Wednesday, 30 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचा दिनांक 30.11.2022 रोजीचा वृत्तविशेष कार्यक्रम

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.11.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  30 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.

·      किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये तर गड किल्ले संवर्धनासाठी दूर्ग प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन.

आणि

·      तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना अनिर्णित; भारतानं मालिका गमावली तर हॉकी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. टेबलटेनिपटू शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ॲथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ३३६व्या शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्यदैवत आहेत, त्यांच्या विचारांनुसारच आम्ही राज्यकारभार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड फुलांच्या तोरणासह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, माजी कुलगुरु डॉ.नागनाथ कोत्तापल्ले याचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या वर्षी कर्करोगाचं निदान झालेले कोत्तापल्ले यांना विषाणू संसर्ग झाल्यामुळे पंधरा दिवसांपासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान, त्यांचं आज दुपारी निधन झालं. कोत्तापल्ले यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –

२९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं जन्मलेले कोत्तापल्ले यांनी देगलूर इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवी तसंच पदव्युत्तर पदवीत त्यांनी कुलपतींचं सुवर्णपदक पटकावलं होतं. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९८० साली त्यांनी पीएच. डी. पदवी मिळवली. बीड इथं मराठीचे अधिव्याख्याता, त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्याता आणि प्रपाठक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिल्यावर २००५ साली ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.

 

राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. श्रीगोंदा इथं १९९९ साली झालेलं ग्रामीण साहित्य संमेलन तसंच २००५ साली जालना इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण इथं २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

 

कोत्तापल्ले यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. ‘मूड्स’ कृष्णमेघ हे कवितासंग्रह, ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ आदी कथासंग्रह, ‘राजधानी’ हा दीर्घकथा संग्रह, ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबऱ्या, ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि बोध’, अस्तित्वाची शुभ्र शिडे, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘साहित्याचा अवकाश’ ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, आदी समीक्षात्मक ग्रंथ, ‘जोतीपर्व’ हे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ आदी पुस्तकांचं संपादनही कोत्तापल्ले यांनी केलं आहे. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

 

नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य, यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

माजी मंत्री सुरेश जैन यांना घरकूल घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी जैन यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला होता, मात्र आता न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.

****

माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध करणाऱ्या पीएमएलए न्यायालयात मलिक यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत सक्तवसुली संचालनालय-ईडीने त्यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला. ईडीपूर्वी आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं, मलिक यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

****

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातील ११ दोषींना २० वर्षांच्या कारावासानंतर गुजरात सरकारने १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुक्त केलं होतं. बिल्किस बानो सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका यांनी दाखल केली आहे.

****

मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने आपला अहवाल दिल्यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती, खंडपीठाने धस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्याला धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानं, धस आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात आठ मंदिरांची जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका न्यूझीलंडने एक शून्यने जिंकली आहे. मालिकेत आजचा तिसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारतानं प्रथम फलंदाजी करत, सर्वबाद २१९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने १८ षटकांत एक बाद १०४ धावा केलेल्या असताना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ या आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपासून बांगलादेशसोबत तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका तर १४ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच हॉकी सामन्यांच्या मालिकेत भारताने आज ऑस्ट्रेलियाचा चार -तीन असा पराभव केला. भारताकडून मनप्रितसिंग, अभिषेक, समशेरसिंग, आणि अक्षयदीपसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. मालिकेत पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलिया दोन एकने आघाडीवर आहे. चौथा सामना तीन तारखेला तर पाचवा सामना चार तारखेला होणार आहे. २०२३ च्या जानेवारी महिन्यात ओडिशात होणाऱ्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. 

