Wednesday, 31 May 2017

AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं आज सकाळी झालेल्या शक्तीशाली आत्मघातकी बाँबस्फोटातल्या मृतांची संख्या ऐंशीवर तर जखमींची संख्या साडेतीनशेवर पोचली आहे. भारतीय दुतावासातले कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाचा निषेध केला असून, दहशतवादाशी लढण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या बरोबर आहे, असं याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात भारत आणि स्पेन एकमेकांना सहकार्य करू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्पेनची राजधानी माद्रिद इथं स्पेनचे राष्ट्रपती मरियानो रॉखॉइ यांच्यासह प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते आज बोलत होते. स्मार्ट सिटी अभियानात आणि रेल्वेक्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी स्पेनला निमंत्रित केलं. सायबर सुरक्षा, तांत्रिक सहाय्य, नूतनशील ऊर्जा यासह इतर क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचे सात करार यावेळी करण्यात आले.

****

एस एम एस सुविधेचा वापर करून नागरिकांनी त्यांचा आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडावा, असं आवाहन आयकर विभागानं केलं आहे. ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून या दोन्ही क्रमांकांना एकमेकांशी जोडता येईल, असं या विभागानं कळवलं आहे. याशिवाय आयकर विभागाच्या अधिकृत ई फायलिंग संकेतस्थळावरूनही हे दोन क्रमांक जोडता येतील.

****

काँग्रेसचे नेता आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या पाच ठिकाणांवर आज सक्तवसुली संचालनालयानं छापे घातले. सिद्दिकी यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुंबईतल्या बांद्रा इथल्या झोपडपट्टीच्या विकासकामाच्या नावाखाली सिद्दिकी यांनी हा घोटाळा केल्याची तक्रार मिळाल्यानंतर, संचालनालयानं ही कारवाई केली आहे.

****

जलयुक्त शिवारातून झालेलं काम हे शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी असून ही योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिजच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित ‘दुष्काळ प्रवण ते दुष्काळमुक्त’ या विषयावरच्या एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादात ते आज बोलत होते. शासनाला राज्यात पाण्याची स्थिती जाणून घेता यावी आणि आवश्यक ती उपाययोजना करता यावी, यासाठी वॉटस्कन हे तंत्रज्ञान सीआयआय नं बनवलं असून ते उपग्रहाद्वारे मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर सह राज्यातल्या तेरा जिल्ह्यांचा अभ्यास करणार असल्याचं त्रिवेणी पाणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कपील नरूला यांनी यावेळी सांगितलं. या परिसंवादाला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, बजाज कंपनीचे उपाध्यक्ष मधूर बजाज, सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला यांच्यासह देशभरातल्या अनेक कंपन्यांच्या तज्ज्ञांचा सहभाग होता.

****

महाराष्ट्र राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी ही संस्था आजपासून बंद करण्यात आली आहे. शैक्षणिक कार्यक्रम निर्माण करणाऱ्या या संस्थेची जागा आता ई-बालचित्रवाणी ही संस्था घेईल आणि एका विशेष वेबपोर्टलवर वर्चुअल अर्थात आभासी वर्ग आणि दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम निर्माण करेल. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी ही नवी संस्था काम करणार आहे.

****

महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या वारकऱ्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करुन तो पैसा पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा ठराव लातूरमध्ये झालेल्या सहाव्या संत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशात मंजूर करण्यात आला. तीन दिवस सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप आज झाला. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधे वृक्षलागवड करुन लातूर जिल्हा वृक्षमय करण्याचा ठरावही या संमेलनात मंजूर करण्यात आला.

****

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे ब्याण्णवाव्या जयंतीच्या निमित्तानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चोंडी या अहिल्याबाईंच्या जन्मगावी आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात तसंच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****

AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2017....13.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 MAY 2017

Time - 1.00 to 1.05 pm

Language – Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०१७ दुपारी १ वा

****

अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं आज सकाळी झालेल्या शक्तीशाली आत्मघातकी बाँबस्फोटात किमान पन्नास जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे. भारतीय दूतावासाजवळ हा स्फोट झाला. दूतावासातले भारतीय कर्मचारी सुखरूप असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कोणी स्वीकारलेली नाही.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल रात्री स्पेनच्या माद्रिद इथे पोहोचले. दोन दिवसांच्या स्पेन भेटीमध्ये पंतप्रधान स्पेनच्या राष्टृापतींची भेट घेणार असून तिथल्या उद्योजकांशी संवाद साधत त्यांना ‘मेक इन इंडिया’ अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी स्पेनला भेट देण्याची ही गेल्या सुमारे तीन दशकांमधली पहिलीच वेळ आहे.

