशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्यानं हा पगार कापला जाणार आहे.

चार दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत नियमानुसार एका दिवसामागे आठ दिवस असा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. याबाबतचे आदेश काल परीवहन महामंडळाच्यावतीनं जारी करण्यात आले.

दरम्यान, ही पगार कपात अन्यायकारक असून, एस टी कर्मचारी संघटना मुंबई औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला होता.

****

राज्यातल्या सुमारे ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यावरचे खड्डे येत्या १५ डिसेंबर पर्यंत बुजवण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शासकीय महापूजेनिमित्त पंढरपूर इथं आले असताना काल वार्ताहरांशी ते बोलत होते.

रस्ते बुजवण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह एकूण २८ जणांविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

अमरसिंह पंडित यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी १४ कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून कारखान्याची जमीन  ठेवली होती, मात्र  पंडित यांनी बनावट कागदपत्रं तयार करून एका व्यक्तीला परस्पर ही जमीन साडेतीन लाख रुपयांना विकली. या प्रकरणाबाबत बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

समाजातल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जनएकता जनाधार आंदोलनच्या वतीनं काल सायंकाळी देशभरात मशाल मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद इथं ही पैठण दरवाजा ते सिटी चौक मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतमालाला हमी भाव द्यावा, आरोग्य सेवेचं खासगीकरण करू नये, शिक्षण क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करावी, कामगारांच्या किमान वेतनात वाढ करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पशु वैद्यकीय विद्यापीठाचं उपकेंद सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, उस्मानाबादचे सहपालकमंत्री महादेव जानकर यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केलं, याचा ‘उस्मानाबाद पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवण्याचा विचार केला जाईल, असं उस्मानाबादचे  पालकमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या शेतीला बळ देण्याकरिता एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचा मानस असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकलचर यांच्या वतीनं आयोजित विभागीय सीताफळ कार्यशाळेत काल ते बोलत होते.

सीताफळाच्या माध्यमातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी केलं.

****

राज्यात कालपासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला. काल यानिमित्तं, सरकारी तसंच निमसरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. कालबाह्य आणि अतिरिक्त प्रक्रिया कमी करून, कामकाजातली पारदर्शकता वाढवल्यास, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येऊ शकेल, असं राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यानिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हंटलं आहे.

****

शिक्षकांच्या बदलीच्या धोरणा विरुद्ध, बीड जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्यावतीन काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि  शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.  

समाजकल्याण विभागानं विविध योजना करिता मंजूर केलेला निधी, राज्य सरकार इतर कामासाठी वापरत असल्याच्या निषेधार्थ बीड इथं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल धरणं आंदोलन करण्यात आलं.

****

वाचनाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षक, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन,  जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचं उद्घाटन  पालकमंत्री  लोणीकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.  एकाच ठिकाणी अनेक ग्रंथ उपलब्ध करून देणाऱ्या या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****










Monday, 30 October 2017

AIR News Bulletin, Aurangabad 30.10.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सशक्त समाज आणि माध्यमं भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज सतर्कता जागरुकता सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कुशलता यामुळे भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन होऊ शकतं, असं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळासाठी अडचणी आल्या, मात्र त्याचे दीर्घकालिन फायदे होतील, असं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.

****

नवीन आव्हानांना सामोरं जाण्यास राज्यांची पोलिस दलं अत्याधुनिक आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरि पाठिंबा देईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत एका कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. तंत्रज्ञानामुळे उग्रवादाचे नवीन मार्ग समोर येत असल्यामुळे पोलीस आणि जनतेनं सावध राहिलं पाहिजे, असं सिंग यांनी नमूद केलं. काही शेजारी राष्ट्र तसंच आयसिस सारख्या संघटनांचे भारतात समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या काळात यशस्वीपणे हाणून पाडल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएचे प्रमुख म्हणून योगेश चंदर मोदी यांनी आज कार्यभार स्वीकारला. आसाम मेघालय कॅडरचे १९८४च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतले अधिकारी असलेले मोदी २०२१ पर्यंत या पदावर राहणार आहेत.

****

वस्तू आणि सेवा कर अंतर्गत व्यावसायिकांना जुलै महिन्यासाठी जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. जीएसटी दोन साठीची मुदत ३० नोव्हेंबर तर जीएसटी तीन साठीची मुदत अकरा डिसेंबर करण्यात आली आहे.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद मैदानात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. औरंगाबाद शहरातही उद्या सकाळी क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

रायगड जिल्हा प्रशासनानं रायगड किल्ल्यावर प्लास्टिकला बंदी केली आहे. ज्यांना पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिक पिशव्या किल्ल्यावर न्यायच्या आहेत अशांना रोपवे जवळ प्रत्येक बाटली तसंच पिशवीमागे २५ रूपये अनामत ठेवावी लागेल. किल्ल्यावरून परत आल्यानंतर बाटली आणि पिशवी परत केल्यावर अनामत रक्कम परत मिळवता येईल. किल्ल्यावर होणाऱ्या अस्वच्छतेमुळे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला.  