****

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. आज सकाळी १० वाजता वर्णी महापूजा झाली, पुढचे आठ दिवस कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम मंदिरात राबवले जाणार असून, सात डिसेंबरला होम-हवन आणि महापूजेने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद शहरातील रिक्षा चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ३३६व्या शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई बरोबरच राज्यातल्या इतर भागात गोवरच्या संशयित रुग्णांबाबत सतत माहिती घेतली जावी, सर्व महापालिकांमध्ये गोवर प्रतिबंधात्मक विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात यावा आणि लसीकरणाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२२ साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं तर २०२१ साठीच्या राष्ट्रीय साहस पुरस्कारांचं वितरण आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात होणार आहे. २०२२ च्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू शरथ कमल अचंता याची निवड करण्यात आली आहे. याशिवाय २५ खेळाडूंना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार तर पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारांचं वितरणही यावेळी होणार आहे.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या ८९ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. दोन कोटी ३९ लाख मतदार ७७८ उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी निवडणूक आयोगानं केली आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एक पर्यावरणपूरक मतदान केंद्र, एक नमुना मतदान केंद्र असेल तर प्रत्येकी एका मतदान केंद्रात दिव्यांग नागरिक पूर्ण काम पाहतील. याशिवाय ११ सखी मतदान केद्रांमध्ये सगळं कामकाज महिला निवडणूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात असेल तर १८ युवा मतदान केंद्रांचं नियंत्रण तरुण कर्मचारी वर्गाकडे राहील. गीरच्या जंगलात फक्त एकाच मतदारासाठी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे, एक मतदान केंद्र मालवाहतुकीच्या वाहनावर तर एक अरबी समुद्रातल्या एका बेटावरही कार्यरत असेल.

****

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर आज बंगळुरुमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत. मुंबईत काल सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा, याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा तक्रारी आल्यास त्याची त्याची तत्काळ सोडवणूक करा, असं सत्तार यांनी सांगितलं. 

****

औरंगाबाद शहरातले रिक्षा चालक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रिक्षा चालकांच्या विविध मागण्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती, औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रिक्षा मीटर कॅलेब्रेशनसाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, वाहतूक पोलिसांची शहरात रिक्षा चालकांविरोधात मोहिम सुरु असून रिक्षा चालकांना २८३ च्या कलमाखाली गुन्हे दाखल करुन नये आदी मागण्या रिक्षा चालकांनी केल्या आहेत.

****

जागतिकड्स दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण पथक आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं उद्या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय उद्या सकाळी साडे आठ वाजता क्रांती चौक इथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देन त्यांचं अभिनंदन केलं.

//**********//

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

किल्ले प्रतापगड इथं शिवप्रताप दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित केलेले विविध कार्यक्रम जल्लोषात सुरू आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गडावरील भवानीमातेची पूजा करत अभिषेक केला. यानंतर गडावरील ध्वजस्तंभाचं पूजन झालं.

****

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर आज बंगळुरुमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

देशातून निर्यात झालेल्या मोबाइल फोन्सची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान दुप्पट झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सात महिन्यांमध्ये भारतानं पाच बिलियन डॉलर किंमतीचे मोबाइल फोन निर्यात केले आहेत. उत्पादन क्षेत्रात भारताची घोडदौड सुरूच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या जीईएम या ऑनलाइन मंचावरून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आत्तापर्यंत झालेल्या विक्रीनं एक लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. विविध मंत्रालयं आणि विभागांनी या मंचावरून उत्पादनं आणि सेवांची खरेदी केल्यामुळे ही वाढ झाली आहे.

****

भारतीय प्रशासकीय सेवेतल्या माजी अधिकारी प्रीती सुदन यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ मनोज सोनी यांनी त्यांना शपथ दिली.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान क्राईस्टचर्च इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर २२० धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ ४८ व्या षटकात २१९ धावांवर सर्वबाद झाला.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड आणि सेनेगल संघांनी अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने कतारचा दोन - शून्य असा, तर सेनेगलनं इक्वेडोरचा दोन - एक असा पराभव केला.

//**********//

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 30؍ نومبر 2022 ؁ ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 30 November 2022

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۰؍  نومبر  ۲۰۲۲؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے ...

٭ شولاپو ر  -   تلجا پور  -   عثمان آباد ریلوے راستے کے لیے ریاستی حکو مت کا 452؍ کروڑ  روپیوں کا فنڈ منظور

٭ پر دھان منتری آواس یو جنا کے تحت کرائے داروں کے دستا ویزات کو ایک ہزار روپئے اسٹیمپ ڈیو ٹی

عائد کرنے کا ریاستی حکو مت کا فیصلہ

٭ دیہی علاقوں میں اِنٹر نیٹ سہو لتوں میں اضا فہ کرنے کے لیے 2؍ ہزار 386؍ دیہاتوں میںBSNL  کے

ٹا ورس نصب کرنے کے لیے ریاستی حکو مت 200؍ مربع میٹر اراضی مفت دے گی 

٭ معذوروں کی تر قی کے لیے علیحدہ معذور بہبود محکمہ قائم کر نے کے لیے کا بینہ کی منظوری

