Wednesday, 31 October 2018

“नवभारताच्या निर्माणासाठी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

नवभारताच्या निर्माणासाठी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज दक्षता सप्ताहाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी कामकाजात अनावश्यक विलंब होत असल्यामुळे सर्व संस्थांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं ते म्हणाले. पारदर्शक व्यवहारासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं.

****

नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचं मत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापूर इथं आज माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय सैनिक प्रत्येकवेळी नक्षलवाद्यांचे हल्ले चोखपणे परतवून लावत असल्याचं ते म्हणाले. मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते, कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये असल्याचं त्यांनी नमूद केलं. माजी सैनिकांनी भारतीय लष्कराचा जास्तीत जास्त प्रसार करावा, असं आवाहन रावत यांनी यावेळी केलं.

****

सर्वोच्च न्यायालयानं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, उद्या सकाळी आठ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. निळवंडे धरणातून तीन पूर्णांक ८५ आणि मुळा धरणातून एक पूर्णांक ९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यानं कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, तसंच नदीतील प्रवाह जास्त असल्यानं कुणीही नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे. 

****

नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातल्या सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. मुंबईमधल्या गिरगाव इथं आज नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या आरोग्य सर्वेक्षणानुसार सहा महिने ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यामुळेच लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रति किलो १४ रुपये दरानं उपलब्ध करुन देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासन मराठवाड्याच्या विकासासाठी करत असलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी मागेल त्याला काम, पाण्याचे साठे पिण्यासाठी राखीव ठेवणं, चाऱ्याचं नियोजन, शेतीसाठी सुक्ष्म सिंचन वाढवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज संकल्प दिन म्हणून पाळण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बीड इथं आयोजित एकता दौडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला. नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या निराशाजनक कामकाजाविरोधात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांना देण्यात येणारी जादा रकमेची बिलं रद्द करावी, शेतीला नियमित वीज पुरवठा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

राज्य सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्त सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद इथं प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं विडंबनात्मक आसनं करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती.

****

शासनमान्य अनुदानित शाळांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि पदभरतीपासून शाळांना मिळणाऱ्या अनुदानापर्यंतचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं एल्गार पुकारला असून दोन नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातल्या तीन हजारांहून अधिक शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण संस्था महामंडळानं दिली आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटनीति आणि शिवाजी महाराजांच्या शौऱ्याचा संगम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वोच्च पुतळ्याचं, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यावर, विविध संस्थानं भारतात विलीन करून घेतली. आज आपण कच्छपासून कोहिमापर्यंत आणि कारगीलपासून कन्याकुमारी पर्यंत विनाअडथळा भ्रमण करू शकतो, त्याचं संपूर्ण श्रेय सरदार पटेलांना असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.



 कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरदार पटेल यांचा हा १८२ मीटर उंच भव्य पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.



 या पुतळ्याच्या परिसरात साकारण्यात आलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - पुष्पवाटिका तसंच वॉल ऑफ युनिटी - एकता भिंतीचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशभरातल्या विविध ठिकाणाहून आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर एक भारत श्रेष्ठ भारत हे वाक्य सतरा भारतीय भाषांमधून लिहिलेलं आहे.



 देशभरातून आलेल्या कलापथकांनी यावेळी देशाचं सांस्कृतिक वैविध्य दर्शवणारी नृत्यं सादर केली. सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला, देशभरातल्या विविध नद्यांचं जल तसंच पुष्प अर्पण करून, पंतप्रधानांनी या त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधून या सर्वोच्च पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

****



 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी देशभरात 'एकता दौड'चं आयोजन केलं जातं. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौड 'रन फॉर युनिटी' ला सुरुवात झाली.



 क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत आयोजित या एकता दौडमध्ये, लहान मुलांसह युवक-युवती तसंच अनेक नागरिक सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. महावीर चौक इथं एकता दौडचा समारोप झाला, विजेत्या स्पर्धकांचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

****



 भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं देशभरात ५३ शहरांमध्ये आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवर आधार नोंदणी आणि सुधारणा करण्यात येईल, असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भुषण पांडेय यांनी सांगितलं. पारपत्र सेवा केंद्रांच्या संकल्पनेवर आधारीत आधार सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना सहजरित्या आधारसंबंधी सेवा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 भारत आणि फ्रान्स यांच्यादरम्यान झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात विमानाची किंमत उघड करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं दहा दिवसात सादर करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या कराराविषयीची धोरणात्मक तसंच गोपनीय माहिती उघड करता येणार नाही, मात्र सार्वजनिक करता येईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी, असे निर्देशही सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती यु यु ललित आणि के एम जोसेफ यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १४ नोव्हेंबरला होणार आहे.

