Friday, 29 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी-सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमाखदारपणे साजरा

·      इंधन भाववाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

आणि

·      एल निनोमुळे यंदा ९० टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

****

नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था -NTA चं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान म्हणाले.

****

देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश, राखून ठेवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जाहीर करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं हा निर्णय दिला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं.

****

ऑपरेशन सिंदूर हे एक अभूतपूर्व यश होतं, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरवरच्या एका स्मृती अंकाचं सामाजिक माध्यमावरुन प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकाशन केवळ ऐतिहासिक नोंदींपुरतं मर्यादित नसून, यामध्ये वीर सैनिकांच्या वैयक्तिक अनुभवांनाही स्थान देण्यात आलं आहे, असं सिंह यांनी सांगितलं. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी, तसंच देशासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सक्षम नागरिक घडवण्यासाठी या प्रकाशनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं.

****

आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक विक २०२६ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे, मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेऊ, असं सपकाळ म्हणाले. 

चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड- लातूर या आठ जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली-सातारा इथून उभे राहणार आहेत. 

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला येथील हबीबुल्ला सभागृहात दिमाखदारपणे पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

यावेळी २३६ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे ६५, संगणक शास्त्र शाखेचे ११२ आणि कला शाखेचे ५९ कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसेच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांतील २१ कॅडेट्सनाही पदवी बहाल करण्यात आली. दरम्यान, एनडीएची पासिंग आऊट परेड उद्या होणार असून, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या परेडचं निरीक्षण करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्यानिसोस केरॉसया तेलवाहू जहाजाने होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते ३ जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. दरम्यान, होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

****

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या भाववाढी विरोधात आज काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापटल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दरकपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

धुळे तसंच भंडारा इथंही काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं.

****

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे  प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा घेतला. न्यायमूर्ती शिंदे समितीने केलेलं काम समाधानकारक असल्याचं मत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना नमूद केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहिर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, जुलै-ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेने चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं मोहापात्रा यांनी सांगितलं.

****

इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. आजच्या सामन्यातला विजेता संघ परवा रविवारी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात उद्या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. २०२६ कौशल्याला रोजगाराची दिशा, या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी पाचशेहून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

****

राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस, नांदेड ४२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार, बीड ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ दुपारी १.०० वा.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहिर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, जुलै-ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेने चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं मोहापात्रा यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यताही त्यांनी वर्तवली.

****

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी एक हजार ६९२ किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग ५२ छत्रपती संभाजीनगर ते करोडी या मार्गांचा समावेश आहे.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या, पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी-यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेने काल जाहीर केलं. या परीक्षा आता ३१ मे, तसंच सहा आणि सात जून रोजी घेतल्या जातील. ३१ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत; ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील, अशी माहिती संस्थेनं दिली आहे.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण आठ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिबंधीत एचटीबीटी कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करुन जवळपास ६ लाख रक्कमेचे बियाणे कृषी विभागाने जप्त केले. जिल्ह्यात तळोदा रस्ता, अक्कलकुवा तालुक्यातल्या वाण्याविहीर, प्रकाशा तसंच समशेरपूर गावात ही प्रतिबंधीत एचटीबीटी विरोधात कारवाई करण्यात आली.

****

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या कनसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १३ मे रोजी त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास पारीत केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावाची विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या एक हजार ४५३ ग्रामस्थांपैकी ९०४ ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजुने, तर ५४९ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं.

****

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातल्या खुटसावर इथं उष्णतेमुळे एप्रिल महिन्यापासून जवळपास ३ हजार कोंबड्या मरण पावल्या आहेत. गतवर्षी दिवसाकाठी १५ ते २० कोंबड्यांचा मृत्यू होत असे, पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, ५० ते १०० कोंबड्या रोज मृत्यूमुखी पडत असल्याचं चित्र आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या २३ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्रीस्टाइल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्रीस्टाइल संघानं ४ सुवर्ण पदकांसह एकूण ९ पदकं जिंकली. तर महिला कुस्ती संघानं ६ सुवर्ण पदकांसह एकूण १० पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाविरोधातल्या लढ्यात दुटप्पी भूमिका किंवा दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात आणि सुरक्षाविषयक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या शक्तींविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असून, जबाबदार देशांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असं डोवाल म्हणाले. दहशतवादाचा मुकाबला करणं ही प्रत्येक देशाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत, त्यांनी, दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या वाढत्या अस्थिरतेमुळे सागरी व्यापार आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचंही डोवाल यांनी स्पष्ट केलं. 