٭ ریاست میں پولس بھر تی کے لیے در خواستیں دینے کے لیے 15؍ دسمبر تک توسیع

٭ ملک میں ریٹیل کار وبار کے لیے ڈیجیٹل روپئے کرنسی کے استعما ل کی تجر باتی سطح پر کَل سے شروعات

٭ اِنڈو نیشیاء کے سینارامس پلپ اینڈ پیپر کمپنی کو رائے گڑھ میں287؍ ہیکٹر اراضی تقسیم کا مکتوب دیا گیا

٭ گنا پیدا وار کسانوں کو یکمشت ایف آر پی دینے کا فیصلہ آئندہ ہنگام سے وزن کرنے کے لیے ڈیجیٹل میزان شروع کیے جا ئیں گے 

اور

٭ نیوزی لینڈ کے خلاف آخری ایک روزہ کر کٹ مقابلے کا آغاز  ‘  بھارت کی پہلے بلّے بازی 


اب خبریں تفصیل سے...

ٌٌ شولا پور-تلجا پور-عثمان آ باد اِس ریلوے راستے کے کام میں تیزی لا نے کے لیے ریاستی حکو مت نے اپنے حصے کا452؍ کروڑ46؍ لاکھ روپیوں کا فنڈ منظور کیا ہے ۔ وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے کی صدارت میں کَل ہوئی کا بینی میٹنگ میں یہ فیصلہ کیا گیا ۔ اِس پرو جیکٹ کے لیے904؍ کروڑ92؍ لاکھ روپئے خرچ آئے گا ۔ اِس میںسے50 ؍ فیصد حصہ ریاستی حکو مت کا ہے ۔ عثمان آ باد ضلعے کے تلجا پور میں مقا می اور دیگر ریاستوں سے کثیر تعداد میں یاتری آتے ہیں ۔ تاہم  ریلوے کی سہولت نہ ہونے کی وجہ سے اُنھیں دقتوں کا مقابلہ کرنا پڑتاہے ۔ اسلے مختلف عوامی نمائندوں نے 

کئی سال سے اِس ریلوے لائن کا مطالبہ کیا تھا ۔ یہ ریلوے لائن 84؍ اعشا ریہ44؍ کلو میٹر طویل ہے ۔ اِس لائن پر

10؍ ریلوے اسٹیشن ہوں گے ۔ اِسی طرح 4؍ سال میں یہ ریلوے راستے کا  کام مکمل کرنے کا منصوبہ ہے ۔

***** ***** ***** 

پر دھان منتری آواس یو جنا کے کرائے داروں کے دستا ویزات پر ایک ہزار روپئے کی اسٹیمپ ڈیو ٹی عائد کرنے کا فیصلہ ریاستی کا بینہ نے لیا ہے ۔ نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے میٹنگ کے بعد صحافیوں کو اِس کی اطلاع دی ۔ اِنٹر نیٹ سہو لتوں میں اضا فہ کرنے کے لیے ڈیجیٹل اِنڈیا مہم میں تیزی لانے کے لیے تمام ریاست میں 2؍ ہزار

386؍ دیہاتوں میں بھارت سنچار نیگم لِمِٹیڈ BSNL کے ٹا ور نصب کرنے کے لیے 200؍ مربع میٹر اراضی مفت دینے کا فیصلہ کَل کی ریاستی کا بینہ کی میٹنگ میں لیا گیا ۔اِس میں  منتخبہ دیہاتوں میںکھلی اراضی یا گائران اراضی مفت دی جائے گی ۔ ضلع کلکٹرس کو اُن کے پاس اِس ضمن میں آئی تجا ویز کو 15؍  یو م میں منظوری دینا ضروری ہے ۔ یہ بات اِس موقعے پر کہی گئی ۔ آزادی کے امرت مہوتسو سال کے75؍ ہزار  عہدوں کی بھر تی کے عمل میں تیزی لانے کی ہدایت وزیر اعلیٰ نے کَل کا بینی میٹنگ میں دی ۔