****



 नवी दिल्लीत काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि  विकास परिषदेची १९ वी बैठक झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक सद्य परिस्थिती आणि आर्थिक क्षेत्राच्या कामगिरिचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. चालू व्याजदर, सद्य स्थितीतली आर्थिक तरलता,  म्युच्युअल फंड आणि नॉन बँकिंग आर्थिक कंपन्यांमधल्या वित्तीय तरलतेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. या सर्व आर्थिक परिस्थितीवर नियंत्रक आणि केंद्र सरकार जातीने लक्ष ठेवून असेल तसंच आवश्यक ती पावलं उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, तसंच प्रतिभूती आणि नियामक महामंडळ - सेबीसह अन्य नियामक मंडळांचे अध्यक्ष तसंच वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

*****

***$F8B7D50A-C9BE-4C04-839F-1D0C7D00C1E5$ 

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१  ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वोच्च पुतळ्याचं, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात सरदार सरोवरानजिक साधू बेटावर उभारलेल्या या १८२ मीटर उंच पुतळ्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं आहे.



 दरम्यान, सरदार पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंह, यांनी संसद मार्गावर सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. गृहमंत्र्यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियम इथून एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली.



 देशभरात ही विविध ठिकाणी आयोजित एकता दौडमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळली जात आहे. यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीत शक्तीस्थळ इथं इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. 

