Saturday, 4 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उध्वस्त-सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त;दोघांना अटक

·      नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथे चारचाकी वाहन विहीरीत पडून ९ जणांचा मृत्यू

·      येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात चुनखडी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा

·      'इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाची ४ सुवर्णपदकांसह लक्षणीय कामगिरी

आणि

·      हवामान विभागाकडून मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. येत्या १४ एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

****

राज्य शासनाने महसुल विभागासाठी ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं, आठ नवीन एसडीओ कार्यालयं, दोन नवीन तहसीलदार कार्यालयं, तर ६९ अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू बाबा-बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता जाहीर करावी, असा ठराव नाशिक इथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघर्ष परिषदेत काल करण्यात आला. परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते झालं. अशोक खरातकडे जाणारे आमदार तसंच मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून, संबंधित अधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्यावेत, अशी मागणी कराड यांनी केली. तर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी खरात प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल, आणि आगामी काळात बुवाबाजीविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असं स्पष्ट केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली, या कारवाईत एकूण ३५ हजार २२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण २६ सिलिंडर्स असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे अडीच हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीत देखील भारतातल्या घरगुती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनी दररोज २८ लाख एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा करत आहे, हे प्रमाण युद्धपूर्व काळातल्या गॅस पुरवठ्याच्या जवळपास पोहोल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

****

आयएनएस तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका काल नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला. अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्यं आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी ही युद्धनौका, माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने बांधली आहे.

****

गुडफ्रायडे निमित्त काल देशभरातल्या चर्चेसमधे विशेष प्रार्थना सभा पार पडल्या. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणच्या चर्चेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथे काल चारचाकी विहीरीत पडून ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून परतत असताना, सदर चारचाकी शेतातील एका विहिरीत कोसळली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य राबवत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

****

परभणी तालुक्यातील समसापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर पोलिसांनी काल कारवाई केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्फोटकं, रसायनं आणि इतर साहित्य असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या प्रकरणी संजय सदाशिव शिंदे आणि सुदर्शन सदाशिव शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात काल चुनखडी वेचण्याच्या सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. डोंगरावरून निघालेली देवीची पालखी दुपारी आमराईमध्ये दाखल होताच, जमलेल्या हजारो भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर उधळण केली, यावेळी पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरम्यान, श्री क्षेत्र तुळजापूर इथे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री चैत्र पौर्णिमा उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला छबिना काल रात्री काढण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले.

****

वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या 'इंडिया स्किल्स २०२५-२६' स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्यपदक अशी एकूण १७ पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेश मधल्या ग्रेटर नोएडा मध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचं आणि विजेत्याचं  अभिनंदन केलं आहे.

चीनमधील शांघाय इथं सप्टेंबर मध्ये होणाऱ्या 'वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

****

दैनंदिन कामाचा ताण-तणाव हलका होण्यासाठी प्रत्येकाने खेळ अवश्य खेळावा, असं आवाहन परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केलं आहे. विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना काल त्या संबोधित करत होत्या. परभणी इथं कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळयात विविध स्पर्धा होत आहेत.

****

बीड शहरासाठी २०१७ मध्ये मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा, आमदार विजयसिंह पंडित यांनी जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून आढावा घेतला. अनियमितता आणि कामातील दिरंगाई प्रकरणी त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी काल पदभार स्वीकारला. शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास यासह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण काम करु असं गौडा यांनी म्हटलं आहे.

****

लातूर शहराचा पाणीपुरवठा कालपासून सुरळीत करण्यात आला. शहराला  धनेगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा बंद पडल्यानं, पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात काल मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे ८२ पर्यटक जखमी झाले. गेल्या दोन महिन्यांतली ही सहावी घटना आहे.

****

धाराशिव शहर आणि परिसरात काल सायंकाळी पाऊस झाला. या पावसामुळे येरमाळा इथल्या येडाई देवीच्या यात्रेसाठी जमलेल्या तसंच तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जमलेल्या यात्रेकरूंची तारांबळ उडाली.

बीड जिल्ह्यात अनेक भागात काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, तसंच गहू, ज्वारी, मक्यासह अनेक पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे. जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान मराठवाड्यासह राज्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

Friday, 3 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      राज्यशासनाकडून महसूल विभागासाठी ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर

·      छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उध्वस्त-सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त;दोघांना अटक

·      येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात चुनखडी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा

आणि

·      इंडिया स्किल्सस्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची ४ सुवर्णपदकांसह लक्षणीय कामगिरी

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. येत्या १४ एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत आज ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

 

१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

****

राज्य शासनाने महसूल विभागासाठी ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं, आठ नवीन एसडीओ कार्यालयं, दोन नवीन तहसीलदार कार्यालयं, तर ६९ अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू बाबा-बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता जाहीर करावी, असा ठराव नाशिक इथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघर्ष परिषदेत आज करण्यात आला. परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते झालं, अशोक खरातकडे जाणारे आमदार तसंच मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून, संबंधित अधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्यावेत, अशी मागणी कराड यांनी केली. तर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी खरात प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल, आणि आगामी काळात बुवाबाजीविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असं स्पष्ट केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं काल गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली, या कारवाईत एकूण ३५ हजार २२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण २६ सिलिंडर्स असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे अडीच हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे.