****

भारतीय नौदलानं बांगलादेशातल्या एका मोठ्या मदत मोहिमेमध्ये सत्तावीस जणांना वाचवलं आहे. ‘मोरा’ चक्रीवादळामुळे हे लोक समुद्रात अडकले होते. नौदलाची ही मदतमोहीम सुरूच असून, या मदतकार्यामध्ये तिथल्या प्रतिकूल हवामानामुळे अडथळे येत असल्याचं नौदलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. बांगलादेशात काल धडकलेल्या या चक्रीवादळानं मोठा विध्वंस केला आहे.

****

कत्तलीच्या उद्देशानं जनावरांच्या बाजारांच्या माध्यमातून होणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला काही राज्यं आणि संघटनांकडून विरोध होत असून, सरकार या विरोधाचा आढावा घेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. पशुंबाबत होणारी क्रूरता आणि त्यांची तस्करी रोखण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या सूचनेमुळेच बंदीचा हा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे, असंही नायडू यांनी स्पष्ट केलं.

****

मागासवर्गीयांसाठी नवीन राष्ट्रीय आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या आयोगाकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गीय असलेल्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.

****

पर्यटन व्यवसायाचा जागतिक वृद्धी दर सुमारे साडेचार टक्के असताना भारतातल्या या व्यवसायाचा वृद्धी दर पंधरा पूर्णांक चार टक्के इतका नोंदला गेल्याची माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. ते काल तिरुचिरापल्ली इथे पत्रकारांशी बोलत होते. देशामध्ये पर्यटन व्यवसायातलं उत्पन्न एक लाख छप्पन्न हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

हिज्बूल मुजाहिदीन संघटनेचा अतिरेकी सबजार बट्ट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीर मध्ये आज तीन दिवसांनी स्थिती सामान्य झाल्याचं वृत्त आहे.काश्मीर मध्ये लावलेले निर्बंध आज हटवण्यात आले आहेत. सरकारी परिवहन सेवाही सुरू करण्यात आली आहे.

****

राज्यातल्या गरीब आणि अल्पसंख्यांक समाजातल्या लोकांसाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तळागाळातल्या लोकांना मिळावी आणि त्यांना त्या योजनांचा लाभ घेता यावा यादृष्टीनं सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभागातर्फे सन्मान संवाद रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा मुंबईतून सुरू झाली. राज्यातल्या खेड्यांमधल्या लोकांना या यात्रेद्वारे शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या योजनेची सांगता पुण्यात होणार आहे.

****

जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या औचित्यानं औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं येता आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आज जिल्हा रुग्णालयातर्फे औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आणि पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे,तर उद्या रेल्वेस्थानकावर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यावर्षीचं या दिनाचं घोषवाक्य : ‘तंबाखू - आपणा सर्वांसाठीच धोका’ असं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पावसाची संततधार सुरू असून वादळी वारे आणि वीजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.05.2017_10.00