****



 जम्मू-काश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्यात जैश - ए - मोहम्मदचा कमांडर उस्मान हैदर याचा समावेश आहे. उस्मान हा जैश - ए - मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचा निकटवर्तीय होता. चकमक झालेल्या ठिकाणी दुर्बिण जोडलेली एम फोर रायफल सापडली. अफगाणिस्तानातल्या ‘नाटो’ दलांकडे ही रायफल आढळते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांना, एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी नवे नियम आजपासून लागू होत आहेत. आजपासून क्लासिक आणि मास्ट्रो डेबिट कार्डधारकांना एका दिवसात ४० हजारांऐवजी २० हजार रुपयेच काढता येतील. ज्या खातेदारांना रोज यापेक्षा अधिक रक्कम काढणं गरजेचं असतं, त्यांना वेगळ्या डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 October 2018
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ  :  ۳۱ ؍اکتوبر  ۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 دیوالی کے تہوار کے دوران پٹا خوں کے استعمال کے بارے میں سپریم کورٹ نے اپنے گذشتہ فیصلے میں جز وی تبدیلی کی ہے۔ نئے فیصلے کے مطا بق عدالت نے پٹا خوں کی آتش بازی کے اوقات طئے کر نے کا اختیار  ریاستوں کو دیدیا ہے ۔ دوسری جانب عدالت نے واضح کیا کہ رات 8؍ بجے سے10؍ بجے کی آتش بازی کے اوقات کی پا بندی صرف دِلّی اورNCRکے لیے ہے۔ تا ہم عدالت نے یہ بھی وضا حت کی کہ آتش بازی کا دورا نیہ ملک بھر میں 2؍ گھنٹے ہی رہے گا۔ سپریم کورٹ نے یہ وضاحت تملنا ڈو حکو مت کی اُس عرضی پر سما عت کے دوران کی جس میں تملنا ڈو میں روا یات کے مطا بق صبح پٹا خوں کے استعمال کی اجازت مانگی گئی تھی۔
***** ***** *****
 وزیر اعظم نریندر مودی آج ملک کے پہلے وزیر داخلہ سر دار ولبھ بھائی پٹیل کی جینتی کے موقعے پر اُنکے عظیم قامت مجسمے
 Statue of Unityکی نقب کُشائی کریں گے۔ یہ مجسمہ گجرات کے نر مدا ضلعے کے سر دار سرو ور پرو جیکٹ کے قریب تعمیر کیا گیا ہے۔ 182؍ میٹر اونچے مجسمے کی تعمیر کا کام تیزر رفتار سے مقررہ مدت میں پوار ہوا ہے۔ دریں اثناء سر دار ولبھ بھائی پٹیل کی جینتی کے ضمن میں آج ملک بھر میں مختلف پرو گراموں کا انعقاد کیاجا رہاہے۔ملک بھر میں ایکتا دوڑ منعقد کی جا رہی ہے۔ اورنگ آباد ، عثمان آباد اور مراٹھواڑہ کے سبھی شہروں میں آج صبح ایکتا دوڑ منعقد کی گئی ہے۔
  سابق وزیر اعظم اِندرا گاندھی کی آج بر سی بھی ہے۔ اِس دن کو راشٹریہ سنکلپ دن کے طور پر منا یا جا تا ہے۔ اِندرا گاندھی کو خراج عقیدت پیش کر نے کے لیے ملک بھر میں مختلف تقریبات کا انعقاد کیا جا رہا ہے۔
***** ***** *****
 مالیگائوں میں2008؁ میں ہوئے بم دھما کوں کے معاملے میں قو می تفتیشی ایجنسی NIA کی خصو صی عدالت نے ملزمین کر نل پرساد پرو ہِت ، سادھوی پر گیہ سنگھ ٹھا کُر اور دیگر افراد کے خلاف الزا مات طئے کیے ہیں۔ ایجنسی نے ساتوں ملزمین پر دہشت گر دانہ سازش رچنے، قتل اور غیر قا نو نی کار وائیوں پر روک لگا نے والے قا نون کے تحت الزا مات عائد کیئے ہیں۔ معاملے کی سماعت 2؍ نومبر کو ہو گی۔ اِس سے پہلے عدالت نے الزا مات طئے کر نے کے عمل کو ملتوی کر نے کی کر نل پرو ہِت کی در خواست کو نا منظور کر دیا۔
***** ***** *****
 مہاراشٹر کے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے واضح کیا کہ ممبئی میں بحر عرب میں چھتر پتی شیواجی مہاراج کی مجوزہ یاد گار اُسی مقام پر تعمیر ہو گی۔ یا دگار کی تعمیر کا کام شروع کر نے جا رہی ایک نائو 24؍ تاریخ کو سمندر میں اُلٹ گئی تھی جس میں ایک شخص کی موت ہو گئی تھی۔ اِس پس منظر میں یا دگار کی تعمیر کی جگہ تبدیل کر نے کا مطا لبہ کیا جا رہا تھا۔ وزیر اعلیٰ پھڑ نویس نے کہا کہ اِس تعمیر کے لیے مہار اشٹر حکو مت نے جگہ کے ساتھ ساتھ سبھی اجازت نا مے حاصل کر لیے ہیں اور کام کی شروعات بھی ہو چکی ہے۔
***** ***** *****
 ایس ٹی کار پوریشن کی جانب سے سیزن کے مطا بق اضا فی کرا ئے آج آدھی رات سے لاگو ہو جا ئیں گے۔ ایس ٹی کار پو ریشن کی سبھی مسا فر بسوں میں ایک نومبر سے 20؍ نومبر کے دوران کرا یوں میں10؍ فیصدکا اضا فہ کیا جا رہا ہے۔ 21؍ نومبر سے دو با رہ پُرا نے مسا فر کرائے نا فذہوں گے۔
***** ***** *****
 مہاراشٹر کی تینوں بجلی کمپنیوں مہا وِترن ، مہا پاریشن اور مہا نِر مِتی کے ملازمین کو دیوا لی سے قبل بونس دیا جائے گا۔
توانائی کے ریاستی وزیر چندر شیکھر با ون کُڑے نے کل یہ اعلان کیا۔ اِسکے مطا بق کامگار، اِنجینئر اور افسران کو 15؍ ہزار روپئے جبکہ اسِسٹنٹ اِنجینئر او ر  زیر تر بیت اِنجینئروں کو 9؍ ہزار روپئے بطور دیوالی بو نس دیئے جائیں گے۔
***** ***** *****
 آنے والے انتخابات میں اگر کانگریس اقتدار میں آ تی ہے تو پیٹرول کی قیمت60؍ سے 65؍ روپئے فی لیٹر کے در میان لا ئی جائے گی۔ مہا راشٹر کانگریس کے صدر او ر  رکن پار لیمنٹ اشوک چو ہان نے یہ یقین دہا نی کر وائی۔ کانگریس کی جن سنگھرش یاترا اور قحط سے متا ثرہ علا قوں کے دورے کے دوران کل جا لنہ میں چو ہان نے یہ بات کہی۔ اُنھوں نے کہا کہ کانگریس ملک کے دستور کی حفا ظت کر رہی ہے۔ چو ہان نے ریاستی حکو مت سے مطالبہ کیاکہ وہ قحط سے متا ثرہ کسا نوں کو 50؍ ہزار روپئے فی ہیکٹر کے حساب سے امداد فراہم کرے اور اُن کے خریف فصل قرض معا ف کرے۔
***** ***** *****
 اورنگ آباد میں2؍ سے5؍ نو مبر کے دوران خواتین کے آل اِنڈیا بین الیو نیور سٹی کُشتی مقا بلوں کا انعقاد کیا جا رہا ہے۔
 کُشتی کے یہ مقابلے اسپورٹس اتھا ریٹی آف اِنڈیا ، سائی کے مغربی ڈویژن کے مرکز میں منعقد ہو ں گے۔ اِن مقا بلوں میں حصّہ لینے کے لیے ملک بھر کی یو نیور سیٹیوں سے112؍ خواتین پہلوان، ریفری، ٹیمیں ، منیجر اور افسران اسطرح900؍ لوگ اورنگ آباد پہنچ رہے ہیں۔
***** ***** *****
 اورنگ آ باد میں 4؍ نومبر کو تیسرے بین الاقوا می بُدھِسٹ فیسٹیول کا انعقاد کیا جا رہا ہے۔ تقریب کی شروعات جبِندا  اسٹیٹ پر صبح8؍ بجے ہو گی۔ بُدھسٹ فیسٹیول میں ملک اور بیرون ملک سے نامور بودھ بھِکشو ،دانشور اور ادیب رہنمائی کریں گے۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



v फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः बदल

v २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोप निश्चित

v ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार

 आणि

v औरंगाबाद इथं २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्तीस्पर्धांचं आयोजन

*****



 दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने अंशतः बदल केला आहे. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी देण्याचा निर्णय हा फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नव्या आदेशानुसार फटाके फोडण्याची वेळ ठरवण्याचे अधिकार न्यायालयानं राज्यांना दिले आहेत. मात्र फटाके फोडण्याचा कालावधी दोन तासच राहील, असं स्पष्ट नमूद केलं आहे. दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे, सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं, एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती, त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं.

****



 देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पानजिक साधू बेटावर उभारलेल्या या १८२ फूट उंच पुतळ्याचं काम विक्रमी वेळात पूर्ण झालं आहे.

     

 दरम्यान, सरदार पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज देशभर एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद, उस्मानाबादसह सर्वच ठिकाणी आत्ता सकाळी एकता दौडचं आयोजन करण्यात येत आहे.



 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळली जात आहे. यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

****



 २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएच्या विशेष न्यायालयानं कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतरांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. सातही आरोपींवर दहशतवादाचा कट रचणं, हत्या आणि बेकायदेशीर कावाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची कर्नल पुरोहितची विनंतीही न्यायालयानं फेटाळून लावली.

****



 राष्ट्र संतांच्या विचारात समाज परिवर्तनाची शक्ती असून, राष्ट्र संतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधल्या गुरुकुंज मोझरी इथं काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी समारंभा ते बोलत होते. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूप दर्शन दिलं असून, स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनच घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 मुंबईतल्या अरबी समुद्रावरच्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदलणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. २४ तारखेला या स्मारकाचं काम प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी जात असलेली बोट समुद्रात उलटून एकाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर स्मारकाची जागा बदण्याची मागणी होत होती. या प्रकल्पासाठी सरकारनं जागेसह सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवलेल्या असून, कामाला सुरुवातही झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

****



 महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांची साखर संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संघाचे सदस्य माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

****



 राज्यात संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नोव्हेंबर २०१८ मध्ये राबवण्यात येणाऱ्या वैरण बियाणे वितरण योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. सिंचन सुविधा असलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना वैरणीची बियाणं तसंच खतं शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार असून १० गुंठे  क्षेत्राकरता ४६० रुपये तर १ हेक्टर क्षेत्रासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

****



 राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीची हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होत आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सर्व प्रवास भाड्यात १० टक्के हंगामी वाढ असणार आहे. २१ नोव्हेंबरपासून पुन्हा मूळ प्रवासभाडे लागू होईल.