***** ***** ***** 

معذوروں کی تر قی کے لیے علیحدہ معذور بہبود محکمہ قائم کرنے کے فیصلے کےساتھ دیگر فیصلے اِس میٹنگ میں لیے گئے ۔ اِس کی اطلاع نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے دی ۔ تمام ریاست میں پولس بھر تی کے لیے در خواستیں داخل کرنے کے لیے 15؍ دسمبر تک توسیع کر دی گئی ہے ۔ یہ بات نائب وزیر اعلیٰ پھڑ نویس نے کہی ۔ اب تک 11؍ لاکھ 80؍ ہزار امید واروں نے اِس کے لیے در خواستیں دی ہیں۔ اِنٹر نیٹ  اور  سر ور میں تکنیکی خرابی آنے کی وجہ سے کئی امید واروں کو 

آ ن لائن در خواستیں داخل کرنے میں دشوا ریاں پیش آ رہی ہیں ۔ اِس لیے یہ توسیع کی گئی ہے ۔

***** ***** ***** 

بھارتیہ ریزر وبینک نے اعلان کیا ہے کہ جمعرات کو آزمائشی طور پر ابھی تک کے پہلے ریٹیل ڈجیٹل روپئے کا آغاز کیا جا ئے گا ۔اِس آزمائش میں شر کت کے لیے 8؍ بینکوں کی نشاندہی کی گئی ہے ۔ اِس آزمائش کا آغاز ممبئی  ‘  نئی دِلّی  ‘  بینگلورو  اور  بھوبنیشور  سے کی جا ئے گی   اور  بعد میں اِس کی توسیع احمد آ باد  ‘  گینگ ٹوک  ‘  گوہا ٹی   ‘  حیدر آ باد   ‘  اِندور  ‘  کوچی  ‘  لکھنئو  ‘  پٹنہ  اور  شملہ میں کی جا ئے گی ۔ بعد میں حسب ضرورت اِس آزمائشی قدم میں بتدریج دیگر شہروں  اور  بینکوں کو شامل کیا جائے گا ۔

***** ***** ***** 


***** ***** ***** ***** ***** ***** 

یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** ***** ***** ***** 


مہاراشٹر میں صنعتوں کے لیے بہترین ماحول ہے ۔ زیادہ سے زیادہ صنعتکار ریاست میں سر مایہ کاری کےلیے آگے آئیں ۔ ایسی اپیل وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے نے کہی ہے ۔ اِنڈو نیشیا  میںسینارمس  پلپ اینڈ پیپر کمپنی  کو کَل رائے گڑھ ضلعے کے دھرینڈ میں287؍ ہیکٹر اراضی تقسیم کا مکتوب دیاگیا ۔ اِس موقعے پر وہ مخاطب تھے ۔ صنعتکارو کو تمام سہو لتیں فراہم کی جائے گی ۔ ایسا تیقن وزیر اعلیٰ نے اِس موقعے پر دیاہے ۔

***** ***** ***** 

قانون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی  رہنما امبا داس دانوے نے کَل ممبئی میںICICI لیمبارڈ  جنرل اِنشورنس کمپنی کے آفس جا کر فصل بیمہ  کے ضمن میں جواب طلب کیا ۔HDFC ایگرو اِنشورنس کمپنی لِمٹیڈ  ‘  بھارتیہ زرعی بیمہ کمپنی کے افسران کے ما بین بھی دانوے نے کَل میٹنگ لے کر صل بیمہ کا جائزہ لیا ۔ کسا نوں کو انصاف حاصل ہو اس لیے شیو سینا سخت رول اختیار کررہی ہے ۔ یہ بات اُنھوں نے کہی ۔

***** ***** ***** 

ریاست کے گنا پیدا وار کسانوں کو یکمشت راست  اور  کفا یتی نرخFRP   دینے کا فیصلہ گنا پیدا وار کسانوں کی میٹنگ میں لیا گیا ہے ۔ ممبئی میں وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے کی صدارت میں کَل یہ میٹنگ ہوئی ۔ آئندہ ہنگام سے وزن کےلیے ڈیجیٹل میزان کی شروعات کی جائے ۔ ایسی ہدایت وزیر اعلیٰ نے اِس موقعے پر دی ۔

***** ***** ***** 

مہاراشٹر -کر ناٹک سر حدی مسئلے پر آج سپریم کورٹ میں سماعت ہو گی ۔اِس کے مدِ نظر مہاراشٹر-  کر ناٹک سر حدی علاقوں میں پولس بندوبست تعینات کیا گیا ہے ۔ سماعت کے بعد قا نون اور  امن متاثر نہ ہو  اس لیے بین الریاستی پولس کی میٹنگ ہوئی ۔ اِس میں بندوبست میں اضا فہ کرنے کا فیصلہ کیا گیا۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد کے ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے گریجویٹ گروپ کے سینیٹ انتخاب میں اُتکرش پینل کے5؍ امید وار کامیاب ہوئے ۔ عام زمرے کے ڈاکٹر نریندر کاڑے  اور  شیخ ظہور کامیاب ہوئے ۔