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या, पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी-यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेने काल जाहीर केलं. या परीक्षा आता ३१ मे, तसंच सहा आणि सात जून रोजी घेतल्या जातील. ३१ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत; ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील, अशी माहिती संस्थेनं दिली आहे.

****

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नवी दिल्ली इथं काल उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी आपत्ती संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद नियोजन, संभाव्य दुर्घटना परिस्थिती, गर्दी व्यवस्थापन, गर्दीच्या उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण, स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचं कार्यान्वयन, घटना प्रतिसाद प्रणाली तसंच विविध विभागांतल्या समन्वय यंत्रणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरु केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटके लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडानजीकच्या जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उदध्वस्त केला होता.

****

आगामी मॉन्सूनमध्ये कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून, १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ठाण्यात ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केला, तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामधे फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत याचा समावेश आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या एक ते पाच जून दरम्यान स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू मोहिम राबवण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे

****

परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम काल घेण्यात आली. आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, लाइफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं.

****

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 May 2026
Time: 09:00-09:10 AM
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
وقت: 09.00 سے 09.10/ بجے
***** ***** *****
سرخیاں
پہلے خاص خبروں کی سرخیاں...
٭ CBSEکے بارہویں جماعت کے امتحانات میں نشانات دینے کے عمل کو دوبارہ کیا جائے گا:مرکزی وزیر تعلیم کا اعلان۔
٭ مراٹھواڑہ میں خشک سالی کو ندی جوڑمنصوبے کے ذریعے ختم کیا جائے گا: نائب وزیرِ اعلی ایکناتھ شندے کا تیقن۔
٭ اقتدار میں حصہ داری سے محرومی پرمرکزی وزیر رام داس آٹھولے کا اظہارِ افسوس۔
٭ معروف شاعر ڈاکٹر بشیر بدر کا طویل علالت کے بعد بھوپال میں انتقال۔
٭ سوامی رامانند تیرتھ مراٹھواڑہ یونیورسٹی سے ملحقہ 29 کالجز میں سالِ اوّل کے داخلے روکنے کا حکم۔
اور۔۔۔ ٭ NEET پرچہ افشاء ہونے کے معاملے میں ناندیڑ میں دو طلبہ اور ان کے افرادِ خانہ سے CBI کی تفتیش۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
مرکزی تعلیمی بورڈ(CBSE) کے جماعت ِ بارہویں کے امتحان کے نشانات دینے کے عمل میں کچھ تضادات اُجاگرہونے کے بعد اس عمل پر دوبارہ غور کیا جائے گا۔ مرکزی وزیرِ تعلیم دھرمیندر پردھان نے کل نئی دہلی میں (CBSE) کے عہدیداران کے ساتھ اجلاس کے بعد صحیفہ نگاروں سے بات کرتے ہوئے یہ اطلاع دی۔ پردھان نے بتایا کہ اس معاملے میں طلبہ کے تمام شکوک و شبہات کو دور کیا جائے گا، اور تضادات سے متعلق مسائل کو حل کرنے کے اقدامات کیے جائیں گے۔ انہوں نے کہا…
