Tuesday, 31 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      भारत तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राला १०९ कोटींहून अधिक रक्कम वितरित

·      राज्य शासनाच्या 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला उद्यापासून सुरुवात

आणि

·      भगवान महावीर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांसह विविध उपक्रम

****

भारत केवळ बदलाचा साक्षीदार नसून, तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या साणंद इथं आज केन्स सेमिकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

जागतिक पुरवठा साखळीतलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही ओ एस ए टी सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज सहा पूर्णांक तीन दशलक्ष युनिट्स उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प आधीच कॅलिफोर्निया-स्थित कंपनीला इंटेलिजेंट पॉवर मॉड्यूल्सचा पुरवठा करत असून, उत्पादनाचा मोठा वाटा निर्यातीसाठी निश्चित करण्यात आला आहे.

भारत सरकार एक परिपूर्ण सेमिकॉन परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करत असून, देशाला गरज असलेल्या चिपपैकी जास्तीत जास्त चिप भारत स्वदेशात बनवेल, असं सांगून पंतप्रधानांनी, यावर्षीच्या अर्थसंकल्पातल्या, सेमिकॉन व्हिजन टू घोषणेचा उल्लेख केला. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

आजचा दिवस खऱ्या अर्थाने “मेक इन इंडीया, मेक फॉर द वर्ल्ड” या भावनेचं प्रतीक आहे. या प्रकल्पात उत्पादन सुरू झाल्यामुळे भारत जागतिक बाजारपेठेत एक विश्वासार्ह सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात अनेक भारतीय कंपन्या जागतिक सहकार्याच्या माध्यमातून जगासाठी सक्षम आणि लवचिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी उभारण्यात योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी गांधीनगरमधल्या कोबा इथं ‘सम्राट संप्रती संग्रहालया’चं उद्घाटन केलं. नव्यानं स्थापन झालेल्या वाव-थराड जिल्ह्यात सुमारे १९ हजार ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या मघडा गावात आज सकाळी माता शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर सहाहून अधिक जण जखमी झाले. शीतलाष्टमीच्या पूजेसाठी मंदिरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या भाविकांच्या गर्दीमध्ये अचानक गोंधळ उडून ही चेंगराचेंगरी झाली. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर राज्य शासनाकडून प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

****

पंचायती राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १५व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानाला मंजुरी देऊन केंद्र सरकारनं निधी वितरित केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्राला २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात १०९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाली आहे. या अनुदानामुळे गावपातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल आणि गरजेनुसार विकासकामं राबवता येतील. ठरावीक उद्दिष्टांसाठी मर्यादित निधी आणि स्थानिक गरजेनुसार वापरता येणारा निधी, अशा दोन प्रकारचा हा निधी आहे.

****

राज्य शासनाच्या, 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला उद्या एक एप्रिलपासून सुरुवात होत आहे. ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती या अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. गाव पातळीवर आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले असून, या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारनं ८० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

****

२०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचं निर्मूल करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टात महाराष्ट्र शासनानं सक्रिय सहभाग घेतला आहे. या रोगाच्या निर्मूलनासाठी, ट्रिपल ड्रग थेरपी अर्थात तीन औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात लातूर, धाराशीवसह एकूण अठरा जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात ५५ लाख नागरिकांना या रोगासाठीच्या औषधोपचारांचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

**

छत्रपती संभाजीनगरमध्ये महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत, माझे शहर, माझी जबाबदारी, या उद्घोषणेवर आधारित देखावे सादर करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि एकतेचा संदेशही यावेळी देण्यात आला.

जालना शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सुमारे आठ हजार शुभ्रवस्त्रधारी समाजबांधव, महिला आणि मुलं सहभागी झाले होते. यामधल्या अहिंसा परमो धर्म, जिओ और जीने दो, या घोषणांमुळे आणि जागोजागी होणाऱ्या पुष्पवृष्टीमुळे या शोभायात्रेला भव्य सोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. भोकरदन, अंबड, परतूर इथंही शोभायात्रा काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरीकांसह बालगोपाळही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

बीड इथंही सकल जैन समाजतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेल्या रथाची शहरातून फेरी, रक्तदान, दंतचिकित्सा आणि फिजिओथेरपी शिबिरं, विविध धार्मिक कार्यक्रम आणि गौतम प्रसादीचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ मुंबईत आज पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि या विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनशे पंचावन्न विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.