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date:31.05.2017, Time: 8.40-8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 May 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱؍مئی  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 ریاستی کا بینہ کے کل منعقدہ اجلاس میںمختلف فیصلوں کو منظوری دی گئی۔
کا بینہ نے زرعی اشیاء پر کی جا نے والی پرو سیسِنگ کا پر و جیکٹ قائم کر نے کے لیے وزیر اعلیٰ زراعت اور فوڈ پرو سیسِنگ منصوبے کو منظوری دی۔ اِس منصو بے کو اگلے 5؍ سالوں کے لیے منظوری دی گئی ہے۔ تا ہم اِسکی کار کر دگی کے جائزے کے بعد اِسے مستقبل میں جا ری رکھنے سے متعلق کوئی فیصلہ لیا جائیگا۔
 اِسکے علا وہ کا بینہ نے کسا نوں کو کفا یتی شر حوں پر بجلی فراہمی کے لیے ’’مُکھیہ منتری سَور کرشی و ا  ہنی‘‘ منصوبے کو بھی منظوری دی۔ اِس منصو بے پر ’’مہا نِر مِتی‘‘ کمپنی کی جانب سے عمل آ روی کی جائیگی۔ 11؍ کلو واٹ اور132؍ کلو واٹ بجلی اسٹیشنوں کے 5؍ تا10؍ کلو میٹر احا طے میں مو جود سر کا ری زمین کو مدّ نظر رکھتے ہوئے مذکو رہ پرو جیکٹ کے لیے جگہ کا انتخا ب کیا جا ئیگا۔
 اِسکے علا وہ ریاستی کا بینہ نے ریاست کی توا نائی تحفظ پا لیسی کو بھی کل منظوری دی۔ اِسکے بعد مرکز کے توا نا ئی تحفظ قا نون 2001؁ پر موثر عمل آ وری میں آ سا نی ہو گی۔ امید کی جا رہی ہے کہ اِس پا لیسی کی بدولت اگلے5؍ سالوں میں1000؍ میگا واٹ توا نائی کی بچت ہو گی۔
 اسکو لوں میں شکشن سیوک اسا تذہ کا تقرر اب Aptitude Testاور ذہنی آزمائش کے امتحا نوں کی بنیاد پر ہو گا۔ کل ہوئے کا بینی اجلاس میں
 یہ فیصلہ لیا گیا۔ ریاست کے تمام امدادی ، امداد کے اہل اور امداد کے اہل قرار دیئے جا چکے سبھی اسکو لوں پر اِس فیصلے کا اطلاق ہو گا۔
****************************
 ایک جون سے ہڑ تال کا اِرا دہ رکھنے والے کسا نوں سے کل وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے ملا قات کی۔ کہا جا رہا ہے کہ بات چیت میں کا فی مثبت پیش رفت ہوئی ہے۔ اِس موقعے پر زراعت کے مملکتی وزیر سدا بھائو کھوت بھی مو جود تھے۔ کہا جا رہا ہے کہ کسا نوں کے سبھی مطالبات پر ریاستی حکو مت مثبت انداز میں غور کر رہی ہے۔
****************************
 سابق مرکزی وزیر زراعت اور رکن پا رلیمنٹ شرد پوار نے کہا ہے کہ مجوزہ ممبئی-ناگپور سمرُدّھی شاہراہ کے بارے میں12؍ جون کو اورنگ آ باد میں سنگھرش کمیٹی کا اجلاس ہو گا۔ پوار نے کل ممبئی میں اِس پرو جیکٹ سے متا ثرہ کسا نوں سے ملا قات کی جسکے بعد منعقدہ اخباری کانفرنس میں اُنھوں نے یہ اطلاع دی۔ پوار نے کہا کہ مذکو رہ پرو جیکٹ کی تحویل اراضی کے عمل میں زبر دستی کسا نوں کی زمینیں تحویل میں لینے اور اُنھیں گرفتار کر نے کی شکا تیں بڑے پیما نے پر موصول ہو رہی ہیں۔ پوار نے مزید کہا کہ 12؍ جون کو اورنگ آ باد میں ہونے والے اجلاس کے بعد وہ اپنا موقف واضح کر ینگے۔
 دریں اثناء ہما رے نمائندے نے خبر دی ہے کہ کل پوار کے ساتھ ملا قات میں کسا نوں نے اُن سے سمرُدّھی شاہراہ پرو جیکٹ کے خلاف احتجاج کی قیادت کر نے کا مطالبہ کیا ہے۔
****************************
 ملک بھر کے میڈیکل اسٹور مالکان نے کل ایک دن کی علا متی ہڑ تال منا ئی e-Portal کے ذریعے دوائیں فروخت کرنے کی بندش اور آن لائن فار میسی شروع کر نے کی حکو مت کی تجویز کے خلاف دوائوں کے خوردہ اور تھوک تاجروں نے ہڑ تال کر نے کا فیصلہ کیا تھا۔ مجمو عی طور پر اِس ہڑ تال کا ملا جلا اثر دیکھا گیا۔ عثمان آ باد ضلع میں100؍ فیصد دوائوں کی دکا نیں بند رہیں۔ وہیں لاتور اور پر بھنی میں احتجا جیوں نے جلوس نکا ل کر انتظا میہ کو محضر پیش کیئے۔
****************************
 جنوب مغربی مانسونی ہوائیں کل جنو بی ریاست کیرا لہ میں داخل ہو گئیں۔
محکمہ مو سمیات نے آج تملنا ڈو کے ساحلی علاقوں میں بھی بارش کی پیشن گوئی کی ہے۔ دریں اثناء مہا راشٹر میں بھی مو سمی با رش کے تیزی سے داخل ہو نے کی امید کی جا رہی ہے۔
 اِس بیچ بیڑ شہر میں کل شام بارش کی آ مد ہو ئی۔ جِس سے درجہ حرا رت میں کچھ کمی واقع ہو ئی۔ تیز ہوائوں کی وجہ سے کچھ علا قوں میں بجلی کے تار ٹوٹ گئے جس سے  بیڑشہر کے کچھ علاقوں میں بجلی فراہمی مسدود رہی۔
****************************
 بھارت کے35؍ کروڑ نو جوا نوں سے روز گار کی شرح میں اضا فہ کر تے ہوئے ملک کو سپر پا ور بنا نے کی جانب کام کر نے کی اپیل سا بق خارجہ سیکریٹری نِرو پما رائو نے کی ہے۔ نِرو پما رائو اورنگ آباد کی ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی میں اظہار خیال کر رہی تھیں جہاں وہ کل57؍ ویںConvocation Dayمیں بحیثیت مہمان خصو صی شریک تھیں۔ وائس چانسلر ڈاکٹر بی۔ اے۔ چو پڑے نے تقریب کی صدا رت کی۔ اپنے خطاب میں رائو نے کہا کہ اُنھیں اِ س بات پر فخر ہے کہ وہ یو نیور سٹی کی سابق طالبہ ہیں۔ تقریب میں450؍محققین طلباء سمیت مختلف گریجویٹ اور پوسٹ گریجویٹ کور سیز کی تعلیم مکمل کر چکے طلباء کو ڈگریاں تفویض کی گئیں۔
****************************
 ریاستی تعلیمی بورڈ کی جانب سے کل ظاہر کیئے گئے بار ہویں جما عت کے نتیجوں کا تنا سب 89؍ فیصد رہا۔
طلباء 9؍ جون کو دو پہر 3؍ بجے کے بعد اپنے کالجوں سے مارکس میمو حاصل کر سکتے ہیں۔ اِن امتحا نات میں2؍ مضا مین میں نا کام قرار دیئے گئے طلباء دو بارہ امتحان دے سکتے ہیں۔ جو کہ11؍ جولائی کو منعقد ہو گا۔ ایک جون کو اِس Re-examinationکے ٹائم ٹیبل کا اعلان ہو گا۔
 کل ظاہر کر دہ نتائج میں حاصل کر دہ نمبرات کی دو با رہ جانچ کے لیے کل سے 3؍ جون تک در خواستیں داخل کی جا سکتی ہیں۔
****************************
 لکھنئو میںCBI کی ایک خصو صی عدالت نے ایو دھیا کے متنا زعہ ڈھا نچے کے انہدام کے معاملے میںBJP کے سینئر لیڈر ایل.کے. اڈوانی ،ڈاکٹر مرلی منو ہر جو شی، مرکزی وزیر او ما بھار تی  اور دیگر9؍ افراد کے خلاف فرد جرم عائد کر نے کا حکم دیا ہے۔ اِن پر مجر ما نہ سازش کے تحت الزامات عائد کیئے جائیں گے۔ سماعت کے دوران تمام 12؍ ملزموں نے قصور وار نہ ہونے کی دلیل پیش کی اور اُنکے خلاف عائد کیئے گئے الزا مات کو مستردکر نے کے لیے ایک در خواست دائر کی تھی۔ خصو صی عدالت کے جج ایس. کے. یادو نے اِن درخواستوں کو مسترد کر تے ہوئے اِنکے خلاف فرد جرم عائد کر نے کا حکم دیا۔ عدالت نے BJP  اورVHP کے لیڈروں کو 50-50؍ ہزار روپئے کے ذاتی مچلکے پر ضما نت دیدی۔
****************************