****



 राज्यातल्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली. वीज कामगार, अभियंते आणि अधिकारी यांना पंधरा हजार रूपये तर विद्युत आणि इतर सहाय्यक अभियंते तसंच प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना नऊ हजार रूपये बोनस मिळाणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांच्या त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले देव यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काल पहाटेपूर्वी त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.



 आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागातून आपल्या सांगितिक कारकिर्दीला प्रारंभ करणारे यशवंत देव यांनी, चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांवर आपला वेगळा ठसा उमटवला. आकाशवाणीवरून ते सादर करत असलेला भावसरगम हा कार्यक्रम संगीत रसिकांच्या खास पसंतीस उतरला होता. शब्दप्रधान गायकी हे संगीत वैशिष्ट्य असलेल्या देव यांना, गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.



 दरम्यान, देव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शब्द - सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचं विश्व समृध्द करणारा अस्सल कलावंत हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****



 हिंगोली इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्रतापराव देशमुख किल्लेवडगावकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर कळमनुरी तालुक्यात, किल्लेवडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात देशमुख यांचं मोठं योगदान आहे.

****



 येत्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार आलं तर पेट्रोलचे दर प्रतिलीटर ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू, असं आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. ते काल जालना इथं काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत बोलत होते. काँग्रेस देशाच्या संविधानाचे रक्षण करीत आहे, असं सांगून शासनानं दुष्काळ जाहीर करुन एकरी ५० हजार रूपयांची मदत देऊन खरीप कर्ज माफ करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****



 जालना जिल्ह्यात अनेक तरुण, महिला आणि बचत गटांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी जुन्या उद्योगात वाढ करण्यासाठी मुद्रा ऋण योजनेचा आधार घेत उद्योग-व्यवसाय भरभराटीला आणला आहे. जालना जिल्ह्यातल्या संजिवनी जाधव यांनी या विषयी  आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या….

मी २०१०ला  अक्टीव्ह महिला बचत गटाची स्थापना केली. २०१०लाच मी उद्योगाला सुरूवात केली. ३-४ वर्षांत माझ्या व्यवसायाची उलाढाल हि लाखोरूपयात येऊ लागली. महाराष्ट्र बँकाने मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गतच्या मला ४लाख रूपये कर्ज उपलब्ध केले आहे. त्याचे रूपांतर क्यॉश, केडीट मध्ये केले असून, मला त्याचा चांगला लाभ होत आहे. लवकर माझा व्यवसाय जालना एम.आय.डी.सी. उभा राहत आहे. मुद्रा या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे धन्यवाद.

****



औरंगाबाद इथं येत्या २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्तीस्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण - साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील ११२ विद्यापीठांतल्या मल्ल, पंच, संघ, व्यवस्थापक, अधिकारी अशा एकूण ९०० जणांचा सहभाग असणार आहे.

****



 पाचवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन येत्या २ आणि ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण इथं होणार आहे. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयावर सात परिसंवाद राहणार आहेत.

****



 औरंगाबाद इथं येत्या चार नोव्हेंबरला तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या जबिंदा इस्टेट इथं सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, देश विदेशातले प्रमुख बौध्द भिक्खू संघ, विद्वान साहित्यिक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

****



 परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं काल गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत गोवर रुबेला या आजाराविषयी मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मन्मथ महाराज यांनी या आजाराविषयी आणि उपचार, लसीकरणाविषयी मार्गदर्शन केलं.

****



 औरंगाबाद शहरातल्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व जलकुंभांवर संरक्षण देण्याची मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

*****

***

Tuesday, 30 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 10 2018 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 10 2018 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 दिवाळीच्या काळात पर्यावरण पूरक, आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी देण्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. पर्यावरण पूरक फटाके वापरण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. बाकी देशभरात सामान्य फटाके फोडता येतील, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. फटाके फोडण्याची वेळ तामिळनाडू तसंच पुद्दुचेरी सारख्या राज्यात बदलून दिली जाईल, मात्र दिवसभरात ती दोन तासांपेक्षा अधिक नसेल, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे, सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं, एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती, त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं.