****

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातल्या नदी आणि नाल्यांच्या काठावरची अतिक्रमणं हटवण्याची कारवाई उद्यापासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहेत. नालेसफाईच्या कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विशेषतः नारेगाव परिसरात नदीकाठावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यानं ते प्राधान्यानं हटवावं, असं त्यांनी सांगितलं. भविष्यात पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथल्या ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती कामांसाठी राज्य शासनानं तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मंदिराच्या संवर्धनासाठी यापूर्वीही विविध टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. नव्यानं मिळालेल्या या निधीमुळे संवर्धनाची अपूर्ण कामं पूर्ण होण्याला मदत होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यावर्षीच्या उन्हाळी परीक्षांसाठी अर्ज सादर करण्याला चार एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. RTGS द्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख सहा एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची लिंक उद्या, एक एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या दहा जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपच्या १३, एमआयएमच्या तीन इच्छुकांसह, शिवसेनेचे १५ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ जणांचा समावेश आहे. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२   दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी गांधीनगरमधील कोबा इथं ‘सम्राट संप्रती संग्रहालय’चं उद्घाटन केलं. हे संग्रहालय जैन इतिहास, सम्राट संप्रती यांचं जीवन, त्यांचा राज्यकारभार आणि अहिंसेचा संदेश यांना समर्पित आहे. या उपक्रमामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला नवी ओळख मिळण्यास मदत होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते साणंद इथं केनेस सेमिकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसंच नव्याने स्थापन झालेल्या वाव-थराड जिल्ह्यात सुमारे १९ हजार ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

****

जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि उत्तम जीवनाचा मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशवासीयांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंतीचा हा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचं जीवन कार्य तसंच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया या शिकवणीचं स्मरण करून देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महावीर जयंतीच्या औचित्यानं ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक महत्वाचं यश मिळवत, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स लिमिटेड,-जीआरएसई-या स्वदेशी कंपनीनं निर्मिती केलेल्या तीन युद्धनौका काल भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आल्या. यातली दुनागिरी ही युद्धनौका निर्धारित लक्ष्यावर मिसाईलनं अचूक मारा करण्यास सक्षम असून, संशोधक ही युद्धनौका सागरी किनारे आणि अन्य सागरी प्रदेशांचं सर्वेक्षण करणार आहे. अग्रय ही तिसरी युद्धनौका शत्रूंच्या पाणबुड्या नष्ट करण्याचं कार्य करेल. जीआरएसई या स्वदेशी कंपनीनं आतापर्यंत एकशे अठरा युद्धनौकांची निर्मिती केली असून, त्यातल्या ऐंशी युद्धनौका भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आल्या आहेत.

****

शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भातल्या आपल्या नव्या मार्गदर्शक नियमांच्या अंमलबजावणीला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. आता हे नियम एक एप्रिल ऐवजी एक जुलैपासून अंमलात येतील. बँका, शेअरबाजारातले मध्यस्थ आणि उद्योग संस्थांच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेनं हे निर्णय जारी केले होते.

****

जालना-देऊळगावराजा मार्गावर आज पहाटे ट्रकला झालेल्या अपघातात ट्रक चालकासह अन्य एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. सुरेश पालवे आणि बबलू लोंढे, अशी या मृतांची नावं आहेत. या रस्त्यावरच्या सेंट मेरी शाळेजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला ट्रक धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशात एक एप्रिलपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, अशा चार गटात वर्गीकरण, अनिवार्य केलेलं आहे.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. तीन एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, उद्या देवीचा जोगवा असेल.

दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेलाही काल प्रारंभ झाला. या यात्रेत दोन एप्रिल तसंच तीन एप्रिलला पालखी मिरवणूक आणि चुनखडी सोहळा होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथल्या शीतलादेवीच्या ऊर्फ पोचम्मादेवीच्या यात्रोत्सवालाही उत्साहात सुरवात झाली आहे. यानिमित्तानं ग्रामस्थांच्या वतीनं हनुमान मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

****

हवामान

राज्यात बहुतांश जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते नुकतंच गांधीनगर इथं महावीर जयंती निमित्त सम्राट संप्रती संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान अहमदाबाद जिल्ह्यात साणंद इथं केन्स सेमीकॉन प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर वाव-थराड इथल्या सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या प्रसंगी ते जनतेला संबोधित करणार आहेत.

****

देशात २०२७ च्या जनगणनेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला टप्पा उद्या म्हणजे १ एप्रिलपासून सुरू होणार असून तो येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे. याआधीची जनगणना २०११ मध्ये झाली होती. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा यांची माहिती घेतली जाणार आहे. यावेळी नागरिकांना प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, विशेष मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून माहिती भरता येणार आहे. हे पोर्टल १६ भाषांमध्ये उपलब्ध असेल. माहिती भरल्यानंतर नागरिकांना ११ अंकी 'AC ID' दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. दुस-या टप्प्यात जातीनिहाय गणनाही केली जाणार आहे.

****

पाइपद्वारे नैसर्गिक वायू  म्हणजे पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. असा अर्ज न करणा-यांचा एलपीजी पुरवठा तीन महिन्यांनंतर बंद होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी दिसणाऱ्या रांगा या भीतीपोटी झालेल्या खरेदीमुळे असल्याचे त्यांनी नमूद केलं आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

नक्षलवादाविरोधातल्या लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळवलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद काल झाली,त्यावेळी ते बोलत होते. माओवादाची चळवळ आता राज्यात नगण्य पातळीवर आली असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे, किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासन विशेष 'सी-60 पदक' देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पोलीस तपासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा वापर वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, हळद आणि कांदा बियाणे यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरसह पैठण तसंच सिल्लोड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.

परभणी शहर परिसरातही काल गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. बीड शहरातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकालाही फटका बसत आहे. अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथल्या दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आंबा पिकाचीही पडझड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गहू पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