***** ***** ***** 

کسانوں کے مختلف مطالبات کے لیے اورنگ آباد ضلع پیٹھن میں راشٹر وادی کانگریس کی جانب سے راستہ روکو احتجاج کیا گیا ۔

***** ***** ***** 

اورنگ آبا د - پونے شاہراہ پر کَل صبح ایس ٹی بس  اور  گنا توڑ نے کے لیے جا رہی بیل گاڑی کے در میان ہوئے حادثے میں2؍ افراد ہلاک ہو گئے ۔ اِس حادثے میں ایک بیل بھی ہلاک ہو گیا  اور  بیل گاڑی چورا ہو گئی ۔

***** ***** ***** 

بھارت   اور  نیو زی لینڈ کے در میان ایک روزہ کر کٹ مقابلے کی سیریز کا تیسرا  اور  آخری مقابلہ آج شروع ہوا ۔ نیو زی لینڈ نے ٹاس جیت کر پہلے فیلڈنگ کرنے کا فیصلہ کیا ۔ 3؍ مقابلوں کی سیریز کا دوسرا مقابلہ بارش کی وجہ سے منسوخ ہو گیا تھا ۔ پہلے مقا بلے میں کا میابی حاصل کرکے نیوزی لینڈ ایک صفرر کی سبقت لیے ہوئے ہیں۔ تازہ اطلاع ملنے تک بھارت نے پہلے بلّے بازی کر تے ہوئے24؍ ویں اوور میں 3؍ وکٹس کھو کر 110؍ رنز بنا لیے ہیں ۔

***** ***** ***** 



آخر میں چنداہم خبریں دوبارہ سماعت کیجیے

...


٭ شولاپو ر  -   تلجا پور  -   عثمان آباد ریلوے راستے کے لیے ریاستی حکو مت کا 452؍ کروڑ  روپیوں کا فنڈ منظور

٭ پر دھان منتری آواس یو جنا کے تحت کرائے داروں کے دستا ویزات کو ایک ہزار روپئے اسٹیمپ ڈیو ٹی

عائد کرنے کا ریاستی حکو مت کا فیصلہ

٭ دیہی علاقوں میں اِنٹر نیٹ سہو لتوں میں اضا فہ کرنے کے لیے 2؍ ہزار 386؍ دیہاتوں میںBSNL  کے

ٹا ورس نصب کرنے کے لیے ریاستی حکو مت 200؍ مربع میٹر اراضی مفت دے گی 

٭ معذوروں کی تر قی کے لیے علیحدہ معذور بہبود محکمہ قائم کر نے کے لیے کا بینہ کی منظوری

٭  ریاست میں پولس بھر تی کے لیے در خواستیں دینے کے لیے 15؍ دسمبر تک توسیع

٭ ملک میں ریٹیل کار وبار کے لیے ڈیجیٹل روپئے کرنسی کے استعما ل کی تجر باتی سطح پر کَل سے شروعات

٭ اِنڈو نیشیاء کے سینارامس پلپ اینڈ پیپر کمپنی کو رائے گڑھ میں287؍ ہیکٹر اراضی تقسیم کا مکتوب دیا گیا

٭ گنا پیدا وار کسانوں کو یکمشت ایف آر پی دینے کا فیصلہ آئندہ ہنگام سے وزن کرنے کے لیے ڈیجیٹل میزان  شروع کیے جا ئیں گے 

اور

٭ نیوزی لینڈ کے خلاف آخری ایک روزہ کر کٹ مقابلے کا آغاز  ‘  بھارت کی پہلے بلّے بازی 


علاقائی خبریں ختم ہوئیں

آپ یہ خبر نامہ ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سماچار اورنگ آباد 

Aurangabad AIR News  

  پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭٭٭


آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 30؍ نومبر 2022 ؁ ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ४५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

·      प्रधानमंत्री आवास योजनेतल्या भाडेपट्टयाच्या दस्तांना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा वाढवण्यासाठी दोन हजार ३८६ गावांमध्ये, बीएसएनएलचे मनोरे उभारण्यासाठी राज्य सरकार २०० चौरस मीटर जागा मोफत देणार