****

सर्वसामान्य गुंतवणुकदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. आज सोलापूर इथं, आयोजित नागरी सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यात अनेक पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडल्यानं ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडलेल्या असल्यानं, हा निर्णय घेतल्याचं देशमुख म्हणाले. पतसंस्थांनी व्यावसायिकता जपावी, तसंच ग्राहकांचं हित लक्षात घेवून नेटका कारभार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

राज्यात मध्यावधी निवडणुका लढवण्यास शिवसेना सज्ज असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात घेतलेल्या विविध बैठका म्हणजे निवडणूक तयारीचा एक भाग असल्याचं सांगून राऊत यांनी, सरकार पक्षच जाणीवपूर्वक मध्यावधी निवडणुकीची चर्चा पसरवत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे आरोप हे राजकीय नैराश्येपोटी करण्यात आले असल्याचं, असं भाजपचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

****

समरसता साहित्य परिषदेचं अठरावं समरसता साहित्य संमेलन येत्या नऊ आणि १० डिसेंबरला अहमदनगर मध्ये होणार आहे. भटके विमुक्तीचे साहित्य आणि समरसता हा या संमेलनाचा विषय आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक गिरिश प्रभुणे यांची निवड झाली आहे. या संमेलनात चार परिसंवाद, कविसंमेलन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती असे कार्यक्रम होणार आहेत.

****

रत्नागिरीत येत्या तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान दहावा पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या अनुषंगानं एक हजार पणत्या प्रज्वलित करून या पुलोत्सवाला प्रारंभ होणार असून, पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी पुलोत्सवाची सांगता होणार आहे.

****

AIR News Bulletin, Aurangabad 30.10.2017 13.00

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०१ दुपारी १.०० वा.

****

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे. सांघिक शासन पद्धतीत एक राज्य संसदेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कशी काय दाखल करु शकतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, यासंदर्भात केंद्र सरकारनं चार आठवड्यात उत्तर द्यावं, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी परत सुरु करण्याच्या विरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ७० वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येच्या प्रकरणाचा परत एकदा तपास करण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे.  

****

जम्मू काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्यावरून काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलेल्या विधानावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कडक टीका केली आहे. दहशतवादाविरोधात सरकार कडक उपाययोजना करत असताना, चिदंबरम यांनी अत्यंत चुकीचं विधान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते शिमला इथं आकाशवाणीच्या बातमीदारांशी बोलत होते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दूरसंवाद आणि चलन वगळता, अन्य सर्व क्षेत्रातले हक्क जम्मू काश्मीरची जनता बजावत असताना, आणखी कोणते हक्क चिदंबरम यांना अपेक्षित आहेत, असा सवाल जेटली यांनी यावेळी केला. 

****

गुजरात इथं अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संशयित दहशतवाद्याबरोबर आपला संबंध असल्याच्या कथित आरोपाची निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून पटेल यांनी ही मागणी केली आहे. सुरत इथं इस्लामिक स्टेटच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर पटेल यांच्याशी त्यांच्या कथित संबंधांवरून राजकीय वादळ निर्माण झालं आहे. या प्रकरणी आपलं आपलं नाव जोडून, आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचं पटेल यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटीलोनी भारत दौऱ्यावर आले असून, राष्ट्रपती भवनात आज त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेंटीलोनी यांच्यात नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा सुरु आहे. 

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या साजरी होत असून या निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

****

रेल्वे विभाग पुढच्या पाच वर्षात १५० बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तमुंबई एका कार्यक्रमात बोलत होते. यामुळे १० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. सरकारच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशात रेल्वे महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्यास स्थानिक उत्पादनात वाढ होऊ शकते, असं त्यांनी नमूद केलं.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी रचना अधिक आकर्षक बनवण्यासाठी उत्पादन आणि उपाहारगृहांच्या करात एक टक्क्यानं घट करण्याची शिफारस जीएसटी रचना योजनेवर काम करणाऱ्या  मंत्र्यांच्या समितीनं केली आहे. सध्या वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या, एक कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना दोन टक्के आणि उपहारगृहांना पाच टक्के कर भरावा लागतो.   

****

माथेरान मधली प्रसिद्ध रेल्वेसेवा दिड वर्षाच्या खंडानंतर आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू झाली आहे. एक नोव्हेबर रोजी नेरळ स्थानकात रेल रोको करण्याचा इशारा माथेरानच्या नागरिकांनी दिला होता, मात्र त्यापूर्वीच ही सेवा पुन्हा सुरू झाली. मागील वर्षी मे मध्ये सलग दोन अपघात झाल्यानंतर ही रेल्वे बंद केली गेली होती. माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता.

****

फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅटमिंटनपटू किदंबी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे. श्रीकांतनं जिंकण्याची सवय लावून घेतली असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे, तर मोदी यांनी श्रीकांतवर देशाला अभिमान असल्याचं ट्वीट केलं आहे. २३ वर्षीय श्रीकांतचं हे गेल्या आठवठ्यातलं हे दुसरं, गेल्या पाच महिन्यात चौथं तर आजवरच्या कारकिर्दीतलं सहावं अजिंक्यपद आहे. या वर्षात श्रीकांतनं आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशिया आणि आता फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

****