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.05.2017_6.50

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतीपूरक विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब

·       समृद्धी महामार्गासंदर्भात येत्या १२ जूनला औरंगाबाद इथं संघर्ष समितीची बैठक

·       नैऋृत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल

·       बारावीचा निकाल ८९ टक्के, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ११ जुलैला पुनर्परीक्षा

आणि

·       तरुणांनी रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्तीशाली बनवावं - माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांचं आवाहन

****

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत शेतीपूरक विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यात शेतमालावर प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. नाशवंत शेतमाल प्रक्रिया प्रकल्पांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. ही योजना पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार असून योजनेच्या मूल्यमापन अहवालाच्या आधारावर ती पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यासह राज्याच्या नवीन ऊर्जा संरक्षण धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे पुढील पाच वर्षात एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होईल, अशी अपेक्षा आहे.

शाळांमध्ये शिक्षण सेवकांची भरती आता ॲप्टीट्यूड अर्थात अभियोग्यता चाचणी तसंच बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांना हा निर्णय लागू असेल. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. या मंडळाकडून बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी वर्गासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी दहावी तसंच बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्यांना देखील या मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे.

****

एक जूनपासून संपाची हाक देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सकारात्मक चर्चा झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन, त्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास एक जुलैपासून मुंबईसह राज्यभरात सर्व महानगरांचा दूध तसंच भाजीपाला पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते.