****

गुडफ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं जात आहे. देशभरातल्या चर्चेसमधे विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं जात आहे. गुडफ्रायडेच्या निमित्ताने प्रेम, करूणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आपल्या संदेशात म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात सर्वांमधे करूणा आणि क्षमाशीलता हे गुण वाढीस लागो अशी प्रार्थना केली.

****

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात आज चुनखडी वेचण्याचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. डोंगरावरून निघालेली देवीची पालखी दुपारी आमराईमध्ये दाखल होताच, जमलेल्या हजारो भाविकांनी वेचलेल्या चुनखडीची पालखीवर उधळण केली, यावेळी पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ थांवली होती.

दरम्यान, श्री क्षेत्र तुळजापूर इथे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री चैत्र पौर्णिमा उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला छबिना आज रात्री निघणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

****

वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या इंडिया स्किल्स २०२५-२६स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्यपदक अशी एकूण १७ पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेश मधल्या ग्रेटर नोएडा मध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचं आणि विजेत्याचं अभिनंदन केलं आहे.

चीनमधील शांघाय इथं सप्टेंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

****

परभणी इथे विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचं आज जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं. दैनंदिन कामाचा ताण-तणाव हलका होण्यासाठी तसंच मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी प्रत्येकाने खेळ अवश्य खेळावा, असं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. परभणी इथं कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळयात विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

****

बीड शहरासाठी २०१७ मध्ये मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा, आमदार विजयसिंह पंडित यांनी आज जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून आढावा घेतला. गंभीर अनियमितता आणि कामातील दिरंगाई, कंत्राटदाराचा बोगसपणा उघड झाला असून ही बाब समोर आल्यानंतर त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आज मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून पदभार स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काम करु असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा लेणी परिसरात आज मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे ८२ पर्यटक जखमी झाले. गेल्या दोन महिन्यांतली ही सहावी घटना आहे. लेणी परिसरात मधमाशांची सुमारे १३ पोळी असून, ती स्थलांतरित करावी, तसंच प्रशासनानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांनी आज जिल्ह्यातील मौजे पाथरे इथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पाऊस, गारपीट तसंच वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

****

धुळे जिल्ह्यात काल सायंकाळी आणि रात्री जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान केलं असून त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेत केली आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

सागरी सार्वभौमत्व टिकवण्यासाठी समर्पित असलेली 'तारागिरी' ही युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. तारागिरीला ताफ्यात दाखल करण्याचा सोहळा विशाखापट्टणम् इथं होणार असून, या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहतील. तारागिरी ही नौदलाची स्वदेशी बनावटीची रडारला चकवा देण्याची क्षमता असलेली युद्धनौका आहे. भारताचं सागरी सार्वभौमत्व निश्चित करण्यात तारागिरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ती आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांचं प्रतीक आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे. काही भागांत पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिक घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात इंधन, गॅस खरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. या अफवांना आळा घालण्यासाठी माध्यमांद्वारे वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करावी, अशा सूचना डॉक्टर मित्तल यांनी दिल्या आहेत. देशातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून कच्च्या तेलासह पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं, तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय परीक्षा संस्था- ‘एनटीए’मार्फत ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या 'संयुक्त प्रवेश परीक्षा' म्हणजेच जे.ई.ई. (मेन) च्या दुसऱ्या सत्राला कालपासून सुरुवात झाली आहे. ८ एप्रिलपर्यंत चालणारी ही परीक्षा देशातील ३०४ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये सुमारे ५६६ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेसाठी सुमारे ११ लाख २३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान, सौदी अरेबियातही ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे.

****

कोल्हापुरात जोतिबाची चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा संपन्न होतो. त्यानुसार, काल रात्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. रथोत्सव मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला, तर गुजरी कॉर्नर इथं अंबाबाईचा रथ आल्यावर फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली.

****

निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार २०२४ च्या मतदार यादीतील नावांचं २००२ च्या यादीशी जुळवणी केली जात आहे. त्यानुसार, अकोला पूर्व-पश्चिम मतदारसंघात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक ठिकाणचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-‘बीएलओ’ ऐन उन्हात घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या नावाची २००२ च्या मतदार यादीशी जुळवणी करत आहेत तसंच मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रे, चुकीच्या तपशीलाची दुरुस्ती केली जात आहेत.

****

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त काल लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. समाजातील स्वमग्नतेबाबतची उदासीनता दूर करून जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत अधिकारी आणि नागरिकांना 'निळी रिबीन' बांधून स्वीकृतीचा संदेश दिला.