Byte: Education Minister Dharmendra Pardhan
***** ***** *****
کرناٹک کے وزیرِ اعلیٰ سدارامیا نے کل اپنے عہدے سے استعفیٰ دے دیا۔ مئی 2023 میں اسمبلی انتخابات میں کانگریس کی کامیابی کے بعد سدارامیا دوسری مرتبہ کرناٹک کے وزیر اعلیٰ بنے تھے، وہ اس سے قبل 2013 سے 2018 تک بھی وزیر اعلیٰ کے عہدے پر فائز رہے تھے۔ کرناٹک اسمبلی میں کانگریس پارٹی کو واضح اکثریت حاصل ہے، اس لیے سدارامیا نے گورنر سے درخواست کی ہے کہ وہ نامزد وزیر اعلیٰ کو حکومت بنانے کیلئے مدعو کریں۔ ذرائع کے مطابق کانگریس کے سینئر رہنماء نائب وزیرِ اعلیٰ ڈی کے شیوکمار وزیر اعلیٰ ہوں گے۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے کل نئی دہلی میں وزیرِ اعظم نریندر مودی سے ملاقات کی۔ اس دوران پھڑنویس نے ریاست میں جاری مختلف اہمیت کے حامل اور بنیادی ڈھانچے کے ترقیاتی منصوبوں کی موجودہ صورتحال اور پیش رفت کے بارے میں جانکاری دی۔ پھڑنویس نے اس ملاقات کے بعد احساس ظاہر کیا کہ وزیرِ اعظم نریندر مودی سے ملاقات ہمیشہ ہی تحریک اور مثبت توانائی دینے والی ہوتی ہے۔
***** ***** *****
نائب وزیرِ اعلیٰ ایکناتھ شندے نے مراٹھواڑہ میں ندیوں کو جوڑنے کے منصوبے کے ذریعے خشک سالی کو ختم کرنے کے عزم کا اظہار کیا ہے۔ وہ کل لاتور ضلعے کے احمد پور میں پارٹی میں شمولیت کی تقریب سے خطاب کررہے تھے۔ شندے نے یقین دلایا کہ ال نینو کی وجہ سے کم بارش کی پیش گوئی کی صورتحال میں حکومت کسانوں کے ساتھ مضبوطی سے کھڑی رہے گی۔ سابق وزیر ونائیک راؤ پاٹل کی شیو سینا میں شمولیت کے بعد، احمد پور علاقے کے ہزاروں کارکنان نے نائب وزیر اعلیٰ شندے کی موجودگی میں کل شیوسینا میں شمولیت اختیار کی۔
دریں اثناء‘ اس اجلاس میں پولس کی مبینہ طور پر صحافیوں کے ساتھ دھکا مکی کرنے کا معاملہ سامنے آیا ہے۔ ہمارے نمائندے نے اطلاع دی ہے کہ اس معاملے کے باعث ذرائع ابلاغ میں سخت ناراضگی کا اظہار کیا جا رہا ہے۔
***** ***** *****
نائب وزیرِ اعلیٰ ایکناتھ شندے نے اپنے عزم کا اظہار کیا ہے کہ مہا یوتی قانون ساز کاؤنسل کی 17 نشستوں کیلئے متحدہ طور پر مقابلہ کرے گی اور تمام نشستوں پر کامیابی حاصل کرے گی۔ وہ گزشتہ روز دہلی میں میڈیا نمائندوں سے مخاطب تھے۔ انہوں نے واضح کیا کہ مہایوتی کی حلیف جماعتوں میں کوئی اختلاف نہیں ہے اور نشستوں کی تقسیم منصفانہ طریقے سے کی جائے گی۔ شندے نے بتایا کہ حکومت مراٹھا سماج کے مسائل کے تئیں پوری طرح حساس ہے اور بی جے پی کے رکنِ اسمبلی پرساد لاڑ نے ریزرویشن تحریک کے رہنماء منوج جرانگے سے ملاقات کرکے ان کے مطالبات سنے ہیں۔ مراٹھا برادری کے فیصلوں کا جائزہ لیتے ہوئے انہوں نے بتایا کہ حکومت نے انا صاحب پاٹل اقتصادی ترقیاتی کارپوریشن کے ذریعے سماج کو انصاف فراہم کرنے کی بھی کوشش کی ہے۔ انہوں نے وضاحت کی کہ حکومت کا موقف ہے کہ جرانگے پاٹل کو بھوک ہڑتال کرنے کی نوبت نہ آئے۔
***** ***** *****
دریں اثناء‘ منوج جرانگے پاٹل نے مراٹھا ریزرویشن کے مطالبے کو لیکر کل 30 مئی سے غیر معینہ مدت کی بھوک ہڑتال کرنے کا انتباہ دیا ہے۔ کنبی سرٹیفکیٹ کی تقسیم اور مراٹھا سماج کے افراد کو ریزرویشن سے متعلق بقیہ مطالبات کو پورا کرنے کیلئے جرانگے کی طرف سے حکومت کو دی گئی مہلت آج ختم ہو رہی ہے۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** *****