****

मुंबई - नागपूर नियोजित समृद्धी महामार्गासंदर्भात येत्या १२ जूनला औरंगाबाद इथं पक्षविरहित संघर्ष समितीची बैठक घेणार असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे, या संदर्भात काल मुंबईत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीनंतर यासंदर्भात भूमिका ठरवली जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी काल एक दिवसाचा लाक्षणिक संप पाळला. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुकानदारांनी १०० टक्के दुकानं बंद ठेवली होती, औरंगाबाद, जालना, लातूर तसंच परभणी इथं आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केलं. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही दुकानातून औषधविक्री सुरू ठेवण्यात आली होती.

****

जागतिक तंबाखू निषेध दिन आज पाळण्यात येत आहे. ‘तंबाखू : विकासाला धोका’ असं यंदाचं घोषवाक्य आहे. या निमित सर्वत्र विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालयाच्यावतीनं आज सकाळी दहा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानक इथं जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. नांदेड इथंही  तंबाखू विरोधी व्याखान, पथनाटयं तसंच प्रभात फेरींचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नैऋृत्य मोसमी पाऊस काल केरळमध्ये दाखल झाला. आज तामिळनाडू किनारपट्टीच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातही मोसमी पाऊस वेगानं दाखल होण्याची शक्यता असल्याचं कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.

दरम्यान, बीड शहरात काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या पावसात वीजवाहक तारा तुटल्यानं, शहराच्या काही भागातला विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नऊ जून रोजी दुपारी तीन वाजेनंतर आपापल्या महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत. या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. ११ जुलैला ही परीक्षा होणार असून, एक जूनला या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल. गुण पडताळणीसाठी उद्यापासून तीन जूनपर्यंत अर्ज करता येतील, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

विभागात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ९० पूर्णांक ५९ शतांश तर त्या खालोखाल बीड जिल्ह्यात ९० पूर्णांक ४९ शतांश परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद ८९ पूर्णांक ७६, हिंगोली ८८ पूर्णांक ६२ तर जालना जिल्ह्याचा निकाल ८८ पूर्णांक ४९ शतांश लागला आहे.

लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक २२ शतांश एवढा लागला असून, विभागात लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक ८९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड ८८ पूर्णांक ५४ शतांश तर उस्मानाबाद जिल्ह्याचा ८४ पूर्णांक ३२ शतांश एवढा निकाल लागला. उस्मानाबाद जिल्ह्यात आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशातल्या ३५ कोटी तरुणांनी रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्तीशाली बनवावं, असं आवाहन, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ काल राव यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कुलगुरु डॉक्टर बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मिलिंद’ची स्थापना केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत राव यांनी या विद्यापीठाची माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचं नमूद केलं. यावेळी साडे चारशे संशोधक विद्यार्थ्यांसह विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी तसंच पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या.

****

जालना जिल्ह्यातल्या डोंगर सेवली इथं मार्च २००८ मध्ये झालेल्या दंगलीतल्या २१ दोषींना काल जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली. या आरोपींपैकी एकास जन्मठेप, तिघांना दहा वर्षे आणि उर्वरित  सतरा जणांना एक वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला होता तर, काही जण जखमी झाले होते. दुकानं, वाहनं आणि इतर मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं.

****

बनावट परीक्षार्थी प्रकरणी परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर याला गुन्हे अन्वेषण विभागानं काल जालना इथून अटक केली. टाकळकर यानं सात जाणांच्या नावानं परीक्षा दिल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद राठेडसह टाकळकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी चळवळ उभारणं आवश्यक असल्याचं मत, वनस्पती शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर एस. आर. यादव यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं आयोजित सहाव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलानात वृक्षारोपण या विषयावरील परिसंवादात ते काल बोलत होते. प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचं संवर्धन करायला हवं असं आवाहन डॉक्टर यादव यांनी यावेळी केलं. 

//******//


Tuesday, 30 May 2017

AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाचा विकास वेगानं होत असताना आगामी काळात पर्यावरणाचे प्रश्नही गंभीर होत जाणार आहेत, यावर उपाय म्हणून आतापासूनच पर्यावरणपूरक विकास प्रकल्प कटाक्षानं राबवायला हवे, असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबई इथं ‘हरित बंदरे आणि तेलगळती व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
दरम्यान, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट इथं रस्ते, रेल्वे आणि सागरी वाहतूकीला जोडणाऱ्या एकूण एक हजार ११७ कोटी रुपये किमतीच्या आठ विविध प्रकल्पांचा कोनशिला समारंभही गडकरी यांच्या हस्ते आज झाला. पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

****

देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. या बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं. सातारा, लातूर, उस्मानाबाद, नाशिक इथं जवळजवळ सर्व औषध विक्रेत्यांची दुकानं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

****

राज्याच्या नवीन ऊर्जा संरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापुढे आता केंद्राचा ऊर्जा संवर्धन कायदा २००१ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करणं शक्य होणार आहे. या धोरणामुळे पुढील पाच वर्षात एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होईल. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही महिती दिली.