****



 दिल्लीतल्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं १५ वर्ष जुनी पेट्रोल वाहनं आणि १० वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घातली आहे. अशी वाहनं रस्तात आढळल्यास ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. अशा वाहनांची यादी केंद्रीय प्रदूषण नियामक बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करून, याबाबत जनजागृती करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला प्रवासी भारतीयांच्या विवाहाशी संबंधित प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी एक कक्ष स्थापन करण्यास सांगितलं आहे. प्रवासी भारतीय परित्यक्त्या महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवर काय निर्णय घेण्यात आले, याचा गांधी यांनी आढावा घेतला, या महिलांकडून खटला चालवणाऱ्या वकीलांनी राष्ट्रीय महिला आयोगासोबत साप्ताहिक समिक्षा बैठका घ्याव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

****



 पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याताला मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीनं त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या अर्जाविरोधात विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत, नीरव मोदीतर्फे काल १० याचिका दाखल करण्यात आल्या.

****



 आसाममधे काझीरंगा इथं आजपासून सार्वजनिक आरोग्य देखभाल व्यवस्थेसंदर्भात तीन दिवसांची पाचवी राष्ट्रीय परिषद सुरु होत आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल. विविध राज्यं आणि संघटनांद्वारे आरोग्य क्षेत्रात राबवल्या जात असलेल्या कौशल्यपूर्ण कार्यप्रणाली आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करणं हा या परिषदेचा उद्देश आहे.

****



 थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. भारताच्या परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. भाभा यांनी देशातल्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थानांचा पाया रचला, त्यांनी दिलेल्या या वारशाचा देशाला अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती इथं, नियोजित रा. सू. गवई स्मारक संकुलाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.



ऐ चालता- फिरता येनसायक्डो पिडीया, जमिनीवरचा प्रचंड अनूभव. अनेक वेळा आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतात. एक जमिनीवर काम करणारे, जमिनीवरचा अनूभव असलेले आणि दुसरे प्रचंड त्यांना ज्ञान असणं पण या दोन्ही गोष्टीचा संगम होतो. सामान्य माणसाच्या अपेक्षा काय आहे.? त्यांची दु्‌:ख काय आहे. ही माहिती असलेले दादासाहेब होते.  



****



 औरंगाबाद शहरातल्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व जलकुंभांवर संरक्षण देण्याची मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. पाणी पुरवठ्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, काल सिडको एन पाच इथल्या जलकुंभावर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****



बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर बी. अधिबान यानं इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडॅम्सचा पराभव करुन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. या विजयामुळे साडे सहा गुण मिळवत तो सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.

 *****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 10 2018 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 10 2018 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चिकनगुनिया झाल्याच्या तक्रारीवरून देव यांना गेल्या १० ऑक्टोबर रोजी मुंबईत दादर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान, आज पहाटे त्यांचं निधन झालं.



 शब्दप्रधान गायकी हे संगीत वैशिष्ट्य असलेल्या देव यांना, गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांवर यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.   

****



 हिंगोली इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्रतापराव देशमुख किल्लेवडगावकर यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर कळमनुरी तालुक्यात, किल्लेवडगाव या त्यांच्या मूळ गावी आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्रामात देशमुख यांचं मोठं योगदान आहे. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यात दोन्ही देशां३२ सामंजस्य करार झाले, तर ५७ जपानी कंपन्यांनी भारतात २५० कोटी डॉलरची गुंतवणूक करायचा निर्णय घेतला आहे, त्याबाबतच्या सहमती पत्रांची देवाण घेवाणही करण्यात आली. टोकियो इथं दोन्ही देशांमधल्या १३ व्या वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही नेते पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिनजो सहभागी झाले होते. तत्पूर्वी, दोन्ही नेत्यांनी द्वीपक्षीय, प्रादेशिक, आणि जागतिक विषयावर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत त्यांनी दोनास दोन संवादाची घोषणा केली. दोन्ही देशांनी सागरी क्षेत्रात माहितीची देवाण-घेवाण आणि सहकार्य वाढवण्याबाबतच्या करारावरही स्वाक्षऱ्या केल्या.

****



 अवैध गौण खनिज वाहतूक करताना बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी पकडलेल्या टिप्पर मालकाला दोन लाख २१ हजार रूपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. चिखली तालुक्यातल्या बेराळा फाटा इथं डांगे यांनी हा टिप्पर पकडला होता.

*****

***