·      दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

·      राज्यातल्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याकरता येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

·      देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून सुरू होणार

·      इंडोनेशियातल्या सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला रायगड जिल्ह्यात २८७ हेक्टर जमिनीचं वाटप पत्र प्रदान

·      ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय, पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात येणार

आणि

·      न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्याला सुरुवात, भारताची प्रथम फलंदाजी

 

सविस्तर बातम्या

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारच्या वाट्याचा ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून, ५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्थानिक आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्यानं त्यांची गैरसोय होते, म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची मागणी केले होती. या रेल्वे मार्गाची लांबी ८४ पूर्णांक ४४ किलोमीटर असून, यावर दहा रेल्वे स्थानकं असतील तसंच चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.

****

प्रधानमंत्री आवास योजनेतल्या भाडेपट्टयाच्या दस्तांना एक हजार रुपये इतकं कमी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

 

Byte …

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जेवढ्या काही वेगवेगळ्या स्कीम्स चालतात, याच्या दस्त नोंदणीकरता रेडीरेकनर प्रमाणे पैसे द्यावे लागत होते, आता ही सगळी दस्त नोंदणी केवळ एक हजार रूपयात करायचा निर्णय आम्ही केलेला आहे. गायरान जमिनीच्या वरच्या अतिक्रमणाच्या संदर्भात त्याच्यावर ज्या लोकांची घरं आहेत, त्या लोकांना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ट्रान्सफॉर्मरवर एकाही व्यक्तीने वीजबिल भरलं असेल तरी देखील त्याचे वीज कट करण्यात येऊ नयेत, सिंगत बिल जो भरेल त्याला वीज पुरवठा नियमित दिला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही जी काही सरसकट कृषी पंप कापण्याची मोहीम आहे, ती मोहीम कुठेही हाती घेण्यात येणार नाही.

****

इंटरनेट सुविधा वाढवण्यासाठी डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरता, राज्यभरात दोन हजार ३८६ गावांमध्ये, भारत संचार निगम लिमिटेड -बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौरस मीटर जागा मोफत देण्याचा निर्णय, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये निवडक गावांमध्ये खुली जागा अथवा गायरान जमिन विनामूल्य देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाला १५ दिवसात मंजूरी देणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पद भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. पदभरती संदर्भात काल १४ विभागांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. राज्यभरातल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत पदभरती होणार आहे. यासदंर्भातील जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे.

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याच्या निर्णयासह मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Byte …

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग मुख्यमंत्र्यांनी करण्याचा निर्णय केलेला आहे. तीन डिसेंबरला त्याची फॉर्मल घोषणा माननीय मुख्यमंत्री करतील. ९५ ते २००३ या कालावधीतील एस.टी.चं सर्टीफिकेट रद्द झालं म्हणून २०१९ साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आलं होतं, अशा सगळ्या लोकांना अधिसंख्य पदावर कंटीन्यू ठेवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना निवृत्तीवेतन वगैरे जे काही बेनिफीटस्‌ आहेत, ते बेनिफिटस्‌ देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. जी काही आदिवासीची एस टी पदं रिकामी झालेली आहेत, एक महिन्याच्या आत याची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत.

 

पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा, तसंच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यातल्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याकरता येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. आतापर्यंत ११ लाख ८० उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत. इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात अडचण येत असल्यामुळे ही मुदत वाढ देण्यात आली आहे.

****

देशात किरकोळ व्यवहारात डिजिटल-रुपी चलनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून सुरू होणार आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेनं काल एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. घाऊक व्यवहारांमध्ये एक नोव्हेंबरपासून डिजिटल रुपीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू झाला आहे. सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये व्यवहार सुरू होतील. सध्या निवडक व्यक्ती आणि व्यापारी या व्यवहारात सहभागी होणार असून, सध्या चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांची डिजिटल टोकन या व्यक्तींच्या डिजिटल वॉलेटमध्ये बँकांकडून हस्तांतरित केली जातील. वॉलेटमधलं हे डिजिटल चलन वापरुन एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करता येईल किंवा यात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदीसाठी वापरता येईल. मोबाइल फोन किंवा तत्सम इतर साधनांद्वारे हे व्यवहार करता येतील. सध्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक या चाचणीमध्ये सहभागी होणार आहेत.