****

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना नऊ जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत. या परिक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरपरिक्षा देता येणार आहे. एक जुनला या परिक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार असून, ११ जुलैला ही परिक्षा होणार आहे. गुण पडताळणीसाठी उद्यापासून तीन जुनपर्यंत अर्ज करता येतील, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि कनिष्ट महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळानं हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यासाठी येत्या सहा जूनपर्यंत सत्ताविस अठ्ठ्यांशी दहा पंचाहत्तर आणि सत्तावीस एकोणनव्वद सदोतीस छप्पन्न या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सरकार संवेदनशील असून, शेतकऱ्यांनी येत्या एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय मागे घेऊन, चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते बोलत होते.

****

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत राजभवनाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी अडवली. तरीही खसदार शेट्टी राज्यपालांची भेट घेणार असून, मागण्यांचं निवेदन देणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊ नये, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात, आदी मागण्या या यात्रेदरम्यान करण्यात आल्या.

****

औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावन्नावा दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. माजी विदेश सचिव निरुपमा मेनन राव या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून, यावेळी सुमारे १६ हजारावर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

****

जागतिक तंबाखू निषेध दिन उद्या ३१ मे रोजी पाळण्यात येतो. या निमित्त औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालयाच्यावतीनं जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या औरंगाबाद रेल्वेस्थानक इथं सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचं महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

राज्यात कोकण, रायगड मुंबई या भागात आज पाऊस झाल्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली आहे. राज्यात आज सर्वात जास्त ४३ अंश सेल्सिअस तापमान वाशिम इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज परभणी आणि नांदेड इथं सरासरी ४० अंश आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद इथं सरासरी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनच वर्तवली आहे. 

****

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2017_1.00

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2017 1.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 MAY 2017

Time - 1.00 to 1.05 pm

Language – Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१७ दुपारी १ वा

****

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला. डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. डॉट. एम. ए. एच. रिझल्ट डॉट एन. आय. सी. डॉट आय. एन. या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. परीक्षार्थींना एस. एम. एस. द्वारे ही निकाल जाणून घेता येणार आहे. त्यासाठी पाच सात सात सहा सहा  या मोबाईल क्रमांकावर एम. एच. एच. एस. सी. स्पेस आसन क्रमांक असा एस एम एस पाठवावा लागेल.

दरम्यान, यंदा बारावीचा राज्याचा निकाल ८९ पूर्णांक ५० टक्के लागला असल्याचं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वात जास्त ९५ पूर्णांक २० टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी ८८ पूर्णांक २१ टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा ८९ पूर्णांक ८३ टक्के, नागपूर ८९ पूर्णांक पाच, पुणे ९१ पूर्णांक १६, कोल्हापूर ९१ पूर्णांक ४०, अमरावती ८९ पूर्णांक १२, तर लातूर आणि नाशिक विभागाचा निकाल ८८ पूर्णांक २२ टक्के इतका लागला आहे. 

****

केरळमध्ये आज पावसाचं आगमन झालं असून, येत्या २४ तासात तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातही मान्सून वेगानं दाखल होईल अशी चिन्हं आहेत. येत्या दोन, तीन आणि चार जून रोजी पावसाची शक्यता असल्याचं कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.

****

राज्यात ग्रामीण स्वच्छता अभियानानं मोठी गती घेतली असून, राज्यातले ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांचा तसंच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात, जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींचा आज मुंबई इथं सत्कार करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे, वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. स्वच्छतेत चांगलं काम केलेल्या जिल्ह्यांचा आणि गावांचा गौरव व्हावा, तसंच उर्वरीत गावांना त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशानं या स्वच्छता मेळावा आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

****

झिका आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.  ते मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. आरोग्य विभागानं त्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्ली इथली राष्ट्रीय रोगनिदान संस्था आणि पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत झिका आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध असून, संशयित रुग्णांनी तात्काळ या ठिकाणाच्या रोगनिदान केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. अहमदाबाद इथं झिका आजाराचे तीन रुग्ण आढळले आहेत.