अकोला जिल्ह्यातही काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून वीज कोसळल्यानं आठ मेंढा दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, राज्यात पुढच्या चार दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात अला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केली आहे.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या असून, भगवान महावीरांच्या आयुष्यातून आणि शिकवणुकीतून सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दिसतो, असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशवासियांना महावीरजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مارچ 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 31 March-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۱۳/مارچ ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ حکومت کی کاوشوں کے باعث نکسلائٹس سے متاثرہ علاقوں تک بھی ترقی پہنچ چکی ہے: وزیرِ داخلہ امیت شاہ کا لوک سبھا میں اظہارِ خیال۔
٭ کل سے ملک بھر میں مردُم شماری 2027 کے عمل کا آغاز۔
٭ عالمی عدم استحکام کے باوجود بھی ہندوستانی معیشت کی بنیادیں مستحکم: مرکزی وزیرِ خزانہ کا اظہارِ اعتماد۔
٭ بھگوان مہاویر جینتی پر آج مختلف پروگراموں کا انعقاد۔
اور۔۔۔٭ متعدد اضلاع میں زوردار غیر موسمی بارش؛ جالنہ ضلع میں بجلی گرنے سے دو افراد کی موت۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
مرکزی وزیرِ داخلہ امیت شاہ نے کہا ہے کہ وزیرِ اعظم نریندر مودی کی زیرِ قیادت حکومت نے نکسل ازم کے خلاف فیصلہ کُن اقدامات کے ذریعے نکسل متاثرہ علاقوں تک ترقی پہنچانے میں کامیابی حاصل کی ہے۔ کل لوک سبھا سے خطاب کرتے ہوئے انھوں نے کہا کہ گذشتہ عشرے میں ملک میں نکسلائٹس سے متعلق پُرتشدد واقعات میں قابلِ ذکر کمی آئی ہے اور کئی نکسلائٹس نے خودسپردگی کی ہے۔ 2024 سے اب تک چھتیس گڑھ میں دو ہزار سے زیادہ نکسلائٹس جنگجوؤں نے مرکزی دھارے میں شمولیت اختیار کی ہے۔ شاہ نے کہا کہ گذشتہ برس یعنی 2025 میں 300 سے زائد نکسلائٹس مختلف وارداتوں میں ہلاک ہوئے اور 800 سے زائد جنگجوؤں کو گرفتار کیا گیا۔ جو عسکریت پسند ہتھیار ڈال دیتے ہیں ان سے مذاکرات کیے جائیں گے لیکن گولی باری پر آمادہ افرادکو گولی سے ہی جواب دیاجائے گا۔ انھوں نے کہا:
Byte: Home Minister Amit Shah
***** ***** *****
ملک بھر میں کل سے ”مردم شماری 2027“ کے عمل کا آغاز ہورہا ہے۔ ملک میں یہ مجموعی طور پر 16 ویں اور آزادی کے بعد کی آٹھویں مردم شماری ہے۔ ملک کے رجسٹرار جنرل اور مردم شماری کمشنر مرتیونجئے کمار نارائن نے کل نئی دہلی میں یہ اطلاع دی۔ دو مرحلوں میں ہونے والے اس عمل میں یکم اپریل تا 30 ستمبر کے دوران ریاستی حکومتوں اور مرکز کے زیرِ انتظام علاقوں میں مکانات کی فہرست تیار کرنے کا کام کیا جائے گا۔ انھوں نے کہا:
Byte: Census Commissioner Mritunjay Kumar Narayan
انھوں نے مزید کہا کہ مردم شماری کے پہلے مرحلے کا سوالنامہ پہلے ہی جاری کیا جاچکا ہے اور دوسرے مرحلے کے سوالات عنقریب جاری کیے جائیں گے اور دوسرے مرحلے میں ذات کی بنیاد پر مردم شماری کی جائیگی۔
***** ***** *****
مرکزی وزیرِ خزانہ نرملا سیتا رَمن نے کہا ہے کہ ہندوستانی معیشت کی اساس اور بنیادی ڈھانچہ عالمی عدم استحکام کے اس دور میں بھی مضبوط ہے۔ گذشتہ روز لوک سبھا میں وقفہئ سوالات کے دوران انھوں نے کہا کہ جنگ کی موجودہ صورتحال کے باعث دنیا بھر کے ممالک کی کرنسی متاثر ہوئی ہے لیکن بھارت میں مہنگائی کم ہوئی - جی ڈی پی میں سات فیصد سے زائد کی شرح سے بڑھ رہی ہے اور کرنٹ اکاؤنٹ خسارہ ایک فیصد سے کم ہوا ہے۔ انھوں نے کہا:
Byte: Finance Minister Nirmala Sitharaman
***** ***** *****
ملک میں یکم اپریل سے کوڑا کرکٹ ضائع کرنے سے متعلق ”گھن کچرا ویوستھاپن ضابطہ 2026“ لاگو کیا جارہا ہے۔ اس قانون کے تحت کوڑا کرکٹ جہاں پیدا ہوتا ہے اسی مقام پر گیلا کچرا‘ سوکھا کچرا‘ حیاتیاتی کوڑا کرکٹ اور خصوصی توجہ کی ضرورت والے کچرے کو چار علیحدہ علیحدہ زمروں میں بانٹ کر جمع کیا جانا لازمی ہے۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