****

महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडोनेशियातल्या सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला काल रायगड जिल्ह्यातल्या धेरंड इथल्या २८७ हेक्टर जमिनीचं वाटप पत्र प्रदान करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल मुंबईत आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन, पीक विम्यासंदर्भात जाब विचारला. एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबतही दानवे यांनी काल बैठक घेऊन पीक विम्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याचं ते म्हणाले.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आपला होकार कळवला आहे. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिवसेनेसोबत झालेल्या दोन बैठकांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं ठाकूर यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

****

मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये मेट्रो कार शेड उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या स्थगितीला, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकल्पासाठी आणखी ८४ झाडं कापणं आवश्यक असून, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राधिकरणची परवानगी घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला अर्ज करता येईल, असं न्यायालयानं सांगितलं. या अर्जावर वृक्ष प्राधिकरण योग्य त्या अटींसह निर्णय घेईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****


राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी देण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तोडणी आणि वाहतुकीबाबत निकष ठरवतानाच पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात यावे,  असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी नऊ डिसेंबरपर्यंत दोन्ही पक्षांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह आठ ऑक्टोबरला गोठवलं होतं, त्यानंतर आता या संदर्भातील अंतिम निर्णय बाकी आहे.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये यासाठी आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली, त्यात बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय झाला. सीमा ओलांडून प्रवास करणाऱ्यांचं, वाहन चालकांचं, बस वाहकांचं फुलं देऊन स्वागत करण्याचा उपक्रम पोलिसांनी राबवला आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून अॅडव्होकेट संतोष चपळगावकर आणि अॅडव्होकेट मिलिंद साट्ये यांची, ज्येष्ठतेनुसार नियुक्ती झाली आहे. या संदर्भात काल अधिसूचना जारी झाली असून, कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटाच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे अनुसूचित जाती प्रवर्गातून सुनील मगरे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून दत्तात्रय भांगे, इतर मागास प्रवर्गातून सुभाष राउत, महिला प्रवर्गातून पूनम पाटील तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून सुनील निकम निवडून आले आहेत. खुल्या गटातून डॉ. नरेंद्र काळे, आणि शेख जहूर हे विजयी झाले.

****

सतत खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या निषेधात हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात काल आंदोलन केलं. उच्च दाबाची वाहिनी जात असलेल्या मनोऱ्यावर चढून शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. महावितरणचे शाखा अभियंता आणि उपअभियंता यांना सुरेजखेडा इथल्या महिलांनी घेरावा घातला. शालेय विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारं हे अभियान एक ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येईल. पाण्याची तपासणी कशी करावी याबाबत या अभियानात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. काल त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

****

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध समाजातल्या नवउद्योजकांसाठी उद्या नांदेड इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा, असं आवाहन समाज कल्याणच विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर-आष्टी मार्गावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं काल गुटख्याचा साठा पकडला. बीड जिल्ह्यातल्या माजलगावहून आलेल्या या वाहनातून सुमारे ११ लाख ६६ हजारांचा गुटख्याची वाहतुक केली जात होती, या कारवाईत पोलिसांनी परतूर इथल्या दोघांना ताब्यात घेतलं असून, गुटखा आणि वाहन असा एकूण १९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

****

आगामी काळात औरंगाबाद शहरात होणाऱ्या जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी काल शहरातल्या मुख्य रस्त्यांची पाहणी केली. या मार्गांवरील वाहतूक बेट सौंदर्यकरण करण्यासह विविध सूचना त्यांनी केल्या.

****


औरंगाबाद महापालिकेच्या दोन शाळांना दिल्ली इथल्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेच्या पथकाने काल भेट दिली. मयुरबन इथली प्रियदर्शनी शाळा तसंच सिडको एन-7 इथल्या शाळेत भेट देऊन या पथकाने स्मार्ट सिटी योजना तसंच सीएसआर निधीतून राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं.

****

एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. यावर्षीचं घोषवाक्य "आपली एकता आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्या करिता" हे आहे. बीड इथं या औचित्यानं उद्यापासून ३१ डिसेंबर पर्यंत जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कुटीर रुग्णालय या ठिकाणी जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

****

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी १० वाजता वर्णी महापूजेने नवरात्राला सुरवात होईल.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना सुरु झाला आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिला सामना जिंकत न्यूझीलंड या मालिकेत एक शून्य ने आघाडीवर आहे.    

****