****

कौशल्य विकासाअंतर्गत येणाऱ्या, सामंजस्य करारातील अडचणी दूर करण्यासाठी ‘महामैत्री’ नावाचं संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ही माहिती दिली. ‘महामैत्री’ संकेत स्थळावर उद्योग संस्थांना संबंधित अधिकारी वर्गाबरोबर थेट संवाद साधता येईल असं सांगतानाच निलंगेकर यांनी, उद्योग संस्थांमधलं गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठीही समुपदेशन कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती दिली. प्राथमिक स्तरावर नागपूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हे समुपदेशन सुरू करण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या शिधापत्रिकाधारकांनी येत्या १५ जूनपर्यंत आपले आधार क्रमांक पुरवठा विभागास सादर करावे, असे निर्देश जिल्हा पुरवठा विभागानं दिले आहेत. शिधापत्रिकाधारकांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक सादर करण्याचे निर्देश सरकारनं गेल्या आठ फेब्रुवारीला एका अध्यादेशाद्वारे दिले होते.

****

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या पहिल्या टप्प्यात, राज्यभरात बीड सह सहा जिल्ह्यांमध्ये साडे नऊ लाखावर रुग्णांची मोफत तपासणी, आणि नोंदणी करण्यात आली आहे. या अंतर्गत सुमारे वीस हून अधिक आजारांबाबत तपासणी करण्यात आली असून, पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार आहे.

****

थायलंड ग्रां प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी साई प्रणित आज आपापले सामने खेळणार आहेत.

****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date: 30.05.2017, Time: 8.40-8.45 AM


AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2017_6.50

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१७ सकाळी ६.५०

****

·      विद्यापीठं, तसंच उच्चशिक्षण संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे - राज्यपालांचं प्रतिपादन

·      मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

·      बारावीचा निकाल आज जाहीर होणार

·      देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप

आणि

·      येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं, - सहाव्या संत साहित्य संमेलनात वन मंत्र्यांचं आवाहन

****

विद्यापीठं, तसंच उच्चशिक्षण क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण केलं पाहिजे, असं प्रतिपादन, राज्यपाल सी.  विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते काल पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांना राज्यपालांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शास्त्रीय गायक महेश काळे, उद्योजिका लीला पुनावाला, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, मरणोत्तर कीर्तीचक्र विजेते सेकंड लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा, यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या अनुषंगानं, ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. हा महामार्ग अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत शेट्टी यांनी, या संदर्भात आज लालबाग ते राजभवन असा मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन राज्यपालांना सादर करणार असल्याचं सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सरकारच्या उत्तराची अपेक्षा नाही, असं सांगतानाच शेट्टी यांनी, संघटना कुणा एका व्यक्तीमुळे थांबत नसल्याचं नमूद केलं.

****

विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा सकारात्मक कामात सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल सातारा जिल्ह्यात मलकापूर इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना पाणी, तसंच वीज वेळेवर देण्यासाठी राज्यशासन कटिबध्द आहे, सोलर फीडर उभारून शेती पंपासाठी १२ तास वीज दिली जाणार आहे, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठिबक, तसंच यांत्रिकीकरणावर भर दिला असून, गट शेतीसाठी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक प्रश्न सकारात्मकपणे सोडावण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. माणूस भाषणानं नव्हे, तर आचरणानं मोठा होतो, हे अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते, एकही आरोप नसलेले नेते म्हणून अरुणभाईंचा नावलौकीक आहे, अभ्यासूवृत्ती आणि नम्र स्वभावामुळे त्यांनी अनेक ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावून गुजराथी यांना शुभेच्छा दिल्या.

****

आरोग्य विभागानं झिका आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली. झिका आजारावर कोणतंही विशिष्ट औषध, अथवा लस उपलब्ध नसली तरीही, पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असं सावंत यांनी सांगितलं. डेंग्यू आजारासारखी याची लक्षणं असून, संशयितांनी तत्काळ रोगनिदान केंद्राशी संपर्क साधून या रोगावर उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

****

रॅगिंग विरुद्ध तक्रार करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीनं तयार करण्यात आलेल्या या ॲपचं, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत लोकार्पण करण्यात आलं.पूर्वी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधात संकेत स्थळावर तक्रार नोंदवता येत असे, आता या ॲपच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरूनही तक्रार करता येईल.

****

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. डॉट. एम. ए. एच. रिझल्ट डॉट एन. आय. सी. डॉट आय. एन. या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. परीक्षार्थींना एस. एम. एस. द्वारे ही निकाल जाणून घेता येणार आहे. त्यासाठी ५७७६६ या मोबाईल क्रमांकावर एम. एच. एच. एस. सी. स्पेस आसनक्रमांक असा एस एम एस पाठवावा लागेल.

दरम्यान, आयसीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी, तसंच बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. बारावीत ९६ पूर्णांक ४७ शतांश, तर दहावीत ९८ पूर्णांक ५३ शतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज  एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली आहे.