سماجی انصاف کے مرکزی وزیرِ مملکت رام داس آٹھولے نے کہا ہے کہ بی جے پی-شیو سینا اتحاد میں راشٹروادی کانگریس پارٹی شامل ہونے کی وجہ سے آر پی آئی کی اہمیت کم ہو گئی ہے۔ آٹھولے‘ کل ایوت محل میں ذرائع ابلاغ سے بات کر رہے تھے۔ انہوں نے اس بات پر ناراضگی ظاہر کی کہ آر پی آئی کو حکومت میں حصہ داری نہیں مل رہی ہے انھوں نے کہا کہ حکومت میں پارٹی کا کوئی ایک وزیر ہونا چاہئے تھا۔ آٹھولے نے کہا کہ مہایوتی میں آر پی آئی کو نظر انداز نہیں کیا جانا چاہیے اور ہمیں بی جے پی کے کوٹے سے قانون ساز کونسل کی نشست یا کسی کارپوریشن میں نمائندگی دی جانی چاہیے۔
***** ***** *****
مذہب ِ اسلام کا مقدس تہوار عیدالاضحی کل ریاست میں روایتی عقیدت و احترام اور جوش و خروش کے ساتھ منایا گیا۔ ممبئی سمیت ریاست کے مختلف مقامات پر مساجد اور عیدگاہوں میں نماز عید ادا کی گئی۔
چھترپتی سمبھاجی نگر کی عیدگاہ چھاؤنی میں بندگانِ توحید نے نمازِ عید ادا کی اور ایک دوسرے کو مبارکباد پیش کی۔ ہنگولی کے عیدگاہ میدان میں نمازِ عید ادا کی گئی، جبکہ بیڑ ضلعے کی مختلف عیدگاہوں اور مساجد میں مسلمانوں نے بڑی تعداد میں نماز ادا کی اور ایک دوسرے کو عید کی مبارکباد دی۔
***** ***** *****
معروف شاعر ڈاکٹر بشیر بدر کل‘ بھوپال میں طویل علالت اور ضعیف العمری کے باعث انتقال کر گئے، وہ 91 برس کے تھے۔ بدر کافی عرصے سے یادداشت کے عارضے میں مبتلا تھے، ان کی طبعیت کچھ عرصے سے مسلسل نازک تھی، اسی دوران وہ گزشتہ روز انتقال کر گئے، ڈاکٹر بشیر بدر کی ادبی خدمات کا مختصر جائزہ لینے والی یہ رپورٹ ملاحظہ فرمائیں:
Voice Cast
ڈاکٹر بشیر بدر کو ادب میں ان کی نمایاں خدمات کیلئے پدم شری ایوارڈ سے نوازا گیا تھا۔ معروف نغمہ نگار اور کہانی نویس جاوید اختر نے بدر کوخراج عقیدت پیش کیا۔ بدر کی وفات پر ادبی دنیا میں شدید رنج و غم کا ماحول ہے۔
***** ***** *****
سوامی رامانند تیرتھ مراٹھواڑہ یونیورسٹی کے تحت 29 کالجز میں سال ِ اوّل کے داخلوں کو روکنے کا حکم دیا ہے، ان کالجز نے تعلیمی اور انتظامی آڈٹ کے آن لائن امتحان میں 40 فیصد سے کم نشانات یعنی ”ایف“ گریڈحاصل کیا ہے۔ اس میں ناندیڑ ضلعے کے سب سے زیادہ آٹھ کالج، لاتور ضلعے کے سات اور پربھنی ضلعے کے چار کالج شامل ہیں۔
***** ***** *****
NEET پرچے افشاء کیے جانے کے معاملے میں سی بی آئی کی ایک ٹیم نے کل ناندیڑ شہر میں دو مقامات پر تفتیش کی۔ شہر میں دو طلبہ اور ان کے افرادِ خانہ سے پرچہ خریدنے کے شبے میں پوچھ گچھ کی گئی۔ ہمارے نمائندے کے مطابق سی بی آئی کی ایک ٹیم نے اس سے قبل 16 مئی کو ناندیڑ میں ایک طالبہ اور اس کے سرپرستوں سے پوچھ تاچھ کی تھی۔
***** ***** *****
سرخیاں
آخرمیں خاص خبریں ایک مرتبہ پھر سن لیجیے...
٭ CBSEکے بارہویں جماعت کے امتحانات میں نشانات دینے کے عمل کو دوبارہ کیا جائے گا:مرکزی وزیر تعلیم کا اعلان۔
٭ مراٹھواڑہ میں خشک سالی کو ندی جوڑمنصوبے کے ذریعے ختم کیا جائے گا: نائب وزیرِ اعلی ایکناتھ شندے کا تیقن۔
٭ اقتدار میں حصہ داری سے محرومی پرمرکزی وزیر رام داس آٹھولے کا اظہارِ افسوس۔
٭ معروف شاعر ڈاکٹر بشیر بدر کا طویل علالت کے بعد بھوپال میں انتقال۔
٭ سوامی رامانند تیرتھ مراٹھواڑہ یونیورسٹی سے ملحقہ 29 کالجز میں سالِ اوّل کے داخلے روکنے کا حکم۔
اور۔۔۔ ٭ NEET پرچہ افشاء ہونے کے معاملے میں ناندیڑ میں دو طلبہ اور ان کے افرادِ خانہ سے CBI کی تفتیش۔
***** ***** *****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सीबीएसईच्या बारावी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन-केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