پائپ لائن کے ذریعے طبعی گیس یعنی PNG کی سہولت والے شہروں میں عوام کو اندرونِ تین ماہ پی این جی کنکشن کے درخواست دینا لازمی ہوگا۔ اغذیہ اور شہری رسدکے وزیر چھگن بھجبل نے کل ممبئی میں ایک اخباری کانفرنس میں یہ اطلاع دی۔ انھوں نے کہا کہ شہریوں کے ابہام اور خوف کو دور کرنے کیلئے راشن دکانوں کو تین ماہ کا راشن پیشگی دینے کی اجازت دی گئی ہے۔ علاوہ ازیں مٹی کے تیل کی تقسیم بھی شروع کردی گئی ہے۔
***** ***** *****
کسانوں کے مختلف مسائل کے حل کیلئے کانگریس پارٹی نے کل دھاراشیو ضلع کے سورت گاؤں تا تلجاپور شیتکری نیائے یاترا نکالی۔ کانگریس کے ریاستی صدر ہرش وردھن سپکاڑ کی زیرِ قیادت نکالی گئی اس یاترا میں کانگریس عہدیداران‘ خواتین اور کسانوں نے بڑی تعداد میں شرکت کی۔
***** ***** *****
جین مذہب کے 24 ویں تیرتھنکار بھگوان مہاویر کی جینتی آج منائی جارہی ہے۔ صدرِ جمہوریہ دروپدی مُرمو نے مہاویر جینتی کی مناسبت سے جین سماج کو مبارکباد پیش کی ہے۔ اس ضمن میں مختلف مقامات پر مذہبی اور سماجی شوبھا یاترائیں نکالی جارہی ہیں۔ دھاراشیو شہر میں کل ہی سکل جین سماج کی جانب سے ایک ریلی نکالی گئی۔ جس میں کم عمر بچوں نے یکجہتی کا پیغام دیتے ہوئے بہترین رقص پیش کیا۔
***** ***** *****
تلجاپور میں تلجابھوانی دیوی کے چیترپورنیما اُتسو کا کل سے آغاز ہوا۔ تین اپریل تک چلنے والے اس اُتسو میں آج‘ کل اور پرسوں مسلسل تین دن جلوس نکالے جائیں گے۔ اس اُتسو میں عقیدت مندوں کی متوقع بڑی تعداد کے پیشِ نظر مندر ٹرسٹ کی جانب سے معقول انتظامات کیے گئے ہیں۔
***** ***** *****
مراٹھواڑہ بھر میں کل غیر موسمی بارش ہوئی۔ چھترپتی سمبھاجی نگر ضلع میں بھی کل چند مقامات پر زوردار بارش ہوئی۔ پیٹھن اور سلوڑ تعلقوں سمیت چھترپتی سمبھاجی نگر شہر میں گرج چمک کے ساتھ بارش ہوئی۔ چند ایک مقامات پر ژالہ باری کی بھی خبر ہے۔ سلوڑ تعلقے میں بجلی گرنے سے چار مویشی ہلاک ہوگئے۔
پربھنی شہر میں کل ژالہ باری کے ساتھ بارش ہوئی۔ بیڑ ضلع میں بھی تیز ہواؤں کے ساتھ غیر موسمی بارش ہوئی۔
جالنہ شہر کے ساتھ ضلع بھر میں کل گھن گرج کے ساتھ زوردار بارش ریکارڈ کی گئی۔ اس غیر موسمی بارش کے باعث گندم‘ چنا‘ مکا اور پیاز کے بیج کی کھڑی فصلوں کو نقصان پہنچنے کا خدشہ ہے۔ تیز ہواؤں کے سبب آم کی فصل بھی متاثر ہورہی ہے۔ عنبڑ تعلقے کے مہاکاڑہ موضع میں بجلی گرنے سے دو نوجوان ہلاک ہوگئے۔ یہ دونوں نیانیشور آپے گاؤں کے مہادیو مندر میں درشن کیلئے جارہے تھے۔
دریں اثناء ریاست میں آئندہ چار دنوں میں زوردار بارش کی پیش گوئی محکمہ موسمیات نے کی ہے۔ بیڑ ضلع میں آئندہ دو دِنوں کیلئے آرینج الرٹ‘ جبکہ جالنہ اور ناندیڑ میں یلو الرٹ جاری کیا گیا ہے۔ ان دو دنوں میں ان اضلاع میں زوردار بارش اور آندھی کی پیش گوئی کی گئی ہے۔ریاستی حکومت نے کسانوں کو کاٹی گئی فصلوں کی حفاظت کرنے کی۔۔۔
***** ***** *****
ناندیڑ میونسپل کارپوریشن کی 47 خدمات اب مکمل طور پر آن لائن دستیاب ہیں۔ ان خدمات کیلئے قائم کردہ کنٹرول روم کا سابق وزیرِ اعلیٰ اوررکنِ پارلیمان اشوک چوہان کے ہاتھوں کل افتتاح عمل میں آیا۔ شہریوں کو اب میونسپل کارپوریشن آئے بغیر گھر بیٹھے ہی مختلف رسیدیں اور لائسنس مل سکیں گے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ حکومت کی کاوشوں کے باعث نکسلائٹس سے متاثرہ علاقوں تک بھی ترقی پہنچ چکی ہے: وزیرِ داخلہ امیت شاہ کا لوک سبھا میں اظہارِ خیال۔
٭ کل سے ملک بھر میں مردُم شماری 2027 کے عمل کا آغاز۔
٭ عالمی عدم استحکام کے باوجود بھی ہندوستانی معیشت کی بنیادیں مستحکم: مرکزی وزیرِ خزانہ کا اظہارِ اعتماد۔
٭ بھگوان مہاویر جینتی پر آج مختلف پروگراموں کا انعقاد۔
اور۔۔۔٭ متعدد اضلاع میں زوردار غیر موسمی بارش؛ جالنہ ضلع میں بجلی گرنے سے دو افراد کی موت۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलप्रभावित भागांमध्ये विकास पोहचला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेत निवेदन