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनानं हा संप मागे घेण्याचं आवाहन केलं असून, सर्व शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरेसा साठा असेल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

****

पंढरपूरच्या येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं, असं आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते. संत साहित्य संमेलनं निरंतर सुरु राहावीत यासाठी राज्य सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समाजातला द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी, साहित्य संमेलनाला राज्य सरकारानं कायमस्वरुपी पन्नास लाख रुपये दर वर्षी मदत करण्याची मागणी केली.   

****

राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांनी संशोधन क्षेत्रात समन्वयानं काम केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असं मत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उदघाटन काल फुंडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलत होते. या चारही विद्यापीठांनी केलेलं सशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असं सांगून,  विद्यापीठांनी हवामान बदलाचा विचार करुन पिकांची नवीन वाणं विकसित करावित, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावन्नावा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. माजी विदेश सचिव निरुपमा मेनन राव या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरु डॉक्टर बी.ए.चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित या समारंभात सुमारे १६ हजारावर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येतील.

****

ग्रामीण भागा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध घरकुल योजनांमध्ये निर्मल शोषखड्डेही योजना राबवण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी, राज्यस्तरीय दक्षता, आणि  सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला.

//*******//


Monday, 29 May 2017

AIR News Bulletin, Aurangabad 29.05.2017....17.25

AIR News Bulletin, Aurangabad 29.05.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते जर्मनी इथं पोहोचले. व्यापर - उद्योग, आर्थिक सहकार्य आणि दहशतवादाचा सामना या मुद्यांवर ते या दौऱ्यात भर देतील. पंतप्रधान चौथ्या इंडो जर्मन चर्चासत्रामध्येही सहभागी होणार असून, जर्मन चॅन्सेलरची भेट घेणार आहेत.

****

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवायांना पाठबळ देणं थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर भारताचा क्रिकेट सामना होऊ शकत नाही, असं क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र राहू शकत नाही, असं ते म्हणाले. मात्र याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी आयनं सरकारशी बोलणी केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

****

जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया या युद्धाप्रमाणे असून, त्या थांबवण्यासाठी नवीन पद्धत अवलंबण्याची गरज आहे, या लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्याला केंद्र सरकारनं पाठिंबा दिला आहे. काश्मीरमध्ये सध्या उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य उपाययोजना करणं गरजेचं असून, रावत यांचा विचार बरोबर असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेता मोहम्मद सलीम यांनी रावत यांचं हे वक्तव्य चूकीचं असल्याचं म्हटलं होतं. 

****

दरम्यान, काश्मीरमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थितीतही श्रीनगर आणि पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद दरम्यान कारवा ए अमन नावाची बससेवा सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी श्रीनगरहून ही बस रवाना झाली.   

****

१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा अंतिम निकाल मुंबईचं विशेष टाडा न्यायालय येत्या १६ जूनला सुनावणार आहे. आज या प्रकरणाचा निकाल सुनावण्याची शक्यता होती, मात्र ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलं. आरोपी अबू सालेम याच्यासह सात जणांविरोधात निकाल सुनावण्यात येणार आहे. 

****

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता एस एम एस द्वारे किंवा मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. 

****

भाषणाने नव्हे तर आचरणाने माणूस मोठा होतो, हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं अरुणभाई गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुणभाईंनी पथदर्शीचं कार्य केलं, असं ते म्हणाले. एकही आरोप नसलेले नेते म्हणून अरुणभाईंचा नावलौकीक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षत्र खासदार शरद पवार यावेळी म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते.

****

पंढरीच्या वारीत पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करण्याचं आवाहन अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारकऱ्यांना केलं आहे. ते आज लातूर इथं सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते. संत साहित्य संमेलनं निरंतर सुरु राहावीत यासाठी राज्यसरकार मदत करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिल. उद्घाटनापूर्वी वारकरी दिंडी काढण्यात आली. समाजात वाढत जाणारा द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी, साहित्य संमेलनाला राज्य सरकारानं कायमस्वरुपी पन्नास लाख रुपये दर वर्षी मदत करण्याची मागणी केली.   

****

येत्या एक जूनपासून प्रस्तावित असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचं नियोजन करण्यासाठी अहमदनगर इथं उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी एक जून पासून संपावर जाणार आहेत. दरम्यान, या संपाला गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांकडून पाठिंबा मिळतांना दिसत आहे. नगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं संपाच्या पूर्वीच शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

****

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदीरातली मूर्ती झिजू लागल्याचं तसंच पांढरी पडू लागल्याचं वृत्त गेल्या दोन दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये येत आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज मुर्तीची पाहणी केली. यासंबंधी औरंगाबादच्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असं ते म्हणाले.
****