·      नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत

·      प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत २९ महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश

आणि

·      नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड इथं दोन विद्यार्थिनींसह कुटुंबीयांची चौकशी

****

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

****

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे २०२३ मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामैया दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. कॉग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती सिद्धरामैया यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

****

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार, असा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. अल निनोमुळे कमी पावसाचं भाकीत व्यक्त होत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहमदपूर परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, या मेळाव्यात पोलिसांनी पत्रकारांशी कथित धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून, सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असं त्यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत, सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे.

****

भाजप-शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस सहभागी झाल्याने रिपाईचं महत्त्व कमी झालं, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाईंला सत्तेत सहभाग मिळत नसून, पक्षाचा एखादा मंत्री असायला हवा होता, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं, असं सांगतानाच, महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

****

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरीद काल राज्यात भक्तिभावाने साजरा झाला. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदागहमधे नमाज अदा करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथं बकरीद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करुन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतल्या  ईदगाह मैदानावर नमाज पठण केली, बीड जिल्ह्यात विविध ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

धाराशिव इथं जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयातही सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. 

****

प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं काल भोपाळ इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतिभ्रंशाचा आजार होता, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती, काल त्यांचं निधन झालं, बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत,

जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है ज़मी।।

पांव फैलाऊं तो दीवार से सर लगता हैं

 

आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं.

बशीर यांचे हिंदीत १२ हून अधिक तर उर्दूत सात काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

 

खुदा हम को ऐसी खुदाई न दे।।

कि अपने सिवा कुछ दिखाई न दे

अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर, हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह, वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं, म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या..  

आपल्या एका रचनेत ते म्हणतात,

 

सात संदूकों में भर कर दफ्न कर दो नफरतें।।

आज इंसा को मोहब्बत की जरूरत हैं।

साहित्यातील योगदानाबद्दल डॉ. बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

नांदेड शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्योती देशमुख यांचं काल नांदेड इथं निधन झालं, त्या ८३ वर्षांच्या होत्या. डॉ. देशमुख यांनी नांदेड इथं महिला महाविद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला, अर्धापूर इथं ‘मीनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल’ स्थापन करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण म्हणजेच ‘F’ ग्रेड मिळाला आहे, अशा तब्बल २९ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक ठरा, लातूर जिल्ह्यातल्या सात आणि परभणी जिल्ह्यातल्या चार महाविद्यालयांचा समावेश आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरात काल दोन ठिकाणी चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या दोन विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यापूर्वीही १६ मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची सीबीआयच्या पथकाने चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक सहा, बीड ३९ पूर्णांक एक तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...