****

भंडारा इथं नवीन श्रम धोरणाविरोधात आज विविध कामगार संघटनांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. डी-टू युनियन आणि भारतीय प्रतिरक्षा मजूर संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्राच्या धोरणामुळे कामगारांचे हक्क धोक्यात आल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. आठ तासांच्या कामाच्या मर्यादेत वाढ, नोकरीतील असुरक्षितता आणि ठेकेदारी पद्धतीला चालना या बाबींवर यावेळी संघटनांनी निषेध व्यक्त केला तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही कामगार संघटनांनी यावेळी दिला.

****

भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या उमरझरी इथं नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवाने या ५५ वर्षीय महिलेचा आज नागपूर इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरवड्यातच नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बाम्पेवाडा, उमरझरी आणि आमगाव बुज अशा लागोपाठ तीन ठिकाणी तिघांवर या नरभक्षक वाघाने जीवघेणे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात बांपेवाडा इथल्या वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

****

मालदीवमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या २० वर्षांखालील सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. चार वेळचा विजेता असलेल्या भारताचं पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याचं लक्ष्य आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. राज्यासह देशभरात त्यांचं पुण्यस्मरण आणि श्रद्घांजली अर्पण करण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरील आपल्या श्रद्धाजंली संदेशात, शिवाजी महाराज भारतीय गौरवाचे अमर प्रतिक आणि राष्ट्रीय सन्मानचे संरक्षक होते असं नमूद केलं आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी जनतेला एकजुट करत स्वराज्याची स्थापना केल्याचं शहा म्हणाले.

****

ख्रीस्ती धर्मियांसाठी पवित्र असा दिवस ‘गुड फ्राय डे’ आज देशासह जगभरात साजरा केला जात आहे. प्रभु येशु यांच्या बलिदानाचं स्मरण आज केलं जातं. त्यांच्या बलिदानानंतर आध्यात्मिक मुक्तीच्या अनुषंगानं उपवास आणि प्रायश्चित्त तसंच ठिकठिकाणच्या चर्चमध्ये आज प्रार्थना केली जात आहे. ख्रीस्तींसाठी सध्याच्या पवित्र अशा सप्ताहातील ईस्टर संडेपूर्वीचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.

****

पश्चिम आशियातील सध्याच्या संकटपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस आज ३२ विशेष, अनियोजित विमानसेवा चालवणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरातीसाठी १८ विमानांचा समावेश असून, ही विमानं दुबई, अबू धाबी, शारजा, मस्कत आणि जेद्दाह यांसारख्या प्रमुख शहरांना जोडतील. या विशेष मोहिमेमुळे आखाती देशांत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं काल गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली, या कारवाईत एकूण ३५ हजार २२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण २६ सिलिंडर्स असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे अडीच हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

रायगड जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्गावर नागोठणे नजीक सुकेळी खिंडीत एका खाजगी बसला मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागोठेणेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना एका वळणावर हा अपघात झाला.

****

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत जालना जिल्ह्यात महसूल विभागानं नागरिकांना एकूण १३ हजार ६९५ महसूलविषयक सेवा प्रदान केल्या. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांत एप्रिल आणि मे महिन्यातही मंडळनिहाय शिबीरं घेण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलं आहे.

****

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि दोन जणांना काल लाच घेताना रंगेहाथ पकडलं. एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी या सर्वांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. संशयित आरोपी पोलिस हवालदार राहुल नागरगोजे याला पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी याच्या वतीनं ४५ हजार रुपये लाच घेताना पंचांसमक्ष पकडण्यात आलं. त्यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

अकोला जिल्ह्यातील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनासाठी धावपट्टी लगत असलेल्या शिवर गावात भूसंपादन विभागाच्या पथकानं प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. पथकानं शिवर गावातील ढोणे कॉलनी, शरद सरोवर परिसर तसेच विमानतळाच्या आवारभिंतीलगत असलेल्या मोकळ्या प्लॉट्स, शेतीजमिनी आणि निवासी घरांची सविस्तर पाहणी केली. २०१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या वाढीव धावपट्टीच्या आराखड्यानुसार ही तपासणी करण्यात आल्याचं सूत्रांनी संगितलं. या पाहणीच्या आधारे सविस्तर अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

****

आगामी अठ्ठेचाळीस तासांत मराठवाड्यासह विदर्भ- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर, कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.

****

पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, आणि गडचिरोली जिल्ह्यात काल सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या अवकळी पावसानं शेती पिकांचं विशेषत: कांदा - द्राक्ष पिकांसह आंबा आणि गव्हाचही मोठं नुकसान झालं आहे.

****

लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, वादळी वारा आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. रेणापूर तालुक्यातील गरसोळी शिवारात वीज पडून आणि पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी शिवाजी राठोड यांच्या ४०० कोंबड्या दगावल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळं पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...