·      उद्यापासून देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला प्रारंभ

·      जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत-केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

·      भगवान महावीर जयंतीचा आज सर्वत्र उत्साह

आणि

·      बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका, जालना जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा देऊन, नक्षलग्रस्त भागात विकास पोहोचवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत या विषयावर निवेदन करत होते. गेल्या दशकात देशात नक्षलवादी हिंसाचारात लक्षणीय घट झाली असून, अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी सांगितलं. २०२४ पासून छत्तीसगडमध्ये दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला, २०२५ मध्ये ३०० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आणि ८०० हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जे शस्त्र खाली ठेवतील त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, पण गोळीबार करणाऱ्यांना गोळ्यांनी प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.

 

****

देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. देशातली ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी काल दिल्लीत ही माहिती दिली.

दोन टप्प्यात होणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत एक एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून घरांची यादी तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले:

बाईट- जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण

 

जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच प्रसिद्ध केले जातील, असं मृत्युंजय कुमार यांनी सांगितलं. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातिनिहाय गणना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे, तर आपल्या देशात महागाई कमी झाली, एकूण देशांतर्गत उत्पन्न – जीडीपी सात टक्क्याहून अधिक दराने वाढत आहे, आणि चालू खात्यातली तूट एक टक्क्याहून कमी असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

****

देशात एक एप्रिलपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, अशा चार गटात वर्गीकरण, अनिवार्य केलेलं आहे.

****

पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी, स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने काल धाराशिव जिल्ह्यात सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत काँग्रेस पदाधिकारी, महिला तसंच शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

धाराशिव शहरातून सकल जैन समाजाच्या वतीनं काल शोभायात्रा काढण्यात आली. एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. तीन एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात आज, उद्या आणि परवा देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, उद्या देवीचा जोगवा असेल. या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर संस्थानच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

 

दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेलाही काल प्रारंभ झाला, या यात्रेत दोन एप्रिल तसंच तीन एप्रिलला पालखी मिरवणूक आणि चुनखडी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंब मार्गावरील अवजड वाहनं अन्य मार्गाने वळवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले.

****

मराठवाड्यात सर्वत्र काल अवकाळी पाऊस पडला.

छत्रपती संभाजीनगरात काल जोरदार पाऊस झाला. पैठण तसंच सिल्लोड तालुक्यासह छत्रपती संभाजीनगरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली.

परभणी शहर परिसरातही काल गारपिटीसह पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड शहरातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकालाही फटका बसत आहे. अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथल्या दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. गोविंद लहाने आणि आदित्य बेद्रे हे दोघे विज्ञानेश्वर आपेगाव इथल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असताना, ही दुर्घटना घडली.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आंबा पिकाचीही पडझड झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

दरम्यान, राज्यात पुढच्या चार दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात अला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना केली आहे.

****

नांदेड महापालिकेच्या ७४ सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांच्या संनियंत्रणासाठी उभारलेल्या 'अविरत कक्षा'चं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना आता पालिकेत न येता घरबसल्या विविध दाखले आणि परवाने मिळवता येणार आहेत.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...